Skip to main content

शिवसेनेची झोप की जाणिवपुर्वक राजकीय गोगपिद?

शिवसेनेची झोप की जाणिवपुर्वक राजकीय गोगपिद?

Published on 13/11/2019 - 09:53 प्रकाशित
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदान २१ ऑक्टोबर २०१९ निकाल २४ ऑक्टोबर २०१९ . २४ ऑक्टोबर २०१९ पर्यंत भाजपा आणि शिवसेना युतीस मतदान करणारी जनता दोहोत अगदीच सरकार बनु न शकण्या इतपत काही बिनसण्याची शक्यता आहे याबद्दल महाराष्ट्रीय सर्वसामान्य जनता अनभिज्ञ होती की मतदार बावळट होता ? २४ ऑक्टोबर नंतर शिवसेना नेते ५०:५० फॉर्म्युलॅच्या गोष्टी करतात भाजपा अध्यक्ष अमित शहांनी आश्वासन दिल्याचे म्हणतात. पण एकुण वाक्य रचनेवरुन मुख्यमंत्रीपद्दवर ५०:५० टक्के करण्याचे आश्वासन न देता अस्पष्टता ठेवली असण्याची शक्यता असू शकते. एखादी गोष्ट स्पष्ट न करणे यास मराठीत गोगपिद (गोमा गणेश पितळी दरवाजा) असा वाक्प्रचार आहे. शिवसेना नेतृत्वासोबत बोलताना अमित शहांनी गोगपिद केले असेल किंवा नसेल पण त्यानंतर म्हणजे १३ ऑक्टोबर २०१९ चा टाईम्स नाऊ या इंग्रजी टिव्ही चॅनलवरची अमित शहांची मुलाखत व्हिडीओ पुढे आला आहे ज्यात ३८मिनीटे ३८ सेकंदपासून पत्रकार नाविका कुमार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी कोण असतील तर अमित शहा केवळ देवेंद्र फडणविसच असतील हे अत्यंत सुस्पष्टपणे सांगताना दिसतात. सर्वसामान्य मतदाराने दोघांचेही मुख्यमंत्रीपदी दावे ऐकले तरी गोष्टी न ताणता तोडगे निघतील कुणितरी नमते घेईल असाच सर्वसामान्य मतदार विचार करेल. पण ज्यांना आपल्या भूमिका टोकाच्या आहेत हे माहित असते त्यांना १३ ऑक्टोबर पर्यंत परस्परांच्या भुमिका जुळत नाहीत आणि टोकाच्या आहेत त्यांनी त्या टोकाच्या आहेत हे जनतेस / मतदारांना सुस्प्ष्टपणे का नाही सांगितले असा प्रश्न आहेच. अमित शहांना आधी माहित नसेल तरी १३ ऑक्टोबरला टाईम्स नाऊ पत्रकाराकडून आदीत्य ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदावरील दाव्या बाबत समजलेले होते. आणि अमित शहांच्या मुलाखतीची वार्ता शिवसेना प्रमुखांच्या कानावर गेली असणार त्यांनी मतदारांना तोंडघशी घालण्यापुर्वी आपापसात चर्चा का केली नाही ? हा प्रश्न व्हॅलिड रहातोच पण.. शिवसेना प्रमुख निकाला नंतर ज्या पत्रकार परिषदा घेत फिरत आहेत त्या एकाही पत्रकार परिषदेत १३ ऑक्टोबरच्या अमितशहांच्या मुलाखतीतील भूमिकेचा उल्लेख का करत नाहीत ? सर्वसामान्य जनतेचे सर्वच राजकीय भाष्यांवर लक्ष नसेल पण शिवसेनेच्या राजकीय नेतृत्वापैकी कुणाचेच लक्ष नसेल तर १३ ऑक्टोबर पासून झोपले होते किंवा १३ ऑक्टोबरची मुलाखत जनतेपासून सोईस्कर लपवत आहेत ? महाराष्ट्रीय जनतेशी हि फसवा फसवी का चालू आहे ? ३८ व्या मिनीटापासून पुढे पहावे

याद्या 85756
प्रतिक्रिया 204
५० :५० चे सूत्र आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री असे जर अगोदरच ठरले असेल तर शिवसेनेने १२४ (आणि भाजपने १६४) जागांवर निवडणूक लढवण्याचे कसे मान्य केले? तब्बल ४० जागा कमी लढवून शिवसेनेस अर्धा वाटा देण्याचे भाजपने अगोदरच ठरवले असेल असे अजिबात वाटत नाही. (त्यातून लढवलेल्या जागांपैकी ४५ % जागीच (५६/१२४) त्यांचे उमेदवार निवडून आले याउलट भाजपचे (१०५/१६४) ६५ % जागी उमेदवार निवडून आले आहेत.) आणि असे झाल्यानंतरसुद्धा १०५ : ५६ हि टक्केवारी ६५ :३५ येते. मग जवळ जवळ दुप्पट जागा निवडून आणल्यावर शिवसेनेचाच मुख्यमंत्री असला पाहिजे हि मागणी सुद्धा अनाकलनीय आहे. जर श्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या वडिलांना वचन दिले होते कि मी एक ना एक दिवस शिवसेनेचा मुख्यमंत्री आणेनच तर त्यांनी १४४ जागा निवडून आणायला हव्या होत्या १२४ जागा लढवल्या तर १४४ येणे शक्य नाहीच. बरं एक ना एक दिवस शिवसेनेचा मुख्यमंत्री आणेनच असे वाचन दिले होते तर तो दिवस आजच आणि आत्ताच असा दुराग्रह कशासाठी? हा केवळ "अहंगंड" आहे असे स्पष्ट दिसते आहे.

In reply to by सुबोध खरे

जेव्हां जेंव्हा निकालात स्पष्टबहुमत नसते व स्पष्ट पराजयही नसतो तेंव्हा कोण चूक कोण बरोबर हा विषयच अस्थानी होतो. तार्किक मुद्देसूदता आकडेमोड याची राजकीय उपयुक्तता संपुष्टात येते. मागील निवडणुकीत युती तोडून शिवसेनेला दुखावले, मेगा भरती करून काँग्रेस व रा काँग्रेसला डिवचले पण उघड पाठिंबा देणाऱ्या(व छुपा विरोध करणाऱ्या) शरदपवारांना ED तर्फे हात लावायचे धाडस करून भाजपने घोडचूक केली व तीन कट्टर विरोधक तयार केले ज्यातील एकालाही भाजपा नको आहे आणी हेच समान सूत्र आहे. त्यामुळे विरोधक एकत्र येणार हे जर कोणी समजून घ्यायला तयार नसेल तर त्यास कमालीची राजकीय अपरिपक्वता म्हटले जाईल. आता फक्त विरोधकांची मोट बांधली कशी जाईल याचेच कुतूहल आहे. भाजपाने परतीचे दोर जवळपास कापूनच टाकले आहेत असे समजू शकतो (समजणे योग्य कारण हे राजकीय प्रकरण आहे व भाजपाही पलटी मारू शकतो पण त्याचे स्वागत कोण करणार हा विषय उरतोच ) .काही लोकं खासगीत असेही म्हणतात की भाजपाला 80 पर्यंत रोखायचेच डावपेच खेळले गेलेत पण भाजपाने तरीही 100 पार केली ही फार मोठी गोष्ट आहे. भाजपा हाय कमांडला याचा अंदाज आधीच आला असल्याने, सुरुवातीलाच सेनेसोबत युती, व निकाला नंतर राममंदिर निकालाची वाट व नंतर राज्यपालांतर्फे भाजपा सोडून इतरांना जुळवाजुळव करायची संधी न देता त्वरित राष्ट्रपती राजवट लागू करणे या खेळया केल्या, मोदी पहिल्यांदा निवडून आले असताना त्या लाटेवर शिवसेनेला लाथाडणारा भाजपा दुसर्यावेळीही मोदी निर्विवादपणे निवडून आल्यावरही सेनेशी अधिकृत निवडणूकपूर्व युती करतो ही गोष्ट पुरेशी बोलकी आहे.

In reply to by जॉनविक्क

>निकाला नंतर राममंदिर निकालाची वाट इतका पूर्वग्रह असेल असे वाटले नव्हते मुळात हा निकाल भाजपाला "लोकसभा निवडणुकी पूर्वी हवा होता" त्यावर श्री कपिल सिब्बल यांनी गदारोळ केला त्यानंतर हा निकाल भाजपाला "विधानसभा निवडणुकीपूर्वी हवा होता" तसेही झाले नाही आणि तुम्ही हा निकाल निवडणुकीच्या निकालानंतर म्हणताय? सर्वोच्च न्यायालय हे कुणाच्याही राजकीय फायद्यानुसार चालत नाही हे अनेक वेळेस सिद्ध होऊनहि त्यांचा निवाडा एका य:कश्चित राज्याच्या विधानसभेच्या निकाला नंतर भाजपाला "आणता येतो" असे आपल्याला वाटत असेल तर धन्य आहे.

In reply to by सुबोध खरे

सर्वोच्च न्यायालय हे कुणाच्याही राजकीय फायद्यानुसार चालत नाही हे अनेक वेळेस सिद्ध होऊनहि माझी नाही पण काही लोकांची अशी चर्चा आहे १४ नवं लाच कसा राहुल गांधी डोस मिळाला ? शिव सेनेच्या अपील ला कोर्टाने लांबणीवर कसे टाकले ? सलमान च्या गाडीचा ड्राइवर कोण ?

In reply to by हस्तर

१४ नवं लाच कसा राहुल गांधी डोस मिळाला ? १७ नोव्हेंबर ला सरन्यायाधीश श्री रंजन गोगोई निवृत्त होत आहेत यामुळेच १)अयोध्या २) राहुल यांच्या विरुद्धची अवमानना याचिका ३)शबरीमाला, ४) माहिती अधिकार व सरन्यायाधीश कार्यालय आणि ५) राफेल अशा निकाल राखून ठेवलेल्या याचिकांचा निकाल त्या अगोदर दिला गेला आहे. हे सर्वत्र वृत्तपत्रात मोठ्या ठळक बातम्यात येत असताना आपल्याला माहिती नसावे? https://www.indiatoday.in/india/story/action-packed-week-at-sc-with-more-big-verdicts-before-cji-ranjan-gogoi-retires-1618049-2019-11-12 राहिली गोष्ट --शिवसेनेची याचिका --ती जर न्यायालयापुढे सादर केली तरच त्यावर न्यायालय निकाल देईल ना? https://www.indiatoday.in/india/story/shiv-sena-supreme-court-plea-maharashtra-governor-government-formation-1618377-2019-11-13 अभ्यास वाढवा एवढेच मी म्हणेन

In reply to by हस्तर

आपल्याला समजून घ्यायचेच नसेल तर न्यायालयीन प्रक्रियेबद्दल आपल्याला घोर अज्ञान आहे एवढे बोलून मी खाली बसतो.

In reply to by हस्तर

राहुल गांधी हे 'प्रौढत्वे निज शैशवास जपणे ' या बाण्याचे आहेत. तसे त्यांनी आपल्या बोलण्याने आणि वागण्याने वारंवार सिद्ध केले आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने त्यांना ठोठावण्यासाठी बाल दिनाची निवड केली.

In reply to by हस्तर

१४ नवं लाच कसा राहुल गांधी डोस मिळाला ? सरन्यायाधीश श्री रंजन गोगोई यांचा काळ आपल्या पदावर राहण्याचा शेवटचा कामाचा दिवस होता. ( अर्थात त्यात त्यांनी कोणताही खटला सुनावणीस घेतला नाही). परंतु ९ तारखेला अयोध्या खटल्याचा निकाल दिल्यानंतर ११ १३ आणि १४ असे फक्त तीन कामाचे दिवस शिल्लक होते त्यात त्यांनी बाकी चार फार महत्त्वाचे खटल्यांचे निकाल दिले. यात राहुल गांधींचा निकाल आणि राफेल चा निकाल हे एकमेकांशी संबंधित होते म्हणून १४ लाच दिला गेला. बाकी एकंदर त्यांची उच्च दर्जाची बुद्धिमत्ता पाहिली तर बाल दिनाच्या दिवशीच त्यांना "ताकीद देऊन" माफी दिली हा काव्यात्मक न्यायच म्हणावा लागेल. कारण एवढं सगळं नाटक होऊनही अजून ते न्या जोसेफ यांच्या निकालपत्रात एक खुसपट काढून राफेल साठी "संयुक्त खासदार समिती" JPC बसवा असेच म्हणत आहेत. काही लोक सुधारणार नाहीत हेच खरं. सुदैवाने भारतीय जनतेने त्यांना आपले पंतप्रधान म्हणून निवडले नाही हि जनतेच्या सुज्ञपणाची ग्वाहीच आहे

In reply to by सुबोध खरे

की आमचा एक आपण मानलेला पूर्वग्रह सोडून इतर काहीही मतव्यक्त करण्याजोगे सापडू नये. राहिले भाष्य आमच्या (तुम्ही मानलेल्या) पूर्वग्रहाचे, तर इतकेच म्हणेन पूर्वग्रह सोडा आणी अभ्यास वाढवा, म्हणजे वाहत्या गँगेत हात धुणे कशाला म्हणतात हे आपणास आपोआप उमजुन येईल.

In reply to by जॉनविक्क

राम मंदिर निकालाची सुनावणी १६ ऑक्टोबर ला पूर्ण झाली आणि यानंतर अभ्यास करून निकाल लिहिण्यासाठी न्यायालयाने निकाल राखून ठेवला. १०४५ पानी निकाल लिहिण्यासाठी हा कालावधी घेतला गेला. त्याचा आणि महाराष्ट्राच्या निवडणूक आणि तिच्या निकालाचा काहीही संबंध नाही. केवळ जोडायचा म्हणून बादरायण संबंध जोडणे हा पूर्वग्रह सोडून दुसरे काहीही नाही. याउपर आपल्याला समजून घ्यायचेच नसेल तर न्यायालयीन प्रक्रियेबद्दल आपल्याला घोर अज्ञान आहे एवढे बोलून मी खाली बसतो.

In reply to by हस्तर

पण ठरलेले न्हवते ते सरकार स्थापन करायचे की नाही याबाबत अधिकृत जाहीर धोरण. आणि त्याअनुषंगाने भाजपाने निकालानंतर काही चाली खेळल्या असतील नसतील हा ही वेगळा मुद्दा पण कोवळ्या बालगोपालासारखे समोरच्याला तुम्हला कोर्टाचे कामकाज समजत नाही म्हणायला उभे राहणे ही गोष्ट हास्यास्पद मानायलाही मी फारच म्हातारा आहे विनोदाच करायचे आहेत तर वेगळा धागा काढाना आम्ही काय तो अपरिशीट केला नाय का कधी ? उगा भाजपाच्या गाढवपणावर तुलनेत कमालीचे मौन आणी शिवसेनेवर उठसूट आसूड, आणि शरद पवार सारख्या मॅच विनर दुर्लक्षित करणे हे सामान्य मतदारांच्या कौलाचा मान राखणे नक्कीच न्हवे

In reply to by जॉनविक्क

आणि त्याअनुषंगाने भाजपाने निकालानंतर
निकालानंतर च्या जागी 2019 निवडणूक निकालानंतर असे वाचावे

In reply to by सुबोध खरे

वाहत्या गँगेत हात धुणे म्हणजे काय हे माझे विधान हे दुर्लक्षित करून आपणास लिखाण करत सुटायचे असेल तर याला अज्ञान न्हवे दांभिकता म्हणतात एव्हडे बोलून आशा अर्धवट सिलेक्टिव्ह रीडिंग मतांवर मला उभे राहूनही उत्तर द्यायची गरज भासत भासली नाही हे नमूद करून आता आपण खाली बसावे हेच नम्रपणे सुचवू इच्छितो.

एक ना एक दिवस सेनेचा मुख्यमंत्री आणेनच असे म्हणणारे उद्धव बाळासाहेबांचे " कोम्ग्रेसशी कधीच तडजोड करणार नाही " हे वाक्य सोयीस्करपणे विसरतात

१. मला तरी असेच वाटतेय की, राकाँ व काँग्रेसच्या सहाय्याने मुख्यमंत्री पद मिळवायचे शिवसेनेने अगोदरच ठरवलेले असावे. अन्यथा निवडणूक निकाल लागण्याची प्रक्रिया चालू असतानाच, सर्व पर्याय खुले असण्याची घोषणा झाली नसती. ती घोषणा, एका प्रदीर्घ घटनेतील एक टप्पा असावी असेच माझे मत बनले. शिवसेनेच्या हातात कोणतीच हुकमाची पाने नव्हती हे आता कळल्यावर, शिवसेनेचा आक्रमकपणा पाहून माझे हे मत जास्त पक्क झालंय. मनसे शिवसेनेचा कट्टर शत्रू. त्यालापण शिवसेनेची मते जाताहेत हे जाणवल्यावर माझा हा संशय जास्तच बळावला. हे तपासायला पुण्याचे उदाहरण पुरेसे आहे. अजून लढवलेल्या जागांवरची टक्केवारी जाहीर झाली नाहीये. ती मिळाली असती तर जास्त पुराव्यानिशी माझे मत मांडता आले असते. असो. २. त्यामुळे जिथे भाजपाचा उमेदवार उभा होता तिथे शिवसेनेची बरीच मते राकाँ व काँग्रेसला गेली आहेत. कारण या दोघांचा निवडणूक निकालानंतर पाठिंबा मिळवायचा असेल तर त्यांचे आमदार निवडून आले पाहिजेत ही तर शिवसेनेचीच गरज बनते व भाजपाचे १४४ आमदार होऊ नयेत ही जबाबदारी ठरते. ह्या दोन्ही गोष्टी पवारसाहेबांच्या फायद्याच्या असल्याने त्यांनीही तोंडभरून आश्वासने दिली असणे शक्य आहे. ३. १९६७ पर्यंत काँग्रेसला विरोधकांची भिती वाटत नव्हती. पण लोहियांची विरोधी पक्षांची युती बनवून काँग्रेस विरोधात एकास एक उमेदवार देण्याची निती यशस्वी होते म्हणल्यावर, विरोधकांची एकजूट होऊ नये यासाठी डावपेच आखणे हे काँग्रेसचे मुख्य धोरण बनले.  त्यानुसारच पवारसाहेब राजकारण करतात व त्यात ते सद्या तरी सर्वात प्रविण आहेत असे वाटते. यावरून महाराष्ट्रात युती भारी पडतेय म्हणल्यावर त्यात फूट पाडणे हेच महाआघाडीचे दिर्घकालीनधोरण असणार यात काही संशय नाही.  थोडक्यात महाराष्ट्रातील निवडणूकांत काँग्रेस व राष्ट्रवादीने एकत्रीत लढणे व शिवसेना व भाजपाने वेगवेगळे लढणे हा एक मार्ग आहे जो महाआघाडीला सत्तेपर्यंत नेऊ शकतो.  जर युती तुटली असेल तर ती फक्त ताणली जात राहील एवढेच फक्त पहावयाचे आहे व परत जोडली जाऊ नये यासाठी प्रयत्न करावयाचे आहेत. त्यासाठी शिवसेनेचे सरकार यावयाची जरूरी नाही. ४. परत निवडणुका झाल्या तर त्या शिवसेना व भाजपाने एकत्रीत लढवू नयेत एवढीच महाआघाडीची इच्छा किंवा धेय्य असावे असे वाटतेय. यासाठी प्रथम राज यांना बाजूला केले. या राजच्या त्रासातून शिवसेना खूप मागे खेचली गेली. बाळासाहेबांची पुण्याईही कामी येऊ शकली नाही. त्याचा फायदा त्यांना २०१४ पर्यंत झाला. फोडा व झोडा पध्दतीत नेहमी रागीट माणसाला हाताशी धरले जाते. कारण रागाच्या भरात त्याच्यावर कबजा मिळवणे सोपे असते. त्यामुळे यावेळी राऊतांद्वारे शिवसेनेला जाळ्यात पकडण्यात आलेय. राऊतांवरचा ऊध्वजींचा विश्वास हे हत्यार वापरले गेलंय. ५. पण मोदी उदयानंतर सगळंच गणित फिसकटायला लागलेय. शिवसेनेच्या बळावर मोठे होण्याची अगतिकता भाजपाची राहिलेली नाही. भाजपचे वाढते बळ त्याचा पुरावा आहे. त्यामुळे परत निवडणुका झाल्या व शिवसेना वेगळी लढली तर त्यांची आघाडीला गेलेली मते परत फिरतील.  भाजपकडे यावेळेस इच्छूक जास्त झाले होते व जागा २०१४ पेक्षा कमी झाल्या होत्या. पण परत निवडणुका झाल्यास, लढायच्या जागा १५६ वरून २८८ झाल्यामुळे बंडखोरांचा प्रश्न सुटेल. भाजपातील लाॅयल कार्यकर्ते त्यामुळे खुष झाल्याने पुढच्या निवडणुकीत मतदान टक्केवारी वाढेल, जी शहांची नेहमीचीच रणनिती आहे. ६. जर शिवसेनेने पुढील निवडणुकीत महाआघाडीशी हात मिळवणी केली तर भाजपाला ते हवेच असेल. ध्रुविकरण भाजपाला नेहमीच फायद्याचे ठरत आले आहे.  काँग्रेस विरोधातील आपला अवकाश शिवसेना आपणहून सोडून देत असेल तर भाजपा नक्कीच खूष होईल. भाजपा यापध्दतीनेच मोठी होत आली आहे. मात्र यासाठी संधीची वाट बघत बसायला लागते व त्यासाठी खूप पेशन्स लागतो. तो मोदी शहांकडे नक्कीच आहे असे वाटते. ७. थोडक्यात, भाजपा, काँग्रेस व राकाँ यांचे पुढील धोरण निव्वळ वेळकाढूपणाचे असेल असे वाटते. यासाठी एखादी कोर्टकेस वगैरे सारखा उपाय योजणे हा मार्ग मस्त. जो काँग्रेस नेहमीच अवलंबते. फक्त कोणाकडे तरी बोट दाखवता आले की झाले. राऊतांनी बोलणी पवारांशी केली. ते आता पवारांकडे बोट दाखवत असतील. पवार बोट दाखवताहेत काँग्रेसकडे. काँग्रेस बोट दाखवतीय केरळ काँग्रेसकडे. ८. पण जास्तीचं काहीही न देता शिवसेना जवळ येत असेल तर भाजपा ही संधी साधेल असं वाटते. दीड दोन महिने फडवणीस संपले संपले असं वाटत असताना परत उभे राहतात, असं बऱ्याच वेळेस झालंय. यावेळेसही हे होऊशकते. यावेळेसही फडणवीस यांनी समारोपाच्या वेळी युतीच सरकार बनवेल असं म्हणूनच ते थांबले आहेत. ९. असंच होणं योग्य असेल. कारण राजकारणात डाव ओळखून प्रतिडाव टाकावा लागतो. बाकी सगळे गौण याचे भान राखावे लागते. जर युती तुटावी हा डाव असेल तर युती टिकवनणे हाच प्रतिडाव असतो. शिवसेना कशी वागली याबाबत सर्वसामान्य भाजपा कार्यकर्त्यांना येणारा राग नेत्यांना पोटात ठेवावा लागतो. भाजप पुढेमागे युती तोडेलही. पण ती सोयीची वेळ ते ठरवतील. पवार साहेबांनी त्यांच्या सोयीने निवडलेली वेळ भाजपाने साधणे शहाणपणाचे ठरणार नाही. अर्थात हे सर्व राजकारणी माझ्यापेक्षा नक्कीच हुषार असणार म्हणा. :)

In reply to by शाम भागवत

चांगल्या पद्धतीनं मांडलेला अन्वयार्थ! पटतोय! :-) अडचण अशी आहे की साहेबांनी आपली वाक्यं फिरवली तर नवल वाटणार नाही. ते नेहमीच एखादी पळवाट बाळगतात परत फिरण्यासाठी. राजकीय कोलांटउड्या त्यांच्यासाठी नव्या नाहीत. सेनेचे तसे नाही. त्यांनी आक्रमकता एवढी दाखवली आणि त्यात इतकं बोलून गेलेत, की त्यातून परत मागे फिरणे म्हणजे सपशेल हार मानणे यावर शिक्कामोर्तब होईल. परत फिरायला वाट न ठेवल्यामुळे सेनेची स्थिती अडचणीची झालीये. सेनेला परत भाजपाकडे जायचं असेल तर आता त्यांना भाजपाच्या अटी मान्य कराव्या लागतील, जे काही फार सुखावह नसणार. अर्थात् तुम्ही म्हणता तसा, सेनेनं ठरवून असा प्रयत्न केलेला असेल तर ते ठीकच आहे. पण मग या पेक्षा ते एकला चलो रे मधे असते तर जास्त बरे झाले असते. कॉ/राकॉ सोबत जाऊन त्यांनी भाजपाला रान मोकळं दिल्यासारखं होईल. एकुणात सेनेला आणि भाजपला जास्त वाढू न देण्याचे साहेबांचे डावपेच यशस्वी ठरतांना दिसत आहेत.

In reply to by ओम शतानन्द

श्री शरद पवार यानी पत्रकारांना खूष ठेवून( कोट्यातून घरे देणे सारख्या अनेक गोष्टी करून) प्रकाशझोतात राहण्याची कला चांगली साधली आहे. अन्यथा त्यांच्या इतका overrated (अवाजवी महत्त्व दिला गेलेला) राजकारणी देशात दुसरा नसेल. साहेब काहीही करू शकतात इतके भंपक वाक्य दुसरे नसेल. स्वतः तीन वेळेस मुख्यमंत्री झाले पण एकंदर कारकीर्द ६ वर्षेच होती. एकाही कारकिर्दीत सलग पाच वर्षे काही त्यांना पूर्ण करता आलेली नाहीत एवढेच नव्हे तर आयुष्यात एकदाही त्यांना स्वबळावर बहुमत मिळेल एवढे आमदार काही निवडून आणता आलेले नाही. इतक्या वेळेस त्यांनी दिल्लीत वाऱ्या केल्या आणि श्रीमती सोनिया गांधी यांच्या भेटी घेतल्या पण सोनिया गांधीनी काही त्यांना भीक घातलेली नाही. त्यामुळे संदिग्ध वाक्ये बोलून मीडिया तर्फे आपला उदो उदो त्यांनी चालवला आहे. त्यां च्याकडून काहीही ठोस येत नाही हे पाहून शिवसेनेला तोंडघशी पडल्याची भावना आलेली आहे आणि त्यांचे अनेक आमदार अस्वस्थ झालेले आहेत.

In reply to by ऋतुराज चित्रे

मुख्य मंत्री पदाची टर्म बाकी लोकांना पण करता नव्हती आली त्यात मनोहर जोशी ,अशोक चव्हाण व बाकी दिग्गज होते स्वबळावर आमदार निवडून आणणे फडणवीस ह्यांना पण एकदपण जमले नाही ते पण मोदींचा पाठिंबा असताना दर वेळी टेकू लागला

In reply to by हस्तर

हो पण मनोहर जोशी, अशोक चव्हाण किंवा फडणवीस काहीहि करू शकतात असा त्यांच्या कट्टर समर्थकांचाही दावा नव्हता किंवा त्यांचा असा उदो उदो झालेला नाही.

In reply to by शाम भागवत

मध्यंतरी मिपा वर नव्हतो .. पण आपल्या प्रतिक्रिया संयमित वाटतात ... बाकी कोणी कोणत्याही पक्षाला समर्थन करत असेल , कोणत्या हि नेत्याला समर्थन करीत असेल तरी आपण संतुलित बोलले पाहिजे हे यातून दिसतेच. Mate भिन्न असणे म्हणजे वाईट नक्कीच नाही .. त्यामुळे संतुलित प्रतिक्रिया , टोकाची भांडणे नसणे, हि चर्चे ची चांगली लक्षणे आहेत

In reply to by शाम भागवत

आणि मुद्दा क्रमांक 4 मध्ये वंचित चा मुद्दा राहिला . जसे राज che उदा , फोडा फोडी तडजोडी ची उदा आहेत .. जसा डाव आघाडी खेळली , तसाच डाव भाजपा वंचित च्या माध्यमातून खेळली असे पण नमूद करतो ...नाहीतर भाजपा चे आणखीन नुकसान हे नक्की झाले असते ..

In reply to by गणेशा

लढवलेल्या जागांनुसार पक्षांची टक्केवारीची वाट बघतोय. मग नक्की सांगता येईल. वंचितचा फायदा झाला असू शकेल पण बंडखोरीचे नुकसान त्यापेक्षा जास्त असावे हा एक अंदाज आहे. मला अभ्यास करायला लागेल. :)

In reply to by शाम भागवत

वेगळाच धागा काढतोय. २०१९ ची विधानसभा निवडणूक, मतदान टक्केवारी. तिथेच चर्चा करूयांत.

In reply to by शाम भागवत

१. मला तरी असेच वाटतेय की, राकाँ व काँग्रेसच्या सहाय्याने मुख्यमंत्री पद मिळवायचे शिवसेनेने अगोदरच ठरवलेले असावे.
असे काही नसावे. सत्तासुंदरी प्राप्त करण्यासाठी वेळ येईल तसे राजकारणी बदलतात. ठरवून असेच होईल मग मी तसेच करेन असे कधी होत नाही. त्यातही शक्यत इतक्या असतात अन इतक्या लवकर बदलतात की ते काय करत आहेत हे त्यांनाही समजत नाही. ( आकाशातला बाप त्यांना क्षमा करो.)

हा विडिओ निवडणुकीच्या धामधुकीत शिव सेनेने ने पाहणे शक्य नाही ,हा विडिओ मागचे १५ दिवस पण कोणाला सापडला नव्हता

In reply to by हस्तर

अजून कोणाला पण सापडला नव्हता, म्हंजे नक्की कोणाला? जर माझ्यासारख्या सामान्य माणसाला लक्षात राहू शकतो, तर एवढ्या मोठ्या राजकीय पक्षाला, त्यांच्या थिंक टँकला, कार्यकर्त्यांना लक्षात राहणार नाही असं तुम्हाला म्हणायचंय काय?

In reply to by राघव

राजकिय पक्षाला हजार डोळे हजार कान असतात. त्यामुळे शिवसेनेला हा विडीओ माहित होता तो सुद्धा भाजप अध्यक्षाचा होता कोणा ऐ-यागै-याचा नव्हता

In reply to by हस्तर

हाहा.. हे चांगले आहे. मुलाखत कधीही दिलेली असो, वायरल कधी झाले ते महत्त्वाचे. शाह तर वर्षभरा पूर्वीच म्हणाले होते की निवडणूक एकट्याने लढवावी. मग तरीही सेना विश्वास का ठेवते त्यांच्यावर? दबावाचा वापर करून या ना त्या प्रकारे फायदा लाटण्याचा हा प्रकार आहे. असो. आता घोडेबाजार जवळच आहे. बघूयात.

In reply to by राघव

मुद्दा हा आहे कि हा विडिओ एवढ्या दिवसात कोणाला माहीत पण नव्हता ,भांडण झाले तेव्हा पण नाही ,मग शिव सेनेला कुठून दिसणार जर तुम्हाला एवढे दिवस दिसला नाही व काल अचानक दिसला

In reply to by हस्तर

आज संध्याकाळी ए एन आय ला अमित शहांनी दिलेल्या मुलाखतीत महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक प्रचारसभेत देवेंद्र फडणविसच मुख्यमंत्री असतील याची वाच्यता केली असताना शिवसेनेने एकदाही हरकत का घेतली नाही असा प्रश्न उपस्थित केला आणि आत्ता थोड्या वेळा पुर्वी उद्धव ठाकरे उपस्थित असलेल्या जाहिर सभेत देवेंंद्र फडणविस मुख्यमंत्री असतील हे सांगणारे मोदींच्या भाषणाची ऑडीओ भाजपा प्रवक्ते संबित पात्रांनी रिपब्लिक टिव्हीवर वाजवून दाखवली. त्या शिवाय आदित्य ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या दाव्याची पोस्टर्स निवडणूक निकालानंतरच कशी काय लावली गेली हा देखिल प्रश्न उपस्थित केला.

https://www.transliteral.org/dictionary/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE/word गोमा गणेश पितळी दरवाजा

महाराष्ट्रीय जनतेशी हि फसवा फसवी का चालू आहे ? अहो हे सगळं जनतेच्या भल्यासाठी आणि शेतकर्‍यांच्या हितासाठी चालु आहे, इतकी साधी गोष्ट कळतं नाही ? :))) ५ वर्ष युतीत सडुन दाखवले, मग राजिनामे खिशातच ठेवुन दाखवले, अफजखानाची फौज असे कोणी तरी कोणाला तरी म्हणुन दाखवले इ.इ.इ आणि अनेक ! आता फक्त कुंथुन दाखवले हेच म्हणायचे बाकी ठेवले आहे ! :))) बादवे... वाचाळवीरता करायला मेंदु वापरावा लागतच नाही, हे अनेक { सर्व पक्षिय बरे का ! ] नेत्यांना २०२० समोर येउन ठेकले आहे तरी अजुन समजत नाहीये... :))) असो... भाजपा आयटीसेल काम करतोय हे असे व्हिडियो "वेळेवर" पसरले की लगेच समजते ! हा गुण त्यांच्याकडुन घेण्यासारखा आहे. हे बघा मंडळी कोण खरं आणि कोण खोटं ते मला काय बी समजत नाय बघा, म्या पडलो अडाणी माणुस... हल्लीच मी खोट बोलणारी अवलाद नाही अशी कोणी तरी स्वत: बद्धल बतावणी केल्याची अफवा माझ्या कानावर पडली होती ! अजुनही मला कळतं नाही की वरचं खरं की सध्या चाललयं ते खरं ? :))) जाता जाता :- अजित पवार पहिले अडीच वर्ष मुख्यमंत्री होतील आणि नंतरच्या अडीच वर्षाचे गाजर कोणाला तरी देण्यात येइल, शिवाय गॄहमंत्री पद आणि महसुल मंत्री पद देखिल कॉग्रेस आणि राष्ट्रवादीकडे जाईल असे होउ शकेल का ? तुम्ही विचार करुन बघा ! ;) { टिपी म्हणुन हो... }

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Hara Hara Hara Hara Mahadev | Naan Kadavul | Ilaiyaraaja Live In Concert Singapore

माझ्या मते युती तोडणे हि शिवसेनेची गरज आहे. मुळात त्यांन्नी ती निवडणूकीच्या आधीच तोडणे अपेक्शीत होते, पण आघाडी बनल्यामुळे त्यांच्यासमोर युती करण्याशिवाय पर्याय ऊरला नाही. शिवसेना हा प्रादेशीक पक्ष आहे, त्यात आता छोटा भाऊ बनल्याने युतीत राहून हळूहळू पक्ष अस्ताला जाण्याची शक्यता जास्त. त्यापेक्षा एकदाच फारकत घेऊन आणी त्याची पुढच्या निवडणूकीत किंमत मोजून पुढे सरकणे ठाकरेंना जास्त सोयीचे वाटले असेल. ह्या सगळ्या खेळात रा.कॉ. आणी काँ. मात्र खुष असतील, पुन्हा निवडणूका झाल्यास आणी सेना भाजप वेगळे लढलयास आघाडीला पेपर सोपा जाईल.

एक गोष्ट आज दिसते आहे की छगन भुजबळ राष्ट्रवादीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असणार आहेत. अजितदादा पवार यांचा राग त्यामुळेच आहे. शरद पवार एक दगडात अनेक पक्षी त्यातून मारणार आहेत. सेना हा अपमान सत्तेसाठी कसा मुकाट्याने झेलते अथवा नाही हे पाहण्यासारखे असेल. या सरकारचा रिमोट कुणाच्या हातात असेल आणि त्या तालावर कुणाला नाचावे लागेल याबद्दल कोणतीही शंका आता राहणार नाही.

हा व्हिडीओ 13 व्या मिनिटाला मराठी मधून नंतर 16 व्या मिनिटापासून 2 मिनिटे हिंदीतून फडणवीसचे ऐका, 27 व्या मिनिटाला उध्दवच्या तोंडून ऐका. हे लोकसभा इलेक्शनच्या वेळी युती झाली तेव्हा आहे. त्यावेळी कोणी ऑब्जेक्शन घेतले नाही कारण भाजप ला गरज होती. गरज सरो वैद्य मरो या उक्ती नुसार लोकसभेची गरज संपल्यावर सेनेला बाजू केले.

In reply to by कपिलमुनी

गूड , आता या परस्पर विरोधी दाव्यांची गोळा बेरीज मतदारांनी आणि महाराष्ट्रीय जनतेने कशी करावी

In reply to by कपिलमुनी

हा vedio येथे दिल्याने धन्यवाद . खरे तर हा vedio पण मुळ धाग्या ला वरती चिकटवला पाहिजे . आता पर्यंत मला वयक्तिक शिवसेना कदाचीत खोटे बोलते आहे अशी शंका येतो होती .. भाजपा पेक्षा शिवसेना च जास्त चुकीची वाटत होती . ह्या vedio नंतर माझे मत पुर्ण वेगळे झालेले आहे

In reply to by गणेशा

उद्धव ठाकरे = पुरुषोत्तम राम आणि अमित शहा = चाणक्य कृष्ण ? असे कूणा कुणाला वाटतय ? ज्यांना असे वाटते त्यांच्यासाठी प्रश्न पुरुषोत्तम राम आणि चाणक्य कृष्ण समोरासमोर आल्यास बरोबर कोण या यक्ष प्रश्नाचे हिंदूत्वीय उत्तर काय ?

In reply to by जॉनविक्क

तुम्ही तितके महापराक्रमी नसाल कृष्णनीती वापरावी लागेल. बाकी रामावर द्यूत खेळात अन्याय झालाअसता हे सत्य पण त्याने पत्नीस पणाला कधीही लावले नसते हे ही तितकेच सत्य कारण त्याने प्रसंगी चुकीचे असूनही विवेकपूर्ण निर्णयच घेतले, उदा. एकपत्नीव्रत , धोब्यामुळे सीतेला पुन्हा वनात सोडणे, वनवासात जायचा निर्णय घेणे, वालीचा वध करणे वगैरे वगैरे वगैरे... थोडक्यात **मधे लिटरली दम नसेल तर रामासारखे आचरण ठेवायचा सामान्य व्यक्तीने प्रयत्न करू नये, असेल तर कृष्णासारखा कपटीपणा दाखवू नये इतके साधे सोपे उत्तर आपल्या यक्षप्रश्नाचे आहे.

In reply to by माहितगार

तुम्ही हे का बोलता आहात तेच कळाले नाही .. Vedio मुळे कोण खरे खोटे बोलते ते कळाले . खरे बोलणारा राम च असतो असे काही नाही आणि राजकारण करणारा कृष्ण असतो असे हि काही नाही ...

दैनिक सकाळमधली ही ९ नोव्हेंबरची बातमी. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ गोड बोलून शिवसेनेला संपवण्याचा डाव: उद्धव ठाकरे लोकसभेच्यावेळी मी युतीसाठी दिल्लीला गेलो नव्हतो, ते मुंबईत आले होते. चर्चेत आम्हाला उपमुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव दिला होता. मात्र मी त्यास नकार दिला. शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्याचे मी बाळासाहेब ठाकरे यांना वचन दिले होते. याची आठवण शहा यांना करून दिली असता त्यांनी ते मान्य केले. शिवसेनाप्रमुखांच्या खोलीत बसून ही चर्चा झाली होती. नंतर अमित शहांनी फडणवीसांना याबाबत माहिती दिली. भाजपत याबाबत नाराजी पसरू नये यासाठी आत्ता ही माहिती जाहीर करू नका. वेळ आली की मी माझ्या पक्षाला सांगेन, असे फडणवीस म्हणाले. आता ते शब्दखेळ करण्यात हुशार आहेत. त्याचा अनुभव मी आत्ता घेतला. हे आम्हाला गोड बोलून संपवण्याचा प्रयत्न करत होते. देवेंद्र फडणवीस माझे चांगले मित्र होते. त्यांच्याकडून मला हे अपेक्षित नव्हते." ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ उद्धव यांच्या सदर दाव्याचे खंडन देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचे अजुन वाचायला मिळाले नाही.

दैनिक सकाळमधली ही ९ नोव्हेंबरची बातमी. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ गोड बोलून शिवसेनेला संपवण्याचा डाव: उद्धव ठाकरे लोकसभेच्यावेळी मी युतीसाठी दिल्लीला गेलो नव्हतो, ते मुंबईत आले होते. चर्चेत आम्हाला उपमुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव दिला होता. मात्र मी त्यास नकार दिला. शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्याचे मी बाळासाहेब ठाकरे यांना वचन दिले होते. याची आठवण शहा यांना करून दिली असता त्यांनी ते मान्य केले. शिवसेनाप्रमुखांच्या खोलीत बसून ही चर्चा झाली होती. नंतर अमित शहांनी फडणवीसांना याबाबत माहिती दिली. भाजपत याबाबत नाराजी पसरू नये यासाठी आत्ता ही माहिती जाहीर करू नका. वेळ आली की मी माझ्या पक्षाला सांगेन, असे फडणवीस म्हणाले. आता ते शब्दखेळ करण्यात हुशार आहेत. त्याचा अनुभव मी आत्ता घेतला. हे आम्हाला गोड बोलून संपवण्याचा प्रयत्न करत होते. देवेंद्र फडणवीस माझे चांगले मित्र होते. त्यांच्याकडून मला हे अपेक्षित नव्हते." ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ उद्धव यांच्या सदर दाव्याचे खंडन देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचे अजुन वाचायला मिळाले नाही.

दैनिक सकाळमधली ही ९ नोव्हेंबरची बातमी. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ गोड बोलून शिवसेनेला संपवण्याचा डाव: उद्धव ठाकरे लोकसभेच्यावेळी मी युतीसाठी दिल्लीला गेलो नव्हतो, ते मुंबईत आले होते. चर्चेत आम्हाला उपमुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव दिला होता. मात्र मी त्यास नकार दिला. शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्याचे मी बाळासाहेब ठाकरे यांना वचन दिले होते. याची आठवण शहा यांना करून दिली असता त्यांनी ते मान्य केले. शिवसेनाप्रमुखांच्या खोलीत बसून ही चर्चा झाली होती. नंतर अमित शहांनी फडणवीसांना याबाबत माहिती दिली. भाजपत याबाबत नाराजी पसरू नये यासाठी आत्ता ही माहिती जाहीर करू नका. वेळ आली की मी माझ्या पक्षाला सांगेन, असे फडणवीस म्हणाले. आता ते शब्दखेळ करण्यात हुशार आहेत. त्याचा अनुभव मी आत्ता घेतला. हे आम्हाला गोड बोलून संपवण्याचा प्रयत्न करत होते. देवेंद्र फडणवीस माझे चांगले मित्र होते. त्यांच्याकडून मला हे अपेक्षित नव्हते." ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ उद्धव यांच्या सदर दाव्याचे खंडन देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचे अजुन वाचायला मिळाले नाही.

In reply to by श्रीरंग_जोशी

उद्धव यांच्या सदर दाव्याचे खंडन देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचे अजुन वाचायला मिळाले नाही. संजय राऊत सामन्यातून ( जे शिवसेनेचे अधिकृत मुखपत्र आहे) गेली पाच वर्षे दर एक दिवसाआड भंपक दावे करत आले आहेत . त्याचे खंडन करत बसले तर राज्य कसं चालवायचं. तिथे केंद्रात श्री राहुल गांधी राफेल मध्ये घोटाळा झाला म्हणून दोन वर्षे कंठशोष करत आले. त्यांचा प्रत्येक दावा फेटाळत बसले असते तर आतापर्यंत राफेल कागदावरच राहिले असते. शेवटी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना सज्जड दम देऊन गप्प बसवले आहे. SC lets off Rahul Gandhi in contempt case, but makes serious comments against former Congress chief https://www.firstpost.com/india/supreme-court-verdict-live-updates-cji-ranjan-gogoi-rafale-sabarimala-case-review-petitions-today-latest-news-7644551.html

जनता जनार्दन ने डिंग्या मारणाऱ्या भापा आणि सेनेला एका फटक्यात भुतलावर उतरवले आणि आयुष्यात पुन्हा महाराष्ट्राचे एग्जिट पोल करणार नाहीत इतपत चॅनेल वाल्यांचे डोळे पांढरे केले . भापा आणि सेना आता पर्यंत स्वबळा वर कधीच सत्ता स्थापन करू शकली नाही व त्यांना युती करण्याशिवाय पर्याय नाही तरी ते पाया ची नखे जमीन वर खरडून एकमेंकावर भूंकत आहे आणि त्यांचे तमाम समर्थक सोशल मिडियावर आपलाच पक्ष कसा योग्य आहे हे दुसऱ्याला शब्दलांछन करुन पटवून देत आहे . 30 वर्ष एकत्र राहून एकमेंकाना संपविन्यासाठी अनैसर्गिक युती करण्याचा प्रयत्न दोघांनी केला , तरी 'आमचाच पक्ष खरा !!! ' यावरून वाद . मी तर या दोन्ही पक्षाला वठणी वर आणण्यासाठी यांच्या विरोधातच मतदान करणार .

In reply to by शाम भागवत

होणारच !!! भापा सेने ने क़ाय दिवे लावले आहेत ते आपण पाहतोय , मग मतदारांनीं समंजसपणा का दाखवावा ??? घरकाम करणारे , रिक्शावाला , दूकानदार अशा ज्या लोकांशी आपला दैनंदिन संपर्क येतो त्यांच्या समोर भापा सेने चा विषय काढला की बघा कसे ते दोन्ही पक्षानां कचा कच शिव्या घालतात !!!!! आणि मला तर वाटतंय एग्जिट पोल वाल्यांनीं मिपावरील भाजप समर्थकांचे प्रतिसाद वाचून सर्वे केला असेल म्हणून तोंडावर पडले असतील :) :) :) कट्टर मुस्लिम देशानीं वेढलेल्या ईसरायल मध्ये सुद्धा खुप मुश्किल ने एखादी पार्टी बहुमत ने सरकार स्थापन करण्यात यशश्वी होते . आताचे पंतप्रधान सुद्धा बहुमत सिद्ध करण्यात सिद्ध करू शकले नाही . थोडक्यात सोशल मीडियाने फक्त मोदीजीनां पुन्हा संधी दिली पण फर्नांडिस आणि आठा / उठा ला ग्राउडं रियालीटी ओळखूनच घटस्फोट घ्यावा !!!

In reply to by ट्रम्प

आणि मला तर वाटतंय एग्जिट पोल वाल्यांनीं मिपावरील भाजप समर्थकांचे प्रतिसाद वाचून सर्वे केला असेल म्हणून तोंडावर पडले असतील :) :) :)
:)

प्रा.डॉ. सरांनी म्हटल्याप्रमाणे उत्तम चर्चा झाली आहे. खरे तर हा धागा काढण्या आधी काही पुढचे प्रश्न मला पडले होते. इतर धाग्यांवर चर्चा झाली आहे का माहीत नाही. झाली असल्यास दुवे द्यावेत नसल्यास उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करावा. * असे गृहीत धरा की शिवसेना + राष्ट्रवादी + काँग्रेस आघाडी बनवून सत्तेत येण्यास यशस्वी होतात १) पण धर्मनिरपेक्षता वाद आणि हिंदूत्व विषयक भूमिका संसदेत परस्पर विरोधी मतदान आणि भुमिका घेतात असे झाल्यास काँग्रेसच्या पुढच्या लोकसभेतील निवडणूकीत -आणि ज्या राज्यांमध्ये अद्याप काँग्रेस सरकारे निवडून येतात- त्यांचा हक्काचा अल्पसंख्यांक मतदार वर्ग काँग्रेस सोबत राहील की काँग्रेसची साथ सोडण्याची शक्यता वाढेल २) समजा काँग्रेसने राष्ट्रीयस्तरावर शिवसेनेस वेगळी हिंदूत्ववादी भूमिका घेण्यास प्रोत्साहन देऊन लोकसभेत भाजपा विरुद्ध शिवसेनेचे उमेदवारही उभे केले तर (महाराष्ट्रा व्यतरीक्त ) इतर राज्यातील किती हिंदूत्ववादी मतदार वर्ग उद्धव ठाकरेंच्या बळावर काँग्रेस फोडू शकेल. ३) जर शिवसेनेचा हिंदूत्ववाद चुकीचा नाही तर संघ आणि भाजपाचा हिंदूत्ववाद चुकीचा कसा याचे कोणते उत्तर काँग्रेस पुढील काळात पुढे करेल - या मुद्द्यावर शिवसेना काँग्रेस सोबत जाऊनही काँग्रेसचा प्रचार खोडण्यात भाजपाला मदत होईल का ? ४) दुसर्‍या बाजूस शिवसेनेच्या हिंदूत्ववादाशी काँग्रेससाठी तडजोड केल्यास महाराष्ट्रात शिवसेनेचा किती हिंदूत्ववादी मतदार तरी सुद्धा शिवसेने सोबत राहील किती भाजपाकडे वळेल ? ५) धर्मनिरपेक्ष असलेले इतर दोन पक्ष पर्याय उपलब्ध असताना नव्याने अंशतः धर्मनिरपेक्ष होऊ घातलेल्या शिवसेनेच्या वेगळ्या अवताराची / पर्यायाची महाराष्ट्रार राकॉ आणि काँग्रेसला स्पर्धा होईल की शिवसेनाच मागे पडेल बेसिकली या नव्या होऊ घातलेल्या राजकीय समिकरणाने कुणाची कोणती घरे आणि कोणते घाट बदलतील

शिवसेनेने किंवा कोणत्याही पक्षाने येथली चर्चा तिर्‍हाईत दृष्टीने वाचायला हवी. योग्य अंजन डोळ्यात जाईल. (बाकी महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नाला कोणीही वाली राहिला नाही याची खंत आहे)

काही अनुत्तरीत प्रश्न आणि मुद्दे : भाजप : महाराष्ट्रसारखं राज्य अमित शहा कसं काय जाऊन देतोय कि त्या मागे 'मोठ्ठ' राजकारण आहे ? कालच्या मुलाखतीत जोर देऊन म्हणाला "तुमच्या कडे नंबर नाहीत , असतील तर आत्ता जा सत्ता क्लेम करायला " मला तर ती गडकरी आणि अहमद पटेलची भेटच आठवते सारखी बंद दाराआडची चर्चा आम्ही बाहेर सांगत नाही ह्याचा मी लावलेला अर्थ - सेना म्हणते तसंच घडलं असावं पण सेनेनी जी घिसडघाई केली ( राऊत मेनिया ) त्या मुळेच भाजप चा हा स्टान्स ठरला असावा - देवेंद्रनी पण प्रेस वार्तेत तेच सांगितलं आहे एका अर्थानी , कुणी सांगावं ५०-५० मध्ये सेनेची मुजोरगिरी सहन नसती झाली - १०५ जणांना न्याय नसता देता आला,आणि सेनेनी अडीच वर्षानंतर पाठिंबा काढला असता तर अजून फटका बसला असता - ज्याची शक्यता मला तरी फार वाटते कित्येक महत्वाची राज्यं आता भाजप कडे उरली नाहीत - जी आधी होती - महाराष्ट्र , मध्य प्रदेश , राजस्थान , छत्तीसगढ , पंजाब आणि राज्य नसलं कि भरपूर फरक पडतो महाशिवआघाडी : उद्धव ठाकरे च्या हाताखालती माजी मुख्यमंत्री आणि अजित दादांसारखी लोक - अडीच वर्ष तरी काम कसे करणार ? भाजप हे हाडाचे विरोधी पक्ष असल्याने आणि आकडा त्यांच्या बाजूने असल्याने हि फरफट ५ वर्ष नक्की टिकत नाही माझं प्रामाणिक मत असं आहे कि भाजप पाकीटमार आहेत आणि आघाडी दरोडेखोर, सेनेला म्हणावं तितकं खाता आला नाही म्हणूनच हा उपद्व्याप केला असावा आणि त्या मुळेच येणारी ५ वर्ष ( एवढी वर्ष नाही टिकत सरकार पण जी काही असतील ती ) न भूतो न भविष्यती तुंबड्या भरून घेणे हा एकच कार्यक्रम असणारे - मेट्रो स्कॅम , वॉटर ग्रीड स्कॅम , महाराष्ट्र समृद्धी महामार्ग स्कॅम , संपूर्ण कर्जमाफी वेगैरे वेगैरे , शिवाय राज्य आलं कि महत्वाच्या महानगरपालिका येणारच .

अवांतर : माहितगार,
एखादी गोष्ट स्पष्ट न करणे यास मराठीत गोगपिद (गोमा गणेश पितळी दरवाजा) असा वाक्प्रचार आहे.
मला वाटतं की अधिकार नसतांना अधिकारपदाचं सोंग आणणे याला गो.ग.पि.द. म्हणावं. प्रस्तुत प्रसंगी अमित शहांनी मुद्दाम संदिग्धता ठेवलेली असू शकते. पण हिला गो.ग.पि.द. म्हणता येणार नाही कारण की अमित शहांना पुरेपूर अधिकार आहेत. आ.न., -गा.पै.

शिवसेनेला राष्ट्रवादीने खुंटीवर टांगून ठेवले आहे आणि राष्ट्रवादीला काँग्रेसने लटकावून ठेवले आहे. बसा बोंबलत. नवाब मलिक यांनी राष्ट्रवादीला सरकार स्थापन करण्याची घाई नाही त्याला अजून २० दिवस लागतील असे कथन केले आहे Maharashtra Govt Formation Updates: NCP in no hurry to form govt; expect new dispensation in 20 days, says Nawab Malik https://www.firstpost.com/politics/maharashtra-government-formation-live-updates-latest-news-uddhav-thackeray-sharad-pawar-ncp-congress-bjp-shiv-sena-gets-chief-minister-of-maharashtra-7630851.html श्रीमती सोनिया गांधी यांची अजूनही शिवसेनेबरोबर युती करण्याची तयारी नाही. आता त्या आणि श्री शरद पवार रविवार १७ नोव्हेंबर रोजी चर्चेस बसणार आणि मग ठरवणार. https://twitter.com/ANI/status/1195368278807367680?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1195368422818770949%7Ctwgr%5E363937393b70726f64756374696f6e&ref_url=https%3A%2F%2Fwww.indiatoday.in%2Findia%2Fstory%2Fmaharashtra-political-crisis-live-updates-news-shiv-sena-congress-bjp-thackeray-1619167-2019-11-15 हे गुऱ्हाळ किती दिवस चालतंय ते पाहू या. बाकी श्री उद्धव ठाकरे यांची फरफट काही संपताना दिसत नाही हे खरं

In reply to by सुबोध खरे

जर हे तिन पक्ष सरकार स्थापन करणार आहेत आणि त्यांच्या मते जर ते सरकार स्थीर सरकार असणार आहे तर मग ह्यांनी राज्यभर दौरे करण्यास का सुरुवात केलि आहे? मला घंटा घेणदेण नाहिये कुठल्याही पक्षाशी... पण एक गोष्ट निश्चित आहे आणि ति म्हणजे भविष्यात महाराष्ट्रात दोनच प्रमुख पक्ष असतिल भाजपा आणि राष्ट्रवादी. खेल खिलाने वाला बहुत फुर्सत मे है और लंबा खेल खेल रहा है कभी काका को वापरा जा रहा है और लास्ट मोमेंट पर कांग्रेस को प्रेशराइज करके वो किया जायेगा.. . हां वोही ;)

In reply to by सुबोध खरे

श्री उद्धव ठाकरे यांची फरफट काही संपताना दिसत नाही हे खरं
भाजपाने शेपूट घालून वेळीच (स्वतः ची, महाराष्ट्राची न्हवे) फरफट वाचवली यासाठी त्यांचे कौतुकही केलेच पाहिजे, ते कुठे दिसत नाही. उदोजींनी आधीच कसलीच घाई नसल्याचे स्पष्ट केले आहे, व तसेही राजवट लागू असल्याने आता तर 20-20 च्या जागी कसोटी स सामनाही रंगू शकतो... फक्त डकवर्ड लुईस नियम लागू करायची वेळ आली की बाजी कोण मारतो हा ताजा इतिहास आहे

In reply to by जॉनविक्क

भाउ हे राजकारण आहे आणि ते डोक्याने आणि आपल्या कडे असलेल्या रिसोर्सेस चा योग्य वापर करुनच खेलायचे असते. आता तुम्हि शेपुट घालणे म्हणा किंवा दहाड मारणे म्हणा. ईथे भाबडा आशावाद आणि मुर्ख सल्लागार नेहमी गोत्यात आणत असतो. तुम्हाला महाराष्ट्र राज्यात भविष्यात फक्त दोनच मुख्य राजकिय पक्ष दिसतिल. भाजपा आणि राष्ट्रवादी कारण तेच दोन "राजकिय" पक्ष आहेत बाकी सब मुर्खो का बजार है and hence they don't deserve.

In reply to by श्रिपाद पणशिकर

पाऊस पवारांना आपण धोनी न्हवे तर कोहली समजायची चूक तर करत नाही ना ? मला तरी ते राष्ट्रवादीचे धोनी वाटतात, त्यांना कोहली अजून मिळायचाय.

In reply to by जॉनविक्क

साहेब दिल्लीला श्रीमती सोनियांना भेटून आले पण महाराष्टाच्या सत्ता स्थापनेबद्दल काहीच बोलणी झाली नाहीत. https://timesofindia.indiatimes.com/india/sharad-pawar-meets-sonia-gandhi-to-discuss-government-formation-in-maharashtra/articleshow/72110350.cms मग साहेब काय दिल्लीच्या प्रदूषणाबद्दल गप्पा मारायला गेल्या होत्या? का सुप्रिया ताईंच्या शेतीबद्दल त्यांना पण सल्ला द्यायला? सोनिया बाई आता त्यांना चकरा मारायला लावत आहेत का? जुनं उट्ट काढण्यासाठी?

बावा बोत बडा झोल है ये और ये 24 को ही चालू हो गया था. बारीश वाले चिच्चा पहले दिन से इस खेल मे खेल रहे है. किसकी तरफ से ;) वो अप्पन को नहीं पता :) चिच्चा का ऐसा है पडोसी का बेटा पेड पर चढा उतरा तो आम मिलेंगे और गिर गया तो खाना. फिलहाल कांग्रेस का कुछ भी स्टेक पर नहीं है. शिवसेना की वो हालत होने वाली है भंडारे में गये तो खाना खतम बाहर आये तो चप्पल गायब. भाजपा अपने रीसोर्सेस का फुल गैर फायदा लेकर और चिच्चा के मदत से पहले सेना को बेहद कमजोर कर देगी और चिच्चा कांग्रेस को.

In reply to by श्रिपाद पणशिकर

त्यानंतर म्हणजे उपरोल्लेखित घडल्यावर (किमान चार महीने) ऐक तर सेना फोडण्यात येईल नाही तर काकाच आपला एखाद्या गट सोइस्कर रित्या पुरवतिल. तोंडाचि वाफ गमावुन आणि अत्यंत मुर्ख लोकांना PR बनवुन फक्त Embarrassment नशिबात येते. ह्याला राजकारण नाही शुध्द मुर्ख पणा म्हणतात. तुमच्या कडे दोन पैकिं एका ही कांग्रेस चे लेखि पत्र नांहि कि ज्यात त्यांच्या सपोर्ट चा उल्लेख असेल माध्यमात येणाऱ्या बातम्यांच्या आधारावर दिले लेकरा ला राजभवन वर पाठवुन व्वा रे बाजिराव . मुंह करे बाता अन ××××× लाता. खरे राजकारण आत्ताशा आत्ताशा सुरु झालेत. वाघांना फक्त येवढेच विचारु ईच्छितो काव्व्ं खेयशील का पोराईंत? देखतें रहो हंसते रहो :)

In reply to by श्रिपाद पणशिकर

खरे राजकारण आत्ताशा आत्ताशा सुरु झालेत.
हे लाखात एक बोललात.. लोकांना सरकार स्थापन होणे म्हणजे विजय वाटतोय.. पण आत्ता महाराष्ट्रात ४ पक्ष त्यांच्या अस्तित्वाची लढाई लढतायत.. त्यापैकी २नच भविष्यात सशक्त पक्ष म्हणून टिकतील, आणि ते भाजपा आणि राष्ट्रवादी असतील असे मलापण वाटतय. (तुम्चे नि माझेपन घोडे विनी त) बाकी या सगळ्याकडे भावनात्मक बाजूने पाहण्यापेक्षा राजकारण म्हणून पाहिलं तर अक्षरशः माहितीचा महापूर येतोय आणि अफात शिकायला मिळतंय.. कदाचित आयुष्यभराचं राजकारण येत्या ६ महिन्यात शिकायला मिळेल.

In reply to by श्रिपाद पणशिकर

वाघांना फक्त येवढेच विचारु ईच्छितो काव्व्ं बोने खेयशील का पोराईंत? दिनांक 17 नोव्हेंबर ची प्रतिक्रिया बावा बोत बडा झोल है ये और ये 24 को ही चालू हो गया था. बारीश वाले चिच्चा पहले दिन से इस खेल मे खेल रहे है. किसकी तरफ से ;) वो अप्पन को नहीं पता :) चिच्चा का ऐसा है पडोसी का बेटा पेड पर चढा उतरा तो आम मिलेंगे और गिर गया तो खाना. फिलहाल कांग्रेस का कुछ भी स्टेक पर नहीं है. शिवसेना की वो हालत होने वाली है भंडारे में गये तो खाना खतम बाहर आये तो चप्पल गायब. भाजपा अपने रीसोर्सेस का फुल गैर फायदा लेकर और चिच्चा के मदत से पहले सेना को बेहद कमजोर कर देगी और चिच्चा कांग्रेस को. आणि कांग्रेस ने हा खेळ ओळखलाय Have popcorn and let's wait and watch. http://misalpav.com/comment/1053683#comment-1053683

ऐ कांचा सेठ साला बंदुक भी दिखाता है और पिछे भी हटता है हांय, पिछे नंही हटने का क्यों की पिछे हटने से पुराना वक्त वापिस नहीं आने वाला. तुम फंस गये मेरी चाल मे ऐक मामुली मोहरे की तरह. हांय. यंहा भी शतरंज की चाल वोही है विजय दिनानाथ वाली. येन्जाय माडि ;)

In reply to by श्रिपाद पणशिकर

मस्त रंगत आणली हैदराबादी लहजा वापरून . पण ते "काव्व्ं खेयशील का पोराईंत आणि एन्जाय माड़ी " नाही समजले हो .

In reply to by ट्रम्प

काव्व्ं खेयशील का पोराईंत (1००% वर्हाडी) कसय ट्रंप तात्या आम्ही लहान असताना अस्सल रांगडे खेळ खेळायचो मग काय कधी वर्ग मैत्रीणी तर कधी बहिणी अडुन बसायच्या हट्ट करायच्या आम्हाला पण खेळायचय नाही सामिल केल की कंप्लेंट करायच्या मग काय पर्याय नसायचा... ह्यांना सामिल करुन मग आम्ही त्यांच्यावर राज्य आले की त्यांचा अक्षरश: अंत पहायचो.. मेटाकुटिला यायच्या अक्षरश: रडकुंडिला येवुन चिडचिड करायच्या.. कधी कधी रडायच्या सुद्धा... आणि त्यावेळी आम्ही ओरडायचो "काव्व्ं बोने खेयशील का पोराईंत" खेयशील का पोराईंत = पुन्हा हट्ट करशील मर्दानी खेळ खेळायचा एन्जॉय माडी = एन्जॉय करा

In reply to by श्रीरंग_जोशी

"आम्ही तुमचा चिदंबरम करू" हे एवढे सोपे नसते. काळे उद्योग झाले,सत्तेतुन पायउतार व्हायची शक्यता दिसली की पुढारी पुरावे मिटवायच्या मार्गाला लागतात. किंबहुना काळे धण्दे हे पुरावे ठेउन कधीच केले जात नाहीत. म्हणूनच हरेन पण्ड्याना कोणी मारले, सोहराबुद्दिनला कोणी मारले, त्याच्या पत्निवर बलात्कार करुन जाळून टाकण्याचे आदेश कोणी दिले हे सर्वाना माहित असते पण पुरावे नसतात. पोस्टमधील संबंधित पुढारी पवारांचे जवळचे समजले जातात. सत्तेतून पायउतार होऊन पाच वर्षे झाली आहेत तेव्हा संबंधित अधिकार्याण्करवी पुरावे नष्ट केले नसतील ह्याची शक्यता कमी.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

अशा अनेक वावड्या उठवणे हा अनेक लोकांचं फावल्या वेळात व्यवसाय झाला आहे. प्रफुल्ल पटेल यांचे इकबाल मिरची बरोबर साटे लोटे दिसत आहेत परंतु सज्जड पुरावा नाही म्हणून इ डी त्यांना अटक करत नाहीये. परंतु त्यांची मालमत्ता जप्त होत आहे असे दिसते.( मालमत्ता करार बेनामी / बेकायदेशीर सिद्ध होण्याईतका पुरावा आहे बहुधा) https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/mirchi-files-after-praful-patels-submission-of-deal-ed-to-attach-ceejay-house/articleshow/71685370.cms?from=mdr ईडी आणि गुन्हे अन्वेषण खात्याना मोदी -२ मध्ये ढिलाई बद्दल सक्त ताकीद दिली गेली आहे. यामुळेच शिवसेना "नाराज" झाली आहे . म्हणून तर निकालाच्या दुसऱ्या दिवशी पण आम्ही दुसरा मार्ग पाहू शकतो अशी गर्भित धमकी दिली गेली. याबद्दल श्री फडणवीस हे केंद्राला( पक्षी श्री मोदी) "आस्ते कदम जा" हे पटवून देण्यास अपयशी ठरले (श्री मोदी यांनी ऐकण्यास नकार दिला) असे पण ऐकिवात आले आहे.

In reply to by इरसाल

हस्तर यांना शुद्धलेखन शिकवण्याचा प्रयत्न करु नये.. ते सर्व काही कोळून प्यायलेले आहेत.. त्यांचा हा स्तर वेगळा आहे..

मध्ये पुतण्यांनी मीडियाची मज्जा केली काल काकांनी केली , सगळं ठरलेलं आहे फक्त हळू हळू खात आहेत , नाही तर मग जल्लोष करायला मजा कशी येणार ?

ओके शरद पवार मोदी शहांना भेटले (शेतकऱ्यासंदर्भात प्रश्न घेऊन) ज्यातून त्यांनी पुन्हा सूत्रधार, व शेतकऱ्यांचा कळवळा असलेला कोण हे अप्रत्यक्ष अधोरेखित केलेच, सोबत साहेब कोणालाच सिंगलआउट कोणत्याही परिस्थितीत करत नाहीत हे ही त्यांनी पुन्हा अधोरेखित केले, हे राजकीय मुत्सद्दीकारक दबावतंत्र थोडेफार उद्धव ठाकरे सोडून कोणत्याच पक्षाच्या कोणत्याही नेत्याकडे नाही :(

In reply to by जॉनविक्क

शेतकऱ्यांचा कळवळा सगळ्यांनाच का येतो ते स्पष्ट आहे. फेर निवडणूका झाल्या तर एकगठ्ठा मते आपल्याच पारड्यात पडावी हीच इच्छा. आपल्या चेल्या चमच्यांना निश्चलनीकरणानंतर पैशाची तंगी झालेली शासकीय रमण्यातून भरून काढता येईल यासाठीच हि नाटकं चालू आहेत. जेथे जेथे पूर आले तेथे असलेल्या दुकानांचे छोट्या उद्योगधंद्यांचे अपरिमित नुकसान झालेच आहे. त्यांचे अश्रू पुसायला कोणीही तयार नाही. कारण त्यांची एकगठ्ठा मते नाहीत. छोट्या छोट्या गावात असलेले वाणी, इलेक्ट्रिशियन आणि लघुउद्योजक इ लोकांचे पण भरपूर नुकसान झालेले आहे. माझ्याकडे आलेल्या रुग्णाचा भाऊ सांगत होता. त्याचे कॉम्प्युटर दुरुस्तीचे दुकान आहे त्यात असलेल्या लोकांच्या संगणक हार्ड डिस्क रॅम इ पाणी गेल्याने निकामी झाल्या आहेत याची नुकसान भरपाई कशी करणार या चिंतेत तो होता. त्यातून ग्राहकांचे नुकसान भरून न दिल्यास धंद्यातूनच उठावे लागेल. त्याच्या शेजारी असलेल्या शिंप्याकडे लोकांनी दिवाळी साठी शिवायला टाकलेले कपडे चिखलाच्या पाण्याने भरले आहेत. ते कपडे काही केल्या नवीन करणे शक्य नाही. नुकसान स्वतः भरणे शक्य नाही. काय करायचे या चिंतेत तोही आहे. हीच स्थिती सांगली कोल्हापूर कागल इ भागात असलेल्या अनेक किराणा मालाचे दुकानदार, कागद, कापड तयार कपडे इ. चे व्यवसाय करणारे असेच हवालदिल झालेले आहेत. त्यांना विचारणारे कोणीही नाही. असंख्य शेतमजूर आहेत. त्यांची घरे वाहून गेली घरात असलेले किडूकमिडूक नष्ट झाले त्यांनासुद्धा कोणीही काहीही द्यायला तयार नाही. खरं तर या सर्वांची संख्या शेतकरूयांपेक्षा जास्त आहे. पण असंघटित असल्याने त्यांचा कोणीही वाली नाही. शेताच्या बांधावर जाऊन टीव्ही समोर नाटकं करणारे राजकारणी पाहून उबग आला आहे.

In reply to by सुबोध खरे

पण धागा निव्वळ राजकारणाविषयी असल्याने, समाजकारणाकडे इथे फोकस अप्रस्तुत आहे.

वरती दिलेल्या व्हिडीओमध्ये फडणवीस स्पष्ट बोलत आहेत , उध्दव रिपीट करत आहे , त्याबाबत कोणी खंडन करायला अजून कसे आले नाही याचे आश्चर्य आहे ? त्यातही ध चा मा कसा करायचा सापडले नाही वाटतं

आता इथली चर्चा वाचूनच राजकीय नेते योग्य तो निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे....

In reply to by मुक्त विहारि

योग्य तो या शब्दाला खूप महत्व आहे.. कारण आपण ज्या गोष्टींना महत्व देतो त्याला बहुतांशी राजकीय पक्षांचा मतदार अजिबात महत्व देत नाही हा इतिहास आहे.

है शाबास शिवसेनेनेने हिन्दुत्वाची गाय सोडून धर्मनिरपेक्षतेची बकरी पिळायला घेतली. आपला देश आणि देशाची घटना सेक्युलर या संकल्पनेवर आधारित आहे https://www.loksatta.com/maharashtra-vidhansabha-election2019-news/shiv-sena-leader-sanjay-raut-on-secularism-no-need-to-discuss-maharashtra-vidhan-sabha-election-2019-jud-87-2019467/

Shiv Sena demands deletion of 'secular' and 'socialist' words from Constitution Read more at: //economictimes.indiatimes.com/articleshow/46041493.cms?from=mdr&utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst “From the time they (the words) were included in the Constitution, it is being said that this country can never be secular. Balasaheb Thackeray and, before him, Veer Savarkar had been saying that India was divided on the lines of religion. Pakistan was created for Muslims, thus, what remains is a Hindu rashtra,” said Raut, adding that India was never secular. 'The country belongs to Hindus': Shiv Sena wants the words 'secular' and 'socialist' REMOVED from India's constitution https://www.dailymail.co.uk/indiahome/indianews/article-2930422/The-country-belongs-Hindus-Shiv-Sena-wants-words-secular-socialist-REMOVED-India-s-constitution.html

यापुढे कधीही शिवसेना नावाच्या ओप्पोर्चुनिस्ट पक्षाला मतदान करणार नाही. भले उद्या त्यांनी BJP शी पुन्हा युती केली तरीही.. ज्या तत्वावर पक्ष उभा केला त्यालाच लाथ मारून फक्त CM पदासाठी पूर्ण 180 डिग्री चेंज.. अरे पब्लिक ला काय चूxxx समजता का?? ज्यांनी त्यांचे मत शिवसेनेला फक्त युती होती म्हणून दिले अन्यथा BJP ला दिले असते अश्या सर्व लोकांची हि फसवणूक नाही काय..

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा आग्रह स्वीकारला असे कानावर आले आहे. हा माणूस अतिशय हुशार आहे हे नक्की. खरे नाट्य मात्र आता रंगणार.

In reply to by जॉनविक्क

हया व्यक्तीमधे राजकीय चाली थंड डोक्याने खेळण्यात माजी पंतप्रधान नरसिंहराव यांची गुणवत्ता आहे असा कयास होता, आता मात्र चाचणी कार्यक्षमता कितपत आहे याची होईल.

मी परत येईन ... नाही नाही... मी परत आलो सुध्दा पैजारबुवा,

देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले आणि अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. राजकारणात जे समोर दिसत असते ते तसे कधीच होत नसते याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला ! :) हम को मिटा सके ये ज़माने में दम नहीं हम से ज़माना ख़ुद है ज़माने से हम नहीं :- जिगर मुरादाबादी भाजप ला शरद पवार समजायला १०० जन्म घ्यावे लागतील ! :- इति संजय राउत आता इंद्राचं आसन दिलं तरी नको :- इति संजय राउत सार्वजनिक वस्त्रहरणाच्या पहिल्या अंकातुन बोध न घेतल्याने आज महा उघड वस्त्रहरण झाले ! :))) भलतीच गोष्‍ट करूं गेले असतां धड स्‍वार्थ ना परमार्थ अशी स्‍थिति होऊन फजिती मात्र पदरांत पउते. पुढील अभंग पहा एक ब्रह्मचारी गाढव झोंबतां। ह्मणोनिया लाता पळालें तें।। गाढवहि गेले ब्रह्मचर्य गेलें। तोंड काळे झाले जगामाजी।। हे ना तैसे झाले हे ना तैसे झाले। तुका म्‍हणे गेले वायाचि तें।। -तुगा २९८५.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मैं किसी और का हूँ फिलहाल के तेरा हो जाऊं :- FILHALL

बहुतेक पुतण्याने काकांचा गेम केला असावा पैजारबुवा,

In reply to by यशोधरा

यशोधरा, मलाही हीच शंका आली. अजित पवारांत इतका दम कुठून आला. राष्ट्रवादीच्या ५४ च्या ५४ आमदारांच्या सह्यांचं पाठिंबापत्र दिलं म्हणे. आणि थोरल्या पवारांना आजिबात सुगावा लागला नाही? अशक्य! सर्वथैव अशक्य!! त्रिवार अशक्य!! आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

राजकीय पलटी मारायची नसल्याने त्यांचे कडून तरी दग्याफटाक्याची तूर्तास अपेक्षा नाही. हे अजितदादा प्रकरण आठवडाभर मस्त रंगणार. बीजेपीला आता अभद्र युती केल्याबद्दल आधी शिवसेनेला शिव्या घालणाऱ्या मतदारांनी आता मात्र तोंड न उघडल्यास ती मिपाकर नसण्यापेक्षाही लांच्छनाची बाब असेल हे नक्की

आई भवानीच्या आशीर्वादाने आणि हिंदुहृदय सम्राट मा. श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यशिर्वादाने गद्दार लोकांचा कोथळा बाहेर काढून आम्ही शिवसेनेचा मुख्यमंत्री महाराष्टात आणूच. कोण आहे रे तिकडे ? आं फडणवीस मुखमंत्री झाले सुद्धा? हा उभ्या महाराष्ट्राच्या पाठीत खुपसलेल्या खंजीर आहे उभ्या महाराष्ट्राची जनता याचा सूड घेतल्या शिवाय राहणार नाही जय भवानी जय महाराष्ट्र

थांबा.... हे काहीतरी विचित्र वाटतंय....मला तर भीती वाटतीय कि हे फार वाईट पद्धतीने कोसळणार आहे आणि भाजपची फजिती होणार जश्या प्रमाणे शपथविधी झाला त्यात असे दिसले कि भाजप पक्ष म्हणून हजार असला तरी राष्टवादी पक्ष म्हणून दिसला नाही जणू अजित पवार यांनी पक्षाला ना विचारता वैयक्तिक निर्णय घेतला ... तसे नसेल तर राष्ट्रीय चे इतर नेते ( जयंत पाटील वैगरे) हि हजार असते.. शरद पवारांचे तर नाव हि नाही ... पण मग हा हि प्रश्न पडतो कि राज्यपालानी राष्ठ्रवादी चा पाठिंबा कसा काय पडताळून पहिला? समजा शरद पवारांना हे मान्य नसेल तर मग घटनेप्रमाणे अजित पवार आणि त्यांचे पाठीराखे राष्ट्रवादी पासून फुटणार का ? आणि फुटले तर त्यांना परत निवडणुकीला सामोरे जावे लागते का? ( हा झाला कायद्याचा प्रश्न) काही तरी गडबड आहे आणि यात लोकशाही चा खून झालं हेच खरा मुळात ज्यांना निवडून दिला जनतेने १०५ +५६ यांनीच सरकार स्थापन कार्याला पाहिजे होता...

महाभूकंप.. आता प्रत्येकानेच सत्तेसाठी आपले खरे रूप प्रकट केलेले असल्याने रोचक प्रकरणाची सुरुवात झाली आहे. आता प्रश्न हा आहे की जनतेचे काय होणार

In reply to by जॉनविक्क

सत्ता स्थापन होणार असताना आपल्याच पक्षाशी प्रतारणा करून अजितदादानी नेमक्या कोणत्या नाराजीला वाट करून दिली आहे हे जाणून घ्यायला आवडेल.

पुतण्याला पुढे करून काकांनी चाल खेळलेली दिसतेय. पुतण्यात दम असता तर हे अगोदरच झाले असते. ३० तारखेला पुतण्या संपलेला असेल.

क्या मिंया क्या तो बि समझा रे मेरे कु.. इत्ते साल से मिस्सलपाव पे बैठा हुं..कुछ इज्जत हय यारों मेरी..अब जो आज हुवा है यईच मै १७ को बोला था मिंया. लेकिन ये लोकल बस्ति के चिप कॅटेगरि के लोंगा जो मिटिंगा मिटिंगा खेल रहे थे अगर ईस्माइल भाई क्या बोल रे जर्रा सुन लेते बोले तु आज ऐसा चिक्कड मे नय फंसते रे. राउत हौला किदर कु गंया रे जो अबरा कु उप्पर निच्चु कर कर के दिन रात बांता खोदता था...ऐसे बैगना को खडा कर दिंये रे तुम गुरुघंटाल लोगा के सामने, दो गुजराति, बारिश वाले चिच्चा और कांग्रेस के बुढे बंगारु लोंगा मजाका लगे रे तुमकु ;) चिंदिचोरो कि पार्टि हो गयि है पिंडे कि मेरी. काव्व बोने खेयशिल का पोराईत :) बावा बोत बडा झोल है ये और ये 24 को ही चालू हो गया था. बारीश वाले चिच्चा पहले दिन से इस खेल मे खेल रहे है. किसकी तरफ से ;) वो अप्पन को नहीं पता :) चिच्चा का ऐसा है पडोसी का बेटा पेड पर चढा उतरा तो आम मिलेंगे और गिर गया तो खाना. फिलहाल कांग्रेस का कुछ भी स्टेक पर नहीं है. शिवसेना की वो हालत होने वाली है भंडारे में गये तो खाना खतम बाहर आये तो चप्पल गायब. भाजपा अपने रीसोर्सेस का फुल गैर फायदा लेकर और चिच्चा के मदत से पहले सेना को बेहद कमजोर कर देगी और चिच्चा कांग्रेस को. त्यानंतर म्हणजे उपरोल्लेखित घडल्यावर (किमान चार महीने) ऐक तर सेना फोडण्यात येईल नाही तर काकाच आपला एखाद्या गट सोइस्कर रित्या पुरवतिल. तोंडाचि वाफ गमावुन आणि अत्यंत मुर्ख लोकांना PR बनवुन फक्त Embarrassment नशिबात येते. ह्याला राजकारण नाही शुध्द मुर्ख पणा म्हणतात. तुमच्या कडे दोन पैकिं एका ही कांग्रेस चे लेखि पत्र नांहि कि ज्यात त्यांच्या सपोर्ट चा उल्लेख असेल माध्यमात येणाऱ्या बातम्यांच्या आधारावर दिले लेकरा ला राजभवन वर पाठवुन व्वा रे बाजिराव . मुंह करे बाता अन ××××× लाता. खरे राजकारण आत्ताशा आत्ताशा सुरु झालेत. वाघांना फक्त येवढेच विचारु ईच्छितो काव्व्ं खेयशील का पोराईंत? देखतें रहो हंसते रहो :)

In reply to by श्रिपाद पणशिकर

हायला इस्माईल किधर था इत्ते दिनोसे. गुल्लू भाई की याद नहीं आई क्या रे तुमको. की साला तुम भी सियासत के पिच्चू भागरा हौरे ! छिछोरे कामा कब छोडेंगे रे तुम. छोछोरे रे याद आया सलीम फेकू किधर है रे मियाँ !

In reply to by गुल्लू दादा

मां कि किरी किरी ये अंग्रेजा के साथ कामा कर कर के भेजे का कुकटपल्लि फ्राय हुवा है मिंया. अबी देख मेरे कु यादिच नय आरेला हय के अपन इदरकु मिस्सलपाव पे गुल्लू दादा से कब आंख्या मिलाया था. छिछोरेपन का ऐसा है गुल्लू के खरबुजे को देखकर खरबुजा रंग बदलताय बावा :) बंदर कित्ता बी बुढा हो जाये गुलाटी मारना नही छोडता. अरे किराक किदर कू गयां रे ढिले देख गुल्लू आया है अपना बोत जिगरी है जरा दो पिलेट अंडाबोंडा चार समोसा और तिन ईरानी चाय लगा रे टेबल पे.

वाचा लेको लय कष्टाने टाईप केलय ;) स्थळ- हिंजवडि पुणे-सुपे प्रांत हिरडस का कुठलेसे मावळ. वेळ- अत्यंत चुकीचि काल बरोबर ह्याच वेळी हापिसातुन घरी यायला निघालो होतो तब्बल सोळा प्रहर निकराने खिंड लढवोन गड (Production Server) सर करोनी त्यावर तिरंगा अंमळ उंच फडकावोन आपल्या शिलेदारांसह टोपीकंरास वर्हाडि शिव्यांच्या लाखोलिसह मुळा मुठे चे पाणि पाजीले. घरी आलेयांसी फर्जंद सोळा प्रहराची रणगाथा शौर्यगाथा मातेस ह्याच बखरकारी भाषेत सांगित होता ... तेजायला कसले काय पुन्हा फोन वाजला पाहतो तर टोपीकरांचा नंबर बायको लागली ना टण टण करुन भांडायला... तब्बल 48 तास तु घरी नव्हता... चुलित गेला असला जॉब म्हणुन तिने माझा फोन स्विच आफ केला आणि माझे हापिसात परतीचे दोर कापियेले... "करमणुकि साठी सुद्धा नको बघत जाउ रे त्या गरीबो के गालिब ला " हे तिने माझ्या बखरकारी वर भाष्य करोन संजयास वेडे ठरविले. झोपलो ते संध्याकाळीच उठलो टिव्हि बघतो तर अपेक्षित खेळ सुरु झालेला होता अपेक्षेपेक्षा बराच आधी ऐव्हढाच काय तो धक्का. आता मला सांगा वर्गात किति होतकरु असे आहेत ज्यांना अजुनहि असे वाटतेय कि काकांच्या मर्जी विना हे झालय आणि काका काहितरी चमत्कार करतिल आणि "हे" पुन्हा 360° फिरेल.... हात वर करा बे पोट्टेहो ;) आता मोदी-शहा ह्यांनी हा खेळ सगळे खेळाडू आणि पक्ष त्यांच्या आवडत्या पिच वर आणलेयत "कायद्याचा किस आणि तांत्रिक घटनात्मक बाबी" अब खेलो. राज्यपालांचे सरकार स्थापनेबाबत चे अधिकार घटने ने त्यांच्या विवेका वर सोडलेयत. त्यानुसार सगळयात मोठा पक्ष भाजपा स त्यांनी पाचारण केले भाजपाला शक्य नसल्याने....मग राजियांसी बोलाविणे जाहले पण बारामती कर मिर्झाराजियांनि राजियांस तहाच्या बोलणीत ऐसे गुंतियले कि राजियांने तहाच्या खलित्या विनाच बाळ राजियांस दिल्ली चा गनिम बघतसिंहाच्या महालि पाठवोन आपले मागल्या सात पिढ्यांचे हसे करोन घेतले. नंतर राष्ट्रवादी ला बोलावणे आले पण त्यांना दिल्या गेलेल्या वेळेच्या बरेच तास आधी त्यांनी राज्यपाल महोदयांना लेखी स्वरुपात कळविले की त्यांना सुद्धा सरकार स्थापणे शक्य नाहि मग रीतसर राष्ट्रपति राजवट लावण्यात आलि. आता मला सांगा इतकी प्रचंड उठापटक आलरेडी झालेलि असतांना मोदी-शहा असा खेळ खेळतिल का कि जो हेडकाउंट, घटनात्मक, तांत्रिक किंवा कायदेशीर रीत्या अव्यवहार्य असेल आणि ते तोंडघशि पडतिल. ज्यावेळेस अजित पवारांनी शपथ घेतली त्यावेळेस राष्ट्रवादी चा विधीमंडळ / गटनेता कोण होता? राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांच्या सह्यांचे पत्र अजित पवारांनी विधीमंडळ/गटनेता ह्याच नात्याने राज्यपाल ह्यांच्या कडे सुपुर्द केले. आता जरी काकांनी पक्षाचि बैठक बोलावलि तर ती पक्षाध्यक्ष ह्या नात्याने फक्त पक्षाचि बैठक असेल "विधिमंडळा" ची नाही. दिलीप वळसे पाटलांचि विधीमंडळ नेता म्हणुन नेमणुक कायदा व घटने ने होणार्या विधान सभा अध्यक्षांच्या विवेकावर सोडलीय त्यामुळे ती टिकणार नाहि आणि हे काकांना आणि दिलीप वळसे पाटलांना दोघांनाहि माहित आहे. दिलीप वळसे पाटिल माजी विधानसभा अध्यक्ष आहेत. त्यामुळे विश्वासदर्शक ठरावाच्या दिवशी अजित पवार व्हिप बजावून भाजपा ला मतदान करण्याचे आदेश देऊ शकतात. जो आदेश राष्ट्रवादीचे आमदार डावलु शकत नाहीत. जर विरोधात मतदान केले तर मत बाद होईल. राहता राहिला सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेचा प्रश्न तर माझ्या मते कोर्ट फार फार तर दिलेली मुदत थोड़ी कमी करेल. बघा कोर्टात सुद्धा राजियांस समोर केले गेलेय. काहि लोकांना ऐका नेत्रुत्वात सौम्य असोन पण मुत्सद्दि गुण दिसोन आले माझ्या मते हे नेत्रुत्व भोळसट आणि बावळट पणाची जी सिमारेषा असते ऐक्झाक्ट त्यावर उभे होते / आहे ज्याच्या चाव्या नार्वेकर नावाचा ऐत्तदेशिय फिरवितो. अभी कुछ नंही होनेवाला. आता आज हे मिडिया वाले भामटे भणंग कायद्याचा भयंकर किस पाडतील. सो ऐन्जाय माडि ;)

In reply to by श्रिपाद पणशिकर

घडले नाही तर तर माझा अभ्यास कमी पडला म्हणेन. विधिमंडळ नेता म्हणून अजितदादाकडेच सह्याचे पत्र असणे बंधनकारक होते त्यामुळे ते त्यांचेकडे होते यात आश्चर्य नाही. राष्ट्रवादीची मते बाद ठरली तर भाजपा बहुमत सिद्ध करणार कसे बरे ? यात एकच शक्यता आहे ती म्हणजे काँग्रेसही फुटणे पण भाजपा काँग्रेस व रा काँग्रेस एकाच वेळी फोडू शकत असेल तर विषयच संपला, पण शिवसेना विनाकारण सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होणार व तगडे विरोधक बनणार, गंमत इतकीच वाटते ज्या चुका काँग्रेसने मोदींना सत्ताबाहेर ठेवण्याचा प्रयत्न म्हणून केल्या नेमक्या त्याच चुका भाजपा सेनेबाबत का करत आहे ?

In reply to by जॉनविक्क

राष्ट्रवादीची मते बाद ठरली तर भाजपा बहुमत सिद्ध करणार कसे बरे ? वाह भाउ वाह आशावादी असणे वाईट कधीच नसते फक्त तेव्हढे विश्वास दर्शक मताबद्दल पुन्हा ऐकदा बघता का, नाही म्हणजे सदस्य अनुपस्थित राहिले किंवा व्हिप मोडुन केलेले बाद झालेले मते मग त्यानंतर कशाच्या दोन तृतीयांश किती लागतील वगैरे वगैरे.

In reply to by जॉनविक्क

राष्ट्रवादीची मते बाद ठरली तर भाजपा बहुमत सिद्ध करणार कसे बरे ? वाह भाउ वाह आशावादी असणे वाईट कधीच नसते फक्त तेव्हढे विश्वास दर्शक मताबद्दल पुन्हा ऐकदा बघता का, नाही म्हणजे सदस्य अनुपस्थित राहिले किंवा व्हिप मोडुन केलेले बाद झालेले मते मग त्यानंतर कशाच्या दोन तृतीयांश किती लागतील वगैरे वगैरे.

In reply to by श्रिपाद पणशिकर

अगदी ऑलमोस्ट हेच आहे. इथलेच वाचून म्हणता आहात का? अगदी साधा प्रश्न आहे, आरोप वगैरे नाही, ह्याची नोंद घ्यावी.

In reply to by यशोधरा

ताई मि भाउ तोरसेकर, निखिल वागले, सुमार केतकर, सामना, अर्णब गोस्वामी, झी न्यूज़ इति. ह्या सारख्या विद्वानांच्या वाट्याला नाहि जात हो. त्यांची त्यांच्या पक्षाशी बांधिलकी आहे आणि ते प्रत्येक अगदी प्रत्येक गोष्ट त्यानुसारच जस्टिफाय करतात. असो बापडे. आता तुम्हाला असे का वाटले असावे की मि हे कुठेतरी वाचुन इथे आपल्या ज्ञानाचे प्रदर्शन करतोय? Just because of the Content, Right? तर तुम्हाला थोड्याफार फरकाने जालावर इतरत्र अनेक जागी अशीच माहिती मिळेल जी माझ्या प्रतिसादात आहे कारण त्या प्रश्नाचे उत्तर तेच आहे. ह्याच धाग्यावर तुम्हि माझे 17 तारखेचे प्रतिसाद बघितलेत तर तुमच्या लक्षात येईल कि मि हे तेव्हाच सांगितले होते कि काका शिवसेनेला फक्त खेळवतायत आणि नंतर हे कांग्रेस ला कमजोर करतील, शिवसेना फोडायला मदत करतिल किंवा स्वयं:चाच एखादा गट भाजपा ला देतिल. अहो ताई आमच्या पिढीने बाल्यावस्थेत व्हि.पि. सिंग, चंद्रशेखर ह्यांचा खेळखंडोबा, शरद पवारांनी फोडलेलि शिवसेना, नरसिंहरावांची तारेवरची कसरत, आमच्या तारुण्यावस्थेत देवेगौड़ा, गुजराल ह्यांची कांग्रेस ने केलेली फटफजिति, सोनियांच्या समर्थकांनी संडासात कोंडलेले केसरी, राज्यपाल रोमेश भंडारी ह्यांची विवादास्पद कारकिर्द तर वाजपेयी ह्यांनी 13 दिवस मग 13 महिने नंतर पाच वर्ष चालवलेले सरकार, जयललिता आणि आता चे हिंदू सम्राट सुब्रमण्यम स्वामी ह्यांनी रडकोंडीला आणलेले वाजपेयी, अडवाणी. त्यासुमारास संसदेत झालेलि ओजस्वी भाषणे जार्ज फर्नांडीस, वाजपेयी, अडवाणी, स्वराज, कम्युनिस्ट नेते इत्यादि इत्यादि. हुश्श ;) आता मला सांगा मि किती अविश्वास प्रस्ताव पाहिलेत?

In reply to by श्रिपाद पणशिकर

एक शक्यता आणखी सांगतो मि किंवा जालावर इतरांनी वर्तवलेले अंदाज खोटे ठरले आणि कसेही करुन जर हे सरकार विश्वास मत नाही संपादन करु शकले तर फडणवीस (शहा) हे राज्यपालांना विधानसभा बरखास्त करुन पुनः निवडणूकीचा सल्ला देतिल आणि राज्यपाल तो मानतील. कारण तोपर्यंत सर्व पक्षांचा खेळखंडोबा खेळन झाला असेल, राज्यपालांचे "तो विवेकी" निर्णय कोर्टात सुध्दा टिकेल. अहो हे राजकारण आहे कुठलेहि विधिनिवेश न ठेवता खेळायचा खेळ आहे. ईथे गितकार पहिले आपल्याला साजेसे गीत लिहितो मग त्याला साजेसी अशी "घटनेची" चाल शोधतो. हा खेळ कांग्रेस, काका, मोदी शहा ह्यांनी खेळावा. बखरकारी भाषा बोलणारे येरगबाळ ईथ फक्त तोंडघशि पडतात.

ये अमित शाह इंसान नहीं रहने का.. अबे ये जिन्न है जिन्न देख तो चंद्रागारु जैसा हौला जो हिल गया था अब्बी हल्लु हल्लु वापिस आने के मुड मे होना बावा. और किसकु मंगताय आजादी? N Chandrababu Naidu @ncbn Dear Sri @AmitShah Ji, truly appreciate your esteemed office’s quick redressal of the issue related to Amaravati not being mentioned on India’s map. You have endeared yourself to Telugu people by taking this step.

In reply to by श्रिपाद पणशिकर

बॉस, अमित शहा जर माझ्या भाग्याने तिथे समोरासमोर भेटले तर त्या माणसाला मी अक्षरशः लोटांगण नमस्कार घालेन... मराठी मिळत नाही, तेव्हा हे इंग्रजी घ्या.. नरहर कुरुंदकर शिवाजी महाराजांबद्दल A Hindu Power has certain distinguishing traits. It is not as if they do not emerge victorious in a war. Victories – there have been many. But their victory does not destroy their opponent. The latter’s territory doesn’t diminish, his might is not erased. The victor’s territory doesn’t expand. Even though victorious, he becomes weaker and stays so. In short, it is plain that they faced total destruction in defeat and weakening in victory. A new chapter in Hindu history is begun with Shivaji wherein battles are won to expand the empire while strength and will power is preserved in a defeat. Secondly, the Hindu Rulers used to be astonishingly ignorant of the border situation. Their enemy would catch them unawares, often marching in over 200 miles in their territory and only then would they wake up to the situation. Whatever may be the outcome of the battle, only theirs would be the land to be defiled. The arrival of Shivaji radically changes this and heralds the beginning of an era of staying alert before a war and unexpected raids on the enemy. Thirdly, the Hindu kings habitually placed blind faith in their adversaries. This saga terminates with Shivaji performing the treacherous tricks. It was the turn of the opponents to get stunned. In the ranks of Hindu kings, the search still going on for somebody to compare with Shivaji on this point.

मिपा वर याबद्दल खूप मोठी चर्चा होईल असे वाटले होते पण तसं काही दिसत नाहीये ! आस्चर्य... मी तर t20 बघावी तस बघत बसलो होतो बघत भूकंपाच्या दिवशी! असो काही मुद्दे आणि प्रश्न - अजित पवारच्या शपथविधी ज्या प्रकारे झालं त्यात काही तरी गडबड आहे हे मी म्हणले होते ते खरेच दिसते, शपथविधीत ते "पक्षाचा चा निर्णय" असे म्हणले नाहीत तर " माझा निर्णय" असे म्हणाले .. आठवा - ज्याअर्थी शरद पवार आणि ठाकरे यांनी उघड एकत्र पत्रकार परिषद घेतली त्याअर्थी खरंच याला राष्ट्रवादी चा पाठिंबा नाही आणि अजित पवरांकडे त्यांनी जेव्हा हि पावलं उचलावी तेव्हा पुरेशे सभासद नवहते ३६/54. - त्यांनी खरंच जर अवैध मार्गे त्या ५४ च्या यादीचा उपयोग केला असेल तर ते आणि भाजप दोन्ही तोंडावर अपाटणर.. त्यांचा काय ते महिन्यात अन्यातवासात जाऊन परत काकांकडे आरामात जाऊ शकतील, भाजपाची वाट लावून - काल पर्वा पर्यंत लोकांच्या मनातून शिवोवसेना उतरली होती आत भाजप हि उतरणार,, मिळविलेला पुण्य असले धेंडंडगुजरी काम करून घालवणार असे दिसतंय ! - सर्वात आस्चर्य याचा वाटतंय कि एवढा मोठा निर्णय घेताना अजित पवरांच्या म्हणण्याला ८-१० आमदार भुलले हे समजू शकतो.. पण पूर्ण भाजप कसे गंडले? त्यांनी शरद पवर्णकडून खात्री कशी नाही करून घेतली? असं कसा? - शरद पवारांचाच हा खेळ वैगरे हे वाचतोय पण १००% खरं वाटत नाही... त्यांना जर भाजपाला मूक पाठिंबा द्यायचाच होता किंवा उघड देऊन सेनेला त्रास द्यायचा होता तर त्यांनी मागील ५ वर्षाप्रमाणे बहरून मूक पाठिंबा देऊ केला असता! - विधिमंडळ नेत्याला काढण्याचाच अधिकार विधिमंडळ पक्षाला ( ५४ ) असतो ना? कि राजकीय पक्षाला? उदाहरणार्थ इंग्लड मध्ये किंवा ऑस्ट्रेलियात काही वेळा चक्क पंतप्रधानाला काढण्यात आले ते स्वतच्यात पक्षाच्या संसदीय सभासदांनी, त्यात त्या पक्षाच्या निवडून ना आलेल्या किंवा पक्ष अध्यक्ष वैगरेनं प्रत्यक्ष मतदान करा येत नाही , संसदीय सभासदांची बैठक होते त्यात कोणीतरी आहे त्या मुख्याला "च्यालेंज " करतो , मतदान होते .. तिथे पक्षाचा अध्यक्ष सुद्धा उपस्थित नसतो ! मग हे भारतात हि लागू नाही का ? तिन्ही ठिकाणी वेस्टमिनिस्टर पद्धतच आहे जवळ जवळ! म्हणजे अजित पवारानं काढण्याचा अधिकार ( फक्त संसदीय नेतेपदाच्या जगेवरून , पक्षातून नव्हे) फक्त त्या ५३ सभासदांना आहे .. एकूण काय हा राडा सेनेनेच घातला आणि भाजप आता त्याच ठरलं जातंय ... मुळात दोनचाच वैचारिक युत्या यौग्य होत्या सेने भाजप आणि २ कांग्रेस ,, आता दुसरे काहीही घडले तरी ते अनैसर्गिकच असणार ... ते योग्य नाही आणि टिकणार नाही .. जनतेची दिशाभूल सेनेने, पवारांनी आणि आता भाजप ने केली असेच म्हणावे लागेल ( काँग्रेस काय काठावर )

In reply to by चौकस२१२

मिपा वर याबद्दल खूप मोठी चर्चा होईल असे वाटले होते चौकस साहेब गेले ते दिवस ;) काय जबरदस्त चर्चा व्हायच्या इथे पण आता नाहि होत त्याचे कारण म्हणजे... असो. मि सुध्दा आपला फावला वेळ व्टीटर वर घालवतो खुप सारे फालोवर्स जमवलेयत आणि आवडता विषय आहे संरक्षण आणि त्यासंदर्भात घड़णार्या घडामोडी आणि अनुषंगाने पाकिस्तान. साहजिकच केवळ त्यामुळेच दुसर्यांदा मागच्या आठवड्यात माझे अकाउंट ISPR Interns च्या Mass Reporting मुळे Block करण्यात आले आणि ते परत मिळेपर्यंत ईथेच मिसळपाव वर. बारा तारखेला दुपारी हापिसात मिटिंग मिटिंग खेळत असताना मि हे व्टीट काहि लोकांना टॅग करुन टाकले होते Where the Shiv Sena is screaming that the Governor did not give them more time then why did the NCP raised their hands eight hours before the time given to them ? What's Going On? ह्या व्टीट ला काहि मिनिटातच टॅग केलेल्या एका व्यक्ति ने जी बंगाली असुन राईट विंग आणि व्टीटर वर मोठ नाव आहे खालील रीप्लाय खुप सार्या इमोजी सहित गम्मत म्हणुन दिला. Maybe they don't want the Prime Minister to leave for Brazil late at night. हा विषय इथेच संपला पण हा किडा काहि डोक्यातुन जाईना नंतर विचार केल्यावर लक्षात आले कि अजित पवारांनी राज्यपालांना जे मुदतवाढि संदर्भात आठ तास अगोदर पत्र लिहिले साहाजिकच ते शरद पवारांच्या संमति ने लिहिले त्यामुळेच माझा असा विश्वास आहे कि काका फक्त शिवसेनेला खेळवतायत आणि तेच मि माझ्या प्रतिसादात 17 तारखेला ह्या धाग्यावर लिहिले. भाषा थोड़ी हैद्राबादि आणि विनोदी अंगाचि होती पण त्यातिल एक वाक्य पुन्हा लिहितोच. चिच्चा का ऐसा है पडोसी का बेटा पेड पर चढा उतरा तो आम मिलेंगे और गिर गया तो खाना और शिवसेना की वो हालत होने वाली है भंडारे में गये तो खाना खतम बाहर आये तो चप्पल गायब.

In reply to by जॉनविक्क

आमच्या intellectually HIGH पणाचे उदाहरणे इथलेच खुप सारे जुने जाणते मिपाकर देतील माझे व्टिटर हॅंडल चे नाव वाचुन जे कि माझे खरे नाव आहे पण त्यानंतर माझा हा मिपा आयडी ब्लॉक होईल ;) आणि तसेहि अजुन व्टिटर सोबत पत्रव्यवहार सुरु आहे अकाउंट वापस मिळेल तेंव्हा बघु.

काल पर्वा पर्यंत लोकांच्या मनातून शिवोवसेना उतरली होती आत भाजप हि उतरणार,, मिळविलेला पुण्य असले धेंडंडगुजरी काम करून घालवणार असे दिसतंय ! बाडीस महा शिव आघाडीला आपले "संकरित" सरकार स्थापन करू द्यायचे होते ते आपल्याच मरणाने मेले असते. यानंतर एकतर फेर निवडणूक झाल्या असत्या किंवा निम्मे शिवसेनेचे आमदार भाजपाला पाठिंबा देते झाले असते. आता सरकार तरले तरी राष्ट्रवादीच्या भ्रष्ट लोकांना पावन करून घ्यावे लागेलं आणि नाही तरले तर जनतेची सहानुभूती घालवून बसल्यामुळे फेरनिवडणूक एकहाती जिंकणे कठीण होईल.