Skip to main content

करोना / तीन देश तीन तर्हा

लेखक चौकस२१२ यांनी शुक्रवार, 10/07/2020 18:25 या दिवशी प्रकाशित केले.
करोना / तीन देश तीन तऱ्हा ( तिन्ही देश सधन पाश्चिमात्य राहणी आणि विचारसरणी पण प्रत्येकाची करोना संबंधी धोरणी वेगळॆ अंदाजे जुलै २०२० परिस्थिती १ ) स्वीडन लोकसंख्या १ कोटी , रुग्ण ७४,५३३ , मृत्यू =५५५० धोरण= उदार , हर्ड इम्युनिटी बघू काय होते ते ...टक्केवारी मृत्यू = १ लाखा मागे ५५ २) न्युझीलंड लोकसंख्या ५० लाख, रुग्ण 1542 , मृत्यू =२२ धोरण = कठीण खूप बंदी , अर्थव्यवस्था छोटी असूनही ) ...टक्केवारी मृत्यू = १ लाखा मागे 0.44 ३) ऑस्ट्रेलिया लोकसंख्या २.५ कोटी , रुग्ण 9359 , मृत्यू =106 धोरण = अधले मधले , दुसरी लाट एक राज्यात सुरु परत तिथे कठीण लॉक डाऊन, ) ...टक्केवारी मृत्यू = १ लाखा मागे ०.४२ यातील स्वीडन चे माहित नाही पण इतर दोन देशांची अर्थव्यवस्था आयात आणि निर्याती वर अवलंबून ( चीन किंवा भारतासारखी अंतर्गत अर्थव्यवस्था फार मोठी नाही ) आणि स्वीडन सारखी यूरोप बाजारपेठ जवळ नाही जगाच्या एका कोपऱ्यात त्याचे फायदे आणि तोटे दोन्ही

वाचने 35480
प्रतिक्रिया 71

प्रतिक्रिया

In reply to by विजुभाऊ

+१ आणि ते घोरणं टायपो आहे धोरणे असायला हवे होते. आधी मला वाटले कोमट पाणी प्या सारखा हा ही प्रकार आहे कि काय!

In reply to by कानडाऊ योगेशु

धोरणे "धोरण" असे वाचावे ( मुद्राराक्षसाच्या विनोदाबद्दल क्षमा )

In reply to by विजुभाऊ

स्वीडन च्या उदारमतवादी धोरणाचे मारे कौतिक झाले होते ( खास करून कुबेराचा लेख वगैरे) ते कसे फोल ठरले आहे ते आकडेवारीने दाखवणे हा उद्देश होता अर्थात हे हि कबूल कि दुसरी लाट हि नु झीलंड किंवा ऑस्ट्रेलियात हि येऊ शकते .. मेलबर्न ला आली आहे ..

पहिली गोष्ट, ज्या "प्रिंट" वरून लेख प्रेरीत भासतोय, तो मूळ लेख खूपच अभ्यास पूर्वक होता. दुसरी गोष्ट न्यूझीलंड उदारमतवादी /लिबरल, लोकशाही सेक्युलर देश आहे. तिथल्या पंतप्रधान, सर्व पक्ष , लोकप्रतिनिधी , जनता यांना विश्वासात घेऊनच देश चालवत आहे. "बहनो और भैयो आज रात आठ बजेसे" असला प्रकार तिथं नाहीय्ये.

In reply to by mrcoolguynice

न्यूझीलंड उदारमतवादी /लिबरल, लोकशाही सेक्युलर देश आहे. तिथल्या पंतप्रधान, सर्व पक्ष , लोकप्रतिनिधी , जनता यांना विश्वासात घेऊनच देश चालवत आहे. "बहनो और भैयो आज रात आठ बजेसे" असला प्रकार तिथं नाहीय्ये. हायला ५० लाख लोक तर आमच्या एक चतुर्थांश मुंबईतच राहतात. तेथे "असलेल्या उदारमतवादी /लिबरल, लोकशाही, सेक्युलर सरकारला" झेपत नाही तर तुलना भारताची न्यूझीलंड बरोबर करायची कशाला? कुठेही काहीही झालं तरी मोदींना शिव्या घातल्या शिवाय लिब्रान्दू ना जेवण पचतच नाही.

In reply to by mrcoolguynice

mrcoolguynice पहिली गोष्ट मी येथे ५० लोकांच्या देशही भारताशी तुलना केलेली नाहीये.. भारताचा संदर्भ एवढाच कि कुबेर सारखया एकांगी पत्ररकराने आणि एकूणच सद्य सरकार विरोधी प्रेमी मंडळींनी स्वीडन चे कौतिक केले होते .. आणि त्याला कारण निव्वळ सद्य सरकार विरोध हा होता, तो प्रयॊग कसा फसला ते दाखवून दिले , प्रिंट मध्ये काय लेख अल्ला होता मला माहित नाही दुसरे; नु झीलंड मध्ये लोकशाही सेक्युलर देश आहे. हो बरोबर पण मग भारत नाहीये? २ वेळेस एका पक्षाला भरगोस मतदान दिले गेले हे विसरलात काय? का उगा आंधळा विरोध "बहनो और भैयो आज रात आठ बजेसे" असे आमचे स्कॉट मॉरिसन बाबा पण म्हणतात आणि नु झीलंड च्या पंतप्रधान बाई हि म्हणतात,,

In reply to by चौकस२१२

"बहनो और भैयो आज रात आठ बजेसे" असे आमचे स्कॉट मॉरिसन बाबा पण म्हणतात आणि नु झीलंड च्या पंतप्रधान बाई हि म्हणतात,,
पण
तिथल्या पंतप्रधान, सर्व पक्ष , लोकप्रतिनिधी , जनता यांना विश्वासात घेऊनच देश चालवत आहे.
हे लिहिलेलं लक्षात न घेता, फक्त "बहनो और भैयो आज रात आठ बजेसे" चे फुका दाखले देऊ नका.

In reply to by mrcoolguynice

आणि भारतातात काय निजामशाही चालू आहे? किती एकांगी द्वेष आणि असली मोदींची निजामशाही तर ती अनेकांना पसंद आहे असे समजा असो मी यात भारत सरकार आणलेच नवहते . तुम्ही आणलेत

In reply to by mrcoolguynice

सर्व पक्ष , लोकप्रतिनिधी , जनता यांना विश्वासात घेऊनच देश चालवत आहे. "बहनो और भैयो आज रात आठ बजेसे" असला प्रकार तिथं नाहीय्ये.
अगदी खरंय....! -दिलीप बिरुटे

३ कोटी पेक्षा कमी लोखसंख्या असलेल्या प्रगत देशांची तुलना १३० कोटी पेक्षा जास्त लोखसंख्या असलेल्या विकसनशील देशाशी होउ शकत नाही. म्हणुनच कदाचित धागाकर्त्याने त्यात भारताची तुलना केली नाही.

In reply to by नेत्रेश

स्वीडन च्या उदारमतवादी धोरणाचे मारे कौतिक झाले होते ( खास करून कुबेराचा लेख वगैरे) ते कसे फोल ठरले आहे ते आकडेवारीने दाखवणे
लोकसंख्या नाही, तर "उदारमतवादी" या शब्दाआडून (उदारमतवादी = पुरोगामी लिब्रल सिक्युलर), काही भलतंच बरळायचं आणि एकमेवलित्वचा टेम्भा मिरवायचा, असं दिसतंय.

In reply to by नेत्रेश

अगदी बरोबर .. मी फक्त कुबेर यांच्या लेखाचा आणि त्याची भलावण करणाऱ्यांचा संदर्भ दिला

इतकी वर्षे मंदिर बांधण्यात दाखवलेला उत्साह जर आरोग्य सुविधा निर्माण करण्यात घालवला असता, तर महामारी काळात असे थेरडेशाही रिमार्क लिबरल लोकांना देण्याची वेळ आज आली नसती काही लोकांवर.

लिबरल !/ सर्वधर्मसमभावी याची भारतीय (काँग्रेसी व्याख्या ) हि जगातील व्याख्येच्या अगदी उलटी आहे सर्वांना सामान कायदा हि जागतिक व्याख्या तर स्वयंघोषित लिबरल लोकांची व्याख्या म्हणजे " प्रत्येकाला पाहिजे तसा कायदा,, म्हणजे सर्वधर्मसमभाव! !!! "तिथल्या पंतप्रधान, सर्व पक्ष , लोकप्रतिनिधी , जनता यांना विश्वासात घेऊनच देश चालवत आहे." याबद्दल ... तिथले ( भारतातील ) विरोधी पक्ष हे मुळातच हे पचवू शकले नाहीत कि भाजप सलग असा सत्तेत येऊ शकतो! मग असा आपत्ती च्य काळात फक्त विरोधी आहोत म्हणून विरोध किंवा काश्मीर सारख्या समस्येत पण खोडसाळ विधाने तेव्हा साहेब जर नु झीलंड किंवा ऑस्ट्रेलिया च्या विरोधी पक्षांबद्दल बोलायचे असेल तर ना... ते जरी विरोधी विचारसरणीचे असले तरी अश्या प्रसंगी काँग्रेस आणि दाव्यानं सारखे वागत नाहीत.. हे हि लक्षात घ्या, हि परिपकवता भारतीय विरोधांच्यात आहे का? आणि हे मी भारतासह या देशात काही दशके घालवून मग म्हणतोय... आणि हो वैचारिक दृष्ट्या नु झीलंड चे सरकार डावे आहे आणि विरोध उंजवे तर ऑस्ट्रेलियात त्याच्या उलटे तुम्हाला जिथे तिथे भाजपने केले कि चुकीचेच असा ओरडा करणे असा रोग जडलाय जसा राजदीप सरदेसाई सकाळ चे पवार, कुबेर, वागले , बरखा दत्त अश्या तथाकथित पत्रकारांना जडलाय तसा .. - काश्मीर वर सार्वभौमत्व सरकार ने स्थापित करण्याचाच प्रयत्न केला तरी रडणार - पाकिस्तान वर प्रतिक्रिया म्हणून हल्ला केला तर पुरावे मागणार - एवढ्या लोकसंख्येत करोना साठी कठीण घरबंदी आणली तरी उलट्या मुठीने बोंब - एक प्रतीकात्मक म्हणून दिवे लावा म्हणले तर त्याच्या मागचा अर्थ ना समजावून घेता नुसता ठणाणा लोकशाही मार्गाने सत्तेत आलेल्या सरकारचा मान ठेवायला शिका जरा

In reply to by चौकस२१२

"विरोधी मत, म्हणजे दुसऱ्याच पक्षातील व्यक्ती. विरोधी मत म्हणजे काँग्रेस. विरोधी मत म्हणजे देशद्रोही" अशी मुळातील तुटपुंजी समज, आणि सायबरसेल कडून फॉरवर्ड झालेल्या लेखांतून आलेल्या विचारधनाच्या भांडवलावर , अजून किती वेळा तेच ते दावे, घोळून घोळून चिवडत बसणार... ते डामोरदरदासचं जाणो.

In reply to by आंबट चिंच

हिंदूंनी निश्चित केलेली फुटपट्टी का? किती एकांगी आहे हि फुटपट्टी ते बघाना: गणपतीच्या अगोदर दोन-दोन महिने सरावाचा दणदणाट. पुण्यातील सरावाच्या जागा बघाल तर बाधित लोकांची कीव वाटल्याशिवाय राहणार नाही. विमलाबाई गरवारे हायस्कुल (शेजारी सहयाद्री हॉस्पिटल), म्हात्रे पुलाखालील नदी पात्र (शेजारी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल), येरवडा विसर्जन घाट (शेजारी राजीव गांधी हॉस्पिटल). प्रत्यक्ष उत्सवादरम्यान चार दिवस रात्री बारापर्यंत लाऊडस्पिकर लावण्याची मुभा आणि विसर्जन मिरवणूक ३०-३० तास चालणार. त्याने बाधित होणारी हॉस्पिटल्सचा तर विचारच नको. गणपतीच्या अगोदर जन्माष्टमी नावाचा लाडिक उत्सव. स्पीकरच्या भिंती लावून आणि हमखास मनुष्य हानी अथवा जन्माचे अपंगत्व साजरा करण्याचा दिवस. गणपतीत उभारलेले मंडप नवरात्रीपर्यंत तसेच ठेऊन साजरा होणारा सोहळा. आता तर नवरात्रीचे पण विसर्जन करण्याची टूम निघाली आहे. त्या खेरीज सोसायट्यांमधून आणि व्यवसायिकरित्या साजरा होणारा गरबा. मग येते दिवाळी. किमान १५०० टन गन पावडरचा धुराळा उडवून वर आम्ही नाताळच्या दिवशी होणाऱ्या आतषबाजीने प्रदूषण होत नाही का असा तिढा टाकणार. जवळपास एक त्रितीअंश वर्ष बेफाम आवाज, माती, पाणी यांचे मनसोक्त प्रदूषण करून वर इतर धर्मियांनी सुधारणा करण्याची मागणी करणार. आणि ज्या अजानच्या भोंग्यांचा त्रास होतो त्याच्या तुलनेत ऐन हिवाळ्यात दोन-दोन तास चालणाऱ्या काकड आरती बद्दल एक चकार शब्द काढणार नाही. होळीच्या अगोदरच महाराष्ट्रातील कित्येक भागात पाणी टंचाई जाणवायला सुरुवात होते. तरी आम्ही पाणी कमी वापरल्याने त्यांना पाणी मिळणार आहे का असा निर्लज्ज प्रश्न विचारून आम्ही दणकून होळी खेळणार. एव्हडं सगळं करून वर सर्वधर्मसमभावाचा नित्यनेमाने गजर आहेच!

In reply to by सर टोबी

त्याच्यावर पण बंदी घाला.. आमचा पूर्ण पाठिंबा आहे. नुसता पाठिंबा नव्हे तर सोशल मिडियावरती सक्रिय पाठिंबा देण्याची पण तयारी आहे. केवळ माझीच नव्हे, तर इथल्या बहुतांश उजव्यांची तयारी आहे.) पण मग सोबत अजानवरती बंदी घालणार का?

In reply to by आनन्दा

जगातील टॉप 5 उजवे देश व त्यांची कोविड हाताळणी यावर माहिती देऊ शकाल का ? (एफ वाय आय: भारत देश व त्याची घटना सेक्युलर आहे)

In reply to by mrcoolguynice

मी कुठे म्हटले त्याचा माझा अभ्यास आहे म्हणून. मी हिंदूंच्या सणांबद्दल बोलत होतो... एक उजवा हिंदू म्हणून मला देखील हिंदूंच्या सणांम्ध्ये घातल्या जाणार्‍या हैदोसाचा त्रास होतो, आणि त्याच्याविरुद्ध आवाज उठवण्याची माझी तयारी आहे. किंबहुना उठवत आहोतच. तुम्ही अजानविरुद्ध आमच्या आवाजाला पाठिंबा कधी देणार ते सांगा.

In reply to by आनन्दा

माझा "सर्व प्रकारच्या ध्वनीप्रदूषणाच्या विरोधाला " पाठिंबा आहे... मग तो घंटानाद किंवा अजान . आणि हो माझ्या सारख्यांच्या पाठिंबा कॅन्डिशनल नसतो.. "आधी अमुक ह्याला पाठिंबा/विरोध, मग तमुक ह्याला पाठिंबा/ विरोध " हे प्रकार मला वैयक्तिकरित्याही पटत नाही .

In reply to by आनन्दा

ए kul gaay जिथं पर्यंत मशिदीतले भोंगे बंद होतं नाहीत ना तिथपर्यंत चिवडत बसणार बोल काय बोलतोस
ही प्रतिक्रिया सुरुवात होती, (पहिली प्रतिक्रिया ध्वनीप्रदूषणाची ... ) भांडायची गरज नाही....

In reply to by mrcoolguynice

आणि हो माझ्या सारख्यांच्या पाठिंबा कॅन्डिशनल नसतो.. हो ! सहेब , अश्या अटी / कंडिशन का घालाव्या लागल्या कारण आपल्यासारखांचे वेचून ठरवलेले ( सिलेक्टिव्ह ) विरोध करतात ... म्हणजे विरोध करणार तर हिंदूं प्रथांवर अधि मग अगदीच अंगाशी आलं तर इतरांच्या .. हा दुटप्पी पण असल्या आणि काँग्रेसी विचारसरणी ने इतके वर्ष जोपासला आणि मग जो माणूस भाजपपासून २ हात दूर होता तो याला वैतागून भाजपाला मत देऊ लागला... त्यामुळे अपलायसारख्यांचं " निपक्षपाती" पण वर कोणाचाच विश्वास नाही बसणार... याचं बाळासाहेबांच्या काळातील उदाहरण आठवत का? सार्वजनिक रस्ता नामजसाठी अडवू नका हे वारंवार सांगून सुद्धा नमाज ला जाणारे आणि शासन ऐकत नाही याला वैतागून "त्यांचाच औषध त्यांना पाजायचे" म्हणून बाळासाहेबांनी "महाआरती" ची घोषणा केली आणि हिंदूनं आवाहन केले ,, आता खरं तर असं काही हिंदू धर्मात अमुक वारी येऊन सार्वजनिक आरती करा असे सांगितले नाहीये... पण या आव्हानामागचा हेतू "जशास तसे" हा होता, हे आपल्यासारख्यांना कळलेच नाही किंवा कळून घ्यायचं नवहते ..

In reply to by चौकस२१२

याचं बाळासाहेबांच्या काळातील उदाहरण आठवत का? सार्वजनिक रस्ता नामजसाठी अडवू नका हे वारंवार सांगून सुद्धा नमाज ला जाणारे आणि शासन ऐकत नाही याला वैतागून "त्यांचाच औषध त्यांना पाजायचे" म्हणून बाळासाहेबांनी "महाआरती" ची घोषणा केली आणि हिंदूनं आवाहन केले ,, आता खरं तर असं काही हिंदू धर्मात अमुक वारी येऊन सार्वजनिक आरती करा असे सांगितले नाहीये... पण या आव्हानामागचा हेतू "जशास तसे" हा होता, हे आपल्यासारख्यांना कळलेच नाही किंवा कळून घ्यायचं नवहते ..
मग बाळासाहेबांच्या या काळातले आपले लाडके काय करत होते ?

In reply to by mrcoolguynice

हि बाळासाहेबांची भूमिका देश/ राज्य प्रशासनाच्या दृष्टीने योग्यच होती... त्यामुळे जे कोण आमचे लाडके होते असतील त्यांचा याला पाठिंबा होता एवढी वर्षे आपले लाडके काय करीत होते,,, त्यांचं बोटचेप्या धोरणामुळे बाळासाहेबांवर हि खेळी खेळण्याची वेळ आली हे सोयीस्कर रित्या विसरताय .. असो चालू द्या तुमचं पटना २४ साली द्या मत आणि आना आपले लाडके...राजकुमार गादीवर

In reply to by चौकस२१२

"मी पुन्हा येईन .... मी पुन्हा येईन .... मी पुन्हा येईन " हे बडबड गीत, तुम्हीच २४ साली आळवा ऑस्ट्रेलियातून ...

In reply to by सर टोबी

हिंदूंनी निश्चित केलेली फुटपट्टी का नाही... कुठेतरी मधय गाठला पाहिजे ..परंतु जसे कानडा. ऑस्ट्रेलिया हे सर्वधर्मसमभावी असले तरी त्यांच्या नियमांवर तेथील मुख धर्माचाच म्हणजे ख्रिस्ती ठसा आहे आणि असणार... आज येथे नुसतेच वेगवेगळ्या धर्माचे असे नाही तर एकाच धर्मातील विविध वर्णाचे लोक राहतात ,, तसेच भारतात भारतीय ( हिंदू शीख, जैन बुद्ध ) यांचं संस्कृती चा भारतीय नियमांवर ठसा असणारच...

In reply to by सर टोबी

आणि टोबी साहेब ,, एक अजून अप्लायसारख्यांची "सर्वधर्मसमभावाची" व्याख्या हि "सगळ्यानं सामान" नसून फक्त जे हिंदूचे असेल ( आणि त्यातील काही चांगले असेल) त्यालाच विरोध हि आहे असे दिसते.. कोट्यवधी हिंदूंना हिंदुराष्ट्र नकोय फक्त हिंदूंना डिवचने बंद व्हावे आणि "देश आधी मग धर्म" हेच मान्यच आहे पण एवढी वर्षे तथाकथित पुरोगाम्यांनी फक्त हिंदूंना दुखवा हेच धोरण अवलंबले तेव्हा लोकं चिडली ..हे समजून घ्याचेच नाही तर बसा उगाळत

In reply to by mrcoolguynice

ओह कूल गाय "...विरोधी मत म्हणजे देशद्रोही"....:" एवढा आंधळे पण नाहीये... इतिहास बघा भारतीय लोकशाही जगातील कितीही मोठीही असली तरी केवळ विरोधासाठी विरोध हा किती होतो आणि अगदी एकमेकांचे हाडवैरी असलेल्या डाव्या आणि उजव्या विचारसरणींचं सरकार आणि पक्ष असलेल्या कानडा, युके, ऑस्ट्रेलिया आणि नझीलँड या देशात विरोधी आणि सरकार एकमेकांशी कसे वागतात हे आपण स्वतः या देश ८-१० वर्षे राहा आणि मग बोला... आणि आता हे वाचल्यावर नेहमीची धुसकी ' हे भारताबाहेर राहणारे भारताबद्दल काय बोलणार " सोडू नका

In reply to by चौकस२१२

अगदी एकमेकांचे हाडवैरी असलेल्या डाव्या आणि उजव्या विचारसरणींचं सरकार आणि पक्ष असलेल्या कानडा, युके, ऑस्ट्रेलिया आणि नझीलँड या देशात विरोधी आणि सरकार एकमेकांशी कसे वागतात हे आपण स्वतः या देश ८-१० वर्षे राहा आणि मग बोला..
मला अनुभव आहे, या देशांचा. फक्त महाराष्ट्र राज्यात उजवे डावे एकत्र आले, की ह्या परदेशी भक्तांची कोल्हेकुई मात्र ऐकू येते.

In reply to by mrcoolguynice

किती वर्षाचा अनुभव आहे? mrcoolguynice आणि हे "परदेशी भक्त " काय? वाटलंच तुम्ही हे घुसवणार... असो माझं मूळ मुद्द्यात भारताचा संबंध फक्त कुबेरांसारख्या पत्रकाररने केवळ सरकार चाय विरुद्ध लिहायचे काह्ही करून म्हणून स्वीडन चे रामायण सुरु केले आणि मग ते तोंडावर पडले... फक्त महाराष्ट्र राज्यात उजवे डावे एकत्र आले,? कोण? ना सेने ना राष्ट्रीय दावे कि उजवे ते तर ' राजकारणी कौटिम्बिक उद्योग " आहेत .. ना तत्व ना काही ,, त्यामानाने कम्युनिस्ट किंवा संघ बरा

In reply to by चौकस२१२

कोण? ना सेने ना राष्ट्रीय दावे कि उजवे ते तर ' राजकारणी कौटिम्बिक उद्योग " आहेत .. ना तत्व ना काही ,, त्यामानाने कम्युनिस्ट किंवा संघ बरा
अच्छा अच्छा संघाने कुठली निवडणूक लढवलीय म्हणे ?

In reply to by mrcoolguynice

"त्यामानाने कम्युनिस्ट किंवा संघ बरा" हे फार पूर्वी पासूनचे एक सर्वसाधारण विधान आहे,,, ते आप्ल्यालाल कळलेलं दिसत नाहीये.. तुलनात्मक रित्या म्हणून लोक असे म्हणतात आता संघाने निवडणूक लढवली नाही हे काय सांगताय... अहो विचारसरणी बद्दल बोलतोय

In reply to by चौकस२१२

हे फार पूर्वी पासूनचे एक सर्वसाधारण विधान आहे,,, ते आप्ल्यालाल कळलेलं दिसत नाहीये..
कोणाचे विधान आहे हे ? काय कॉन्टेक्सट आहे/होता, जेव्हा कोणी ते केलेले ? कोणीही काहीही बरळल की मला कसं कळणार ?
तुलनात्मक रित्या म्हणून लोक असे म्हणतात
कौन है ये लोग ? कहांसे आते है ये लोग ?

In reply to by mrcoolguynice

मि १०० वर्षाचा असल्यामुळे भारतात हे अनेकदा बोलले जायचे हे मला आठवते.. आपले वय माहित नाही पण आपल्याला माहित नसेल तर विचारानं जरा आसपासच्या म्हाताऱ्या लोकांना ! वैचारिक दृष्ट्या टोकाची आणि न आवडणाऱ्या असेनात का / होईना कम्युनिस्ट आणि संघ या दोन प्रवृत्तीची काहीतरी ठोस विचारधारा आहे ( ए तू झेड काँग्रेस प्राव्हेट लिमिटेड आणि पवार आणि कंपनी प्राव्हेट लिमिटेड / ठाकरे आणि कंपनी प्राव्हेट लिमिटेड / मुलायम सिंग आणि कंपनी प्राव्हेट लिमिटेड ) यांच्या तुलनेने हा तर्क कळायला ४ यत्ता पूर्ण केलेले चालते

In reply to by चौकस२१२

आपले वयोमान अवघे १०० असल्याने .. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात कोण सहभागी होते, व ब्रिटिशांचे चाटुकार पित्ते कोण होते, ह्याचीही आपल्याला कल्पना असेलच ... असो वयोमानानुसार विसरत असल्याचा भाग वेगळा. परदेशात कमोडवर बसून पार्श्वभागावर टीश्यूपेपर रगडत , इंटर्नेटवरवरून भारतातल्या भारतीयांना शहाणपणा शिकवण्याचा कंड शमवणार्यांची बरगळ, कळायला आमच्या इकडकच्या ४ यत्ता पूर्ण केलेले चालते

In reply to by mrcoolguynice

मुद्ययावरून खालच्या दर्जाच्या पातळी वर आला आहेत .. त्यामुळे मी थांबतो तुम्ही तुमचा एकांगी द्वेष उगाळत बसा

परत एकदा मोदी वैगरे सोडून या तीन देशांबद्दल बोलू नु झीलंड सारख्या कडक योजना ना आणता कुठेतरी मध्यम मार्ग गाठण्याचाच प्रयत्न ऑस्ट्रेलिया ने केला आणि करताय आणि आकडेवारी बघितली तर नु झीलंड च्या सारखीच जवळ पास परिस्थिती आहे , हे नमूद करण्याचे कारण कि कठीण लोकडवून हेच फक्त यशस्वी हे हि मी म्हणत नाहीये ,,,

अमेरिकेच्या व ब्राझीलच्या, 56 इंची छातीच्या राष्ट्रपुंगवांनी, कोविड धोरणात जे हगून ठेवलंय, त्यावरही अभ्यास पूर्वक लेख लिहा की....

लेख कशाला एक दोन वाक्यात लिहिता येईल या राष्ट्रपुंगवांन वर - महाधान्य ते ट्रम्प दादा आणि बॉल्सवार तात्या... त्यांच्या अति tokachya उजव्या विचारसरणी ला ना करोना मान्य ना ग्लोबल वॉर्मिंग मान्य .. मग काय बोलणार त्यांच्यापुढे कपाळ मी कुठे त्यांची भलावण करतोय.. ब्राझील मध्ये काय उपाय योजले त माहित नाही अमेरिकेत जे " आधी धंदा मग सार्वजनिक स्वास्थ्य " हे धोरण आणि त्यातून जी दिव्य विधाने उजव्या विचारसरणी ची लोक करीत आहेत त्यावर शहाणा माणूस काय बोलणार! अर्थात मी काही अमेरिकेत राहिलो नाही त्यामुळे तेथील खरी परिस्थिती तेथिल एखाद्या मिपाकरांनी उलगडून सांगितली तर बरे

In reply to by चौकस२१२

चला, तुम्ही आम्ही या मुद्द्यावर एक दिसतोय. डोलांड ने जे 56 इंची छातीच्या राजकारणावर दिवे लावले, तसे आपल्याकडं होऊ नये हीच अपेक्षा.

एक कोटी लोकसंख्येत ५५०० मृत्यू या दराने भारतात आतापर्यंत साडे सात लाख मृत्यू झालेले आपल्याला परवडले असते का? त्यात सुद्धा भारतात अजूनही एकत्र कुटुंब पद्धती आहे. स्वीडन मध्ये असंख्य वृद्ध लोकांचे अंत्यसंस्कार होण्यास २० दिवस लागतात. भारतात अशी पार्थिवे शवागारात पडून राहिली तर देशात दंगली उसळतील. बाकी यावर मी बरेच लिहिलेले आहे. तेंव्हा द्विरुक्ती नको. कोणताही पक्ष सत्तेत असता तरी लॉक डाऊन केलेच असते. महाराष्ट्रात काय किंवा राजस्थानात लॉक डाऊन आहेच आणि ते आवश्यक आहे. पण केवळ मोदी आणि भाजपवर गरळ ओकण्यासाठी काही लोक येथे भंपक युक्तिवाद करतात.

In reply to by सुबोध खरे

Report

कोणताही पक्ष सत्तेत असता तरी लॉक डाऊन केलेच असते. महाराष्ट्रात काय किंवा राजस्थानात लॉक डाऊन आहेच आणि ते आवश्यक आहे.
लॉकडाऊन आणि अनलॉकचा काडीचा फायदा झालेला दिसत नाही. आपल्याकडे म्हणजे भारतात जेव्हा पहिला रुग्ण सापडला तेव्हापासून ते कालपर्यंचा शिक्षण व औषधी द्रवे विभाग महाराष्ट्र यांचा अहवाल पाहिला तर लक्षात येते की रुग्णसंख्या अजिबात कमी झालेली नाही. राहीला प्रश्न लॉकडाऊनचा ? किती दिवस लॉकडाऊन ठेवणार ? जगरहाटी सुरु करावीच लागणार आहे. आवश्यक आहे तर त्याचा फायदा दिसलाच पाहिजे होता असे वाटते. सध्याच्या आलेखात नखभरही आलेख खाली आलेला दिसत नाही. मिपावर अनेकांनी लॉकडाऊनचा काहीही फायदा होणार नाही, असे सांगितले होते त्याची प्रचिती केव्हाच यायला लागली आहे, अर्थात हे सर्वांनाच मान्य होत असते असे नाही. लॉकडाऊनमुळे लोकांचे रोजगार गेले, काही लोक रस्त्यावर आले. काही बिचारे मरण पावले. काहींची उपासमार सुरु आहे, काहींचा जीवन जगण्याचा संघर्ष सुरु आहे. काहींचे वेतन कपात होत आहे. काहींचा जीवन-मरणाचा संघर्ष सुरु आहे. काही लोकांच्या टेष्ट होतात, लोक कोरंटाईन होतात. काहींमधे संसर्ग आढळतो. काही गंभीर असतात, काही उपचार घेऊन बाहेर पडतात. , काही दुर्दैवाने मागे राहतात, हे सध्या भारतातील चित्र आहे. बाकी चालू द्या. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सरजी पाण्याला बांध बंधारे घातले जातात त्यामागे पुढच्या गावाला पुराचा त्रास होऊ नये असाही उद्देश्य असतो. काही वेळा पाऊसच बंधार्‍याच्या क्षमतेपेक्षा अधिक येतो, कधी बंधार्‍यात लिकेज असते कधी कधी बंधार्‍याचे स्थानिक व्यवस्थापन गडबडते, कधी पूररेषेत न राहण्या बद्दल लोकांना वारंवार सांगून लोक ऐकत नाहीत, कधी अगदी पानशेत होते आणि बंधारा बांधणीच्या मोठ्या प्रयत्नांना अपयश येऊ शकते, शिवाय बंधारा बांधण्याने पाठीमागचा निसर्ग वाड्या वस्त्यांचे प्रश्न असतातच पण नियोजनातील सर्वच्या सर्व त्रुटीचे खापर म्हणून पूरांना अटकाव करणारी बंधारा संकल्पनेवर फोडता येत नाही. नियोजनाच्या अपयशावर टिका अवश्यंभावी करावी. पण अपयश दिसले म्हणून संकल्पना पुर्णतः मोडून कसे चालेल. लोकांना पूररेषेपासून दूर जायलाही नको आहे बंधाराही नको आहे तर लोक पुरात बुडून मरणारच. मी जर अबकड नेता असेन आणि लोक पूररेषेपासून दूर हटण्यास तयार नसतील तर बंधारा बांधण्याचा असफल का होईना प्रयत्नाचे पुण्य माझ्या पदरी का घेऊ नये. (नास्तिक असाल तर पुण्ण्याएवजी क्रेडीट म्हणा हवे तर) बाकी सुधारणात सहभागी न होता दोष काढण्यासाठी दोष काढणार्‍यांचे काय, बाप आणि मुलाने घोड्यावर मांडी कशीही घातली तरी चुकीचेच ही भूमिका नेहमीच उपलब्ध असते.

In reply to by माहितगार

"पण अपयश दिसले म्हणून संकल्पना पुर्णतः मोडून कसे चालेल" हे अगदी बरोबर...माहितगार बिरुटे आपण म्हणता "लॉकडाऊन आणि अनलॉकचा काडीचा फायदा झालेला दिसत नाही" असे विधान ठोकून देणे किती जबाबदारीचे आहे? भारताच्या लोकसंख्येत आणि एकूण असेलेल्या समस्येत या आलेखात सपाट पणा ( फ्लॅटन द कर्व) हे व्हायला अजून वेळ असेल.. लगेच कसे अनुमान काढता हो? फ्लॅटन द कर्व हे साध्य करून सुद्धा काही देशात परत दुसरी लाट येत आहे म्हणून काय मुळात फ्लॅटन द कर्व करण्यासाठी जे उपाय/ प्रयतन केले त्याला असे धुडकावून लावायचे का? यात आपली सरकार विरोधी आंधळी भूमिकाच दिसते... जगातील हा प्रसार उत्तम रित्या काबूत आणणाऱ्या देशापैकी एक म्हणून ऑस्ट्रेलिया ची सुरवातीला वाखाणणी झाली.. पण आता दुसरी लाट व्हिक्टोरिया राज्यात (मेलबर्न ) आली आहे .. म्हणून येथे लगेच " सरकारने सुरवातीला जे लोकडवून केले ते कसे मुरकाचे होते वैगरे " अशी आगपाखड करीत नाहीत.. परत आपण म्हणाल " मला काय करायचंय जगात काय चाललंय ते ..

In reply to by माहितगार

आपत्कालीन निर्णयाचा कोणताही आगापिछा नसल्यामुळे देशाचं आणि नागरिकांचं फार नुकसान झालं. देशाच्या नेतृत्वाने कुचकामी निर्णय घेतले. जनतेला भोगावं लागलं, सोसावं लागलं, यात आपल्याला सर्व बरोबर दिसत असेल तर आपल्या मताचा आदर आहेच. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अभ्या यांच्या प्रतिसादला अनुमोदन देताना म्हणतो, की "देशाच्या नेतृत्वाने कुचकामी निर्णय घेतले" हे लक्षात आल्यावर , स्वीडनने मान्य करण्याचा प्रामाणिक दाखवला. एका क्ष देशात असा प्रामाणिकपणा जाऊ द्या, सुप्रीम लीडर चे मानसपुत्रे गोलपोस्ट शिफ्ट करतील. अर्थव्यवस्था खालावली की संख्याशास्त्रीय डेटा जाहीर न होऊ देने, असे चिंधीगिरी प्रकार जिथे होतात, तो क्ष देशाचे सुप्रीम लीडर, विश्वागुरु होण्याच्या बाता मारतात. अवांतर : डोलांडसुद्धा मास्क वापरू लागला.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जगातील प्रत्येक सरकार धडपताय, काही यशस्वी होत आहेत हे दिसता दिसता अपयशी होतात... याचे मेलबर्न चे उदाहरण दिलेच आपण मात्र पदोपदी असं भासवताय कि जणूकाही फक्त भारत सरकारच इतके निकामी निघाले...! सरकार जर काँग्रेस किंवा डाव्या आघाडीचे असते तर असं काय मोठा फरक पडला असता?.. भारत काही चीन नाही कि दंडुकेशाही वापरून काबूत आणता येईल.. आमचं येथ ७ राज्यात दोन्ही डावे आणि उजवी सरकारे आहेत , यौग्य आणि अयोग्य निर्णय झाले आणि त्यात फक्त सरकार चुकीचे असेही नाही जनतेनी शिस्त नाही पाळली तर कसे आवरणार हे सगळे.. हे झाले सामाजिक स्वास्थ्याचे, आर्थिक स्वास्थ्य यावर केवढा मोठा बोजा पडणार आहे याची कल्पना तरी आहे का तुम्हाला? आता पुढे काय आर्थिक संकट आहे ते आज इकडे बजेट मध्ये कळणार आहे १९-२० साल ५ बिलियन फायद्यात असेल असे वाटत असताना ९० बिलियन तोट्यात झाले आहे .. हे जर सधन देशाचे तर भारतासारख्या ( सधन परंतु प्रचंड लोकसंख्येचा बोजा ) देशाचे काय याचा विचहर तरी करवतो का? आपण सगळ्यांनी यात " फक्त सरकार कसे चुकले" यावर बहुमूल्य वेळ घालवण्यापेक्षा यातून बाहेर कसे पडत येईल यावर विचहर केला तर आपापल्या देशाचा / समाजाचाच फायदा होईल ..जर इच्छा असेल तर ... "हाणा टपली सरकारला जातायेता " हाच जर एक खांबी तंबू असेल तर मग काय बोलणार

In reply to by चौकस२१२

"हाणा टपली सरकारला जातायेता "
गेल्या 70 वर्षात, देव देश धर्म अर्थव्यवस्था याला जी तथाकथित ग्लानी आलेली , त्याच्या उच्चाटना साठी डामोडर-सुताने या पृथ्वीवर जणु जन्म घेतलाय, असा प्रचार भाडोत्री लोकांकडून कुजबुजयंत्रणा व सोशल मीडियावर केला, त्यावर साक्षर (सुशिक्षित नाही) मूर्ख लोकांनी विश्वास ठेवून मतदान केलं, त्याचे परिणाम. पक्षाचा एक खांबी तंबू केला, इथं आजूबाजूला सगळे चाटुकार गोळा केले.... अटलबिहारी , मनमोहनसिंग, नरसिंहराव यांच्या सारखे पंतप्रधान असते, तर संकट जरी कोरोनाचे असते तरी, परिस्थिती कैक पटीने वेगळी हाताळली गेली असती. नस्ती पनौती लागलीये भारताला या डामोडरसुताच्या रूपाने.....

In reply to by mrcoolguynice

हाणली अजून एक टपली.. मुदा नसला कि नुसती आगपाखड... हि अशी.. मग दुसऱ्यांना "चाटुकार" म्हणायचं... चालुद्या पातळी दिसली तुमची

In reply to by चौकस२१२

काय मुद्दा पाहिजे काका ? तुम्ही डेटासकट तुमचा मुद्दा सांगा, त्याला डेटाने उत्तर दिले जाईल. तुम्हाला गिरीश कुबेर यांना टपली हानायची होती... त्याद्वारे एक्सट्रापोलेट करून अजून काही जणांना टपली हानायची होती, तर असे मुद्दे विरहित धागे काढले, तर त्यावर धाग्याच्या लायकीनुसार प्रतिक्रिया येणार. तुम्हीही तुमची पातळी फार उच्च दर्जाची असल्याचे दर्शवून दिले नाहीये... ऑस्ट्रेलियात राहून देखील..…

In reply to by mrcoolguynice

- या धाग्याच्या सुरवातीला स्वीडन , ऑस्ट्रेलिया आणि न झीलंड ची आकडेवारी , शीर्षक काय धाग्याचे वाच - "कठोर घरबंदी" हि स्वीडन च्या "हर्ड इम्युनिटी च्या प्रयोगापेक्षा" जास्त प्रभावी दिसत आहे , हा हा मुद्दा होता त्यात भारताचा संबंध फक्त कुबेराचा संधीसाधू पण दाखवणे हा होता कारण कुबेर हे एकांगी अजेंडा चालवतात कि जेणेकरून सद्य सरकार ला जमेल तसे ठोकायचे .. हा आता त्यावर तुला आकडेवारीने हे दाखवता आले असते कि नाही स्वीडनचे कसा बरोबर वैगरे पण गाडी कुठे घसरली ..

In reply to by चौकस२१२

विथ डेटा मुद्दा कसा मांडतात, याची आपल्याकडे कल्पना नसावी, ... मुद्दा कसा मांडणे अपेक्षित आहे याच्या उदा एक मुद्दा... गुजरात मॉडेल, ज्यात आरोग्य यंत्रणाही आली, "चाटुकार" लोकांनी सोशल मीडियावर, लय चाटुगिरी करून, जे नाहीये ते गुण मॉडेलला दिले... आज कोविड मध्ये राष्ट्रीय मृत्यूदर 2.48% असताना, गुजरातचा दर 4.89% च्या अवतीभवती आहे. "चाटुकार" लोक सोईस्करपणे इकडे दुर्लक्ष करून, भलतेच मुद्दे मांडून ठेवतात. राष्ट्रीय महामारी कायद्या किंवा तत्सम कायद्याच्याकक्षेत देश आल्यावर, स्वतंत्र भारतात कदाचितच असे सर्वंकष अधिकार पंप्र ला आज मिळाले असताना, त्यांनी आज केलेल्या फकअप बद्दल, हेच "चाटुकार" , नेहरूंना जाब विचारतात, तर त्यांना मी "चाटुकार"च बोलणार.

In reply to by mrcoolguynice

"चाटुकार" तुझी हि गटार गन्गा वाहत राहूदे ,, माफ करा संपादक .. एक प्रामाणिक आकडेवारी दाखवत होतो पण या महाशयांना नुसती उचकेगिरी करायची दिसतीय ...

In reply to by सुखी

सुखी, उपरोक्त लेखात हा दावा पंचवीसेक स्वीड डॉक्टरांनी केलेला आहे. स्वीडनच्या अधिकृत आरोग्यसंस्थेने हे मान्य केलेलं नाहीये. उलट तिने लक्षणविरहित लोकांना रुग्ण मानायला नकार दिला आहे, जो माझ्या मते योग्य आहे :
.... the agency refused to acknowledge the importance of asymptomatic spread of the virus ....
लक्षणविरहित मनुष्याच्या अंगात करोना असेल तर तो रोगी नव्हे. तसा मानायचा झाला तर माणसाच्या अंगात शेकडो विषाणू असतात मग मानवी शरीर हे रोगांचं माहेरघर मानावं लागेल. हा संदेश वाचणाऱ्या कितीतरी वाचकांच्या आतड्यात या क्षणी पोलियो व्हायरस सापडेल. हे सगळे वाचक रोगी समजावेत का? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

'स्वीडनच्या अधिकृत आरोग्यसंस्थेने हे मान्य केलेलं नाहीये' बरं मग? म्हणणं काय तुमचं? स्वीडन चा "प्रयोग" जास्त यशस्वी आहे? नु झीलंड आणि स्वीडन छाया आकडेवारी कडे बघितला तर कठोर बंदी हा नु झीलंड चा उपायच जास्त प्रभावी दिसतोय ! सध्यातरी का कुबेरनसारखा "मिया गिरा तो भी टांग उपर !

In reply to by चौकस२१२

चौकस२१२, न्यूझीलंडची लोकसंख्या ५० लाख असून घनता १८ प्रति चौ.किमी. आहे. स्वीडनची लोकसंख्या १ कोटी ३ लाख असून घनता २३ प्रचौकिमी आहे. भारताची लोकसंख्या १३२ कोटी असून घनता ४००+ प्रचौकिमी आहे. न्यूझीलंडकडे पाहून करा पाहू भारतात टाळेबंदी. बघा काय होतं ते. आता माझं म्हणणं थोडक्यात सांगतो. करोना हे थोतांड आहे. टाळेबंदी हे महाथोतांड आहे. अंतरसोवळे हा रोगापेक्षा भयंकर उपाय आहे. निरोगी माणसांवर कशाला टाळेबंदी लादायची? हवं तर नाजूक प्रकृतीवाल्यांनी घरात गुपचूप बसावं. रोगप्रवणांनी तर जरूर घरी बसावं. त्रास होत असेल तर आणि तरंच रुग्णालयात जायचं. जरा लक्षणं दिसली की की रुग्णालयात गर्दी करायची नाही. माझ्यासारखे रोगप्रवण लोकं मरायला टेकले तर त्यांना यथोचित उपचार मिळण्यासाठी रुग्णालयं व डॉक्टर मोकळे हवेत. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

मी मुळात भारताशी तुलना केलीच नवहती.. न्यूझीलंड आणि स्वीडन चा चाललं होता.. नीट वाचा माझा मूळ धागा "निरोगी माणसांवर कशाला टाळेबंदी लादायची?" अहो पण लोकसंख्येतील निरोगी चे प्रमाण राहावे म्हणून तर जमावबंदी जगभर चालू आहे ... जगातील सर्वात घनदाट लोकसंख्या असलेले देश म्हणजे सिंगापोर.. तेथही तिथेहि त्रास झाला असणारच ..कारण ७०% जनता ८-१० मजली इमारतीत राहते , मास रॅपिड ट्रान्सीट आणि बस हीच मुख्य दळणवळणाची साधने जमावबंदी ची अंमलबजावणी भारतासारख्या देशात करणे अवघड आहे हे मान्य पण मुळात हा उपायच चुकीचा आहे हे म्हणणं मात्र विचित्र आहे असो आपल मत "हे सर्व थोतांड आहे" असे असल्यामुळे पुढे बोलणेच खुंटले...

In reply to by चौकस२१२

माझा मुद्दा या धाग्यावर , लॉकडाऊन करणे न करणे , या पेक्षा... ती कशी अमलात येते त्याकडे जास्त होता. अटल बिहारी किंवा मनमोहन सिंग जर पंतप्रधान असते, तर सर्वाना बरोबर घेऊन त्यांनी , जे करायचे ते केले असते. ( जसं सध्या न्यूझीलंड च्या पंप्र करत आहेत). कोविडवर उत्तर, हे (लॉकडाऊन करणे न करणे) असे बायनरी नसून, त्याला अनेक पैलू आहेत. त्या अनेक पैलूंवर अमलबजावणी होण्या साठी केंद्रीय क्ष पदावरील व्यक्तीत, राजकीय परिपक्वतेची आवश्यक्यता असते (उदा अटलजी मनमोहन, नरसिंहराव), जीची सध्या तीव्र कमतरता भासतेय. परिपक्व दिसणे वेगळे, आणि खरंच असणे वेगळे. आजकाल दिसण्यालाच महत्व दिलं जातंय, चकचकीत शो आणि इव्हेंट्स फक्त.

In reply to by चौकस२१२

चौकस२१२, माझं मत "करोना थोतांड आहे" असं आहे. "हे सर्व थोतांड आहे" असं आजिबात नाही. सर्व हे विशेषण माझं नाही. करोनामुळे माणसं मरायला टेकतात. सबब करोना हा रोगप्रवण लोकांसाठी घातक आहे. पण प्रसारमाध्यमांनी आणि सरकारांनी इतक्या मोठ्या प्रमाणावर भंपक अपप्रचार केला आहे की तो निरोगी लोकांसाठीही घातक असल्याची समजूत दृढ होते आहे. त्यामुळे ज्यांना खरंच उपचारांची गरज आहे असे रोगी निष्कारण मरताहेत. ज्यांना उपचार हवे आहेत नेमके त्यांनाच नाकारले जात असतील तर कुठेतरी थोतांड आहे ना? काढा शोधून. माझा प्रश्न स्पष्ट आहे. करोना जर निरोगी माणसांना प्राणघातक नाही, तर सरसकट टाळेबंदी कशासाठी? आ.न., -गा.पै.

आज देशाचं नेतृत्व जर पप्याकडे असतं तर हा विषाणू नक्कीच फोफावला नसता. मुळात त्याने तो भारतात येऊच दिला नसता. उगीचच नाही MoU केलंन चिन्यांबरोबर. तुम्ही बसा ओरडत पण ब्रह्माण्डातले सर्वोत्तम मुख्यमंत्री आणि त्रिखंडातले एकमेव लायक पप्याशेट बॅंगकॉककर एकत्र येऊन मायभवानीच्या आशीर्वादाने ह्या विषाणूला पळवून लावतील बघा. अहो तीन दिवसात अँजिओप्लास्टी निपटवणारे सेनापती आणि तिरडीवर पडले तरी आगीत सरपण घालणारे खरे सेनापती असल्यावर चिंता कशाची ?

In reply to by तेजस आठवले

अरे अरे किती तो त्रागा, किती तो संताप काम न करू दिल्याचा. उपमा तरी योग्य आणि सर्वसामान्यांना समजतील आणि रूढ असतील त्या द्या. कसला राग म्हणायचा ह्याला?