Skip to main content

सरकार पाडण्यामागे पवार ह्यांचा हात कसा ?

लेखक हस्तर यांनी मंगळवार, 12/11/2019 19:17 या दिवशी प्रकाशित केले.
बघा मुद्दे पटले तर १) विखे पाटील :- लोकसभा निवडणुकीच्या वेळी जुना वाद उकरून काढला वर सुजय विखे ने संग्राम जगताप ला पाडले ,आता जर भाजपचे सरकार आले असते तर इथे पण विखे नक्की मंत्री झाले असते व ताकत वाढली असती २) फडणवीस :- आतून मैत्री असेलहि पण एकतर विखे ह्यांना घेऊन नाराज केले आणि समक्ष आव्हान दिले ,गेम तर होणारच ३) ED :- ची नोटीस देऊन आगाऊ पणा करायची गरज नव्हती ,डिवचले तर गेम करणारच ४) चिवसेना :- आमचे १७५ आमदार आहेत हे आक्रमक पणे कोणीही सांगणार नाही विनाकारण ,दिल्ली शी शिव सेनेचा संपर्क कमी ,मग कोणी पाठिंबा दिला ? राष्ट्रवादी असणारच , परत ५ वर्ष आधी जाहीर पाठिंबा दिला होता भाजपला राष्ट्रवादी ने विधानसभा २०१४ ला ,आत्ता मुद्दाम कोणालाच नाही ,भाजप ला नाही कारण १ ते ३ ,आणि शिव सेनेला सौम्यपणे कारण सांगून मनाई केले कारण ५ ५) पुनर्निवडणूक :- झाली तर (पाऊस पडणार नाही तरी पण ) जागा वाढू शकतात कारण भाजप आणि शिवसेना ह्यांचे भांडण बघून लोक विटले आहेत जेव्हा राज्यपालांनी काल बोलावले तेव्हा शरद पवार स्वतः गेले नाहीत ,व सकाळीच राष्ट्रवादीने वेळ वाया ना घालवता जास्त वेळ मागितली ,८:३० पर्यन्त थांबण्यास काहीच त्रास नव्हता कारण काँग्रेस तास पण पाठिंबा दिला असता व देवेंद्र किंवा शिवसेने कोणीतरी साहेबांचा शब्द मानलाच असता उगाच फेर निवडणूक करण्यापेक्षा ,किंवा जास्त वेळ संध्याकाळी पण मागता आली असती ,तसेच राज्यपाल यांनी काँग्रेस ला पण आमंत्रण दिले नाही जणू त्यानं पाठिंबा मिळणारच नाही व दुपारीच राष्ट्रपती राजवट जाहीर केली अर्थात ठरलेले असू शकते आता पब्लिक च्या डोळ्यात फक्त फक्त राष्ट्रवादी आहे शिवसेनेचा चा गेम झालाय आणि भाजप खोटारडी आहे ,जनतेच्या मते ,काँग्रेस मूग गिळून गप्प आहे तेव्हा फायदा कोणाला ? पवार ह्यांना
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 51686
प्रतिक्रिया 93

प्रतिक्रिया

In reply to by सुबोध खरे

मग आता - पहिली ५ वर्षे पूर्ण भाजपा चा मुखमंत्री होता. दुसऱ्या पूर्ण पाच वर्षात पण आमचाच मुख्यमंत्री हवा या भाजपाच्या हट्टामुळे भाजपास विरोधी पक्षात बसावे लागले. जशास तसे. :)

In reply to by Rajesh188

राष्ट्र वादी आणि काँग्रेस ची युती किती तरी वर्ष टिकली . दोन्ही पक्षांनी एकमेकावर कठोर टीका सुद्धा केली नाही . ह्याला काय कारण असेल . साधं आहे. "खा आणि खाऊ द्या" संस्कृती

राजकारणी लोक डावपेच करण्यात सामान्य लोकांपेक्षा एक पावूल पुढे असतात. कधी कधी त्यांचे डावपेच राजकारणाच्या विश्लेषण करणाऱ्या जाणकार लोकांना सुधा खोटे ठरवतात. आपण आपल्याला जेवढे समजले तसाच अंदाज व्यक्त करणार. Bjp नी शिवसेना संपवण्याची पद्धतशीर तयारी केली होती सत्तेत असून सुद्धा सत्तेत सेनेचा प्रभाव कमी केला जात होता ह्याची जाणीव सेनेला होवू लागली असेल. म्हणून च सेना विरोधी पक्षा सारखी वागत होती असा एक माझा अंदाज . बरोबर असेल असं मी म्हणतं नाही. लोकसभेच्या निवडणुकीत bjp ला भरघोस यश मिळाले होते. एका पाठोपाठ घटनाऱ्या घटने मुळे मोदी जी लोक प्रियतेच्या शिखरं वर होते . प्रसिद्ध माध्यमांना मोदी शिवाय काहीच दिसत नव्हत . अशा परिस्थतीमध्ये सेनेला bjp विषयी आढी असून सुद्धा युती तुटणे बिलकुल फायद्याचे नव्हते. तो आत्मघात झाला असता.. युती tutavich अशी bjp ची मनीषा होती. त्यामुळे तयारी म्हणून काँग्रेस ,राष्ट्रवादी मधील प्रभावी नेत्यांना(ज्यांची त्यांच्या मतदार संघात वैयक्तिक छाप आहे) bjp नी भरती केली होती. युती तुटलीच तर त्यांना bjp नी वापरले असतं. ह्यांची पूर्ण जाणीव असलेल्या शिवसेनेची न कुरकुर करता आणि जास्त विरोध न करता युती केली आणि bjp ला बेसावध ठेवले. युतीचं फायदा होवून सेनेला बऱ्या पैकी जागा मिळाल्या. काँग्रेस,राष्ट्रवादी शी आघाडी करून bjp ला आपण धडा शिकवू शकतो आणि bjp चे पितळ उघडे पाडू शकतो अशी स्थितीत पोचल्या वर उघड बंड केले. हे माज विश्लेषण आहे. चुकीचं असू शकत. तुम्हाला काय वाटतं ह्या मता वर

फक्त (आपल्याच) पन्नासेक आमदारांचे पत्र घेऊन सरकार बनवतो म्हणत राऊत,बाळराजे,अजितदादा कतारमध्ये उभे आहेत. सोनूतै तयार नाहीत. त्याच किंगमेकर ठरल्या.

बातमी बदलली. उद्धव, पवार, अहमद पटेल यांच्यात समझौता झाला. फक्त मुख्यमंत्री ठरायचाय. - भाजपला दणका.

In reply to by कंजूस

सामान्यपणे त्या तिघन्चे सरकार येइल असाच अन्दाज आहे. पण तसे सरकार येणे हे शिवसेनेसाठी फारच वाईट ठरेल. कारण १. कोंग्रेसचा मतदार प्रामुख्याने वंचित भागातून येतो. २. राकॉ चा मतदार हा मुख्यत्वेकरुन मराठा आणि अन्य प्रस्थापित जातीमधून येतो. ३. शिवसेनेचा मतदार हा मुख्यत्वेकरुन मराठी, कुणबी आणि हिन्दुत्ववादी मराठा - ज्याला पवार आवडत नाहीत असा आहे. अश्या परिस्थितीत जर पवार आणि ठाकरे एक झाले, तर शिवसेनेचा हा हिन्दुत्ववादी मतदार मोठ्या संख्येने भाजपाकडे जाऊ शकतो. हिंदुत्ववादी मतदार हा प्रामुख्याने काँग्रेसचा विरोधी मतदार असतो. त्यामुळे हिंदुत्ववादी मतांपेक्षा देखील कोंग्रेसविरोधी मते या विषयात महत्वाची ठरतात. नेते लोकांना जरी या आधाडीने आनंद झाला तरी शिवसेना व्हिक्टिम कार्ड किती चांगल्याप्रकारे खेळते यावर शिवसेनेचे भविष्य अवलंबून आहे. याउलट भाजपाकडे आयते व्हिक्टिमकार्ड आलेले आहे, ज्यचा वापर करुन तो आपली पहिले मते तर राखेलच, पण त्याचसोबत शिवसेनेच्या वाट्यातली नाराज मते देखील घ्यायचा प्रयत्न करु शकतो. आता अन्य काही गोष्टी १. शेतकरी मुद्दा - भाजपाची मुख्य ताकद शहरी भागात आहे (जिथे शिवसेनेची देखील ताकद आहे), जिथे कर्जमाफी हा मुद्दाच नाहीहाउलट कर्जमाफी म्हणले की वसकन अंगावर येणारेच लोक जास्त आहेत. २. अश्या परिस्थेतीत सत्ता घेऊन कर्जमाफी दिली, तरी त्यातून नेमके पदरात काय पडेल हे सांगणे कठीन आहे. त्याची अंमलबजावणी तर कठीणच, कारण न्यायलये आणि कॅग यात मोडता घालू शकतील (कायदेतज्ज्ञानी याबाबात शहानिशा करावी कृपया). ३. बदलत्या परिस्थितीत कोंग्रेसशी जुळवुन घेणे, आणि हिंदुत्ववादी मतदार राखणे या दोन दगडांवर पाय ठेवायला शिवसेनेला ज्या कोलांट्या मारायला लागतील त्याची कल्पना करता शिवसेना अधिकाधिक हास्यास्पद होत जाऊन कालांतराने राज ठाकरे च्या पंक्तीत जाऊन बसेल ४. खरेच जर युती तुटली, आणि भाजपा ने मनसे शी आघाडी केली, तर मुंबै महानगरपालिका देखील शिवसेनेच्या हातातुन जाईल. राज ने भाजपाशी युती केली, तर ठाकरेना मानणारा हिंदुत्ववादी मतदार त्यांच्यामागे जाउ शकतो. त्यामुळे एकंदरीत हे सरकार हा मानसिक समाधानासाठी शिवसेनेसाठी ज्वालामुखीवर बसुन पोळी भाजण्याचा प्रकार आहे असे माझे मत आहे. खरेच जर तसे झाले तर पुढच्या पाच वर्षात राज ठाकरेनी पुन्हा उभारी घेतली तर आश्चर्य वाटायला नको. किंबहुना, मला तर कायमच असे वाटतेय की हा सगळा चाललेला प्रकार म्हणजे राज ठाकरेंच्या सभांचे आघाडीने चुकते केलेले बिल आहे.

In reply to by आनन्दा

काँग्रेस ची खूप वर्ष सत्ता देशात होती bjp आता आली आहे. काँग्रेस ,राष्ट्रवादी नाव वेगळी असली तर त्यांचा मतदार एकच आहे व्यक्ती बघून मतदान होते . कोणत्याही विभागात 100 लोक राहत असतील तर त्या मधील 7 ते 8 लोकच सक्रिय राजकारणात असतात बाकी त्यांच्या पाठी चालतात . खूप वर्ष सत्ता असल्या मुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी ल पारंपरिक राजकीय कार्यकर्ते आहेत ते बाकी पक्षा कडे नाहीत ग्रामीण भागात समस्या एकच प्रकारच्या असतात पण त्या मुळे त्या लोकांना स्वतः कडे वळवण्यासाठी उपाय पण एकच असतो. शहरात ( मोठ्या ,) तसे नाही दहिमिसल झाली असल्या मुळे समस्या असंख्य असतात आणि उत्तर पण अनेक हिंदुत्व हे सर्व शहरी लोकांना एक करू शकत नाही कारण जगात सर्व ठिकाणी असलेला ज्वलनत प्रश्न स्थानिक लोक आणि परप्रांतीय लोक ह्यांना धर्म एक करू शकत नाही . महाराष्ट्र मध्ये अशी अवस्था मुंबई पुण्या मध्ये आहे हिंदू पण दहीमिसल वाला स्थानिक हिंदू स्वीकारत नाही. कर्ज माफी हा ग्रामीण प्रश्न आहे पण शहरात राहणारे पण ग्रामीण नाळ असणारी लोक शहरात सुधा बहु संख्येने आहेत ह्याचा विसर नसावा

In reply to by आनन्दा

आनन्दा, काँग्रेस आणि शिवसेना यांच्या घरोब्याची उदाहरणं देतांना तत्कालीन परिस्थितीकडे दुर्लक्ष होतंय का? जुनी काँग्रेस इंदिरेची होती. तिच्यात नाही म्हंटलं तरी इंदिरेला पक्ष वाढायला हवा होता. आजची काँग्रेस पप्पूची आहे. पप्पूस पक्ष वाढवायची काडीइतकीही अक्कल नाही. मग काँग्रेसच्या नेत्यांनी सोनियासाठी कशाला काम करायचं? उद्धव काय वाईट आहे? निदान पवारांसारखा वापरून फेकून देणारा तरी नाहीये. उद्धवसोबत जाऊन स्वत:चा सवतासुभा राखता येतो. पवारांच्या सोबत गेलं तर तोही राखणं मुष्कील! मग काँग्रेसही फुटू शकते ना? आज पवार व काँग्रेस मिळून शिवसेनेला पाठींबा कशासाठी देताहेत? नाही दिला तर नवनिर्वाचित विधानसभा एकदाही न भरता बरखास्त होईल या भीतीने. आज या क्षणी निवडणुकांना परत सामोरं जायची हिंमत फक्त उद्धवकडे आणि केवळ उद्धवकडेच आहे. मला वाटतं आजच्या घडीला हे धाडस मुख्यमंत्रीपदाचा दावा सांगायला पुरेसं आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by आनन्दा

हि निवडणूक मराठी मतदारानींच चारशंकू करुन ठेवली यात शंका नाही !!! जो मराठा मतदार लोकसभेला मोदीसाहेबांच्या पाठीमागे भक्कम उभा राहिला त्याच मतदारानीं चार ही पक्षांची शर्यत लावून दिली . पुण्यातील वडगाव शेरी मतदार संघातील भाजप चा उमेदवार फक्त 4560 मतानीं पडला ( राष्ट्रवादी च्या माजी आमदार ला भाजप मध्ये जाहिर प्रवेश दिला , त्या राकॉ च्या आमदराच्या पाठोपाठ त्याचे कार्यकर्ते सुद्धा भाजप मध्ये गेले , रात्रीत व्हाट्सएप चे डीपी घड्याळ ऐवजी कमळ झाले तरी भाजपचा उमेदवार पडला ) गेल्या वेळेस च्या आठ जागा पैकी सहा जागा भाजप नी जिंकल्या त्यातले चार जण काठावर पास आहेत याचा अर्थ स्पष्ट आहे भाजपचा जनाधार या वेळी कमी झाला . विधानसभा निवडणूक मध्ये अस क़ाय घड़ल की भाजपा सेने ला अब की बार 225 (लोकप्रिय घोषणा) पार न करता दोघांची सीटे कमी करुन रा / कॉ च्या पदरात टाकली . काँग्रेस तर दिल्लीच्या राजाच्या पाठिंब्या शिवाय लढली तरी गेल्या वेळेपेक्षा जास्त उमेदवार निवडून आले . त्याच प्रमाणे राष्ट्रवादी चे जवळ जवळ निम्म्मे सेनापती भाजप च्या आश्रयला पाळाले होते , भ्रष्टचारा मुळे बदनाम होती तरी गेल्या वेळेपेक्षा जास्त सीटे निवडून आली !!! याच्या अगदी उलट भाजप , दिल्ली तून सगळे मंत्रिमंडळ दिमतीला होते तरी गेल्यावेळे पेक्षा कमी सीटे !!! कुठे तरी वाचले होते की भाजप शेने चे बरेच से आमदार चारपाच हजारांच्या फरकाने निवडून आले आहेत , म्हणजे याचा अर्थ पेपर खूपच अवघड गेला होता .

In reply to by ट्रम्प

विद्यमान भाजप आमदारांबद्दल नाराजी होती. फार काय कामे केली नाहीत पाच वर्षांत.मी त्याच मतदारसंघात रहातो.

In reply to by बबन ताम्बे

विद्यमान आमदार नी वार्ड मध्ये काय ! काय !! कामे केली ? जनमानस आता पुन्हा अनुकूल आहे का ?याचा तापास आय टी सेल चा ढिंढोरा पिटणाऱ्या भाजप ने करायला नको ? किती दिवस अजून मोदींच्या नावाने जोगवा घेवून फिरत बसणार ? विद्यमान आमदार , मुख्यमंत्री यांनी मतदार घड़वायला नको ? वडगाव शेरि माधिल भाजप च्या त्या आमदार कड़े कोणी सार्वजनिक हिताची कामे घेवून गेले की " तुमच्या एरियात मला मतदान झालेले नाही !! मग मी तुमची कामे का करू ? " असे गर्मी ने ऊत्तर द्यायचा. परिणामी राष्ट्रवादी च्या नेत्यांनी भाजप साठी आवाहन करुन देखील मतदारानी भाजप च्या मुळीक ला घरी बसविले आणि राकॉ च्या टिंगरे ला निवडून आणले . त्यामुळे सत्तेतून आलेली गुर्मी तुमचा नाश करु शकते हे भाजप च्या वरिष्ठ नेत्यांना कधी समजणार ?

In reply to by ट्रम्प

काम न करणाऱ्या आमदाराला, नगरसेवकाला पुढच्या निवडणूकीत घरीच बसवावे. काही नाही केले तरी पक्षाच्या,नेत्यांच्या नावावर निवडून यायचे दिवस गेले.

राज्यपाल हे केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर च निर्णय घेतात हा देशाचा इतिहास आहे निवृत्ती सोय म्हणून च ह्या पदाचा वापर केला आहे. सक्रिय राजकारण करू शकत नाहीत अशा पक्षीय नेत्यांना राज्यपाल पद दिले जाते.. शिव आघाडी सरकार बनवण्यात यशस्वी होतेय असे दिसले की राज्यपाल मार्फत bjp अडथळा आणयचा प्रयत्न करेल हे भाकीत आत्ताच करतो

भाजप अडथळा आणण्याचा प्रयत्न करणारच. कारण तो तर विरोधी पक्ष असेल.त्यांचं कामच आहे ते. श्री फडणवीसांना सुद्धा श्री शरद पवारानी भरपूर अडचण करण्याचा प्रयत्न केला मराठा आरक्षण, कर्जमाफी सारखे अनेक प्रश्न उभे करून. फडणवीस त्याला पुरे पडले हि गोष्ट वेगळी. आता येणाऱ्या आघाडीत असा परिपकव ( mature ) मुख्यमंत्री मला तर फक्त श्री "उद्धव ठाकरे"च दिसतात. कदाचित एकनाथ शिंदे हे उमेदवार असू शकतील परंतु त्यांची भाजपशी असलेली जवळीक काँग्रेस/ राष्ट्रवादीला पचणार नाही. बाकी संजय राऊत, अजित पवार, आदित्य ठाकरे इ सर्व प्यादीच आहेत. आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण दिग्गज आहेत परंतु त्यांच्या पदाला कोणी पाठिंबा देणार नाहीत. किन्वा अशोक चव्हाण. पण ते आदर्शच्या कलंकातून अजून तरी सुटलेले नाहीत आणि न्यायालयाने ठपका ठेवला असल्याने त्यात कोणीही राजकारणी हात घालण्याची शक्यता कमीच आहे पाहू या काय होतंय ते.

सगळ्या राजकीय गोष्टींमागे पवार साहेबांचा हात आहे हे महाराष्ट्रात अनेकानेक वर्ष चालत आलेले आवडते वाक्य आहे.

एका सेना ,bjp च का फाटलं ह्याची सर्व कारण शोधण्यात सर्व राजकीय विश्लेषक लोकांनी उलट सुलट विचार मांडून डोकं बधीर केले जनतेच्या . त्यात सेना आणि bjp ची उलट सुलट आरोप प्रत्यारोप कशाचा कशाला मेळ नाही. नंतर पवार साहेबांनी काडी घातली आणि आम्ही पाठिंबा देतो असे सांगून शिवसेनेला वेडे केले. अजुन राष्ट्र वादी ,काँग्रेस,सेनेची चर्चा च चालू आहे . काही निर्णय नाही .. अक्षर शां फालतुगिरी चालू आहे . आता संबंधित यंत्रणेने आपल्या अधिकाराचा वापर करून हे नाट्य थांबवावे. Vaitak आलंय आता

शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या हेतूंबद्दल काँग्रेसला अजूनही खात्री वाटत नाही त्यामुळे ते शिवसेनेबरोबर सरकार स्थापन करण्यास काँग्रेस चालढकल करत आहे -- आजची लोकसत्तेची ठळक बातमी.

In reply to by सुबोध खरे

ग्रेसची अस्तित्वाची लढाई चालू आहे त्यामुळे, ते ताकही फुंकून प्यायच्या मूड मधे आहेत. सेनेशी त्यांची युती होणे आणी स्थिर सरकार 5 वर्षे मिळणे ही भारतीय लोकशाहीसाठी अत्यंत महत्वाची बाब ठरेल.

साहेब दिल्लीला श्रीमती सोनियांना भेटून आले पण महाराष्टाच्या सत्ता स्थापनेबद्दल काहीच बोलणी झाली नाहीत. https://timesofindia.indiatimes.com/india/sharad-pawar-meets-sonia-gand… मग साहेब काय दिल्लीच्या प्रदूषणाबद्दल गप्पा मारायला गेल्या होत्या? सोनिया बाई आता त्यांना चकरा मारायला लावत आहेत का? जुनं उट्ट काढण्यासाठी?