नाळ!
कालच 'नाळ' पाहण्याचा योग आला. सुरुवातीच्या दृष्या बद्दल आणि त्याची 'फॉरेस्ट गम्प'शी तुलना यावर बरीच चर्चा झालीय. पण हा सीन निश्चित आवडून जाईल.
'सुधाकर रेड्डी यंकट्टी' यांनी 'देऊळ', 'हायवे' आणि 'सैराट' नंतर या चित्रपटाच्या कॅमेरा सोबत दिग्दर्शनाची धुरा पण सांभाळली आहे.
पहिल्या फ्रेम पासून हा चित्रपट सिनेमॅटोग्राफी चा आहे हे लक्षात येत.
चित्रपट थेटरात बघण्यासारखाच आहे, त्यामुळे जरूर बघा आणि सुरुवात अजिबात चुकवू नका.
Spoiler alert!
चित्रपटातील गावाकडची दृश्य, अप्रतिम कॅमेरा(बऱ्याच वेळा ड्रोन चा वापर केलाय बहुधा) आणि जबरदस्त नैसर्गिक अभिनय ह्या जमेच्या बाजू आहेतच. त्याबरोबर 'जाऊ दे ना व' हे गाणं आणि बच्चे कंपनीचा दंगा हे धुमाकूळ घालतंय, जेणेकरून चित्रपटाचा इतर subtle आशय न आवडणाऱ्या प्रेक्षकांना पण खेचून घेता येईल.
मला वाटतंय सगळं शूटिंग गोंदिया-भंडारा भागातील कुठल्या तरी गावातील आहे आणि त्या गावाशेजारची विस्तीर्ण वाळवंट असणारी नदी, आसपासचा बैलगाडी रस्ता आणि त्यावरची धूळ या सगळ्यामुळे एक 'वॉर्म' टच येतो जो रखरखीतपणा दाखवतो पण अगदी अंगावर नाही येत असं वाटलं.
चैत्या ची भूमिका करणारा 'श्रीनिवास' याने खूप भारी काम केलंय. त्याला आपण दत्तक असण्याबद्दल माहिती झाल्यानंतर झालेली घालमेल, निरागसपणे त्या प्रश्नाच्या उकलीसाठी केलेल्या उचापती, खऱ्या आईने परिस्थितीमुळे ह्याच्याकडे जाणूनबुजून केलेलं दुर्लक्ष आणि मग त्याचा हिरमोड/अपेक्षाभंग आणि आताच्या आईकडे परत येताना त्याची उमज हे सर्व स्थित्यंतर खूप भावणारं आहे.
याशिवाय 'देविका दफ्तरदार' यांनी पण एकदम नॉन-ग्लॅमरस भूमिका असून तीच सोनं केलंय! अनेक प्रसंगात त्या फक्त डोळ्यातून खूप काही बोलून जातात.
'दीप्ती देवी' यांनी छोटेखानी भूमिकेत ज्यामध्ये एकसुद्धा स्पष्ट संवाद नाही त्यामध्ये जीव ओतलाय.
या तिघांच्या भाव-विश्वाचा परमोच्च बिंदू असणारा एक क्षण आहे जेव्हा खरी आई लांब जातेय मागे दत्तक गेलेली आई वाट बघतेय आणि मध्ये रिकाम्या रस्त्यावर चैत्या रडत उभा आहे. निव्वळ अप्रतिम! मला तर वाटलं ह्या पॉइंटवर चित्रपट संपावा!
थोड्या वेळाने थोडा सुखद शेवट करून चित्रपट संपतो खरा, पण रूढार्थाने गोष्ट संपत नाही किंबहुना सगळ्या गोष्टींची उकल करून संपत नाही. बरेचसे प्रश्न अनुत्तरीतच राहतात पण चटका लावून जातो चित्रपट.
बऱ्याच लोकांना चित्रपट अपूर्ण ठेवलाय असं वाटणं साहजिक आहे पण ही त्या दिग्दर्शकाची मांडणी आहे हे लक्षात घ्यायला हवं माझ्यामते. मी कुठं तरी वाचलं होत की दिग्दर्शक किंवा कुठलीही गोष्ट हे फक्त एक तुकडाच दाखवत. कुठे थांबायच हे तो गोष्ट सांगणारा(इथे दिग्दर्शक) ठरवेल, त्याच्या आधी आणि नंतर बरंच काही असेल जे कधी आपण शोधावं लागत किंवा तसंच सोडून द्यावं, कारण बऱ्याच गोष्टींच्या अपूर्णतेतच आनंद असतो!
खूप नाट्य नाही, किंवा काहीच ग्लॅमरस नाही तरी पण चित्रपट भावतो. नागराज मंजुळे यात अभिनय करताहेत पण एखादा प्रसंग सोडला तर त्यांचा 'अभिनेता' म्हणून कस लागेल असा प्रसंग माझ्यामते यात नाही.
निश्चित बघा आणि आपली प्रतिक्रिया सांगा.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
चांगला परिचय .
ठीक आहे चित्रपट .
हे जे प्रसंग सांगितले आहेत ते
4/5
4/5
:D:D:D:D
चैत्या जे वय दाखवलंय त्या
मुलांची मनं नाजुक असतात.
नाळ ठीक वाटला ... पात्रे आणि
धन्यवाद!
फार आवडला नाही...
देविकाने खूप सुरेख काम केलंय