९ मार्च ,२००८..
सकाळपासुनच लगबग होती घरात.आस्मादीक नेहेमीप्रमाणे शांत आणी स्थिर होते.कपडे पॅक करण्यापासुन ते काय -काय लागेल ,काय-काय हवं नको ते आई आणी ताईच बघत होते.आणी आम्ही आरामात रीलायन्सच्या डब्यावरुन सर्व मित्राना उद्या जाणारे बरं का सांगत होतो.वैतागुन आईने कर लो दुनिया मुट्ठीमे ला ड्रॉवर मध्ये कोंबला आणी 'एकदा बघ अजुन काय हव असेल तर सांग' असा आदेश दिला.आता गत्यंतर नव्हतं.पाह्यलं तर बाप रे! दुनियाभरच्या वस्तु त्या ट्रॉली मध्ये अक्षरशः कोंबलेल्या.
"अगं आई काय हे इतके कपडे नकोयत.आणी हे काय ब्लँकेट शॉल.असलं काही नकोरे !"
"तु गप्प रे थंडी असते तीकडे खुप !'
तुला कसं काय महिती, असं विचारायची हिंमत होत नाही म्हणा आमची.२० किलो फक्त लगेज मध्ये अलाउड होतं.बॅगेचं वजन केलं साधारण २५ किलो आलेलं.मग त्यातुन खाण्याच सामान्,थोडे कपडे ब-याच वस्तु कमी करुन २० किलो केलं आणी कुलुप लावलं.
तर आजचा दिवस होता आम्ही परदेशी निघालेलो.रीतसर पासपोर्टावर चायनाचा व्हीसा लागलेला आणी १० मार्च ला ४.१५ ला आम्ही हवाईयात्रा करणार होतो.आधी ४.१५ म्हणजे दुपारचे असावेत असा समज झालेला आणी त्यानुसार सर्व मित्राना कळवुन टाकले होते (समस हो रीलायन्सची ५० रुपयात ५००० समस ची इस्कीम).नंतर एजंटाकरवी कळालं की सोन्या, ४.१५ म्हणजे पहाटेचे.आणी मग डोक्यात प्रकाश पडला.
तर मंडळी आयुष्यात फार-फार तर १०-१५ दिवस पुण्यातुन बाहेर,आई-बापा पासून दुर राहीलेलो,आणी आज तर डायरेक्ट साता-समुद्रापार (असं म्हणायचं असतं वास्तवीक भारत आणी चीन दरम्यान फक्त हिमालय पर्वतच आहे,समुद्र-बिमुद्र काहीही नाही.) पण अजिबात मनात चल-बिचल नाही,किंतु-परंतु नाही.मला जायचये वर्षभर का होइना पण सर्वापासून दुर रहायचये,असं पक्क मनी ठासलेलं.छोट्या-छोट्या गोष्टीसाठी आईवर परावलंबी असलेला आपला शहाणा बाळ कसा काय एकटा राहील ह्याची माझ्या माउलीला कोण काळजी.नाय-नाय म्हणता आज तरी तुला रागावणार नाही हे व्रत तोडलं तीने.वैतागच तसा दिलेला.सकाळपासुन फक्त अंघोळ केली.आणी हाफ बर्म्युडावर लोळत पडलेलो.कसलं सख-दुख नाही,काय नाही.मग मात्र आई आणी ताईने मस्त पैकी राशन घेतलं.त्यानंतर सलून गाठलं.नेहेमीचा कारागीर.म्हटलं बाबारे माणुस बनव.
"काय शेठ आज कुठें मुलगी बघायला की काय?" म्हटलं "आरे बाहेर चाललोये चीनला!"म्हणे "कुणी भेटलं नाय का सकाळपासुन ?" आणी खी-खी करुन हसायला लागलेलं.
च्या मायला! काय जोक सांगतोये की काय मी? असा राग अलेला,पण नेमका वस्तरा आणी माझी मान दोन्ही त्याच्या हातात्,मग गप्प बसलो.तासाभराने डोक्यावरच आणी चेहेर्यावरचं अर्धा-एक किलो वजन कमी करून झाल्यावर परतलो.
एक -एक करत मावशी ,मावस बहिणी,मामा ,मामी आणी बरीचशी मंडळी घरी जमू लागली.मग आणी सतराशे साठ सुचना प्रत्येक जण देउ लागलं.तीकडे असं असतं,तमुक असतं,असं कर,तसं करु नको.बरं एकच सुचना प्रत्येकानी द्यायलाच पायजे का.दीड -दोन तास फुल पीडलं.मी सुधा आज्ञाधाअरक बालकाप्रमाणे सारं अगदी मन लावुन ऐकत होतो.माझ थोबाड बघुन मावशीच्या मुली अजुन चिडवत होत्या.
संध्याकाळ झाली.बापूस आला.शेजारी बसला.एका शब्दानी आमचा संवाद नाय झाला.(आमच्या दोघाची राशी कधीच जुळली नाय्..बाप आणी पोराचा सुसंवाद कधी झालाच नाही.)
"जेउन घ्या " ताई.
"दीदी अगं अजिबात भूक नाहीये.शिवाय रात्रभर जागरण होइन मी नाय जेवत"
"दोन घास खा बेटा"-बापूस.
बर्याच दिवसानी बापाचा शब्द ऐकला.बसलो शेजारी.पूरी-श्रीखंड वगैरे.
मामेभाउ टपकला."अनिल पण जायचये कसं ?"
आणी आता आठवलं सकाळपासुन आपण कसं जाणारे ह्याचा विचारच नाय केलेला.मित्राला फोन लावला.
"मन्या, गाडी पाहीजे आज.मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ."
"आरे दोन्ही गाड्या बूक आहेत,दुस-याची चालेल का?"
"झक मार! काय पण कर! अर्जंट आहे,समजलं!"
"जॉर्ज बुशला रीसीव्ह करायला निघालास की काय?"
"आबे मीच चाललोये चीनला! "
"थोबाड पाह्य्लं का आरशात!ह्या ह्या ह्या !
असा राग आलेला,पण म्हटलं बरये कुणीच विश्वास नाय ठेवत ते.उद्या जेव्हा खरच मी गेलोये हे कळेन ना,तेव्हा सुधरतील साले.
"एक काम कर १५ मिनीटात फोन कर सुमो अरेंज करतो!"-मन्या.
देवपूजा कर्,सर्वाच्या पाया पड ,वगैरे सोपस्कार करता-करता ९.०० झालेले.
थोड्या वे़ळात सुमो पण पोचली.पून्हा सर्वाना येतो हं वगैरे केलं.बापूस एकटाच घरात बसलेला.म्हटलं काय झालं,तुम्ही नाय येत काय?२८ बर्षात पहिल्यांदा बापाला रडताना पाह्यलं,अगदी माझ्या गळ्यात पडून! "अहो पपा, मी काय नांदायला नाय चाललेलो,दोन एक वर्षात परतीन आणी एवढं काय टेंशन घेताये!वगैरे समजावलं.
मी-मी करत सारी फॅमीली मला सोडायला निघालेली.
"ज्याला जायचये ,तो आहे ना गाडीत!"-इती ड्रायव्हर.
"आहे आहे मी आहे !"
"बोला !पूंडलीक वरदे हरी विट्ठल!
श्री ज्ञानदेव ,तुकाराम "
च्या गजरात गाडी निघाली.एक्सप्रेस-वे साठी.अजुनही मी अगदीच शांत होतो.
१२.३० च्या सुमारास विमानतळावर पोचलो.ट्रॉली आणी हॅण्ड-कॅरी घेउन मेनडोर पाशी आलो.अर्थात सारे सोबत होतेच.पण हे तर EXIT आहे.आत कुठुन जायचं,इथुन सुरुवात.
सापडली एकदाची एन्ट्री गेट.दुसर्या मजल्यावर पोचलो आणी आता इथुन आत मला एकट्याला जायचं होतं.सर्वाना शेवटाचा नमस्कार केला.आणी एकदाही मागे वळून न पाहता आत प्रवेशलो.
काय गंमत असते नाही.दरवाज्याच्या पलीकडे सारे माझे आप्त,नातेवाईक्,माझी लोकं आहेत.आणी दरवाज्याच्या इकडे मी एकटाच आहे,एका वेगळ्या विश्वात.इथही खुप लोकं आहेत्,पण माझ्यासाठी फक्त लोकं आहेत.कुणीच आपलं नाही.
स्कॅन मशीनीत माझी बॅग आणी ट्रॉली टाकली.तीथुन पूढे कॅथे पॅसीफीकचा काउंटर शोधत गेलो.रात्री दीड च्या सुमारास प्रसन्न ,हसर्या चेहेर्याने काउंटरवर माझं स्वागत केलं गेलं.काही क्षणासाठी का होइना पण आपण फारच कुणीतरी ग्रेट आहोत असं वाटलं.बोर्डींग पास घेउन इमीग्रेशन नावाच्या परीक्षेसाठी सज्ज झालो.फॉर्म घेतला,नेमका कसा भरायचा,हे बघायला पाहीजे.इकडे तीकडे पाह्यलं.तर दोन जण माझ्या शेजारी, मी कसा भरतोये ते बघायला थांबलेली.शेवटी मीच माझाही भरला आणी त्या दोघानाही मदत केली.आता स्वारी इमीग्रेशनच्या लायनीत आली.
माझा नंबर आला.
"कुठे निघाले हुले साहेब?"
"गाँझौ चायना!!" -मी.
"अवघड आहे तुमचं जाणं?"
"का हो साहेब?"-मी.
"धावपट्तीचं काम चालू आहे.तुमची कॅथेची भलीमोठी विमान छोट्या धावपट्टी वरुन उडतील की नाही शंका आहे,म्हणुन म्हटलं!!"
माझा जीव भांड्यात पडला.....
पासपोर्टावर शिक्का मारल्यावर आस्मादीक आत प्रवेशले.
सगळ वातावरण वेगळं-वेगळच भासत होतं.कुठी विमानतळाची डागडुजी चाललेली तर कुठे काय.आतमध्ये सुद्धा मला घाम येत होता.बोर्डींग गेटपाशी अलो.तासभार लागेल तुमच्या बोर्डींगसाठी असं समजलं.आता करायचं काय.अंबानी सोबतच होता.भावजीला फोन करुन मी आत पोचलोये तुम्ही निघा म्हणुन सांगीतलं. पून्हा सर्वाशी बोलणं झालं.काय कर आणी काय करु नको ची परत एकदा उजळणी झाली.आत जीतु भेटला,जो माझ्या सोबत येणार होता.
नमस्कार-चमत्कार करत एका ठीकाणी बसलो.त्याची सुद्धा पहीलीच वेळ होती.इकडच्या तीकडच्या गप्पा मारत-मारत ४५ रु.ची एक कॉफी पीण्यातला आनंद (?) घेत होतो.काही फॉरीनर्स उगाच इकडुन तीकडे भटकत होते.अनोळखी लोकही हसुन हाय हॅलो करत होती.
सगळ्यात असुन देखील एकटा आहे की काय असं वाटत होतं.
अनाउन्समेंट झाली.बोर्डींग नावाचा तो फार्स देखील पार पडला.आणी आता १० मिनिटात उंच आभाळाला गवसणी घालणार होतो. कॅथेच्या हवाई सुंदरीने पास घेत आत सोडलं,हवाई सुंदर्याना हवाई सुंदरी का म्हणतात,ते आज मला समजत होतं.त्या अंधार्या गुहेतुन डायरेक्ट आत विमानात प्रवेशलो.माझ्या आणी जीतुच्या सीट्स मध्ये बरच अंतर होतं (बधीर १२.०० लाच येउन बसलेला) आत सीटवर येउन बसलो.शेजारी अजुन दोघे होते.
काही म्हणा मी मात्र थोडासा भारावलेलाच होतो.आयुष्यात कधी विचारही नव्हता केलेला की आपण चीन नावाच्या देशी जाउ.
लगेच 'कर लो दुनिया मुट्ठी मे 'तुन सर्व मित्राना अखेरचा समस केला "गुड बाय!फ्लायींग फॉर चायना !!"
मोबाईल वगैरे स्वीच ऑफ करा ची अनाउन्समेंट झाली. आणी निर्धारीत वेळेपेक्षा २० मिनीट उशीराने का होइना विमानाने सुक्ष्मगतीने चालायला सुरुवात केली.अंधारात काही दिसत नव्हतं,धावपट्टीच्या लाइट्स दिसु लागल्या.इकडे कप्तानाने आता विमान टेकऑफ करणार आहे ची अनाउन्समेंट दिली.आणी इंजीनाचा आवाज वाढला.काही समजण्या आधी अतिशय वेग घेत थोडावेळ धावपट्टीवर असलेलं विमान आकाशात भरारी घेउ लागलं.पहील्यांदाच सारं अनुभवत असल्याने थोडासा भांबावलोच म्हणा.शेजारचे दोन नमुने तर अगदी जीव मुठीत धरुन बसल्या सारखे भासले.त्यांच्या कडे बघत स्मित हास्य केलं तर.दोघानाही बरं वाटलं.आता आकाशातुन दिसणारं मुंबई शहर दुर दुर जाणारे दिवे दिसत होते.थोड्या वेळाने फक्त धुरकट अंधार दिसु लागला.क्षितीजावर सुर्यदेव जगावर राज्य गाजवायला सात घोड्या च्या रथावर स्वार होउन येतोयेतसं वाटत होतं.थोडावेळ अवकाशातुन त्याचा दिसणारा लालसर तांबुस रंग डोळे भरुन पाहुन घेतला.आत सारी मंडळी मस्त पेंगु लागलेली.मी सुद्धा मान टाकली.आणी डोळा लागला.
जाग आली तेव्हा सारी मंडळी नाश्ता करण्यात मग्न.
च्यामारी मला विसरलेले दिसताहेत.
जाउदे ! इतक्या सकाळी चरण्या पेक्षा थोडावेळ अजुन डुलकी मारणे मला जास्त योग्य वाटले.
कप्तानाने दिलेली सुचना ऐकुन जाग आली.विमान लँड होत होते,समोर स्क्रीनवर विमानाची सध्याची स्थिती वगैरे दाखवत होते.पहीला बँकॉक मध्ये स्टॉप घेउन नंतर हाँगकाँग साठी टेकऑफ होनार होतं.आणी तीथुन कनेक्टेड फ्लाईट ने गाँझौ चायना ला जायचं होत.विमान लँड होताच मी उठलो आणी जीतु शी गप्पा मारत बसलो.बरीचशी मंडळी बँकॉक ला उतरली आणी हाउसकिपींग वाले येउन त्यांची कामे करु लागले.
मला मस्त चहाची तल्लफ झालेली.
एअर होस्ट (जेंट्स बरं का) शोधला आणी 'अ कप ऑफ टी!' सांगीतलं.
(आपलं हींग्लीष मंजे लै भारी! :D)
त्या शहाण्याने ब्लॅक टी दिली .
फॉरीन कंट्रीज मध्ये ब्लॅक टी जास्त चालत असावा असा समज करुन आम्ही घेतला आणी लक्ष्यात आलं शाण्यानी साखर घातलीच नाही.इतक्यात बँकॉक वरुन येणारे प्रवासी यायला सुरुवात झालेली.गप्प डोळे बंद करुन ढोसला तो कडवट चहा!!
म्हटलं बेट्या पहीला कडवट अनुभव आहे,विसरु नकोस.
पून्हा एकदा विमानाने आकाशात भरारी घेतली आणी तासाभरात हाँगकाँग ला पोचवले.
आता कनेक्टेड फ्लाईट शोधणे आले.पून्हा सगळ्या फॉर्मॅलीटीज पूर्ण करुन आत पोचलो २ तास सारं होंगकाँग एअर्पोर्ट पायी फिरण्यात काय मज्जा असते ते अनुभवले.
दिसली कोणी सुंदरी( हवाई सुंदरी) की तीला विचारणे की आमची फ्लाईट कुठुल्या गेटवर आहे.पण अजुन डीक्लेयर च नव्हती केलेली.एका शॉप मध्ये पून्हा एकदा चहा पीण्यासाठी ४० HK डॉलर खर्च केले.
आणी घोडं गंगेत न्हालं.
एकदाची फ्लाईट डिक्लेयर झाली.आम्ही आसन ग्रहण केलं.दीड तासाने चायनाच्या गाँझौ नामक शहरात आमच आगमण झालं.
(क्रमशः) :-D
वाचने
12563
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
आणी घोडं
झकाआआआस ...
In reply to आणी घोडं by अवलिया
अन्या भाउ
हेच म्हणतो
In reply to अन्या भाउ by परिकथेतील राजकुमार
१+
In reply to अन्या भाउ by परिकथेतील राजकुमार
+१ लढ बाप्पु
In reply to अन्या भाउ by परिकथेतील राजकुमार
जाहिरातीमधे
In reply to अन्या भाउ by परिकथेतील राजकुमार
छान
मस्त
सही रे अन्या!
ज्याला जायचये ,तो आहे ना गाडीत!"-इती ड्रायव्हर
In reply to सही रे अन्या! by धमाल मुलगा
मस्त लेख
अन्याभाव,
कॅथे
काय गंमत
दीड तासाने
हेच म्हणते..
In reply to दीड तासाने by रेवती
सुंदर लेख
सहमत. क्रमश
In reply to सुंदर लेख by रामदास
बिगी बिगी लिव्हा
काय गंमत
जरा त्याची
In reply to काय गंमत by पर्नल नेने मराठे
तारझन आय
In reply to जरा त्याची by टारझन
अनिलभाऊ जोरात!
आम्हीसुद्धा येतोय बरं का?
भारी हो,
धन्यु फ्रेंड्स !!
छान आहे !! :)
In reply to धन्यु फ्रेंड्स !! by अनिल हटेला
मस्त...
+१
In reply to मस्त... by स्वाती दिनेश
मस्त ......
हटेलाभाई आनदेव!
सह्ही..
>> "ज्याला जायचये ,तो आहे ना गाडीत!"-इती ड्रायव्हर.