शहानी गुजरातचं मुख्यमंत्रीपद (जे तियाना सहज मिळू शकत होतं) ते न घेता केंद्रात दोन नंबरचं खातं का घेतलं हे समजून घ्या. माझा अदाज खरा ठरला तर शहा हे खरंच चाणक्य ठरतील.
बिहारात नितीश कुमारना पुर्ण पाच वर्षे मुख्यमंत्रीपद देऊ शकतात तर महाराष्ट्रात विरोधात बसन्यापेक्षा शिवसेनेला एक किंवा दोन वर्ष मुख्यमंत्रीपद त्यानी सहज दिलं असतं
नितीशकुमार आणि उद्धव ठाकरे ह्यान्च्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे.. नितीश १९७७ च्या आन्दोलनातून मोठा झालेला हुशार प्रशासक आहे.. वडिलान्ना दिलेल्या वचनाच्या जोरावर राज्याला वेठीला धरणारा नाही..
महाराष्ट्रात भाजपने जशा चुका केल्या तशाच चुका बिहारमध्ये सुद्धा केल्या.
बिहारमध्ये सुरूवातीपासून संजदपेक्षा कितीतरी जास्त मताधार असूनही भाजपने कायम (मधली २-३ वर्षे वगळता) नितीशकुमारांच्या ताटाखालचे मांजर बनण्यात धन्यता मानली. मोदींनी बिहारमध्ये प्रचारासाठी येऊ नये अशी नितीशकुमारांची अटही भाजपने अनेक वर्षे मान्य केली होती. २०१३ मध्ये मोदी बिहारमध्ये प्रचारासाठी गेले असताना तेथील पोलिसांनी त्यांच्या सुरक्षेकडे पूर्ण दुर्लक्ष केले होते. मोदींच्या सभेच्या जवळ बॉम्बस्फोट होऊन काही नागरिक गेले होते. एक बॉम्ब तर मोदींच्या व्यासपीठाखाली लपविला होता.
संजदशी युती तुटलेली असूनही व नितीशकुमार मोदींना पाण्यात पहात असूनही भाजपने २९१७
मध्ये पुन्हा एकदा नितीशकुमारांचा हात धरला. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत संजदला २ व भाजपला २२ जागा मिळाल्या होत्या. परंतु २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने आपल्या ५ जागा संजदला दिल्या व दोन्ही पक्षांनी समान १७ जागा लढविल्या. २०२० मधील विधानसभा निवडणुकीत भाजपने आधीच नितीशकुमारांना मुख्यमंत्री म्हणून मान्यता दिली. प्रतै भाजपला ७४ तर संजदला फक्त ४१ जागा मिळाल्या, पण मुख्यमंत्री भाजपचा नाही.
२०१७ मध्ये भाजपने संयम बाळगून विरोधी बाकांवर बसला असता तर काही काळात संजद-राजद-कॉंग्रेस यांचे संयुक्त सरकार कोसळून मध्यावधी निवडणुक होऊन भाजपला सत्तास्थापनेची संधी मिळू शकली असती. परंतु भाजपने धाडस न करता नितीशकुमारांच्या ताटाखालचे मांजरच राहण्याचे ठरविले व कायमच दुय्यम स्थान स्वतःहून गळ्यात घेतले.
महाराष्ट्रात भाजपने जे १९८९ पासून केले तेच बिहारमध्ये १९९६ पासून केले. स्वत:चा मताधार बऱ्यापैकी असूनही अजिबात गरज नसताना अत्यंत दुर्बल स्थानिक पक्षाला खूप जास्त महत्त्व देऊन स्वत:ची वाढ खुंटविण्याची चूक भाजपने दोन्ही राजो केली. सुदैवाने बिहारमध्ये २०१३ मध्ये व महाराष्ट्रात २०१४ मध्ये युती तुटून भाजपला खूप फायदा झाला होता व युतीतील स्थानिक पक्षाचा दुर्बल जनाधार सिद्ध झाला होता. परंतु पुन्हा एकदा भाजपला अवदसा आठवली व पुन्हा एकदा त्याच दुर्बल स्थानिक पक्षांना डोक्यावर बसवून भाजपने स्वतःचे नुकसान करून घेतले.
अर्ध्या पेक्षा जास्त भारतात स्थानिक पक्ष च प्रबळ आहेत.राष्ट्रीय पक्ष राज्य हिताचे नाहीत हे नॉन हिंदी राज्यांना चांगले माहीत आहेत.
यूपी ,आणि बिहार फक्त मतदार ची खोगीर भरती असलेल्या राज्यातील मतदान च्या जोरावर थापा मारून कोणी ही स्वतः ला राष्ट्रीय मान्यता असलेला पक्ष समजत असतात. पण दोन राज्यात च प्रभाव असणारे राष्ट्रीय पक्ष बेडका सारखे आहेत.ते हत्ती कधीच होणार नाहीत.
मोदी गुजरात सोडून यूपी मध्ये निवडणूक लढले त्याला हेच कारण आहे भावनिक आव्हान केले की यूपी ल कोणी निवडून येवू शकते.
मोदी नी .
केरळ,तामिळनाडू,आसाम,मेघालय,त्रिपुरा पश्चिम महाराष्ट्र, काश्मीर,कर्नाटक,आंध्र , तेलंगणा. बंगाल पंजाब,ओरिसा,,इथे निवडणूक लढवावी.
बरोबर .. पण नितिश शेवटच्या क्षणाला अजूनही पलटी मारू शकतात.. ते राजकिय कारकिर्दीच्या मावळतीला आहेत.. कदाचीत तिसर्या आघाडीचे पन्तप्रधान पदाचे उमेदवार असतील.. मला एवढच म्हणायचय .. त्यान्ची आणि उध्दव ठाकरेन्ची तुलना होऊ शकत नाही.. कारण आधी त्यानी रेल्वे-मन्त्री, ३-४ वेळेला मुख्य-मन्त्रीपद साम्भाळल आहे.. अनुभव आहे
नितीश तिकडे जाऊच देत. एकतर समाजवादी विचारांची मंडळी अंतर्बाह्य गंडलेली असतात त्यामुळे कधीतरी हे लोक कोणत्या ना कोणत्या प्रकारे घाण घालणारच हे गृहित धरायचे. त्यामुळे नितीश कधीतरी जाणारच. ते जात नसतील तर भाजपने त्यांना हाकलावे असे फार वाटते.
एक तर रामविलास पासवान गेल्यानंतर लोकजनशक्तीचीही ताकद बरीच कमी झाली आहे. अशा परिस्थितीत २०२४ मध्ये नितीश बरोबर नसतील तर बिहारमधील ४० च्या ४० जागा लढवता येतील. मागच्या वेळेस नितीश-पासवानबरोबर युती करून ४० पैकी ३९ जागा आल्या होत्या त्यापैकी १७ भाजपच्या होत्या. २०२४ मध्ये तितक्या नक्कीच येणार नाहीत तरी २२-२४ जागा जरी आल्या तरी २०१९ पेक्षा पडलेली ती भर असेल.
तसेच तिकडे राहुल स्वतःला सगळ्या विरोधी पक्षांचे पंतप्रधान पदाचे उमेदवार बनता यावे यासाठी गुडघ्याला बाशिंग लावून बसलेच आहेत. बरोबर आपले काका पण आहेतच. अलीकडे त्यात ममतांचीही भर पडली आहे. आणखी नितीशही स्वतःचा दावा सांगायला जाऊ देत. नितीश स्वतः स्वबळावर बिहारमध्ये एकदाही जिंकलेले नसले आणि कित्येक वर्षांपासून भाजपबरोबर असल्यामुळे त्यांच्या दाव्याला विरोधी पक्षात सहजासहजी मान्यता मिळणार नाही हे उघड आहे. तरीही नितीश स्वतःचा दावा करायला गेले आणि तो अमान्य झाल्यामुळे वादावादी-मतभेद-भांडणे झाली तर विरोधी कळपात परस्परविरोध आहे एवढे चित्र उभे राहिले तरी ते पुरेसे आहे. दुसरे म्हणजे नितीश भाजपच्या पाठिंब्यावर स्वतः मुख्यमंत्री बनले पण ममतांनी १९९८ मध्ये पहिल्यांदा भाजपला केंद्रात सत्तेत यायला मदत केली होती आणि ममताही भाजप सरकारमध्ये मंत्री होत्या हे पण हे पण नाकारता येणार नाही. तसेच जर वि.प्र.सिंग पूर्वीचा सगळा जन्म काँग्रेसमध्ये काढूनही काँग्रेसबाहेर पडल्यानंतर दोन-सव्वादोन वर्षांत पंतप्रधान बनू शकत असतील तर मग नितीश का नाही? असे काही मुद्दे नितीश मुद्दा मांडू शकतील. तेव्हा सांगायचा मुद्दा हा की तिकडे पन्नास पंतप्रधानपदाचे उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असू देत. त्यातूनच तो तंबू एकसंध नाही हे चित्र मतदारांपुढे आले तर ते पण पुरेसे आहे. त्यामुळे नितीश स्वतः तिकडे जाणार नसतील तर भाजपने त्यांना लाथ घालावी असे फार वाटते. करू दे त्यांना परत एकदा राजदबरोबर सरकार स्थापन.
त्याप्रमाणेच महाराष्ट्रातही सगळ्या ४८ जागा लढवता येऊन मागच्या वेळच्या २३ मध्ये ५-६ ची भर पडू शकेल. फक्त त्यासाठी शिवसेना किंवा राष्ट्रवादीबरोबर युती करायची अवदसा आठवायला नको. २०२४ मध्ये २०१९ च्या तुलनेत हरियाणा, पंजाब आणि कदाचित बंगाल-कर्नाटकमध्ये जागांचे नुकसान व्हायची शक्यता बरीच आहे. अशावेळी महाराष्ट्र आणि बिहारमधून १२-१५ जागा अधिक मिळाल्या तरी भाजपला स्वतःचा २९० पर्यंत आकडा कायम ठेवता येईल.
महाराष्ट्रातही सगळ्या ४८ जागा लढवता येऊन मागच्या वेळच्या २३ मध्ये ५-६ ची भर पडू शकेल. >>>>
महाराष्ट्रात शिवसेने शिवाय आपले खासदार निवडून येऊ शकत नाहीत हे पक्के माहीत असल्यानेच स्वत अमित शहा मातोश्रीवर युती करा म्हणून विनवण्या करायला आले होते. भाजपने एकटं लढायची हिंमत केली नाही, करनार नाही. ;)
चंसू,
मुंबई महापालिकेची निवडणूक झाल्याशिवाय महाराष्ट्रात भविष्यात काय होईल याबाबत बोलण्यात काही अर्थ नाही. आता ती निवडणूक कोविडमुळे पुढे ठकलली नाही तरच.
एक मात्र खरे की, भारताची अर्थव्यवस्था जोरदार सुधारण्याची लक्षणे दिसताहेत. खूप वेगाने भांडवल भारतात येताय. त्यामुळे २०२४ ची निवडणूकीची गणिते फार वेगळी असतील.
असो.
लोकसभा आणि विधानसभेची गणिते वेगळी असतात. महापालिकेची आणखी वेगळी. भाजपची लोकसभेतील कामगिरी विधानसभेतील कामगिरीपेक्षा चांगली असेल असे वाटते. फक्त त्यासाठी ४८ च्या ४८ जागा लढवता आल्या पाहिजेत. जर भाजपवाले परत शिवसेनेपुढे शेपूट हलवत गेले किंवा राष्ट्रवादीशी युती केली तर मात्र कठीण होऊन जाईल. मी तर ठरवले आहे. जर परत शिवसेनेशी युती केली तर विधानसभेत माझे मत राष्ट्रवादीला आणि लोकसभेत नोटाला. आमच्या मतदारसंघातून शिवसेनेचा उमेदवार असेल. त्याला मत देता येणे केवळ अशक्य.
आता महाराष्ट्रात जो सावळागोंधळ चालला आहे ते पाहता महाविकास आघाडीला जनमत आपल्या विरोधात आहे हे जाणवले असेलच. त्यामुळे कोरोनाचे निमित्त करून महापालिका निवडणुका पुढे ढकलल्या जातील ही शक्यता आहे. कधीकधी वाटते की महापालिका निवडणूक घ्यायला लागायला नको म्हणून दिवाळीच्या सुमारास आकडे फुगवून पण दाखवले तरी आश्चर्य वाटू नये.
शिवसेना भाजप युती आता कधीच होणार नाही असे वाटते. मात्र मविआ मधे वैचैरिक गोंधळासाठी पुड्या सोडणे चालूच राहील. पुलोदच्या प्रयोगापासून निरनिराळे कॅांग्रेस विरोधक पवार साहेबांबरोबर गेले व संपले. या अगोदर नुकतेच राज साहेब गेले व संपले. आता शिवसेनेची पाळी आहे इतकेच. ध्रृविकरणाची ही उत्तम व अनायासे चालून आलेली संधी भाजप सोडेल असं वाटतं नाही. मात्र मुंबई महापालिकेच्या निवडणूकांनंतर या राजकारणला आलेला आकार जाणवायला लागेल व मंगळवेढा निवडणूकीतून मिळलेल्या संदेशाचे पुष्टिकरण होते आहे का ते लक्षात येईल. तसेच भाजपालाही पक्षांतर्गत साफसफाईची संधी लाभेल. सत्ता गेल्यामुळे भाजपातले बरेच जण खुलेआम बोलताहेत, त्याचा फायदा भाजपाला नक्कीच पुढच्या राजकारणाला होईल असं वाटतंय.
मागे झालेल्या अनेक निवडणूकीत अगदी भाजपचा बालोकिल्ला असलेल्या पुणे, नागपूर पदविधर नतदारसंघात भाजपचा धुव्वा ऊडाला तरी भाजप जिंकेल अशी आशा आहे??? मआणसाने आशावादी रहावं पण किती?? भाजप राज्यातून नामशेष होनार आहे. फडणवीस आणी स्वतचा मतदार संघ नसलेले “हेवीवेट” नेते चंद्रकांत पाटील ह्याना पाहून कोण भाजपला मत देईल??
जो पर्यंत फडणवीस कडे नेतृत्व आहे तोपर्यंत मी कधीच भाजपला मत देणार नाही. तोपर्यंत माझं मत धनुष्यबाण नाहीतर घड्याळ.
मी १९७८ पासूनच्या इतिहासाच्या आधारे बोलतोय. मतदानाची टक्केवारीच्या आधारे बोलतोय. एखाद दुसऱ्या निवडणुकीवर मी मत मांडत नाही आहे.
पण तुमच्याही मतांचा आदर आहे. ते खोडून काढायचीही अजिबात इच्छा नाही. काळ तो न्यायनिवाडा करणारच आहे. :)
फडणवीसांच्या कारकीर्दीत ते, त्यांचे नातेवाईक, सगेसोयरे श्रीमंत झालेले नाहीत. त्यांच्यापैकी कोणि भूखंड लाटलेले नाहीत. त्यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप व पुरावे नाहीत. यास्तव माझे मत फडणवीसांनाच.
तुम्ही कोणालाही मत द्या. फक्त तो स्वत:ची धन करणार नाही एवढेच पहा एवढेच म्हणून थांबतो.
फडणवीसांच्या कारकीर्दीत ते, त्यांचे नातेवाईक, सगेसोयरे श्रीमंत झालेले नाहीत>>> श्रिमंत झालेले असुही शकतात नसूही शकतात. खात्रीने कसं सांगता?
फडणवीसांच्या कारकीर्दीत ते, त्यांचे नातेवाईक, सगेसोयरे श्रीमंत झालेले नाहीत. त्यांच्यापैकी कोणि भूखंड लाटलेले नाहीत. त्यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप व पुरावे नाहीत. >>>>
जलयुक्त शिवार योजना तसेच समृध्दी महामार्गात घोटाळ्याचे आरोप लागलेत.
काळ तो न्यायनिवाडा करणारच आहे. :) >>> काळ निवाडा करतोच आहे. भाजप एकापाठोपाठ एक निवडणूका हरतेय.
बाकी तुम्ही आकडेवारीवर बोलतात ईतर भाजप समर्थकांसांरखे आंधळ्याथापा मारत नाहीत. ह्यामुळे तुमचा आदर वाटतो. बाकी भाजपशी युती तोडल्या मुळे शिवसेनेचा मोठा फायदा झालाय. आजपर्यंत मिळाल्या नव्हत्या एवढ्या जागा सोनेला पंचायत समीतीत मिळाल्या. सेनेच्या साथीने पुणे नागपूर हे भाजपचे बालेकील्ले ऊध्वस्थ झाले. मिरा भाईंदर आणी साक्री ईथल्या आमदारानी सोनोत प्रवेश घेतला, मंगळवेढ्यात स्वतच्या प्रभावामुळे भाजपचा आमदार जिंकला, एकामागोमाग एक पराभव होत असुनही शिवसेना संपेल असा आशावाद व्यक्त कसा होऊ शकतो?? म्हणजे अंदाजाला काही आधार हवा ना??
बाकी भाजपचे स्थानीक नेते फडणवीसानी संपवलेत, तावडे बावनकुळे हे लोक आता आधी सारखी मेहनत घेणार नाहीत. खडसेनी तर जळगावात चांगलीच मोर्चेबांधनी केलीय. मुंडे भगीनी हा स्वत पुरतं पाहतील. फडणवीस लोकनेते नाहीत. स्वतचिया मतदार संघातही ते फक्त २५०००० च्या आघाडीने जिंकले. भाजपला राज्यात भविष्य कठीण आहे.
भ्रष्ट चार झालाच नाही असे काही नाही.
ह्या देशात एक व्यक्ती सापडणार नाही त्यांनी भ्रष्टाचार केला नाही.
फक्त काहींनी कमी नी जास्त केला इतकाच फरक आहे.
पक्ष चालवायला,घर चालवायला पैसा लागतो.
पक्षासाठी पैसे पदावर राहून जमा नाही तर हाकलून देतील .
आरोप झालेच नाहीत म्हणजे भ्रष्ट चार झालाच नाही असे काही नाही.
आपल्या येथे, कायद्याने, कुणावरही, कसलाही आरोप, तो आरोप करणार्याला सिद्ध करावा लागतो. अर्थात, आरोप करणार्यावर ही जबाबदारी (इंग्लिशमधे onus) असते, हे तुम्हाला माहिती असेलच. पण आता काय झाले आहे, टामटूममामांचे अनुकरण करतांना तुम्ही अगदी संपूर्ण घसरला आहात. त्यांचे राहूंद्यात-- ते 'बियाँड रीडिंप्शन' आहेत. तुम्हीतरी काही विचार करून लिहा की !
तुम्ही म्हणताय ते सर्व बरोबर आहे.
मात्र एकदा का त्या दोघांनी 'कडक' माल मारला की आपण काय लिहितोय, काय म्हणतोय याचे जराही भान त्या दोघांना राहात नाही. शेवटी चेले कोणाचे आहेत ! राष्ट्रीय विदुषकाचे !
फडणवीस फक्त अडीच लाखांच्या मताधिक्याने जिंकले म्हणे. याआधी राजनाथ सिंह काय, हफीज सईद काय . . . !
"कडक" माल वारंवार वापरल्यानंतर अज्ञान वारंवार उघडे पडून सर्वत्र हसू होणारच. आपल्या ठार अज्ञानामुळे आपलं सर्वत्र हसू होतंय याचेच यांना अज्ञान आहे.
पुन्हा एकदा आकडेवारीच्या अज्ञानाचे केविलवाणे आणि हास्यास्पद प्रदर्शन. शून्य माहिती व अज्ञान असूनही फेकाफेकी करण्याचा कॉन्फिडन्स प्रचंड जागृत आहे.
चालू द्या. तेवढीच आमची करमणूक होतेय.
ज्याच्या बेसिकमध्येच लोचा आहे त्याला सांगितलेले काय समजणार? सांगितलेले समजण्याएवढा आवाका आहे का आपला?
जरा ब्रेक घ्या बाहुबली. आपले अज्ञान वारंवार उघडे पडून सर्वत्र हसू होतंय. थोडे ज्ञान वाढवा आणि नंतर विचारा. मग सांगेन.
शक्य तेव्हढे मुद्ध्यांपुरते देण्याचा प्रयत्न करतो आहे.
भाजपा नेत्यांचे ते कृत्य अतिशय लाजिरवाणे होते. तेव्हाचे भाजपाचे नेतृत्व बुळचट होते. ते खास दिल्ले पठडीतले असल्याने ते तसेच असणार ह्यांत आश्चर्य नाही. आताचे त्यांचे नेतृत्व मात्र, निदान आंतरराष्ट्रीय राजकारणांत, आपल्या देशाच्या सरहद्दींवरील त्याच्या आतापर्यंतच्या इतिहासावरून तरी बरेच खंबीर आहे, असे दिसते. तेव्हा आली तशीच वेळ पुन्हा आली, तर ते काय करतील, हा 'जर- तर' चा मुद्दा झाला.*
पण भाजपाच्या त्या वेळच्या त्या दुर्दैवी निर्णयास बरीचशी भारतीय मानसिकता कारणीभूत आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरू नये. आपल्यांत, एक समाज म्हणून अतिशय बुळेपणा आहे. त्या वेळी त्याच मनोवृत्तिचे प्रदर्शन त्या विमानंत अडकलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांनी, दिल्लीत निदर्शने करून, तत्कालिन माध्यमांना मुलाखती देऊन दर्शवले होते. हीच आपली भुसभुशीत मानसिकता, कुठल्याही आपत्तितही दिसून येते-- जशी ती कोव्हिड्च्या दुसर्या लाटेच्या वेळी दिसून आली. कुठल्याही माध्यमाच्या 'वार्ताहरा'ने माईक नाकाखाली सरकावयाचा अवकाश, लगेच आपले रडगाणे जाहीरपणे सुरू! असो.
पण, निदान तो दुर्दैवी, व लाजिरवाणा निर्णय जनतेसाठी, जनतेच्या दबावामुळे होता तरी. त्याअगोदर आपल्या सरकारांनी तत्सम परिस्थितीत कायकाय केले होते?
बांगलादेशाच्या निर्मीतीच्या वेळी, इंदिराबाईंनी पाकिस्तानचे हजारो सैनिक नंतर सोडून दिले. अर्थात, त्यांना महिनोमहिनेच नव्हे, तर काही आठवडेही पोसणे आपल्याला कठीणच होते. तेव्हा ते सोडले ह्याविषयी कुणी तक्रार करू नये. पण त्या बदल्यात आपण आपल्या पदरांत काय पाडून घेतले? तर जवळजवळ शून्य.
पण खरी कमाल १९८९ व १९९१ साली तत्कालिन केंद्रीय नेत्यांनी केली आहे.
१९८९ साली, तत्कालिन केंद्रीय गृहमंत्री, मुफ्ति महंमद सयीद ह्यांच्या, रूबाईयाँ ह्या मुलीचे अपहरण जे.के. एल. एफ ह्या फुटीरवादी गटाने केले. तेव्हा त्यांच्याशी वाटाघाटी करण्यासाठी वि. प्र. सिंग ह्यांनी तेव्हाचे जम्मू- काश्मिरचे मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला ह्यांच्यावर दबाव आणला. सिंग ह्यांचे म्हणणे असे होते की, सरकारने त्या गटाच्या अटकेत असलेल्या ज्या दहशदवाद्यांच्या सुटकेची मागणी होती, ती अब्दुल्ला ह्यांनी स्वतः मान्य करून, त्या गटाला कळवावी, व रूबाईयाँ ह्यांची तात्काळ सुटका करून घ्यावी. अब्दुल्लांच्या माहितीनुसार, ह्या टोकाची जरूर नव्हती, व तसे न करतांच तो अपहरणकर्ता गट रूबाईयाँ हिची सुटका करेल असा त्यांना विश्वास होता. पण सिंग व सयीद ह्यांनी दबाव आणला, अब्दुल्लांना धुडकावून लावले. व त्या मुलीची सदर गटाने सुटका करण्याच्या अगोदरच, सरकारने त्या दहशतवाद्यांची सुटकाही करून टाकली.
म्हणजे येथे, जनतेचा संबंध नव्हता. हे केवळ एका केंद्रीय गृहमंत्र्यासाठी उचललेले देशविघातक पाऊल होते.
ह्याचीच उजळणी, १९९१ साली झाली. पुन्हा जे.के. एल. एफ ह्या दहशतवादी गटानेच, कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते, सैफुद्दिन सोझ ह्यांच्या मुलीचे, नहिदा इम्तियाझ हिचे अपहरण केले. बदल्यात ते त्यांच्या अटकेत असलेल्या पाच दहशतवाद्यांची सुटका सरकारने करावी, अशी मागणी करत होते. तेव्हा विप्र सिंगांच्या सरकारने त्या पाचांची सुटका करून टाकली, व सदर मुलीची सुटका करून घेतली.
म्हणजे येथेही, जनतेचा संबंध नव्हता. हे केवळ एका नेत्यासाठी उचललेले देशविघातक पाऊल होते.
[* ते सध्याचे सरकार कुठे खंबीर आहे? बालाकोट इत्यादी खरेच झाले कशावरून? -- अशा तर्हेची भुक्कड शेरेबाजी, आडगावांतल्या बकाल वस्तीतील- आजूबाजूस सांडपाण्याचे नाले वाहाताहेत अशा ठिकाणच्या, दारावर घाणेरडा पातळ पडदा लावलेल्या, भिक्कार बारमधे, आपल्याप्रमाणेच दोन कानांमध्ये केवळ एकपेशीय मेंदू आहे अशाच भुक्कड मित्रांबरोबर बसून, 'चखणा खातखात', अतिसुमार दर्जाची दारू पितपित, एकेमेकांच्या हातांवर टाळ्या देत शेरेबाजी करण्यांनी, येथे तशीच शेरेबाजी केली तर उत्तर देण्यात येणार नाही].
धन्यवाद प्रदीप!
अगदी मुद्देसुद प्रतीसाद.
भारताला "बनाना रिपब्लीक" हे नाव याच गोष्टींंमुळे पडले होते. काहीही केले तरी भारत काहीच करत नाही असा संदेश बाहेर जात होता. कश्मीर च्या बाबतीत तर ते अगदी खरे होते. पाकीस्तान चे मंत्री भारतात आले की फुटीर ता वादी पहिले त्यांना जाउन भेटायचे. तेही दिल्लीत येउन. याच फुटीरतावादी लोकांचा सारा खर्च भारत सरकार कित्येक वर्षे करत होते वरुन त्यांची दादागिरी चालु होती.
आता हळुहळु भारताची भुमीका जगात जरा सिरियस्ली घेतली जात आहे. बाकी ज्या लोकांना बाहेर काय चालले आहे हे माहीत नसते तेच लोक अगदी अधिकारवाणी ने बोलतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष हाच एक उपाय आहे.
जाता जाता : मला १९९१ सालची नहिदा इम्तियाझ हिचे प्रकरण माहीत नव्हते. माहीती बद्दल धन्यवाद.
स्टार मध्ये जे लिहिलंय त्याबद्दल अभिनंदन. मला माझ्या या लोकांबद्दलच्या भावना इतक्या नेमक्या शब्दात व्यक्त करताच आल्या नसत्या. बाकी मोबाईल सर्व जनांमध्ये पोचवण्यामुळे जे नुकसान झालेलं आहे त्याचा अशा लोकांनी सगळीकडे फालतू पोस्ट टाकणे हा परिपाक आहे.
यापेक्षाही अजून एक भयंकर घटना १९९३ मध्ये घडली ज्याचा उल्लेख सर्व माध्यमे टाळत असतात कारण तेव्हा त्यांच्या लाडक्या पक्षाचे सरकार केंद्रात होते.
सप्टेंबर १९९३ मध्ये ७-८ पाकिस्तानी अतिरेकी काश्मीरमधील हजरतबाल मशिदीत घुसल्यानंतर तातडीने लष्कराने मशिदीला सर्व बाजूने वेढा घालून अतिरेक्यांना आत अडकवून ठेवले. मशिदीत आत एकही नागरिक नव्हता. त्यामुळे कोणाच्याही जिवाला धोका नव्हता. अतिरेक्यांनी शरण येण्यास नकार दिल्याने लष्कराने मशिदीची वीज व पाणी तोडले. त्याविरुद्ध काही पाकिस्तानप्रेमी ढोंगी पुरोगामी सर्वोच्च न्यायालयात गेले व सर्वोच्च न्यायालयाने वीजपुरवठा पूर्ववत करून अतिरेक्यांना अन्नपाणी पुरविण्याचा अत्यंत विचित्र आदेश दिला. त्यामुळे नाईलाजाने लष्करालाअतिरेक्यांना अन्नपाणी पुरवावे लागले.
अतिरेकी आत अडकले होते, पळून जाण्याची सुतराम शक्यता नव्हती व एकाही नागरिकाचा जीव धोक्यात नव्हता.
परंतु २-३ महिन्यांनतर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान व हिमाचल प्रदेश या ४ राज्यांची निवडणुक होती. मुस्लिम मते जाऊ नयेत यासाठी अतिरेक्यांना सुखरूप पाकिस्तानातला जाऊन देण्याचा अत्यंत संतापजनक आदेश नरसिंहरावांनी लष्कराला देऊन अतिरेक्यांना सोडून दिले.
१९९९ मध्ये अपहरण केलेल्या विमानात १७० नागरिक होते. त्यातील एकाला अतिरेक्यांनी मारून टाकले होते व दुसऱ्याला जखमी केले होते. जवळपास ७-८ दिवस प्रवाशांना विमानातून बाहेर जाऊन दिले नव्हते. विमानातील सर्व टॉयलेट्स तुडुंब भरली होती व नंतर विमानातील दिसेल त्या रिकाम्या जागेवर प्रवाशांना नैसर्गिक विधी करावे लागले. त्यामुळे विमानात प्रचंड दुर्गंधी पसरली होती. कंदाहारमध्ये विमानाला तालिबानी रणगाड्यांंनी वेढा घातल्याने कोणत्याही प्रकारची सुटकेची कारवाई करणे जगातील कोणत्याही देशाला अशक्य होते.
अशा परिस्थितीत अतिरेक्यांच्या मागण्या मान्य करणे किंवा १७० प्रवाशांचा जीव जाऊ देणे हे दोनच पर्याय शिल्लक होते. अतिरेक्यांनी सुरूवातीला १० कोटी डॉलर्स व ४० अतिरेक्यांना सोडण्याची मागणी केली होती. नंतर अजित डोवलांनी बऱ्याच वाटाघाटी करून ही मागणी फक्त ३ अतिरेकी सोडण्यावर आणली. प्रवाशांच्या सुटकेसाठी जसवंतसिंह आपला जीव धोक्यात घालून कंदाहारला जाऊन सर्व प्रवाशांना सुखरूप परत घेऊन आले.
१७० नागरिकांचे जीव वाचविणे याला गुडघे टेकले म्हणणे हे अत्यंत निर्बुद्ध व महामूर्ख असल्याचे लक्षण आहे. अर्थात जे असा आरोप करीत आहेत त्यांनी आपला मूर्खपणा वारंवार सिद्ध केला आहे.
अतिरेक्यांना सोडून दिल्याच्या अजून काही घटना १९९१-९२ या काळात घडल्या आहेत.
१९९१ मध्ये इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे महाव्यवस्थापक दोराईस्वामींचे काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी अपहरण केल्यानंतर त्यांच्या सुटकेसाठी ७ अतिरेक्यांना नरसिंहरावांनी सोडले होते.
१९९२ मध्ये गुलाम नबी आझादांच्या मेव्हण्याचे अपहरण केल्यानंतर नरसिंहरावांनी एका कट्टर अतिरेक्याला सोडले होते.
https://www.google.com/amp/s/wap.business-standard.com/article-amp/news…
परंतु नरसिंहरावांंच्याच काळात एच एम टीचे महाव्यवस्थापक खेरा व इतर दोघांच्या अपहरणानंतर अतिरेक्यांच्या मागण्या पूर्ण होत नसल्याने त्यांनी तिघांनाही मारून टाकले होते.
१९९५ मध्ये काश्मीरमधील ६ परदेशी पर्यटकांचे अपहरण करून शेवटी मागच्या पूर्ण होत नसल्याने त्यांना मारण्यात आले होते.
जर १९९९ मध्ये ३ अतिरेक्यांना सोडले धसते तर सर्व १७० प्रवाशांना मारून टाकले असते.
४ महापालिकांंची मुदत संपून बराच काळ लोटलाय व अजून १० महापालिकांंची मुदत फेब्रुवारी २०२२ मध्ये संपतेय. पुढील वर्षभर तरी निवडणुक होणे अवघड दिसतंय. त्यासाठी कोरोना, इतर मागासवर्गीयांसाठी असलेले रद्द झालेले मतदारसंघ अशी कारणे दिली जातील.
खरंय.
तसंच व्हावं अशी इच्छा आहे. शिवसेनेने असंच काही बाही करत आपले मरण पुढे पुढे ठकलत राहावे हे नैसर्गिक आहे. कारण तसं झालं तरच जास्त चांगल्या रितीने व भक्कम धृविकरण होईल.
या साठीच मी भाजपाला अनायासे मिळालेली संधी असं म्हणतोय.
पण निवडणुक पुढे जाणे हे राष्ट्रवादी-कॉंग्रेससाठी त्रासदायक ठरेल कारण या १४ पैकी बहुतेक सर्व महापालिकेत भाजप किंवा शिवसेनेची सत्ता आहे आणि जोपर्यंत निवडणुक होत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी-कॉंग्रेसला या महापालिकात सत्तेत परत येण्याची संधी मिळणार नाही. विशेषतः पिंपरी-चिंचवड, पुणे, सांगली अशा महापालिकेत आपण पुन्हा सत्तेत परतू अशी राष्ट्रवादीला आशा आहे. सोलापूर, अमरावती महापालिका परत जिंकू अशी कॉंग्रेसला आशा आहे.
त्यामुळे निवडणुक पुढे ढकलण्याच्या निर्णयाला हे दोन पक्ष विरोध करतील असं वाटतंय.
मुंबई महानगर पालिका निवडणूक फक्त प्रांतीय मुद्द्यावर होते.
मराठी लोकांचे पक्ष म्हणून परप्रांतीय कधीच सेने ला मत देत नाहीत परप्रांतीय द्वेष पूर्ण वागून मराठी लोकांची सत्ता बरखास्त करण्यात आघाडीवर असतात
आपले अती बुद्धिवान ,नेक देशप्रेमी (देश दर्जा वर फक्त ह्यांचा द्वेष केला जातो तरी हे मी भारतीय पाहिले असले खूळ बाळगून असतात)
मुंबई नगरपालिका सेने च्या हातात राहिले ह्याला महत्वाचे कारण bjp बरोबर ची युती.
गुजराती ,मारवाडी हा समाज bjp व्यक्तिरिक्त कोणालाच मत देत नाही.
अगदी उद्योगपती पण वेळ काढून मतदान करतात.
गुजराती,मारवाडी, ह्यानीची bjp मुळे मत आणि सेने मुळे मराठी मत ह्याच्या जोरावर सहज मुंबई जिंकली जाते.
आता bjp शी युती न करता सेना निवडणुकीत उभी राहिली तर मुंबई मध्ये नकीच जागा कमी येतील.
काँग्रेस राष्ट्रवादी मुळे मुस्लिम मत,आणि अगदी थोडीफार उत्तर भारतीय मत मिळतील.
पण महाराष्ट्र ची निवडणूक खूप वेगळ्या मुद्द्यावर लढली जाते.
ही bjp ला मदत करण्यासाठी च निवडणूक लढवता.
तो BJP च B गट आहे.गुप्त समजोता असण्याची शक्यताच जास्त आहे.
मुस्लिम मतांचे विभाजन झाल्या मुळे bjp ला. निवडणूक जिंकणे सोपे जाते.
ह्यावोळी मुंबई पालिका निवडणूक सरळ सेनेचे मराठी मावळे विरूध्द भाजपचे गुज्जू योध्दे होणार आहे. सेनेला काॅंग्रेस आणी राष्ट्रवादीची साथ असेल तर भाजपला धुळीस मिळवायला कितीसा वेळ लागेल??
फडणवीस वेगळा विदर्भ झाल्या शिवाय लग्न करनार नव्हते.
आपद धर्म नाही, शाश्वत धर्म नाही असं सांगून राष्ट्रवादीशी युती करनार नव्हते.
अजित दादाना चक्की पिसायला पाठवनार होते (पिसींग पिसींग)
फडणवीस नेहमी खरं बोलतात, त्यामुळे त्यानी ऊध्दव ठाकरेना वचन दिले नसावे. सत्य हरिश्चंद्राचा आधूनीक अवतार म्हणजे फडणवीस.
Bjp कडे 7 वर्ष सत्ता असून सुद्धा ती सामान्य लोकांचा विश्वास जिंकू शकले नाहीत
यूपी ,बिहार मधील कौल हा भावनिक असतो
मग त्यांना काही ही चालते .
सुशांत पण चालतो,राज ठाकरे पण चालतो.
Upsc साठी हिंदी च हवी हे पण चालते.
हिंदुत्व पण चालते.
त्या राज्यात विकास वर कधीच मतदान होत नाही.
देशातील प्रगत राज्यात bjp ल कधीच यश मिळाले नाही.
प्रगत राज्यातील लोक प्रॅक्टिकल आहेत भावनिक फालतू मुद्द्यावर ते मतदान करता नाही.
BJP उत्तम कार्य करत आहे हे तेव्हाच सिद्धहोईल जेव्हा bjp दक्षिण भारत ,महाराष्ट्र पंजाब,ह्या राज्यात यश संपादन करेल.
केरळ मध्ये bjp जेव्हा बहु मत मिळवेल तेव्हाच हे सिद्ध होईल bjp देश हितासाठी उत्तम पक्ष आहे
देशातील सर्वात सुशीक्षीत राज्य केरळ मध्ये भाजपचा एकही आमदार नाही. ;) पण राष्ट्रवादीचे दोन आमदार आहेत. जिथे शिक्षण असते तिथे भाजप नसते. युपी बिहार ला त्यामुळेच भाजपेयी लोकांचा शिक्षणाचा टक्का वाढू देत नसावेत, लोक शिकले तर आपला पत्ता साफ.
ईसाीस कडे बोट दाखवलं म्हणजे तिथले लोक भाजपला ओळखून आहेत हे खोटं ठरतं का?? केरळी हिंदू शिकलेले असल्याने त्याना भाजप हा ढोंगी हिंदूत्ववादी पक्ष आहे हो पक्क माहीतीय. महाराष्ट्रातील हिंदूंच्या डोक्यात ही हळूहळू प्रकाश पडू लागलाय. १२२-१०५ पुढील निवडणूकीत ६० ;)
एकदम खरे आहे तुमचे ...
त्यामुळे केरळ मधे खुप मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. सुजलाम सुफलाम आहे. खुप मोठया प्रमाणात उद्योग आहेत. दळनवळन चान चान आहे ...
कंम्युनिस्ट सरकार असल्यामुळे तिथे सर्व धर्म समभाव आहे ... तिथला युवक रोजगारासाठी आजीबात बाहेर जात नाही ... उप्र मधे कसे सारे बाहेर जातात ... मुंबैला ..
Bjp कडे 7 वर्ष सत्ता असून सुद्धा ती सामान्य लोकांचा विश्वास जिंकू शकले नाहीत
यूपी ,बिहार मधील कौल हा भावनिक असतो
मग त्यांना काही ही चालते .
सुशांत पण चालतो,राज ठाकरे पण चालतो.
Upsc साठी हिंदी च हवी हे पण चालते.
हिंदुत्व पण चालते.
त्या राज्यात विकास वर कधीच मतदान होत नाही.
देशातील प्रगत राज्यात bjp ल कधीच यश मिळाले नाही.
प्रगत राज्यातील लोक प्रॅक्टिकल आहेत भावनिक फालतू मुद्द्यावर ते मतदान करता नाही.
BJP उत्तम कार्य करत आहे हे तेव्हाच सिद्धहोईल जेव्हा bjp दक्षिण भारत ,महाराष्ट्र पंजाब,ह्या राज्यात यश संपादन करेल.
केरळ मध्ये bjp जेव्हा बहु मत मिळवेल तेव्हाच हे सिद्ध होईल bjp देश हितासाठी उत्तम पक्ष आहे
अफगणिस्तानचा पुढचा पन्तप्रधान राष्ट्रवादीचा किन्वा शिवसेनेचा झाला तरच सिध्द होईल की हे दोन्ही उत्तम पक्ष आहेत..
.. शेवटी सगळ साहेबान्च्या धोरणामुळेच ..
भाजपचा करा, नाहीतरी अफगाणींशी भाजपचे जुने संबंध आहेत. अफगाणींपुढेच गुडघे टेकून हाफीज सईद ला भाजपने सोडले होते. कडी निंदा फेम राजनाथसींग स्वत गेले होते सोडायला ;)
अच्छा?? अतिरेकी सोडले हे खोटं आहे?? बरं मग भाजपची लाज राखायला आणी तुमच्या समाधानासाठी आपण अतिरेक्याना गोळ्या घातल्या असं मानू??? किती ते अंधळं समर्थन???
हो.. चूक ती चूक.. त्याला सोडायचीच वेळ आली होती तर हाल हाल करून सोडायला पाहिजे होता.. हे त्याला मन्त्रान्बरोबर विमानातून घेऊन गेले ती मोठी चूक
अजून.. सिमला कराराच्या वेळेला (पोलादी महिला कोन्ग्रेसच्या) त्यानी काश्मिर प्रश्न सोडविला नाही
अतिरेक्यांपुढे गुडघे टेकले,मसूद अजहर ला सोडले, जसवंत सिंग गेले होते. चूक सुधारली.
पण मुळ मुद्दा हा आहे की भाजपच्या बूळचट नेत्यानी अतिरेक्यांपुढे गुडघे टेकून ३ अतिरेकी सोडले. आता ह्यावर बोलनार का??
१२५ + प्रवासी कसे सोडायचे? हा प्रश्न होता.. कांग्रेस असती तर त्यांनी काय वेगळे केल असत? तुम्हाला वाटतंय
तेव्हा हि हि गोष्ट लाजिर्वाणीचं वाटली होती, वाटलं होता सोड्याचेच होते तर एखादे जर्जर आजाराचे इंजेकशन आधी देऊन मग सोडायचे !
पण खरी परिस्थिती काय होती कसे कळणार? त्या वेळचं काँग्रेस नेत्यांनी किंवा आजचे मोदीविरोदही "शोध पत्रकारांनि हि माहिती काढावी आणि गोपयस्फोट करावा
आणि हो अगदी खरे कि तालिबान काही भारतावर चाल करून येत नाहीयेत पण त्यांचाच उपद्रव भारताला होणार आणि त्यांची साथ घेऊन "बॅड तालिबान" "गुड तालिबान " वॉर मत करून पाकिस्तान मार्गे भारताविरुद्ध कराव्या चालू ठेवणार .. या शिवाय तेथील भारताचे गुड विल विसरले जाणार .. त्यामुळे भारताला त्रास दायक आहेच .. हा हे खरे कि त्याचा संबंध गल्लीतील निवडणुकीशी लावण्याचाच मंत्रचळे पण कोणी करू नये
खरय.. सगळी यन्त्रणा राणे, भाजपा च्या मागे लावली.. तरी सामान्यान्ना भाजपा त्रास देत आहे.. तेव्हा करोना कुठे होता.. का फक्त मन्दिर उघडी करायला असतो तो..
आणि भाजपाची लोकप्रियता २०१४ पासून कमीच होत आहे.. सगळ साहेबान्च्या धोरणामुळे .. :) :) :)
तालीबानी भारतात आले तर? काय होईल विचार करा ह्या साठीच मोशा पाहीजे छाप फोरवर्ड समर्थक करताहेत. अर्थात बुध्दी आणी ह्या समर्थकांचा काही संबंध असेल असं वाटत नाही. भारतीय सैन्य हे जगातील पाचव्या नंबरचं प्रबळ सैन्य आहे. ते तालीबानी बाजारबूनग्याना क्षणात धुळीस मिळवेल. त्यामुळे समर्थकानी घाबरून जाऊ नये. तालीबानी काही ईथपर्यंत पोहोचनार नाहीत, ऊगाच बिपी वाढवून घेवू नये. ;)
(अर्थात ह्या साठी राज्यकर्ते प्रबळ हवेत. पुन्हा भाजप नेत्यानी तालीबान्यांसमोर गुडघे टेकले तर??)
तालीबानी आणी भाजपेयी बरोबरच सत्तेवर येतात. ;)
प्रतिक्रिया
पंतप्रधानपदा साठी एखाद्या
In reply to wishful thinking.. किन्वा by रामदास२९
फडणवीस आणि शहा ह्यान्ची
In reply to पंतप्रधानपदा साठी एखाद्या by अमरेंद्र बाहुबली
असं तुम्हाला वाटतंय. मोदींनतर
In reply to फडणवीस आणि शहा ह्यान्ची by रामदास२९
शहानी गुजरातचं मुख्यमंत्रीपद
In reply to फडणवीस आणि शहा ह्यान्ची by रामदास२९
थोडक्यात
In reply to फडणवीस पुढे जाऊन मोदींनंतर by अमरेंद्र बाहुबली
बिहारात नितीश कुमारना पुर्ण
In reply to फडणवीस पुढे जाऊन मोदींनंतर by अमरेंद्र बाहुबली
महाराष्ट्रात भाजपने जशा चुका
In reply to बिहारात नितीश कुमारना पुर्ण by रामदास२९
तुमचेच खरे करण्याच्या नादात सत्य स्थिती विसरून जाता गुरुजी
In reply to महाराष्ट्रात भाजपने जशा चुका by श्रीगुरुजी
बरोबर .. पण नितिश शेवटच्या
In reply to महाराष्ट्रात भाजपने जशा चुका by श्रीगुरुजी
नितीश जाऊदेतच
In reply to बरोबर .. पण नितिश शेवटच्या by रामदास२९
महाराष्ट्रातही सगळ्या ४८ जागा
In reply to नितीश जाऊदेतच by चंद्रसूर्यकुमार
चंसू,
In reply to नितीश जाऊदेतच by चंद्रसूर्यकुमार
गणिते
In reply to चंसू, by शाम भागवत
शिवसेना भाजप युती आता कधीच
In reply to गणिते by चंद्रसूर्यकुमार
मागे झालेल्या अनेक निवडणूकीत
In reply to शिवसेना भाजप युती आता कधीच by शाम भागवत
मी १९७८ पासूनच्या इतिहासाच्या
In reply to मागे झालेल्या अनेक निवडणूकीत by अमरेंद्र बाहुबली
फडणवीसांच्या कारकीर्दीत ते,
In reply to मी १९७८ पासूनच्या इतिहासाच्या by शाम भागवत
आरोप झालेच नाहीत म्हणजे
In reply to मी १९७८ पासूनच्या इतिहासाच्या by शाम भागवत
इतका
In reply to आरोप झालेच नाहीत म्हणजे by Rajesh188
नशेंडी कंगना आणी गंजोडी
In reply to इतका by प्रसाद_१९८२
राजेश भावदी
In reply to आरोप झालेच नाहीत म्हणजे by Rajesh188
@प्रदीप
In reply to राजेश भावदी by प्रदीप
फडणवीस फक्त अडीच लाखांच्या
In reply to @प्रदीप by प्रसाद_१९८२
टायपो झालाय तो गुरूजी. २५०००.
In reply to फडणवीस फक्त अडीच लाखांच्या by श्रीगुरुजी
पुन्हा एकदा आकडेवारीच्या
In reply to टायपो झालाय तो गुरूजी. २५०००. by अमरेंद्र बाहुबली
किती टाळनार?? अतिरेक्यांपुढे
In reply to पुन्हा एकदा आकडेवारीच्या by श्रीगुरुजी
ज्याच्या बेसिकमध्येच लोचा आहे
In reply to किती टाळनार?? अतिरेक्यांपुढे by अमरेंद्र बाहुबली
उत्तर
In reply to किती टाळनार?? अतिरेक्यांपुढे by अमरेंद्र बाहुबली
धन्यवाद प्रदीप ..
In reply to उत्तर by प्रदीप
स्टार मध्ये जे लिहिलंय
In reply to उत्तर by प्रदीप
यापेक्षाही अजून एक भयंकर घटना
In reply to उत्तर by प्रदीप
अतिरेक्यांना सोडून दिल्याच्या
In reply to उत्तर by प्रदीप
कशाला अकलेचं दिवाळं जाहीर
In reply to अतिरेक्यांना सोडून दिल्याच्या by श्रीगुरुजी
प्रदीप यांनी उत्तर दिल्यानंतर
In reply to कशाला अकलेचं दिवाळं जाहीर by सुबोध खरे
आयला, खर कि काय?
In reply to मागे झालेल्या अनेक निवडणूकीत by अमरेंद्र बाहुबली
फडणवीस नेता, चं.पा अध्यक्ष,
In reply to आयला, खर कि काय? by नावातकायआहे
४ महापालिकांंची मुदत संपून
In reply to गणिते by चंद्रसूर्यकुमार
खरंय.
In reply to ४ महापालिकांंची मुदत संपून by श्रीगुरुजी
पण निवडणुक पुढे जाणे हे
In reply to खरंय. by शाम भागवत
यालाच तर अंतर्विरोध म्हणतात
In reply to पण निवडणुक पुढे जाणे हे by श्रीगुरुजी
मुंबई महानगर पालिका.
In reply to चंसू, by शाम भागवत
MMS हा bjp च B गट आहे
In reply to मुंबई महानगर पालिका. by Rajesh188
ह्यावोळी मुंबई पालिका निवडणूक
In reply to मुंबई महानगर पालिका. by Rajesh188
फडणवीस वेगळा विदर्भ झाल्या
In reply to बिहारात नितीश कुमारना पुर्ण by रामदास२९
गडकरींना निवडणूकीत न हरवल्यास
In reply to फडणवीस वेगळा विदर्भ झाल्या by अमरेंद्र बाहुबली
BJP
देशातील सर्वात सुशीक्षीत
In reply to BJP by Rajesh188
ISIS मध्ये भरती होणार्यामध्ये
In reply to देशातील सर्वात सुशीक्षीत by अमरेंद्र बाहुबली
हो..दोन महिलान्च( हिन्दू आणि
In reply to ISIS मध्ये भरती होणार्यामध्ये by रात्रीचे चांदणे
ईसाीस कडे बोट दाखवलं म्हणजे
In reply to ISIS मध्ये भरती होणार्यामध्ये by रात्रीचे चांदणे
एकदम खरे आहे तुमचे ...
In reply to देशातील सर्वात सुशीक्षीत by अमरेंद्र बाहुबली
पास ह्यावर ...
In reply to देशातील सर्वात सुशीक्षीत by अमरेंद्र बाहुबली
BJP
अफगणिस्तानचा पुढचा पन्तप्रधान
In reply to BJP by Rajesh188
भाजपचा करा, नाहीतरी अफगाणींशी
In reply to अफगणिस्तानचा पुढचा पन्तप्रधान by रामदास२९
आता वेळ आली आहे आफ्रिकेची मदत घ्यायची
In reply to भाजपचा करा, नाहीतरी अफगाणींशी by अमरेंद्र बाहुबली
माहित नसेल तर बोलू नये.. उगाच
In reply to भाजपचा करा, नाहीतरी अफगाणींशी by अमरेंद्र बाहुबली
अच्छा?? अतिरेकी सोडले हे खोटं
In reply to माहित नसेल तर बोलू नये.. उगाच by रामदास२९
कडी निंदा फेम राजनाथसींग स्वत
In reply to अच्छा?? अतिरेकी सोडले हे खोटं by अमरेंद्र बाहुबली
ओके. माय मिस्टेक. पण
In reply to कडी निंदा फेम राजनाथसींग स्वत by रामदास२९
ओके. माय मिस्टेक पण
In reply to कडी निंदा फेम राजनाथसींग स्वत by रामदास२९
हो.. चूक ती चूक.. त्याला
In reply to ओके. माय मिस्टेक पण by अमरेंद्र बाहुबली
अफगाणींपुढे गुडघे टेकले, हफीज
In reply to कडी निंदा फेम राजनाथसींग स्वत by रामदास२९
अतिरेक्यांपुढे गुडघे टेकले
In reply to अफगाणींपुढे गुडघे टेकले, हफीज by श्रीगुरुजी
तुमच्या अकलेचा सगळीकडे उजेड
In reply to भाजपचा करा, नाहीतरी अफगाणींशी by अमरेंद्र बाहुबली
गोपयस्फोट करावा
In reply to भाजपचा करा, नाहीतरी अफगाणींशी by अमरेंद्र बाहुबली
आजचा शोध
In reply to BJP by Rajesh188
Bjp ची लोकप्रियता कमी होत आहे
खरय.. सगळी यन्त्रणा राणे,
In reply to Bjp ची लोकप्रियता कमी होत आहे by Rajesh188
तालीबानी भारतात आले तर? काय