आदरणीय पंतप्रधान मा. मोदी यांचं सरकार आल्यापासून देशात अनेक गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहेत, ते सोडविण्यासाठीचे प्रयत्न करण्याऐवजी जे प्रश्नच नव्हते, त्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचा सतत प्रयत्न केला जातो. सरकारसमोरील प्रश्न आणि त्याची सोयीस्कर उत्तरांनी देशात विविध माध्यमं सतत चर्चेत असतात. गेल्या वर्षभरापासून करोना या विषाणुच्या संक्रमाने भर घातली. आज जवळपास चार लाखांवर बाधीतांचा आकडा पोहचला आहे, मृत्युचं प्रमाणही वाढत आहेत. भारताच्या एकून आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे केव्हाच निघाले आहेत, अशावेळी असलेल्या व्यवस्थेत माणसं कशीतरी भयावह अवस्थेत जगत आहे, भारतीय जनता आपापल्या सगेसोय-यांच्या गमावलेल्यांच्या दुखात खिन्न मनाने कसेबसे आलेला दिवस ढकलत आहेत.जगण्याची शाश्वती राहीली नाही, अशी एक अनामिक भिती माणसाच्या मनात भरुन राहीलेली आहे. दुसरीकडे लशींचा देशातला, राज्यातला तुटवडा आणि लशीकरणाने विषानुवर नियंत्रण आणन्याचा प्रयत्न केंद्रस्तरावरुन प्रयत्न केला जात आहे. जगभरात करोना विषानुवर नियंत्रण येत असल्याचे दिसत आहे, त्याचवेळी भारताची अवस्था दुस-या लाटेत दिवसेंदिवस अधिक दयनीय होत चालली आहे. गेल्या वर्षभरापासून येणा-या विषाणुंच्या लाटेबाबत आपण गाफील राहीलो, प्रयत्न करण्याऐवजी स्वत:च कौतुक करण्यात केंद्रीय नेतृत्त्व गुंतलेले दिसले. आणि त्याचे आज परिणाम भारतीय जनतेला भोगावे लागत आहे. आता इतर देशांच्या तुलनेत आपले मृत्युदर कमी आहे, बाधीत संख्या कमी आहे, आकडे कमी आहेत, साख्यंकी, वगैरे दाखवून आपली परिस्थिती भली आहे, हे दाखविण्यात आता काहीही अर्थ उरला नाही, वास्तव समजून घेण्याची वेळ आली आहे.
देशभरात आरोग्यव्यवस्थेची मरणासन्न अवस्था झालेली आहे,आपत्ती व्यवस्थापनाचे धडे काय असतात त्याची कल्पना नसलेले नेतृत्व लोकांना जगण्याची उभारी देऊ शकले नाही. लोकांचे दुखदायक व्हीडीयो माध्यमातून फिरत आहेत. आपण जगू की नाही याची शाश्वती आता उरली नाही, अशी भिती प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली आहे, अशावेळी जनतेमधे आश्वासक वातावरण करण्याऐवजी आपण कुंभमेळे भरवता ? आपण ठरवलं असतं तर ते थांबवता आलं असतं आता वाढलेल्या संसर्गाचे आकडे यायला लागले आहेत. पश्चिम बंगालची निवडणूक आपण प्रतिष्ठेची केली. मा.पंतप्रधान, देशाचे गृहमंत्री, केंद्रीयमंत्रीमंडळातील मंत्री, आमदार, खासदार, अभिनेते त्यांच्या रॅल्या, ते मोर्चे ती भाषणं यात अशावेळी जनतेच्या दु:खावर फुंकर घालण्याऐवजी आपणास पश्चिम बंगालची निवडणूक महत्वाची वाटली. रोम जळत होते तेव्हा निरो फिडल वाजवत होता अशा गोष्टीची आठवण होत होती. इतके, हे नेते आणि नेतृत्व असंवेदनशील असू शकतात ही कल्पनाच सहन होऊ शकत नाही. जीवाचा आटापीटा करुनही पश्चिम बंगाल मधे आपला दारुण पराभव झाला. जनतेने आपणास साफ़ नाकारले, एक संदेश दिला की आपण कोणत्या विषयांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे त्याचं एक आत्मभान जनतेने दिले. . जनतेची आवश्यकता काय आहे, यातून आपण काही शिकाल अशी अपेक्षा करणे गैर आहे. विकत घेतलेली माध्यमं आपला जयजयकारात व्यस्त आहेत. कोणत्याही माध्यमाने हॉस्पीटल्समधील आवश्यक बेडची संख्या सांगितली नाही, उपचार कुठे मिळू शकतो ते सांगितले नाही, आपण करीत असलेल्या चुंकावर मौन बाळगले. मात्र पश्चिम बंगालमधे आपण कसे विजयी व्हाल त्याचे खोटे आकडेमोड करीत विविध वाहिन्या व्यापून टाकलेल्या होत्या. करोनाच्या पहिल्या लाटेत एका चित्रपटसृष्टीतील अभिनेत्यावर दिवसभर वाहिन्या त्याच विषयावर चर्चा करीत राहील्या तेव्हाही आपण जनतेच्या आवश्यकतेकडे अक्षम्य दुर्लक्ष केले.
जनतेला उपचार, लशीकरण, आणि योग्य मार्गदर्शन यांचे योग्य नियोजन हवे होते. ऑक्सीजनचा तुटवडा जाणवत होता, इंजेक्शचा तुटवडा होता. लोक रुग्णालयाबाहेर तळमळतांनाची छायाचित्रे व्हीडीयो व्हायरल होत होती, आजही होत आहेत. मा.सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतरही आपल्यात काहीही जवाबदारीचं भान दिसलं नाही. आपण वाढती लोकसंख्या आणि तुटपुंज्या उपायात आम्ही किती काम करीत आहोत हे दाखविण्यात व्यस्त राहीलात. आपण टीका करणा-यांवर कायदेशीर कार्यवाहीत व्यस्त राहीलात. मा.सर्वोच्च न्यायालयास सांगावे लागले की सकारवर टीका करणा-यांवर आपण कार्यवाही कराल तर याद राखा, आपल्या दडपशाहीबद्दल मा.न्यायव्यवस्थेला आपलाला समज द्यावी लागते. आपण जनतेच्या गरजांकडे दुर्लक्ष आजही करीत आहात. आपली असंवेदनशीलता अनेकदा दिसून आली. आसामचा प्रचार असो, की पश्चिमबंगालचा प्रचार असो. बाकी इतर पक्षांच्या नेतृत्वाने काय केले यापेक्षा आपण एक आदर्श उभा करायला हवा होता. राजकारण करायला माणसं जगली तर भविष्यकाळात आपणास भरपूर राजकारण करता येणार आहे. दीर्घकालीन नियोजनांचा अभाव, विविध पक्षांच्या भूमिका, पक्षीय धोरणे, मतभेद या पलिकडे जाऊन राष्ट्रहित लक्षात घेऊन नियोजन करणे गरजेचे होते.
जगभरातील आंतरराष्ट्रीय दैनिके दुस-या लाटेतील भारताच्या बेजवाबदारीबद्दल लिहित असतांना आपण त्या त्या राष्ट्रांना आपापल्या परदेशातील दुतावासामार्फत भारताची बदनामी थांबवा, असे म्हणत आहात. सरकारवर टीका करणा-यांची ट्वीटर खाती गोठवायला सांगत आहात. आपल्या देशातील माध्यमे कदाचित आपल्याविरुद्ध लिहिणार नाहीत, सरकारच्या प्रशासनाबद्दल लिहिणार नाहीत कारण त्यांचे हित त्यात गुंतलेले आहेत, भारतीय माध्यमांना पॅकेजेसप्रमाणे वार्तांकन करावे लागतही असेल, परंतु परदेशातील सरकारे, लोक आणि देश नागरिकांचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य जपतात त्या टीकेचा आदर करतात, आपणास टीका सुद्धा सहन होत नाही. टीकेकडे सकारात्मक पद्धतीने बघायला हवे, त्यातले चांगले म्हणून काही घ्यावे असे आपण आणि आपल्या मंत्रीमंडळास वाटत नाही. आपण आपल्या अपयशाचे खापर राज्यांवर फोडण्याचे प्रयत्न करीत आहात, कुरघोडीचे राजकारण करीत आहात असे वाटावे इतकी ती तफावत आपल्या प्रशासकीय भेदाच्या वर्तनातून दिसून येते.
भारतीय जनतेने आपणास बहुमताने निवडून दिले आहे ते जनता पूर्वीच्या सरकारांमुळे त्रस्त होती, अपेक्षांना उतरत नव्हती म्हणून. आपण काही चमत्कार कराल, काही बदल कराल, आपल्या वकृत्वामुळे लोक भारावून गेले होते. आपण जसे जसे, जे जे म्हणाल ते ते लोकांनी केले. आपण दिवे लावा म्हणालात, लोकांनी दिवे लावले, आपण थाळीनाद करा म्हणालात लोकांनी आपल्या डोक्याचा वापर न करता थाळी नाद केला. आपण जे जे म्हणाल ते ते सर्व केले. अजूनही आपण काही चमत्कार कराल म्हणून जनता आपल्याकडे आस लावून बसली आहे, पण दुर्दैवाने आपलं अपयश आता लपविणे शक्य नाही. सरकारातील सध्याच्या अवस्थेबद्द्ल निवडून दिलेले प्रतिनिधीसुद्धा बोलत नाहीत, दयनिय अवस्थेबद्दल तक्रार करीत नाहीत. सत्तेच्या मोहापोटी लोकांच्या गरजांबद्दल प्रतिनिधी बोलत नाहीत, इतके लाचार लोकप्रतिनिधी पहिल्यांदा बघावे लागत आहेत.
सध्या सोशियल मिडियात मा.पंतप्रधान यांच्यावर खुप टीका होतांना दिसते, टींगल टवाळी होतांना दिसते. प्रधानमंत्र्यांबद्दलचा आदर लोक विसरत चालले आहेत, ही टीका थेट सन्माननीय पंतप्रधान आणि गृहमंत्री यावर असते, देशभरातून त्यांच्यासंबंधी संतप्त प्रतिक्रिया उमटत असतात, टीका करणे ही सहज प्रतिक्रिया असते. पंतप्रधान म्हणून असलेल्या जवाबदा-यांपासून त्यांन पळ काढता येणार नाही, लोकभावनेचा विचार करावाच लागेल. आज परदेशात लशीवाटपापेक्षा देशात लशींची आवश्यकता आहे, परराष्ट्रीय धोरण म्हणून काही मदत करावी लागत असेल पण आपण जगाला मदत करीत आहोत त्याचवेळी इथे देशात काय अवस्था आहे, हा विचार करु नये असा संतप्त सवाल लोक करीत असतात.
भारतीय जनतेने काही आमुलाग्र बदल होतील म्हणून जनतेने सत्तांतर केले. पण गेली काही वर्षात असलेल्या प्रश्नांचा नीपटारा झाला का ? वाढती बेरोजगारी, वाढती महागाई, गरिबी, या आणि असंख्य प्रश्नांना घेऊन सत्तेवर आपण आलात आता त्यात काही बदलही झाले नाहीत. खोटे युक्तीवाद केले तरी, असलेल्या प्रश्नांपासून सुटका होऊ शकत नाही, लोकांनी ज्यासाठी निवडून दिलं, तो हेतू पूर्ण झाला नाही तर लोक बदल घडवतात हा या देशातला इतिहास आहे, लोकशाहीने भल्या भल्यांचे होत्याचे नव्हते केले. तरीही आपण काहीही शिकला नाहीत, आपण जे ठरवू ते झाले पाहिजे या अट्टाहासाने देशाला अजून किती वेठीस धरणार, संकटाच्या खाईत लोटणार हा प्रश्न आहे, अशावेळी आता काही बदल होणे आवश्यक वाट्ते.
सध्याचं प्रशासनातील पंतप्रधानांचं अपयश पाहता, लोक ज्या पद्धतीने पंतप्रधान पदाची त्यांच्या भाषणाची खिल्ली उडवत आहेत ते सर्व पाहता, आता पक्षाच्या कार्यकर्ते, नेते, आणि सल्लागारांनी तज्नांनी आता नेतृत्त्वात बदल करण्याची आवश्यक्ता वाटते. आपणास बहुमत आहे, त्यामुळे आपण पंतप्रधान आणि मंत्रीमंडळ बदलू शकत नसलो, तरी आता अन्य चेह-यांना प्रयोग म्हणून आता नव्या चेह-याला नवी संधी दिली पाहिजे, आपल्याकडून जे काही नेतृत्त्व म्हणून अपेक्षित आहे, त्यात जर काही होत नसेल तर आता भाकरी फ़िरवली पाहिजे. भाकरी फ़िरवली नाही तर ती करपते त्या प्रमाणे सध्याच्या नेतृत्वात आता बदल करणे आवश्यक आहे, असे वाटते. आपल्या सरकारमधे अनेक अनुभवी व्यक्ती आहेत, कोणास तरी नवी संधी दिली पाहिजे. सुडाचे राजकारण न करता आता माणसाच्या जगण्याला प्राधान्य देणा-या कृतीची गरज आहे.
नाकर्ते शासन-प्रशासनामुळे माणसाच्या जगण्याची शाश्वती वाटत नसेल तर लोकांना अशी शक्तीशाली व्यवस्था लोकशाहीच्या माध्यमातून बदलता येते, हा येथील इतिहास आहे, पक्षातील लोकप्रतिनिधींची एक मर्यादा असते, सत्तेचा लोभ असतो. परंतु ज्या नागरिकांचे नातेवाईक गमावले गेले आहेत त्या नागरिकांनी सनदशीर मार्गाने सरकारच्या धोरणाला विरोध केला पाहिजे, नागरिक म्हणून तरी आपली काहीही मजबुरी नाही. सरकारविरुद्ध शिक्षितांनी लिहिले बोलले पाहिजे. सरकारला बहुमत आहे, सध्या सत्तांतर शक्य नाही, परंतु, पंतप्रधान मोदी यांची पक्षीय कारकीर्द पाहता, इतिहास सोडून द्या. पण, पक्षाच्या पद्धतीप्रमाणे त्यांना नेता म्हणून जसे निवडले तसे त्यांचं नेतृत्त्व आता बदलण्याची वेळ आली आहे. एका नव्या चेह-याची गरज आहे, पंतप्रधान मोदी यांचा अपयशी कारकीर्दीचा पाढा असाच वाढत राहीला तर तो पक्षाला घातक ठरेलच पण देशासाठी ही वाटचाल घातक ठरणार आहे. त्यामुळे वेळीच ही व्यवस्था बदलेल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. पश्चिम बंगालच्या अनुभवावरुन काही तरी शिकून भारतीय लोकांना ’अच्छे दिन’ येतील अशी अपेक्षा करु या, पश्चिम बंगालने या दोन्ही नेत्यांना स्पष्ट थेट नाकारले आहे आणि देशाला वाचवले. एक नवा संदेश बंगालने दिला आहे. हुकुमशाही प्रवृत्तीला लगाम लावला आहे. लोक अशा कोणत्याही भूलथापीला बळी पडत नाही, हे पश्चिम बंगालने दाखवून दिले, तरीही, पक्षाने तीनाचे सत्तर पंचाहत्तर कसे केले, याच जयजयकारात पक्ष राहणार असेल, आणि 'गीरे भी तो टांग उपर'करुनच फ़िरायचे असेल तर तर पक्षाची अवस्था पून्हा एकदा दोन खासदारांवर जाऊन थांबायला वेळ लागणार नाही. आणि जनता म्हणून तोपर्यंत आपण सर्व देशोधडीला लागलेले असू...!
मिसळपाव
प्रतिक्रिया
आमचं सरकार बहुमताने येईल असे
In reply to ऑ.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स्क्युज मी...
In reply to आमचं सरकार बहुमताने येईल असे by प्रचेतस
हेच नेतृत्व सध्याच्या
In reply to स्क्युज मी... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हाच नियम महाराष्ट्राला लावा
In reply to ऑ.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
३ चे ७७ झाले असल्या फालतू घटनेकडे
In reply to आत्ता जनतेने बंगालमधे नाकारले by प्रचेतस
गुर्जी सारखे अंध मोदी भक्त
In reply to ३ चे ७७ झाले असल्या फालतू घटनेकडे by चौकस२१२
गुर्जी सारखे अंध मोदी भक्त सुद्धामाझ्याबद्दल लिहिलंय का?हो पण ते तुमच्यावर आरोप
In reply to गुर्जी सारखे अंध मोदी भक्त by श्रीगुरुजी
मला कुणी श्री मोदींचा (अंध)
In reply to हो पण ते तुमच्यावर आरोप by चौकस२१२
हे प्रोफेश्वरांचे नवीन
In reply to नवा चेहरा जनतेच्या प्रश्न समजून घेणारा... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नवीन शब्दोत्पत्ती
In reply to हे प्रोफेश्वरांचे नवीन by चौकस२१२
इकॉनमी आणि तारतम्य
ब्रेकिंग न्यूज
देखते रहिये मिपातक.
In reply to ब्रेकिंग न्यूज by चित्रगुप्त
गरज तर अनेको अनेकांच्या राजीनाम्यांची
लिहिते राहा.
In reply to गरज तर अनेको अनेकांच्या राजीनाम्यांची by माहितगार
नेतृत्व आकाशातून थोडीच टपकते,
In reply to लिहिते राहा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बाकी सर्वच राजकीय नेतृत्व दर
In reply to लिहिते राहा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपली नाकारत्मकता आता हास्यास्पद झाली आहे ..
काहीही हं प्रा.डॉ.
आभार...!
कितीही मोठे, अभ्यासपूर्ण,
सहमत आहे .....
In reply to कितीही मोठे, अभ्यासपूर्ण, by Vichar Manus
मत.
स्वरा भास्कर
ऑक्सिजनशिवाय तडफडून लोकांना मरायचं नसेल तरनवीन पंतप्रधानांची गरज- स्वरा भास्कर. यातील खोडलेल्या जागी कोणतीही परिस्थिती घाला. या लोकांना त्या परिस्थितीशी काहीही घेणेदेणे नाही. तर नवीन पंतप्रधानांची गरज हे आपले म्हणणे पुढे दामटायचे हे महत्वाचे. उदय भास्कर या संरक्षण तज्ञाची मुलगी अशी का निघावी? अशी म्हणजे तुकडे तुकडे वाल्यांच्या बाजूची? https://maharashtratimes.com/entertainment/swara-bhaskar-says-india-nee…आलं अंगावर तर ढकल केंद्रावर .....
In reply to स्वरा भास्कर by चंद्रसूर्यकुमार
गल्ली चुकली का?
In reply to आलं अंगावर तर ढकल केंद्रावर ..... by मुक्त विहारि
गल्ली बरोबर आहे आणि प्रतिसाद पण बरोबर आहे ....
In reply to गल्ली चुकली का? by चंद्रसूर्यकुमार
रघुराम राजन म्हणतात...
रघुराम राजन यांसारखे उत्तम
In reply to रघुराम राजन म्हणतात... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हल्ली ?
In reply to रघुराम राजन यांसारखे उत्तम by प्रचेतस
=))
In reply to हल्ली ? by प्रसाद गोडबोले
कभी तू...
In reply to =)) by प्रचेतस
=))
In reply to कभी तू... by चंद्रसूर्यकुमार
हल्ली?
In reply to रघुराम राजन यांसारखे उत्तम by प्रचेतस
हल्ली म्हणजे गव्हर्नरपद
In reply to हल्ली? by सुबोध खरे
मी श्री रघुरामान राजन यांच्या
In reply to हल्ली? by सुबोध खरे
हायला
कोविड लसीच्या वेगवेगळ्या
ऑक्सिजनशिवाय तडफडून लोकांना
एवढी हाईप का दिली जाते अश्या लोकांना.. ??
In reply to ऑक्सिजनशिवाय तडफडून लोकांना by बापूसाहेब
आम्हाला सरकार हवंय : अरुंधती रॉय.
हिचे काश्मीर वरचे तोडलेले
In reply to आम्हाला सरकार हवंय : अरुंधती रॉय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बरोबर आहे
In reply to हिचे काश्मीर वरचे तोडलेले by सुबोध खरे
बरोबर आहे
In reply to हिचे काश्मीर वरचे तोडलेले by सुबोध खरे
ज्या बाईचे काहीच कर्तुत्व
In reply to बरोबर आहे by यश राज
प्रतिसाद का पोस्ट होत नाही
In reply to ज्या बाईचे काहीच कर्तुत्व by यश राज
नेतृत्वाबद्दलची मंत.
In reply to हिचे काश्मीर वरचे तोडलेले by सुबोध खरे
आय एस आय हा भारताची शत्रू
In reply to नेतृत्वाबद्दलची मंत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
In reply to आय एस आय हा भारताची शत्रू by सुबोध खरे
शँम्पेन पिऊन महालात बसून
In reply to +१ by प्रचेतस
विद्यावाचस्पती प्राध्यापक,
In reply to आम्हाला सरकार हवंय : अरुंधती रॉय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बरोबर आहे
आजच मोदी व ठाकरे यांंच्यात
In reply to बरोबर आहे by इरसाल
राज्याला आरोग्य ॲप
In reply to आजच मोदी व ठाकरे यांंच्यात by श्रीगुरुजी
ओह, वाहिन्यांवर चुकीची बातमी
In reply to राज्याला आरोग्य ॲप by आग्या१९९०
कधी खरं सांगतात? २०१४ नंतर
In reply to ओह, वाहिन्यांवर चुकीची बातमी by श्रीगुरुजी
२५ मे २०१४ पर्यंत सांगत होते
In reply to कधी खरं सांगतात? २०१४ नंतर by आग्या१९९०
हो, तेव्हाही अर्धसत्य माहिती
In reply to २५ मे २०१४ पर्यंत सांगत होते by श्रीगुरुजी
म्हणजे एनडीटीव्ही, मटा, सामना
In reply to हो, तेव्हाही अर्धसत्य माहिती by आग्या१९९०
वायर, क्विंट, प्रिंट, कॅरॅवॅन
In reply to म्हणजे एनडीटीव्ही, मटा, सामना by श्रीगुरुजी
सगळी म्हणजे सगळी चॅनल. प्रिंट
In reply to वायर, क्विंट, प्रिंट, कॅरॅवॅन by श्रीगुरुजी
म्हणजे मटा, सामना, लोकमत,
In reply to सगळी म्हणजे सगळी चॅनल. प्रिंट by आग्या१९९०
नीट वापरता येत नसेल
In reply to राज्याला आरोग्य ॲप by आग्या१९९०
एकंदरीत केंद्र सरकारचा सगळाच
https://www.news18.com/news
अरे हा धागा अजून चालूच आहे का
२०२४
In reply to अरे हा धागा अजून चालूच आहे का by अमर विश्वास
ॲड हॉक कारभारी आता सुप्रीम
In reply to २०२४ by प्रसाद गोडबोले
अरे वाह
In reply to ॲड हॉक कारभारी आता सुप्रीम by आग्या१९९०
हो ३००+ असले तरी "अडाण्याचा
In reply to अरे वाह by सुखीमाणूस