Skip to main content

महाराष्ट्रातील चालू घडामोडी १

लेखक स्वामि १ यांनी बुधवार, 01/05/2019 09:23 या दिवशी प्रकाशित केले.
भारतात लोकशाही व कथित कायदा मुळे महाराष्ट्रात मानवी मुल्ले, अधिकार, राहणीमान, भाषा व संस्कृती जपली जाते का? प्रतेक जनतेला प्राथमिक गरजा, आरोग्य व पायाभूत सुविधा मिळत आहेत का? तरूणांना शिक्षणा नंतर योग्य नोकरी ची शाश्वती आहे का? वृद्धांना आपले उर्वरित आयुष्य सुख समाधानाने जगता येइल का?

वाचने 35593
प्रतिक्रिया 105

प्रतिक्रिया

In reply to by भंकस बाबा

http://www.misalpav.com/node/40590 मागे मी चेलिया मुसलमानांबद्दल एक लेख लिहिला होता त्यात त्या समाजाचे लोक आपल्याच समाजातील गरीब मुलांना कसा हात देऊन आपली प्रगती करत आहेत हे लिहिले आहे. मराठी माणसांबद्दल असे कुठे होताना दिसत नाही. आपली माणसे निर्भीड आणि निष्पक्ष पणा कसा चांगला आणि आम्ही सर्वांचा उद्धार करणार अशा काहीतरी मनोवृत्ती मध्ये वावरत असतात. याउलट बृहन्महाराष्ट्रात( महाराष्ट्राच्या बाहेरील) मराठी माणसे आपल्या लोकांना धरून चांगली प्रगती करताना दिसतात असा माझा वैयक्तिक अनुभव आहे.

In reply to by सुबोध खरे

माझे एक मित्र श्री गोपाल पुजारी मुंबईत आले तेव्हा एका होटेलात फडके मारायचे काम करीत. हळूहळू पाणी देणे, वेटर अशी प्रगति करत त्या धंद्यातल्या खाचाखोचा शिकुन घेतल्या. चर्चगेटमधे सिंडिकेट बैंकेचे कैंटीन चालवायला घेतले. चारकोप कांदीवलीला तुलसीविहार हे रेस्टोरेंट उभे केले. त्यात गावावरुन अनेक लोकांना आणून कामधन्द्याला लावले. आजही आपल्या स्वतःच्या होटेलात ना बसता कैंटीन चालवतात व त्यांच्या गावाकडील जे शिकाऊ उमेदवार आज होटेलात गल्ल्यावर बसून होटल चालवतात. मराठी माणूस असा विचार करताना फार कमी दिसतो.

In reply to by सुबोध खरे

आपण चेलीया मुसलमान च्या आसपासातील सहकार्या बद्दल सांगितले. असेच सहकार्य किंवा Syndicate जैन, केरळ, गुजराती पटेल व (बराचशा महाराष्ट्र बाहेरून आलेल्या) मुस्लिम समाजात उघड पणे व गुप्त पणे धंद्यात व्यहवारी सहकार्य असते पण असे मराठी मध्ये नाही आहे. असे गुप्त सहकार्य मराठी मध्ये का नाही?

सर्वांच्या चर्चेत निच्छित होते की हल्ली मराठी माणूस आळशी होत चालला आहे व तो सकारात्मक कामाशिवाय इतर निरर्थक कामा कडे लक्ष घालतो व ते सत्यच आहे. Rajesh 118 नीं सांगितले की मराठी माणूस कर्तबगार व हुशार आहे व तशी उदाहरणे ही दिली व तेही तितकेच सत्य आहे. मराठी माणूस माघे पडायला तो स्वःताच कारणीभूत आहे. मग ही होत असलेली चुक सुधारणारा कोणी तरी पाहिजेच ना? ही चुक संपूर्ण मराठी समाजाकडून होत आहे मग ह्या तुन मार्ग काय काढायचा?

In reply to by स्वामि १

ही चुक संपूर्ण मराठी समाजाकडून होत आहे मग ह्या तुन मार्ग काय काढायचा?
आता तुम्हीच सांगा सकारात्मक उपाय ?

In reply to by स्वामि १

खरंच आहे सर्वात पहिल्यांदा "त्या" मराठी माणसाने हे रिकामटेकडे पणाचे उद्योग असणारे धागे काढणे बंद केले पाहिजे. कोणत्यातरी संकेतस्थळावर वायफळाचे मळे पिकवण्यापेक्षा त्याच माणसाने स्वतःचा एखादा उद्योग उभा करून तो पुढे आणला पाहिजे. तुम्हाला कुठे "तो" मराठी माणूस दिसला तर त्याला पकडून पकडून हे ऐकवा.

महाराष्ट्र बरोबरच अमेरिका, ब्रिटन,गल्फ मधले देश,austriliya,न्यूझीलंड,अशा जगातील सर्वच देशातील नागरिकांना सुधा आपण संदेश पाठवला पाहिजे की कामे करा ,मेहनत करा तुम्ही आळशी असल्या मुळे बाकीच्या देशातील म्हणजे बांगलादेश,भारत,पाकिस्तान,नेपाल,आफ्रिकन देश ह्या सर्व देशातील कामसू लोकांना तुमच्या कडे येवून तुमची अर्थ व्यवस्था चालवावी लागत आहे . समाज कार्य आणि विश्वबंधुत्व म्हणून ते हे काम करत आहेत.त्यांनी तरी तुम्हाला किती दिवस सेवा म्हणून हे काम करायचे . आणि महारष्ट्र नी सुधा परप्रांतीय लोकांच्या भोळे पणाचा फायदा घेवून सर्व राज्याचा बोजा त्यांच्या वर न टाकता स्वतः काम केले पाहिजे . भारतात महाराष्ट्र आणि जगात वरील सर्व देशाची सेवा सेवा करता करता त्यांना स्वतःच्या राज्याकडे सुधा लक्ष द्यायला वेळ न मिळाल्यामुळे त्यांचे स्वतःचेच प्रदेश अनेक अडचणींना तोंड देत आहेत .तरी कृपया अजून जास्त सेवेची त्यांच्या कडून अपेक्षा ठेवू नका

In reply to by Rajesh188

तुम्हाला खरंच असं वाटते का की त्या त्या भागातल्या लोकांनी त्यांच्याच भागात राहुन प्रगती करावी ? असं नसतं हो. आदीमानवापासुन आज पर्यंत स्थलांतर होतच आलंय हो. प्रत्येक गोष्टीचे फायदे तोटे असतातच तसेच याचे पण असणारच. मराठी व्यक्ती बेंगलोर, दिल्ली, अमेरीकेत गेली तर भारी आणी हिंदी व्यक्ती मुंबईत आली तर समस्या ! जाऊ द्या तुमच्या बेसीक मध्येच काहितरी गफलत वाटतेय.

In reply to by Rajesh188

तुम्चा सर्व्या जगाला आसलेला निरोप वाचुन लई म्हंजी लई म्हंजी लईच मराटी आसल्याचा आबिमान वाट्ला. आख्ख्या जगाचे तारणहार आसलेले स्वामि Rajesh188 ह्येंचा जयजयकार हाये! आता आपन सगळ्ये सगळ काय ते टाकून देऊन आदीमानवा सारके आपापल्या जमिनिवर शिकार आणि वनस्पती गोळा कराय्ला लागू (त्येच त्ये, हंटर-गॅदरर का काय म्हंतात त्येच). आपल्या हद्दीत दुसरा कोनी घुस्ला रे घुस्ला की त्येला चांगला पोकल बांबूने फोकलवून काढू. म्हंजे कसं जगभर चांगभलं व्हईल. काय म्हंता?

In reply to by गब्रिएल

ळॉळ ! असं काही नका लिहीत जाऊ साहेब ! ऑफिसमधे आहे. हसु अजिबात कंट्रोल नाही होतंय. :D :D :D

In reply to by उगा काहितरीच

विनाकारण हसत जावू नका. Konhi ऑफिस मध्ये बागितल तर गैरसमज होईल .आणि बचाव साठी माझी पोस्ट वाचून दाखवलं तर हस होईल तुमचं

In reply to by Rajesh188

विनाकारण नाही हो साहेब,
आपल्या हद्दीत दुसरा कोनी घुस्ला रे घुस्ला की त्येला चांगला पोकल बांबूने फोकलवून काढू. म्हंजे कसं जगभर चांगभलं व्हईल. काय म्हंता?
हे वाचलं आणि हसु आलं बघा.
Konhi ऑफिस मध्ये बागितल तर गैरसमज होईल
धन्यवाद! आपल्या बहुमोल सल्ल्याबद्दल. यापुढे निश्चित काळजी घेतल्या जाईल.
आणि बचाव साठी माझी पोस्ट वाचून दाखवलं तर हस होईल तुमचं
नाही हो असं काही नाही. अर्ध्याअधीक लोकांना कळणारच नाही. कारण आजबाजुचे लोक पश्चीम बंगाल, केरळ, कर्नाटक, आसाम आणि पॅरीसचे आहेत. त्यांना मराठी नाही वाचता येत. ज्यांना वाचता येते त्यांना तुमच्या पोस्ट दाखवुन मी स्वतःचे हसे करुन नाही करुन घेणार. काळजी नसावी.

In reply to by गब्रिएल

मी जी पोस्ट केली आहे त्याला संदर्भ आहे . इथे सर्वच जन असे सांगत आहेत की महाराष्ट्रात वाढलेले परप्रांतीय लोकांचे प्रमाण ह्याच एकच कारण आहे मराठी कामचुकार,व्यसनी लोक. हे कारण खरे असेल तर अमेरिका,ब्रिटन,आणि जेवढे प्रगत देश आहे त्या देशातील जनता कमचोर आणि व्यसनी आहे असे समजायचं का . खरे कारण अप्रगत देश आपल्या जनतेच्या गरजा भागवू शकत नाहीत म्हणून एक पर्याय म्हणून आपण तिथे नोकरी करायला जातो हे आहे . आणि हाच नियम महाराष्ट्र ल सुधा लागू आहे

In reply to by Rajesh188

ए बास कर ए आता, ना आगा ना पिछा, बिनबुडाचे काहीही लिहायचे, ना मुद्दा ना एक ठाम भूमिका, कैतरी लिहिता बसायचे अन चार लोक चांगले सांगतात त्याकडे दुर्लक्ष करून परत एकेक प्रतिसाद रेटत राहायचे. किती ती फालटूगिरी. दुसऱ्या संस्थळावर अकलेचे वाभाडे काढूनही शहाणपण न येता इथे अक्कल पाजळायची असेल तर बाकी साऱ्या सुज्ञ मिपाकरांना माझी हात जोडून विनंती आहे. हे चर्चा किंवा संवाद करायच्या लायकीचे रसायन नाहीये. ह्याच्या नादी लागू नका. विषयाचा किंवा चर्चेचा बट्ट्याबोळ आपल्या हवेत बाण टाइप प्रतिसादाने करत राहायचा हाच एकमेव अजेंडा ह्या आयडींचा आहे. धन्यवाद

In reply to by अभ्या..

बुद्धिमान माणसांनी असे अशिक्षित लोकांसारखे रागावू नये. असतात माझ्या सारखी लोक बिचाऱ्या ना काहीच (न्यान) नसते . आपण जाणते समजावून सांगावे . राग आणि blood pressure ह्याचा जवळचा संबंध आहे असे एका तुमच्या सारख्या शाण्या लोकांचे तोंडून ऐकले होते . तेव्हा control Kara mi नाही लिहीत आता . पण तुम्हाला जे आवडते तेच वाचत जा न आवडणारे दिसले की डोळे बंद करून घ्यायला विसरू नका. डोळे बंद केले की न आवडणारी मते नष्ट होतात अशी एक अंधश्रद्धा आहे

In reply to by Rajesh188

राजेश१८८ बोलतात ते बरोबर आहे, मराठी माणसे कतृवात व हुशार आहेत म्हणूनच भारतात महाराष्ट्र सर्वात जास्त प्रगतीशील आहे. पण परप्रातीयाचे प्रचंड लोंढे आल्याने व प्रतेक राज्यातील आपापसात भाषेचे गुप्त वाटाघाटी व syndicate मुळे मराठी माणूस बाहेर फेकला गेला किंबहुना मराठी माणसाला दुर ठेववे गेले. काही वेळेस मराठी माणसाला एखादे विशिष्ट पक्ष देउन शांत बसउन ठेवले. त्यात मराठी माणसाने खूप मोठी चुक केली म्हणजे महाराष्ट्र व मुंबईच्या अर्थ व्यहवारात कघिच लक्ष घातले नाही. किंबहुना त्यांना हेतुपूर्वक बाहेर ठेवले. हे आज आपण बदलले पाहिजे. मुंबई व महाराष्ट्रा ची अर्थ (पैसा) व्यवस्था मराठी माणसाच्या हातात आणली पाहिजे.

कमीत कमी धाग्याच्या आशयाला तरी चिटकून रहा. हे बाकीच्या देशातील लोक तिकड़ूंन हाकलून दिल्यावर भारतात आल्यावर तुम्ही त्यांना आपल्या घरी भांडी घासायला ठेवणार आहात क़ाय? धागा चिंतनपर विषयावरून विनोदाकडे वळतो आहे. पण तुम्हाला क़ाय? दर दोन वाक्याआड प्रगति झाली पाहिजे एवढे टंकले की तुम्ही मराठी माणसावर फार मोठे उपकार केले आहेत असा आव आणत आहात. काहीतरी मुद्देसुद मांडा हो!

कमीत कमी धाग्याच्या आशयाला तरी चिटकून रहा. हे बाकीच्या देशातील लोक तिकड़ूंन हाकलून दिल्यावर भारतात आल्यावर तुम्ही त्यांना आपल्या घरी भांडी घासायला ठेवणार आहात क़ाय? धागा चिंतनपर विषयावरून विनोदाकडे वळतो आहे. पण तुम्हाला क़ाय? दर दोन वाक्याआड प्रगति झाली पाहिजे एवढे टंकले की तुम्ही मराठी माणसावर फार मोठे उपकार केले आहेत असा आव आणत आहात. काहीतरी मुद्देसुद मांडा हो!

स्थलांतर होण्याची मुख्य ढोबळ कारणांचा आपण विचार केला तर 1) उत्तम शिक्षणासाठी जे आपल्या प्रदेशात उपलब्ध नसते किंवा आपल्याच प्रदेशात संधी मिळत नाही २)लग्न झाल्या मुळे स्त्रियांचे स्थलांतर( सुधारित राज्यात राहणारा नवरा हा हट्ट हे उप कारण) ३) शिक्षित लोकांना त्यांच्या शिक्षणाला पूरक नोकऱ्या chya सुविधा नसल्या मुळे दुसऱ्या प्रदेशात स्थलांतर करावे लागते. ४) कामगार आणि कष्ट करणारा वर्ग हा त्यांचा कष्टाला जास्त भाव जिथे मिळतो त्या प्रदेशात स्थलांतर करतात ही काही ठराविक करणे झाली. ज्या प्रदेशात ही लोक जातात त्या प्रदेशाला आपण प्रगत प्रदेश म्हणुया जिथे सर्व प्रकारच्या लोकांची प्राथमिक गरजा भागण्या ची क्षमता असते. आणि प्रगत प्रदेशाला आपली मनुष्य शक्तीची गरज भागवण्यासाठी खूप अप्रगत प्रदेशांचा लोकांचा समज असतो पण अप्रगत प्रदेशातील लोकांना प्रगत प्रदेशमध्ये जाणे हा एकमेव पर्याय असतो. त्या मुळे आपण ज्या भागात जातो आणि आपली स्वप्न पूर्ण करतो तो प्रदेश आपल्या मुळे प्रगत झालंय ही भावना अत्यंत चुकीची आहे हे माझे स्पष्ट मत आहे. पण काही विचारवंत ,media migration चे समर्थन करताना अशा स्थलांतरित लोकांच्या मनात अशी. भावना निर्माण करतात की. तुम्ही इथे आलात म्हणून हा प्रदेश प्रगत झाला .ही फक्त भावना चेत्वण्याची एक dhurth खेळी असते. त्यामुळं अप्रगत प्रदेशातील लोक आपल्या प्रदेशात काहीच सुविधा नाहीत ही गोष्ट विसरून जातात .त्या मिळाव्या म्हणून आंदोलन करणे, तशी मागणी लावून धरणे हे सर्व करण्या साठी परावृत्त होत नाहीत .तशी भावनाच त्यांच्या मनात निर्माण होवू नये म्हणून स्थलांतर ह्या शब्दाला सोन्याचा मुलामा चढवला जातो . ह्यातून दोन प्रकारचं नुकसान होते एकतर अविकसित प्रदेश अविकसित च राहतो.आणि पोट पाण्यासाठी स्थलांतर हे निरंतर चालू राहते. दुसरे नुकसान हे होते काही ठराविक प्रदेश हा आर्थिक क्षेत्र म्हणून विकसित होतो आणि अर्धिक नाड्या ह्या अश्या प्रगत प्रदेशकडेच राहतात आणि बाकी प्रदेशावर अन्याय ,अत्याचार होण्याची शक्यता वाढते. अमेरिका ही अशी अर्थ क्षेत्र एकवटलेला देश आहे ती कोणत्याही अप्रगत देशा वर आर्थिक बंदी खालून हुकूमत गाजवतो ही उदाहरण सर्वांना माहीतच असेल त्या मुळे गरज असेल तर स्थलांतर करावच लागते पण जिथून हे होते त्या प्रदेशाचा विकास होणे तशी मागणी होणे खूप गरजेचं असते पण जेव्हा स्थलांतर हे लजा spad नसून गर्व करण्या सारखे हा विचारच आर्थिक विषमता वाढवत आहेत ह्याची जाणीव राहत नाही

आज जगभरात स्थलांतराला स्थानिकांनकडून विरोध होत आहे. आपण आत्ता केवळ महाराष्ट्रातीलच विचार करूया. आज मराठी भाषा व संस्कृती संपण्याच्या मार्गावर आहे व त्याला एकच कारण आहे ते म्हणजे प्रचंड प्रमाणात परप्रातीयाचे रोज होणारे स्तलानतर. राजेश११८ नीं योग्यच सांगितले मराठी माणूस हुशार व कतृवात आहे. १९८० साला पासून मी मुंबईत बांधकाम व्यवसायात आहे. त्या काळात इमारती च्या कारागीर मध्ये कोकणातून सुतार येत होते. नांदेड मधून गवंडी व कामगार आमच्या कडे होते व ते आळशी किंवा कामचुकार करणारे मुळीच नव्हते. नंतर Up हुन माणसे स्थलांतरित होउ लागली व ती खूप कमी पगारात काम करु लागले व इथेच मराठी माणसासाठी कुचंबणा झाली व तो आळशी व कामचोर ठरला गेला.

In reply to by फुटूवाला

ते स्वामि बिचारे मराठी माणसाच्या उद्धारासाठी इतके तळमळीने लिहितात आणि तुम्ही त्यांच्या क्षुल्लक चुका शोधता. अशाने मराठी आणि महाराष्ट्र राज्याचा विकास कसा होणार?

In reply to by फुटूवाला

अठ्ठी लावलेल्या तरी आम्हाला. ईस्पिक सत्त्या मिळण्यापासून रोखू शकणार नाहीत.मराठी मानुस जागा झाला आहे फक्त कुठे जायचं ते ठरलं नाही,एकदा ठरलं की बघाच तुम्ही. किलवर तिर्री नाखु

In reply to by फुटूवाला

ते घोडा चतुर- घोडा चतुर सारखं आहेत. आता आयडी बदलून लिवायचं म्हणजे तेव्हढा गोंधळ चालतुया

आज इथे ३३% लोक आपल्या राज्यातील नाहीत देश भर चे भिकारी आहेत तरी मराठी संकेस्थळांवर असणाऱ्या हुशार लोकांना ही समस्या आहे ह्याची पुसटशी पण जाणीव नाही . शिवसेना, मनसे ह्यांची प्रतिक्रिया काय असते ह्याची जाणीव असल्या मुळे 33% गैर मराठी माणसा सारखे वागत आहेत . लढणाऱ्या मराठी लोकांनी अंग काडून घेतले की हे कथित देशप्रेमी ची देशाचा कायदा सुधा रक्षण करू शकणार नाही

आज महारष्ट्रात जी पाणि टचांई आहे याला सुद्धा हे ३३% परंपरांतीय लॉक्स कार्निबुत आहेंत...

आपले राजकीय पुढारी परप्रातीया बद्दल काहीच बोलत नाही, त्याची स्वताची पोट भरून झाली की शांत राहतात किंबहुना राष्ट्रीय पक्षा मध्ये मान डोकावून गप्प बसणारे नेते निवडले जातात व ह्या कचखाउ नेत्यांनी मराठी व महाराष्ट्रा चे नुकसान झाले आहे. सर्वच नेत महाराष्ट्र सुजलाम सुफलाम असल्याचे भासवतात. आज मराठी माणूस शहरा पासुन ते गावापर्यंत जमीनी विकत आहेत. परप्रातीय वेवसाय करतो पैसे कमावतो व मराठी काहीच प्रगती करत नाही. दुदैवाने मराठी माणसानेही प्रगती करावी अशी तरतूद किंवा प्रयत्न आपल्या महाराष्ट्राच्या कायदा व घटणेत नाही आहे. हे आपले दुदैवं आहे.

In reply to by स्वामि १

चला, ह्या दुर्दैवासोबतच धाग्याची शंभरी भरली आहे असे मी याटिकानी जाहिर करतो, शंभर प्रतिसाद येउनही दलिंदरी हटली नसल्याने नवीन मुद्द्यानिशी स्वामी अजुन एकांदा धागा काढतील त्याटिकानी मी राजेशरावासहित त्यांचे हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद, जयहिंद जयमहाराश्ट्र जय मराठी. अरे ह्या महाराष्ट्राचे दुश्मन कोन? जातीय आनि प्रप्रांतीय हेच दोन.

देवा !! काय दिवस आले हैत !!! म्या जरी नवीन म्येम्बर अस्लो तरी लै दिवसा पासून मिपावरिल सगळ्या चर्च्या वाचत व्हतो . काय यक से यक मुद्द्यावर भांडण व्हायची , आररर्र !! पन काहीही म्हणा , @स्वामि नी सगळ्यांना कस सुसंस्कृत केलय :))

माझ्या गावच्या मित्रासोबत एक घटना घटली होती तेव्हा तोही २ वर्ष मराठी अन महाराष्ट्र करत बसला होता. ऐकायची इच्छा असेल तर किस्सा सांगतो ..

In reply to by फुटूवाला

मूळ पदार्थ मध्ये तुमच्या कडचे तिखट मीठ घालणार नसाल आणि वरती तुमच्या कडूनच लोंच्याच फोड वाढणार नसाल तर मूळ रेसिपी सांगा