Skip to main content

बेळगाव आणि कर्नाटक: सध्याच्या घटना

लेखक उपयोजक यांनी शुक्रवार, 20/11/2020 20:03 या दिवशी प्रकाशित केले.
बेळगाव आणि आजूबाजूचा कर्नाटकात समाविष्ट असलेला सीमाभाग मराठीबहूल असल्याने महाराष्ट्रात समाविष्ट करावा ही मागणी बर्‍याच वर्षांपासून होत अाहे.त्यासाठी वेळोवेळी आंदोलने,मारामार्‍या होत असतात. पण गेल्या काही दिवसातल्या सीमाभागातल्या बातम्या/घडामोडी पाहिल्या तर बेळगाव नि सीमाभाग महाराष्ट्रात जाऊ नये यासाठी कर्नाटकने कंबर कसून तयारी केल्याचे दिसत आहे.सीमा आंदोलनातले एक शहर ही बेळगावची अोळख पुसून एक मोठे आणि विकसित शहर बनवून तिथे कन्नडिगांना बहुसंख्येने वसवून सीमाभागात मराठीभाषिकांना अल्पसंख्यक करणे हा उद्देश दिसतो आहे.मुंबईसारख्या मराठीभाषिक महाराष्ट्राच्या राजधानीत मराठीबाबत अौदासीन्य असणारा मराठी माणूस दक्षिणेत सीमाभागात मात्र मराठीसाठी दमदारपणे आजही खिंड लढवत आहे.बेळगाव वेगाने मोठे आहे पण त्यावर भाषिक सत्ता कोणाची राहणार की असेच द्वंद्वयुद्ध सुरु राहणार हे येणारा काळच ठरवेल. काळ्या दिनाची बातमी http://www.belgavkar.com/newsnetwork.php?newsId=6188&tblId=6188 हा एक वेगळाच इश्यु http://www.belgavkar.com/newsnetwork.php?newsId=6202&tblId=6202 बेळगावात भुमिगत गॅस लाईन.अद्याप शेजारच्या कोल्हापूरात किंवा सांगलीतही हे झालेले नाही. http://www.belgavkar.com/newsnetwork.php?newsId=6296&tblId=6296 सीमाभागात कन्नडची सक्ती http://www.belgavkar.com/newsnetwork.php?newsId=6334&tblId=6334 बँक कर्मचार्‍यांना कन्नडची सक्ती http://www.belgavkar.com/newsnetwork.php?newsId=6417&tblId=6417 कर्नाटकात मराठा विकास प्राधिकरण. कर्नाटकात मराठा समाजाची लोकसंख्या भरपूर आहे. http://www.belgavkar.com/newsnetwork.php?newsId=6468&tblId=6468 कर्नाटकात मराठा प्राधिकरणाला कन्नडिगांचा विरोध http://www.belgavkar.com/newsnetwork.php?newsId=6490&tblId=6490 सीमाभाग महाराष्ट्रात आणू - अजित पवार http://www.belgavkar.com/newsnetwork.php?newsId=6508&tblId=6508 अजित पवारांच्या वक्तव्याचा निषेध http://www.belgavkar.com/newsnetwork.php?newsId=6514&tblId=6514 मराठा प्राधिकरणाला विरोध दर्शवण्यासाठी ५ डिसेंबरला कर्नाटक बंद http://www.belgavkar.com/newsnetwork.php?newsId=6515&tblId=6515 बेळगावात १०० एकर जागेत मेगा डेअरी http://www.belgavkar.com/newsnetwork.php?newsId=6525&tblId=6525 बेळगाव जिल्हा विभाजनाची मागणी http://www.belgavkar.com/newsnetwork.php?newsId=6550&tblId=6550

वाचने 34419
प्रतिक्रिया 77

प्रतिक्रिया

In reply to by सुखीमाणूस

भारतीय म्हणून कोणतीच बंधन नकोत. सर्वांना रोजगार व्यवसाय साठी देशभर फिरण्याची मुफा असावी . देशभर एकच सोयीची भाषा असावी जेणे करून देश एक राहील ,भक्कम होईल. हे सर्व योग्य च आहे आणि ह्या मता शी सहमत पण आहे. पण प्रतेक गोष्टीला काही तरी मर्यादा नक्कीच असते मर्यादा ओलांडली गेली की सकरतमक स्थिती निर्माण न होता विपरीत परिस्थिती निर्माण होते. अगदी पोष्टीक म्हणून प्रमाण च्या बाहेर काजू बदाम खाल्ले तर शरीरात रोग निर्माण होतात . आणि अगदी तसेच झाले आहे यूपी,बिहार,झारखंड,ह्या राज्यातून प्रचंड प्रमाणात लोक स्थलांतरित होत असून ते महाराष्ट्र मध्ये येवून स्थायिक होत आहेत . आणि त्याचा विपरीत परिणाम महाराष्ट्र वर होत आहे .पुढे राज्य संकटात सापडू शकते. महाराष्ट्र पाठोपाठ गुजरात,कर्नाटक,तमिळ nadu, punjab,haryana, दिल्ली ह्यांची त्याच दिशेने वाटचाल चालू आहे. सर्व राज्यात ह्या अनियंत्रित स्थलांतर विषयी रोष निर्माण होत आहे. पंजाब,गुजरात,तमिळ nadu,asam मध्ये लोकांनी रस्त्यावर येवून विरोध केला आहे. तरी डोळे उघडणार नसतील तर पुढे स्थिती नक्कीच गंभीर वळण घेईल. आणि जो पर्यंत स्थिती गंभीर होत नाही तो पर्यंत तिकडे दुर्लक्ष करायचं हा आपला ,भारतीय लोकांचा विशेष खास गुण आहे.

*बेळगाव : Belgaum लिहल्याने आणि बॅनरवर कन्नड नसल्याने जप्तीची कारवाई* ९/१२/२० बेळगाव : एका फलकावर इंग्रजीत बेलगाम असे लिहिले होते. त्याचा पोटशूळ उठलेल्या कथित कन्नड नेत्याच्या सांगण्यावरून आणि Facebook वरील विरोधामुळे महापालिकेने फलक जप्त केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. शहरात एका मंगल कार्यालयात आयोजित खाजगी कार्यक्रमाची माहिती देणारा इंग्रजी भाषेतील फलक विनायकनगर गणपती मंदिराच्या मागे लावण्यात आला होता. त्यावर Belgaum असे इंग्रजीत लिहिले होते. पण, भाषाव्देषाने पछाडलेल्या एका कन्नड नेत्याने याबाबत महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांच्याकडे तक्रार केली. त्यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांनी तो फलक ताब्यात घेतला. लोकभावना लक्षात न घेता बेळगावचे नामांतर करण्यात आले आहे. या नामांतराला मराठी जनतेचा तीव्र विरोध आहे. इंग्रजीत Belgaum असे लिहिण्यात येते. राजकीय पक्ष सोयीची भूमिका घेतात. मराठी लोकांत बेळगाव असा आणि कन्नड लोकांत बेळगावी असा उल्लेख करतात. एकीकडे कानडीकरणाचा फतवा काढणे, भाषिक अल्पसंख्याकांचे हक्क डावलणाऱ्या मराठीव्देष्ट्ये आणि प्रशासनाला आता इंग्रजीमधील बेलगामही खुपू लागले आहे. त्यातूनच मंगळवारी विनायकनगरातील इंग्रजी भाषेतील फलक हटवण्यात आला आहे.

कर्नाटक सरकारची दडपशाही; निवडणूकीचे अर्ज मराठीतून देण्यास नकार. बेळगाव : ग्रामपंचायत निवडणुकीचे अर्ज कन्नडमधून दिले जात असल्याने मराठी भाषकांची अडचण होत आहे. निवडणुकीचे अर्ज मराठी भाषेतून मिळावेत, तो आमचा हक्क आहे . यासाठी आज शुक्रवारी (4 डिसेंबर) सकाळी 11 वाजता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा निर्णय तालुका म. ए. समितीच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला . तसेच, निष्ठावंत कार्यकर्त्यांनाच समितीचे तिकीट देण्याचे ठरले. कार्याध्यक्ष मनोहर किणेकर अध्यक्षस्थानी होते . येत्या ग्राम पंचायत निवडणुकीसाठी अर्ज व इतर माहिती मराठीतून उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी माजी आमदार मनोहर किणेकर यांनी तहसीलदारांकडे केली होती. मात्र तहसीलदारांनी फक्‍त कन्नडमधूनच अर्ज व माहिती पाठविण्यात आली आहे. त्यामुळे मराठीतून अर्ज देता येणार नाही अशी दर्पोक्‍ती केली आहे. याबाबत मराठी भाषिकांमधून तिव्र नाराजी व्यक्‍त होत आहे. मराठीतून अर्ज व माहिती मिळालीच पाहीजे अशी मागणी जोर धरु लागली आहे. सीमाभागात मराठी भाषिकांची संख्या मोठ्‌या प्रमाणात आहे. त्यामुळे निवडणुकीबाबतची माहिती मराठीतून देणे आवश्‍यक आहे. याबाबत माजी आमदार किणेकर यांनी तहसीलदारांना निवडणुक जवळ आली आहे. त्यामुळे मराठीतून माहिती देण्याबाबत विचारणा केली असता सरकारच्या आदेशाप्रमाणे फक्‍त कन्नडमधूनच माहिती दिली जाईल असे सांगत उडवाउडवी करण्याचा प्रयत्न केला, तसेच यावेळी फक्‍त कन्नडमधून माहिती आली आहे. असे सांगत तहसीलदारांनी सरकारची री ओढण्याचा प्रयत्न करीत जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिला तर बघू असे सांगण्याचा प्रयत्न केला. याबाबत किणेकर यांनी तहसीलदारांना चांगलेच धारेवर धरले व दरवेळी प्रमाणेच यावेळी मराठीतून अर्ज देणे आवश्‍यक असून ते द्यावेच लागतील असे स्पष्टपणे सांगितले. प्रशासनाला सीमाभागात मराठी भाषिकांची संख्या अधिक प्रमाणात आहे. याची जाणीव असून देखील सातत्याने मराठी भाषिकांचे हक्‍क डावलण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जातो. तसेच मराठी भाषिकांच्या मतांवर निवडून गेलेले लोकप्रतिनिधीनी मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाबाबत एक शब्दही उच्चारत नाहीत. उलट सरकारची बाजू घेण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यामुळे मराठी भाषिकांकडे मतांचा जोगवा मागणाऱ्या लोकप्रतिनिधीला दूर ठेवणे आवश्‍यक आहे. तसेच ग्राम पंचायत निवडणुकीत सर्रास जागांवर समितीचा भगवा फडकविने आवश्‍यक आहे. तरच अन्याय करणाऱ्या कर्नाटकी सरकारला सणसणीत चपराक बसणार असल्याच्या भावना नागरिकांतून व्यक्त होत आहेत. मराठीतून अर्ज देण्याबाबत तहसीलदारांशी संपर्क साधला होता. मात्र दरवेळी प्रमाणेच उडवा उडवीची उत्तरे देण्यात आली आहेत. मात्र मराठीतून माहिती मिळावी यावर आम्ही ठाम असून मराठी भाषिक बहुसंख्येने असुनही कशा प्रकारची दुय्यम वागणूक दिली जाते, याचा विचार सीमावाशीयांनी करणे आवश्‍यक आहे. -मनोहर किणेकर, माजी आमदार कार्याध्यक्ष म. ए. समिती

हिंदीची जबरदस्ती नको - हे बरोबर आहे. माझ्या ओळखीच्या बहुतांश मध्यमवर्गीय शहरी मराठी लोकांच्या घरात फक्त काम करायला येणार्‍या लोकांशीच ( भांडी/धुणी करायला येणारे, माळीकाका इ.) मराठीतून बोलतात. मराठी बोलणं कमी दर्जाचं समजतात. तुटक-फुटकं हिंदी किंवा इंग्रजी बोलण्यात धन्यता मानतात. आणि त्यांच्याशी मराठीतून बोलायचा प्रयत्न केल्यास उत्तरं हिंदी, इंग्रजीतूनच मिळतात. प्रत्येक वाक्याच्या शेवटी 'यू नोम व्हॉट आय मिन ना..' असं अगम्य काहीतरी बोलतात. पालकांचीच अशी अवस्था तर मुलांकडून काय अपेक्षा ठेवणार. त्यापेक्षा मला मातृभाषेचा अभिमान असणारे दक्षिण - उत्तर भारतीय आवडतात

In reply to by पुष्करिणी

अहो हे तर काहीच नाही. हुच्चभ्रू मराठी मंडळी तर श्वानाशी देखील आंग्ल भाषेत बोलतात. आत्ता बोला !

मी आणि माझा मराठी नसलेला मुस्लिम मित्र आणि 2 मराठी च व्यक्ती नी टॅक्सी शेअर केली होती ते दोघे मराठी असून हिंदी मध्ये बोलत होते आणि माझा मित्र मराठी नसून आम्ही दिघे मराठीच बोलत होतो . त्यांनी मला ते बोलून दाखवले मी मराठी नसून मराठी मध्ये बोलत आहे आणि हे दोघे मराठी च असून हिंदी बोलत आहेत.

In reply to by Rajesh188

असे तर ऑफिस मधे खुपदा पाहीलेले आहे. त्याला कारण इतर लोक मराठी ला "downmarket" समजतात असे काही मराठी लोकांनाच वाटते.