स्पर्धेनंतरची शशक : निरपराध
लेखनविषय (Tags)
"आई, कधी येणार बडोदा?"
"निघेल गाडी लगेच."
"कंटाळा आला या प्रवासाचा! राम उगीच गेला होता अयोध्येबाहेर."
"बाळ, असं म्हणू नये."
"का नको? अयोध्येतच राहिला असता तर लोकांनी त्याचं मंदिर बांधलंच नसतं ना तिथे. मग आपल्याला एव्हढं दूर जायला लागलं नसतं."
"अरे, त्याच्या वडलांनी आज्ञा होती वनवासात जायची. शिवाय राक्षस ऋषीमुनींना त्रास द्यायचे ते वेगळंच."
"आपण बडोद्याहून अयोध्येत मंदिर बांधायला जायचंच कशाला?"
"कळेल तुला मोठं झाल्यावर!"
"पण निरपराध्यांना कशासाठी त्रास द्यायचा? राक्षसांना कसला आनंद मिळतो?"
"कळेल तुला मोठं झाल्यावर!"
"निरपराध्यांना कसं वाटंत असेल?"
"कळेल तुला मोठं झाल्यावर!"
"आई, बडोदा कधी येणारे?"
"आताच तर गाडी निघालीये. बघ कोणतं गाव गेलं ते!"
"गो----ध----रा!"
---------------------------
वाचकहो,
कथा वाचल्याबद्दल धन्यवाद. साहित्य संपादकांनी ही कथा शशक स्पर्धेत स्वीकारली नाही. मात्र ही मिपावर वा अन्यत्र स्वतंत्रपणे प्रकाशित केलेली चालेल म्हणून सांगितलं. म्हंटलं स्पर्धा संपू दे.
आ.न.,
-गा.पै.
प्रतिक्रिया
+1
+1
+१
+१
+१
बडोदा, अयोध्या आणि कळेल तुला
सर्व प्रतिसादकांचे आभार
"गो........ध.....रा....."
अंगावर काटा आला
+१
व्वा, छानच !
योगेश कोलेश्वर, मुक्त विहारि,