लोकसंख्या वाढीचा बागुलबुवा
खालील ध्याग्यावर दिलेली प्रतिक्रिया थोडी खूपच लांब झाली म्हणून इथे वेगळा लेख म्हणून पाडत आहे.
https://misalpav.com/node/48280
पाश्चात्य देशांत २-३ दशकांनी एक नवीन पोपट निर्माण होतो. मग हा विषय घेऊन तेथीतील हस्तदंती मनोऱ्यातील लोक येथेच्छ प्रोपागंडा करून लोकांची प्रचंड प्रमाणात दिशाभूल करतात.
महायुद्धानंतर निर्माण झाला तो बागुलबुवा लोकसंख्या वाढीचा आणि हा बागुलबुवा बऱ्याच काळ चालला. भारतासारख्ग रीब देश ह्या विदेशी प्रोपागंडाला जास्त डोके न चालविता बळी पडतात. (सध्या बागुलबुवा वातावरण बदलाचा आहे आणि तो सुद्धा तितकाच दांभिक पणाचा आहे).
लोकसंख्या वाढीचे परिणाम समजण्यासाठी भौतिक शास्त्र किंवा जीवशास्त्र पूर्णपणे निरर्थक आहे. त्यासाठी अर्थशास्त्र समाजणे जरुरीचे आहे. ह्या संदर्भांत अमेरिकेतील १९८० मधील सायमन-एहरलीच हि पैज वाचणे मनोरंजक ठरेल. तर अर्थतज्द्न्य जुलिअन सायमन आणि जीवशास्त्री पॉल एहरलीच ह्यांच्यात एक मोठी जाहीर पैज लागली. १९६८ साली पॉल ह्यांनी पॉप्युलेशन एक्सप्लोजन नावाचे एक भयंकर प्रसिद्ध पुस्तक लिहिले. त्यांच्या मते लोकसंख्या वाढ तात्काळ थाम्बवली नाही तर जगांत प्रचंड अन्न कमतरता होऊन कोट्यवधी लोक मरणार होते. ह्या पुस्तकाने खळबळ माचवली आणि ह्यांच्या नादाला लागून गोऱ्या लोकांनी मुले निर्माण करणे कमी केले (ज्याची फळे ते आज भोगत आहेत). भारत, चीन आणि अनेक देशांनी जास्त विचार न करता विविध योजना राबवून लोकसंख्या वाढ म्हणजे जणू काही भस्मासुर आहे असा प्रोपागंडा निर्माण केला.
ज्युलियन सायमन ह्यांनी त्यांची हि भविष्यवाणी साफ खोटी ठरणार आहे असे जाहीर रित्या प्रकाशित केले आणि १० हजार डॉलर्स ची जाहीर पैज लावली. पैजेच्या नुसार ज्युलियन ह्यांचे म्हणणे होते कि बहुतेक संसाधनाचा तुटवडा तर असणार नाहीच पण वर तीच संसाधने स्वस्त सुद्धा असणार आहे. १९९० साली जुलिअन सायमन हे पैज सहज, म्हणजे अगदी मोठ्या फरकाने जिंकले. त्या दहा वर्षांत जगाची लोकसंख्या सुमारे ८०० दशलक्ष वाढली पण जे ५ धातू त्यांनी निवडले होते त्यांची किंमत बऱ्यापैकी कमी झाली होती.
लोकसंख्या वाढीचे काहीच वाईट परिणाम आहेत असे नाही. लोकसंख्या वाढीचे अनेक वाईट परिणाम आहेत. पण जगांत नक्की किती लोक असायला पाहिजेत हे सुद्धा कोणीही निर्धारित करू शकत नाही. बहुतेकांना लोकसंख्यावाढीचे वाईट परिणाम दिसतात पण त्याचे असंख्य चांगले फायदे दिसत नाहीत. लोकसंख्या कमी झाली तर हे अनेक फायदे गायब होतीलच पण त्या फायद्यांना आम्ही मुकलो आहोत हे सुद्धा समजणार नाही.
सोपे उदाहरण घेऊया. पोलिओ ची लस हि आमच्या साठी वरदान ठरली आहे ह्यांत काहीच दुमत नाही. अक्षरशः कोट्यवधी मुलांचा जीव ह्या लसीने वाचवला आहे. पण फक्त लसच नाही तर अनेक औषधे निर्माण झाली आहेत त्यामुळे आम्हा सर्वांचेच जीवन जास्त सुखकर झाले आहे. तर हि औषधे कशी निर्माण होता ? अक्षरशः हजारो लोकांचे परिश्रम ह्यांत गुंतले असतात. जगाच्या पाठीवर जितके जास्त डॉक्टर, संशोधक आहेत तितकी जास्त औषधांचा शोध लागतो. आज देशाची लोकसंख्या ७ अब्ज ऐवजी ४ अब्ज असती तर मार्केट मधील अनेक औषधें गायब झाली असती. पण मी फक्त औषधांचे उदाहरण दिले आहे. सॉफ्टवेर पासून, टीव्ही वरील विविध चॅनेल पर्यंत अनेक गोष्टी गायब झाल्या असत्या आणि आम्हा सर्वांचा जीवनमानाचा स्तर खूपच खाली गेला असता.
तुमहाला आवडत असलेली कुठलीही गोष्ट घ्या. समजा तुम्हाला तुमचा फोन आवडतो. ह्या फोनच्या निर्मितीसाठी हजारो पेटंटन्स लागली आहेत आणि अक्षरशः लक्षावधी विविध छोटे छोटे शोध अनेक लोकांनी निर्माण केले आहेत. आणि ह्यांत जो एकूण मानवी वेळ गेला आहे त्याची जर बेरीज केली तर कदाचित कोट्यवधी मनुष्य-तास त्या फोन चा शोध लावण्यासाठी खर्च झाले आहेत. समजा देशाची लोकसंख्या अर्धी असती तर तितके मनुष्यतास खर्च होण्यासाठी दुप्पट वेळ लागला असता आणि फोन आपल्या हाती येण्यासाठी २०२० ऐवजी कदाचित २०४० वर्ष लागले असते.
अर्थानं त्याच तर्काने आम्ही असे म्हणू शकतो कि जगाची लोकसंख्या फक्त ७ अब्ज असल्याने आज आमच्या हातात अश्या अनेक गोष्टी नाहीत ज्या कदाचित २०५० मध्ये आमच्या हाती असतील. आज जगाची लोकसंख्या १४ अब्ज असती तर कदाचित आणखीन अजब साधने आणि तंत्रज्ञान आमच्या हाती असते.
> अहो पण लोकसंख्या अशीच वाढत राहिल्यास पर्यावरणाचे काय ?
हा मुद्दा अनेक लोक वर काढतात आणि काही प्रमाणात तो रास्त सुद्धा आहे. पहिली गोष्ट म्हणजे जसे जीवनमान उंचावते आणि लोक जास्त काळ जगू लागतात त्याच वेळी लोकांना मुलें नकोशी होतात. आमच्या आजोबांच्या काळी खाण्यापिण्याचे वांधे होते त्यामुळे लोक दिवसभर काबाडकष्ट करायचे आणि रात्रभर प्रजनन करायचे. महिलांची अवस्था फक्त चूल आणि मूल अशी होती. पण त्यांची चूक नव्हती. रात्री आणखी करणार काय ? मग ४०-५० वर्षांत हृदयविकाराचा झटका वगैरे येऊन मृत्यू.
आता जीवनमानाचा स्तर उंचावलाय. गर्भनिरोधक आल्याने शरीरसुख घेता येते आणि प्रजनन रोखता येते. रोमान्स ची व्याख्या रुंदावलीय. आता जोडपी चित्रपट पाहतात, दिनार करतात, कुठे फिरायला वगैरे जातात. पुस्तके वाचतात आणि नेटफ्लिकस पाहतात. त्याशिवाय प्रत्येक वेळी फिरायला वगैरे जाताना लक्षांत येते कि जास्त मुले म्हणजे खूपच जास्त खर्च त्यामुले फार तर एक दोन मुले खूप होतात. ह्यामुळे आपसूकच जन्मदर खालावत जातो. ह्या दृष्टिकोनातून कर्वे हे खूपच दूरदर्शी आणि विद्वान होते.
मुले जास्त जन्माला घालण्याचे एक कारण म्हणजे मुले मारण्याचे प्रमाण सुद्धा खूप होते. आता ते कमी झाल्याने वंशाला एक दिवा असला तरी पुरतो मोठी माळ लावायची गरज नाही. परंपरागत घरे आता बंद पडत आहेत. बापाने बांधलेल्या घरांत मुलें राहू इच्छित नाहीत म्हणून "वंशाचा दिवा" हि सुद्धा जास्त डिमांड नसलेली गोष्ट झालीय.
मुलांच्या संगोपनाचा मार्जिनल खर्च आणि लोकसंख्या वाढीचा दर हि दोन महत्वाची व्हेरिएबल्स अर्थतज्ञ पाहतात आणि दोन्ही मध्ये खूपच जास्त संबंध आहे. आणि ह्या संबंधाने मानवी लोकसंख्या चादर पाहून हात पसरेल ह्यांत मला तरी अजिबात शंका वाटत नाही.
मुलांच्या संगोपनाचा मार्जिनल खर्च :
मार्जिनल खर्च ह्याचा अर्थ प्रत्येक ऍडिशनल मुलाच्या संगोपनासाठी खर्च किती येतो. एका मुलाचा खर्च प्रचंड असतो. कारण मूल नाही तर माता काम करू शकते. एक मूल झाले आणि तिने नोकरी सोडली तर ते पैसे येणे बंद होतात आणि त्यामुळे तो मुलाच्या संगोपनाचा खर्च ठरतो. पण एकदा नोकरी सोडल्यानंतर तिला २ मुले झाली तर त्या दुसऱ्या मुलाचा मार्जिनल खर्च खूपच कमी असतो. (एका मुलासाठी ३ लक्ष वर्षाला खर्च येतो तर दोन मुलांसाठी ३.५ लक्ष खर्च येतो इत्यादी).
जुन्या खाली हा मार्जिनल खर्च खूपच कमी असायचा कारण बहुतेक खर्च हा फक्त अन्नाचा असायचा. आता तुम्ही दुबईला किंवा किमान खंडाळ्याला जाता तर सुद्धा तिकिटाचा खर्च प्रत्येक मुलांमागे होतो तो फार असतो. ४ मुले झाली तर मग तुम्हाला ५ सीटर गाडी सुद्धा चालत नाही.
जसे जसे जीवन मान उंचावते तसे तसे मार्जिनल खर्च हा खूपच वेगाने वाढतो. मुलाला विदेशांत शिकायला पाठवायचे तर ५० लक्ष रुपये पाहिजेत. दोन मुले झाली तर मग १ कोटी. पण गरीबाच्या घरांत हे प्रश्न नसतात.
पण खर्च वाढतो म्हणजे नक्की काय होते ? माणसाला जगांत फक्त दोनच खर्च असतात. एक खर्च असतो ऊर्जेचा दुसरा खर्च असतो दुसऱ्या माणसाच्या वेळेचा. (आयफोन पासून कांदे बटाटे पर्यंत तुम्ही काहीही विकत घेतले तर तुम्ही फक्त ऊर्जा आणि दुसऱ्या लोकांचा वेळ ह्या दोनच गोष्टींचा मोबदला देत असता. समजा ह्या दोन गोष्टी अपरंपार आणि फुकट असत्या तर आयफोन आणि कांदे बटाटे ह्यांची किंमत सुद्धा शून्य असती.). खर्च वाढतो ह्याचा अर्थ तुम्ही जास्त ऊर्जा आणि मानवी वेळ खर्च करत आहात असा होतो. आपण पर्यावरणाच्या नावाने बोंब मारतो तेंव्हा पर्यावरणाला होणारी हानी हि १००% ऊर्जा ह्या एका संसाधना द्वारे तुंबलेली जाऊ शकते. पण ऊर्जा महाग असल्याने आम्ही ती हानी अन-डू करू शकत नाही. जर पर्यावरणाची हानी वाढत गेली तर ऊर्जेचा दर सुद्धा वाढत जातो आणि आणि त्यामुळे मुलांच्या संगोपनाचा मार्जिनल खर्च.
त्यामुळे हि दोन्ही व्हेरिएबल्स एकमेकांना बॅलेन्स करतात. पण ऊर्जा हि काळाचा ओघांत स्वस्त होत गेली तर लोकसंख्या सुद्धा वाढत जाते आणि पर्यावरणाला हानी सुद्धा होत नाही. ह्या दोन्ही व्हेरिएबल्स मधील गणिती संबंध तसा स्पष्ट पणे अभ्यासाने कठीण आहे कारण लोकसंख्या वाढली कि हे लोक नवीन शोध लावून ऊर्जेचा दर आणखीन कमी करतात.
टीप : युनायटेड नेशन्स किंवा विविध तद्न्य मंडळी जगाची लोकसंख्या सुमारे २०५० मध्ये स्टेबल होईल असे भाकीत करत आहेत. मला त्यांत शंका वाटते. पहिली गोष्ट म्हणजे माझ्या मते ऊर्जेचा खर्च येत्या २० वर्षांत १०० पटीने कमी होणार आहे. बहुतेक ऊर्जा फ्युजन सेल द्वारे किंवा इतर कुठल्या नवीन शोधांतून निर्माण होईल आणि त्यानंतर सर्वच जीवनावश्यक वस्तूंचा भाव कमालीचा पडणार आहे. ऊर्जा स्वस्त आणि मुबलक होताच, शेती, पिण्याचे पाणी वगैरे गोष्टींचा काहीही तुटवडा असणार नाही त्याशिवाय कार्बन एमिसशन वगैरे उलट करणे सहज शक्य होणार आहे. कदाचित IVF वगैरे प्रक्रिया खूपच सोप्या होऊन गरोदर न राहता सुद्धा मुले निर्माण करणे शक्य होईल आणि त्यामुळे कुठल्याही वयांत मुले निर्माण करणे शक्य होईल आणि कदाचित मंडळी जास्त मुले निर्माण करतील. अर्थांत मी हे भाकीत एखाद्या ज्योतिष्या प्रमाणे वर्तवत आहे.
टीप २ : जगांतील सर्व नैसर्गिक संसाधने हि अक्षय म्हणजे अनलिमिटेड आहेत. एकच असे संसाधन आहे जे अक्षय नाही आणि ते म्हणजे मानवी वेळ. हि संकल्पना बहुतेक इकॉनॉमिक्स च्या पुस्तकांत मंडळी गेलेली असते पण राजकीय कारणासाठी पाश्चात्य राष्ट्रांनी "लिमिटेड रिसोर्सिस" आणि "अनलिमिटेड रिसोर्सेस" किंवा "रिन्यूएबल ऊर्जा" आणि "नॉन रिन्यूएबल ऊर्जा" असल्या श्रेणी शाळांतून आम्हा मुलांच्या डोक्यांत घातल्या. हि विचारसरणी डाव्या लोकांची असून पाश्चात्य देशांतून आपल्या देशांत आली आहेत आणि त्यांत काहीही तथ्य नाही. हि गोष्ट बहुतेक लोकांना पचणार नाही किंवा पटणार नाही कारण ह्या प्रकारच्या प्रोपागंडावर आमच्या देशांत कुणीही प्रश्न विचारला नाही. कुणाला इंटरेस्ट असेल तर वेगळ्या लेखांत विस्ताराने लिहीन. प्रतिक्रिया किंवा खरडवहीवर लिहून कळवा.
हम्म
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
सहमत आहे
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
तेंव्हापासून आता लोकसंख्या
In reply to तेंव्हापासून आता लोकसंख्या by साहना
पुर्वी...
In reply to पुर्वी... by मुक्त विहारि
हम्म
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
तेच म्हणत आहे
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
@माईसाहेब
In reply to @माईसाहेब by उपयोजक
माहिती बद्दल धन्यवाद
छान
ओके ....
In reply to ओके .... by मुक्त विहारि
१००० होईल कि ५०० कोटी ठाऊक
In reply to १००० होईल कि ५०० कोटी ठाऊक by साहना
https://www.theguardian.com
In reply to १००० होईल कि ५०० कोटी ठाऊक by साहना
जितकी लोकसंख्या जास्त...
In reply to जितकी लोकसंख्या जास्त... by मुक्त विहारि
> 1000 कोटी जनतेला पुरेल,
In reply to > 1000 कोटी जनतेला पुरेल, by साहना
प्रति चौरस किलोमीटर मध्ये किती माणसे राहु शकतील?
In reply to जितकी लोकसंख्या जास्त... by मुक्त विहारि
> 1981 मध्ये मी डोंबिवली
In reply to > 1981 मध्ये मी डोंबिवली by साहना
तुम्ही सेकंदाला एक लोकल सोडली तरी,
चायनाने,
In reply to चायनाने, by प्रसाद_१९८२
सरकारी बाबू काही नवीन नियम
In reply to सरकारी बाबू काही नवीन नियम by साहना
कसले चुकीचे नियम ..?
In reply to कसले चुकीचे नियम ..? by चौकटराजा
लोकसंख्या वाढीच्या
In reply to कसले चुकीचे नियम ..? by चौकटराजा
परिणाम
In reply to चायनाने, by प्रसाद_१९८२
ती पाॅलीसी योग्य आहे ....
कंपू बाजी करणारे
In reply to कंपू बाजी करणारे by Rajesh188
केव्हां झाल ---- मुस्लिम समाज हा खूप प्रगत विचाराचा असून
In reply to कंपू बाजी करणारे by Rajesh188
इथे पाहण्यासारखे काहीही नाही
मुळात पूर्वी मुले हणजे
In reply to मुळात पूर्वी मुले हणजे by आनन्दा
DINK
मुस्लिम समाज मध्ये जास्तीत जास्त मुलांना जन्म देतात
In reply to मुस्लिम समाज मध्ये जास्तीत जास्त मुलांना जन्म देतात by Rajesh188
पॅरिस करारा मधून बाहेर
सहना यांच्याशी अजिबात सहमत
In reply to सहना यांच्याशी अजिबात सहमत by बाप्पू
गंगाधरच शक्तिमान आहे.
:=))
In reply to :=)) by सोत्रि
धागा सत्कारणी लागला ....
लोकसन्ख्या कमी करण्यासाठी
एक प्रश्न
In reply to एक प्रश्न by चंद्रसूर्यकुमार
सगळेजण याचा आधार घेतयात
In reply to सगळेजण याचा आधार घेतयात by आनन्दा
फक्त प्रॉब्लेम एकच आहे की
In reply to फक्त प्रॉब्लेम एकच आहे की by आनन्दा
स्टॅटिस्टिक्स मराठे
In reply to फक्त प्रॉब्लेम एकच आहे की by आनन्दा
+१ तुम्हाला ह्याचे मर्म समजले
In reply to एक प्रश्न by चंद्रसूर्यकुमार
हा बदलतो
In reply to एक प्रश्न by चंद्रसूर्यकुमार
उत्कृष्ट प्रतिक्रिया आहे.
In reply to उत्कृष्ट प्रतिक्रिया आहे. by साहना
उपप्रश्न
In reply to उपप्रश्न by चंद्रसूर्यकुमार
राहणीमान उंचावले तरी ....
In reply to उपप्रश्न by चंद्रसूर्यकुमार
आणखी थोडे
In reply to आणखी थोडे by चंद्रसूर्यकुमार
एक विनोद म्हणून सांगतो ...
In reply to एक विनोद म्हणून सांगतो ... by मुक्त विहारि
तंत्रज्ञान सुधारले तर
In reply to एक विनोद म्हणून सांगतो ... by मुक्त विहारि
> 1. तंत्रज्ञान कितीही
In reply to > 1. तंत्रज्ञान कितीही by साहना
1. खनिजे निर्माण होत नाहीत, तर फक्त साठे शोधले जातात ...
In reply to 1. खनिजे निर्माण होत नाहीत, तर फक्त साठे शोधले जातात ... by मुक्त विहारि
मूवी
In reply to 1. खनिजे निर्माण होत नाहीत, तर फक्त साठे शोधले जातात ... by मुक्त विहारि
मुद्दा
In reply to मुद्दा by चंद्रसूर्यकुमार
> लोकसंख्या वाढत राहावी असे
In reply to 1. खनिजे निर्माण होत नाहीत, तर फक्त साठे शोधले जातात ... by मुक्त विहारि
चक्रम (सर्क्युलर) वाद
In reply to चक्रम (सर्क्युलर) वाद by साहना
कोणे एके काळी....
In reply to > 1. तंत्रज्ञान कितीही by साहना
सोने निर्माण केले जाऊ शकते की शोधले जाऊ शकते ...?
In reply to सोने निर्माण केले जाऊ शकते की शोधले जाऊ शकते ...? by चौकटराजा
सौर ऊर्जा साठवता येते
In reply to > 1. तंत्रज्ञान कितीही by साहना
समुद्राच्या पाण्यातून सोने वेगळे करणे
In reply to समुद्राच्या पाण्यातून सोने वेगळे करणे by Rajesh188
अजुन एक
In reply to अजुन एक by Rajesh188
+१
In reply to उपप्रश्न by चंद्रसूर्यकुमार
> लोकसंख्या वाढल्यामुळे
In reply to > लोकसंख्या वाढल्यामुळे by साहना
काहि अंशी मान्य
In reply to काहि अंशी मान्य by अर्धवटराव
> बहुतांश लोक्स तंत्रज्ञानाचे
In reply to > बहुतांश लोक्स तंत्रज्ञानाचे by साहना
सरकारी हस्तक्षेप ह्यांत चांगल्या पेक्षा वाईट जास्त...
In reply to सरकारी हस्तक्षेप ह्यांत चांगल्या पेक्षा वाईट जास्त... by अर्धवटराव
काही गोष्टींच्या परिणामांचा आपण अंदाज लाऊ शकतो ...
In reply to काही गोष्टींच्या परिणामांचा आपण अंदाज लाऊ शकतो ... by मुक्त विहारि
अरेरे
In reply to > लोकसंख्या वाढल्यामुळे by साहना
काही पडलेले प्रश्न
In reply to काही पडलेले प्रश्न by चंद्रसूर्यकुमार
गरज ही शोधाची, जननी असते....
In reply to काही पडलेले प्रश्न by चंद्रसूर्यकुमार
@चंद्रसूर्यकुमार
In reply to उत्कृष्ट प्रतिक्रिया आहे. by साहना
अगदी चूक
In reply to अगदी चूक by चौकटराजा
विचार करण्या लायक प्रतिसाद आहे.
In reply to अगदी चूक by चौकटराजा
> रीही ते सक्तीचे असणारा
सुबत्ता व लोकसंख्या नियंत्रण
In reply to सुबत्ता व लोकसंख्या नियंत्रण by चौकटराजा
सहमत आहे
उत्तम विषय आणि बहुतांशी उत्तम
उत्तम चर्चा....
एक उपप्रश्न
In reply to एक उपप्रश्न by उपयोजक
शक्यता आहे
In reply to एक उपप्रश्न by उपयोजक
ह्याला कारण मुलींची कमतरता हे पण असावे
लोकसंख्या किती आहे हे जसे महत्वाचे आहे
इथे
In reply to इथे by Rajesh188
अगदी हाच प्रश्न
In reply to इथे by Rajesh188
Bull's Eye
In reply to Bull's Eye by मुक्त विहारि
लेखाचा रोख आठ दहा किंवा तीन
In reply to लेखाचा रोख आठ दहा किंवा तीन by गवि
बरोबर आहे. किमान १-२ लोकांना
In reply to बरोबर आहे. किमान १-२ लोकांना by साहना
अतिशय उत्तम चर्चा!
In reply to इथे by Rajesh188
कुणी तरी दूध पिण्याचे फायदे
In reply to कुणी तरी दूध पिण्याचे फायदे by साहना
राजेशचे लाॅजिक बरोबर आहे ....
In reply to राजेशचे लाॅजिक बरोबर आहे .... by मुक्त विहारि
१. सर्वानी असे केले पाहिजे.
In reply to १. सर्वानी असे केले पाहिजे. by साहना
नसबंदी शिवाय इतरही मार्ग असतात
In reply to १. सर्वानी असे केले पाहिजे. by साहना
थोडक्यात सांगायचे तर,
In reply to थोडक्यात सांगायचे तर, by मुक्त विहारि
काय संबंध?
In reply to काय संबंध? by आनन्दा
काही बाबतीत संबंध आहे
In reply to काही बाबतीत संबंध आहे by Rajesh188
योग्य उदाहरणे
In reply to काही बाबतीत संबंध आहे by Rajesh188
मुख्यमंत्रीसाहेब, तुम्हाला
In reply to मुख्यमंत्रीसाहेब, तुम्हाला by आनन्दा
आनंदा जी
In reply to आनंदा जी by Rajesh188
आपल्या लोकांच्या हातात काही देऊ नये ...
In reply to आनंदा जी by Rajesh188
राजेश यांच्या विधानाशी सहमत आहे !चक्क
In reply to राजेश यांच्या विधानाशी सहमत आहे !चक्क by चौकस२१२
सर्वसामान्य लोकांना, तारतम्यता नसते...
In reply to काय संबंध? by आनन्दा
शेवटचा भाग विनोद आहे का ?
In reply to शेवटचा भाग विनोद आहे का ? by शा वि कु
असे का वाटते?
In reply to असे का वाटते? by आनन्दा
सहमत आहे ....
In reply to असे का वाटते? by आनन्दा
सहमत आहे.
In reply to सहमत आहे. by उपयोजक
हेट द मॅन बेटर दॅन यु...
In reply to थोडक्यात सांगायचे तर, by मुक्त विहारि
जे काही मी वर लिहिले आहे
लेखाशी सहमत.
In reply to लेखाशी सहमत. by अमरेंद्र बाहुबली
नक्की का?
In reply to नक्की का? by मुक्त विहारि
होय
In reply to होय by अमरेंद्र बाहुबली
मग एक काम करशील का?
राजेश यांचे लॉजिक व चर्चा..
In reply to राजेश यांचे लॉजिक व चर्चा.. by चौकटराजा
तेच तर म्हणत आहे
In reply to तेच तर म्हणत आहे by मुक्त विहारि
> अफाट मुले असल्याने, ही
+१११
डोंबिवलीतले उदाहरण देतो
In reply to डोंबिवलीतले उदाहरण देतो by मुक्त विहारि
असे कसे??
In reply to असे कसे?? by बाप्पू
आपला प्रतिसाद उपरोधिक असला
In reply to आपला प्रतिसाद उपरोधिक असला by साहना
पूर्वी म्हणजे
In reply to पूर्वी म्हणजे by Rajesh188
शहरांपेक्षा
In reply to शहरांपेक्षा by मुक्त विहारि
असे असेल तर ओढा लागला असेल ना
In reply to असे असेल तर ओढा लागला असेल ना by साहना
:-))
In reply to :-)) by गवि
शहरांची आणि गावांची तुलना करता,
In reply to असे असेल तर ओढा लागला असेल ना by साहना
प्रत्येकाची मानसिक विचारसरणी वेगळी असते ....
In reply to आपला प्रतिसाद उपरोधिक असला by साहना
नाथा कामतचे एक वाक्य आहे....
लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम
लोकसंख्या नियंत्रण हा कायदा हवाच ...
In reply to लोकसंख्या नियंत्रण हा कायदा हवाच ... by मुक्त विहारि
न्यूनगंड
In reply to न्यूनगंड by शा वि कु
न्यूनगंड कशाला?
In reply to लोकसंख्या नियंत्रण हा कायदा हवाच ... by मुक्त विहारि
+१
या बाईंनी भारतावर
In reply to या बाईंनी भारतावर by उपयोजक
ती अज्ञानी आहे ....
In reply to ती अज्ञानी आहे .... by मुक्त विहारि
पण
In reply to पण by उपयोजक
गरिबीमुळे...
सध्या खुल्या गटातील विविध जाती
मला हे कळत नाही
In reply to मला हे कळत नाही by Rajesh188
पटत आहे
शाळेत असताना, म्हणजे २५
शाळेत असताना, म्हणजे २५
In reply to शाळेत असताना, म्हणजे २५ by सुचिता१
नक्कीच.
नाही बुवा नाही पटलं. हे
In reply to नाही बुवा नाही पटलं. हे by उगा काहितरीच
सहमत आहे
In reply to नाही बुवा नाही पटलं. हे by उगा काहितरीच
उगा काहितरीच
In reply to उगा काहितरीच by उपयोजक
पण एखादा आतंकवादी तयार झाला तर?
In reply to पण एखादा आतंकवादी तयार झाला तर? by मुक्त विहारि
आतंकवादी पेक्षा "विकृत
In reply to पण एखादा आतंकवादी तयार झाला तर? by मुक्त विहारि
अन्याय अत्याचार चे प्रमाण वाढले
In reply to नाही बुवा नाही पटलं. हे by उगा काहितरीच
> दर १०००० व्यक्तिमागे १
आपण कुठे रहाता ?
In reply to आपण कुठे रहाता ? by सामान्यनागरिक
सुयोग्य प्रतिसाद
In reply to सुयोग्य प्रतिसाद by मुक्त विहारि
यामागे केवळ वाढती लोकसंख्या हेच कारण नाहि
In reply to आपण कुठे रहाता ? by सामान्यनागरिक
नैसर्गीक साधन संपत्ती
In reply to नैसर्गीक साधन संपत्ती by प्रकाश घाटपांडे
सहमत आहे
In reply to आपण कुठे रहाता ? by सामान्यनागरिक
> नैसर्गीक साधन संपत्ती