गाभा:
गोव्यात प्रमोद सावंत यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री फिलीप नेरी रॉडरीग्ज यांनी मंत्रीपदाचा आणि आमदारपदाचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करायचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर विफ्रेड डिसा या आमदारांनीही भाजप सोडून काँग्रेसमध्ये जायचा निर्णय घेतला आहे. हेच दोन आमदार जुलै २०१९ मध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये आले होते. ते आता स्वगृही चालले आहेत. परवाच बघितले की २०१७ मध्ये निवडणुका झाल्यानंतर गोवा विधानसभा निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या ४० आमदारांपैकी २४ आमदारांनी पक्षांतर केले आहे.आता हे आणखी दोन आमदार दुसर्यांदा पक्षांतर करत आहेत. विधानसभेत निवडून आलेल्या ६०% आमदारांनी पक्षांतर केले असे दुसरे उदाहरण बघायला मिळणे अशक्यच वाटते. आता तरी निवडणुकीत पक्षांतर करायची शक्यता नसलेल्यांनाच लोकांनी निवडून द्यावे ही अपेक्षा.
प्रतिक्रिया
19 Jan 2022 - 9:06 pm | धर्मराजमुटके
नगरपंचायत आणि जिल्हा परिषदेचे १०६ पैकी ९७ निकाल हाती आले असून त्यापैकी
भाजपा (३८४ ) पहिल्या क्रमांकावर असून यानंतर अनुक्रमे राष्ट्रवादी (३४४), काँग्रेस (३१६) आणि शिवसेनेचा (२८४) क्रमांक आहे. मात्र असे असूनही भाजपा सोडून इतर उरलेले पक्ष आपापसात मांडवली करुन सत्ता मिळवतील. त्यामुळे भाजपा ला केवळ जागा वाढल्या किंवा पहिला क्रमांक आला म्हणून खुश होता येणार नाही.
मनसे आणि इतर पक्ष यांची काय स्थिती आहे हे आजच्या बातम्यांत नीट कळले नाही. मात्र भाजपाला आता एकंदरीतच कोणत्याही मित्रपक्षाशिवाय एकहाती सत्ता मिळविणे अवघडच दिसते आहे.
19 Jan 2022 - 9:22 pm | चंद्रसूर्यकुमार
नगरपरीषदांचे निकाल स्थानिक पातळीवरील मुद्द्यांवरून असतात. मतदार लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्येही मतदान करताना फरक करतात. तेव्हा नगरपरीषदांच्या निवडणुकांवरून विधानसभा-लोकसभेत काय होईल हे भाकित करणे धाडसाचे आहे. नगरपरीषद निवडणुकांमध्ये स्थानिक उमेदवार ओळखीचा असणे/लोकप्रिय असणे/स्थानिक पातळीवर केलेल्या मदतीमुळे त्याला मत देणे वगैरे मुद्दे अधिक प्रमाणावर येतात. ते विधानसभेला अजून कमी आणि लोकसभेला त्याहूनही कमी प्रमाणावर लागू होतात. अगदी विधानसभा-लोकसभा पोटनिवडणुक आणि राष्ट्रीय निवडणुक यातही मतदार फरक करतात कारण त्यावेळी त्यांना मुख्यमंत्री/पंतप्रधान निवडायचा नसतो तर स्थानिक आमदार/खासदार निवडायचा असतो. मी काही भाजप आरामात बहुमत मिळवेल असे म्हणत नाहीये पण या निकालांवरून तसे होणारच नाही हे म्हणण्यायोग्य आधार आहे असे वाटत नाही.अपवाद असेल मुंबई महापालिका निवडणुकांचा. त्या निवडणुकाही स्थानिक पातळीवर लढविल्या जाणार असल्या तरी ब्रिटिश साम्राज्यात भारताचे किंवा इंग्लंडच्या राणीच्या मुकुटात कोहिनूर हिर्याचे जे स्थान आहे तेच शिवसेनेसाठी मुंबई महापालिकेतील सत्तेचे आहे. तिथे पराभव झाल्यास शिवसेनेला तो जिव्हारी लागेल आणि पक्षाच्या आत्मविश्वासावर त्यामुळे खूप परिणाम होईल.पण कुठल्याकुठल्या नगरपरीषद निवडणुकांबद्दल असेच म्हणता येईल असे वाटत नाही.
19 Jan 2022 - 9:28 pm | धर्मराजमुटके
मान्य. मात्र सांगायचा मुद्दा हा की मित्रपक्षांशिवाय कोणत्याही एका पक्षास सत्तेवर येणे अवघड आहे. त्यामुळे भाजपाला नवा आणि चांगला मित्र शोधावा लागणार आहे. मात्र शिवसेना ही त्यांची पहिली पसंत असेल तर अवघड आहे.
अवांतर : मी इतकी वर्षे वर्तमानपत्रे वाचत आहे पण नगर पंचायत हा शब्द पहिल्यांदाच ऐकल्यासारखा / वाचल्यासारखा वाटतो आहे. आजपर्यंत मी नगर परिषद, जिल्हा परिषद असेच शब्द ऐकले आहेत.
20 Jan 2022 - 12:02 am | Trump
पंचायत समिती तालुका पातळीवर असते.
19 Jan 2022 - 9:16 pm | धर्मराजमुटके
कोविड काळात अनेक लोकांचे रोजगार गेले मात्र याच काळात जगात सगळ्याच ठिकाणी नोकरीचे राजीनामे देण्याचे प्रकार मोठया प्रमाणात आढळून आले असे अनेक वृत्तपत्रे सांगत आहेत. नक्की काय कारण असावे ?
19 Jan 2022 - 11:46 pm | कासव
१. कोविड मुळे नुकसानच झाले असे नसून फायदे पण झाले. खूप लोकांना घरी बसून स्व कळला. आपण उगाच इतके दिवस पैश्याच्या मागे लागत होतो हे कळले.खूप लोकांनी निवृत्ती घेऊन किंवा काम कमी करून फिरायचे आणि कुटुंबाला वेळ द्यावा म्हणून राजीनामे दिले. ह्या मध्ये सिनियर लोक जास्त असतील ज्यांचे भविष्य साठी पुरेसे अर्थाजन झाले असेल
२. काही लोकांना दुसरे स्वतःच्या मनासारखे काम मग ते कमी पैश्या मध्ये का असेना ते करायचे आहे. त्यांनी राजीनामे दिले
३. स्वतःचा धंदा किंवा शेती करायची आहे म्हणून पण राजीनामे दिलेत
४. काही ठिकाणी खूप किंवा वेगळी skill असलेली माणसे मिळेनाशी झाली आहेत. अश्या वेळी उमेदवाराची bargening पॉवर वाढते आणि ते ६ - ६ महिन्यांनी जॉब बदलून जास्ती चा पगार मिळवत आहेत. अर्थात जुन्या ठिकाणी राजीनामा देऊन.
५. काही संस्थांनी स्वतःच काहीही करणा मुळे स्टाफ कमी करायचा ठरवला आहे. एवढ्या माणसाची गरज नाही म्हणून किंवा आर्थिक अडचणी म्हणून.
पण राजीनाम्याचे फॅड भारतात जास्त दिसले नाही. IT मध्ये हा ट्रेंड नक्कीच होता पण बाकीच्या क्षेत्रात नाही.
ही माझी मते किंवा निरीक्षणे आहेत.
20 Jan 2022 - 8:14 am | विजुभाऊ
नबाब मलीक आणि संजय राऊत यांना बातम्यांमधून बाहेर फेकलंय.
अनील देशमुखांना जामीन मात्र मिळत नाहिय्ये.
20 Jan 2022 - 9:30 am | चंद्रसूर्यकुमार
आपने गोव्यात मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून पणजीमधील वकील अमित पालेकर यांचे नाव घोषित केले आहे. त्यांनी गोव्यात अनेक गरीबांच्या केसेस कोणतीही फी न आकारता कोर्टात लढवल्या आहेत. जुन्या गोव्यात एका ऐतिहासिक वास्तूच्या ठिकाणी नवी इमारत बांधायच्या निर्णयाविरोधात त्यांनी आमरण उपोषण सुरू केले होते त्यानंतर ते केजरीवालांच्या नजरेत आले. त्यानंतर त्यांना पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे.
हा निर्णय जाहीर करताना केजरीवाल म्हणाले की गोव्यातील भंडारी समाजाला इतकी वर्षे गोव्यातील राजकीय व्यवस्थेत फार महत्वाचे स्थान मिळाले नव्हते आणि एका अर्थी अन्याय झाला त्याला अमित पालेकर मुख्यमंत्री झाल्यावर उत्तर मिळेल!! इतर पक्ष जातीपातीचे राजकारण करतात पण आम्ही स्वच्छ राजकारण करण्यासाठी आलो आहोत असे एकीकडे म्हणत असतानाच परत आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराच्या जातीचा उल्लेख खटकलाच.
अमित पालेकर सेंट क्रुझमधून तर मागच्या वेळचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार एल्व्हिस गोम्स यांनी पक्ष सोडून थेट काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
20 Jan 2022 - 9:42 am | वामन देशमुख
मप्र के रतलाम के सुराना गांव में डरे-सहमे हिंदुओं का छलका दर्द, कहा- मुस्लिमों से बचाए वरना छोड़ देंगे गांव
हे व केंद्र-राज्य शासनातील इतर लोक, भाजप, रास्वसं इ. संस्था संघटना, आणि मुख्यतः हिंदू लोक, हिंदूंच्या हिताबद्धल खरंच संवेदनशील / सक्षम आहेत का?
आपली व्यक्त-अव्यक्त ध्येये साध्य करण्यासाठी सत्ता कशी राबवावी हे त्यांना माहित नाही का?
---
हिंदूंच्या दुरावस्थेला हिंदूच जबाबदार आहेत.
20 Jan 2022 - 12:50 pm | मुक्त विहारि
सहमत आहे...
23 Jan 2022 - 4:09 pm | वामन देशमुख
ख्रिश्चॅनिटी स्वीकारण्याची जबरदस्ती : हिंदू विद्यार्थिनीची आत्महत्या
पंतप्रधान: श्री नरेंद्र मोदी
केंद्रीय गृहमंत्री: श्री अमित शहा
हे व शासनातील इतर लोक, भाजप, रास्वसं इ. संस्था संघटना, आणि मुख्यतः हिंदू लोक, हिंदूंच्या हिताबद्धल खरंच संवेदनशील / सक्षम आहेत का?
आपली व्यक्त-अव्यक्त ध्येये साध्य करण्यासाठी सत्ता कशी राबवावी हे त्यांना माहित नाही का?
---
हिंदूंच्या दुरावस्थेला हिंदूच जबाबदार आहेत.
20 Jan 2022 - 1:17 pm | sunil kachure
एक बाब सामान असते
देशापुढचे गंभीर प्रश्न
हे जाती शी संबंधित असतात
धर्माशी संबंधित असता त
बाजूचे किरकोळ देश पाकिस्तान,बंगला देश शी संबंधित असतात.
पण देशातील अनेक राज्य सर्वात गरीब देशात गणल्या जाणाऱ्या आफ्रिकन देशातील स्थिती पेक्षा वाईट स्थिती मध्ये आहेत हा कधीच राष्ट्रीय प्रश्न नसतो .
शेती,कुटीर उद्योग,पशू पालन, आणि इंडस्ट्रिअल उद्योगात मोठ्या कंपन्यांन सुट्टे भाग बनवणारे उद्योग .
जे स्वयं रोजगार निर्माण करतात आणि देशातील नागरिकांना गुलाम,नोकर बनवत नाहीत.
त्यांच्या स्थिती विषयी कधीच चर्चा नसते.
ह्या सर्वामध्ये सुधारणा करून स्वयं रोजगार मजबूत करावेत आणि जनतेला गुलमगिरी मधून मुक्त करावे.
शहरात येणाऱ्या बेकार londhya ना रोजगार त्यांच्या गावात च निर्माण करावा.
हे प्रश्न कधीच चर्चेत नसतात.
ना पाकिस्तान ,बांगलादेश भारत ताब्यात घेणार आहे.
ना मुस्लिम सर्व हिंदू ना मारणार आहे.
हे सर्व कधीच अस्तित्वात नसलेल संकट आहे.
पण तेच राजकारण मध्ये सर्वात चर्चित विषय अस्तात..
20 Jan 2022 - 1:30 pm | Trump
नमस्कार सुनील, तुमचा प्रतिसाद समजला नाही. नक्की तुम्हाला म्हणायचे काय आहे?
20 Jan 2022 - 1:52 pm | sunil kachure
जेव्हा लोकसभेची निवडणूक असते प्रसार माध्यमावर ज्या चर्चा आयोजित केल्या जातात
त्या कधी देशाची आर्थिक स्थिती,देशातील गरिबी,काही राज्य वर्षांवर्ष गरीब आहेत त्याची कारणे आणि त्या वरचे उपाय.
देशातील शहरांची अवस्था,रोजगाराची अवस्था,शेती ची अवस्था,बेरोजगारी,देशात असणारी प्रचंड गरिबी.
ह्या विषयावर होतात का?
तर बिलकुल नाही.
कोणी तरी मौलाना,कोणी तरी हिंदू साधू बोलवायचे आणि फक्त धार्मिक चर्चा करत बसायचे.
विधानसभा निवडणुकीत
पण राज्याच्या आर्थिक धोरणं विषयी कोणीच बोलणार नाही.
विज पुरवठा,सिंचन व्यवस्था,रस्त्यांची अवस्था.
शहरांचे बकाल पण.
ह्या वर चर्चा नाही
अमक्या जातीला आरक्षण देवू,वीज फुकट देवू,कर्ज माफ करू.
असले फालतू विषय अस्तात
20 Jan 2022 - 1:57 pm | रावसाहेब चिंगभूतकर
188 स्वामी, मिपा वर पुन्हा स्वागत आहे
20 Jan 2022 - 3:03 pm | प्रदीप
हे ते नव्हेत. इथे पूर्वापार एक आयडी नवनवे अवतार घेत आलेला आहे. सद्य अवतार त्याचाच आहे.
20 Jan 2022 - 3:50 pm | sunil kachure
१८८ चा इथे उल्लेख होत आहे.जरा समजून सांगावे
20 Jan 2022 - 10:53 pm | सुक्या
सहमत.
लिहिण्याची पध्द्त पाहता ... हे १८८ स्वामी नवीन अवतारात आले आहेत हेच वाटते . .
20 Jan 2022 - 3:34 pm | Trump
मान्य, लोकांची तितकी समज नाही, मते ह्या मुद्द्यांबर मिळत नाहीत.
आणि वाहिन्या जे खपते ते विकतात.
काही ठिकाणी मात्र अशी चर्चा होते.
20 Jan 2022 - 1:47 pm | विजुभाऊ
पण देशातील अनेक राज्य सर्वात गरीब देशात गणल्या जाणाऱ्या आफ्रिकन देशातील स्थिती पेक्षा वाईट स्थिती मध्ये आहेत हा कधीच राष्ट्रीय प्रश्न नसतो .
याला जबाबदार कोण? स्वातंत्र्य मिळून ७ ०वर्षे झाल्यावरही हे प्रश्न अजून असावेत हीच सगळ्यात वाईट गोष्ट आहे.
नबाब मलीक, संजय राऊत यांच्यावर बदाबदा बातम्या ओतणारे या बाबतीत गप्प का बसतात? हे विचारणे हे खरेतर नागरीक म्हणून आपले काम आहे.
जी राज्ये मागास आहेत त्या राज्यांनी कितीतरी पंतप्रधान आणि रेल्वे मंत्री दिले आहेत.
पण त्या राज्यात उद्योग कधी आले नाहीत. आलेले उद्योग घालवण्यात त्यांच्या नेत्यांनी धन्यता मानली.
तेथील जनता पोटासाठी इतर राज्यात जाते. याचा जाब ना त्या जनतेने कधी विचारला ना मिडीयाने.
20 Jan 2022 - 1:29 pm | sunil kachure
https://www.google.co.in/url?sa=t&source=web&rct=j&url=https://blogs.wor...
जगात असणाऱ्या गरीब लोकांपैकी अर्धे गरीब पाच देशात राहतात
त्या मध्ये भारत आघाडीवर आहे. ह्या देशात पाकिस्तान नाही
पण त्याची लाज आम्हाला वाटत नाही.
त्या संबंधित प्रश्न राजकारण करणाऱ्या लोकांना महत्वाचे वाटत नाहीत.
20 Jan 2022 - 1:45 pm | प्रसाद_१९८२
'गरिबी हटाव' ही घोषणा कॉंग्रेसने १९७१ मधे केली होती ना !
मग गेली कित्येक वर्षे कॉंग्रेस सत्तेत असून देखील भारतात इतके लोक गरिब राहिलेच कसे ?
20 Jan 2022 - 2:01 pm | मुक्त विहारि
आणि पुढेही भोगावे लागतील...
चीन, पाकिस्तान, बांगलादेश हे बाहेरील शत्रु आहेतच
शिवाय, काश्मीर, खालिस्तानी आन्दोलन हे अंतर्गत प्रश्र्न पण आहेतच
स्वातंत्र्य मिळाल्या नंतर, लगेचच संरक्षणावर भर दिला असता तर, गोष्ट वेगळी झाली असती
... संरक्षण प्रथम...
20 Jan 2022 - 2:10 pm | sunil kachure
पाकिस्तान,बांगलादेश पण आर्थिक बाबतीत भारताच्या पुढे जातील आणि आपण आहे तिथेच राहू.
आज चीन नी प्रचंड आर्थिक प्रगती केली आहे.
आपण कुठे आहे.
20 Jan 2022 - 2:17 pm | मुक्त विहारि
पाकिस्तान आणि बांगलादेश, यांची निर्मिती का झाली?
शेषराव मोरे, यांनी एक ग्रंथात चांगला उहापोह केला आहे...
जमल्यास जरूर वाचा ...
बाय द वे,
शेषराव मोरे, हे पारदर्शी चष्मा वापरतात...आमचा चष्मा भगव्या रंगाचा...
20 Jan 2022 - 2:37 pm | sunil kachure
वायफळ दाव्याना काही अर्थ नसतो भारताला अंतर्गत धोका बिलकुल नाही.असेल तर त्या वर अजून उपाय सापडत नसेल तर ब्रिटिश लोकांचा सल्ला घ्या.
पाकिस्तान,बंगला देश सारख्या आकाराने, सामर्थ्य नी अतिशय किरकोळ देश कडून भारत असुरक्षित असेल तर chullu भर पाण्यात आत्महत्या च करावी भारत सरकार नी.
20 Jan 2022 - 3:32 pm | Trump
नक्षलवाद, इस्लामिक दहशतवाद ....
20 Jan 2022 - 4:28 pm | मुक्त विहारि
सहमत आहे...
20 Jan 2022 - 4:28 pm | मुक्त विहारि
हो क्का?
आपल्या प्रचंड वाचनाचा आनंद आहे...
आम्ही आपले अजूनही, गोध्रा हत्याकांड, 1993 बाॅम्ब स्फोट, मुजफ्फरनगर दंगल, शीख हत्याकांड, आझाद मैदान दंगल, विसरू शकलेलो नाही...
20 Jan 2022 - 2:07 pm | मुक्त विहारि
मध्य रेल्वेकडून अनधिकृत घरं खाली करण्याच्या नोटिसा, मंत्री जितेंद्र आव्हाड, खासदार श्रीकांत शिंदे यांचा विरोध.
https://marathi.abplive.com/news/mumbai/notice-issued-by-central-railway...
बांधकाम अनधिकृत असेल तर, रेल्वेने भरपाई का द्यावी?उद्या, ह्याच न्यायाने, माझ्या जागेवर पण एखादे अनधिकृत बांधकाम उभे राहील आणि भरपाई मला द्यावी लागेल...
20 Jan 2022 - 2:10 pm | मुक्त विहारि
काँग्रेसने मंत्रिमंडळाला अंधारात ठेवत स्पेक्ट्रम कमी किमतीत विकले”; Antrix-Devas प्रकरणावरुन अर्थमंत्र्याचे टीकास्त्र
https://www.loksatta.com/desh-videsh/fm-nirmala-sitharaman-press-confere...
--------
कॉंग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष, जनतेच्या भल्यासाठी विचार करत नाहीत....हे माझे वैयक्तिक मत आहे ....
20 Jan 2022 - 2:13 pm | मुक्त विहारि
अत्याचारांपासून सोडवा, ही जमीन तुमची आहे”; पाकव्याप्त काश्मीरमधील कुटुंबाचे पंतप्रधान मोदींना आवाहन
https://www.loksatta.com/desh-videsh/zulm-se-nijaat-dilao-pok-family-app...
काश्मीर प्रश्र्न, युनोत नेल्याने, झालेले परिणाम आहेत... अर्थात, ह्याला जबाबदार म्हणजे, जवाहरलाल नेहरू....
20 Jan 2022 - 3:18 pm | sunil kachure
ह्यांनी निवडणूक जिंकल्या नंतर जी प्रतिक्रिया दिली ती अतिशय mature होती
ना कोणावर टीका,ना कोणाची लायकी काढली
पण माझे शहर प्रगत असावे म्हणून पुढच्या वीस वर्षाचा विचार करून तशा योजना आखल्या जातील.
शहराची प्रगती कशी होईल हीच आमची प्राथमिकता असेल.
अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
आणि असेच नेते देशाला हवे हवेत.
ह्याला gadu त्याची वाट लावू असली भाषा असणारे नको आहेत.
20 Jan 2022 - 4:18 pm | मुक्त विहारि
गृहमंत्री अमित शाह आणि लष्करप्रमुख मनोज नरवणे यांना अटक करा”; पाकिस्तानची ब्रिटन पोलिसांकडे मागणी
-------
https://www.loksatta.com/desh-videsh/uk-police-received-request-to-arres...
-------
370 हवे म्हणून, पाकिस्तान बोंबाबोंब करत आहे. आणि शत्रूराष्ट्राच्या ह्या मागणीला, कॉंग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष, विरोध करत नाही आहेत...
कॉंग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष, जनतेच्या भल्यासाठी विचार करत नाहीत, हे माझे वैयक्तिक मत आहे ....
20 Jan 2022 - 4:45 pm | मुक्त विहारि
एसटी संपामुळे पगार नसल्याचं सांगून वडील आंदोलनात गेल्यावर मुलाने घरात घेतला गळफास
https://www.loksatta.com/maharashtra/st-workers-son-committed-suicide-sc...
आता तरी, सरकारला काही जाग येईल का?
छत्रपती शिवाजी महाराज, यांनी रयतेला कधीच त्रास दिला नाही...
20 Jan 2022 - 5:01 pm | मुक्त विहारि
WhatsApp स्टेटससाठी २६ वर्षीय तरुणीला सुनावली मृत्यूदंडाची शिक्षा
https://www.loksatta.com/trending/pakistani-woman-sentenced-to-death-for...
-----
कायद्याचे असेच कठोर पालन हवे...
20 Jan 2022 - 6:30 pm | मुक्त विहारि
छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे हिरवेकरण करण्याचा प्रयत्न; विशिष्ट धर्माची स्थाने उभारण्याचे प्रकार
https://www.loksatta.com/mumbai/bjp-chadrakant-patil-vigilance-committee...
हे प्रयत्न रोखण्यासाठी भाजपाच्या वतीने दक्षता समिती स्थापन करण्यात आली असल्याचं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. ही समिती गडाचे वैभव अबाधित राखून सर्व गैरप्रकार हाणून पाडेल असं ते म्हणाले आहेत. ही समिती गडांना भेट देऊन गेल्या दोन वर्षात गडाचे पावित्र्य भंग करण्याचे कोणकोणते प्रयत्न झाले आहेत याची नोंद करेल अशी माहिती त्यांनी दिली आहे.....
-------
अशिक्षित हिंदू असल्याने, मला तरी, भाजप शिवाय पर्याय नाही...
20 Jan 2022 - 7:40 pm | sunil kachure
https://www.loksatta.com/trending/rtd-ias-officer-surya-pratap-singh-sla...
ह्या योजनेचे नाव च आदरणीय पंतप्रधान विसरले.
20 Jan 2022 - 10:38 pm | स्वलिखित
...
काल परवाच 31 वर्ष पूर्ण झालीत ...
21 Jan 2022 - 6:59 pm | चंद्रसूर्यकुमार
उत्पल पर्रीकरांनी आपण पणजीमधून अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवार लढवायचा निर्णय जाहिर केला आहे.
भाजप समर्थक आणि मनोहर पर्रीकरांविषयी आदर असलेल्या सगळ्यांनाच आज वाईट वाटत असेल हे नक्कीच. पत्रकार परीषदेत उत्पल पर्रीकर यांनी इतर कोणत्याही पक्षात जायचा संबंध नाही हे स्पष्ट केले आहे आणि आपल्या मनात भाजप आहेच फक्त पक्षाने वाईट व्यक्तीला उमेदवारी दिली आहे म्हणून पणजीतल्या लोकांना एक पर्याय देण्यासाठी हे करणे भाग आहे असे ते म्हणाले आहेत हे त्यातल्या त्यात चांगले आहे. उत्पल यांना कितपत मते मिळतील, विजय मिळेल की नाही हे सांगता येणार नाही पण समजा विजय मिळाला तरी ते आमदार म्हणून भाजपलाच पाठिंबा देतील ही अपेक्षा आहेच.
भाजपने म्हापसा मतदारसंघातून मनोहर पर्रीकरांच्या मंत्रीमंडळातील उपमुख्यमंत्री (आणि पर्रीकरांचे निधन झाले त्यापूर्वी एक महिना कर्करोगानेच निधन झालेले) फ्रान्सिस डिसूझांचा पुत्र जॉशुआ डिसूझाला उमेदवारी दिली आहे. तर वाळपईमधून माजी मुख्यमंत्री (आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते) प्रतापसिंग राणे यांचे पुत्र विश्वजीत राणे यांना तर प्रतापसिंग राणे यांच्या पोरी मतदारसंघातून विश्वजीत राणेंची पत्नी देविया राणे यांना उमेदवारी दिली आहे. इतकेच नाही तर बाबूश मोन्सेराटची पत्नी जेनिफर मोन्सेराटला तळीगाव मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. असे असेल तर मग उत्पल पर्रीकरांनाच का उमेदवारी नाकारली आहे हे समजले नाही.
उत्पल पर्रीकर यांना शुभेच्छा.
22 Jan 2022 - 1:06 am | sunil kachure
लोकप्रिय असतील,कोणत्याच चुकीच्या कामात सहभागी नसतील, बापा सारखेच प्रामाणिक असतील तर त्यांना bjp नी उमेदवारी का नाही दिली.
जर ये भ्रष्ट असतील,त्यांची कुवत नसेल,त्यांना समाजात मान नसेल.
तर ते निवडून येणार नाहीत
पण त्यांनी bjp लाच समर्थन करावे ही अपेक्षा अताताई आहे.
ते लोकप्रिय आहेत आणि त्यांना संधी दिली तर केंद्रीय नेतृत्व ला ते डोईजड होतील ही भीती bjp ला आहे .
बाकी त्यांना तिकीट न देण्याचे दुसरे कोणतेच कारण नाही
22 Jan 2022 - 1:33 am | sunil kachure
देवेंद्र फडणवीस साहेब नक्कीच गोवा निवडणुकी चे पक्षाचे पदाधिकारी असणारा
म्हणून परिकर ह्यांच्या मुलाला तिकीट मिळाले नसेल
22 Jan 2022 - 1:04 pm | कपिलमुनी
उत्पल पर्रीकर हे कोणत्याही दृष्टीने भाजपचे योग्य उमेदवार नाहीत.
१.उच्च शिक्षित आहेत
२. त्यांच्यावर गुन्हे दाखल नाहीत
३. त्यांच्याकडे गुंड पाळलेले नाहीत
४ दुर्दैवाने त्यांच्या वडिलांनी करोडो रुपयांची माया गोळा केली नाही
५ मग हे लोकांना धमकावणार कसे? आदल्या रात्री पैसे वाटणार कसे?
आणि चुकून निवडून आले तरी पक्ष निधीत कॉन्ट्रीब्युशन देणार कसे ??
शिवाय महाराष्ट्र भाजपची वाढ करणारे फडणवीस सारखे नेतृत्व असताना योग्य कार्यक्रम करतीलच
22 Jan 2022 - 2:09 pm | अमरेंद्र बाहुबली
+१.
त्या पेक्षा त्यानी कोंग्रेस मध्ये जावे. काही वर्षानी त्यांच्यासाठी भाजप रेड कार्पेट अंथरेल नी केंद्रात ऊद्योगमंत्री पदही देईल. भाजपात कार्यकर्ता म्हणून सतरंज्याच ऊचलाव्या लागतील.
22 Jan 2022 - 2:26 pm | sunil kachure
एकदम बरोबर .मंत्रिपद पाहिजे असेल तर .उमेदवारी हवी असेल तर via काँग्रेस असे bjp मध्ये यावं लागत
काँग्रेस मध्ये प्रशिक्षण घेतल्या शिवाय bjp तिकीट पण देत नाही आणि मंत्री पद पण देत नाही
22 Jan 2022 - 3:53 pm | अमरेंद्र बाहुबली
पर्रीकरांना भाजपच्या दारामध्ये भीक मागण्याची वेळ, असे शिवसेना नेते संजय राऊत का म्हणाले...
https://zeenews.india.com/marathi/india/time-to-beg-for-manohar-parrikar...
24 Jan 2022 - 4:51 am | निनाद
या वर्षी भारताच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करत असताना, लेखक टी. ए. सिन्हा यांनी आदिवासी नायक बिरसा मुंडा यांच्या जीवनावर अंकिता वर्मा सह-लेखिके बरोबर एक पुस्तक लिहिले आहे.
'लिजेंड ऑफ बिरसा मुंडा' हे पुस्तक आदिवासी क्रांती आणि बिरसा मुंडा यांच्या भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचा आढावा घेते. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते त्याचे प्रकाशन करण्यात आले.
भगवान बिरसा मुंडा यांनी ब्रिटीश आणि ख्रिश्चन मिशनर्यांविरुद्ध केलेल्या क्रांतीने झारखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड या भागात राहणाऱ्या आदिवासींच्या जीवनात चैतन्य आणले होते. त्यांनी ख्रिश्चन धर्माचा त्याग केला आणि चाईबासा मिशनरी स्कूलमधून बाहेर पडले. बिरसैत या नावाने ओळखली जाणारी धार्मिक चळवळ ख्रिश्चन मिशनरी आणि जमीन मालक असलेल्या 'डिकस' किंवा अत्याचारी लोकांविरुद्ध केंद्रित होती. त्यांनी आपल्या आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी जुलमी ब्रिटिश राजवटीविरुद्ध धैर्याने लढा दिला. त्याच्या धार्मिक चळवळीत सामील झालेल्यांपैकी अनेक असे मुंडा होते ज्यांनी पूर्वी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. पण त्यातला फोल पणा लक्षात आल्यावर त्यांनी ख्रिश्चन धर्माचा त्याग केला आणि ते परत हिंदू बनले. बिरसांना आपल्या वडिलांचे सुगन मुंडांचे जबरदस्तीने धर्मांतरण केल्याबद्दल ख्रिस्ती मिशनऱ्यांचा व इंग्रजांचा मनस्वी राग येत असे. त्यातच अशिक्षित आदिवासींवर इंग्रजांकडून होणारा अत्याचार पाहून इंग्रज अधिकाऱ्यांना धडा शिकवण्याचा विचार त्यांनी केला. बिरसा मुंडांनी गोडगेडा गावातील स्वामी आनंद पांडे यांना गुरुस्थानी मानले होते. त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या सहकार्याच्या बळावर इंग्रज सरकारच्या अन्यायाविरोधात बिरसा मुंडाने छोटा नागपूर क्षेत्रात इ.स १८९५ साली लढा उभारला.
इंग्रजांनी त्याला अटक केली व तुरुंगात अतोनात छळ केला. ९ जून १९०० रोजी बिरसा मुंडा यांचा रांची कारागृहात मृत्यू झाला. बिरसा मुंडा यांना लोकांनी जननायक हा किताब बहाल केला.
वणी गडाला जातांना आदिवासी नायक बिरसा मुंडा यांचे एक स्मारक महाराष्ट्रात उभारलेले दिसते.
शीर्षक: 'द लीजेंड ऑफ बिरसा मुंडा'
लेखक: तुहिन सिन्हा आणि अंकिता वर्मा
प्रकाशक: मंजुल पब्लिकेश्न्स
पृष्ठे: ४००
किंमत: रुपये ४९९
25 Jan 2022 - 2:00 am | सुक्या
छान माहीती.
टाटा स्टील मधे काम करत असताना रांची / दुमका / चाईबासा वगेरे ठिकाणी खुप भ्रमंती झाली. गावोगावी बिरसा मुंडा यांचे पुतळे आहेत. मला ते आदेवासी नायक आहेत हे माहीत होते परंतु भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांचे योगदान होते हे माहीत नव्हते.
24 Jan 2022 - 5:43 am | निनाद
DRDO मॅन-पोर्टेबल अँटी-टँक गाईडेड मिसाईल (MPATGM) ची यशस्वी चाचणी केली. स्वदेशी विकसित रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र कमी वजनाचे आहे आणि ते पोर्टेबल लाँचरमधून सोडले जाते. यामुळे शत्रू रणगाड्यांना युद्धात मोठा दणका बसणार आहे. हे फायर-अँड-फॉरगेट अँटी-टँक गाईडेड क्षेपणास्त्र किमान २०० ते ३०० मीटर आणि कमाल ४ किमी अंतरावर मारा करू शकते. हे पुर्णपणे आत्मनिर्भर भारत योजनेनुसार भारतात बनलेले क्षेपणास्त्र आहे. या प्रगतीमुळे भारताने इस्रायली स्पाइक (ATGM)
घेण्याचा पुर्वी केलेला एक मोठा करार रद्द केला. या रणगाडा विरोधी क्षेपणास्त्राची निर्मिती भारत डायनॅमिक्स लिमिटेड द्वारे भानूर , तेलंगणा येथे केली जाईल.
24 Jan 2022 - 10:24 am | सुबोध खरे
मोदी सरकारने स्वयंपूर्णतेच्या दिशेने वाटचाल करताना अशी अनेक कंत्राटे रद्द केलेली आहेत हि अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट आहे.
कारण या कंत्राटात मिळणारे कमिशन यासाठी सरकारी बाबूंपासून राजकारणी, लष्करी अधिकारी आणि संरक्षण उत्पादन खात्यातील अनेक लोकांचे लागेबांधे जुळलेले असतात. भारतीय तंत्रज्ञान निकृष्ट आहे हे सिद्ध करायचे आणि मग त्याजागी शस्त्रास्त्रे आयात करायची हा प्रकार गेली काही दशके चालू होता.
जो देश मंगळावर यान पाठवू शकतो, उपग्रह पाठवू शकतो, आंतरखंडीय क्षेपणास्त्रे बनवू शकतो त्याला ४ किमी टप्पा असलेले क्षेपणास्त्र बनवता येणार नाही का?
बऱ्याच वेळेस दिल्लीतील ल्युटेन्स वाल्यानी आपल्या शास्त्रज्ञांचे हात बांधलेले होते. त्यातून उत्तम काम करणाऱ्या शास्त्रज्ञाला बढती देण्याऐवजी तो आपल्याला वरचढ होईल या भीतीने वरिष्ठ लोक त्याला काम करू देत नाहीत. सारखे काड्या घालणे, मूळ काम सोडून इतरच कामला त्याला जुंपणे, असे झाल्याने काही कालावधीनंतर हाच हुशार शास्त्रज्ञ नोकरी सोडून जातो आणि त्याला उच्च पगारावर नोकरी देण्यात त्याच क्षेत्रात काम करणाऱ्या परदेशी कंपन्या टपून बसलेल्या असतात. त्यांचे अशा हुशार अभियंत्यांवर बारकाईने लक्ष असते.
यात दिल्लीतील अनेक जणांचे साटे लोटे आहेत. अनेक वेळेस प्रामाणिक लष्करी अधिकारी सुद्धा यात अनवधानाने सामील होतात.
एक चक्षुर्वैसत्यं उदाहरण देतो आहे
विराट हि विमानवाहू नौका भारताच्या नौदलात १९८७ साली समाविष्ट झाली. १९९० मध्ये तेथे तात्पुरता (काही काळासाठी) मी प्रमुख वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केले. नौकेसाठी आणि त्यावरील हॅरियर या विमानासाठी असलेली अनेक उपकरणे आणि आयुधे इंग्लंड मधून आलेली होती आणि तशीच उपकरणे (दुसरा सेट) भारतातूनहि विकत घेतली.
स्क्रू पिळण्यासाठी एक विशिष्ट पकड मला दाखवत एक नौसैनिक म्हणाला सर हि बघा इंपोर्टेड पकड आणि हि भारतीय पकड यात फरक बघा.
अर्थात त्यात फरक होताच.
हाप्रश्न मी माझ्या वैमानिक अभियंता मित्राला विचारला. त्यावर तो म्हणाला इंग्लंड मधून आणलेली पकड हि २०० पौंडाला आणली आहे आणि हि भारतीय पकड निविदा काढून सर्वात स्वस्त कंत्राट देणार्याकडून विकत घेतलेली आहे. २०० पौंड म्हणजे १६ हजार रुपये ( तेंव्हा पौंडाचा भाव ८० रुपये होता) १६ हजार रुपये आणि १८० रुपये याच्या दर्जात अर्थात फरक येणारच. पण हि गोष्ट सामान्य नौसैनिकास कशी समजेल?
मी मित्राला विचारले तेंव्हा तो म्हणाला कि भारतीय माल घ्यायचा असेल तर L १ लाच (lowest quotation) द्यायला लागते. त्यामुळे वरपासून खालपर्यंत सर्वच आयात मालाचा आग्रह धरतात. दिल्लीतील लोक त्यात मिळणाऱ्या मलिद्यासाठी आणि माझ्यासारखे प्रामाणिक लोक २०० कोटीचे विमान एखाद्या तकलादू उपकरणामुळे खराब होऊ नये म्हणून.
जोवर उच्च दर्जासाठी या प्रक्रियेत L १ (lowest quotation) बदल करत नाहीत किंवा त्याला अपवाद करता येत नाही तोवर भारतीय माल म्हणजे खराबच किंवा कमी दर्जाचा या मनोवृत्तीत बदल होणार नाही.
इसरो किंवा अणुशक्ती या खात्यात तंत्रज्ञान विकत घेताच येत नाही तेथे भारतीय शास्त्रज्ञांनी दैदिप्य्मनरीतीने काम केलेले आहे. याचा अर्थ भारतीय माणसे कुठेही कमी पडत नाहीत.
त्यातून अनेक वर्तमानपत्रे भारतीय मालाबद्दल लष्कर साशंक आहे अशा तर्हेच्या बातम्या मधून मधून पसरवत असतात. अर्थात त्यात त्यांचे बोलविते धनी यांचा स्वार्थ असतो
इस्रायली स्पाईक या एका क्षेपणास्त्राची किंमत ४६ लाख आहे तर संपूर्ण भारतीय बनावटीच्या man-portable anti-tank guided missile ची किंमत अंदाजे १० लाखाच्या आसपास येईल. याचा अर्थ एका इस्रायली क्षेपणास्त्राच्या ऐवजी आपण ४ ते ५ क्षेपणास्त्रे वापरू शकतो. याचा दोन्ही बाजूनी अर्थ लावता येईल.
१) मुळात पाचपट क्षेपणास्त्रे तयार ठेवा आणि थोडी फार फुकट गेली तरी चालतील
२) काही लोक असेही म्हणून शकतात कि ऐन युद्धाच्या वेळेस अत्यंत अचूक क्षेपणास्त्र जास्त चांगले. परंतु एकंदर भारतीय क्षेपणास्त्रांची अचूकता आणि कार्यक्षमता पाहिल्यास इस्रायली क्षेपणास्त्रांपेक्षा ती कमी अचूक असतील असे म्हणणे धारिष्ट्याचे ठरेल. कदाचित भारतीय क्षेपणास्त्रे जास्त अचूक आणि जास्त घातक असावीत असा प्राथमिक अंदाज आहे.
25 Jan 2022 - 2:21 am | सुक्या
ही घातक प्रथा आपल्याकडे सगळ्या क्षेत्रात आहे. अगदी शिक्षणक्षेत्र ही त्याला अपवाद नाही. माझे दोन वेळा डॉक्ट्ररेट झालेले शिक्षक व माझ्या बॅचचा प्रथम क्रमांकाचा मित्र ह्या दोघांनाही शिकवण्याची आवड होती. पण अंतर्गत राजकारणामुळे दोघेही आता साईड्ला आहेत. त्यांचा शिकवण्याचे काम न देता रीसर्च करायला सांगितले जाते. त्यातही दोघे उत्तम काम करत आहेत. दोघे पण डझन्भर पेटंटे बाळगुन आहेत. पण त्यातही डिपार्ट्मेंट हेड पासुन सगळे भागीदार आहेत. माझा मित्र गेल्या वर्षी इथे पोस्ट डॉक्टरल करायसाठी आला होता तेव्हा ज्या विद्यापीठात तो आला होता त्यांनी त्याला आमच्याकडे शिकवशील का म्हणुन विचारणा केली. केवळ वयस्कर आई वडील भारतात आहेत म्हणुन तो परत गेला. पण त्याच्या बोलण्यातली निराशा मला पदोपदी दिसली...
याच वेळी अगदी सुमार कामगिरी असलेला माझाच वर्ग् मित्र त्याच ठिकाणी आता विभाग प्रमु़ख आहे व शिकवतो ही आहे. कारण त्याचे वडील बारामतीच्या काकांच्या ओळखीतले आहेत ...
25 Jan 2022 - 7:57 am | रावसाहेब चिंगभूतकर
शिक्षण क्षेत्राचे अगदी विद्यापीठीय स्तरावरचे शिक्षणाचे खाजगीकरण होण्याची तातडीची गरज आहे. कॉर्पोरेट स्पॉन्सर्ड विद्यापीठे ही संकल्पना फार पूर्वीच अस्तित्वात यायला हवी होती.
25 Jan 2022 - 9:10 am | सुक्या
शिक्षणाचे खाजगीकरण झाले की मग ते आवाक्याबाहेर जाते. मग ज्यांच्याकडे पैसा आहे त्याला गुणवत्ता नसली तरी गोष्टी आवाक्यात येतात .. खरा गुणवान मात्र पैसा नाही म्हणुन बाजुला फेकला जातो. अमेरिकेत हेच झाले आहे ...
25 Jan 2022 - 10:26 am | चंद्रसूर्यकुमार
अमेरिकेत विद्यापीठ पातळीवरील शिक्षण भरमसाठ महाग झाले आहे त्यामागे अमेरिकन केंद्र सरकारकडून विद्यार्थ्यांना मिळणारी FAFSA ही शिक्षण कर्ज योजना जास्त जबाबदार आहे. १९६५ मध्ये लिंडन जॉन्सन यांच्या प्रशासनाने ही योजना सुरू केली होती. त्यामागचा उद्देश चांगला होता की विद्यार्थ्यांना पैशाअभावी कॉलेजला जाता आले नाही असे व्हायला नको. पण त्यातून झाले असे की पूर्वी जे विद्यार्थी कॉलेजला गेले नसते ते पण जायला लागले. हे दरवेळा समाजासाठी चांगले असते का? नेहमीच नाही. उदाहरणार्थ खूप जास्त इनोव्हेशन करायची चमक नाही, फार हुषार नाहीत असे विद्यार्थी कोणत्याकोणत्या स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये पोलिटिकल सायन्स, लॅटिन अमेरिकन इतिहास, प्लेटो-अॅरिस्टॉटलचे तत्वज्ञान वगैरे विषयांमध्ये काठावर पास होऊन डिग्री मिळवायला लागले. याच विषयात हार्वर्डमध्ये वगैरे जाणारे विद्यार्थी पुस्तके लिहिणे, पत्रकार-स्तंभलेखक अशाप्रकारे नाव कमावू शकतात. पण तिथे प्रवेश मिळण्याइतकी गुणवत्ता नसेल तरी अशा कर्जाच्या जोरावर कोणत्यातरी Northwestern Oklahoma State University मध्ये अशा विषयात डिग्रीला जायला लागले. चार वर्षे कॉलेजात असेपर्यंत खर्या परिस्थितीची झळ बसली नाही की आपण नक्की कशामध्ये स्वतःला गुरफटून घेतले आहे हे त्या विद्यार्थ्यांना समजत नाही. पण चार वर्षांत लाख-दीड लाख डॉलर्सचे कर्ज आणि महिन्याला तीन-साडेतीन हजार डॉलरपेक्षा जास्त नोकरी मिळेल अशी डिग्री नसेल तर मोठ्या प्रमाणावर अडचणींना सामना करावा लागतो. अमेरिकेत राहायचे की मग गाडी लागतेच. मग हे शिक्षण कर्ज, गाडीचे कर्ज, काही वर्षांनी घराचे कर्ज या सगळ्यात ते लोक अगदी पिचून जातात. त्यातून या शिक्षणकर्जावर डिफॉल्ट करायचे प्रमाणही वाढले. मग ते कोण भरणार? तर अर्थातच करदाते.
असे कर्ज मिळत आहे म्हणून कॉलेजला जाणारे विद्यार्थी गेल्या काही दशकात वाढले आणि त्यातून दोन गोष्टी झाल्या. मागणी वाढल्याने किंमत वाढली आणि कर्ज मिळत आहे म्हणून विद्यार्थी चार पैसे फी जास्त द्यायला तयार झाल्याने विद्यापीठांनीही फी वाढवली. (ओबामाकेअरमुळे हाच प्रकार आरोग्यसेवेतही झाला आहे अशाप्रकारचे लेख वाचले आहेत). आपल्या शिक्षणावर महिन्याला तीन-साडेतीन हजार डॉलरपेक्षा जास्त पगार मिळणार्यातला नसेल तर आपण किती फी भरणे योग्य ठरेल हे गणित सगळे लोक करू शकत नाहीत. परिस्थितीची जाण सगळ्यांना असतेच असे नाही आणि असली तरी परिस्थितीला लगेच तोंड द्यायचे धैर्य सगळ्यांकडे नसते. तेव्हा आता तोंड देण्यापेक्षा चाढढकल करावी- चार वर्षे कॉलेज झाल्यावर पुढचे पुढे बघून घेऊ असा कल बहुसंख्यांचा असतो. मी स्वतः त्या फेजमधून गेलो आहे त्यामुळे त्यावेळी नक्की काय मानसिकता असते याची जाण नक्कीच मला आहे.
अमेरिकन सरकारच्या योजनेमुळे जर भविष्यात भरपूर पगाराची नोकरी मिळायची शक्यता असेल अशा डिग्रीला विद्यार्थी जात असतील तर त्यात अमेरिकन समाजाचा फायदाच आहे. पण त्याबरोबरच हे 'ओव्हरहेड्स' पण मोठ्या प्रमाणावर आहेत. लिंडन जॉन्सन यांच्या प्रशासनाने ही विद्यार्थीकर्ज योजना सुरू केली पण त्याबरोबरच फूड स्टॅम्प्स, मेडिकेड, स्वस्तातील घरे वगैरे अनेक योजना सुरू केल्या. त्यानंतर अध्यक्ष झालेल्या रिचर्ड निक्सन यांनीही त्यात भर टाकली. १९७० च्या दशकात अनेक देशांमध्ये आर्थिक, सामाजिक आणि राजकीय अस्थिरता होती त्यामागे लिंडन जॉन्सन आणि रिचर्ड निक्सन यांच्या बेजबाबदार आर्थिक धोरणांचा हात आहे. तरी १९७३ मध्ये अरब-इस्राएल युध्द झाले त्यामुळे महागाई वाढली अशाप्रकारे दोष त्या युध्दावर ढकलून द्यायला निक्सनना कारण मिळाले.
तेव्हा सांगायचा मुद्दा हा की सरकार अशा योजना सुरू करते तेव्हा समाजाचे भलेच व्हावे हा विचार असतो. आपल्याच लोकांचे वाटोळे व्हावे म्हणून कोणीच राज्यकर्ता योजना सुरू करणार नाही- अगदी कम्युनिस्ट राज्यातही राज्यकर्ते तसे करणार नाहीत. पण अशा योजनांमधून असे unintended consequences असतात त्याकडे मात्र फारसे कोणाचेच लक्ष जात नाही.
25 Jan 2022 - 7:08 pm | चौकस२१२
अमेरिकन केंद्र सरकारकडून विद्यार्थ्यांना मिळणारी FAFSA ही शिक्षण कर्ज योजना जास्त जबाबदार आहे. १
पण अशा योजनांमधून असे unintended consequences असतात त्याकडे मात्र फारसे कोणाचेच लक्ष जात नाही.
विचार करण्यासारखी गोष्ट आहे
कारण येथे ऑस्ट्रलयात सुद्धा पूर्वी पदवी शिक्षण फुकट होते पुढे टायचे रूपांतर दीर्घ मुदतीचं कर्जत केले गेले
( पदवी करण्यासाठी लागणारे शुल्क कर्ज म्हणून दिले जाते आणि बिनव्याजी. ते जमेल तसे पगारातून कापले जाते,विदयापीठे हि सरकारी पश्यावर चालतात म्हणजे सरकार या हातातून पैसे काढून त्या हाताला देते एवढेच आणि परत मिळतील अशी अपेक्षा ठेवते, जेणेकरून शिक्षण फुकट आहे असे भासू नये हा या मागचा हेतू असावा )
परंतु येथे अशी चर्चा दिसत नाही अजून तरी
26 Jan 2022 - 12:52 am | सुक्या
ही समस्या आहे खरी. पण मी असे ऐकले आहे की शिक्षण कर्ज हे डीफॉल्ट करता येत नाही. अगदी बँकरप्सी फाईल केली तरी ते कर्ज तसेच राहते. पण या कर्जाचा बोजा अर्थव्यवस्थेवर आहे हे मात्र खरे.
इथेही आपल्या कडे आहे तसे .. कम्युनीटी कॉलेजातुन डीग्री घेतलेल्याला जरा कमी लेखले जाते. त्यामुळे कर्ज घेउन का होईना जरा बर्या कालेजात जावे हाच सगळ्या लोकांचा कल असतो.
सुदैवाने भारतात पद्व्युत्तर उच्च शिक्षण आजही बर्यापैकी दर्जा बाळगुन आहे. किमान सरकारी संस्था / काही खाजगी विद्यापीठे तो दर्जा राखुन आहेत. तरीही गल्ली बोळात उभ्या राहिलेल्या संस्था त्याला अपवाद आहेतच. पदवी शिक्षणाच्या बाबतीत मात्र अजुन बराच पल्ला गाठायचा आहे. प्रचंड लोकसंख्या हा त्यातला मोठा अडसर झाला आहे.
25 Jan 2022 - 3:14 pm | शाम भागवत
अगदी याच पध्दतीने अमेरिकन लोकं सर्व गोष्टींवर उधारीने भरपूर खर्च करत असतात. त्यामुळे तो देश कर्जावरती चालतो असे म्हणतात.
25 Jan 2022 - 4:32 pm | sunil kachure
आता मध्ये भाटिया हॉस्पिटल जवळ मुंबई मध्ये एका इमारती ला आग लागली
बाजूच्या एक पण खासगी हॉस्पिटल नी आगीत जखमी झालेल्या लोकांना प्रवेश दिला नाही.
सरकारी दवाखान्यात च उपचार झाले.
आता chya covid साथी मध्ये खासगी हॉस्पिटल नी लूट करणे चालू केले होते.
सरकारी दवाखाने,विलाफिकरण कॅम्प ह्या मध्येच योग्य उपचार झाले
सर्व सरकारी शाळा,कॉलेज,हॉस्पिटल बंद च केलीच पाहिजे त.
करोड खर्च केले की कोणी पण अडाणी डॉक्टर होतो.
आणि नंतर फक्त लूट करत असतो
भारताने भले तर टॅक्स वाढवावा पण .
शिक्षण,आरोग्य यंत्रणा ह्या सरकारी च असाव्यात.
25 Jan 2022 - 4:35 pm | sunil kachure
सर्व सरकारी शाळा,कॉलेज,हॉस्पिटल बंद च केलीच पाहिजे त.
ह्या वाक्यात सरकारी ऐवजी खासगी असे वाचावे.
25 Jan 2022 - 6:41 pm | कर्नलतपस्वी
धाग्यावर प्रतिक्रिया देताना काहीजण उचलली जीभ लावली टाळ्याला सारखे लिहीतात.
25 Jan 2022 - 10:04 pm | Bhakti
डिसले गुरूजींना फुलं ब्राईट स्कोलरशीपसाठीचे आडकाठीचे प्रकरण सध्या पाहून फारच वाईट वाटले.
19 Jul 2022 - 4:59 pm | शाम भागवत
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रणजितसिंह डिसले गुरुजींना भेटण्यास बोलावलंय. भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी डिसले गुरुजींना फोन केलाय. यावेळी डिसले गुरुजींना राजीनामा न देण्याची सूचना केल्याचं गिरीश महाजन यांनी एबीपी माझाशी दूरध्वनीवर बोलताना सांगितलंय. तसंच डिसले गुरुजींचा राजीनामा मंजूर करु नये असे निर्देश सीईओंना दिल्याचंही महाजन यांनी सांगितलंय.
हुश्श!
खूप छान वाटलं.
_/\_
19 Jul 2022 - 6:18 pm | रात्रीचे चांदणे
डीसले गुरुजी परवानगी न घेता कामावर गैरहजर होते, तेही २ वर्षे. त्याकाळात त्यांच्या वर्गातल्या पोरांचं भरपूर नुकसान झालं असेल.
26 Jan 2022 - 2:06 am | sunil kachure
हे सध्या स्थानिक राजकारण चे शिकार आहेत
ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील ह्या मध्ये खूप फरक आहे
शहरात लोकांच्या गुणांची कदर असते नीच पातळी कोणी गाढत नाही.
ग्रामीण राजकारण हे अतिशय नीच पातळीवर चालते
आणि गुरुजी त्याचेच शिकार आहेत.
सरकार नी अतिशय कठोर भूमिका घ्यावी.
बिलकुल दयामाया न दाखवता कठोर कारवाई करावी .
26 Jan 2022 - 6:41 am | अनन्त अवधुत
प्रभू, तुमच्याकडे काही माहिती आहे का?
+१
26 Jan 2022 - 8:12 am | रात्रीचे चांदणे
ह्यात दुसरी बाजूही बघितली पाहिजे, बातम्यांनुसार डीसले गुरुजी गेली २ वर्ष कामावर हजर नाहीत, मूल्यमापनासही टाळाटाळ केलेली आहे. आणि PHD साठीच्या सुट्टीच्या अर्जवरही त्यांनी मोगम माहिती टाकली होती. केवळ अमेरिकेत Phd साठी पाहिजे एवढ्या कमी माहितीवर कोणताच अधिकारी सुट्टी मंजूर करणार नाही. ज्या गावात ते शिकविण्यासाठी होते त्या गावकऱ्यांनीही त्यांच्याविरुद्ध कामावर गैरहजर राहिल्यामुळे तक्रारी दाखल केल्या आहेत.
26 Jan 2022 - 3:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मागे एक लेख आला होता, पण तो वेगळा विषय होता. आता खासगी शाळांचं पेव फुटलं आहे. कोणीही उठतो आणि इंग्लिश स्कूल. फॅसीलिटी, चकाचक शाळा वगैरे आणि त्यांच्या फिसा हा वेगळा विषय. अशा शाळेत पोरं शिकायला घालायचं म्हणजे अशा शाळेत फक्त पैसे असले पाहिजे. अशावेळी वाबळेवाडीच्या शाळेचं नाव झालं. आणि एक लेख वाचनात आला होता. 'ही चळवळ बनेल का ?' म्हणून. पुणे जिल्ह्यातील वाबळेवाडीची जिल्हा परिषदेच्या शाळेचा विकास ग्रामस्थांनी केला होता. शाळेला आपल्य जमीनी दिल्या. तो प्रयोग देश आणि परदेशातही गाजला. शाळेतलं राजकारण प्रशासकीय गोष्टी सोडल्या तर तो एक अभिनव प्रयोग होता. आणि त्या धरतीवर अनेक जिल्हापरिषद शाळांनी आपल्या शाळेचा चेहरा-मोहरा बदलला. अभ्यासक्रमही नव्या पद्धतीने शिकवू लागले तीही चांगली गोष्ट. जिल्हापरिषदांच्या शाळा आजही आवश्यक आहेत कारण शाळाबाह्य मुले ही एक नवीन समस्या आहेच.
आता शाळेच्या व्यवहार अनियमितता आणि प्रशासनाने शाळेवर कार्यवाही सुरु केली त्याबद्दल माहिती नाही पण त्याचबरोबर दुसरी एक मागणी करण्यात आली की शाळा ग्रामस्थांकडे वर्ग करा. ग्रामस्त बोलायला चांगला शब्द पण ती जवाबदारी कोणी तरी घेत्यली पाहिजे. हे कोण करु शकतं तर, ग्रामपंचायती. ७३ व्या घटनादुरुस्तीने ग्रामपंचायतींना शाळा सुरु करण्याचा मूलभूत अधिकार दिला आणि पुढे २००९ च्या शिक्षण हक्क कायद्याने शाळा सुरु करणे आणि मुलांना इयत्ता आठवीपर्यंत शिक्षण देणे हे तर ग्रामपंचायतीचे कर्तव्यच ठरवले आहे. अशावेळी ग्रामपंचायतीने ठराव करुन अशी शाळा चालवायला घेता येईल.
आता प्रश्न आहे की जिल्हापरिषदाच्या माध्यमातून गावोगावी शाळा पोहचल्या परंतु त्याचं नियोजन निधी हा शासनाकडून येतो त्यामुळे तो थेट शाळेपर्यंत पोहचत नाही आणि शाळा कायम पडक्या वगैरे दिसतात. आणि आपण आपल्या शाळा आठवायला लागतो. आता ग्रामपंचायती तितक्या सक्षम झाल्या आणि राजकारण कमी झालं तर त्या त्या गावातल्या शाळा ग्रामपंचायती नव्या पद्धतीने उत्तम चालवू शकतील असा आशावाद त्या लेखाचा होता. शाळेच्या कामात लक्ष घालून शाळेचा दर्जा उंचावता येऊ शकतो. शाळाबाह्य मुलांचे प्रश्नही यानिमित्ताने सुटतील आणि शाळा उत्तम पद्धतीने सुरु राहतील असेही वाटले.
-दिलीप बिरुटे
26 Jan 2022 - 3:10 pm | Trump
चांगली माणसे नोकरीवर ठेवा. ग्रामस्थांकडुन आणि सरकारकडुन मदत घ्या.
26 Jan 2022 - 6:59 pm | कपिलमुनी
गावात एखादा आपल्या पेक्षा पुढे गेला ,प्रगती केली की त्याचे पाय ओढायचे हे नेहमीचे आहे.
दिसले गुरुजी प्रति नियुक्ती वर दुसऱ्या ठिकाणी असताना कामावर हजर नाही म्हणणे चुकीचे आहे.
26 Jan 2022 - 7:11 pm | sunil kachure
ग्रामीण भागात जे राजकारण चालते ते शहरी भागा पेक्षा खूप वेगळे आहे.
Zp ,पंचायत समिती ह्यांच्या अधिकारात येणाऱ्या कर्मचाऱ्या वर नेहमीच राजकीय दबाव असतो.
रीतसर कारवाई अधिकारी च करतात पण ते कोणाच्या तरी दबावात येवून करतात..
Disle गुरुजी नी जागतिक पातळीवर वाहवा मिळवली आहे .
त्यांना त्यांच्या पद्धतीने काम करण्यास मुभा दिली पाहिजे.
जगाला जास्त कळते की zp च्या प्रशासनाला
26 Jan 2022 - 7:22 pm | Bhakti
जगाला जास्त कळते की zp च्या प्रशासनाला
26 Jan 2022 - 7:21 pm | Bhakti
डिसले गुरुजींनी शिक्षण क्षेत्र सोडण्याचं वा भारत सोडण्याचं ठरवल्यावर आश्चर्य वाटायला नको.
गुरुजींची बाजू
https://youtu.be/xeTM7tmaPzI
कृतीशील आणि कागदोपत्री बहाद्दर यातला फरक ७३ वर्षापासून अजूनही व्यवस्थेत रूजू होत नाही.
26 Jan 2022 - 7:25 pm | sunil kachure
शिक्षिका म्हणजे गावच्या पाटला ची सेविका च असे पाटील समजत असतं.
सिनेमात हे समाजाचे चित्र दाखवत होते.
26 Jan 2022 - 7:28 pm | मदनबाण
डीसले गुरुजींना मुलाखतीत रडताना पाहुन फार वाईट वाटले होते, एका "जागतिक दर्जाच्या" शिक्षकाला कामचोर आणि मुजोर सरकारी यंत्रणा कशी पिदवते ते परत अगदी उघडपणे पहायला मिळाले. सरकारी कर्मचार्यांच्या कामचोरपणाचा,उर्मटपणाचा,लाचखोरीपणाचा अनुभव सामान्य जनतेला [ यात सर्व जाती-धर्मांचे लोक आले.] रोज येत असतो. तरी सुद्धा या लोकांना अजुनही शिस्त लावण्याची वेळ येत नाही हे फार वाईट आहे. यांना मिळणार्या सर्व प्रकारच्या सवलती, वेतनवाढ,वेतन आयोग्य रद्द करुन काम केल्या शिवाय दमडी देखील मिळणार नाही अशी जेव्हा वेळ आणण्यात येईल तो पर्यंत हे सरकारी बाबु तुमचे रक्त पित राहणार.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Enakke Enakkaa... :- Jeans
26 Jan 2022 - 7:31 pm | मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Enakke Enakkaa... :- Jeans
26 Jan 2022 - 7:34 pm | मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Enakke Enakkaa... :- Jeans
27 Jan 2022 - 4:16 am | निनाद
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी Android आणि iOS च्या वर्चस्वाचा सामना करण्यासाठी भारत स्वदेशी ऑपरेटिंग सिस्टीम विकसित करणार्या उद्योगांसाठी एक इको सिस्टिम विकसित करेल असे असे म्हणाले आहेत.
महत्त्वाचे म्हणजे सरकारच स्वतः मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम तयार करणार नसल्याने या प्रयोगात तथ्य असावे असे वाटते. सरकार फक्त त्याला लागणारी परिस्थिती तयार करणार आहे असे दिसते.
हे जर खरेच घडले आणि नवीन स्वदेशी ऑपरेटिंग सिस्टीम विकसित झाली तर!?
27 Jan 2022 - 11:48 am | कपिलमुनी
नव्या सिस्टम ला नमो ओएस असे नाव द्यावा
27 Jan 2022 - 12:38 pm | वामन देशमुख
हं, माझं अनमोदन आहे बरं का.
---
सवांतरः राहूलOS हे नाव क्यूट वाटलं असतं असं आधी वाटलं; पण आरएसएस आपलं ते हे, ओएस दणकट असते, म्हणून जाऊ द्या असं नंतर वाटलं.
---
अवांतर: माझ्या एका कॉलेज मित्राचं नाव राहूल आहे आणि तो चाळीशी उलटूनही अजून क्यूट आहे.
27 Jan 2022 - 12:50 pm | सुबोध खरे
५०० च्या वर ठिकाणी नेहरू आणि गांधी घराण्यातील लोकांची नावे दिली तरी चालतंय.
केवळ एकदा खासदार असलेल्या संजय गांधी यांचे नाव मुंबईतील एकमेव राष्ट्रीय उद्यानाला आणि लखनौ मधील प्रथितयश वैद्यकीय आस्थापनाला दिलेलं हि चालतं
पण सलग २० वर्षे निवडून येऊन मुख्यमंत्री आणि पंतप्रधान झालेल्या श्री मोदींचं नाव क्रीडा संकुलाच्या एका भागाला दिल्यावर लोकांच्या पोटात दुखायला लागतं
त्याला कुणीच काही करू शकत नाही.
वैचारिक बद्धकोष्ठावर उपाय नाही.
27 Jan 2022 - 2:30 pm | अमरेंद्र बाहुबली
संजय गांधींनी मारूती स्थापली होती. मोरूती सुझूकीची प्रगती पहा. आहे ते विकलं फूकलं विकलं असतं तर देश भिकेला लागला असता तेव्हाच.
27 Jan 2022 - 3:54 pm | रावसाहेब चिंगभूतकर
अदानी विलमार घ्या. शिव्या तर तश्या पण देणार तुम्ही.
27 Jan 2022 - 2:44 pm | sunil kachure
ह्यांची सामान्य लोकांना अलर्जी नाही.
त्यांचे रोज चे जीवन सुख कारक करणारे सरकार असावे हीच सामान्य लोकांची इच्छा असते.
Bjp ला छान संधी लोकांनी दिली त्याचे सोने त्यांनी करायला हाव होते.
लोकांच्या हिताचे निर्णय घेवून त्याची amalbajavni केली पाहिजे होती
पण जे निर्णय सरकार नी घेतले त्याचे दुष्परिणाम च जास्त होते.
आपल्या राज्य विषयी बोलायचे झाले तर बहुमत मिळवून bjp सत्तेत आली नाही हे लोकांना खटकले होते.
पण सुशांत सिंग प्रकरण.अर्णव ला पाठिंबा.
उद्धव आणि त्यांच्या पुत्रावर अत्यंत नीच पातळी चे शब्द वापरून टीका.
हे सुसंस्कृत मराठी लोकांना पटले नाही.
हे ह्या राज्याची परंपरा पण नाही.
पवार साहेब असतील किंवा बाकी नेते इतक्या खालच्या पातळीवर येवून त्यांनी टीका कधीच केली नाही.
त्या मुळे ज्यांना bjp विषयी आस्था होती ते पण लांब गेलं
27 Jan 2022 - 4:24 pm | Trump
रावत काय फुले उधळतात का?
27 Jan 2022 - 4:25 pm | Trump
राऊत काय फुले उधळतात का?
27 Jan 2022 - 1:02 pm | sunil kachure
ही म्हण पूर्ण करा.मराठी मध्ये आहे.
तशी अवस्था आहे.
फक्त च आश्वासन .
स्वतःची os पहिली निर्माण होवू ध्या.
आणि नंतर ह्या वर बोला.
27 Jan 2022 - 1:09 pm | सुबोध खरे
कसं बोललात?
ओ एस कागदावर सुद्धा तयार झाली नाही
तोच लोकांचे वैचारिक बद्धकोष्ठ उफाळून आलं
27 Jan 2022 - 3:44 pm | श्रीगणेशा
निदान Android चं निर्विवाद वर्चस्व मोडून पर्यायी ऑपरेटिंग सिस्टीम यशस्वी करून दाखवणं अगदी मायक्रोसॉफ्ट सारख्या मोठ्या कंपनीलाही जमलं नाही. काही वर्षे आणि खूप सारा पैसा ओतूनही शेवटी त्यांनी शहाणपणा दाखवत माघार घेतली.
28 Jan 2022 - 3:46 am | निनाद
खुप मोठे असलेले अनेक व्यवसाय मनोरे सहजपणे ढासळून पडले आहेत. यात याहू पासून अनेक उदाहरणे आहेत.
आज Android खूप मोठे आहे म्हणून त्याला पर्याय दिसत नसला तरी तो पर्याय उभाच राहू शकत नाही असे नाही. चीनी सरकारने तसा प्रयत्न यशस्वी केला आहे. त्यांच्या कडे अनेक ओएस चे फ्लेवर्स आहेत असे दिसते. आणि शेवटी Android पण लिनक्सचाच एक फ्लेवर आहे!
28 Jan 2022 - 10:22 am | सुबोध खरे
अमेरिकेची GPS हि यंत्रणा असताना आपली अशी प्रणाली असण्याची गरजच काय असे विचारणारे अनेक होते.
परंतु कारगील युद्धाचे वेळेस अमेरिकेने पाकिस्तानी लष्कराचा ठावठिकाणा देण्यास नकार दिला होता. यामुळे याबाबतीत आपण स्वयंपूर्ण असणे आवश्यक आहे हे भारताच्या लक्षात आले आणि त्या दिशेने केलेले प्रयत्न २०१८ साली पूर्णत्वास जाऊन इसरो तर्फे भारत सरकारने NavIC ('Navigation with Indian Constellation' हि स्वतः ची जीपीएस प्रणाली तयार केलेली आहे. आणि गेल्या तीन वर्षात लष्कराने ती वापरण्यास सुरुवात सुद्धा केलेली आहे.
NavIC: Two decades after US spurned India in Kargil, country replies with desi GPS
Read more at:
https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/navic-two-...
NavIC: Know about India's own GPS, now available on smartphone
Read more at:
https://economictimes.indiatimes.com/tech/software/navic-know-about-indi...
https://economictimes.indiatimes.com/tech/software/navic-know-about-indi...
(तसेही भारताला उपग्रह, अणुशक्ती, सौर ऊर्जा इ मध्ये काहीही जमणार नाही किंवा गरजच काय असे म्हणणारे दीड शहाणे भरपूर होते किंवा आहेतही)
याच कारणास्तव भारत काही बाबतीत स्वयंपूर्ण होण्याचा विचार करत आहे. परदेशी ओ एस ( अँड्रॉइड किंवा ऍपल) या भुसभुशीत असून त्या आपल्याला कित्येक बाबतीत आपली वैयक्तिक माहिती त्यांना देण्यास भाग पाडतात. यामुले आपल्याला किती आणि कुठे तडजोड करावी लागेल याची आपल्याला कल्पना येत नाही.
एक उदाहरण देतो आहे. भारतातील मॉल मध्ये येणाऱ्या गाड्याच्या संख्येत किती वाढ झालेली आहे याची सांख्यिकी अमेरिकी उपग्रह मालकीची असलेल्या कंपन्यांनी तेथील कंपन्यांना विकली. त्यामुळे FMCG किंवा लक्झरी उत्पादने किती विकली जातील आणि भारतीय बाजार किती उच्चीस जाईल याचा आडाखा बांधून तेथल्या कंपन्यांनीं भारतीय बाजारात पैसे ओतला आणि नफा झाल्यावर वाऱ्याची दिशा बदलल्यावर हा पैसा डिसेंबर मध्ये काढून घेतला. ( अर्थात भारतीय बाजार पडण्याचे हेच एक कारण आहे असे मुळीच नाही). अशी असंख्य उदाहरणे आहेत.
तेंव्हा आपली किती माहिती परदेशी कंपन्याच्या हाती ठेवायची याचा विचार करायची वेळ आली आहे. आणि हा प्रश्न पक्षीय दृष्टिकोनातून विचार करण्यापेक्षा सर्वांगीण विचार करण्याची आवश्यकता आहे.
परंतु मिपावरील ह्रस्वदृष्टी असलेल्या वैचारिक बद्धकोष्ठाच्या रुग्णांनी त्यावर नेहमीप्रमाणे कावकाव सुरु केली आहे.
त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे हाच एक उपाय आहे
28 Jan 2022 - 11:51 am | निनाद
नाविक ही यंत्रणा खूप महत्त्वाची ठरते आहे. अमेरिकेने पाक च्या डोक्यावरचा हात काढल्या पासून चीनी त्यांना मदत करत आहेत. BeiDou नेव्हिगेशन सिस्टम ची लष्करी सेवा पाकिस्तान सशस्त्र दलांना दिली गेली आहे. लष्करी सेवेची स्थान अचूकता १० सेंटीमीटर आहे. आणि भारतीय लष्करी सेवेची स्थान अचूकता १० मिटर आहे. पण यावर भारतात अजून काम चालले आहे. येत्या काळात नवीन उपग्रह अचूकता वाढवतील. ही सेवा अचूक कदाचित केली ही असेल आणि याची माहिती बाहेर दिलीच नसेल अशीही शक्यता आहे.
भारताने उपग्रह विनाशक अग्निबाण तंत्रज्ञान आधीच विकसित केले आहे. त्यामुळे युद्ध काळात नको असलेले शत्रूचे उपग्रह उडवून त्याला नेव्हिगेशन सिस्टम आंधळे करणे
आता भारताला सहज शक्य आहे.
28 Jan 2022 - 12:12 pm | सुबोध खरे
आपला दुवा २०१६ चा आहे. तेंव्हा नाविक चालू झालेली नव्हती. अर्थात चिनी प्रणाली सध्या तरी भारताच्या पुढे असेल यात शंका नाही.
परंतु भारतीय लष्कराने स्वयंपूर्ण का व्हावे याचे कारण पाहून घ्या
The US has, via satellites, apparently digitally mapped the entire world. In military terms, BECA (Basic Exchange and Cooperation Agreement (BECA) to share geospatial and satellite data,) promises Indian forces and weapons platforms digitized maps so obtained of, say, China and hence the precise targeting coordinates for any Chinese military assets India may care to have in its crosshairs in a conflict. It will, in theory, also permit Indian missiles and other over-the-horizon standoff munitions once fired to reach distant points by helping them correct course mid-way and align properly to target in their terminal run for precise destruction. So far so good; where’s the hitch?
The trouble is the US, as dispenser and source of sensitive adversary target information, is in a position to monitor on real time basis the digitized data being accessed and, if its national interests of the moment are so served, to deny the user state such information and even to tweak the digitized data just enough to misdirect the fired weapon, and otherwise to dictate the outcome of such engagements. The US can then plausibly blame technical glitches in the Indian weapon for it going astray. No BECA can ever be drafted in such verifiable detail as to prevent the US from doing this. After all, India has no control over American satellites and, therefore, even less control over the kind of information they transmit at any time. So, there’s no guarantee that expensive Indian weapons fired at China will not be thus fooled around with by a third party. It needs no reminding that Indian and US interests even as regards China only overlap a bit but are far from convergent.
The cautionary tale to have in mind is what happened when the intermediate range Agni missile was first test fired in May 1989 and was oriented to “target” by the US Global Positioning System (GPS). The launch was fine and the telemetry in the initial stage indicated flawless performance, but with Indian ships monitoring its progress and stationed at the planned endpoint in the Indian Ocean, the missile entering the terminal stage in its flight suddenly plunged into the sea. What happened was that the American GPS had just then “blinked” sending the missile off course!
India thereafter used the Russian GPS. It is not hard to imagine such a thing happening with Indian munitions dependent on US-generated target data being misdirected in wartime. With what consequences for India can only be imagined.
This is why India so desperately needs to be self-reliant in armaments and strategic support systems at any cost, including accelerating the pace of launching and operationalizing an Indian constellation of satellites to provide the Indian military indigenous blink-proof GPS and targeting wherewithal not prey to the interests of any outside power.
https://bharatkarnad.com/2020/10/24/beca-oh-no-in-the-context-of-indo-us...
पाकिस्तान चीनची प्रणाली वापरू लागेल तेंव्हा पाकिस्तानने तुमच्या वर कसा आणि किती अचूक हल्ला करायचा हे सुद्धा चीनच्या हातात असेल.
मुळात पाकिस्तान हा भिकारी देश असून चीनची बटीक झालेलाच आहे. चीनने त्यांना संपूर्णपणे आपल्यावर अवलंबित केलेले आहे.
28 Jan 2022 - 12:04 am | सुक्या
जरा अवघड आहे. Android आणि iOS यांनी बनवलेली इको सिस्टिम आता मॅचुअर झाली आहे. कित्येक अॅप, कितीतरी कंपण्या आता या बनवलेल्या इको सिस्टिम वर जगत आहेत. Android आणि iOS चा गड भेदणे आता जवळ्पास अशक्यप्राय गोष्ट झाली आहे. एच पी / मायक्रोसॉप्ट वगेरे दिग्गजांनी तो गड भेदण्याचा प्रयत्न केला पण त्याला यश आले नाही.
भारत सरकार नवीन ऑपरेटिंग सिस्टीम जरुर विकसित करु शकतात. पण त्याची उपयोगितेसाठी त्यांना Android आणि iOS असलेल्या अॅप चा वापर करावाच लागेल. यात सरकारचा दोष नाही तर विविध अॅप चे मालक अजुन एका नवीन ऑपरेटिंग सिस्टीम साठी अॅप बनवतील का याची शश्वती नाही. त्यात त्यांना डेवलेपमेंट / टेस्ट / विविध पेमेंट गेटवे ला संलग्न करणे या नाना झंझटी आहेत. त्यात बराच पैसा व वेळ वाया जातो. त्याउपर त्यातुन काही उत्पन्न मिळेलच याची शाश्वती नाही.
त्यामुळे सरकार जर हा वेळ व पैसा चांगले अॅप बनवण्यासाठी खर्च करेल तर ते जास्त संयुक्तीक होइल.
28 Jan 2022 - 3:42 am | निनाद
सरकार ओएस बनवणार नाहीये - हाच मुख्य मुद्द आहे, म्हणून ती बातमी आहे!
भारत स्वदेशी ऑपरेटिंग सिस्टीम विकसित करणार्या उद्योगांसाठी एक इको सिस्टिम विकसित करेल म्हणजे सरकार ओएस बनवणार नाही! म्हणून मला यात धुगधुगी वाटते.
28 Jan 2022 - 12:42 pm | प्रदीप
माझ्या वाचनांत आलेले असे की ही ओएस सरकारच्या स्वतःच्या व डिफेन्सच्या अंतर्गत वापरासाठीच आहे. चुभूद्याघ्या,
27 Jan 2022 - 9:07 am | निनाद
गुंटूर आंध्र प्रदेश जिना सर्कल येथे २६ जानेवारी रोजी, राष्ट्र प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना, गुंटूर पोलिसांनी भारतीय राष्ट्रध्वज फडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या हिंदू वाहिनीच्या सदस्यांना अटक केली. तेलगू देसम पक्षाच्या सदस्याने हा टॉवर बांधून गुंटूरला भेट दिली तेव्हा जिना यांचे प्रतिनिधी जुदलियाकत अली खान यांचा सत्कार केला होता.
भारतात अजूनही जिना च्या नावाचे टॉवर आणि आणि वाहतूक बेट का आहे? आणि का राहू दिले जाते?
27 Jan 2022 - 3:53 pm | रावसाहेब चिंगभूतकर
Former RAW (Research and Analysis Wing) officer has made explosive allegations that former Vice President Hamid Ansari who has served as Indian Ambassador to Iran between 1990-92, endangered the lives of RAW officers in Tehran and even ended up exposing the RAW set-up in Tehran.
28 Jan 2022 - 3:47 am | निनाद
याचा दुवा देता का?
28 Jan 2022 - 8:28 am | रावसाहेब चिंगभूतकर
https://www.tv9hindi.com/india/former-raw-officers-wants-action-against-...
https://www.sundayguardianlive.com/news/ex-raw-officers-want-pm-act-hami...
https://mobile.twitter.com/rawnksood/status/1144581538954145792?lang=mr
https://youtu.be/r8Uqm1VxvQ0
28 Jan 2022 - 8:46 am | चंद्रसूर्यकुमार
२००७ मध्ये कम्युनिस्ट पक्षांच्या आग्रहामुळे या मनुष्याला उपराष्ट्रपतीपदासाठी युपीएने उमेदवारी दिली होती. कम्युनिस्टांच्या आग्रहाने पुढे आलेला मनुष्य.... म्हणजे तो कसा असणार हे वेगळे सांगायलाच नको.
28 Jan 2022 - 9:49 am | सुबोध खरे
हमीद अन्सारी हा देशद्रोही माणूस आहे असे अनेक वेळेस पुढे आलेले आहे.
28 Jan 2022 - 11:58 am | निनाद
तेहरानमध्ये असताना अन्सारी भारताच्या हिताचे रक्षण करू शकले नाहीत असे दिसते आहे. तेव्हा अशी चार प्रकरणे घडली होती. अन्सारीची इराणमधून बदली झाली तेव्हा भारतीय दूतावासात जल्लोष झाला होता.
हा माणूस उपराष्ट्रपती असतांना काय काय विध्वंस करून गेला असेल याची कल्पना ही आपण करू शकत नाही. या शिवाय हा विविध ठिकाणी राजदूत म्हणून कार्यरत असतांना काय भानगडी होत असतील? कोणती माहिती कुणाला कशी मिळत असेल असेल? त्या काळात अन्सारीच्या तेहरानमधील पाकिस्तानी राजदूताशी झालेल्या दीर्घ भेटी चर्चेत होत्या. त्यात काय घडत असे हे कधीच बाहेर आले नाही. भारताचा उपराष्ट्रपतीच पाक धार्जिणा असणे हे केव्हढे भव्य यश आय एस आय ने मिळवले होते?
भारताचे यश काय हे मात्र दिसत नाही..?
28 Jan 2022 - 12:33 pm | रावसाहेब चिंगभूतकर
कुलभूषण जाधव ला इराण मध्येच पकडलं गेलं होतं. बहुधा भारत आपल्या हेरांना बलुचिस्तान मध्ये इराण मार्गे पाठवत असणार. आणि जाधब कोण ही माहिती कुठून तरी लिक झाली असणार.
28 Jan 2022 - 12:43 pm | वामन देशमुख
प्रतिसादाच्या आशयाशी सहमत आहे.
खरंतर अन्सारी या व्यक्तीने तिच्या संपूर्ण कार्यकाळात भारत-हितविरोधी कामेच केलेली आहेत असे दिसते.
---
मोदी-शहा यावर जनतेला दिसेल अशी आणि भविष्यात दुसरे अन्सारी तयार होऊ नयेत अशी काय कारवाई करतात ते पाहू.
27 Jan 2022 - 9:25 pm | कपिलमुनी
भाजप आमदार राणे यांना सर्वोच्च न्यायालयाने शरण येण्यास सांगितले .
पप्पा राणे पाठोपाठ छोटा राणे जेलमध्ये नंबर लावणार !
27 Jan 2022 - 10:09 pm | अमरेंद्र बाहुबली
भाजपच्या लोकांना महाराष्ट्र हा युपी नाही दादागीरी करायला हे कळाले असेल. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे.
28 Jan 2022 - 9:47 am | सुबोध खरे
महाराष्ट्रात काय द्या चे राज्य आहे.
28 Jan 2022 - 11:46 am | अमरेंद्र बाहुबली
म्हणूनच २०१९ ला पवारानी लत्तापालट करून महाराष्ट्र वाचवला.
28 Jan 2022 - 11:51 am | सुबोध खरे
हा हा हा
छान विनोद होता
अजून पाठवा
28 Jan 2022 - 12:11 pm | अमरेंद्र बाहुबली
विनोद? सत्ता पालट केली २०१९ ला हे खोटं का?
28 Jan 2022 - 12:16 pm | सुबोध खरे
महाराष्ट्र वाचवला.
हा हा हा ही ही ही
पवारांसारख्या xxxxx माणसा मुळे महाराष्ट्र वाचायला ते काय एखादं डबक्यात बुडणारं शेम्बडं पोर आहे का?
काय पण तुमच्या बुद्धीची अगाध झेप?
28 Jan 2022 - 12:58 pm | अमरेंद्र बाहुबली
नाही ना. पण १०५ घरी बसवले, नी आपली ऊभी हयात खर्च करून विकसीत केलेला महाराष्ट्र भाजपच्या ताब्यात जाण्यापासून वाचवला. नाहीतर भाजपने महत्वाची कार्यालये गुजरात ला हलवून, मुंबईतून मराठी माणसाला देशोधडीला लावून महाराष्ट्राचा युपी, बिहार केला असता. मोदी त्याना गुरू मानतात ते ऊगाच का? :)
28 Jan 2022 - 2:46 pm | सर टोबी
या वाक्याचा काय अर्थ घ्यायचा. डबक्यात जे बुडतं ते शेंबडं पोर असतं. किंवा शेंबडी पोरं डबक्यातच बुडतात. किंवा शेंबूड आल्यावर डबक्याच्या बाजूने जाऊ नये.
कुमार १, यावर काही मनोरंजक खेळ तयार करता येईल का?
28 Jan 2022 - 3:17 pm | अमरेंद्र बाहुबली
खिक्क. किंवा शेंबंडं पोर असेल तरच त्याला डबक्यात बूडण्यापासून वाचवावे. बूडनार्या पोराच्या नाकाला शेंबूड आहे का ते पहावे. शेंबूड नसेल तर शेंबूड यायची वाट पहावी मगच वाचवावे?
28 Jan 2022 - 7:59 pm | सुबोध खरे
शेम्बडं पोर म्हणजे ज्याला स्वतःचा शेम्बूड पुसता येत नाही इतका लहान मूल.
डबक्यात पडल्याने आपल्याला मृत्यू येईलही समजण्याइतकी समज/ अक्कल न आलेलं
प्रतीक साहेब
फडतूस प्रतिवाद करण्यापेक्षा
केवळ मोदी द्वेषाचे दोन ओळींचे प्रतिसाद येथे देण्यापेक्षा काहीतरी चांगली माहिती असणारे प्रतिसाद किंवा चांगले लेख टाकले तर बरं होईल.
निदान श्री मोदींचं काय चुकलं आणि तेथे काय करता येऊ शकलं असतं याचे समग्र विश्लेषण असलं तर चर्चा करता येईल
अन्यथा आमचे विद्वान मित्र मोगा उर्फ हितेश उर्फ चंपाबाई यांच्यासारखे केवळ भंपक प्रतिसाद दिल्यास वितंडवाद सोडून काहीच निष्पन्न होणार नाही.
बघा जमतंय का?
नाही तर चालु द्या तुमचे तेच ते अन तेच ते
28 Jan 2022 - 4:19 am | निनाद
२९ जानेवारी रोजी शुक्र धनु राशीत प्रवेश करेल.
28 Jan 2022 - 2:09 pm | अनन्त अवधुत
.
28 Jan 2022 - 12:10 pm | प्रसाद_१९८२
ठाकरे सरकारला सुप्रीम कोर्टाचा झटका, भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन केले रद्द
https://maharashtratimes.com/india-news/supreme-court-quashes-one-year-s...
28 Jan 2022 - 2:02 pm | चंद्रसूर्यकुमार
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा विधानसभेच्या अधिकारावर अतिक्रमण करणारा आहे आणि तो लोकशाहीसाठी असलेला धोका (डेंजर टू डेमॉक्रसी) आहे असे श्री.रा.रा.संजय राऊत म्हणत आहेत.
हा सर्वोच्च न्यायालयाचा अपमान नाही का? त्याबद्दल राऊतविरोधात कंटेम्प्टची केस दाखल होऊ शकेल का?
28 Jan 2022 - 2:28 pm | sunil kachure
सरकार येतील आणि जातील
सरकार जनता निवडते आणि ते सरळ लोकांना जबाबदार असते
न्यायालय किंवा प्रशासन ही फक्त यंत्रणा आहे ती लोकांना बांधील नसते.
त्या मुळे घटनाकार नी न्यायालय,संसद,विधानसभा ह्यांना मर्यादा घालून दिली आहे
ती सीमारेषा कोणीच ओलांडायची नाही
नाही तर फक्त वाटोळे होईल .
सरकार कोणाचे आहे ही फालतू बाब आहे.
कोणती संस्था मर्यादा सोडून काम करत नाही ना हे महत्वाचे आहे
28 Jan 2022 - 8:06 pm | सुबोध खरे
ती सीमारेषा कोणीच ओलांडायची नाही
आपण न्यायालयाचा निवाडा पूर्ण वाचला आहे का?
न्यायालयाने सीमारेषा कशी ओलांडली आहे हे आपल्याला सांगता येईल का?
अगणित काळासाठी आमदारांना निलंबित करता येणार नाही असे न्यायालय का म्हणते हे वाचलंय का?
याचा गैरवापर किती आणि कसा होऊ शकतो हेही त्या निकालात लिहिलेले आहे.
श्री राऊत काय म्हणतात त्याला अगदी शिवसैनिक सुद्धा सिरियसली घेत नाहीत. बाकीच्यांचं तर सोडाच.
अन्यथा "नॉटी आणि हर्बल तंबाखू" वर एवढे शेकड्याने विनोद आले नसते.
त्यांना राजकारणच करायचे आहे. तुम्ही त्यांच्या सतरंज्या कशाला उचलताय?
निकाल वाचला असता तर असली भंपक विधाने केली नसती.
28 Jan 2022 - 12:56 pm | sunil kachure
महाराष्ट्रात चालणारे राजकारण आणि यूपी ,बिहार सारख्या राज्यात चालणारे राजकारण ह्या मध्ये खूप फरक आहे.
महाराष्ट्रात एक वेगळी परंपरा आहे .बाकी राज्यांपेक्षा नीती चे राजकारण ह्या राज्यात होते.
विकास ची दृष्टी असणारे च मुख्यमंत्री ह्या राज्याने बघितले आहेत
अगदी यशवंत राव ह्यांच्या पासून आज च्या ठाकरे साहेब न पर्यंत सर्व मुख्य मंत्री कार्यक्षम च ह्या राज्याला लाभले.
यूपी,बिहार सारखी विरोधी मता च्या लोकांची हत्याकांड ह्या राज्यात झाली नाहीत.
जाती ,धर्माचे टोकाचे राजकारण ह्या राज्यात झाले नाही
ही राज्याची परंपरा बदलून,.
यूपी,बिहार सारखे गलिच्छ राजकारण इथे रुजविण्याचे प्रयोग bjp करत आहे.
आणि ते अयोग्य आहे
28 Jan 2022 - 8:12 pm | सुबोध खरे
बाकी राज्यांपेक्षा नीती चे राजकारण ह्या राज्यात होते.
हा हा हा हि हि हि
सर्वात जास्त आमदार निवडून आलेला पक्ष विरोधात बसलाय
त्यांच्याशी युती केलेला पक्ष मुख्यमंत्रीपदासाठी आपल्या कट्टर विरोधकांबरोबर सत्तेत बसलाय.
जाती ,धर्माचे टोकाचे राजकारण ह्या राज्यात झाले नाही
हा हा हा हि हि हि
ब्रिगेडी लोक कोणत्या राज्यात आहेत?
ओ बी सी आंदोलन नंतर मराठा आंदोलन नंतर धनगर आंदोलन कशासाठी आहे हो?
कशाला उगाच फुक्या मारताय?
we dont caste vote
we vote caste
इंग्रजीत आहे बघा समजलं तर
28 Jan 2022 - 1:50 pm | sunil kachure
एक न्यूज चॅनल चा टीव्ही anchor राज्याच्या मुख्यमंत्री असलेल्या व्यक्ती लं आरे तुरे करतो आणि विरोधी पक्ष त्या अँकर ची बाजू घेवून रस्त्यावर उतरतात.
राज्याच्या मुख्यमंत्री असलेल्या व्यक्ती चा अपमान विरोधी पक्षांना राज्याचा अपमान वाटत नाही.
असे ह्या राज्यात कधीच घडले नाही.
एक अभिनेत्री राज्याच्या मुख्यमंत्री वर खुळचट,बावळट कॉमेंट करत असते .
आणि विरोधी पक्ष त्या नटी साठी राज्याची प्रतिष्ठा सोडून रस्तावर उतरतात .
असे ह्या राज्यात कधीच घडले नाहीं.
Bjp विषयी वाईट मत मराठी लोकात निर्माण झाली ती ह्याच प्रसंग वरुंम
28 Jan 2022 - 1:55 pm | sunil kachure
आणि न्यूज अँकर आणि अभिनेत्री नी त्यांचा अपमान होईल अशी भाषा वापरली असती तर .
महारष्ट्र ची जी परंपरा आहे त्याचे पालन विरोधी पक्षांनी केले असते.
ते अभिनेत्री आणि अँकर साठी रस्त्यावर नक्कीच उतरले नस्तेम
28 Jan 2022 - 3:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
च्यायला, नव्या व्हेरियन्टचं आगमन. आता पुन्हा किती डोस घ्यावे लागतील. काय माहिती. २०२५ पर्यन्त दहा एक बुष्टर डोस घ्यावे लागतील वाटतं.
यापेक्षा घण्टी, थाळी, मशाल मोर्चे भारी होते. आकाशातून नील किरणे येऊन व्हायरसचा ख़ात्मा होतो. ;)
-दिलीप बिरुटे
28 Jan 2022 - 3:22 pm | sunil kachure
तरी सांगतो हा नवीन variant आणि त्या विषयी कांगावा करणारे ब्रिटन आणि अमेरिका च असणार.
हेच लस उत्पादक पण आहेत
Who ह्यांची दासी आहे.
28 Jan 2022 - 11:23 pm | सुक्या
१८८ साहेब. तुम्हाला काहीही म्हणजे अगदी काहीही माहीत नसते हे सगळ्यांना माहीत आहे. जरा हात्पाय हलवा हो. त्या लिंकेत ब्रिटन आणि अमेरिका नाही तर तुमच्या लाडक्या चीन चे सायंटीस्ट तसे म्हणत आहेत.
नव्या अवतारात तरी सुधरा !!
29 Jan 2022 - 1:23 pm | इरसाल
श्री. सुक्या,
तुमच्यावर कंटेम्ट ऑफ १८८ ची केस का दाखल करण्यात येवु नये.
साक्षात जगतगुरुंना हातपाय हलवायला नी सुधरायला सांगताय
1 Feb 2022 - 1:09 am | सुक्या
आय माय स्वारी . . . भावनेच्या भरात लिहुन गेलो ...
आता आत्मक्लेश करावा म्हणतो आळंदीला जाउन . .
30 Jan 2022 - 12:40 am | sunil kachure
पण ह्या वुहान लॅब नक्की कोण चालवते ह्या वर अनेक उलट सुलट माहिती नेट वर असते.
अगदी बिल gate च हया लॅब शी संबंध आहे असे पण दावे आहेत.
काही ही असो पण ही वुहान लॅब आणि अमेरिका ब्रिटन ह्यांचे कनेक्शन असण्याची दाट शक्यता आहे.
आर्थिक फायदा जिथे असेल तिथे दुश्मन पन मित्र होतात .
भारताचे चीन शी मतभेद दाखवायला तीव्र आहेत .
पण आर्थिक व्यवहार वाढत च आहेत.
31 Jan 2022 - 10:59 am | सुबोध खरे
भारताचे चीन शी मतभेद दाखवायला तीव्र आहेत .
हायला
मग डॉकलाम किंवा गाल्वान खोऱ्याच्या हाडं गोठवण्याच्या थंडीत भारतीय लष्कराचे जवान काय भांगडा खेळायला उभे आहेत?
29 Jan 2022 - 8:52 pm | चंद्रसूर्यकुमार
परत पिगॅसस प्रकरण चर्चेत आले आहे. २०१७ मध्ये पंतप्रधान मोदींनी इस्राएलला ऐतिहासिक भेट दिली. त्यावेळी भारत-इस्राएल संरक्षण करार झाला त्या कराराद्वारे भारत सरकारने इस्राएलकडून पिगॅसस हे हेरगिरीसाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान घेतले असा दावा न्यू यॉर्क टाईम्समध्ये आलेल्या एका रिपोर्टमध्ये केला गेला आहे. एक गोष्ट कळत नाही. याविषयी सर्वोच्च न्यायालयाने तज्ञांची समिती नेमली आहे. त्या समितीकडे आमचे फोन अशाप्रकारे या हेरगिरीला बळी पडले आहेत अशाप्रकारे कोणी तक्रार केली आहे का आणि तांत्रिक तपासासाठी ते फोन सादर केले गेले आहेत का? अशाप्रकारे कोणती बातमी आलेली मी तरी वाचलेली नाही. तेव्हा त्या सर्वोच्च न्यायालयाच्या समितीकडे फोन तपासणीसाठी दिलेच नसतील तर ती समिती नक्की कसला तपास करणार आहे? सुरवातीला फ्रान्समधील कोणत्यातरी नियतकालिकात उडतउडत आलेल्या बातमीवरून विसंबून राहून मोदी सरकारने आमचे फोन बग केले असतीलच अशी कल्पना केली तर त्यातून धुराळा उडायचा तो उडू शकेल पण तो मुद्दा सिध्द करायला तांत्रिक तपासणीच करायला लागेल ना? त्याविषयी काय? आणि दुसरे म्हणजे संसदेच्या अधिवेशनाच्या वेळेसच बरे पिगॅसस संबंधी असे कोणते कोणते रिपोर्ट येतात? आणि तिसरे म्हणजे आता न्यू यॉर्क टाईम्समध्ये आलेली बातमी असा दावा करत आहे की भारत सरकारने ते तंत्रज्ञान इस्राएलकडून विकत घेतले. ते तंत्रज्ञान विकत घेतले असे क्षणभर सत्य जरी मानले तरी त्याचा अर्थ सरकारने त्या तंत्रज्ञानाचा वापर विरोधकांवर हेरगिरीसाठी केला असा होतो की तसा वापर केला जाईल ही भिती आहे? नुसती भिती असेल आणि अमुक झाले तर तमुक होईल या कल्पनांना नक्की कितपत अर्थ आहे? म्हणजे घरी असलेल्या दोरखंडाला साप मानून घाबरायला लागले तर त्या भितीचे काय करायचे?
31 Jan 2022 - 11:03 am | सुबोध खरे
हि बातमी केवळ संसदेच्या अधिवेशनासाठी आलेली नाही तर पंजाब उत्तराखंड आणि उत्तरप्रदेशच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आलेली आहे.
आणि आता संसदेत वाटेल ते आरोप करायला विरोधक आणि त्याला प्रसिद्धी करायला डावे पत्रकार पुढे सरसावतील.
सदनात केलेल्या भाषणा/आरोपांबद्दल गुन्हा दाखल करता येणार नाही.
31 Jan 2022 - 12:49 pm | sunil kachure
राज्य घटना लिहत असताना किती खोल वर विचार करून ती लीहली आहे.
ह्याचा प्रतेय नेहमी येतो
संसदेची सभागृह ,आणि राज्याची सभागृह ह्यांना विशेष अधिकार दिलेले आहेत.
त्यांच्या क्षेत्रात न्यायालय पण हस्तक क्षेप करू शकत नाही तसा त्यांना अधिकार नाही.
खूप विचार करून हे कलम घटनेत आहे.
लोकशाही मध्ये लोक सर्वोच्च स्थानी आहेत.आणि लोकांनी निवडलेले सरकार ह्यांना सर्वोच्च अधिकार आहेत.
संसदेत काही ही मत बिन्धास्त मांडता यावे म्हणून त्यांना विशेष संरक्षण घटनेने दिले आहे.
आणि हे अतिशय योग्य च आहे..
31 Jan 2022 - 12:59 pm | सुबोध खरे
खूप विचार करून हे कलम घटनेत आहे.
काय सांगताय?
असं एखादं कलम मिपाच्या घटनेत का नाही?
ज्यात केवळ खूप विचार करून दिलेला प्रतिसादच प्रकट व्हावा
31 Jan 2022 - 1:41 pm | sunil kachure
तुमच्या मताचे स्वागत आहे .तुमच्या सूचनेचे पण स्वागत आहे.
पण विचार करण्याचे स्वतंत्र,ते व्यक्त करण्याचे स्वतंत्र जे आपली राज्य घटना देते त्याची गळचेपी करायची का?
ठराविक प्रकारचे विचार च लोकांनी करावेत,ठराविक प्रकारची मत च लोकांनी व्यक्त करावीत
आणि हेच योग्य आहे.
असे तुम्हाला वाटत असेल तरी त्याचे स्वागत आहे.
तुम्हाला तो अधिकार भारताची राज्य घटना देते. आणि ते फक्त मत आहे कृती नाही .
ही T@c आहे
31 Jan 2022 - 2:33 pm | सुबोध खरे
मी ठराविक प्रकारे विचार करा असे म्हटलेलेच नाही तर खूप विचार करून लिहा असेच लिहिलेले आहे .
उचलला हात आणि बडवला कळफलक असे होऊ नये इतकीच अपेक्षा आहे.
तेंव्हा प्रतिसाद पूर्ण वाचतही चला
30 Jan 2022 - 9:54 am | रावसाहेब चिंगभूतकर
https://indianexpress.com/article/india/it-ministry-plan-one-digital-id-...
सगळ्या डिजिटल आयडेंटिटीज ना एका मास्टर डिजिटल आयडी शी जोडण्याचे IndEA 2.0 या प्रोपोजल वर आयटी मिनिस्ट्री विचार करत आहे. या द्वारे आधार, पॅन, पासपोर्ट वगैरे वगैरे सर्व एकमेकांशी जोडले जाऊन एकाच आयडी द्वारे इपलब्ध असतील.
31 Jan 2022 - 5:13 pm | मुक्त विहारि
घुसखोरांना थांबवण्यासाठी, ही एक महत्वाची पायरी आहे ...
मध्यंतरी ह्या विषयावर एक बातमी वाचली ... लिंक देतो...
https://www.lokmat.com/crime/a-young-woman-who-remained-a-hindu-for-15-y...
-------
भाजपच्या काळांत, संरक्षणा बाबतीत, योग्य निर्णय घेतले जात आहेत... अर्थात, घराणेशाहीची तळी उचलत असणार्या, लोकांना, ही गोष्ट कधीच समजणार नाही....
31 Jan 2022 - 5:08 pm | मुक्त विहारि
9 राज्यांमध्ये हिंदूंना 'अल्पसंख्याक' दर्जा देण्याचं प्रकरण, सुप्रीम कोर्ट केंद्रावर नाराज; म्हणाले..
https://lokmat.news18.com/amp/national/grant-of-minority-status-for-hind...
--------
राज्यांचा संदर्भ देत त्यात म्हटले आहे की, लडाख, मिझोराम, लक्षद्वीप, काश्मीर, नागालँड, मेघालय, अरुणाचल प्रदेश, पंजाब आणि मणिपूरमध्ये हिंदू अल्पसंख्याक आहेत.
मिझोराम, मेघालय आणि नागालँडमध्ये ख्रिश्चन बहुसंख्य आहेत तर अरुणाचल प्रदेश, गोवा, केरळ, मणिपूर, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात ख्रिश्चन लोकसंख्या आहे. तरीही त्यांना अल्पसंख्याक समुदाय म्हणून वागणूक दिली जाते.
--------
समान नागरी कायदा हवाच, असे माझे वैयक्तिक मत आहे..
31 Jan 2022 - 7:12 pm | टिनटिन
आपल्या शेतकरी आंदोलनाशी बरेच साधर्म्य आहे. ओट्टावामध्ये ट्रकचालक रस्ते ब्लॉक करत आहेत. त्यांच्या वॉर मेमोरियलजवळ नासधूस केली आहे. आंदोलनामध्ये निओ नाझींचा शिरकाव झाल्याच्या बातम्या आहेत. आपल्या शेतकरी आंदोलनाबद्दल काळजी दाखवणारे कॅनडाचे पंतप्रधान आता काय करतात ते बघूया
BBC Link
31 Jan 2022 - 7:14 pm | मुक्त विहारि
माहिती बद्दल धन्यवाद
31 Jan 2022 - 8:49 pm | चंद्रसूर्यकुमार
एक गोष्ट कळत नाही. कॅनडासारखा टिनपाट देश नक्की कोणत्या आधारावर मागच्या वर्षी शेतकरी आंदोलनात हुषार्या करत होता? कॅनडा म्हणजे कायम अमेरिकेचे शेपूट म्हणून राहण्यात धन्यता मानणारा लाळघोटा प्रकार आहे. ना लष्करी महासत्ता, ना आर्थिक महासत्ता, ना तंत्रज्ञानातील प्रगती. तरी अमेरिकेचे शेपूट म्हणून आणि त्यामुळे मिळालेले नाटोचे सदस्यत्व हे सोडले तर कॅनडाकडे नक्की काय आहे? जस्टीन ट्रुडो २०१८ मध्ये भारतात आला होता तेव्हा मोदींनी त्याची फार दखल न घेता त्याची बोळवण केली होती. असल्या देशाच्या असल्या पंतप्रधानांचा असलीच वर्तणूक दिली पाहिजे.
31 Jan 2022 - 9:58 pm | सर टोबी
इथले काही आयडी ठराविक लोकांना आणि देशाला लाळघोटे म्हणतात ते समजून घ्यायला आवडेल. स्वतः मोदी आणि भाजपाची चाटूगिरी करायची आणि इतरांना लाळघोटे म्हणायचे म्हणजे कमाल झाली.
अजून विकासाचे कोंबडे आरवले पण नाही तरी मोदींनी नुसते धोरण जाहीर केले तरी भक्तांना गुलाबी स्वप्न पडायला लागतात.
1 Feb 2022 - 7:59 am | चौकस२१२
कॅनडासारखा टिनपाट देश नक्की कोणत्या आधारावर मागच्या वर्षी शेतकरी आंदोलनात हुषार्या करत होता?
हे आहे ते तेथील भरकटलेलया २-३-४ शीख पिढीचे कारस्थान ... आणि हि मंडळी फक्त या आंदोलनात नाही तर दरवेळी १५ ऑग किंवा २६ जानेवारी ला भारतविरोधी आरडाओरडा करता असतात .
मी कितीदा तरी मन्ड्ले आहे कि इतर देशात जेवहा हे तथाकथित देशव्यापी आंदोलन चालू होते त्यात शिखच का होते जास्त !
भारत डेथ बाय थौसंड कट्स याचा हा भाग
31 Jan 2022 - 7:26 pm | मुक्त विहारि
Air India TaTa Group: टाटांनी शब्द पाळला! एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना पहिली भेट मिळाली; पीएफ, पेन्शनमध्ये मोठे बदल
https://www.lokmat.com/photos/business/air-india-tata-group-epfo-onboard...
-------
आता परमपूज्य राहुल गांधी आणि त्यांचे चेले, काय मत व्यक्त करणार?
31 Jan 2022 - 7:29 pm | मुक्त विहारि
माझे फॉलोअर्स कमी झाले, वाढतच नाहीत, राहुल गांधींचं ट्विटरच्या CEO ना पत्र...
https://www.lokmat.com/national/as-my-followers-dwindle-rahul-gandhis-le...
---------
काय बोलावं, ते सुचेना....
------
1 Feb 2022 - 12:45 am | अनन्त अवधुत
संसदेतले खासदार कमी झालेत, अमेठीमधले मतदार कमी झालेत, पक्षाचे लोकांमधुन आलेले नेते कमी झालेत, लोकोपयोगी आंदोलने झालीच नाहीत, पण त्यांना काळजी आभासी जगतातल्या फॉलोअर्सच्या संख्येची.
आपलीआपली प्राथमिकता!!
31 Jan 2022 - 8:17 pm | मुक्त विहारि
जिल्हा परिषद कार्यालय परिसरातील जुगार अड्ड्यावर धाड, ८ कर्मचाऱ्यांना बेड्या, ५ लाखांचा मुद्देमाल जप्त
https://maharashtratimes.com/maharashtra/yavatmal/yavatmal-awdhutwadi-po...
ह्या राज्यात मदिरालये चालू आहेत, वाईन विक्रीला पण, मोठ्या जागेतील दुकानांत विकायला परवानगी दिली आणि आता चक्क सरकारी कार्यालयात जुगार!!!!!!