आणीबाणी
- डॉ. सुधीर रा. देवरे
देशात आणीबाणी जाहीर झाली तेव्हा मी पाचवी सहावीत असेल. या वयात आणीबाणीचा मला काहीच फरक पडणार नव्हता. पडला नाही. माझे वडील प्राथमिक शिक्षक होते. आमच्या विरगावपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या एका लहान गावाला वडिलांची बदली होती. वडील शाळेत पायी जात. तिकडूनही पायी यायचे. त्यांच्या येण्याजाण्याच्या वेळेत एसटी नव्हती. पायी जायचं आणि वेळेवर शाळेला पोचायचं. म्हणून वडील पहाटे शाळेला निघत. ‘आणीबाणी असल्याने शाळेला उशीरा जाऊन चालणार नाही’ असं त्यांच्या बोलण्यातून कळत असे. पण आणीबाणी म्हणजे नेमकं काय हे ते समजण्याचं वय नव्हतं.
गावात किराणा दुकान होतं. दुकानात वर्तमानपत्र यायचं. मी अधुन मधून किराणा दुकानात जाऊन वृत्तपत्र वाचायचो. त्यात आणीबाणीच्या काही बातम्या असत. पण त्यातलं राजकारण मला त्या वयात समजण्यापलीकडचं होतं. ‘आणीबाणीमुळे पेपरात खर्याा बातम्या येत नाहीत’ असं वडील म्हणायचे. यावर ‘म्हणजे काय?’ माझा प्रश्न ठरलेला. मी पेपर वाचायचो. त्यात तर बातम्या असायच्या. मग खर्या बातम्या, खोट्या बातम्या कशा ओळखायच्या. कळत नव्हतं.
त्यानंतर देशात निवडणुका जाहीर झाल्या. यावेळी मला बर्याापैकी कळायला लागलं होतं. प्रचारात जनता पक्षाकडून आणीबाणीवर बोललं जात होतं. सरकारवर घणाघाती टीका केली जात होती. सर्व पक्ष एकत्र येऊन जनता पक्ष निवडून आला. इंदिरा गांधींचा पराभव झाला. त्यावेळी रेडिओवर बातम्या ऐकताना आमच्या गावचा एक माणूस इंदिरा गांधींना उद्देशून म्हणाला, ‘आनीबानी आनस नही का, आता व्हयी गयी कानीबानी!’ हा त्यांचा उद्गाआर माझ्या लक्षात आहे. आणीबाणी लावली म्हणून इंदिरा गांधीचं सरकार गेलं, इतकी आणीबाणी वाईट असते, हे त्यावेळी समजलं. पण आणीबाणी वाईट म्हणजे नेमकं काय ते समजत नव्हतं. (आणि ती आणीबाणी इतकी वाईट होती तर फक्तई अडीच वर्षात इंदिरा गांधींना लोकांनी पुन्हा पंतप्रधानपदी कसं बसवलं?)
तेव्हा देशात आणी्बाणी असूनही सरकारच्या विरूध्द जाणार्या लोकांनी त्या सरकारला जातीयवादी म्हटल्याचं आठवत नाही. विशिष्ट समुदायाचं राजकारण होतं, असं कोणी म्हटलं नाही. सरकारनेही विरोधकांना जातीय म्हटलं नाही. दोन्ही बाजूने जातीय- धर्मीय दुजाभाव झाला नाही. देशात कळपाने एकत्र येऊन कोणाला बदडून जिवानिशी मारलं नाही. देशातल्या विरोधकांना आणि बुध्दीवाद्यांना तुरूंगात डांबलं, पण स्वयंघोषित देशभक्तांकनी साहित्यिक-विचारवंतांची हत्त्या केली नाही.
आणीबाणीत जातीय- धर्मीय दंगे झाले नाहीत. ‘दुसर्याय देशात चालते व्हा’, असं सरकारने आपल्या विरोधकांना म्हटलं नाही. ‘परकीय शक्तीकचा हात’ असं सरकारने म्हटलं असेल पण कोणाला ‘देशद्रोही’ ठरवलं नाही. आणीबाणी असूनही देशात यादवी माजली नाही. अनेक झेंड्यांचे अनेक कळप देशात निर्माण झाले नाहीत. सरकार प्रणित अनेक छुप्या संघटनांनी देशभर आपला अजेंडा राबवला नाही. सरकारबद्दल नाराजी होती पण देश सोडण्याची भाषा साहित्यिक- कलावंत- विचारवंतांनी केली नाही. सरकारविरूध्द बोलणे हा सरकारद्रोह होता. देशद्रोह नव्हता. तथाकथित संतांकडून चार- पाच मुलं जन्माला घालायला सांगितलं जात नव्हतं. उलट नसबंदी कार्यक्रम राबवला जात होता. बलात्कार कमी कपड्यांमुळे होतात, असं सरकारातला कोणी मंत्री म्हणत नव्हता. ‘मुलगी आवडली तर पळवून आणू’ असं सरकारचा एखादा आमदार म्हणत नव्हता.
तेव्हा फक्तल आकाशवाणी आणि दूरदर्शन अस्तित्वात होते आणि ते सरकारी मालकीचे होते. (खेड्यात फक्तण रेडीओ. तो सुध्दा प्रत्येक घरात नव्हता.) म्हणून सरकार बद्दल सर्व गोड गोड ऐकायला मिळायचं. आज देशात शेकडो खाजगी चॅनल आहेत, पण ते नागरिकांच्या बाजूने का बोलत नाहीत, कळायला मार्ग नाही.
(‘साधना’ साप्ताहिक 29 सप्टेंबर 2018 च्या अंकात प्रकाशित झालेला लेख. या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)
– डॉ. सुधीर रा. देवरे
ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मुक्त मीडिया धोकादायक ...
वस्तुनिष्ठ प्रतिक्रिया
>>पाय जी एस टी मुळे वा
पूर्णपणे एकांगी आणि
आपल्या प्रतिक्रियेचा आदर
खरे साहेब,
एखाद्या घराण्याची आणि किती
मी कोणत्याच पक्षाचा नाही.
सुधीर साहेब,
:):):)
तेव्हा देशात आणी्बाणी असूनही
आपली सविस्तर प्रतिक्रिया वाचली।
सरकारविरूध्द बोलणे हा
सरकारविरूध्द बोलणे हा सरकारद्रोह होता. देशद्रोह नव्हता. ह्या दोघात काय फरक आहे?हा एक मुद्दा पटलेला नाही. केवळ सरकार म्हणजे देश नव्हे. देशाचा एक भाग आहे. निवडून आलेल्या सरकारचे दोष दाखवणे , उणिवा शोधणे हेच तर विरोधी पक्षाचे काम असते (असलायला हवे ) मिडियानेसुद्धा शक्य तेवढे केलेल्या कामासोबत सरकारचे दोष दाखवायला हवे. संविधानाची चौकट पाळून त्यात सरकारवर टीका करणे , न पटलेल्या निर्णयांचा निषेध करणे ह्याचे हक्क सामान्य नागरिकांना मिळालेले आहेत. सबब सरकारविरोध हा देशद्रोह कधीच ठरत नाही. देशविघातक कटात सामिल होणे , संविधानास धोका पोहचवणारे काम करणे , गुप्त माहिती फोडणे या गोष्टी येतील देशद्रोहात.(चू.भु.दे.घे.) विरोधातूनच वेगवेगळेे विचार पुढे येत जातात आणि लोकशाही बळकट होते. अर्थात सरकारच्या काही धोरणांना विरोध करण्याचा हक्क आहे पण लोकशाहीचे सरकार ही संकल्पनाच मोडण्याचे नाहीअभिनंदन सर
सरकारद्रोह
किस्सा कुर्सीका
धन्यवाद अभ्याजी
हे दोन्ही मुद्दे परस्पर विरोधी वाटले.
निर्बंध
आणिबाणी झाली होती
नाही
साहित्यिक विचारवंतांची हत्या?
इंदिरा गांधी च्या आणीबाणी त
इंदिरा गांधी च्या आणीबाणी त
प्रचंड लोकसंख्या असलेल्या या देशात शिस्त ही असायला पाहिजेच
प्रचंड लोकसंख्या असलेल्या या देशात शिस्त ही असायला पाहिजेच
आज कोठेतरी हुकुमशाहीत वावरतो
कोणाची हुकूमशाही??
पुरावा म्हणजे आपण आपले विचार व्यक्त करतो ते छापले जात नाही
मटा आणि मिपा म्हणजे देश झाला
:-) :-)
भोकरवाडी बुद्रुक मध्ये नाना
अवघड जागेचं
लेखकांचे बालपण काँग्रेसी
हुकूमशाही .... ?
च्या मारी मोदिविरोधात ब्र
मोदींनी व भाजप ने आपल्या काळात मराठी व महाराष्ट्रा साठी काय केले
स्वामीजी,
मोदी व काॅग्रेस किंवा दुसरा कोणीही काहीच करू शकत नाही
महाराष्ट्र व मराठी साठी भाजप
मोदींनी देशाची प्रगती केली तर परप्रातीय महाराष्ट्रात येणार नाही
अहो स्वामी ,
परप्रातीय येवढे येत आहेत की मराठी अल्पसंख्यक होतील
ईतकेच काय
१९९६ साली भारताची लोकसंख्या