✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

Survival of the fittest.....

झ
झपाटलेला फिलॉसॉफर यांनी
Sat, 05/23/2020 - 15:30  ·  लेख
लेख
परवा ऑफिसला जाण्यासाठी ठाण्याहून बस पकडली. बाजुच्या सिटवर बसलेल्या मुलाने बॅगेतुन पुस्तक काढुन वाचायला लागला. मोबाईलच्या जमान्यात चक्क पुस्तक वाचताना पाहुन माझं कुतुहलही चाळवलंच. हळुच वाकुन पाहिलं तर पब्लिक सर्व्हिस परिक्षेचं पुस्तक होतं. म्हटलं घ्यावा जरा याचा इंटरव्हयू. तेवढाच आपलाही टाईमपास होईल. तोपर्यंत बसही सुसाट वेगाने निघाली होती. मी- कसला अभ्यास करतोयस ? कोरोना चा का ? (खेळीमेळीच्या वातावरणात गप्पा व्हाव्यात म्हणून मी कोपरखळीने सुरुवात केली.. तो-पब्लिक सर्व्हिस कमिशन परिक्षेचा अभ्यास करतोय.. मी- मग कोरोना बद्दल काही वाचलंस का ? काय होईल पुढे ? आटोक्यात येईल का ? तो-कोरोना बद्दल अधिकृत काॅमेंट करायला मी डाॅक्टरही नाही आणि वैज्ञानिकही नाही.. पण हो, W.H.O., केंद्र सरकार, राज्य सरकार, जागतिक पातळीवरच्या घडामोडी यांवरून काही गोष्टी स्पष्ट होतायत.. कोरोना हा विषाणू आता आपल्या सोबत किमान काही वर्षे तरी राहणार.. आणि याबाबत वेळोवेळी प्राप्त होणार्या सुचना काटेकोरपणे पालन कराव्या लागतील. *डार्विनच्या सिद्धांतानुसार it's survival of the fittest..* so, fit रहायचा प्रयत्न करायचा.. मी- म्हणजे यापुढे कायम योगा प्राणायाम, व्यायाम करावा लागणार.. तो-ते तर आहेच.. पण त्याहुन थोडं पुढे जाऊन मी असं म्हणेन कि आपण आपल्या औकातीत रहायला शिकायला हवं.. मी- म्हणजे ? तो-आपण जन्माला येताना तीन गोष्टी सोबत घेऊन येतो.. बौद्धिक- शारीरिक आणि मानसिक ताकद, घरचे संस्कार आणि आपलं नशीब... यातुन जे निर्माण होतं त्याला व्यक्तिमत्व विकास म्हणतात.. त्यातूनच निर्माण होते इम्युनिटी.. कुठल्याही रोगाशीच नाही तर समस्येशी लढण्याची ताकद.. ती कुणाची थोडी कमी अधिक असु शकते.. ती प्रामाणिकपणे कशी वाढवता येईल याचा प्रयत्न करायला हवा.. पण सध्या प्रोटीन पावडर खाऊन दंडावर बेडकुळ्या दाखवत फिरण्याच्या शाॅर्टकट काळात ,स्पर्धेत टिकण्यासाठी चुकीच्या मार्गाचा अवलंब केला जातो त्यातुन तयार होतं tension आणि त्यातुन तयार होतात विविध आजार.. त्याने इम्युनिटी कमी होते आणि नेमका तेव्हाच कोरोना चा शिरकाव होतो.. हेच जर आपण वास्तव स्विकारून प्रामाणिकपणे राहिलो तर कमी त्रास होईल.. मी-मग यात सरकारच्या कामाबद्दल तुझं काय मत ? तू जर पंतप्रधान असतास तर काय केलं असतंस ? तो- शाळेतल्या निबंधाची आठवण झाली.. जर मी पंतप्रधान असतो तर.... असो, मी जर पंतप्रधान असतो तर केंद्रीय आरोग्य खात्याला जागतिक पातळीवर गांभीर्याने लक्ष ठेवायला लावलं असतं.. जगात कुठल्या देशात कोणत्या रोगाची साथ पसरतेय ते लक्ष ठेऊन तिथुन देशात येणार्या प्रवाशांवर लक्ष ठेवण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवली असती.. एअरपोर्टवर इमिग्रेशन पासूनच त्यांना ट्रॅक केलं असतं.. त्या रोगावर कोणते औषधोपचार उपलब्ध आहेत ते प्रयोग आणि प्रयत्न केले असते.. जगभर रोग पसरल्यावर तीन महिन्यांनी अचानक रातोरात सगळं बंद नसतं केलं.. सव्वाशे कोटींचा देश आहे आपला.. किमान आठवडा दिला असता आपापल्या घरी/ गावी पोहोचायला, किराणा सामान भरुन ठेवायला आणि मग महिनाभर पुर्ण संचारबंदी लागू केली असती..फक्त दवाखाने आणि मेडिकल स्टोअर सुरु ठेवली असती.. जे आजारी असतील / होतील त्यांना आरोग्यसेवा आणि अत्यावश्यक सेवा सुरु राहिली असती बाकी सर्व बंद.. लाॅकडाऊनच्या काळात तसंही प्रदुषण कमी झालंय.. लोकांना स्वतःसाठी, कुटुंबासाठी वेळ देता येतोय.. त्याचा चांगला वापर करायला सांगितलंं असतं.. मी- हे झालं .. आता पुढे काय करावं असं तुला वाटतं ? तो-आता आपण कचाट्यात सापडलोत.. लाॅकडाऊन उठवला तर कोरोना जोमाने पसरण्याची भिती आणि नाही उठवला तर अर्थव्यवस्था अडचणीत सापडण्याची भिती.. मी- मग ? यावर उपाय काय ? तो- मला वाटतं.. आता हळुहळु लाॅकडाऊन उठवायला हवा.. कोरोना सोबत जगायच तर टप्प्याटप्प्याने सगळं सुरू व्हायला हवं.. भाजीपाला विकायला परवानगी आहे.. पण ज्याचा चष्मा तुटला त्याने काय करायचं ? चष्म्याचं दुकान बंद.. इलेक्ट्रिकचं दुकान बंद.. गर्दी कुठे जास्त होणार- भाजीपाला घ्यायला कि चष्मा, लाईटस् घ्यायला ? ते गरजेचे नाही का ? निर्णयात विसंगती जास्त दिसते.. मी- पण शेतकर्याला मदत नको का करायला ? तो- हवी ना.. पण मग मदत नको असा कोण आहे इथे ? उद्योजकांना नको का मदत ? छोट्या व्यापार्यांना- दुकानदारांना नको का मदत ? हे सगळे टिकले तर नोकर्या टिकतील.. शेतकरी उद्योजक आणि नोकरदार सगळेच टिकले पाहिजेत ना.. मी-पण त्यासाठी पैसा कुठून आणायचा ? तो-कोण म्हणतं अर्थव्यवस्था अडचणीतून बाहेर काढायला पैसा लागतो म्हणुन ? मी- नक्की काय म्हणायचंय तुला ? तो- शाळा काॅलेजमधे शिकवलं जातं कि धंदा व्यवसाय करण्यासाठी land, labour आणि capital लागतं.. पण वास्तवात धंदा व्यवसाय करण्यासाठी लागतो आत्मविश्वास.. कधी तो कुणात जन्मतः असतो तर कधी तो द्यावा लागतो.. सरकार जेव्हा तो देते, तेव्हा धंदाच काय अख्खा देश उभा राहतो.. फक्त तो मनापासून द्यायला हवा.. बरं, पुढच्या स्टाॅपवर उतरायचंय.. मी निघु ? मी- खुप छान बोलतोस ....एक शेवटचा प्रश्न- कोरोनाच्या या काळात आपलं काय होईल ? तो -- शक्य होईल इतकी दक्षता घ्यावी.. आणि आपापली कामे प्रामाणिकपणे करावी.. तीन तत्वं लक्षात ठेवायची- Survival of the fittest.. जगा आणि जगू द्या.. एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ.. एवढं बोलून तो उतरला.. श्रीकृष्णाने अर्जुनाला रणभूमीवर गीता सांगितली होती हे ऐकलं होतं.. या पोराने मला कोरोनाच्या या बसप्रवासातील या रणभूमीवर आयुष्याची दिशा दिली.. ('मराठी संस्कृती' ग्रुप वरून साभार)
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
52941 वाचन

💬 प्रतिसाद (113)

प्रतिक्रिया

जगातील कोणत्याही देशाचे काय

ऋतुराज चित्रे
Wed, 05/27/2020 - 13:55 नवीन
जगातील कोणत्याही देशाचे काय केले ह्याने माझ्या जीवनावर काय फरक पडत नाही, माझ्या भारत सरकारने काय केले ह्याने निश्चितच फरक पडतो. पुन्हा पुन्हा हाच प्रश्न विचारतो, आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे सरकारी खर्चाने विलगिकरण करण्यास केंद्र सरकारला काय अडचण होती? आपले सरकार स्वतंत्रपणे विचार करून निर्णय घेऊ शकत नाही का? जगाचे उदाहरण न देता कोणी सांगू शकेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

का एवढा बोचतंय

चौकस२१२
Wed, 05/27/2020 - 18:05 नवीन
जगाचे उदाहरण दिले ते का एवढा बोचतंय .. केवळ या साठी ते दिले कि या लढाईत अनेक देशांचे अधिकारी एकमेकांशी देवाण घेवाण करीत आहेत ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋतुराज चित्रे

जगात इतर हि देश हे टप्य्या

ऋतुराज चित्रे
Wed, 05/27/2020 - 14:03 नवीन
जगात इतर हि देश हे टप्य्या टप्य्या ने आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर बंदी आणत होते..एकदम सगळ्या सरकारांना एका रात्रीत उमगले असे झाले नाही चूक, सगळेच देश आपापल्या देशाच्या अर्थव्यवस्थेची काळजी करत होते. कोरोना मुळे मृत्यूचे प्रमाण फक्त ३-४ % असेल अशा तेव्हा बातम्या येत होत्या. त्यामुळे सगळे बेफिकीर होते, आपले सरकारही.
  • Log in or register to post comments

अप्रेझल

मूकवाचक
Wed, 05/27/2020 - 14:55 नवीन
अप्रेझलमधे ४/५ किंवा ८/१० रेटिंग व्यवस्थापकाने दिले आणि तरीही एखादा कर्मचारी त्यात समाधानी नसेल तर असले मुद्दे पुढे केले जातात (उदा. जगावेगळे काहीच केले नाही, सहावे इंद्रिय (अंतर्ज्ञान) वापरून अमुक एक नुकसान थांबवले नाही इ. इ.). थोडक्यात मोदींचे ४/५ किंवा ८/१० असे अप्रेझल झालेले दिसते आहे. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋतुराज चित्रे

टप्य्या टप्य्या ने आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर

चौकस२१२
Wed, 05/27/2020 - 18:02 नवीन
चूक? मी स्वतः ऑस्ट्रेलियात अनुभवलंय.. तुम्ही कोणत्या माहितीच्या जोरावर हे बोलताय? टप्य्या टप्य्या ने आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर बंदी आणत होते आता जेव्हा उठवली जाईल तेव्हा पण सुरवातील शेजारच्या नुझिलन्ड मधून सुरु होईल असे दिसते आपण भारत सरकारचं काही निर्णयावर नाराज साला तर ते समजू शकतो पण म्हणून उगाच दुसऱ्या देशात असे घडलेच नाही हे काय एक उद्धरण म्हणून तुम्हाला माहिती आहे का जर ऑस्ट्रेलिया ला आपली आम्हन्याप्रमाणे फक्त "देशाच्या अर्थव्यवस्थेची काळजी कऱ्यांची असती" तर चीन मधून येणाऱ्या विद्यार्थ्यांवर त्यांनी बंदी आणली नसती! परदेशी विद्यार्थी हे फार मोठे अर्थार्जनाचे स्तोत्र आहे येथे ..जसे पुण्यात बाहेरून शिकायला येणार्यांमुळे खूप पैसे पुण्यात येतो तसेच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋतुराज चित्रे

आपण भारत सरकारचं काही

ऋतुराज चित्रे
Wed, 05/27/2020 - 20:40 नवीन
आपण भारत सरकारचं काही निर्णयावर नाराज साला तर ते समजू शकतो पण म्हणून उगाच दुसऱ्या देशात असे घडलेच नाही हे काय अपवाद असेल, नाही म्हणत नाही,परंतू तुम्ही अप्रत्यक्षपणे माझ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या मुद्याला दुजोरा देत आहे, चीनच्या विद्यार्थ्यांवर ऑस्ट्रेलियाने बंदी घालणे. मी साधा प्रश्न विचारलाय, भारत सरकारला आंतरराष्ट्रीय प्रवाशांना १४ दिवस सरकारी खर्चाने विलगीकरण करण्यात काय अडचण होती? बाकीचे देश काय करत होते हे थोडा वेळ बाजूला ठेवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

आंतरराष्ट्रीय प्रवाशांना १४ दिवस सरकारी खर्चाने

चौकस२१२
Sat, 05/30/2020 - 17:28 नवीन
अहो हि बंदी घालणे हा निर्णय घ्यायला वेळ लागलाच.. जशी माहिती ( सरकार ते सरकार च्या पातळीवर) येऊ लागली तसे टप्याय टप्य्याने निर्णय घेतले .. कुठे वेळेवर बंदी, कुठे चूक होऊन वेळ लागलं ( रुबी प्रिन्सेस क्रूझ शिप ) आणि कुठे तयारी केल्याशिवाय निर्णय घेणे शक्य नवहते असे सगळे इथंही झाले १४ दिवस सरकारी खर्चाने ठेवा हे मानणे सोप्पे आहे येथे ते केले पण त्याला सुद्धा वेळ लागला.. म्हणून लगेच आम्ही ताशेरे नाही ओढत कि २ दिवस आधी का नाही केले आणि "बाकीचे देश काय करत होते हे थोडा वेळ बाजूला ठेवा." का? जर कोणी केवळ द्वेषापोटी भारत सरकारच कसे चुकले आणि चुकलेच हे वारंवार संधी मिळेल तिथे म्हणत असेल तर माझ्यासारखाय ज्याने सतत भारताशी संपर्क ठेवला आहे आणि जगातील ४ देशात राहिला आहे तो त्यावर इतर देशांच्या मानने अशी तुलना करणारच ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋतुराज चित्रे

मला एक समजत नाहीये

विटेकर
Wed, 05/27/2020 - 14:39 नवीन
आपण संक्षीनाच का बरे पंतप्रधान करत नाही आहोत ? त्यांना सगळ्या गोष्टीतील सगळे कळते ... इतका अलौकिक दैवी महापुरुष भारतात उपलब्ध असताना आपण इतक्या असामान्य बुद्धीमत्तेचा उपयोग आपण न करुन घेणे या करंटेपणाला काय म्हणावे ? मिपाकर हो , तुम्हाला तरी कळ्ते की नाही ? एक साधा प्रश्न ते विचरताहेत .. ते वेगेवेगेळ्या पद्धतीने तुम्हाला सांग्ताहेत की मोदीनी घोड्चूक केली आहे .. तुम्ही अप्रबुद्ध .. ही साधी गोष्ट तुम्हाला समजत नाही ? किती तो निलंडपणा ?? मला अगदी हताश हताश वाटते आहे .. नशीब त्यन्च्यासारखे प्रचितीचे प्रज्ञापुरुष मिपावर आहेत .. अन्यथा आमचे काय झाले असते कोणास ठाऊक ? हे परम पित्या , किती रे तुझे उपकार आमच्यावर ! धन्य आहेस तू !
  • Log in or register to post comments

विटेकर !

संजय क्षीरसागर
Wed, 05/27/2020 - 16:07 नवीन
हे रामदासांनीच का गादी चालवली नाही ? असं विचारणं झालं ! मोदी आणि शिवाजी महाराज यांच्यात तोच नेमका फरक आहे. महाराज रामदासांचं म्हणणं ऐकायचे आणि मग समग्र विचार करुन लोकहिताचा निर्णय घ्यायचे मोदींच्याकडे एकसोएक सल्लागार आहेत. ते सगळ्यांच ऐकतात, पण कुणाचं काही मनावर घेत नाहीत. त्यांच्या निर्णयात फक्त एकच विचार असतो : माझी प्रतिमा कशी उंचावेल ! (बाकी काय वाट्टेल ती काशी झाली तरी हरकत नाही)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

केवल मोदि द्वेश

चौकस२१२
Wed, 05/27/2020 - 18:07 नवीन
यातच सर्व आले आपला केवल मोदि द्वेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

सहमत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 05/27/2020 - 18:20 नवीन
माझी प्रतिमा कशी उंचावेल आणि बाकी काय वाट्टेल ती काशी झाली तरी हरकत नाही. इतकंच सुरुय सध्या. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

तारतम्य

चौकस२१२
Wed, 05/27/2020 - 18:25 नवीन
एवढा व्यक्तीद्वेष खरंच चांगला नाही .. म्हणजे याचाच अर्थ असा होतो कि मोदी या व्यक्तीला देशाची काह्ही पडली नाहीये हे विसरू नका कि हा माणूस एका राज्याचा १५ वर्षे मुख्यमंत्री होता आणि देशाचा ६-७ वर्षे पंतप्रधान... आणि ते सुद्धा लोकशाही पद्धतीने निवडून आलेला जरा टीका करताना तारतम्य बाळगा प्रोफेश्वर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अपेक्षाच चुकीची आहे.

अर्धवटराव
Wed, 05/27/2020 - 18:34 नवीन
तारतम्य वगैरे अफुच्या गोळ्या.. कशाला उगाच ओढायच्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

तान घेऊ नका

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 05/27/2020 - 18:37 नवीन
>>>>>टीका करताना तारतम्य बाळगा प्रोफेश्वर... फार तान घेऊ नका. संयम ठेवा. _/\_ -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

टिके साठी टीका नाही

चौकस२१२
Wed, 05/27/2020 - 18:49 नवीन
आहे संयम... टिके साठी टीका नाही करत आपण.. उद्या मोदी आणि भाजप चुकले तर ते चुकले म्हणायला लाज नाही वाटत आपल्याला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नमस्ते....( जुमला)

गोंधळी
Wed, 05/27/2020 - 19:00 नवीन
नमस्ते मोदी जी https://www.youtube.com/watch?v=gqJ9cts4QPA
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

चौकस

संजय क्षीरसागर
Wed, 05/27/2020 - 19:06 नवीन
एकतर तुमचं लेखन वाचतांना बोबडे बोल ऐकू येतात आणि काही टोटल लागत नाही. त्यामुळे सुसंगत लिहलं तर वाचवेल तरी. मुद्दा काये ? मोदी कुणाचं ऐकत नाहीत ! हा घ्या पुरावा > साक्षात त्यांचाच विडिओ एक्पर्टस सांगतायंत सर्जिकल स्ट्राईकची डेट बदलू कारण ढगाळ हवामानात टार्गेट दिसणार नाहीत >पण मोदी सांगतायंत आता डेट ठरली म्हणजे ठरली. ढगांच्या आड आपली फायटर्स पण पाकिस्तानी रडारवर दिसणार नाहीत ! तुम्ही निघा ! चला रडारला फसवू या !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

बोबडे

चौकस२१२
Wed, 05/27/2020 - 19:11 नवीन
बोबडे बोल...मिपावर टंकलेखन करताना होतो त्रास पण हा मुद्दा आहे का? पण तुम्हाला वयक्तिक पाणउतारा करायचा असेल तर काय .. चालू द्या आणि मोदी गेले खड्यात .. तुम्ही पण सतत लोकडवून असं का केलं हेच गुऱ्हाळ चालू ठेवलाय ! जगात आज थोड्या फार फरकाने अशी बंदी चालू आहे पण ते दिसत नाही !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

लेखन सुधारणं हा त्यावर उपाय आहे

संजय क्षीरसागर
गुरुवार, 05/28/2020 - 14:51 नवीन
तुमचे प्रतिसाद वाचणं आणि त्यातून नेमका अर्थ काढणं अशक्य आहे. त्यामुळे तुमच्या मुद्द्याचा प्रतिवाद झाला नाही तर मनातल्या मनात, आपलं बरोबर आहे असं समाधान मानू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

प्रतिसाद वाचून काही

चौकस२१२
Sat, 05/30/2020 - 17:31 नवीन
"तुमचे प्रतिसाद वाचणं आणि त्यातून नेमका अर्थ काढणं अशक्य आहे." आणि आपले प्रतिसाद वाचून काही उपयोग नाही त्यात दोनच मुद्दे असणार हे आधीच कळलेले असते " १) मोदी कशे गाढव आणि २ ) जे काय कळते ते संक्षी यानाचा .. ब्रावो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

आपण संक्षीनाच का बरे

मोदक
Sat, 05/30/2020 - 16:53 नवीन
आपण संक्षीनाच का बरे पंतप्रधान करत नाही आहोत ? भारतात एक पप्पू पंतप्रधानपदाची आस लावून बसलेला आहे.. तितके पुरेसे नाहीये का..? >>>त्यांना सगळ्या गोष्टीतील सगळे कळते - हे चुकीचे वाक्य आहे. थोडा बदल करतो. त्यांनाच सगळ्याच गोष्टीतील सगळेच कळतेच्च
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

मजूरांनी स्थलांतर २२ मार्च ला

मराठी कथालेखक
Wed, 05/27/2020 - 17:05 नवीन
मजूरांनी स्थलांतर २२ मार्च ला केले काय की २५ मे ला केले काय किंवा दरम्यानच्या काळात केले काय ... सगळे वाईटच (कोरोनाचा प्रसार होणे, पायी , सायकलवर मिळेल ,त्या वाहनाने, लपून छपून जीवावर उदार होवून .. ई) पण मजूरांनी स्थलांतर का केले ? किंवा त्यांना स्थलांतर का करावे लागले ? काय शक्यता असतील ? १) केवळ कोरोनाच्या भीतिने ? २) केवळ मुर्खपणा म्हणून हे पाऊल उचलले ? की ३) उत्पन्नाचे साधन बंद झाले, घरभाडे देणे आणि किराणा भरणेही जिकरीचे झाले ? सरकारी मदतही मिळाली नाही ? असे काही झाले असेल का ? या तीनपैकी कोणती गोष्ट जास्त प्रमाणात स्थलांतराला कारणीभूत असावी बरे ?
  • Log in or register to post comments

अर्रर्र...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 05/27/2020 - 17:13 नवीन
लेख वाचलाच नव्हता. मुलगा आणि तुमचा संवाद उत्तम झाला आहे. मुलाला कळत आहे पण काही लोकांना कळत नै ये असंय ते.
सव्वाशे कोटींचा देश आहे आपला.. किमान आठवडा दिला असता आपापल्या घरी/ गावी पोहोचायला, किराणा सामान भरुन ठेवायला आणि मग महिनाभर पुर्ण संचारबंदी लागू केली असती..फक्त दवाखाने आणि मेडिकल स्टोअर सुरु ठेवली असती.. जे आजारी असतील / होतील त्यांना आरोग्यसेवा आणि अत्यावश्यक सेवा सुरु राहिली असती बाकी सर्व बंद..
अगदी सहमत आहे. काहीही करुन धक्कादायक निर्णय घेऊन धक्का द्यायचा या चमत्कारवजा अवतारातून आता देशाच्या नेतृत्त्वाने बाहेर यायला हवे असे वाटते. परिणामांची कल्पना न करता देशाच्या वाटेला जे आलं ते भयंकर आहे. पूर्वीही असा अनुभव घेतलाच आहे. काही वेळ देऊन लॉकडाऊन केला असता तर आज मजुरांचे जे अतोनात हाल झाले ते हाल तरी झाले नसते. बाकी कित्येक दिवसांपासून म्हणत आहे की, सरकारने योग्य निर्णय घेतले नाहीत. पहिला रुग्ण सापडल्यानंतर हालचाली करायला सुरुवात केली पण जगभर जेव्हा चर्चा सुरुच होती त्यापूर्वी काय प्रतिबंधाचे उपाय केले ? लॉकडाऊनमुळे चौन तुटेल आणि भराभर रुग्णसंख्या कमी होऊन जूनच्या सुरुवातीला आपण कोरोना मुक्त होऊ असे वाटत राहीलेले, तिसर्‍या आणि चौथ्या लॉकडाऊनच्या 'भाईयो और बहनो' म्हणून नव्या घोषणेला आले नाहीत यातच सर्व आलं. बाकी चालू द्या. चर्चा छान सुरु आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

जरा आपल्या बघायच्या कक्षा रुंदावा

चौकस२१२
Wed, 05/27/2020 - 17:54 नवीन
लॉकडाऊनमुळे चौन तुटेल आणि भराभर रुग्णसंख्या कमी होऊन जूनच्या सुरुवातीला आपण कोरोना मुक्त होऊ असे वाटत राहीलेले "करोनामुक्त" होऊ असा दावा कोणी केलाय? जगातील कोणत्याही सरकारने असा दावा केलं नाहीये लोकडवून मुळे करोना चा "प्रसार कमी होईल आणि वैद्यकीय सेवा सावरून तयारी करिता येईल" असा विचार जगातील जवळ जवळ सर्व देशांच्या सरकारने केला आणि हे व्हायला वेगवेगळ्या देशांना वेगवेगळं वेळ लागेल , काही देश लवकर साधय करू शकतील काही नाही... हा एवढा तर्क नाही समजत नाही तुम्हाला? " २१ दिवसांनंतर सगळं काही आलबेल होईल असा स्वतःचा गृहीत धरायचं आणि २२ वया दिवशी सरकारचं नावाने आरडाओरड" आज ज्या देशात हे आटोक्यात येतंय असा दिसतंय तिथे सुद्धा सरसकट बंदी उठवलेली गेली नाहीये हे लक्षात घ्या जरा आपल्या बघायच्या कक्षा रुंदावा
  • Log in or register to post comments

साहेब अपयशी सरकारबद्दल काही सांगू नका ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 05/27/2020 - 18:14 नवीन
साहेब आम्हाला आमच्या कक्षा वगैरे सर्व माहिती आहेत, आमचे तर्क आमच्यासाठी उत्तम आहेत. सरकारने गेली काही दिवस काय दिवे लावले ते सर्व आम्हाला माहिती आहे, उघड्या डोळ्यांनी ते आम्ही पाहतो आहोत हमे हमारे हाल पर छोड़ दो....! आभार....! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

मुद्दा नसला

चौकस२१२
Wed, 05/27/2020 - 18:30 नवीन
मुद्दा नसला कि हे अस्त्र बाहेर काढायचं "भारताबाहेर राहणाऱ्याला भारताबद्दल काय कळतंय.." हाहाहाहाहा जगाच जाऊद्या, निदान हे तरी टीका कर्नाऱ्यारें बघावे कि भारतासारखाय देशात हा प्रश्न सोडवणे किती कठीण आहे ते, मग ते मोदी असोत किंवा नेहरूं असते किंवा शरद पवार ..आणि महाराष्ट्रात तर पवारांचे राज्य आहे ना मग ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पैसा लागतो म्हणुन

चौकस२१२
Wed, 05/27/2020 - 18:41 नवीन
"कोण म्हणतं अर्थव्यवस्था अडचणीतून बाहेर काढायला पैसा लागतो म्हणुन ? पैसे नाही लागत? इंग्लंड ने ८०% पगार दिला जनतेला आणि ऑस्ट्रेल्याने १३० बिलियन डॉलर ( गुणिले साधारण ४६) दिले जनतेला ते पैसे काही तिजोरीत नवहते .. आपली पत वापरून कर्ज घेऊन .. पुढील काही पिढ्या हे कर्ज आम्ही फेडणार... तेव्हा एक तर पॆसा लागतोच आणि दुसरे असे कि "लॉकडवून तातडीने करणे जरुरीचे वाटले ते सुद्धा एवढे कर्ज घेऊन आणि ते भांडवशाही सरकारे म्हणजे खरंच गंभीर असणार !
  • Log in or register to post comments

मी मोदींचा पंखा..

चौकटराजा
Wed, 05/27/2020 - 19:59 नवीन
मी एरवी मोदी यांचा काही प्रमाणात पंखा आहे,. निदान मनमोहन सिंग यांच्या पार्श्वभूमीवर तर नक्कीच ! पण मी ही आता या निष्कर्षाला आलो आहे की स्थलांतरित मजूर या विषयी माझे व मोदींचे ज्ञान सारखेच आहे .आपण सर्व नेहमी ऐकतो की उत्तर भारतातून इकडे मजूर, कारागीर आले आहेत पण इथे शपथ घेऊन सांगा की याची व्याप्ती इतकी मोठी आहे असे कुणास वाटले होते का ? ज्या प्रमाणात गाड्या भरून जात आहेत किवा आता रिकाम्या जात आहेत याला काही कारणे आहेत. घरी उपाशी मरू पण परत येणार नाही अशी मनोधारणा वाला एक गट व दुसरा लवकरच सरकार धोका पत्करून कंटाळून हे निर्बंध उठवेल व आपल्याला काम मिळेल असे वाटणारा गट. मला मोदींचे असे दिसले की मी जे जगाला जमले नाही ते 15 दिवसांच्या मुदतीत करून दखवतो. तो पर्यत कोण कुठे अडकले तरी जीवनासाठी सम्भाळून घेतील .हिटलरला रशियाने ( व थंडीने )कडवा प्रतिकार केला तसा या रोगाने व लोकांच्या खुळेपणाने ही प्रतिकार केला व युद्ध लाम्बले. नोटाबंदी ही जर "बदली "होती तर प्रथम कोण कसल्या किती नोटा देतो याचे विश्लेषण करणारी यंत्रणा विकसित करून नोटा बदलता आल्या असत्या. श्रीमंतानी त्या गरीबांकडे रोकडा म्हणून ठेवायला दिल्या असत्या तर गरीब सापडले असते. अशा केवळ कुठलीही लिखापढी न करता नोटा काळा पैसा वाल्यानी गरीबाना दिल्या असत्या..... ? मला शंका आहे. मोदीना धक्का देण्याची जी एक सवय लागली आहे त्यातून काय साध्य होते हा आता इतिहास सर्वाना माहीत आहे.
  • Log in or register to post comments

एक राहिले

चौकटराजा
Wed, 05/27/2020 - 20:26 नवीन
आज लोक म्हणतात की आरोग्य यंत्रणा (रोग प्रसार वाढणारच आहे याची खात्री असल्याने ) सज्ज करण्यासाठी " लॉकडाउन" केला .जरा मोदी व उद्धव यांची सुरूवातीची भाषणे पुन्हा ऐका. त्यात या मुद्याचा उल्लेख देखील नाही. त्यांचा सर्व भर "साखळी तोडणे" यावर होता. आता ते तरी काय करतील बिचारे ! ज्या देशात 130 कोटी लोकसंख्या आहे इथे साखळी तोडणे या अल्प खर्ची उपायाखेरीज काय शक्य होते ? 130 कोटी आधारकार्डे देखील अजून 10 वर्शे झाली तरी झाली नाहीत. तिथे 130 कोटी टेस्ट ...? आज माझी परिस्थीती अशी आहे की मला डॉ ची अपोइंटमेट 20 दिवस अगोदर घ्यावी लागते. तेच डॉ मी होस्पिटलाएज झालो तर अर्ध्या तासात हजर. सरकारी दवाखान्यात जाउ तर तिथे गर्दी म्हणजे आनंद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

जरा मोदी व उद्धव यांची

मराठी कथालेखक
गुरुवार, 05/28/2020 - 00:18 नवीन
जरा मोदी व उद्धव यांची सुरूवातीची भाषणे पुन्हा ऐका. त्यात या मुद्याचा उल्लेख देखील नाही. त्यांचा सर्व भर "साखळी तोडणे" यावर होता.
सहमत. सुरवातीच्या काळात साखळी तोडणे, कोरोनाला हरवणे ,"स्टे होम , स्टे सेफ" या घोषणा होत्या. मगा आता "स्टे होम , स्टे सेफ" का बोलले जात नाही ? आता बाहेर जाणे अधिक सुरक्षित झाले का ? तर "कोरानसोबत जगण्याचा"उल्लेखही आधी नव्हता मात्र आता ते बोलले जात आहे. जर कोरोनाला हरवले तर कोरोनासोबत जगण्याचा प्रश्न येतोच कुठे ? लॉकडाउन सुरु करते वेळी एक तर सरकारांनाच (राज्य असो की केंद्र) उद्दिष्ट स्पष्ट नव्हते किंवा त्यांना उद्दिष्ट स्पष्ट असेल मात्र जनतेला ते स्पष्टपणे सांगायची तयारी /धाडस नव्हते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

सरजी एक सांगू का ? (मी खरे तर

उपेक्षित
गुरुवार, 05/28/2020 - 13:54 नवीन
सरजी एक सांगू का ? (मी खरे तर पहिल्यापासून मोदी विरोधक आहे) मोदी काय, उद्धव काय, ट्रंप काय कोणाकडेच याबद्दल सुरवातीपासून उत्तर नव्हते पण लोकांना धीर देणे हे खूप महत्वाचे होते. जे निदान उध्दव, मोदी यांनी प्रामाणिकपणे केले. मुद्दा हा कि जे काय उपाय केले गेले ते सर्व ट्रायल बेसिस वर होते कारण कोणाकडेच १००% यश देणारे उत्तर नव्हते. सरकारे चुकली असेल नाही असे नाही पण हे त्यांनी जाणीवपूर्वक लोकांना त्रास देण्यासाठी नव्हे तर लोकांना संसर्ग होऊ नये म्हणूनच केले हे निदान मलातरी खरे वाटत आहे. अजून १ बिरुटे सर तुमचे आजवर बरेच मुद्दे पटत आहे आहेत पण यावेळी तुम्ही चुकत आहात हे नक्की वाटत आहे. बाकी एकदा घालवून देऊन परत आलेल्या दिव्य पुरुषाबद्दल न बोललेले बरे :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

एकदा घालवून देऊन परत आलेल्या दिव्य पुरुषाबद्दल न बोललेले बरे

संजय क्षीरसागर
गुरुवार, 05/28/2020 - 14:47 नवीन
हा बरा विषय काढलात ! ज्या जिएसटीच्या धाग्यामुळे आयडी ब्लॉक झाला होता, त्यावर मी आल्याआल्या प्रतिसाद देऊन हे सिद्ध केलं आहे की तीन वर्षांपूर्वी मी जे म्हणत होतो तेच बरोबर होतं. तुम्ही हे सिद्ध करुन दाखवा की जिएसटीमुळे मोदींनी दिलेली किंमती कमी होण्याची हमी प्रत्यक्षात आली आहे आजही ज्या HSN Code वरुन इथे टाकलेली टेबल्स दिशाभूल करणारी आहेत हा माझा दावा होता तो निर्विवाद आहे. तो HSN Code आजपर्यंत कुणीही देऊ शकला नाही. ________________________________________ जर माझी चूक असती तर प्रशासनानं त्या क्षणी माझा आयडी ब्लॉक केला असता. _____________________________________________ माझ्या हितचिंतकानी मला इथे आणलं आहे आणि त्यासाठी मला कोणतीही रदबदली करावी लागलेली नाही. तस्मात, फालतू कमेंटस करण्याऐवजी चर्चेतला काही मुद्दा असेल तर मांडा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपेक्षित

सरकारने जीएसटी लावला

चौकस२१२
Fri, 05/29/2020 - 04:25 नवीन
आपण अर्थ क्षेत्रातील आहात म्हणून हा प्रश्न मी जिथे राहतो तिथे असाच सरकारने जीएसटी लावला काही वर्षपूर्वी, त्यावेळी सुद्धा हा योग्य आहे! नाही! यावर चर्चा झाली परंतु एक तर त्याची अंमलबजावणी देशभर एकाच वेळी आणि सुरळीत झाल्यामुळे कोणतेही विचित्र प्रकार फारसे उदभवले नाहीत.. भारतात ते उद्भवले असतील आणि यात सरकारने त्याची अंमलबजावणी नीट केली नसेल हे शक्य आहे ..मान्य पण खालील परिस्थिती दोष कोणाचा ? हे एक जागरूक नागरिक आणि अर्थ क्षेत्रातील म्हणून सांगाल का? - माझ्य मित्राच्या इमारतीला स्वच्छता/ रखवाली पुरवणारा एक कंत्राटदार होता .. त्याने जी एस टी आल्यावर आपली किंमत वाढवली.. मित्र माझ्य कडे तक्रार करीत होता... मला शंका आली म्हणून खोदून विचारल्यावर कळले कि हि वाढ होण्याचे खरे कारण हे होते कि एवढीं वर्षे त्या कंत्रादाराने कोणताच सरकारी कर भारत नसल्यमुळे तो जी किंमत आकारायचा ति किंमत आणि आता सगळा कर भरून होणे असल्यामुळे ग्राहकाला शेवटी जी किंमत मोजावी लागली ति जास्त झाली म्हणजे एवढी वॉरसेह तो कंत्रादार आणि त्याचे ग्राहक हे दोघेही कर बुडवीत होते म्हणजे असा मलिदा खात होते आणि आता प्रामाणिक पणे काम कार्यनाची वेळ आल्यावर आरडा ओरडा.. मग यात असा म्हणता येईल का कि सरसकट जी एस टी मुले किमती वाढल्या ( खुलासा: वरील उदाहरणात मुळात काय कर होते? जी एस टी लागतो कि नाही याची मला कल्पना नाही मित्राने जे वर्णन केलं त्यावरून मला जे सुचले त्यावर लिहले आहे परंतु मूळ मुद्दा हा कि जर जी एस टी मुले आपोपाप कर भरणी होत असेल तर सरकार आणि देशाला ते चांगले नाही का? दुसरे असे कि वैध मार्गाने कर कमी करणे हा नागरिकाचा हक्क आहे त्याबद्दल दुमत नाही )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

तुम्ही राहता त्या देशात जिएसटीचे दर काय आहेत ?

संजय क्षीरसागर
Fri, 05/29/2020 - 15:47 नवीन
ते कळवा, म्हणजे भारतात काय झालं आहे ते सांगतो. _________________________________________________ > माझ्य मित्राच्या इमारतीला स्वच्छता/ रखवाली पुरवणारा एक कंत्राटदार होता .. १. सर्विसेसवर पूर्वी सर्विस टॅक्स १५% होता. जिएसटीमधे १५% ची स्लॅब नाही म्हणून > तो १८% केला गेला ! (इतका अजब प्रकार जगात कुठेही पहायला मिळणार नाही) परिणामी सर्विसेसमधे कोणतीही वॅल्यू अ‍ॅडीशन न होता (उदा. टेलिफोन) सर्व देशाला नाहक ३% जादा पैसे भरायला लागले. २. कंत्राटदाराकडे, तो लाएबल असूनही सर्विस टॅक्स रजिस्ट्रेशन नसेल तर त्या तो वेळी ही गुन्हा होता आणि आता लाएबल असून जिएसटी रजिस्ट्रेशन नसेल तर तो ही गुन्हा आहे. थोडक्यात, जिएसटी आल्यावर लोकांनी झक मारत कंप्लायंस केला हा सरकार आणि त्यांच्या पित्त्यानी पसरवलेला गैरसमज आहे. ३. > म्हणजे एवढी वॉरसेह तो कंत्रादार आणि त्याचे ग्राहक हे दोघेही कर बुडवीत होते म्हणजे असा मलिदा खात होते आपण एखादा कर भरतो तेंव्हा देयकाची रितसर पावती घेणं हे अनादी कालापासून चालू आहे. सोसायटीला तर अशी पावती असल्याशिवाय खर्चाची वजावट मिळणारच नाही. परिणामी देणार्‍याला तो भुर्दंड सोसावा लागेल. मुळ काँट्रॅक्टच जर रिवाइज झालं असेल तर खर्चात वाढ होणारच. पण सरळ आणि कायदेशीर व्यावहारात पूर्वी जो १ लाखावर १५ हजार सर्विस टॅक्स द्यायला लागायचा, तो आता १८ हजार जिएसटी द्यावा लागतो..... आणि तेही सर्विसमधे कोणतीही वॅल्यू अ‍ॅडिशन नसतांना. अशाप्रकारे देशातल्या सर्वच्या सर्व सेवांवर (सेवेत काहीही बदल नसतांना) ग्राहकांच्या माथी निष्कारण ३% वाढ मारली गेली आहे _____________________________________________ आता तुम्ही तिकडचे दर कळवले की वस्तूंच्या जिएसटीविषयी बोलता येईल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

इकडे सरसकट १०% आहे जीएसटी ,

चौकस२१२
Fri, 05/29/2020 - 19:32 नवीन
इकडे सरसकट १०% आहे जीएसटी , (फक्त वाईन चे टॅक्स प्रकरण जरा वेगळे आहे ) अगदी सविस्तर माहिती येथे मिळू शकते https://www.aph.gov.au/About_Parliament/Parliamentary_Departments/Parliamentary_Library/Publications_Archive/Background_Papers/bp9798/98bp01 आता त्या भारतातील सोसायटी बद्दल "पण सरळ आणि कायदेशीर व्यावहारात पूर्वी जो १ लाखावर १५ हजार सर्विस टॅक्स द्यायला लागायचा" तो ते देत नवहता मुळात (आणि मग सोसायटी कसे काय हिशोबात मांडत होती ते विचारून सांगतो ) म्हणजे दोघेही दोषी होते तर ... म्हणजे मित्र जी तक्रार करीत होता कि बघा आत्ता खर्च वाढला ती केवळ सोयीस्कर तक्रार नाही का? सरकार चा काय दोष? लेको तुम्ही आणि तो कंत्रादार देशाचा कर मुळात बुडवीत होता आणि आता भरावा लागतोय म्हणून तक्रार? १५% चा १८% झालं हे योग्य कि अयोग्य यावर नागरिक बोलू शकतो तो प्रश्न नाही येथे ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

इकडे सरसकट १०% आहे जीएसटी

संजय क्षीरसागर
Fri, 05/29/2020 - 20:00 नवीन
इथे चार स्लॅब्स आहेत ! 5%, 12%, 18% and 28% म्हणजे किती भानगडी असतील याची कल्पना करा ! शिवाय Input Tax Credit (ITC) मधे > म्हणजे खरेदीवर भरलेल्या जिएसटीचा सेट-ऑफ, अनंत लफडी आहेत. पुन्हा जिएसटी रिटर्न्स ३ वर्ष झाली तरी अजून सुरळीत झालेली नाहीत. ____________________________________ > लेको तुम्ही आणि तो कंत्रादार देशाचा कर मुळात बुडवीत होता आणि आता भरावा लागतोय म्हणून तक्रार? त्यानं पूर्वीही कर भरायलाच पाहिजे होता आणि मित्रानं रितसर बील घ्यायला हवं होतं. त्यामुळे आता कर भरतो हे त्याचं पश्चात शहाणपण आहे. यात सरकारला स्वतःची पाठ थोपटून घेण्यासारखं काही नाही. _____________________________________ > १५% चा १८% झालं हे योग्य कि अयोग्य यावर नागरिक बोलू शकतो तो प्रश्न नाही येथे तो तर उघड प्रश्न आहे ! कारण जिएसटीमुळे सगळ्या वस्तु आणि सेवा पूर्वीपेक्षा स्वस्त होतील असा मोदींनी पार्लमेंटमधे जयघोष केला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

आजीव सभासद!

चौकस२१२
Sat, 05/30/2020 - 10:26 नवीन
"त्यामुळे आता कर भरतो हे त्याचं पश्चात शहाणपण आहे." सहमत आहे "यात सरकारला स्वतःची पाठ थोपटून घेण्यासारखं काही नाही." पण अहो यात कोण आणि कुठे म्हणताय कि सरकारने स्वतःची पाठ थोपटून घ्व्यवि ? मी आपल्याला त्या क्षेत्रातील तद्न्य म्हणून विचारायला गेलो तर त्यात "सरकार वर ताशेरे ओढणे " हे धोरण काही तुम्हाला सुटत नाही झक मारली आणि तुम्हाला विचारलं. "येन केन प्रकारे झोडप भाजप सरकार ग्यांग" जे आजीव सभासद दिस्तय ... पुढे नाही अर्थ काही विचारविनिमय करण्यात धन्य ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

जिएसटी हा मोदी सरकार महान पराक्रम म्हणून मिरवते आहे

संजय क्षीरसागर
Sat, 05/30/2020 - 12:01 नवीन
तुम्ही भारतात नसल्यानं त्याची झळ तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. खरं तर हे जिएसटीचं लफडं त्याच वेळी लोकांना कळायला हवं होतं. माझ्यासारखे जे थोडे लोक जिएसटीविरोधात बोलत होते त्यांचे आवज मोदी ट्रोलर्सनी दाबले. तुमचंही जिएसटीचं आकलन आतापर्यंत काय होतं ? ते पाहा : जिथे काही टॅक्स भरल्याचा जात नवहता तिथे यामुळे सरकारला टॅक्स मिळू लागला तर मग तक्रार कसली? आणि आता वस्तुस्थिती कळल्यावर तुमची भाषा बघा : " झक मारली आणि तुम्हाला विचारलं " एखादा सूज्ञ म्हणाला असता की जिएसटीमुळे देशाचं खरंच नुकसान झालं आहे. किंमती कमी व्हायचं सोडा, त्या वाढल्या आहेत. वस्तुस्थिती नाकारुन, केवळ व्यक्तीपूजा आणि जयघोष करुन आपण मुळ मुद्दाच हुकवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

अगदी

चौकटराजा
गुरुवार, 05/28/2020 - 17:25 नवीन
जे काय उपाय केले गेले ते सर्व ट्रायल बेसिस वर होते कारण कोणाकडेच १००% यश देणारे उत्तर नव्हते त्यामुळेच मी माझ्या प्रतिसादात असेच म्हटले आहे की ते तरी काय करतील बिचारे यासाठी मी मगेच एक उदाहरण केदारनाथ यात्रेचे दिले आहे. तिथे दोन भिन्न तट यात्रेकरूत पडले. त्यात बरोबर एकाचेच ठरले. आणखी एक सिचुएशन... समजा क्रिकेट मधे शेवटचे ओव्हर सीमर ला द्यावे की स्पिनर ला ? असा प्रशन कप्तानाला पडतो. तो चार अनुभवी खेळाडूचे ऐकून चामिडा वास ऐवजी मुरलीधरनला बोलिन्ग देतो. आठ विकेट गेल्यात या हिशेबात कोणत्या दर्जाचा फलन्दाज आता उरला आहे असा तो हिशेब असतो. पण पलिकडची टीम असते पाकिस्तानची ! ही बाब कप्तान विसरतो. पाकिस्तान् चा बोलर मुरलीधरनला पार धुतो.सामना पकिस्तानच्या हातात. कसची टाईट बोलिन्ग अन काय ? जो शत्रू दिसतच नाही ,त्याची वर्तणूक मेडिकल प्रोफेशनल ला देखील नीट माहीत नाही. त्यावेळी एका राजकीय माणसाला यश वा अपयश याची शक्यता ५० ५० टक्के असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपेक्षित

असे आहे ना .............?

चौकटराजा
Fri, 05/29/2020 - 17:32 नवीन
सरकार विविध विकास कामे व प्रशासकीय खर्च यासाठी निरनिराळ्या मार्गाने पैसा जनतेकडून गोळा करीत असते. त्यात कर व फी असे वेगवेगळे विषय आहेत. कराच्या मागचे तत्व थेट मोबदला नाही .सबब कर वाढला म्हण्जे त्याशी सम्बन्धित सेवेची गुणवत्ता वा आकारमान वाढलेच पाहिजे असा काही नियम नाही. उदा. रोड टॅक्स व रस्त्याची गुणवत्ता यान्चा थेट सम्बन्ध असेलच असे नाही. आता फी ... समजा एका सरकारी सन्ग्रहालयाची प्रवेश फी १० रू आहे ती ५० रूपये केली म्हन्जे ८ तासाचे सन्ग्रहालय आता २४ तास उघडे राहिले पहिजे असे नाही . काय ?माझे काही चुकत नाही ना ? आता अर्थ शास्त्र शिकून देखील ४५ वर्षे झाली !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

वेगळा मुद्दा आहे

संजय क्षीरसागर
Fri, 05/29/2020 - 17:54 नवीन
जून १७ आणि जुलै १७ या दोन महिन्यात टेलीफोन सेवेत सेवेत काही बदल झालेला नाही. पण जून मधे १५% सर्विस टॅक्स होता तो जुलैमधे १८% जिएसटी झाला. कारण काय ? तर जिएसटीमधे १५% असा दर नाही ! परिणाम : काहीही कारण नसतांना देशातल्या सर्व सेवा एकजात ३% नी महाग झाल्या. आणि लोकांनी मोदी सरकारचा निर्णय सिरसावंद्य मानून त्याबद्दल अवाक्षरही काढलं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

आणि आता ही निष्कारणची ३% दरवाढ

संजय क्षीरसागर
Fri, 05/29/2020 - 17:56 नवीन
आपल्याला जन्मभर सोसायची आहे याचाही जनतेला पत्ता नाही !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

परिणाम : काहीही कारण नसतांना

सुबोध खरे
Fri, 05/29/2020 - 22:58 नवीन
परिणाम : काहीही कारण नसतांना देशातल्या सर्व सेवा एकजात ३% नी महाग झाल्या. एकाही गोष्टीवर कर कमी झाला नाही? ये बात कुछ हजम नहीं हो रही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

The services supplied by the

सुबोध खरे
Fri, 05/29/2020 - 23:01 नवीन
The services supplied by the banks to Jan-Dhan account holders will be exempted from GST. https://www.google.com/amp/s/m.hindustantimes.com/india-news/full-list-of-items-set-to-get-cheaper-after-gst-council-tweaks-tax-slabs/story-vWkrDiZlDnEe4CXQaWrxaK_amp.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

@ सुबोध खरे

संजय क्षीरसागर
Sat, 05/30/2020 - 13:57 नवीन
> परिणाम : काहीही कारण नसतांना देशातल्या सर्व सेवा एकजात ३% नी महाग झाल्या अर्थात, कोणतंही सेवादात्याचं बील काढून पाहा > १ जुलै १७ पासून १५% सर्विस टॅक्साऐवजी १८ % जिएसटी लागला आहे. > एकाही गोष्टीवर कर कमी झाला नाही ? कोणत्या वस्तुवर कमी झाला ? तुम्ही दाखवा. ________________________________ हॉटेलची बीलं पाहा. पूर्वी मेन्यूवरच्या किंमती इतकेच पैसे द्यावे लागायचे. आता त्याच मेन्यूप्राइसवर पुन्हा ५% जिएसटी द्यावा लागतो. स्वस्ताई झाली का महागाई वाढली? ______________________________ इथे म्हात्र्यांनी कुण्या कॉर्पोरेट एक्स्पर्टनी तयार केलेली टेबल्स टाकली होती आणि पोस्ट जिएसटी रेजीममधे धडाक्यात किंमती उतरवून दाखवल्या होत्या. त्या वस्तुंचा HSN Code कोड विचारल्यावर "मी बांधील नाही" म्हणाले. आजतागायत तो HSN Code काही मिळाला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

@ सुबोध खरे

संजय क्षीरसागर
Sat, 05/30/2020 - 14:02 नवीन
> The services supplied by the banks to Jan-Dhan account holders will be exempted from GST. हा मोदींचा थोर विनोद वाटत नाही का ? जिथे खातीच झीरो बॅलंस आहेत तिथे जिएसटी कसा लावणार ? आणि कुठून वसूल करणार ? या अशा धूळफेकी मुळेच तर सुशिक्षित गंडले आणि मोदी पुन्हा निवडून आले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

झिरो बॅलन्सचा अर्थ त्यांना

सुबोध खरे
Sat, 05/30/2020 - 20:58 नवीन
झिरो बॅलन्सचा अर्थ त्यांना सेवेचे पैसे लावणार नाहीत असे कुठे आहे? त्या खात्यात झिरो बॅलन्स असला तरी त्याला ( किमान रक्कम नसल्याचा) दंड लावला जाणार नाही. चेक बुक किंवा इतर कोणत्याही सुविधा वर लागणार कर लावणार नाही. आपले मुद्दे गंडले कि असेच कात्रज करणे सोडून द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

आधी नीट वाचलं असतं तर कळलं असतं

संजय क्षीरसागर
Sat, 05/30/2020 - 22:01 नवीन
आता पुन्हा वाचा : > जिथे खातीच झीरो बॅलंस आहेत तिथे जिएसटी कसा लावणार ? आणि कुठून वसूल करणार ? कर वसूल करण्यासाठी खात्यात पैसे तर हवेत ना असा त्याचा अर्थ आहे. > त्या खात्यात झिरो बॅलन्स असला तरी त्याला ( किमान रक्कम नसल्याचा) दंड लावला जाणार नाही. चेक बुक किंवा इतर कोणत्याही सुविधा वर लागणार कर लावणार नाही. चेक बुकसाठी जनधन खात्याला मिनीमम बॅलन्सची अट आहे. थोडक्यात, नगण्य स्वरुपात, गोरगरीबांसाठी (जिथे जिएसटी लागणार्‍या सेवाच फारश्या नाहीत) तिथे ही सूट आहे. ______________________________________________________ आता ज्यावर चर्चा चालली आहे तो मुद्दा लक्षात घ्या : जिएसटीमुळे संपूर्ण देशात स्वस्ताई येईल हा सरकारचा दावा फोल ठरला आहे. __________________________________________ जनधन खात्यातल्या जिएसटीवर पाणी सोडल्यानं संपूर्ण देशात स्वस्ताई आली असा निष्कर्श काढता येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

महागाई वाढली

चौकस२१२
Sat, 05/30/2020 - 15:15 नवीन
आपला विरोध १५% चे १८% का केले? यावर असेल तर समजू शकतो पण मुळात म्हणजे जेव्हा बाकीचे कर काढून हा कर लावला तेव्हाची गोष्ट , तेव्हा जी एस टी मुळे महागाई वाढली असा दावा आहे का आपला? तसे असेल काही गोंष्टींच्या बाबतीत , कदाचित नसेल हि ! नक्की टीका आणि विरोध कशावर तेच समजत नाहीये.. दुसरी एक विचित्र गोष्ट माझ्य हि लक्षात आली कि आशियात ( भारत धरून ) कॊणत्याही दर तक्त्यात जी किंमत दाखवली असते त्यात कर धरलेले नसतात ? असे का? हे चुकीचे आहे ( हो मोदी चुकले... ) कारण असे कि असे ना केल्याने आपण ग्राहक म्हणून आकर्षित तर होतो त्याकडे पण मग नंतर लक्षात येते कि अरे एकूण खर्च दरपत्रकापेक्षा जास्त होणार येथे असे नाही .. कोफी जर ४ डॉलर ला असले तर ४ डॉलरलाच ... त्याचा अर्थ ४ डॉलर ++ असा होत नाही ...कायद्याने हे सक्तीचे आहे कि तुम्ही सर्व कर हे ग्राहकाला आधीच दाखवले पाहिजेत .. १ दिवसाचे हॉटेल भाडे जर १५५ $ तर ते (१५० + ५ जीएसटी १०% ) दुर्दैवाने असे म्हणावे लागेल कि मुळात करताना नीट करावे हे का नाही ? कशाची कमतरता आहे? गणित , आणि तंत्रन्यान यात येवडः पुढारलेला समाज ... पण गोची करून ठेवतात ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

आता थोडं थोडं कळतंय तुम्हाला

संजय क्षीरसागर
Sat, 05/30/2020 - 15:58 नवीन
> आपला विरोध १५% चे १८% का केले? यावर असेल तर समजू शकतो जिएसटीमधे १५% ही स्लॅब नाही म्हणून सर्व सेवांवर सरळ १८% जिएसटी हा कुठला न्याय आहे ? __________________________________________ > जी एस टी मुळे महागाई वाढली असा दावा आहे का आपला ? अर्थात, व्यावसायिकांनी मुळ किंमती त्याच ठेवून त्यावर जिएसटी वसुली चालू केली. मग स्वस्ताई झाली का महागाई ? __________________________ > कोफी जर ४ डॉलर ला असले तर ४ डॉलरलाच ... त्याचा अर्थ ४ डॉलर ++ असा होत नाही इथे दरपत्रकात खाली टिप मारलेली असते > + जिएसटी ... % ! आणि लोकांना बील आल्यावर ते कळतं ! आता मोदींचा जिएसटी म्हटल्यावर लोक काय बोलणार ? वास्तविकात एमारपी ही ऑल इन्क्लुजीव प्राइस हवी. _____________________________ > मुळात करताना नीट करावे हे का नाही ? कशाची कमतरता आहे? गणित , आणि तंत्रन्यान यात येवडः पुढारलेला समाज ... पण गोची करून ठेवतात .. समाज सुबुद्ध असता तर असे झोलबाज सरकार निवडून कसे आले असते ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा