स्फुट चांगले आहे.
सामंत साहेब, मला वाटतं की हजर "असणं" किंवा हजेरी "लावणं" हे व्यक्तिसापेक्ष (किंबहुना नाती-सापेक्ष) असतं. आणि ह्याचं भान असणं आवश्यक आहे.
तुम्ही तुमच्या मित्राचं वर्णन दिले आहे. त्यात माझ्या मते त्या नात्याला जास्ती महत्व आहे.
कुठल्याही नात्यात आणि मैत्रीत जवळिकीचे अनेक पदर असतात ह्या बद्दल कोणाचं दुमत असू नये. सगळेच मित्र अगदी जिवाभावाचे नसतात.
तेव्हा प्रसंगानुरूप आणि नात्यातल्या जवळिकीनुरूप आपली उपस्थिती तिथे आवश्यक आहे का त्या उपस्थितीची अडगळ वाटेल ह्याचा सारासार विचार करणे आवश्यक आहे. ही बाजु हजेरी "लावणार्याची" बाजू झाली.
असाच जर विचार हजेरी "घेणार्याने" केला तर ते अधिक समंजस पणाचे ठरणार नाही काय? अवास्तव अपेक्षांचे ओझे कोणावर लादून मग त्या पूर्ण झाल्या नाहित तर स्वतःला मनःस्ताप करून घेणारे कितीतरी असतात(ह्याला मी सुद्धा अपवाद नाही :) ).
शेवटी काय तर. "सर्वेऽपि सुखिनः सन्तु" हे फक्त श्लोकामधे(च) ठीक असतं.
असो. प्रतिसाद मुळ विषया पासून भरकटला असेल तर एक डाव माफी द्यावी :)
हलो विंजिनेर,
मुळ विषयापासून आपला प्रतिसाद मुळीच भरकटलेला नाही असं मला वाटतं.किंबहूना आपण केलेल्या चर्चेमुळे "असणं" हे किती व्यक्तिसापेक्ष आहे हे फार कौशल्याने आपण दाखवून दिलं आहे.
"अवास्तव अपेक्षांचे ओझे कोणावर लादून मग त्या पूर्ण झाल्या नाहित तर स्वतःला मनःस्ताप करून घेणारे कितीतरी असतात"
हे आपलं म्हणणं फारच दूरदर्शी आहे.
आपल्या प्रतिसादा बद्दल आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
सामंत साहेब,
'उपस्थिती' ही व्यक्तीसापेक्ष असली तरी विचार करायला लावणारे एक सुंदर स्फुट !
किती अनुभव संपन्नता असते आपल्या लेखनात आणि दर्जाही तितकाच उच्च..खूप वाचायचे आहे आपले लेखन, अजून येऊ द्या !
-दिलीप बिरुटे
डॉ.दिलीप,
आपल्या कडून असा प्रतिसाद वाचल्यावर माझ्या सारख्याला लेखन करायला हुरूप येतो.
आपल्या प्रतिसादाबद्दल आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
प्रतिक्रिया
स्फुट
दूरदर्शी प्रतिसाद
सुंदर स्फुट
आभार