Skip to main content

ताज्या घडामोडी- फेब्रुवारी २०२२ - भाग ४

लेखक निनाद यांनी सोमवार, 21/02/2022 16:51 या दिवशी प्रकाशित केले.
सोशल मीडिया पोस्टवरून कर्नाटकमध्ये २६ वर्षीय हिंदू कार्यकर्त्याची हत्या. अभिनेत्री कंगना रणौत आणि रवीना टंडनपासून ते भाजप नेते आणि समाजातील प्रमुख सदस्यांनी हर्षाच्या थंड रक्ताच्या हत्येबद्दल संताप व्यक्त केला आहे. रुपेश कुमारचीही झारखंडमध्ये याच मानसिकतेच्या लोकांनी हत्या केली गेली आहे. भारतात हिंदु असुरक्षित होत चालले आहेत.

वाचने 15982
प्रतिक्रिया 119

प्रतिक्रिया

पोषण आहाराचा 281 पोते तांदूळ नाशिकमध्ये जप्त; टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रताप महिला बचत गटामुळे उघड https://www.tv9marathi.com/crime/281-bags-of-nutritious-rice-seized-in-… नाशिकमधील 13 कंत्राटदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यात आली होती. मात्र, ही कारवाई मागे घेण्यासाठी काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांनी जोर लावला होता. सातत्याने लेखी पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच शिक्षणंत्री वर्षा गायकवाड यांनी बैठक घेतली. आमदारांच्या या भूमिकेमुळे महिला बचत गटांमध्ये तीव्र असंतोष आहे. ह्या राजवटीत नक्की काय चालले आहे?

ईडीच्या धाडींवर मुख्यमंत्र्यांची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले, “जणूकाही महाराष्ट्र देशातला सगळ्यात सडका…”! https://www.loksatta.com/maharashtra/shivsena-uddhav-thackeray-targets-… साधू हत्याकांड ते नाशिक मधले तांदूळ घोटाळा प्रकरण, हे बघता, माझ्या सारख्या सर्वसामान्य जनतेला, असेच वाटते.... कर नाही त्याला डर कशाला?

युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी पंतप्रधान मोदींशी साधला संवाद; पाठिंब्याचे केले आवाहन https://www.loksatta.com/desh-videsh/russia-ukraine-war-live-updates-uk… यूक्रेन बेबरवशी आहे ... चीनने आणि पाकिस्तानने देखील, उपकाराची फेड अपकारानेच केली आहे... आणि मदत करायचचीच असेल तर, आत्ताच दामदुप्पट भावाने वसुली करणे योग्य... हा देश आधी देखील भारताच्या विरोधात होता आणि नंतर देखील फिरणार ..

In reply to by कॉमी

थोडी माहिती घ्या नाही मिळाली तर सांगा .. मी नक्कीच देईन युक्रेनने आपल्याला, युरोनियम दिलेले नाही, हा पण त्यातलाच एक मुद्दा ...

In reply to by मुक्त विहारि

तो मुद्दा नव्हता, युक्रेनने भारताला मदत केली नाहीचे. दामदुप्पट घेणे म्हणजे काय घ्यायचे ? आणि इतक्या वेळ भारत रशियाच्या विरोधात का बोलत नाहीये (अमेरिका आणि युरोपचे प्रेशर असूनही) यावर तुम्ही विचार करा!

In reply to by कॉमी

*मदत करायचीच असेल तर .....* खनिज संपत्तीत वाटा, सरकारी कंत्राटे, इत्यादी मार्गाने, वसुली करायची...

In reply to by मुक्त विहारि

मदत करू शकणार नाही हे न समजायला युक्रेन चे राष्ट्र अध्यक्ष अंध भक्त आहेत काय. विहिरी च काय च्या काय असते.

“युक्रेनमधील भारतीयांना काहीही होणार नाही”, रशियाचे अध्यक्ष पुतीन यांचा मोदींना शब्द https://www.loksatta.com/desh-videsh/russian-president-putin-assure-saf… ह्या केंद्र सरकारवर माझा तरी विश्र्वास आहे ... अर्थात, अशा यशाचे श्रेय घेणारे खूप जण निघतील...

In reply to by मुक्त विहारि

ह्या केंद्र सरकारवर माझा तरी विश्र्वास आहे ... कोरोनानिधी कुठे गेला?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कारण, मला आणि माझ्या कुटुंबातील व्यक्तींना, करोनाची लस फुकट मिळाली....

हल्ली ठराविक लोक कशावर पण आणि कोणावर पण विश्वास ठेवत आहेत.देव त्यांचे भले करो.

आज बघितले. भारताचा तिरंगा इमारतीवर लावला असेल तर रशिया त्या वर हल्ला करत नाही बस च्या पुढे तिरंगा लावला असेल तर युक्रेन आणि रशिया दोन्ही देशाचे सैनिक ती बस चेक करत नाहीत. प्रवासी लोकांची कागद पत्र,त्यांची लोक बघत नाहीत त्यांनी सैन्याचा dasta सुरक्षा पुरवतो. कारण मोदी नी दोन्ही देशांना दम दिला आहे. हे असले विचित्र,बिनडोक ,व्हॉट्स ॲप फॉरवर्ड भक्त virul करत आहेत. आणि भक्त त्यावर विश्वास ठेवून पुढे ढकलत आहेत अशी बिनडोक प्रजा जर भारतात असेल तर नेपाल पण भारतावर हजारो वर्ष राज्य करेल. फक्त त्यांनी एकदा प्रयत्न केला पाहिजे

In reply to by sunil kachure

प्रत्येकवेळा सत्यपरिस्थिती नक्की काय आहे हे ते तपासून न बघता असले काही लिहिलेच पाहिजे का? https://www.ndtv.com/education/print-indian-flag-paste-on-vehicles-emba… ही एन.डी.टी.व्ही ने दिलेली बातमी आहे म्हणजे ती चुकीची नसावी. अजून एक- किव्हमधील भारतीय दूतावासाने पुढील मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यात झेंड्याचा स्पष्ट उल्लेख आहे. जमल्यास वाचा आणि ते न समजल्यास पुढील ट्विटमधील नुसते फोटो बघितले तरी चालतील. त्यात जे काही दिसत आहे त्याला भारताचा झेंडा म्हणतात असे मला पामराला तरी वाटते. अर्थात तुमच्यासारख्या अंधगुलामांना * असले काही करू नका असे मी तरी अजिबात म्हणणार नाही. असलेच प्रकार अजून करा. सत्य परिस्थिती काय आहे हे समजून यायला वेळ लागत नाही आणि ते समजल्यावर आणखी काही मते आमच्या बाजूला वळतीलच. *: अंधगुलाम वगैरे शब्द वापरायला आवडले नसते पण या महाशयांनी अंधभक्त असे म्हटले आहे त्यामुळे त्यांना समजेल अशाच भाषेत उत्तर दिले तरी त्याने फार काही बिघडू नये.

शेतकर्‍यांना दिवसातून १० तास वीज मिळायला हवी म्हणून शेतकर्‍यांनी आंदोलन सुरू केले आहे. मोदी सरकार कसा शेतकर्‍यांवर अन्याय करत आहे हे लिहिण्यापूर्वी ते ठिकाण कुठचे आहे हे आधी बघा. या आंदोलनात संतप्त शेतकर्‍यांनी सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज येथील महावितरणचे कार्यालय जाळले आहे. मागच्या शेतकरी आंदोलनाच्या वेळेस शेतकर्‍यांचे अन्नदाता वगैरे म्हणत तोंड फाटेस्तोपर्यंत कौतुक करणारे लिब्बू विचारवंत कुठे आहेत आता? की शिवसेना या नवसेक्युलर पक्षाने चालविलेल्या सरकारविरोधात हे आंदोलन असल्याने या आंदोलनाची दखल घेतली जाणार नाही?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

देशात विविध आर्थिक स्तरातील लोक अशें. जसे विविध भाषिक आहेत तस विविध आर्थिक स्तरावरील लोक आहेत हे भाषिक लोक देशात नकोत ह्या आर्थिक स्तरातील लोक देशात नको.. हे bjp मूर्ख उजवे ह्यांनी जाहीर करावे.सर्व बाहेर पडतील देशातून शेतकरी समाजाच्या अडचणी आहेत खूप प्रश्न आहेत ते सोडवणे राज्य करते म्हणून bjp चे कर्तव्य आहे.त्यांची कुवत नसेल तर ..त्यांना घृणा वाटत असेल तर सराव bjp आणि मूर्ख उजवे ह्यांनी त्यांना न आवडणाऱ्या लोकांना देश सोडायला सांगावे ..ते त्यांच्या भू भागात सहित वेगळे होतील उजव्या फालतू भारतात राहण्या साठी ते बिलकुल ustuk नाहीत

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सोडवायला स्पाईसजेट बुखारेस्ट आणि बुडापेस्टसाठी विशेष विमाने चालवणार आहे. युक्रेनची हवाई हद्द बंद असल्याने किव्हला विमाने जाऊ शकत नाहीत. स्पाईसजेटने ऑगस्टमध्ये काबूलमध्ये अडकलेल्या भारतीयांना सोडवायला पण विमाने पाठवली होती. बाकी काही नाही तरी सरकारी मालकीची विमानकंपनी नसेल तर अशाप्रसंगी परदेशात अडकलेल्या भारतीयांना वाचवता येणार नाही असे कोणीतरी म्हणत होते ना? मिपावरच वाचल्याचे आठवते. कोण आहे रे तिथे असे म्हणणारे?