विवाह
विवाह हा सर्वाधिक महत्त्वाचा संस्कार होय. एका विशिष्ट क्रमाने करावयाच्या अनेक समारंभाचा या संयुक्त विधीमध्ये समावेश होतो. वस्तुतः धर्मशास्त्रानुसार विवाह संस्काराच्या वेळी ४३ विधी साजरे करतात. तथापि सांप्रत काळात बहुतांश विवाह सनातन रुढीतील अनेक उपचार वगळून परिवर्तित पद्धतीनुसार साजरे केले जातात.
महाराष्ट्रातील उच्चवर्णीयांमध्ये सगोत्र, सप्रवर आणि सपिंड विवाह निषिद्ध मानले जातात. तथापि मामेबहिणीबरोबर लग्न करण्यास मुभा आहे. अलीकडे बहिर्विवाहांचे प्रमाण वाढले आहे.
सांप्रतकालीन हिंदू विवाह रूढीचे खालील तीन पद्धतीत वर्गीकरण करता येईल : (१) वेदमंत्रोच्चाराचा समावेश असलेली आणि गृह्यसूत्रांनी निर्धारित केलेली वैदिक पद्धती, (२) वेदमंत्रविरहित पौराणिक पद्धती आणि (३) लोणावळ्याच्या धर्मनिर्णय मंडळाने सुचविलेली पुनर्रचित वैदिक पद्धती. उच्चवर्णीय लोक पहिल्या पद्धतीचा अंगिकार करतात, ब्राह्यणेतर दुसऱ्या पद्धातीचा तर कुठल्याही जातीचे लोक तिसऱ्या पद्धतीनुसार विवाह साजरे करतात.
विवाह रुढी
पारंपारिक विवाह रूढी खूपच विस्तीर्ण होती. अलीकडे मात्र त्यातील बरेच उपचार संक्षिप्त केलेले आहेत, तर काहींची विस्मृती झालेली आहे.
विवाह संस्काराच्या प्रारंभी गणपतिपूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, इत्यादि आराधनात्मक विधी साजरे करतात. महाराष्ट्रातील प्रमुख विवाह विधी क्रमानुसार खाली दिले आहेत.
हळद
विवाह संस्काराचा प्रारंभ मुलास हळद लावण्याने होतो. त्याची आई, बहिण व नात्यातील बायका त्याला सुगंधी तेलात भिजविलेली हळद लावतात. ह्या रंगतदार समारंभात हळदीची गाणी आणि वाजंत्री यांसह मुलास समारंभपूर्वक आंघोळ घालतात. उर्वरित म्हणजे उष्टी हळद, साडी आणि पूजा साहित्यासह, वधूगृही नेतात. वरपक्षाकडे ज्याप्रमाणे हळदीचा कार्यक्रम झालेला असतो त्याचीच वधूकडे पुनरावृत्ती करतात. वधूला हळद लावताना नारळ व पाच मूठभर तांदळांनी तिची समारंभपूर्वक ओटी भरतात. हळद लावल्यावर मुला-मुलीस नवरदेव-नवरी असे संबोधिले जाते.
सीमांतपूजन
वधूगृही जातांना वराने वधूच्या गावाची सीमा ओलांडल्यानंतर सीमांतपूजन करण्याची पूर्वीच्या काळी प्रथा होती. आजकाल विवाहदिनी देवळातच सीमांपूजन करण्याची प्रथा आहे. वधूचे आई-बाप व नातलग वरपक्षांचे स्वागत करण्यास्तव देवळात असलेल्या वराकडे जातात. गणपति आणि वरुण देवतांचे प्रतीक असलेली सुपारी व कलश यांची पूजा करतात. विष्णूस्वरुप नवरदेवास आपली लक्ष्मीसारखी कन्या द्यावयची असल्यामुळे आई-बाप वराची पूजा करतात. आणि त्यास नवीन पोषाख अर्पण करतात. वधूची आई वरमातेचे पाय धुते, आणि वरमाता तसेच वराकडील इतर आप्तेष्ट महिलांचा यथास्थित ओटीभरण विधी करते.
वरप्रस्थान
वरपक्ष वाजतगाजत वधूगृही जातो. मंडपप्रवेशद्वारावर वरास पंचारती ओवाळून सुवासिनी त्याचे स्वागत करतात. नवरदेवास मंडपात समारंभपूर्वक नेऊन चौरंगावर बसतात. शुभ मुहूर्ताची योग्य वेळ कळण्यास्तव पुरोहित घटिकापात्राची योजना करतो.
मंगलाष्टके
लग्न लागण्याचा प्रारंभी नवरदेव पूर्वाभिमुख उभा राहतो. त्याचे समोर स्वस्तिक चिन्ह रेखांकित केलेला अंतरपाट धरतात. वराच्या पुढ्यात अंतरपाटाच्या दुसऱ्या बाजूला नवऱ्या मुलीस उभी करतात. पुरोहित मंगलाष्टके पठन करीत असताना वधू-वरांच्या हातात पुष्पहार असतात. शुभ मुहूर्ताचा क्षण येताच मंगलाष्टक पठन बंद होते. पुरोहित अंतरपाटा उत्तरेकडे ओढून घेतात. वादक वाजंत्री वाजवतात आणि आमंत्रित पाहुणे वधू-वरांवर अक्षता टाकतात. प्रथम वधू वरास वरमाला घालते. नंतर वर वधूस पुष्पहार घालतो; तसेच तिच्या गळ्यात मंगलसूत्र बांधतो. मंगलसूत्रबंधानाने वधू विवाहबंधनात अडकते.
कन्यादान
कन्यादान विधिद्वारे वधूपिता आपल्या कन्येचे पवित्र दान करतो. आपल्या कन्येची धर्म, अर्थ आणि कर्माचे बाबतीत कुठल्याही प्रतारणा करू नये असे वधूपिता वरास आवर्जून सांगतो. `नातिचरामि' या शब्दांनी नवरदेव प्रतिसाद देतो.
लाजाहोम
होमाग्नी प्रज्वलित केल्यावर लाजाहोम विधी होतो. वर मंत्रोच्चार करीत असताना वधू होमाग्नीला भाताच्या लाह्या त्रिवार अर्पण करते. लाह्यांचे चौथे आणि अंतिम अर्ध्यदान वधू नवरदेवाच्या मंत्रोच्चार थांबल्यावर स्तब्धपणे करते. तदनंतर ते जोडपे पवित्र होमाग्नी, भूमाता आणि देवाब्राह्मणांना साक्षी ठेवून अशी शपथ घेते की, आयुष्याच्या अंतापर्यंत सर्व सुखदुःखांमध्ये ते एकमेकाचे साथीदार राहातील. त्यानंतर अग्निपरिणयन आणि अश्मारोहण विधी पार पडतात.
सप्तपदी
सप्तपदीनंतर विवाह संस्कार पक्का आणि अप्रत्यावर्ती होतो. हा विधी करताना यज्ञवेदीच्या सभोवती सात पाटांवर प्रत्येकी एक अशा तांदळाच्या लहान लहान सात राशी मांडलेल्या असतात. प्रत्येक राशीवर सुपारी ठेवलेली असते. होमाग्नी अर्ध्यदानाने प्रज्वलित केला जातो. पुरोहिताच्या सतत मंत्रोच्चार चालू असताना वधूःवर यज्ञवेदीभोवती प्रदक्षणा घालतात. तसे करताना वर वधूचा हात धरून पुढे चालतो. वधू तांदळाच्या प्रत्येक राशीवर प्रथम उजवे पाऊल ठेवते आणि त्याच प्रकारे सर्व राशींवर पाऊल ठेवून चालते. प्रत्येक पदाचा स्वतंत्र मंत्र उच्चारला जातो. त्यानंतर ते दोघे होमाग्नीस तूप आणि लाह्या अर्पण करतात.
सप्तदीनंतर वधू-वर अचल अशा ध्रुवताऱ्याचे दर्शन घेऊन हात जोडून नमस्कार करतात. विवाहसंबधनाचे आजन्म चिरंतन पालन करण्याच्या प्रतिज्ञेचे हे प्रतीक होय.
वरात, गृहप्रवेश, लक्ष्मीपूजन, देवकोत्थापन आणि मंडापोद्वासन ह्या विधींनंतर विवाह संस्काराची सांगता होते.
सही रे घाश्या :)
जोरात हाबिणंदण! आणी हो, "वेलकम टू क्लब"
उभयतांस वैवाहिक जीवन सुखसमृध्दीचे, आनंदाचे व समाधानाचे जावो ही सदिच्छा!!!!
(घाश्या, लेका ब्याचलर्स पार्टी राहिली की रे.)
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
मागेच मी विचारल होत कोण कशी घेतो पण
त्याला जास्त प्रतिसाद नाहि आले ना!!!
ठिक आहे आता बसु बोल कधी ते
**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
वहिनी नाहीत ना मिपाच्या सदस्य?
नाहीतर तुमचं ठीक आहे, पण आम्ही तुमच्या घरी आल्यावर फटके पडायचे आम्हाला..."नवर्याला नादी लावणारे टोळभैरव आले" असं म्हणुन ;)
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
अजुन तरी ती मिपा सदस्य परिवारात नाहि आलि हळु हळु येइलच ना
तोपर्यंत हरकत नाहि धम्या
**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
काय संदिपराव कशाला खेचताय गरिबाची किति लांब आहे
तुम्ही त्या तिकड पार पड्याल सायबांच्या देशात आम्ही हिकड
कस जमायच बॉ!!!
**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
आहेर आणला तर उत्तम नाहि तर सोय जरा कमी प्रमाणात होण्याची शक्यता आहे ;)
ह घ्या
**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
घाशीराम, पत्रिका दिसत नाही आहे. लग्न आहे कुठे?मुंबै,पुणे,नगर?
गावी आहे पुण्या पासुन ७० किमि पुणे नाशिक हायवे लगत एक गाव आहे खडकी पिंपळगाव तिकडेच आहे लग्न
**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
लग्न म्हणजे घोड्यावर बसून करण्याचा गाढवपणा.
मांजर आणि नवरा ः कुठेही नेऊन सोडला, तरी संध्याकाळी घरीच परत येतो!
एकटेपणाला घाबरत असाल, तर लग्न अजिबात करू नका!
आमच्या घरी अंतिम शब्द माझाच असतो ः "ठीक आहे, तुला हवं ते कर!'
बायकांना ओळखता येत नाही, असे दोनच कालखंड असतात ः लग्नआधीचा आणि लग्नानंतरचा.
प्रेमविवाह म्हणजे लग्नाच्या आधीपासून भांडण्याची संधी.
बायको आणि वादळ ः नंतरच्या उत्पाताचा आधी अंदाज येत नाही!
संकटं एकटीदुकटी येत नाहीत. सासूसह माहेरचा बराच गोतावळा आणतात. - शुभेच्छा!!
आगुदरच कशाला घाबरवताय राव नाय तर
आमचा समर्थ रामदास व्हायचा
बाकि वरची हि वाक्य झक्कास आहेत
**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
चांगल्या आहेत हो शुभेच्छा!
अभिजीतशेठ, का बिचार्याला आधीच घाबरवताय राव :D
घाश्या, डोंट्री रे डोंट्री! सगळं ठीक होतं. आधी थोडं बिचकल्यासारखं होईल, पण नंतर सवय होऊन जाईल =))
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
बाकरवडी आणी सर्व मिपाकरांसाठी लाडु सम्राट लालबाग यांजकडुन हे मोतीचुरचे लाडु
**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
एव्हड्या लवकर पेढे :O :O
बर हे घ्या
**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
प्रतिक्रिया
वा! वा !
हा घ्या विवाह विधी तुमच्या भावी आयुष्यासाठी
अभिनंदन.
धन्यवाद
अभिनंदन!
हार्दिक
अभिनंदन
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
हार्दिक
अभिनंदन
अभिनंदन
मनःपूर्वक
अभिनंदन रे
हार्दिक
हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा
अभिनंदन!
अभिनंदन
अभिनन्दन
अभिनंदन आणि
हाबिणंदण!!!!!!!!!!!!!!!!!!
कधी बसुया धम्या
सरकार...सांभाळून!!!
अजुन तरी नाहि आहे
धम्या आणि घाश्या
वेस्ट कोस्ट
अभिनंदन रे
अभिनंदन!!
कोतवाला
आहेर आणला तरी चालेल
अभिनंदन
अभिनंदन
हार्दिक अभिनंदन!
अभिनंदन
अभिनंदन आणि शुभेच्छा
अभिनंदन!
कोतवाल साहेब निमंत्रणाबद्दल धन्यवाद!
अभिनंदन!
उभयतांचे
पत्रिका दिसत नाही
माझे लग्न गावी आहे
मनःपूर्वक
अभिनंदन....
लग्न
आमचा समर्थ रामदास व्हायचा
शुभमंगल
हा हा हा....
अभिनंदन !
बाकरवडी
अभिनंदन !
आयला
पत्रिका
Pagination