Skip to main content

.

लेखक एस.बी यांनी गुरुवार, 17/06/2021 12:04 या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:

वाचने 4852
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

कथा वाचली. कथेची मांडणी विस्कळीत वाटत असली तरी लेखातील भावना पोहचल्या. बाकी, 'वारी' शब्दातच एक मोठा पट डोळ्यासमोर उभा राहतो. एकदा तरी अनुभवावी अशी ती गोष्ट. संत श्रेष्ठ, तुकोबा म्हणतात. उदंड पाहिले उदंड ऐकिले | उदंड वर्णिले क्षेत्रमहिमे || ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर | ऐसा विटेवर देव कोठे || -दिलीप बिरुटे (मिपा वारकरी)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आभारी आहे सर...मी लेखन करण्यात नवखा असल्याने कथा विस्कळीत वाटत असेल तर कृपया असा विस्कळीतपणा कमी व्हावा म्हणून योग्य त्या सुधारणा सुचवाव्यात ही विनंति...

In reply to by एस.बी

अपण चांगलं लिहिता. पण, पाहता क्षणी प्रेमात पडावं तसं पहिल्या काही ओळीतच वाचकांची पकड बसावी अशी सुरुवात असायला पाहिजे. आपण दोन-चार ओळीचं प्रास्ताविक लिहिलं, त्या पेक्षा थेट सुरुवात व्हावी. वाचकांना काय सांगायचं, कसं सांगायचं ते थेट लेखनातूनच. लेखनात वारीकाळातील दिवेघाटाचं एखादं छायाचित्रही डकवलं तरी चाललं असतं. लेखनात आलेले हॅशटॅग, चांदण्या, अतिरिक्त उद्वारवाचक चिन्ह. टींबटींब, हे कमी करुन वाक्यांची व्यवस्थित मांडणी जर करत गेला तर उतम लेखन होईल असे वाटते. अर्थात सरावाने ते येत जाईल. अर्थात ही माझी मतं. पुढील लेखनासाठी शुभेच्छा. -दिलीप बिरुटे

छान लिहीले आहे... गोष्ट आवडली पण बिरुटे सर म्हणाले तशी विस्कळीत वाटली, मधेच कोविड चा उल्लेख ही खटकला. पैजारबुवा,

सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती । रखुमाईच्या पती सोयरिया ।१। गोड तुझें रूप गोड तुझें नाम । देई मज प्रेम सर्वकाळ ।२। विठो माउलिये हाचि वर देई । संचरोनि राहीं ह्रदयामाजीं ।३। तुका म्हणे काही न मागे आणिक । तुझें पायीं सुख सर्व आहे ।४।

पण म्हातारबाबा विठ्ठल आहेत लगेच समजलं. हा ट्विस्ट एकदम जुना आहे. काहीवेळेस काही ट्विस्ट नसणे हा मोठा ट्विस्ट असतो.

गारंबीचा बापू'मध्ये बापूंनी तिकडे पंचक्रोशीत कायकाय करून ठेवलं आहे! हे पहिल्या पानावरच बहुतेक आहे ना? त्याने काय केले हे पुढे उलगडत जाणारच आणि वाचकांना समजणार. पण 'वाचकहो' अशी मध्येच हाक आली की वाचक खाडकन भानावर येऊनआसुद,दापोली सोडून धाडकन खुर्चीत आदळतो. ------------- ( बऱ्याच वर्षंपूर्वी वाचली गारंबीचा त्यामुळे पक्के आठवत नाही. पण कादंबरी तशीच रेटून वाचली कारण तो त्या परिसराचा सामाजिक इतिहास आहे. )