✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

शिवसेनेचे हे काय चाललय

व
विजुभाऊ यांनी
Wed, 09/09/2020 - 13:12  ·  लेख
लेख
मुंबईत ज्या पद्धतीने महापालीकेने कंगना राणावतचे घर पाडले तोडफोड केली त्या वरून शिवसेनेला राजकारणापेक्षा रस्त्यावर मारामार्‍या कर्‍अण्यातच जास्त रस आहे असे दिसतेय. एक क्षण असे समजूया कंगना ने घरात परवानगीशिवाय बांधकाम केले होते. मात्र हायकोर्टाच्या कोविड च्या काळात डिसेंबर पर्यंत कोणतीही तोडफोड करू नये अशा आदेशानंतरही महापालीकेने तोडफोड केली. कंगना घरात नसताना तीला नोटीसीला उत्तर देण्यासाठी वेळही न देता ही कारवाई केली गेली. ते देखील ती मुंबई मधे नसताना. मुंबई महापालीकेला कंगना च्या घरात बाथरून च्या जागी ऑफीस केले ही बातमी मिळते मात्र वांद्रे स्टेशनच्या बाहेरच्या पाच पाच मजली अनधिकृत झोपड्या कधीच दिसत नाहीत. मुंबई महापालीकेला कंगनाच्या घरावर ज्या तातडीने कारवाई करता आली तितकी तातडी महापालीका रस्ते दुरुस्तीबाबतीत , स्वच्छतेबाबत का दाखवत नाही. शिवसेनेचे म्हणणे आहे की ही कारवाई शिवसेनेने नाही तर मुंबई महापालीकेने केली आहे. शिवसेनेला अशी स्वतंत्र कारवाई करायचा काय अधिकार आहे का? दुसरे म्हणजे महापालीकेतली शिवसेना ही वेगळी शिवसेना आहे का? शिवसेना ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळत आहे. ते पहाता स्टॅलीन च्या दडपशाही ची आठवण होते. या सगळ्या प्रकरणात मविआ चे सर्वेसर्वा तथाकथीत जाणते राजे सोयीस्करपणे मुग गिळून बसलेत. बी एम सी ही एक सरकारी संस्था आहे. त्यांनी केलेल्या कोर्टाच्या आदेशा विरुद्ध जाऊन अनधिकृत कारवाई च्या विरोधात कोर्टात दाद मागितली तर अधिकार्‍यांवर काही कारवाई होईल असे नाही. त्यामुळे अधिकारी निर्धास्त आहेत. त्यामुळे त्यांना जनतेवर अन्याय करायला परमीट मिळाले आहे असे दिसतेय शिवसेनेचे हे नक्की काय चालले आहे तेच समजत नाही. ते स्वतःच्या हातानेच स्वतःचे भवितव्य खणून काढताहेत
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
108944 वाचन

💬 प्रतिसाद (293)

प्रतिक्रिया

हो

सॅगी
Sun, 09/13/2020 - 17:56 नवीन
पण बहुमत युतीला असताना आघाडीवाल्यांच्या पाया पडून दिवसाढवळ्या सत्तेची चोरी केली हे सुचवायचे होते. बाकी तुमच्या मतांशी सहमत आहेच..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी

छान

Gk
Sun, 09/13/2020 - 20:27 नवीन
सुरुवात तर फडणवीसने केली पार्टनरला सत्तेत वाटा दिला नाही ( आणि हे म्हणे तुम्हाला 15 लाख देणार ) राष्ट्रवादी हा दुसरा पार्टनर निवडला. मग तीच खेळी सेनेने केली , पण इथे निदान मुमं पदाबाबत तरी एकवाक्यता आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सॅगी

छान

सॅगी
Sun, 09/13/2020 - 21:43 नवीन
पार्टनर आता सत्तेत येउन काय उजेड पाडतोय ते दिसतंच आहे....बरं केलं सत्तेत वाटा दिला नाही ते... आणि कमवा की १५ लाख तुमचे तुम्हीच? कोणी अडवलंय??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Gk

हं

Gk
Mon, 09/14/2020 - 07:11 नवीन
फडणवीस बिहारला गेले , भाषण द्यायला व चिठ्ठ्या वाटायला . आता 5 वर्षात बिहारचा ब्रिस्बेन होईल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सॅगी

हं

सॅगी
Mon, 09/14/2020 - 07:37 नवीन
चांगलंच आहे की मग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Gk

Bjp आनि bjp समर्थकांनी हाच

गणेशा
Mon, 09/14/2020 - 08:56 नवीन
Bjp आनि bjp समर्थकांनी हाच अहम बाजूला ठेवला पाहिजे कि सेनेने रडत खडत त्यांच्या मागुन आलेच पाहिजे होते.. जर युती धर्म पाळायचा असला तर तो दोघांनी पाळला पाहिजे.. आणि सेनेचे पुन्हा शुन्य येतील कि जास्त हे जनता उत्तर देईलच. पण त्यांनी भाजपाने जसे म्हणेल तसेच वागले पाहिजे हा अहम कशा साठी? युती करायला bjp च गेली होती ना मातोश्री वरती? त्या आधी शिवसेना वेगळी लढलेली होतीच ना? कितीदा तेच तेच.. म्हणे ओरबाडून, मग कर्नाटक, गोवा येथे ओरबाडलेली नाही का सत्ता bjp ने? आणि काँग्रेस ची लोकं फोडून भर करोना काळात सत्तेचेच डोहाळे मध्य प्रदेश मध्ये लागलेले होतेच कि.. आणि महाराष्ट्राचे बोलायचे झाल्यास, काँग्रेस बरोबर हातमिळवणी शिवसेनेची चूक.. किंवा जूने शिवसैनिक दुखावलेत वगैरे.. मग ज्या राष्ट्रवादीला, काँग्रेस ला भ्रष्ट म्हणताना हयात घालवली, त्यांनाच आपल्या पक्षात घेऊन उमेदवारी दिल्याने जूने bjp समर्थक दुखावलेत असे का नाही? किती तरी उमेदवार हे मूळचे काँग्रेस राष्ट्रवादी चे होते, मग ते चालते का? अजित पवार बरोबर युती करून, एका दिवसात 9 केसेस बंद केल्यात bjp ने त्याचे काय? तेंव्हा कोणी दुखावत नाही..? त्यामुळे स्वतः नीट असल्यास bjp आणि समर्थकांनी इतरांना बोलावे. नाही तर त्यांनी तरी विकासावर प्रश्न विचारावेत.. उजेड कोणीच पाडला नाहि.. 2014 ला कुठे नेहून ठेवला महाराष्ट्र माझा, यातल्या प्रश्नांची उत्तरे 2019 ला निवडणुकीला सामोरे जाताना bjp का देऊ शकली नाही, ह्याचे आपण का काही पाहत नाही? 2019 ची महाराष्ट्र निवडणूक काश्मीर 370 मुद्दयांवर लढवायची काय गरज होती? असो..असे अनेक मुद्दे आहेत.. आजकाल लोकांनी एका पक्षाची पालखी वाहायची ठरवलेली असल्याने त्यांना दुसरे चूकच दिसतात, जे चूक ते चूक, जे बरोबर ते बरोबर हा सारासार विचार जो पर्यंत जनता करणार नाही, तो पर्यंत bjp, सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर या असल्या अंध समर्थकांना पुढे रेटून आपल्याला जे पाहिजे तेच करत राहणार.. असो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सॅगी

उकरलाच आहे तर

चौकस२१२
Mon, 09/14/2020 - 08:16 नवीन
जुना वाद उकरलाच आहे तर आम्ही पण त्या गावघाणीत लोळून घेऊ म्हणतो... "पार्टनरला सत्तेत वाटा दिला नाही " म्हणजे मुमु पद ना? अरे तुमचे ५६ आणि भाजपचे १२० मग मुमु कसे रे मिळणार...नुसत्या डरकाळ्या का गणित चंद्रावर शिकला ? मग धूर्त काकांनी शिवसेनेचा वाघ ( म्याव करणारा) सोन्यताईंकडे घेऊन नेला आणि "मांडवली केली" ( मध्यलामध्ये पुतण्याने का "रात्रीस खेळ केला " आणि त्याला फडणवीसांपासून मोदी आणि शहा कसे तयार झाले/ गंडले हे २१ वय शतकातले एक गूढ कधी कळणार कोन जाणे.. काकांचीच फूस असे म्हणतात तर असा तमाशा ते करतील असे वाटत नाही...त्यांना भाजपला बाहेरून पाठिंबा देणे तर सहज शक्य होते मग सोनोयताईंचे तोंड पण बघावे लागले नसते पण त्यांनी तसे का केले नाही? खरंच पुतण्याने काकांचा मामा ( १-२ दिवन्संपुरता ) केला काय ?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Gk

????

शा वि कु
Mon, 09/14/2020 - 08:48 नवीन
आरोप काय होते हे बघण्याचे तरी कष्ट घ्या बचावला येण्यापूर्वी ! "२.५ वर्ष सेनेचा मुख्यमंत्री असेल, असे अमित शहांनी वचन दिले होते" असा आरोप आहे सेनेचा. त्यात ५६ आणि १२० चा काय हो संबंध ? (आता सेना खोटारडी आणि फडणविस/शहा खर्रेखुर्रे असलं काही नका सांगू. आपल्याला खरं काय माहित नाही हेच खरं आहे.) नाही तुम्हाला तुमच्या पूजनीय नेत्यांचे रक्षण करायचे आहे जरूर करा, पण उगाच उसना आवेश आणून काहीही बोलू नका. बादवे, शिवसेनेचा वाघ म्याव करतो म्हणजे काय ? गुरकावता पाहिजे म्हणजे काय ? हि आताची तोडफोड आणि हाणामारी गुरकावत्या वाघाचीच लक्षणे आहेत. सो मेक अप योर माईंड. हे जे चाललंय ते हवं का नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

"भाजप ने लाज सोडली हे मान्य"

चौकस२१२
Mon, 09/14/2020 - 09:15 नवीन
अहो आंधळा बचाव नाही करत आहे, औटघटकेचा सरकार बनवताना "भाजप ने लाज सोडली हे मान्य" करूनच बोलतोय.. ते चुकलंच त्यांचं घाणेरडे वागले ( अजित पवार काय वागले त्या पातळीवर भाजपने कशाला जायचा?).. बाकी मी पाहिलेलंय लोकशाहीत तरी १२०/५६ अश्या परिस्थिती १२० चाचा मुख्य असतो हे साधा गणित आहे. अमित शहाणी खरंच अशी ग्वाही दिली होती का? आणि हे सगळं उघड आधी ठरतेआणि जनतेला कळवले असते ( परिपक्व लोकशाहीत) शिवसेनेला काह्ही करून आपणच मुख्य हे करायचे होते..... आपण तर बुवा सेनाला १० पैकी २ भाजपला १० पैकी ४ आणि द्यायचेच तर राष्ट्रवादीला १० पैकी ७ गन देणार ( ७ एक तर आलेली साधनही त्यांनी वापरली.. त्यात काही चूक नाही निर्लज्ज पण असेल तर तो हाच कि दगाबाजी करणाऱ्याला परत उपमुख्यमंत्रीपद दिला.. पण राष्ट्रवादी पक्ष कुठाय ते तर एक घराणं मग केला पुतण्याला माफ.. जनतेचा काही संबंध नाही ) सेनायचवागाह्चे म्याऊ चा अर्थ असा कि "स्वबाल वैगरे" गर्जणारा वाघ शेवटी काँग्रेस चाय साथीत गेलं म्हणून म्याऊ....उपहासात्मक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शा वि कु

स्पष्ट व्हिडीओ

कपिलमुनी
Mon, 09/14/2020 - 10:32 नवीन
शाह समोर उठा स्पष्ट बोलले होते , की निम्मा वाटा म्हणजे सर्व पदाचे समसमान वाटप ! पूर्वी इथं व्हिडीओ पण डकवले होते, तेव्हा भक्त गण गायब झाले होते. बहुधा गणेशा च्या धाग्यावर चर्चा झाली होती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

नशीब राज्याचं

चौकस२१२
Mon, 09/14/2020 - 14:57 नवीन
युती मध्ये जपर्यंत आमूलाग बदल होत नाही तोपर्यंत धाकटा भागीदार मोठा भहगीदार हे असणारच १९२३ पासून असलेली एक युती मला माहित आहे ती कधी देशाच्या सत्तेत आली कधी नाही पण फुटली नाही आणि असा तमाशा करून तर नाहीच पण ती भारताबाहेरील आहे त्यामुळे उगाच " भारताशी काय संबंध" हे ऐकायला नको म्हणून सोडून देऊ... अर्थात जगातील संसदीय लोकशाही या व्याप्तीत बोलायचे तर ते उदाहरण बघू शकतो जाऊदे याचा परिणाम दोन्ही पक्षांवर होणार (राऊतांसारख्यांची दिव्य विधाने ऐकून सेनेचा सच्चा विचारवंत पाठीराखा सुद्धा तोंड लपवून बसलेला असेल ) आणि फायदा पवार कुटुंबाचा होणार हेच दिसतंय.. नशीब राज्याचं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

ओरबाडून घेतलेली सता हे काय असते

Rajesh188
Sun, 09/13/2020 - 18:14 नवीन
ज्या पक्षाकडे बहुमत त्याची सत्ता हाच नियम आहे. ज्या उमदेवराला निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवार पेक्षा जास्त मतं मिळतील तो आमदार. मग ती मत कशी मिळवली हे बघितल जात नाही ओरबाडून घेतली की दम देवून की खोटे बोलून. आपल्या आमदार होण्याच्या पद्धतीत च दोष आहे . त्या मुळे ओरबाडून सत्ता मिळवली असे नाही म्हणता येणार.
  • Log in or register to post comments

खरे आहे, कायदा हे बघत नाही,

आनन्दा
Mon, 09/14/2020 - 06:53 नवीन
खरे आहे, कायदा हे बघत नाही, पण मतदार बघतो, त्यामुळे दूरगामी राजकारण करणारे तात्कालिक फायद्यासाठी इतके रसातळाला जात नाहीत.. आज सत्ता आहे, 5 वर्षांनी काय? राष्ट्रवादीकडे त्यांचे बालेकिल्ले आहेत, तुमच्याकडे आहेत का? आता बदलत्या परिस्थितीत एकटे लढून मनसेपेक्षा अधिक जागा तरी येणार का तुमच्या?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

युती केल्याशिवाय bjp ला रोकता येणार नाही

Rajesh188
Mon, 09/14/2020 - 12:14 नवीन
He सत्य तिन्ही पक्षाला माहीत आहे. तिन्ही पक्षा ना सामान मुद्ध्य वर एकमत घडवून सामान कार्यक्रम ठरवून निवडणुकी ला सामोरे जावे लागेल. सेने ला हिंदुत्व सोडून देण्या शिवाय पर्याय नसेल. आणि हिंदुत्व च सोडले तर सेनेत वेगळे असे काही राहणार नाही.भूमिपुत्र च्या भूमिकेला राष्ट्रवादी पाठिंबा देईल पण काँग्रेस देणार नाही. Bjp barobar यूती होती तेव्हा सेने नी भुमिपत्र फर्स्ट ही भूमिका सोडून दिली होती..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

छान

Gk
Sun, 09/13/2020 - 20:25 नवीन
https://youtu.be/dTXVy-84XMA यु ट्यूबवर अनेक ज्योतिषी महाराअष्टर सरकार पडावे अशी इचछा व्यक्त करून सरकार पडणार अशी भविष्यवणीही करत आहेत गम्मत म्हणजे हे बहुतांश भविष्य पंडित महाराष्ट्राबाहेर रहात असावेत असे वाटते
  • Log in or register to post comments

सरकार

माईसाहेब कुरसूंदीकर
Mon, 09/14/2020 - 07:52 नवीन
सरकार पडण्याची शक्यता कमी पण शिवसेना नेते असाच मूर्खपणा करत राहिले तर सरकार पडायला वेळ लागणार नाही. ह्याचे सर्वात टेन्शन आहे ते कॉन्ग्रेसला. ज्या पक्षाला 'कम्युनल' म्हणत आलो त्याच पक्षाशी युती करावी लागली. सोनिया गांधींचा सेनेशी युती करायला अगदी टोकाचा विरोध होता पण नाईलाजाने त्यानी मान्यता दिली. गेल्या महिन्याभरात सोनियानी थोरात्/पृथ्विराज वगैरे नेत्यांची शाळा घेतली असणार हे नक्की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Gk

सरकार पडण्यास ही योग्य वेळ आहे का

Rajesh188
Mon, 09/14/2020 - 11:38 नवीन
जास्त च संकट आली तर मुख्यमंत्री राजीनामा देतील मुख्यमंत्री चा राजीनामा म्हणजे सरकार चा राजीनामा . तेव्हा केअर taker म्हणून उद्धव जी मुख्यमंत्री राहतील जो पर्यंत नवीन निवडणुका होत नाहीत. किती आमदार आपली आमदारकी पणाला लावायला तयार आहेत? आता निवडणुका झाल्या तर bjp निवडून येण्याची शक्यता किती आहे. तशी शक्यता नसेल तर bjp च सरकार पडून देणार नाही. किंवा मुख्यमंत्री राजीनामा देतील इथ पर्यंत तानानार नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

राज्यपाल ना सरकार बरखास्त करण्याचा चान्स च देणार नाहीत.

Rajesh188
Mon, 09/14/2020 - 11:41 नवीन
अगोदर च मुख्यमंत्री राजीनामा देवून पेच निर्माण करतील. जाणता राजा असलेले पवार साहेब सर्व खेळी खेळण्यात आणि योग्य वेळ ओळखण्यात तरबेज आहेत. त्या मुळे सरकार ची चिंता करू नका. राहील का जाईल ते.
  • Log in or register to post comments

सगळं पवारसाहेबच करणार असतील

कानडाऊ योगेशु
Mon, 09/14/2020 - 13:15 नवीन
सगळं पवारसाहेबच करणार असतील तर शिवसेनेचे स्वतःचे अस्तित्व (हिंदीमधेय वजूद) ते काय उरले.? असेच चालु राहिले तर शिवसेना राष्ट्रवादीची बी टीम ठरेल. आताही तेच होते आहे. स्वतःचा फायदा जिथे आहे तिथेच सल्ले द्यायचे व जिथे आवश्यक आहे पण फायदा नाही तिथे मीठाची गुळणी धरायची असेच धोरण पवारसाहेबांचे राहिलेले आहे. राऊतांनी घेतलेल्या हास्यास्पद मुलाखती पाहिल्यावर तर हे प्रकर्षाने जाणवतेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

महाराष्ट्र भाजप

गामा पैलवान
Mon, 09/14/2020 - 13:34 नवीन
गणेशा,
मग ज्या राष्ट्रवादीला, काँग्रेस ला भ्रष्ट म्हणताना हयात घालवली, त्यांनाच आपल्या पक्षात घेऊन उमेदवारी दिल्याने जूने bjp समर्थक दुखावलेत असे का नाही?
अगदी नेमका प्रश्न आहे. मी कट्टर शिवसैनिक असूनही माझ्या मते देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्रास लाभलेले सर्वोत्तम मुख्यमंत्री आहेत. पण महाराष्ट्र भाजप विषयी लोकांना विश्वास वाटंत नाही. खडसे भ्रष्ट व तोंडाळ आहेत म्हणून त्यांना घरी बसवलं. ठीके. मग अजित पवार काय धुतल्या तांदळासारखे आहेत काय? अजित पवारांचं जाउद्या. चंद्रशेखर बावनकुळे तर भाजपचे एकनिष्ठ, स्वच्छ व कार्यक्षम मंत्री होते ना? त्यांना का घरी बसवलं? गडकरींशी जवळीक म्हणून? चंद्रकांत पाटील पुण्यात कशाला उभे राहिले? कोल्हापुरात भाजपविरोधी लाटबिट अजिबात नव्हती. या अशा कारणांपायी महाराष्ट्र भाजप विषयी मला भरवंसा वाटंत नाही. आ.न., -गा.पै. तळटीप : शिसेनेनेही भाजपप्रमाणे स्वकीयांचं खच्चीकरण केलंय. प्रताप सरनाईक व विजय शिवतरे ही नावं चटकन आठवली. या दोघांना (व अशांसारख्या इतरांना) उद्धव ठाकऱ्यांनी जाहीर दिलासा द्यावा अशी एक आरामखुर्चीतील कट्टर शिवसैनिक या नात्याने मी मागणी करतो.
  • Log in or register to post comments

माझ्या ऐकीव माहितीप्रमाणे

राघव
Mon, 09/14/2020 - 19:03 नवीन
माझ्या ऐकीव माहितीप्रमाणे बावनकुळेंनी शहांच्या मर्जीतल्या व्यक्तीचं घोडं अडवलं. त्यामुळे मग वेळ आली तेव्हा स्कोर सेटल करण्यात आलेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा

Rajesh188
Mon, 09/14/2020 - 13:49 नवीन
प्रशासकीय सेवेतील मित्र न बरोबर च्या चर्चेत काही मुध्ये माहीत पडले. त्यांच्या मता नुसार. Bjp सरकार निर्णय घेताना विचारपूर्वक पूर्वक घेत नव्हती. एकदा निर्णय घेतला तो निर्णय आमलात आणण्यासाठी नियम ठरले की सरकार अमलबजावीसाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांना निर्देश देत असे. नियमाची पूर्तता करून अमलबजाणी ची वेळ वेळ आली नी नियमात बदल करून प्रशासनाच्या मेहनतीवर पाणी सोडले जायचे परत नवीन नियम परत फिरून सर्व नवीन नियमात बसवणे चालू असले प्रकार bjp च काळात खूप झाले. सत्ता कशी रबाबवावी ह्या विषयी mature पना नसणे किंवा अनुभव नसणे त्या मुळे असा प्रकार घडत असाव. काँग्रेस ,राष्ट्रवादी अनेक वर्ष satte वर असल्यामुळे त्यांच्या कडून हा प्रकार घडत नाही. सेना तर फर्स्ट टाइम lead rol मध्ये आहे सरकार मध्ये त्या मुळे थोडे बावरत आहेत . चुका करत आहेत.
  • Log in or register to post comments

असे

माईसाहेब कुरसूंदीकर
Mon, 09/14/2020 - 15:00 नवीन
असे काही नसते रे राजेशा. बाकीच्या राज्यांत सरकारे चालतातच की. आणि १९४७ साली नेहरूना काय अनुभव होता ? आंबेडकराना काय अनुभव होता ? लाल बहादूर शास्त्रिना काय अनुभव होता ? लोकप्रतिनिधी आहात, निवडून आला आहात. हाताशी सुविधा आहेत. बदलणारे वातावरण समजत नसेल,लोकांच्या अपेक्षा काय आहेत हे समजत नसेल तर सरळ राजीनामा द्यावा. कोणत्याही पक्षाचा असो मग तो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

माई साहेब

Rajesh188
Mon, 09/14/2020 - 15:26 नवीन
मी प्रशासन ला सरकार कसे अडचणीत आणत होते हे सांगितले आहे. त्या मुळे सरकारी निर्णयाची अंमबजावणी ला वेळ लागला . देवेंद्र जी च्या काळात. आत्ताचे ताजे उदाहरण देतो. कर्ज चे हफ्ते corona काळात स्थगित ठेवले जातील असे आदरणीय पंतप्रधान जाहीर पण म्हणजे तसे घडले का ? कारण तसे सरकारी आदेश निघाले नाहीत. जे भाड्या नी राहतात त्यांचे भाडे मालकांना मागता येणार नाही असे आपले आदरणीय पंतप्रधान म्हणाले त्या नुसार त्यांनी योजना बनवून मालकांना आर्थिक मदत देण्याचे आदेश दिले का? कंपन्यांनी कामगार ना corona काळात पगार द्यावा आणि कोणाला ही नोकरी वर काढू नये असे आपले आदरणीय पंतप्रधान म्हणाले. सर्रास लोकांना कामावरून काढले गेले.लोकांना पगार दिले गेले नाहीत. आपले आदरणीय पंतप्रधान आहेत राजकीय नेत्यांसरखे त्यांना बोलता येणार नाही त्यांचे वाक्य ,वाचन हा सरकारी निर्णय समजलं जातो मग ते सर्रास खोटे का बोलले ...ते जे बोलले त्याची अंमलबावणी सरकार म्हणून नियमात बसते का ,सरकार ला तो अधिकार आहे का . हे त्यांना एकतर माहीत नाही किंवा ते खोटे बोलण्यात mahir आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

-१

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 09/14/2020 - 16:07 नवीन
खरे तर या धाग्यावर प्रतिसाद लिहायचा नव्हता पण वरील प्रतिसादातली काही विधाने खटकली म्हणून लिहिणे भाग पडले...
कर्ज चे हफ्ते corona काळात स्थगित ठेवले जातील असे आदरणीय पंतप्रधान जाहीर पण म्हणजे तसे घडले का ? कारण तसे सरकारी आदेश निघाले नाहीत.
अशा सुचना आल्या आहेत, व त्याची अंमलबजावणी सुध्दा झाली आहे ( मी स्वतः आमच्या कंपनीतल्या काही कामगारांना हप्ते स्थगित करुन घेण्या साठी मदत केली आहे.
कंपन्यांनी कामगार ना corona काळात पगार द्यावा आणि कोणाला ही नोकरी वर काढू नये असे आपले आदरणीय पंतप्रधान म्हणाले. सर्रास लोकांना कामावरून काढले गेले.लोकांना पगार दिले गेले नाहीत
. सरकार ने अशा प्रकारच्या सुचना सुध्दा जारी केल्या होत्या (माझ्या माहितीतल्या सर्व कंपन्यां मधे याची अंमलबजावणी झाली आहे) कोरोनाच्या आधी किती कामगार होते व आता किती आहेत अशा प्रकारची माहिती सुध्दा कामगार आयुक्तांनी मागितली होती. घरभाड्या बद्दल माहित नाही, कदाचित असतीलही. साधारण अशा प्रकारचे आदेश कायदा करुन / बदलुन देता येत नसावेत म्हणून ते मार्गदर्शक सुचनांच्या स्वरुपात दिले गेले होते. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

मुख्यमंत्र्याच्या विरोधात व्हिडिओ पत्रकाराला मारहाण

कपिलमुनी
Mon, 09/14/2020 - 15:41 नवीन
मुख्यमंत्र्याच्या विरोधात व्हिडिओ केला पोस्ट, पत्रकाराला बेदम मारहाण
  • Log in or register to post comments

योगी नी

Rajesh188
Mon, 09/14/2020 - 15:54 नवीन
Bjp चे मुख्यमंत्री योगी ह्यांनी नवीन force तयार केली आहे.. आणि बिना warrant , Bina चोकशी ,कोणत्या ही व्यक्ती ला अटक करण्याचे अधिकार त्यांना दिले आहेत. तिकडे जरा लक्ष ध्या हिटलर पण वर स्वर्गात लाजला असेल योगी चे निर्णय ऐकून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

बाकी चालू द्या

सॅगी
Mon, 09/14/2020 - 16:14 नवीन
त्रिपुराचे भाजपा प्रवक्ते नंबेदु भट्टाचार्य यांनी हे आरोप फेटाळून लावले. त्यांनी या घटनेचा निषेध केला असून पोलीस योग्य तपास करत आहेत, असं सांगितले.
मारहाणीचा निषेधच आहे, पण प्रवक्त्यांनी "स्वाभाविक प्रतिक्रीया" म्हणून हात झटकलेले नाहीत हेही नसे थोडके......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

आणि हा आहे फरक

सॅगी
Mon, 09/14/2020 - 16:27 नवीन
मर्यादा सुटणारच/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

.

Gk
Tue, 09/15/2020 - 22:16 नवीन
डोलकर शर्मा भाजपात सामील मर्चंट नेव्ही म्हणजे मराठीत डोलकर ना ?
  • Log in or register to post comments

सुप्रीम कोर्टाने थोबाड फोडले

Gk
Fri, 10/16/2020 - 17:58 नवीन
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. दिल्लीमधील तीन व्यक्तींकडून ही याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकेत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची तसंच उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वातील महाविकास आघाडी सरकार बरखास्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. याचिका फेटाळताना सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांना चांगलंच फटकारलं आहे. सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी याचिका फेटाळताना तुम्ही राष्ट्रपतींकडे विचारणा करु शकता असं सांगितलं. “देशाचे एक नागरिक म्हणून तुम्हाला राष्ट्रपतींकडे अर्ज करण्याचं स्वातंत्र्य आहे,” असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं. यावेळी त्यांनी “तुम्हाला माहित तरी आहे का, महाराष्ट्र किती मोठे राज्य आहे?,” अशा शब्दांत याचिकाकर्त्यांना फटकारलं. वकील रिषभ जैन, गौतम शर्मा आणि सामाजिक कार्यकर्ते विक्रम गेहलोत यांच्याकडून याचिका दाखल करण्यात आली होती. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असल्याचा दावा त्यांनी याचिकेत केला होता. याचिकाकर्त्यांकडून सुशांत सिंह राजपूत मृत्यू, कंगनाच्या ऑफिसवरील कारवाई आणि माजी नौदल अधिकारी मदनलाल शर्मा यांना झालेली मारहाण या घटनांचा उल्लेख करण्यात आला होता. https://www.loksatta.com/maharashtra-news/supreme-court-dismisses-plea-seeking-imposition-of-president-rule-in-maharashtra-sgy-87-2303392/
  • Log in or register to post comments

न्यायालयाने योग्य निर्णय दिला

बाप्पू
Fri, 10/16/2020 - 18:44 नवीन
न्यायालयाने योग्य निर्णय दिला. आणि त्याचे स्वागत. पण काही सदस्य (जसे राजेश188) इथे बोंब मारतात कि न्यायालय निष्पक्ष नाहीत, अराजक माजले आहे वगैरे वगैरे ते कुठल्या बिळात लपलेयत?? आपल्याला नावडता निर्णय आला कि लगेच न्यायव्यवस्थेवर अविश्वास दाखवून ढोल बडवायचे?? हा कोणता अजेंडा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Gk

याचिका मुळातच भम्पक होती.

सुबोध खरे
Fri, 10/16/2020 - 19:11 नवीन
याचिका मुळातच भम्पक होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Gk

शिवसेना

Ajit Gunjal
Fri, 10/16/2020 - 20:58 नवीन
Shivsena शिवसेना सरकार राज्यात चांगले काम करीत आहे,. कोविड सारख्या भयंकर आजारावर नियंत्रण आणण्याचे काम प्रामुख्याने शिवसेनेने केले आहे.
Latest Marathi News Live
  • Log in or register to post comments

कोविड सारख्या भयंकर आजारावर

सुबोध खरे
Sat, 10/17/2020 - 11:39 नवीन
कोविड सारख्या भयंकर आजारावर नियंत्रण आणण्याचे काम प्रामुख्याने शिवसेनेने केले आहे. ह ह पु वा विनोद चांगला होता अजून येऊ द्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Ajit Gunjal

धागा काढून दीड वर्ष झाले.

विजुभाऊ
Sat, 01/22/2022 - 11:00 नवीन
धागा काढून दीड वर्ष झाले. दरम्यानच्या कालात पुलाखालून आणि डोक्यावरून बरेच पाणी वाहून गेले. सेनेचे आणि राष्ट्रवादीचे काय झाले आहे ते जाहीर आहे. मात्र त्या दोघांपैकी कोणालाही काहीही फरक पडलेला नाहिय्ये.
  • Log in or register to post comments

ही कसली शिवसेना ? ही तर लांडी सेना...

मदनबाण
Sat, 01/22/2022 - 11:37 नवीन

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Tere Siva Jag Mein... :- Tadap
  • Log in or register to post comments

“अर्धी मुंबई हिंदी भाषेत

Trump
गुरुवार, 02/24/2022 - 19:07 नवीन
“अर्धी मुंबई हिंदी भाषेत बोलते”, गोरखपूरमधील प्रचारसभेत संजय राऊतांनी सांगितलं उत्तर प्रदेशसोबतचं ‘नातं’! https://www.loksatta.com/elections/shivsena-sanjay-raut-in-gorakhpur-up-elections-2022-claims-hindi-language-in-mumbai-pmw-88-2818253/
शिवसेना कोठे पोचली बघा.
  • Log in or register to post comments

केम छो वरली ....

मुक्त विहारि
Fri, 02/25/2022 - 07:30 नवीन
आणि आता गुल्टी आणि भय्ये अर्थात, काही मागुघपा जनतेला हे पचणे जरा अवघडच आहे ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Trump

वाघाची शेपटी

चौकस२१२
Fri, 02/25/2022 - 09:54 नवीन
पूर्ण पक्ष जर स्थानि कात यावर निर्माण झाला असेल तर त्याला पुढेच जाऊन राष्ट्रीय पक्ष होणे अवघड असते ! उदा द्रविड मुन्नेत काझघम ला हिमाचल मध्ये कोणी विचारेल का ! महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कोणी ओडिशात स्थान देईल का ! आणि सेनेची सध्याची केविलवाणी लाचारी दुसरे काय पूर्वी ऐकलेली म्हण शिवसेनेचाच वाघ ऐनवेळी आपली शेपटी कुठे घालेल सांगता येत नाही !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Trump

ऐनवेळी आपली शेपटी कुठे घालेल

सुबोध खरे
Fri, 02/25/2022 - 10:16 नवीन
ऐनवेळी आपली शेपटी कुठे घालेल मुळात आघाडी केली तेंव्हा पासून शेपटीदोन पायातच आहे. बाकी गुरगुरणे चालू असले तरी त्याला कोणीच भीक घालत नाही. नवाब मलिक यांचा राजीनामा मागण्याची हिम्मत श्री उद्धव ठाकरे दाखवतील काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

मुळात स्थानिक राजकीय पक्षांनी

sunil kachure
Fri, 02/25/2022 - 10:51 नवीन
राष्ट्रीय पातळीवर निवडणूक लढण्याचे कारण च नाही.राज्य पातळीवर चे प्रश्न राज्याचा विचार करूनच सोडवणे आणि राज्यातील लोकांस त्यांच्या होताच राजकीय पर्याय देणे . हाच मूळ हेतू स्थानिक पक्षाचा असतो. केंद्रात वर्चस्व निर्माण करण्यासाठी राष्ट्र पातळीवर निवडणुका लढण्याचे काही कारण नाही स्वतःच्या राज्यातील सर्व लोक सभेच्या जास्तीत जास्त जागा जिंकल्या तरी . केंद्र सरकार मधील अत्यंत महत्वाची बलाढ्य ताकत म्हणजे हे स्थानिक पक्ष च असतात. सेने नी राज्यात च लक्ष द्यावे. हिंदुत्व चा नाद सोडून द्यावा ते आरक्षण फक्त bjp लाच असू ध्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

सेनेने हिंदूत्वाचा नाद सोडला

अमरेंद्र बाहुबली
Fri, 02/25/2022 - 10:54 नवीन
सेनेने हिंदूत्वाचा नाद सोडला तर हिंदूंनी कुणाकडे पहायचे?? हिंदूंच्या हितीचं रक्षण करनारा दुसरा कुठलाही पक्ष भारतात नाही. भाजपचं म्हणाल तर त्यांचं हिंदूत्व फक्त सत्ता मिळवण्यासाठी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sunil kachure

खो खो खो

चंद्रसूर्यकुमार
Fri, 02/25/2022 - 11:31 नवीन
सेनेने हिंदूत्वाचा नाद सोडला तर हिंदूंनी कुणाकडे पहायचे?? हिंदूंच्या हितीचं रक्षण करनारा दुसरा कुठलाही पक्ष भारतात नाही.
खो खो खो. दाऊद इब्राहिमच्या सहकार्‍यांना मंत्रीमंडळात ठेवणारा पक्ष म्हणे हिंदुत्ववादी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

हे कुणी ठरवले आता?? नाही

अमरेंद्र बाहुबली
Fri, 02/25/2022 - 11:40 नवीन
हे कुणी ठरवले आता?? नाही म्हणजे पुरावे वगैरे पाहून ह्या आधी कोर्ट ठरवायचे. आता तुम्ही स्वतः कोर्ट बनलात का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

टिपूसेना

चंद्रसूर्यकुमार
Fri, 02/25/2022 - 11:54 नवीन
मग राफेल प्रकरणी काहीही पुरावा नसताना थयथयाट करणार्‍या रागाचे नाक कोर्टाने कापले तरी त्याला तुमची टिपूसेना डोक्यावर घेतच आहे ना? त्याचे काय? तेव्हा हे तत्वज्ञान कुठे जाते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

डोक्यावर घेत आहे म्हणजे??

अमरेंद्र बाहुबली
Fri, 02/25/2022 - 18:57 नवीन
डोक्यावर घेत आहे म्हणजे??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

अर्णब गोस्वामी

चंद्रसूर्यकुमार
Fri, 02/25/2022 - 11:59 नवीन
बाकी अर्णब गोस्वामीला कोर्टाने दोषी ठरविले आहे का? त्याबद्दल काय? म्हणजे कसे असते की यांच्याविरोधात कोणी बोलले की खराखोटा कोणताही मुद्दा हे उकरून काढणार आणि स्वतःच न्यायनिवाडा करणार. पण यांच्या अंगाशी आले की मात्र कोर्ट ठरवू दे हे तत्वज्ञान पाजळणार. असले ढोंग क्षणभरही आता टिकणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

प्रकरण केरिटात आहे दोघांचे ही

अमरेंद्र बाहुबली
Fri, 02/25/2022 - 18:58 नवीन
प्रकरण केरिटात आहे दोघांचे ही. कोर्ट ठरवेल काय ते. पण तुम्ही तर स्वत जज बनून नियायनिनाडा करायला लागलात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

मराठी माणसांना न्याय

Trump
Fri, 02/25/2022 - 11:03 नवीन
मुळातच शिवसेना मराठी माणसांना न्याय ह्या मुद्द्यावर स्थापन झाली होती. त्या पक्षाने राष्टीय स्वप्ने पाहणे म्हणजे किती शहाणपणाचे? असल्या उद्योगामध्ये आहे तो हक्काचा मराठी मतदार सोडुन जायचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा