Skip to main content

कोविड१९ : व्याप्ती आणि भवितव्य

लेखक हेमंतकुमार यांनी शुक्रवार, 31/07/2020 12:15 या दिवशी प्रकाशित केले.
करोना सार्स २ - धडकी भरवणारे विचित्र शब्द ! या विषाणूने कोविड१९ची महासाथ घडवली. आपल्या सर्वांच्या आयुष्यातील एक अभूतपूर्व घटना. तिच्या उगमाला सात महिने उलटले तरी अजूनही तिची घातकता जाणवतेच आहे. या विषयावर आतापर्यंत मी इथे दोन धागे असे प्रकाशित केलेत: १. हात, जंतू, पाणी आणि साबण २. कोविड१९ घडामोडी : समज,गैरसमज. वरील दुसर्‍या धाग्यावर बरीच साधक-बाधक चर्चा झालेली आहे. तिथल्या प्रतिसादांची संख्या आणि मजकूर एव्हाना विस्तृत झाला आहे. त्याला अनुसरून काही वाचक मित्रांनी अशी सूचना केली, की आता यावर नवा धागा उघडावा. त्यास मान देऊन हा धागा चालू करतोय. आपल्या सर्वांच्या सहभाग आणि प्रोत्साहनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !

वाचने 107712
प्रतिक्रिया 243

प्रतिक्रिया

साधारण एक महिन्याने जरूर भेटा. भेटताना सुरक्षित अंतर आणि दोघांनी मुख्यपट्ट्या लावायच्या, ही काळजी अधिक महत्त्वाची.

आताच सहयाद्री वाहिनीच्या बातम्या पाहिल्या. संपूर्ण बातम्या होईपर्यंत निवेदिकेचे तोंड पूर्ण मोकळे असते. बातम्या संपताना त्या कोविड विरोधी त्रिसूत्रीचे आवाहन करतात. ते करत असतानाच त्या तोंडावर पट्टी व्यवस्थित बांधून घेतात. मगच बातम्या संपतात. सुरेख लोकशिक्षण ! अभिनंदन !

होय, त्यात तथ्य आहे. १. सध्या युरोप-अमेरिकेत दुसरी लाट तेजीत आहे २. आजारी लोकांना लवकर रोगमुक्त करायला प्रभावी औषधाची गरज आहे; अजून ती भागलेली नाही ३. प्रतिबंध त्रिसूत्री अजूनही दीर्घकाळ महत्वाची आहे पण लोक बेफिकीर होताहेत ४. लसीकरण यशस्वी व व्यापक व्हायला बराच काळ जाईल. तोपर्यंत रोगप्रसार चालू राहतो ५. अंशतः रोगनियंत्रण होत राहिले तरी २०२१ देखील झगडण्यात जाईल हा अंदाज.

https://www.loksatta.com/desh-videsh-news/who-suspends-remdesivir-from-… ज्या औषधाच एव्हढा बोलबला होता , काळाबाजार होत होता असेही ऐकले होते , त्या औषधा बद्दल आता ही बातमी. सामान्य लोकांनी कोणावर विश्वास ठेवावा.

सौम्य ते मध्यम कोविड झालेल्या रुग्णांच्या उपचारासाठी Regeneron कंपनीच्या दुहेरी अँटिबॉडी उपचारास अमेरिकी औषध प्रशासनाने मान्यता दिली आहे. ही मान्यता 'तातडीचे उपचार' (EUA) या सदराखाली दिली आहे.

बातमी रोचक आहे. पण मुळात सामूहिक प्र-शक्ती कशी येईल यावर तज्ज्ञांचे उघड दोन गट पडलेत. १. ती नैसर्गिक आजारातून येईल : इथे मग टक्केवारीचे विविध आकडे येतात २. ती १ नुसार येणार नसून लसीकरणानेच येईल.

In reply to by हेमंतकुमार

डॉकजी, मला वाटते जर्मन लोकांचा मूळ रिपोर्ट बघणे श्रेयस्कर असावे कारण मराठी दैनिकाच्या वार्ताहराने कोणत्या आधारावर भारतातील वैविध्याशी संबंध जोडला ? महाराष्ट्रात आणि त्यातही मुंबईत कमी वैविध्यता होती का की म्हणून मुबंईत बराच पसरला. वृत्तपत्रिय वार्तांकने हेडलाईन बनवण्याच्या नादात मूळ रिसर्च रिपोर्टचे तीन तेराही करू शकतात.

वृत्तपत्रिय वार्तांकने हेडलाईन बनवण्याच्या नादात मूळ रिसर्च रिपोर्टचे तीन तेराही करू शकतात.
>>> + ११२२ या विषयातल्या पेपरच्या बातम्या मी गांभीर्याने घेत नाही. कोणी इथे विचारले तरच बघतो.

कोविड निदानासाठी प्रचलित RT-PCR या पद्धतीपेक्षा एक नवीन तंत्रज्ञान (RT-LAMP) आता भारतात उपलब्ध झाले आहे. पहिल्या पद्धतीपेक्षा त्याचे पुढील फायदे आहेत : १. या तंत्रात महागडी उपकरणे लागत नाहीत २. ३० मिनिटात निष्कर्ष हाती येतो. ३. संबंधित चाचणीची रसायने ४ डिग्री C तापमानात -म्हणजे साध्या फ्रिजमध्ये- ठेवता येतात. ४. यासाठी अतिकुशल तंत्रज्ञांची गरज नसते. ५. निष्कर्ष RT-PCR शी समकक्ष आहेत.

म मा, ICMR च्या प्रमाणीकरणानुसार नव्या पद्धतीची : १. सकारात्मक (+ve) निर्णयक्षमता १००% आणि २. नकारात्मक (-ve) निर्णयक्षमता ९९.३८% अशी आहे. म्हणजेच उत्तम. (https://www.thehindu.com/sci-tech/science/rt-lamp-a-new-technology-for-…)

साखळी तुटली, तर प्रत्येकाला करोनाची लस देण्याची गरज नाही -आयसीएमआर बातमी

ममा संसर्ग साखळीचा अर्थ असा असतो: समजा एक व्यक्ती बाधित आहे. तिच्यापासून दुसरी, पुढे दुसरी पासून तिसरी अशा तऱ्हेने साथ पसरत जाते. आता हे पसरण्याचे मार्ग आपल्याला माहित आहेतच. ते म्हणजे बाधित व्यक्तीच्या शिंकणे, खोकणे इत्यादीतून बाहेर पडलेले सूक्ष्मकण इतरांपर्यंत पोहोचणे. जर आपण प्रतिबंध-त्रिसूत्री व्यवस्थित अमलात आणली तर ही साखळी तुटू शकते. म्हणजेच, आपल्या जवळपास जरी बाधित व्यक्ती असली तरी तिच्यापासून आपल्याला होणारा संसर्ग रोखता येतो.

किती काळ याचे उत्तर तज्ञ समितीने अभ्यास करून द्यावयाचे असते. सध्या तरी तसे काही मार्गदर्शक तत्त्व प्रसिद्ध झालेले दिसत नाही. माझ्या मते अजून पाच सहा महिने तरी ते पाळावे असे वाटते.

In reply to by हेमंतकुमार

एक शंका अशी आहे की, ज्या वेळेस कडक टाळेबंदी होती, म्हणजे लोक बाहेर फिरु शकत नव्हते, एक मेकांना भेटु शकत नव्हते तेंव्हाच का नाही ही साखळी तुटली. आता टाळेबंदीत खुप शिथीलता आहे, दिवाळीत तर खुपच गर्दी झाली होती , त्याचे फोटोही वर्तमान पत्रात छापुन आले , पण रुग्णवाढ मात्र कमी आहे . असे का ?

आतापर्यंतच्या माझ्या अभ्यासानुसार काही शक्यता व्यक्त करतो. ( याला अंतिम उत्तर समजू नये) १. कडक टाळेबंदीच्या काळात रोगजंतू ‘खूप जोरात’ होता. तेव्हा बहुसंख्य लोकांमध्ये त्याच्या विरोधी अँटीबॉडीज निर्माण झालेल्या नव्हत्या. तेव्हा अल्प संपर्कही रोग फैलावत राहिला. २. पुढे जंतूमध्ये जनुकीय बदल झाले. त्याचा संसर्ग क्षमतेवर काही परिणाम झाला असावा. ३. अजून पुढच्या टप्प्यात लोकांमध्ये वाढत्या प्रमाणावर अँटीबॉडीज निर्माण होत राहिल्या. त्यातून समूह प्रतिकारशक्तीही वाढत राहिली.

In reply to by हेमंतकुमार

ओके. म्हणजे हर्ड ईम्युनिटी काम करतेय असे तुम्हाला वाटते का?? आणखी एक प्रश्न. एकदा कोरोना होऊन गेल्यावर पून्हा होईल का?? आजवरची आकडेवारी काय सांगते?

. म्हणजे हर्ड ईम्युनिटी काम करतेय असे तुम्हाला वाटते का? >>>
होय काही प्रमाणात नक्की करते आहे. २.
एकदा कोरोना होऊन गेल्यावर पून्हा होईल का?? >>>
होय, पुन्हा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आकडेवारी बाजूला ठेवू. मुद्दा असा आहे, की संसर्गनंतर ज्या अँटीबॉडीज शरीरात निर्माण होत आहेत, त्या किती काळ संरक्षण देतील यावर एकमत नाही. जनुकीय बदल झालेल्या नव्या स्वरूपातील विषाणूने संसर्ग केल्याचे थोडेफार वृत्तांत वाचण्यात आले आहेत.

In reply to by हेमंतकुमार

काही दिवसांपूर्वी कोरोनाची दुसरी लाट येणार म्हणत panic केलं .आता म्हणत आहेत लवकर साखळी तुटू शकते.विश्वास कशावर ठेवावा? एवढ्या लवकर हर्ड इम्युनिटी येऊ शकते? लंडन मधील लसीबद्दल माहिती असेल तर नक्की द्यावी

इंग्लंडमधील लस
ही लस Pfizer ची असून तिची वैशिष्ट्ये : • शुद्ध लस; टिकाऊ • RNA प्रकारची. • साठवणीसाठी उणे ७० C तापमान आवश्यक • २ डोस ; २१ दिवसांच्या अंतराने • प्रयोगादरम्यान ती ६५ वयावरील गटात ९४% उपयुक्त ठरली आहे. • लस देण्यासाठी प्राधान्यक्रम ठरला आहे. त्यात वृद्धाश्रमातील लोक, ८० वयावरील लोक आणि नंतर आरोग्यसेवकांचा क्रम आहे.

सोपे तर्कशास्त्र आज भारतात ९0 लाख लोकांची चाचणी पॉझिटिव्ह आहे. प्रत्येक सकारात्मक चाचणी केलेल्या प्रकरणामागे चाचणी न केलेले ९ लोक असतात. म्हणजेच आपल्याकडे आतापर्यंत ९ कोटी व्यक्ती कोव्हीड झालेल्या आहेत. लस येईपर्यंत हि संख्या 10 कोटीच्या वर असेल लसीचा एक डोस फक्त २०० रुपये आहे असे गृहीत धरू (अंदाजे- कमीत कमी ) यात 100 / - रुपये शुद्ध नफा म्हणून देईल. कल्पना करा की दर 3 महिन्यांनी हि लस परत परत द्यावी लागली तर दर तीन महिन्यांनी लस बनवणाऱ्या कंपन्यांना 1000 कोटी नफा आहे. मग कोणती कंपनी असे रुग्ण सोडेल. तुम्हाला पुन्हा संसर्ग होउ शकतो अशी भीती घातली तर हे रुग्ण नक्की त्यांचे ग्राहक होणार आहेत. म्हणूनच सर्व *अभ्यास * असे दर्शवितो की प्रतिपिंडे 3 महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकत नाहीत. सात महिने प्रतिपिंडे टिकतात अशा अभ्यास निबंधाना प्रसिद्धी मिळत नाही The study revealed that 90 per cent of subjects have detectable antibodies up to seven months post contracting Covid-19. https://www.cidrap.umn.edu/news-perspective/2020/10/studies-show-long-t…. https://health.economictimes.indiatimes.com/news/diagnostics/antibodies…. Immunity to the Coronavirus May Last Years, New Data Hint https://www.nytimes.com/2020/11/17/health/coronavirus-immunity.html मी वैद्यकीय क्षेत्रातील सर्व दिग्गज आणि मान्यवर लोकांना हा प्रश्न विचारला आहे की जर मूळ कोविड 19 विषाणूमुळे संसर्ग झाला असताना रोग प्रतिकारशक्ती निर्माण होत नाही तर एक डीनेचर्ड किंवा लाइव्ह अटेन्युएटेड (लसीचा) व्हायरस यापासून तितकी चांगली रोगप्रतिकारक क्षमता कशी मिळू शकेल. म्हणजेच ज्यांना कोव्हीड झाला आहे त्यांची प्रतिकारशक्ती लसी मुळे निर्माण होणाऱ्या प्रतिकारशक्ती पेक्षा नक्क्कीच जास्त सरस असेल. आणि जर हा विषाणू दर काही महिन्यात उत्क्रांत होत असेल तर लस अगदीच निरुपयोगी ठरेल कारण त्या विषाणूचे विश्लेषण करून लस बनावे पर्यंत त्याची परत उत्क्रांती झालेली असेल. मुंबईतील सर्वच मोठ्या रुग्णालयांतील दिग्ग्ज वैद्यकीय तज्ञा कडून मला याचे उत्तर अजून मिळालेले नाही. बहुसंख्य डॉक्टर की लस उत्पादकांनी विणलेल्या मानसिक जाळ्यात अनवधानाने ओढले गेले आहेत का असा प्रश्न निर्माण होतो आहे. अशी वेळ आली आहे की डॉक्टरानी वेळेत जागृत होणे आवश्यक आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की क्षयरोग प्रतिपिंडे संसर्गापासून आपले संरक्षण करीत नाहीत परंतु आपण प्रतिकारशक्ती प्राप्त करतो. कसे? सीएमआय cell mediated immunity (टी पेशींद्वारे पेशी द्वारे असणारी प्रतिकारशक्ती) . एकही लस उत्पादक सीएमआय बद्दल बोलत नाही. का? ते सीएमआयवर आधारित लस तयार करू शकत नाहीत. डॉक्टर अनवधानाने कम्पन्यांच्या सूरात गाणे गात आहेत का अशी शंका येत आहे ? आपण डॉक्टरांना एकदा कोव्हीड झाल्यानं पुन्हा संसर्ग होऊ शकेल अशी भीती पसरवत असलेले मी पहात आहे. भारतात खात्रीलायक पुनसंसर्गाची (reinfection) किती प्रकरणे आहेत? तीन भारतात आतापर्यंत एकंदर संसर्ग झालेले रुग्ण किती ९० लाख. म्हणजे पुनः संसर्गाची प्रकरणे किती ३० लाखात एक रस्त्यावर मरण्याची आपली शक्यता किती आहे (अपघात) 1: 10000. मग ही भीती मानसिक( भयगंड) नाही का ?.

In reply to by सुबोध खरे

ICMR: 3 cases of coronavirus re-infection in India, 24 globally The Indian Council of Medical Research (ICMR) on Tuesday said at least three cases of Covid-19 re-infection have been reported from across the country so far, whereas 24 such cases have been found globally. https://health.economictimes.indiatimes.com/news/diagnostics/icmr-3-cas…