रेन हार्वेस्टिंग किती व्यवहार्य ?
रेन हार्वेस्टिंग किती व्यवहार्य? किती कार्यक्षम?
एखाद्या ठिकाणचे पर्जन्यमान/ पाऊस मिलिमिटर्स अथवा सेंटिमिटर्स यांमध्ये मोजतात. रोजचा पाऊस किती झाला हे मिलिमिटर्समध्ये सांगणे सोयीचे असले तरी एखाद्या भागातला वर्षभरांत एकूण पाऊस किती हे सेंटिमिटर्स मापात सांगितल्यास तुलना करणे सोपे जाते.
उदाहरणार्थ -
ठिकाण - पाऊस - माप
जैसलमेर - २० सेंटिमिटर्स
पुणे - ४० सेंटिमिटर्स
बंगळुरू - ८० सेंटिमिटर्स
चेन्नई - १०० सेंटिमिटर्स
कोलकाता - १५० सेंटिमिटर्स
तिरुवनंथपुरम १६० सेंटिमिटर्स
मुंबई - २०० सेंटिमिटर्स
गोवा - २०० सेंटिमिटर्स
कोची - ३५० सेंटिमिटर्स
((महाबळेश्वर - ८०० सेंटिमिटर्स
मेघालय - १२०० सेंटिमिटर्स))
एक सेंमि पाऊस म्हणजे १२.५ मिलिलिटरस पाणी १२.५ चौ सेंमि (square cms area) क्षेत्रफळावर जमा होते.
एका प्लॉटवर एक छोटे घर
एक फुट बाइ एक फुट जागेवर साधारण नउशेतीस मिलिलिटर्स पाणी गोळा होईल.
घरची गच्ची ५०० चौ फुट असेल तर एक सेंमि पावसाने ४५० लिटर्स पाणी मिळेल. वर्षभराच्या ४० सेंमि पाऊस होणाऱ्या पावसाचे सर्व पाणी गोळा केल्यास १८००० लिटर्स पाणी मिळेल.
वापर
एका कुटुंबात चार जण धरून रोजचा पाण्याचा खप ५०० लिटर्स धरुया. हे १८००० लिटर्स पाणी त्या कुटुंबास ३६ दिवस पुरेल. म्हणजे वर्षभराच्या वापराच्या दहा टक्के पाणी रेन हार्वेस्टिंगने मिळाले. हे एक मध्यम पावसाच्या ठिकाणाचे उदाहरण झाले. जिथे यापेक्षाही कमी पाऊस पडतो तिथेच खरी गरज आहे. पण तेवढा पाऊस पडत नाही. पाण्याच्या कमतरतेमुळे रोजचा वापर २५० लिटर्सही केला जाईल तर तर दोन महिने पुरेल.
साठवण
८ फुट बाइ ८ फुट लांब रुंद आणि ६ फुट खोल टाकी बांधल्यास त्यात ९ ते १० हजार लिटर्स पाणी साठवता येईल. अशा दोन टाक्या लागतील.
प्लॉट जमिनीचा आकार
७५ फुट बाइ ६० फुट प्लॉटमध्ये १०/१०/१०/१५ फुट जागा सोडून २५ बाइ २०फुटी घर (५०० चौ फुट) ही एक आदर्श स्थिती झाली. त्यात कडेला या दोन टाक्या व एक संडासची टाकी बांधावी लागेल.
मोठ्या इमारती , हौझिंग सोसायटीतील गरज
तळ मजला अधिक त्यावर तीन मजले आहेत असे धरल्यास गच्चीवरच्या प्रत्येक पाचशे चौ फुट भागातील गोळा झालेले पाणी खालच्या चार रहिवाशांत वाटायचे आहे. वरच्या उदाहरणातील पाणी अर्थातच एका ब्लॉकला आठ दिवस पुरेल. अधिक मजले असतील तर आणखी वाटप कमी होईल. बाकी त्या टाक्या बांधणार कुठे हा एक प्रश्नच ठरतो. टाक्या बांधण्याचा खर्चही आहेच. केवळ टाक्या बांधणे, पाऊसपाणी साठवणे बंधनकारक केले म्हणून नागरीक ते करतीलच.
गावागावांत जी पाणी अडवा जिरवा/ साठवा मोहिम अमलात आणत आहेत त्यांची गोष्ट वेगळी आहे कारण ते सर्वच उघड्या जमिनीवरचे पावसाचे पाणी गोळा करून साठवतात. तसे सोसायटीच्या/इमारतीच्या आवारातील गोळा केले जाईल असे नाही वाटत.
तुमचे अंदाज आणि सूचना मांडा.
वाचने
45683
वाचनखूण
प्रतिक्रिया
77
मोजमाप आणि गणित नंतर
रेन हार्वेस्टिंगची खरी गरज
रेन हार्वेस्टिंगची खरी गरज
गाड्या धुवायला, गार्डनमधे
In reply to गाड्या धुवायला, गार्डनमधे by कंजूस
अंदाज
बोअरवेल चार्जिंग
In reply to बोअरवेल चार्जिंग by विअर्ड विक्स
असे नसावे बहुधा
feasible scheme
त्यांचं पन्नास/शंभर सेंमि
हे पाणी सरसकट पुनर्वापर
पाणी वापरावर निर्बंध
पुनर्वापर -
एखादा निचरा खड्डा करून त्यात
एक सल्ला
एक सल्ला
In reply to एक सल्ला by भंकस बाबा
@ भंकस बाबा - असे करणे सयुक्तिक नाही.
तुमचा प्रश्न पाणी जिरवण्याचा
In reply to तुमचा प्रश्न पाणी जिरवण्याचा by कंजूस
कंजूस जी
In reply to कंजूस जी by भंकस बाबा
असलेला पण पाणी न मिळालेला
रेनवॉटर हार्वेस्टिंग करा असं
एक सल्ला
अशा पद्धतीचे रेन वॉटर हार्वेस्टिंग व्यवहार्य आणि कार्यक्षम नाही!
पाणी हे जीवन आहे
In reply to पाणी हे जीवन आहे by Rajesh188
मुळात त्या बिसलेरी पाण्याचा
In reply to मुळात त्या बिसलेरी पाण्याचा by जॉनविक्क
खरं आहे
स्वतः साठीच करायचे आहे रेन हार्वेस्टिंग
पावसाच्या पाण्याची साठवण व
In reply to पावसाच्या पाण्याची साठवण व by डॉ सुहास म्हात्रे
क्र १ आणि २अ विशेष.
In reply to पावसाच्या पाण्याची साठवण व by डॉ सुहास म्हात्रे
अजून काही खूप महत्वाचे...
In reply to अजून काही खूप महत्वाचे... by डॉ सुहास म्हात्रे
आपली ही चर्चा चालू आहे आणि
In reply to आपली ही चर्चा चालू आहे आणि by डॉ सुहास म्हात्रे
खाजगी कंपन्यासुद्धा रेन वॉटर
In reply to पावसाच्या पाण्याची साठवण व by डॉ सुहास म्हात्रे
अगदी बरोबर
बिसलेरी न म्हणता 'बॉटलमधले
जी गटारे बांधली जातात
In reply to जी गटारे बांधली जातात by कंजूस
जी गटारे बांधली जातात
जी गटारे बांधली जातात
जी गटारे बांधली जातात त्यांनाच बांधताना जागोजागी शोषखड्डे का ठेवत नाही , म्हणजे वरुन पूर्ण सिमेंटचे बांधकाम असते तर खाली तीनचार मीटर खड्डा करून पाणी जिरवता येऊ शकते.धोका !!! हे आरोग्यदृष्ट्या अत्यंत धोक्याचे आहे. भारतात (अ) पावसाचे पाणी, (आ) घरातले संडासासकट सर्व सांडपाणी, इ वाहून नेण्यास वेगवेगळ्या व्यवस्था नाहीत. असे मिश्र पाणी जमीनीत जिरवल्यास जमीनीतील सर्वच जल दूषीत होईल... अर्थातच, यामुळे, 'सांसर्गिक रोगांच्या साथींना' आणि 'पाण्यांत विषारी रसायनांचा स्तर वाढल्यामुळे होणार्या रोगांना', आमंत्रण दिल्यासारखे होईल. भारतात, बहुतेक/बर्याच ठिकाणी अश्या मिश्र पाण्याचे शुद्धीकरण न करता, ते जवळच्या वाहत्या पाण्यामध्ये सोडून दिले जाते. हे सुद्धा गैरच आहे व त्यानेही भूमीतील जलसाठ्यांचे काही प्रमाणात प्रदूषण होतेच आहे. यासंबंधीचे दुष्परिणाम आपण सतत माध्यमांत ऐकत असतोच. उदा : नुकतेच पुण्याशेजारच्या नदीत हजारोंच्या संखेने मरून तरंगणारे मासे. गटारांना शोषखड्डे बनवण्यामुळे, गाव/शहरभर प्रदूषित पाणी भूजलसाठ्यात मिसळून, त्या प्रदूषणाला आपण स्वतःहून घरापर्यंत येण्यासाठी मार्ग मिळवून दिल्यासारखे होईल.In reply to जी गटारे बांधली जातात by डॉ सुहास म्हात्रे
सुहासजी,
In reply to सुहासजी, by भंकस बाबा
इथे मी जे गटार बोलत आहे ते
इथे मी जे गटार बोलत आहे ते पक्के बांधलेले असावे व रहिवासी भागात असावे.गटार कोठेही बांधलेले असले तरी त्यातले पाणी जमीनीत मुरल्यावर ते सर्व भूजलात मिसळून त्याला दुषित करेल, नाही का ? शिवाय पाणी जमिनीत मुरेल असे गटार वरून पक्के असले तरी भूजलात मुरणार्या पाण्याबाबत त्याने काही फरक पडत नाही. तेव्हा, मुख्य प्रश्न आपण कोणत्या प्रकारचे पाणी जमीनीत जमीनीत मुरवायचे आहे, हा आहे. जेथे, दुषित (मलमुत्र किंवा इतर रोग निर्माण करू शकणरे पदार्थ मिसळलेले) आणि इतर प्रकारचे पाणी यांची व्यवस्था वेगळी आहे, तेथे (अ) दुषीत नसलेले आणि (आ) प्रक्रिया करून (ट्रिटेड) निर्धोक पाणी, या दोन्हीही प्रकारचे पाणी जमिनीत मुरवायला हरकत नाही. जेथे अशी व्यवस्था नाही (जे भारतात बहुतेक भागात आहे) तेथे "मिश्र" पाणी जमिनीत मुरविल्यास सर्व पाणी दुषित होऊन धोकादायक बनते. केवळ दुषित पाण्याच्या पिण्यानेच आजार होतात असे नाही तर, त्याच्या प्रक्रिया न केलेल्या (विशेषतः मलमुत्र किंवा रसायनांमुळे) दुषित पाण्याच्या वापरानेही (उदा : बागेसाठी वापर, इ) आजार अथवा इतर प्रकारचे धोके उदभवू शकतात... हे सुद्धा या बाबतीत ध्यानात घ्यायला हवे. बाकी, मंदीर-मशिद बांधण्यासाठीचा खर्च वगैरे मुद्दे फार वेगळे आहेत आणि त्याबाबत तत्वतः सहमती आहे.सक्ती करावीच लागेल
देश पातळी वर नको
गच्चीवरच्या छपरावरचे पाणी
मला एक समजत नाही, घरं किंवा
एक सल्ला
एक सल्ला
पाण्याच्या पुनर्वापराबद्दल
सर्वांची जबाबदारी आहे
पुस्तक
नवीन टाक्या कुठे बसवायच्या?
छतावरील पावसाचे पाणी टाकीत
In reply to छतावरील पावसाचे पाणी टाकीत by ऋतुराज चित्रे
पहिला पाऊस
५ पेक्षा कमी TDS असलेले
In reply to ५ पेक्षा कमी TDS असलेले by ऋतुराज चित्रे
चित्रे साहेब,
In reply to चित्रे साहेब, by भंकस बाबा
चौरस आहार
पावसाच्या साठवलेल्या पाण्याचे
पावसाच्या पाण्याचा TDs
In reply to पावसाच्या पाण्याचा TDs by Rajesh188
हो पावसाच्या पाण्याचा TDS आणि
साठवलेले पाणी किती दिवस पुरेल
आणि पाण्याची भीषण टंचाई
पावसाचे पाणी हे बाकी सर्व उपलब्ध पाण्यापेक्षा
आमच्या सोसायटीत एका इमारतीत
अगदी बाटलीबंद पाण्याचे ही मुळ स्तोत्र हे पावसाचे पाणी हेच असते
१) पावसाचे पाणी शुद्धच असते.
जीवन रक्षक
ज्यांना शक्य आहे त्यांनी
खुपच व्यवहार्य
In reply to खुपच व्यवहार्य by रघुनाथ.केरकर
स्तुत्य उपक्रम !
भूजलावर आपल्या सर्वांचा अधिकार आहेच पण त्याचे संवर्धन करणे देखील प्रत्येकाचे कर्तव्य आहे.+१००० माझ्या सोसायटीने जमिनीत जिरवलेले पाणी फक्त माझ्याच सोसायटीला मिळाले पाहिजे. तसे होत नाही म्हणून जमिनीत पाण्याचे पुनर्भरण करण्यात अर्थ नाही, असे म्हणणे योग्य नाही. जेव्हा एखाद्या विभागातील सर्वजण आपापल्या सोसायटीत असे उपक्रम करत असतात, तेव्हा त्या सर्व विभागातील भूजलाची पातळी वर येते आणी सर्वांनाच त्याचा फायदा होतो. त्यात विचाराची सीमा केवळ, "माझा फायदा काय", इथपर्यंतच मर्यादीत करू नये. भूजलस्तर वाढविण्यासारख्या सगळ्या उपक्रम-प्रकल्पांकडे, "सार्वजनिक फायदा (कॉमन गुड)", असेच पाहिले पाहिजे आणि "एकमेका करू सहाय्य" अशी भावना मनात धरून कारवाई केली पाहिजे. ****** जरा पुढे जाऊन असे म्हणता येईल की, जरी केवळ स्वार्थी विचार करायचा झाला तर... विभागातल्या सगळ्या / बहुसंख्य सोसायट्यांनी स्वार्थी विचार करून भूजलसंवर्धन प्रकल्प करण्याचे टाळले तर, त्या विभागातल्या भूजलाचा स्तर खूप खाली जाऊन पाण्याची चणचण/अभाव निर्माण होऊन... अ) त्या विभागातील सगळ्यांनाच त्रासदायक परिस्थिती निर्माण होईल आणि आ) त्या विभागातील सगळ्याच सोसायट्यांतील सदनिकांची किंमत कमी होईल. इतर काही नाही तरी, केवळ वरचा स्वार्थी विचार करून तरी प्रत्येकाने हा उपक्रम करायला हवा, नाही का? :)In reply to खुपच व्यवहार्य by रघुनाथ.केरकर
भारी.
आदर्श उदाहरण. फोटोंसह मिसळपाव
आमच्या सोसायटीत एक विहीर आहे.
In reply to आमच्या सोसायटीत एक विहीर आहे. by सुबोध खरे
आमच्या सोसायटीत एक विहीर आहे.
आमच्या सोसायटीत एक विहीर आहे. त्याचे पाणी फिल्टर करून पिण्यासाठी योग्य होईल या क्षमतेचे आहे. आमच्या गच्चीत पडलेले पाणी आम्ही या विहिरीत सोडत आलो आहोत. हे पाणी आम्ही बाथरूम संडास मध्ये फ्लश साठी वापरतो. एका घरातील चार माणसे दिवसात पाच वेळेस लघवी आणि एकदा शौचास जातात हे गृहीत धरले तर रोज साधारण एका घरात ४५० लिटर पाणी नुसतेच वाया जाते. सोसायटीत ५६ फ्लॅट आहेत तेंव्हा रोजचे २५००० लिटर पाणी नुसतेच सांडपाणी म्हणून वापरले जात असे.+१०० महानगर पालिकेने शुद्धीकरण केलेले 'तुलनेने किमती पाणी' वाचवण्याचा हा पर्याय जास्त व्यवहार्य, कमी खर्चाचा, प्रकल्प म्हणून सोपा आणि आरोग्याच्या दृष्टीने पूर्ण निर्धोक आहे.पुनर्विकास नसला तरी ज्यांना
भारी मांडला आहे विषय असा
पुण्यातला वर्षभरातील एकूण पाऊस (सरासरी)
आता दुस-या बाजूने विचार
पाणी अजुनही खुपच स्वस्त आहे ही अडचण आहे
सामायिक वाटप, खप, मालकी ही
मस्त चर्चा. ...