परवा ऑफिसला जाण्यासाठी ठाण्याहून बस पकडली. बाजुच्या सिटवर बसलेल्या मुलाने बॅगेतुन पुस्तक काढुन वाचायला लागला. मोबाईलच्या जमान्यात चक्क पुस्तक वाचताना पाहुन माझं कुतुहलही चाळवलंच. हळुच वाकुन पाहिलं तर पब्लिक सर्व्हिस परिक्षेचं पुस्तक होतं. म्हटलं घ्यावा जरा याचा इंटरव्हयू. तेवढाच आपलाही टाईमपास होईल.
तोपर्यंत बसही सुसाट वेगाने निघाली होती.
मी- कसला अभ्यास करतोयस ? कोरोना चा का ? (खेळीमेळीच्या वातावरणात गप्पा व्हाव्यात म्हणून मी कोपरखळीने सुरुवात केली..
तो-पब्लिक सर्व्हिस कमिशन परिक्षेचा अभ्यास करतोय..
मी- मग कोरोना बद्दल काही वाचलंस का ? काय होईल पुढे ? आटोक्यात येईल का ?
तो-कोरोना बद्दल अधिकृत काॅमेंट करायला मी डाॅक्टरही नाही आणि वैज्ञानिकही नाही.. पण हो, W.H.O., केंद्र सरकार, राज्य सरकार, जागतिक पातळीवरच्या घडामोडी यांवरून काही गोष्टी स्पष्ट होतायत.. कोरोना हा विषाणू आता आपल्या सोबत किमान काही वर्षे तरी राहणार.. आणि याबाबत वेळोवेळी प्राप्त होणार्या सुचना काटेकोरपणे पालन कराव्या लागतील. *डार्विनच्या सिद्धांतानुसार it's survival of the fittest..* so, fit रहायचा प्रयत्न करायचा..
मी- म्हणजे यापुढे कायम योगा प्राणायाम, व्यायाम करावा लागणार..
तो-ते तर आहेच.. पण त्याहुन थोडं पुढे जाऊन मी असं म्हणेन कि आपण आपल्या औकातीत रहायला शिकायला हवं..
मी- म्हणजे ?
तो-आपण जन्माला येताना तीन गोष्टी सोबत घेऊन येतो.. बौद्धिक- शारीरिक आणि मानसिक ताकद, घरचे संस्कार आणि आपलं नशीब... यातुन जे निर्माण होतं त्याला व्यक्तिमत्व विकास म्हणतात.. त्यातूनच निर्माण होते इम्युनिटी.. कुठल्याही रोगाशीच नाही तर समस्येशी लढण्याची ताकद.. ती कुणाची थोडी कमी अधिक असु शकते.. ती प्रामाणिकपणे कशी वाढवता येईल याचा प्रयत्न करायला हवा..
पण सध्या प्रोटीन पावडर खाऊन दंडावर बेडकुळ्या दाखवत फिरण्याच्या शाॅर्टकट काळात ,स्पर्धेत टिकण्यासाठी चुकीच्या मार्गाचा अवलंब केला जातो त्यातुन तयार होतं tension आणि त्यातुन तयार होतात विविध आजार.. त्याने इम्युनिटी कमी होते आणि नेमका तेव्हाच कोरोना चा शिरकाव होतो.. हेच जर आपण वास्तव स्विकारून प्रामाणिकपणे राहिलो तर कमी त्रास होईल..
मी-मग यात सरकारच्या कामाबद्दल तुझं काय मत ? तू जर पंतप्रधान असतास तर काय केलं असतंस ?
तो- शाळेतल्या निबंधाची आठवण झाली.. जर मी पंतप्रधान असतो तर.... असो, मी जर पंतप्रधान असतो तर केंद्रीय आरोग्य खात्याला जागतिक पातळीवर गांभीर्याने लक्ष ठेवायला लावलं असतं.. जगात कुठल्या देशात कोणत्या रोगाची साथ पसरतेय ते लक्ष ठेऊन तिथुन देशात येणार्या प्रवाशांवर लक्ष ठेवण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवली असती.. एअरपोर्टवर इमिग्रेशन पासूनच त्यांना ट्रॅक केलं असतं.. त्या रोगावर कोणते औषधोपचार उपलब्ध आहेत ते प्रयोग आणि प्रयत्न केले असते.. जगभर रोग पसरल्यावर तीन महिन्यांनी अचानक रातोरात सगळं बंद नसतं केलं.. सव्वाशे कोटींचा देश आहे आपला.. किमान आठवडा दिला असता आपापल्या घरी/ गावी पोहोचायला, किराणा सामान भरुन ठेवायला आणि मग महिनाभर पुर्ण संचारबंदी लागू केली असती..फक्त दवाखाने आणि मेडिकल स्टोअर सुरु ठेवली असती.. जे आजारी असतील / होतील त्यांना आरोग्यसेवा आणि अत्यावश्यक सेवा सुरु राहिली असती बाकी सर्व बंद..
लाॅकडाऊनच्या काळात तसंही प्रदुषण कमी झालंय.. लोकांना स्वतःसाठी, कुटुंबासाठी वेळ देता येतोय.. त्याचा चांगला वापर करायला सांगितलंं असतं..
मी- हे झालं .. आता पुढे काय करावं असं तुला वाटतं ?
तो-आता आपण कचाट्यात सापडलोत.. लाॅकडाऊन उठवला तर कोरोना जोमाने पसरण्याची भिती आणि नाही उठवला तर अर्थव्यवस्था अडचणीत सापडण्याची भिती..
मी- मग ? यावर उपाय काय ?
तो- मला वाटतं.. आता हळुहळु लाॅकडाऊन उठवायला हवा.. कोरोना सोबत जगायच तर टप्प्याटप्प्याने सगळं सुरू व्हायला हवं.. भाजीपाला विकायला परवानगी आहे.. पण ज्याचा चष्मा तुटला त्याने काय करायचं ? चष्म्याचं दुकान बंद.. इलेक्ट्रिकचं दुकान बंद.. गर्दी कुठे जास्त होणार- भाजीपाला घ्यायला कि चष्मा, लाईटस् घ्यायला ? ते गरजेचे नाही का ? निर्णयात विसंगती जास्त दिसते..
मी- पण शेतकर्याला मदत नको का करायला ?
तो- हवी ना.. पण मग मदत नको असा कोण आहे इथे ? उद्योजकांना नको का मदत ?
छोट्या व्यापार्यांना- दुकानदारांना नको का मदत ? हे सगळे टिकले तर नोकर्या टिकतील.. शेतकरी उद्योजक आणि नोकरदार सगळेच टिकले पाहिजेत ना..
मी-पण त्यासाठी पैसा कुठून आणायचा ?
तो-कोण म्हणतं अर्थव्यवस्था अडचणीतून बाहेर काढायला पैसा लागतो म्हणुन ?
मी- नक्की काय म्हणायचंय तुला ?
तो- शाळा काॅलेजमधे शिकवलं जातं कि धंदा व्यवसाय करण्यासाठी land, labour आणि capital लागतं.. पण वास्तवात धंदा व्यवसाय करण्यासाठी लागतो आत्मविश्वास.. कधी तो कुणात जन्मतः असतो तर कधी तो द्यावा लागतो.. सरकार जेव्हा तो देते, तेव्हा धंदाच काय अख्खा देश उभा राहतो.. फक्त तो मनापासून द्यायला हवा..
बरं, पुढच्या स्टाॅपवर उतरायचंय.. मी निघु ?
मी- खुप छान बोलतोस ....एक शेवटचा प्रश्न-
कोरोनाच्या या काळात आपलं काय होईल ?
तो -- शक्य होईल इतकी दक्षता घ्यावी.. आणि आपापली कामे प्रामाणिकपणे करावी..
तीन तत्वं लक्षात ठेवायची-
Survival of the fittest..
जगा आणि जगू द्या..
एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ..
एवढं बोलून तो उतरला..
श्रीकृष्णाने अर्जुनाला रणभूमीवर गीता सांगितली होती हे ऐकलं होतं.. या पोराने मला कोरोनाच्या या बसप्रवासातील या रणभूमीवर आयुष्याची दिशा दिली..
('मराठी संस्कृती' ग्रुप वरून साभार)
वाचने
53190
प्रतिक्रिया
113
मिसळपाव
प्रतिक्रिया
करेक्ट बोलला आहे मुलगा
बरेचसे बरोबर बोलला आहे !
लॉकडाऊनचे साईड इफेक्टस
वाचनमात्र झालेल्या पोस्टवर
पुन्हा वाचा
In reply to वाचनमात्र झालेल्या पोस्टवर by सुबोध खरे
' Prevention is better than
तारे
बरोबरच आहे.
In reply to तारे by कपिलमुनी
जबरदस्त पॉइंटे !
In reply to बरोबरच आहे. by मराठी कथालेखक
बरं आहे संभाषण !!
मग आता काय चाललंय ?
In reply to बरं आहे संभाषण !! by अर्धवटराव
अशी लॉजिकली शक्यता आहे की नाही ...
In reply to मग आता काय चाललंय ? by संजय क्षीरसागर
२) लॉकडाऊनच्या काळात वैद्यकीय
In reply to मग आता काय चाललंय ? by संजय क्षीरसागर
बाकी सरकार वर टीका करणे आणि
In reply to २) लॉकडाऊनच्या काळात वैद्यकीय by सुबोध खरे
सहमत
In reply to बाकी सरकार वर टीका करणे आणि by झपाटलेला फिलॉसॉफर
अशा सुसंगत प्रतिसादावर चर्चा होऊ शकते
In reply to २) लॉकडाऊनच्या काळात वैद्यकीय by सुबोध खरे
मजुरांना कितीही अवधी दिला असता तरी ते स्वतःहुन गेलेच नसते.
In reply to अशा सुसंगत प्रतिसादावर चर्चा होऊ शकते by संजय क्षीरसागर
मजुरांना कितीही अवधी दिला असता तरी ते स्वतःहुन गेलेच नसते ?
In reply to मजुरांना कितीही अवधी दिला असता तरी ते स्वतःहुन गेलेच नसते. by अर्धवटराव
सर्जिकल स्ट्राईक मध्ये नियोजन
In reply to मजुरांना कितीही अवधी दिला असता तरी ते स्वतःहुन गेलेच नसते ? by संजय क्षीरसागर
सर्जिकल स्टाईक हे
In reply to सर्जिकल स्ट्राईक मध्ये नियोजन by सुबोध खरे
कॉमनसेन्स...
In reply to मजुरांना कितीही अवधी दिला असता तरी ते स्वतःहुन गेलेच नसते ? by संजय क्षीरसागर
प्रश्न स्थलांतराचा नव्हता... रोगाचा प्रसार थांबवण्याचा होता ?
In reply to कॉमनसेन्स... by अर्धवटराव
कसली व्यर्थता ??
In reply to प्रश्न स्थलांतराचा नव्हता... रोगाचा प्रसार थांबवण्याचा होता ? by संजय क्षीरसागर
स्थलांतर करणे हा उद्देशच नव्हता ?
In reply to कसली व्यर्थता ?? by अर्धवटराव
कितपत शिक्षणाची आवश्यकता आहे ?
In reply to स्थलांतर करणे हा उद्देशच नव्हता ? by संजय क्षीरसागर
नियोजन
In reply to कसली व्यर्थता ?? by अर्धवटराव
अर्धवट रावांसोबत सहमत
In reply to अशा सुसंगत प्रतिसादावर चर्चा होऊ शकते by संजय क्षीरसागर
मग आता काय चाललंय ?
In reply to मग आता काय चाललंय ? by संजय क्षीरसागर
मुद्दा काये ?
In reply to मग आता काय चाललंय ? by अर्धवटराव
चुकीचं अझम्प्शन आहे.
In reply to मुद्दा काये ? by संजय क्षीरसागर
हातातला घास पानात सोडुन आहे त्या अवस्थेत आपापल्या घरी जा ?
In reply to चुकीचं अझम्प्शन आहे. by अर्धवटराव
चुका वगैरे अजीबात नाहि
In reply to हातातला घास पानात सोडुन आहे त्या अवस्थेत आपापल्या घरी जा ? by संजय क्षीरसागर
१००० वेळा सहमत आहे अर्धवट यांच्याशी,
In reply to चुका वगैरे अजीबात नाहि by अर्धवटराव
अन्यथा आहे त्या पेक्षा दयनीय परिस्थीती ओढावली असती ?
In reply to चुका वगैरे अजीबात नाहि by अर्धवटराव
२४ मार्चचा स्प्रेड आणि आताचा
In reply to अन्यथा आहे त्या पेक्षा दयनीय परिस्थीती ओढावली असती ? by संजय क्षीरसागर
कॉमनसेन्स...
In reply to अन्यथा आहे त्या पेक्षा दयनीय परिस्थीती ओढावली असती ? by संजय क्षीरसागर
खरच पराकोटीची दयनीय असावी लागते...
In reply to कॉमनसेन्स... by अर्धवटराव
पहिल्यापासून मोदी काय किंवा
In reply to खरच पराकोटीची दयनीय असावी लागते... by अर्धवटराव
बरोबर बोललात
In reply to पहिल्यापासून मोदी काय किंवा by उपेक्षित
कोट्यवधी मजूर संख्या हे उगाच
अवास्तव अपेक्षा
In reply to कोट्यवधी मजूर संख्या हे उगाच by ऋतुराज चित्रे
सरसकट सर्व आंतरराष्ट्रीय
In reply to अवास्तव अपेक्षा by अर्धवटराव
कधिपासुन विलगीकरण करायला हवं होतं ?
In reply to सरसकट सर्व आंतरराष्ट्रीय by ऋतुराज चित्रे
चीन मधे पहिला मृत्यु झाला
In reply to कधिपासुन विलगीकरण करायला हवं होतं ? by अर्धवटराव
कनिका कपूर बाधित असतांना
In reply to चीन मधे पहिला मृत्यु झाला by ऋतुराज चित्रे
तब्लिगींबद्दल का गुळणी धरून
In reply to कनिका कपूर बाधित असतांना by संजय क्षीरसागर
सरकार प्रतिबंधात्मक उपाय करण्यात कमी पडले...
In reply to चीन मधे पहिला मृत्यु झाला by ऋतुराज चित्रे
सहमत
गृहीत
कनिका कपूर बाधित असतांना
In reply to गृहीत by चौकस२१२
जगातील कोणत्याही देशाचे काय
In reply to गृहीत by चौकस२१२
का एवढा बोचतंय
In reply to जगातील कोणत्याही देशाचे काय by ऋतुराज चित्रे
जगात इतर हि देश हे टप्य्या
अप्रेझल
In reply to जगात इतर हि देश हे टप्य्या by ऋतुराज चित्रे
टप्य्या टप्य्या ने आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर
In reply to जगात इतर हि देश हे टप्य्या by ऋतुराज चित्रे
आपण भारत सरकारचं काही
In reply to टप्य्या टप्य्या ने आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर by चौकस२१२
आंतरराष्ट्रीय प्रवाशांना १४ दिवस सरकारी खर्चाने
In reply to आपण भारत सरकारचं काही by ऋतुराज चित्रे
मला एक समजत नाहीये
विटेकर !
In reply to मला एक समजत नाहीये by विटेकर
केवल मोदि द्वेश
In reply to विटेकर ! by संजय क्षीरसागर
सहमत.
In reply to विटेकर ! by संजय क्षीरसागर
तारतम्य
In reply to सहमत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अपेक्षाच चुकीची आहे.
In reply to तारतम्य by चौकस२१२
तान घेऊ नका
In reply to तारतम्य by चौकस२१२
टिके साठी टीका नाही
In reply to तान घेऊ नका by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नमस्ते....( जुमला)
In reply to टिके साठी टीका नाही by चौकस२१२
चौकस
In reply to टिके साठी टीका नाही by चौकस२१२
बोबडे
In reply to चौकस by संजय क्षीरसागर
लेखन सुधारणं हा त्यावर उपाय आहे
In reply to बोबडे by चौकस२१२
प्रतिसाद वाचून काही
In reply to लेखन सुधारणं हा त्यावर उपाय आहे by संजय क्षीरसागर