चालू घडामोडी - मे २०२१ (भाग ५)
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन आज बरोबर दीड वर्ष पूर्ण झाले. त्यांना खऱ्या अर्थाने जेमतेम ३ महिनेच निर्वेध कारभार करता आला. त्यांनी शपथ घेतल्यानंतर ४ महिन्यांच्या आतच चिनी विषाणूने भारतात व महाराष्ट्रात धुमाकूळ घालायला सुरूवात केली व तो धुमाकूळ अजूनही सुरू आहे. या विषाणूचा भारताला व महाराष्ट्राला फार मोठा फटका बसला आणि अजूनही बसत आहे.
दुर्दैवाने एकूण रूग्णांची संख्या व एकूण मृत्यु यात अगदी प्रारंभापासूनच महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. यासाठी जनतेचा निष्काळजीपणा जेवढा कारणीभूत आहे तेवढीच केंद्र व राज्यसरकारची नियोजनशून्य उपाययोजना कारणीभूत आहे.
हे दीड वर्ष अत्यंत वादळी ठरले. महाराष्ट्रावर एकापाठोपाठ एक संकटे येत गेली. दुर्दैवाने बहुतेक सर्व प्रसंगात राज्य सरकारचे व मुख्यमंत्र्यांचे अस्तित्व क्वचितच दिसले. मागील सव्वा वर्षात मुख्यमंत्री बहुतांशी घरात बसून आहेत. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पूर्ण खेळखंडोबा झाला आहे. यातील काही संकटे अनपेक्षित निसर्गनिर्मित होती तर काही राज्य सरकारने स्वतः ओढवून घेतली होती. सुशांतसिंग राजपूत व त्यानंतर घडलेले महाभारत, कंगना रनौटवर सूडबुद्धीने केलेली कारवाई, टीकाकारांना मंत्र्यांनी घरी उचलून आणून बेदम मारणे, सचिन वाझे व अनिल देशमुख प्रकरण, संजय राठोड व धनंजय मुंडे प्रकरणे, औषध उत्पादकांना धमकावणे अशी अनेक प्रकरणे टाळता येण्यासारखी होती. राऊत, नबाब मलिक, पटोले, सचिन सावंत असे अनेक वाचाळ सरकारच्या बाजूने व भाजपविरूद्ध अत्यंत प्रक्षोभक वक्तव्ये करीत आहेत.
दुर्दैवाने विरोधी पक्ष म्हणून भाजपही अपयशी ठरला आहे. हे सरकार पडावे यासाठी फडणवीस व चंपा पाण्यात देव ठेवून वाट पहात आहेत. सुशांतसिंग प्रकरण, वाझे प्रकरण, प्रताप सरनाईकांवर धाड, १२ नियुक्त आमदारांची यादी अडवून ठेवणे अशा प्रकारातून सरकारची जास्तीत जास्त कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अत्यंत वाचाळ असलेले चंपा सरकार पडण्याचा रोज एक नवीन मुहूर्त सांगतात. आधी म्हणत होते की नोव्हेंबर २०२० मध्ये बिहार विधानसभा निवडणुकीनंतर हे सरकार पडणार. नंतर म्हणायला लागते की २ मे नंतर हे सरकार पडणार हे शाळेतला मुलगाही सांगेल. आता म्हणतात महाराष्ट्र झोपेत असतानाच हे सरकार पडणार. नंतर म्हणाले की राज्यात सत्ताबदल निश्चित आहे व कसा होणार ते अजित पवारांना माहिती आहे. फडणवीस म्हणाले की २ मे नंतर हे सरकार पाडणार. पण हे सरकार काही केल्या पडत नाही.
भाऊ तोरसेकर व इतर काही पत्रकार सुद्धा सरकार पडणार अशी भाकिते सातत्याने करीत आहेत. अमित शहा व पवारांचं काहीतरी शिजतंय, महाराष्ट्रात काहीतरी घडणार अशी भाकिते किमान ७ महिन्यांपासून सुरू आहेत.
शरद पवार आजार किंवा कोणत्या तरी कारणाने मागील जवळपास २ महिन्यांपासून राजकारणापासून संपूर्ण दूर राहून गप्प आहेत. त्याचाही सोयिस्कर अर्थ काढला जात आहे.
एकंदरीत बार्शी लाईटच्या वेगाने या सरकारने दीड वर्षांची मजल मारली आहे. दीड वर्षात यांनी काहीही केले नाही व यांचे अस्तित्वही दिसत नाही. महाराष्ट्राच्या भाळी हा खेळखंडोबा अजून किती काळ चालणार हे सांगता येणे अवघड आहे.
प्रतिक्रिया
प्रसिद्ध गुंतवणूकदार जोसेफ
ही ओढून ताणून लावलेली मीमांसा
च च च... भल्या पहाटे बाशिंग
@प्रदीप.
@ चंद्रसूर्यकुमारमागच्या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Be happy for this moment. This moment is your life. :- Omar Khayyamबहुधा मा.देवेंद्र फडणवीस
बहुधा मा.देवेंद्र फडणवीस यांनीच स्पष्ट सांगितलेले आहे की हे सरकार पाडण्याची अजिबात इच्छा / घाई नसुन अंतर्गत कलहाने हे आपणहुनच पडेल.तसेही आत्त्ता सरकार स्थापन करण्याची घाई भाजपला नसावी... कारण चालु सरकारच्या विरोधात जितका असंतोष अधिक वाढेल तोच पुढे त्यांच्या फायद्याचा ठरेल.खालील वक्तव्ये वाचा. सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा आघाडी सरकार लवकरच पडेल हे आठवीतला मुलगाही सांगेल आघाडी सरकार २ मे नंतर पडणार राज्यात सत्ताबदल होणार हे निश्चित महाराष्ट्र झोपेत असतानाच हे सरकार पडेलमदनबाण.....
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- "Life is what happens when you're busy making other plans." :- John Lennonहे अजूनही आशेवर आहेत.
केरळ high कोर्टानं केरळ
रोचक!
स्वातंत्र्यानंतर भारत हळूहळू
कॅट्रीना
Kenya has donated 12 tonnes
तीव्र निषेध
सनातनी हिंदू म्हणजे
काही दिवसांच्या विश्रांतीनंतर
सहमत
@ नगरीनिरंजन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- "Love me or hate me, both are in my favour. If you love me, I will always be in your heart, and if you hate me, I will be in your mind." :- Qandeel Balochhttps://www.tv9marathi.com
"गुजराती कंपनी" असं जर
या बातमीत "गुजराती" या
समाजमाध्यमांबद्दल कायदे
TV9 बद्दल किंवा lallantop.com
न्यायालयाने म्हटलं असेल तर ती
ओ सात साल...!
तुम्हीच लिहा
तुम्हीच लिहा .. निपक्षपणे!
ते नेहमीच निष्पक्षपणे लिहितात
इंग्रजीत "लोडेड क्वेशन " तसे
चिनी विषाणूमुळे महाराष्ट्रात
कीव येते खूप
इतकी भीषण परिस्थिती असूनही
राज्य सरकार,राहुल जी,ममता
१००% सहमत...
श्री हफिज सईद, हफिज सईद साब
https://www.loksatta.com/desh
हं.
अडाणी सरकारचे हेतू स्वच्छ
अर्थ
इथे पहा
जी क्वांटिटी चढ्या भावाने
गोंधळ
ह्यांत गोंधळ झाला आहे, बघा.
समजत नाही....
१. राज्यांना स्वतंत्र
घोडा- चतुर....
????
1. म्हणजे नक्की काय करायला
म्हणजे केंद्र सरकार ने
????
Pagination