दिवाळी हा खरा तर दिपोत्सव. त्यात हे फटाके कुठून घुसले काय समजत नाही.पुर्वी दुष्ट शक्तींना जवळपास फिरकू न देण्यासाठी ढोला सारखी वाद्ये वाजवली जायची.कदाचित दिवाळी सारख्या मंगल सणामधे दुष्ट शक्ती चा वावर नको म्हणुन फटाके वाजवण्याची प्रथा आली असावी.
फटाकेनिर्मितीत वापरले जाणा-या रसायनांमुळे अनेक प्रकारचे आजार संभवतात. फटाक्यांमुळे हवा आणि वातावरण दूषित होते.त्यामुळे श्वसानाचे आजार वाढतात. ध्वनीप्रदूषणाची पातळीही वाढते. मोठ्या आवाजाच्या फटाक्यांमुळे श्रवण क्षमता कमी होते.फटाके फोडल्यामुळे कार्बन मोनॉक्साईड सारखे विषारी वायू वातावरणात पसरतात. ओझोनचा थर पातळ होतो.एकदा मराठी विज्ञान परिषदेचा फटाक्यामागील विज्ञान या कार्यक्रमात फटाक्यात वापरल्या गेलेल्या रसायनांबदद्ल स्लाईड शो कार्यक्रम दाखवला होता.
कॉपर मुळे श्वसननलिकेत त्रास कॅडमियम मुळे किडनीला धोका आणि अॅनेमिया.शिशाचा मज्जासंस्थेवर परिणाम अशा अनेक गोष्टी सांगितल्या होत्या.तपशीलात थोडाफार फरक असू शकतो. अशा प्रदुषण करणार्या फटाक्यांपासून मुक्त राहून दिवाळी साजरी करता येणार नाही का? नक्कीच येईल. फटाक्या शिवाय दिवाळी ही कल्पनाच काहींना करवत नाही. कारण दिवाळी आणी फटाके यांची संलग्नता मेंदुमधे ठामपणे कोरली गेली आहे.पिढ्यान पिढ्या ती संक्रमित होत गेली आहे.कालसुसंगत नसलेल्या अनेक प्रथा परंपरा आज पाळल्या जातात.खर तर कालबाह्य रुढी परंपरा या एक प्रकारच्या अंधश्रद्धाच आहेत.मनाला वाटणार्या असुरक्षिततेमुळे ते मोडण्याचे धाडस आज बर्याच लोकांना होत नाही.अंधश्रद्धा निर्मुलनाची चळवळ ही एक व्यापक समाज परिवर्तनाची चळवळ आहे.त्यामुळे अंनिस फटाकेमुक्त दिवाळीचे अभियान नेहमी राबवते. विद्यार्थ्यांमधे ही पर्यावरण जागृतीचे प्रमाण वाढू लागल्यामुळे त्यांना फटाके मुक्त दिवाळीचे महत्व पटू लागले आहे.काही सुसंस्कृत पालक ही आपल्या मुलांना फटाक्यांचे दुष्परिणाम पटवून त्यापासून परावृत्त करु लागले आहेत. डॊ नरेंद्र दाभोलकरांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी काही युवकांनी व विद्यार्थ्यांनी स्वत:हून फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचे ठरवले आहे.पाहू या काय होते ते!
वाचने
58084
प्रतिक्रिया
112
मिसळपाव
प्रतिक्रिया
त्याचे कारण महागाई +
In reply to यावर्षी खरोखरच फटाके by गुलाम
महागाई
In reply to यावर्षी खरोखरच फटाके by गुलाम
महागाई या निमित्ताने फटाके
In reply to महागाई by योगी९००
इतर कारणे
सहमत.
In reply to इतर कारणे by प्रभाकर पेठकर
सहमत आहे.
In reply to इतर कारणे by प्रभाकर पेठकर
या धाग्याला चार वर्षे झाली.
लेकीचे
In reply to या धाग्याला चार वर्षे झाली. by प्रकाश घाटपांडे
ज्या ज्या कुटुंबांनी
या धाग्याला ६ वर्शे झाली .या
या निमित्त आपल्यात काय काय बदल झाले याच आत्मपरिक्शन करता येईल.
राममंदीराचे कनेक्शन इथे कसे
In reply to या निमित्त आपल्यात काय काय बदल झाले याच आत्मपरिक्शन करता येईल. by धर्मराजमुटके
राम १४ वर्षे
In reply to राममंदीराचे कनेक्शन इथे कसे by प्रकाश घाटपांडे
या वर्षी कोरोनाचे सावट
कोविडमुळे प्राणवायुचे महत्व खरेच कळले आहे का?
जग्गी वासुदेव
In reply to कोविडमुळे प्राणवायुचे महत्व खरेच कळले आहे का? by प्रकाश घाटपांडे
जास्तीत जास्त प्रबोधन वारंवार
In reply to जग्गी वासुदेव by धर्मराजमुटके
फटाक्यामुळेच मुलांना आनंद
In reply to जग्गी वासुदेव by धर्मराजमुटके
एक ठराविक धर्मातील चाली
खालील लेखन कायप्पावर आले. ते
फटाके वाजवा असे आवाहन
यावेळी अनेक वर्षांनी मी फटाके
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- सीख नहीं पा रहा हूँ मीठे झूठ बोलने का हुनर,कड़वे सच से हमसे न जाने कितने लोग रूठ गये।