Skip to main content

नाना आणि तनुश्री

लेखक फुकनी यांनी सोमवार, 08/10/2018 01:37 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ता सध्या तनुश्री दत्ता चे जे काही गरळ ओकणे चालू आहे त्या विषयी तू नळी वरती बऱ्याच काही चर्चा पाहण्यात आल्या. मला स्वतः ला नाना असे काही करेल असे वाटत नाहीं . तुमच्या सर्वांच्या प्रतिक्रिया वाचायला आवडेल. https://www.youtube.com/watch?v=EDx1KywLLrQ&t=1969s

वाचने 72571
प्रतिक्रिया 151

प्रतिक्रिया

ह्या साध्याशा घटनेला खूप सारे पैलू आहेत १) नाना विरुद्ध तनुश्री २) बॉलीवूड विरुद्ध मराठी चित्रपट सृष्टी ३) उत्तर भारतीय विरुद्ध मनसे ४) अमेरिकन "मी सुद्धा" आणि त्याची भारतीय अंमलबजावणी ५) स्त्री आणि पुरुष ६) अमेरिकन हिरवे ओळखपत्र ७) सोशल मीडिया ८) डिफामेशन केसेस साठी काही वयोमर्यादा असावी का? इत्यादी, इत्यादी... मकरंद अनासपुरे यांची एक बोलकी प्रतिक्रिया https://www.youtube.com/watch?v=LxEd_mgLVis शेतकऱ्यांच्या विधवांचा पाठिंबा https://www.youtube.com/watch?v=3S0AIlACmvk

In reply to by फुकनी

मकरंद अनासपुरे खोटारडा आहे. दहा वर्षात तीन वेळा यावर तिने बोलुन झालेलं आहे. तक्रार करुन झाली आहे संघटनेकडे. काही उपयोग झालेला नाही.

In reply to by अनुप ढेरे

मकरंद अनासपुरे नाना पाटेकरला गुरुस्थानी मानतो, मकरंद अनासपुरेची भूमिका उघड उघड नाना पाटेकरची बाजू घेण्याची आहे, आणि इतर अनेक नाना पाटेकर फॅन्सची असेल. तिच्या सुरवातीच्या तक्रारींकडे चित्रपट प्रसिद्धीचे तंत्र म्हणून पाहिले गेले असणे सहज शक्य आहे. आपण म्हणता तसे, तिने २००८ मध्येच (कोर्ट सोडून उर्वरीत) संबंधीतांसमोर तक्रार केली ह्यात तथ्य असावे. मिडिया समोर किती वेळा बोलली आणि पुढे किती वेळा बोलेले, ह्याला ती स्टेटमेंट बदनामी विषयक कायद्यात मोडतात की नाही एवढेच महत्व असावे चुभूदेघे. कोर्टात का नाही गेली या प्रश्नावर एकदा ती प्रक्रीया काय असते ते माहित नव्हते, तर एकदा कोर्ट प्रक्रीया वेळ खाऊ आहे असे वेगवेगळे बोलताना दिसते. कोर्टात जाण्याचा मार्ग मोकळा आहे हे तिला माहित नव्हते ?(जे वय १८+ पेक्षा मोठ्या प्रत्येक व्यक्तिस -आणि सुसाक्षर नक्कीच- माहित असणे अभिप्रेत असावे) किमान तिच्या वडीलांना ज्येष्ठत्वाच्या नात्याने माहित असणे अभिप्रेत असावे. किमान स्वनियूक्त तज्ञ वकिलाचा सल्ला तिने घ्यावयास हवा होता. भारतीय कोर्ट प्रक्रीया कितीही वेळ खाऊ म्हटली तरी तिने मिडियाला दिलेल्या मुलाखतींच्या संख्ये पेक्षा कमी तारखांनाच प्रत्यक्ष उपस्थिती नोंदवावी लागली असती. बाकीच्या तारखा पडणे हे वकील मंडळी बघून घेत असतात. बहुधा दहा वर्षात किमान प्रथम स्तरीय न्यायालयांचे निकाल हातात असते. -तसे पहाता २००८ नंतरच्या स्त्री विषयक अनेक खटले न्यायालयीन निकालाचे सर्वोच्च न्यायालया पर्यंतचे स्तर सुद्धा पार करुन झाले असतील -आता नुसतीच आरोपबाजी करण्या पेक्षा ती म्हणते त्यात तथ्य असले तर किमान प्रथम स्तरीय न्यायालयाचा निकाल हातात घेऊन २०१८ मध्ये ती मिडियात बोलू शकली असती असे वाटते.

आपले सर्वांचे आवडते पंतप्रधान , आपल्याला लहानपणी सतत त्यांचे गोजिरवाणे रूप दाखवले गेले . अशा आदरणीय व्यक्ति ज्या राजकारण नावाच्या क्षेत्रात होत्या त्या राजकारण क्षेत्रात # metoo कधी सुरू होतंय याची वाट बघतोय . जाऊ द्या कोणाचे नाव नको घ्यायला पण लैंगिक छळवणूक साठी सर्वात उत्तम क्षेत्र आहे ते म्हणजे राजकारण पण या क्षेत्रातील टाळ्या बऱ्यापैकी दोन्ही हाताने वाजतात म्हणून राजकारणातील काळा डोह शांत आहे . त्या काळ्या डोहातील सहसा बाहेर येत नाहीत , कारण अळीमिळी गुपचिळी !!

वाचतेय. राज कपूर, शम्मि कपूर, ए.आ.र. किर्दार ही मंडळी सुटली म्हणायची.! असो. आता एम.जे.अकबर ह्याण्च्याविरुद्ध सहा महिलानी तक्रार केली आहे. अकबर हे राज्यमंत्री आहेत व सरकारचे धाबे दणाणले असणार हे नक्कि. तनुश्रीच्या जवळपास सर्व मुलाखती पाहिल्या. २००८ साली ती जे बोलत होती तेच आताही बोलत आहे. ती खरे बोलत आहे असे आम्हाला वाटते. "नाना शेतकर्याना मदत करतो म्हणून नाना तसे करणे शक्य नाही" हा दावा हास्यास्पद वाटतो.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

एम.जे अकबर बहुधा परदेश दौर्‍यावर असावेत वापस आले की सोड चिठ्ठी दिली जाण्याची शक्यता असू शकते, निवडणूक काळात सरकार त्यांना जपून ठेवण्याची जोखीम नक्कीच घेऊ शकणार नाही. दुर्दैवाने एन डि ए कडे एम.जे अकबर सारखा दुसरा मुस्लिम चेहराही नाही म्हटल्यावर एम.जे अकबर शिवाय एन. डि. ए. सरकारची काही काळ तरी पंचाईत ठरलेली आहे. नाना शेतकर्याना मदत करतो, आणि दहा वर्षापुर्वी का तक्रार केली नाही हे मुद्दे कायद्यासमोर टिकणार नाहीत. दुसर्‍या बाजूला तनुश्रीच्या कार वरचा कॅमेरामन आणि पत्रकारांचा हल्ला आणि स्टेजवरील वितुष्ट यांचाही संबंध नसण्याची शक्यता बरीच दिसते. नाना पाटेकर आणि तनुश्री दत्तात तनुश्री म्हणते तसे बिघडल्याची शक्यता असू शकते. तनुश्रीच्या स्वतःच्या जबानीला निश्चितच किंमत असेल त्याच वेळी तिथे शेकड्याने माणसे असताना हात लावण्याबद्दल एकही प्रत्यक्ष दर्शी विटनेस न देता आल्यास तनुश्रीच्या विरुद्ध पाटेकरांची बाजू मजबूत होण्याची शक्यता असावी त्याच वेळी मकरंद अनासपुरेंनी नाना पाटेकरांची उघड बाजू घेतली तशी त्यांची इतर स्त्री सह-कलाकारांनी बाजू न घेतल्यास नानांच्या बाजूला वेटेज येणार नाही. राखी सावंतने नाना पाटेकरांच्या घेतलेल्या बाजूचे मुल्य मोजले जाण्याची शक्यता कमी असावी. अंदाजाधारीत विश्लेषण आहे प्रत्यक्षदर्शी माहिती नव्हे म्हणून माहिती आणि विश्लेषणाच्या अचुकतेचा कोणताही दावा नाही, चुभूदेघे उत्तरदायीत्वास नकार लागू

In reply to by माहितगार

बाकी विश्लेषण चांगले पण खालील भाग:
राखी सावंतने नाना पाटेकरांच्या घेतलेल्या बाजूचे मुल्य मोजले जाण्याची शक्यता कमी असावी.
कोर्टात व्यक्तीनुसार साक्षीचं वेटेज बदलत असेल असं वाटत नाही. अमुक व्यक्तीने दिलेली साक्ष अधिक मजबूत किंवा तमुक व्यक्तीची साक्ष कमी विश्वासार्ह असं करता येत नसावं. भले न्यायाधीशांना व्यक्तिगत तसं इम्प्रेशन असलं तरी. विरोधाभास दाखवून दिला किंवा खोटेपणा उलटतपासणीत सिद्ध केला तरच साक्षीदार पूर्ण अग्राह्य सिद्ध होऊ शकेल. पण मूल्य / वेटेज असं काही नसावं.

१. सेटवर अनेक कलाकार, तंत्रज्ञ मंडळी असताना असे काही घडेल असे वाटत नाही. २. ज्या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी स्त्री आणि पुरुशांनासुद्धा सेक्स चा वापर करावा लागतो आणि हे नीट माहिती असूनसुद्धा जे लोक या क्षेत्रात शिरतात त्यांनी असा कांगावा करावा हे आश्चर्य आहे. ३. १० वर्षांपूर्वी घडलेला गुन्हा आज कोण सिद्ध करू शकेल ? ४.एकूणच या मागील हेतूबद्दल शंका घ्यायला जागा आहे.

In reply to by सामान्यनागरिक

४.एकूणच या मागील हेतूबद्दल शंका घ्यायला जागा आहे.
सब्जेक्टीव्ह आहे, हेतू बद्दल शंका असूही शकतात पण त्याच वेळी केवळ हेतू वरील शंके मुळे न्याय नाकारला जातो असेही होऊ नये.
३. १० वर्षांपूर्वी घडलेला गुन्हा आज कोण सिद्ध करू शकेल ?
इतर विटनेसेसच्या आठवणी मिळवणे कठीण होऊ शकते म्हणून कठीण होऊ शकते पण अशक्य नव्हे.
२. ज्या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी स्त्री आणि पुरुशांनासुद्धा सेक्स चा वापर करावा लागतो आणि हे नीट माहिती असूनसुद्धा जे लोक या क्षेत्रात शिरतात त्यांनी असा कांगावा करावा हे आश्चर्य आहे.
आपले हे वाक्य राज्यघटनेने दिलेल्या आधिकार आणि मुल्यांना अनुसरुन नसावे. मुद्दा 'कंसेंट' म्हणजे परवानगीचा आहे. संबधीत स्त्री/पुरुषाच्या 'कंसेंट' म्हणजे परवानगी ने झाले तर कायदेशीर आणि संबधीत स्त्री/पुरुषाच्या 'कंसेंट' म्हणजे 'परवानगी' शिवाय झाले तर बेकायदेशीर. तनुश्री सोबत झालेल्या लेखी करारात नाना पाटेकरांना भूमिका नव्हती असे दिसते. लेखी करारातील मर्यादांची जाणीव दिग्दर्शकाने नाना पाटेकरांना दिली की नाही आणि कल्पना नसून नाना पाटेकर इन्व्हॉल्व झाले का कल्पना असूनही इन्व्हॉल्व झाले ? असा प्रश्न कोर्टात उपस्थित होऊ शकतो . म्हणजे दिग्दर्शक आणि नाना पाटेकर दोघांना पूर्णपणे एकमेकांच्या बाजूने बोलणे अवघड होऊ शकते. अर्थात नाना पाटेकर स्टेजवर उपस्थित होते हा गुन्हा होऊ शकत नाही . स्टेजवर कोण कोण असावे हा दिग्दर्शकाचा प्रिरॉगेटीव्ह असावा. नाना पाटेकरांकडून आगळीक झाली का आणि नाना पाटेकरांचा हेतू अयोग्य होता का हे प्रश्न अधिक महत्वाचे आणि प्रत्यक्ष साक्षी पुरावे काय उभे रहातात यावर बरेच काही अवलंबून राहील.

In reply to by माहितगार

गाडीची तोडफोड होत असताना नाना व दिग्दर्शकाला त्याच परिसरात असून मदतीला जावेसे का वाटले नाही? ते म्हणतात-"आम्हाला माहित नाही बाहेर काय चालले होते ते". हे न पटण्यासारखे आहे. आपल्या सहकलाकारच्या गाडीची तोडफोड चालु आहे, आपण जवळच आहात, आणी आपण मदतीला गेला नाहीत? गेले नाहीत कारण ती गाडीत कोणत्या कारणाने बसली आहे हे नाना व दिग्दर्शक व नृत्य-दिग्दर्शकाला चांगले ठाउक होते.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

...गाडीची तोडफोड होत असताना नाना व दिग्दर्शकाला त्याच परिसरात असून मदतीला जावेसे का वाटले नाही?...
हा मुद्दा नानास मिडियासमोर आणि कायद्या समोर नाना पेक्षाही दिग्दर्शकास त्रासदायक होऊ शकावा.

In reply to by माहितगार

काम मिळवण्यासाठी जर एखाद्या स्त्री समोर शय्यासोबतीची अट ठेवली तर ते 'कंसेंट' आहे म्हणून ग्राह्य धरले जाईल का? म्हणजे एक होतकरू मुलगी ऑडिशनला गेली आणि तिथल्या एखाद्या निवडीचे अधिकार असलेल्या व्यक्तीने तिला सांगितलं की तुला काम देईन पण त्याची इच्छा पूर्ण करायला लागेल. काम मिळवण्यासाठी नाईलाजाने का होईना पण तिला त्याची इच्छा पूर्ण करायला लागली. वर ती राजीखुशीने करत आहे असा अभिनय पण करायला लागला तर तिची 'कंसेंट' होती असं म्हणायचं का? दुसऱ्या बाजूने विचार करता तिला काम नाही मिळालं तरी चालेल पण असल्या तडजोडी करणार नाही असं म्हणायचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे दोष कोणा एकावर ठेवणे योग्य नाही. तनुश्री प्रकरणात तिचं म्हणणं आहे की नाना सेटवर येऊन तिला हात धरून डान्स स्टेप्स शिकवायला लागले. त्या वेळेच्या नृत्य दिग्दर्शकाचं म्हणणं आहे की तनुश्रीला बराच वेळ झाला तरी स्टेप्स जमत नव्हत्या. त्यामुळे वैतागून नाना सेटवर गेला आणि तिला हात धरून स्टेप्स करून दाखवू लागला. तिचा आक्षेप या कृतीवर आहे. त्या चित्रपटात नाना व तनुश्री मुख्य भूमिकांमध्ये होते, मग तिला नानाची ही कृती अपमानास्पद वाटली असावी का? हा व्हिडिओ बघा यात नृत्य दिग्दर्शक आणि सिनेमा दिग्दर्शकाचे मत सांगितले आहे. पण त्याच बरोबर जे आरोप केले जातात की स्टुडिओच्या बाहेर पण तिच्या गाडीवर हल्ला झाला त्याबद्दल पण त्या कॅमेरामनचे (पवन भारद्वाज) म्हणणे मांडले आहे. त्या कॅमेरामनच्या सांगण्याप्रमाणे, तो त्याच्या एका स्त्री सहकार्यांबरोबर स्टुडिओच्या बाहेर न्यूज कव्हर करण्यासाठी थांबला होता. न्यूज काय, कोणाबद्दल आहे हे त्याला सांगण्यात आलं नव्हतं. सुमारे ४ तास थांबल्यानंतर तनुश्रीसाठी एक गाडी आली. त्याबरोबर तनुश्री व्हॅनिटी व्हॅन मधून बाहेर आली. म्हणून पवन आणि त्याची सहकारी शूट करण्यासाठी पुढे आले. त्यावेळेला तनुश्रीच्या वडिलांनी पवनचा कॅमेरा तोडला आणि पवनच्या महिला सहकार्याचे केस ओढून बाजूला ढकललं. नंतर गाडी पुढे नेताना ती पवन आणि त्याच्या महिला सहकार्याच्या पायावरून गेली. त्यामुळे दोघेही खाली पडले. पुढच्या गेटवर जमावाने गाडी थांबवली म्हणून पवन पुढे गेला आणि नुकसान भरपाई मागू लागला. ते दाद देत नव्हते म्हणून हवा सोडण्याचा प्रयत्न केला असे दिसते. अर्थात बाकी जमाव कोण होता हा प्रश्न विचारला जातोय आणि त्यातही एक पांढरा शर्टवाला गाडीवर नाचतोय हे दिसतंय. पण पोलीस आणि बाकीचे त्याला थांबवायचा प्रयत्न करत आहेत हे पण दिसतंय. स्टुडिओ मध्ये बरेच लोक उपस्थित असणं हे काही नवीन नसावं आणि त्या लोकांनी तनुश्रीच्या वडिलांनी केलेलं आणि या दोघांच्या पायावरून गाडी गेलेली बघितलं असावं, म्हणून त्यांनी पुढे गाडी अडवली असावी का? अश्या बऱ्याच शक्यता आहेत, त्यामुळे लगेच मीडिया ट्रायल करून दोषी फिक्स करू नये असं मला वाटतं.

In reply to by ट्रेड मार्क

...त्यामुळे लगेच मीडिया ट्रायल करून दोषी फिक्स करू नये..
अगदी सहमत, पण एकदा मिडियात आले कि इतरांनी चर्चा करणे स्वाभाविक होते. अशी चर्चा संयमीत विवेकपूर्ण राहील या साठी तुमच्या माझ्या सारख्या जागरुकांनी आपण मांडणी प्रयत्न करता तसा संयमीत मांडणी प्रयत्न करणे रास्त असावे.
....स्टुडिओ मध्ये बरेच लोक उपस्थित असणं हे काही नवीन नसावं आणि त्या लोकांनी तनुश्रीच्या वडिलांनी केलेलं आणि या दोघांच्या पायावरून गाडी गेलेली बघितलं असावं, म्हणून त्यांनी पुढे गाडी अडवली असावी का? ....
असायला काय अगदी सही मागण्यासाठी थांबलेले फॅन सुद्धा असू शकतात ;) (वकिली उपहास ह. घ्या.) अगदीच फॅन मंडळी नसली तरी मुलाखतेच्छु पत्रकार किंवा अनेकविध व्यक्तिगत कारणांनी एकाच वेळी पोहोचलेल्या व्यक्ति किंवा तनुश्री आक्षेप घेते तसा ठरवून पाठवलेला जमाव हा चौकशीचा विषय असावा. पोलीस चौकशी या विषयावर पुढे गेली नसेल तर तोही कदाचित वेगळ्या चौकशीचा विषय असू शकेल. आणि न्यायालये आपली मते मांडतील निर्णय घेतील. वर माईंनी मांडलेल्या मुद्द्यातले तथ्य असे की तो जमाव स्टुडीओच्या आवारात असेल तर स्टुडिओच्या आवारातून अगदी काम सोडलेला व्यक्तीसुद्धा सुखरुप बाहेर पडेल हे बघण्याची दिग्दर्शकाची आणि प्रोड्यूसरची अप्रत्यक्ष जबाबदारी असू शकते. - बॉलीवूड फिल्म फेडरेशनने स्त्री कलाकार घरी पोहोचे पर्यंतच्या सुरक्षीततेची बाब या गाजावाजानंतर मनावर घेतल्या सारखे दिसते आहे- नाना पाटेकरांनाही समजा जमावा विरोधात लगेच मदत करता आली नाही तरी कळल्या नंतर सहकलाकार घरी सुखरुप पोहोचला का आणि आता कसा आहे हे चौकशी चिंता आणि कळकळ व्यक्त केली असल्यास कल्पना नाही .

In reply to by ट्रेड मार्क

...तनुश्री प्रकरणात तिचं म्हणणं आहे की नाना सेटवर येऊन तिला हात धरून डान्स स्टेप्स शिकवायला लागले. त्या वेळेच्या नृत्य दिग्दर्शकाचं म्हणणं आहे की तनुश्रीला बराच वेळ झाला तरी स्टेप्स जमत नव्हत्या. त्यामुळे वैतागून नाना सेटवर गेला आणि तिला हात धरून स्टेप्स करून दाखवू लागला....
आधी, स्टेजवर हात धरला की नाही धरला ? , धरला या बाजूने कोण कोण विटनेस आहे , नाही धरला या बाजूने कोण कोण विटनेस आहे आणि त्यांची साक्ष साक्षीची उलट तपासणी या नंतर नेमके तथ्य पुढे येईल. हात धरला गेला असेल तर उद्देश्य आणि हेतूंच्या योग्या योग्यतेचा समज गैरसमजांबद्दल कोर्टापुढे बाबी मांडाव्या लागतील आणि कोर्ट उद्देश्य आणि हेतूंची निर्मळता स्विकारते का पहावे लागेल. नानांना अशी कोणती स्टेप माहित होती की जी नृत्य दिग्दर्शका कडून प्रशिक्षीत करुन घेता आली नाही हा तनुश्रीचा मोठा प्रश्न असावा. कारण द्यायचेच तर कॅमेराचा अँगल समजावण्याचे द्यावे स्वतःलाच नृत्य येत नसताना नृत्य शिकवण्यास निघाले हे अगदी निखळ विनोदाचा प्रयत्न म्हणूनही सांगता येईल पण नृत्य न येणारी व्यक्ती नृत्याच्या स्टेप सिरीयसली सांगत होती हे नेमके कसे स्विकारले जाऊ शकेल याची कल्पना नाही. नाना तिथे थांबलेच का ? हा तनुश्रीचा प्रश्न / भूमिका मात्र सहसा रास्त धरली जाऊ नये कारण स्टेजवर कुणि कुणि थांबावे हा दिग्दर्शकाचा प्रिरॉगेटीव्ह असावा. नृत्य करताना अभिनय सुद्धा करावा लागतो आणि तो अभिनय कसा असावा हे सांगण्याचा नानाचा अधिकार मोठा असू शकतो. किंवा नृत्याच्ता वेळी नाना प्रेक्षकात अथवा स्टेजवर आहे हे दिग्दर्शकास दाखवायचे असू शकते. अर्थात नानां किंवा अजून कुणाकडून कराराचा भंग अथवा गैर वर्तन झाल्याच्या नंतर अमुक एक व्यक्ती स्टेजवर नको असे कलाकारास सांगता यावे असे वाटते .

In reply to by माहितगार

"तनुश्री प्रकरणात तिचं म्हणणं आहे की नाना सेटवर येऊन तिला हात धरून डान्स स्टेप्स शिकवायला लागले. त्या वेळेच्या नृत्य दिग्दर्शकाचं म्हणणं आहे की तनुश्रीला बराच वेळ झाला तरी स्टेप्स जमत नव्हत्या. त्यामुळे वैतागून नाना सेटवर गेला आणि तिला हात धरून स्टेप्स करून दाखवू लागला. तिचा आक्षेप या कृतीवर आहे. त्या चित्रपटात नाना व तनुश्री मुख्य भूमिकांमध्ये होते, मग तिला नानाची ही कृती अपमानास्पद वाटली असावी का?" नाना त्याच्या अभिनयाबद्दल माहित आहे. त्याने तिला नृत्य शिकवावे ईतपत त्याच्याकडे नृत्यकला अवगत आहे का? तिने दिलेल्या मुलाखतीनुसार-नानाला हे सगळे करण्याची गरजच काय ?तो एक दिवस आधीच येउन तिच्याकडे रोखून बघत होता असे ती म्हणते. सुरुवातीला तिने आक्षेप घेतल्यावर "नाना ज्येष्ठ अभिनेता आहे. आम्ही काहीच करू शकत नाही. जरा सहन कर" असे दिग्दर्शक्/नृत्यदिग्दर्शक तिला म्हणाले. "मी मनात येइल ते बोलतो.. पटेल तेच करतो" असे म्हणणार्या लोकांबद्दल लोकाना एक आकर्षण असते. त्यामुळे नानाचे लोकाना तसे कौतुक वाटते. पण येथे त्याने मर्यादा ओलांडली . कुणी दुसरी अभिनेत्री असती तर सहन केले असते. पण कितीही नाके मुरडली तरी ती माजी मिस. इंडिया आहे. "माझी परवानगी न घेता मला स्पर्ष करून मला नाच शिकवणारा हा कोण?" असा प्रश्न तिला नक्किच पडला असणार. नाना तुमच्या घरी अभिनय शिकवायला आला आणी तुमच्या स्त्री सदस्याना सारखे स्पर्श करून नाच शिकवू लागला तर येथील पुरूष सदस्य काय करतील? हाकलून देतील की नाना तसा नाही म्हणून सहन करत राहतील?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माईसाहेब आपण उपप्रतिसाद नक्की माझ्या प्रतिसादाला दिला आहे का ? की अनवधानाने ? माझ्या प्रतिसादात नेमके काय राहून गेले की आपण शेवटच्या परिच्छेदातील भावना माझ्या प्रतिसादाचा उपप्रतिसादात आली ? कुठे चुकले ते कळावे म्हणजे अधिक नेमके पणाने संवाद साधता येईल . कळावे संवाद साधावा हि नम्र विनंती.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

...नाना तुमच्या घरी अभिनय शिकवायला आला आणी तुमच्या स्त्री सदस्याना सारखे स्पर्श करून नाच शिकवू लागला तर येथील पुरूष सदस्य काय करतील? हाकलून देतील की नाना तसा नाही म्हणून सहन करत राहतील?...
माईसाहेब मुद्दा कंसेंट कंसेंट आणि कंसेंटचाच आहे. पहिली कंसेंट ज्या व्यक्तीला नृत्य शिकवले जात आहे त्याची/तिची दुसरी कंटेंट घर/जागा मालक अथवा भाडेकरुची. कंसेट असेल तर रहावे नसेल हाकलावे , अर्थात घर या वास्तुच्या मालकाला वास्तुचा मालक या नात्याने ठेवण्याचे अथवा हाकलण्याचे अधिकचे आधिकार अंशतः असू शकतात. गुरु शिष्य नात्यात शुचितेचे दृष्टीकोण शिष्यांच्या व्यक्तिगत दृश्टीनुसार बदलते असू शकतात आणि त्यानुसार कंसेंट बदलू शकते. शिष्याची परवानगी असून गुरु स्पर्ष करत असेल तर आभाळ कोसळ्ले म्हणणारे नैतिक सुभेदारी करणारे काझी कोण ? कंसेंट नसेल तर अशा गुरुंना टाटा अगत्याने करावे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

" नाना तुमच्या घरी अभिनय शिकवायला आला आणी तुमच्या स्त्री सदस्याना सारखे स्पर्श करून नाच शिकवू लागला तर येथील पुरूष सदस्य काय करतील? हाकलून देतील की नाना तसा नाही म्हणून सहन करत राहतील? " माई , स्रियांवर होणाऱ्या अन्यायबद्दल तुमचा सात्विक संताप समजू शकतो पण आपले मुद्दे ' योग्यच ' आहेत हे सिद्ध करण्यासाठी या धाग्यावर चर्चा करणाऱ्या पुरुषांचा उद्धार करून काय फायदा ? वरील तुमचे वाक्य वाचून चाळीतील नळावर एकमेकांची धुणी धुणाऱ्या बायकांची आठवण झाली . भविष्यात सनी ताईवर असा धागा निघाल्यावर वरील वाक्य तुम्हाला उद्देशून कोणी वापरले तर चालेल का ? विचार करून च त्रास होतो ना ? तुमच्या श्रेष्ठत्वचा आब तुम्हीच ठेवला पाहिजे . रस्त्यावर चालताना एखादया मुलाने डोळा मारला तर त्याच्या कानफटात लावतील अशा स्वाभिमानी मुली आपल्याला पूर्वी आणि आताही भरपूर दिसतील , रस्यावरची मुलगी कानाखाली लावू शकते मग या महिलांनी त्याच वेळी अन्याय करणाऱ्याच्या कानाखाली का नाही लावली ? नाही लावली कारण बऱ्याचजनींनी स्वाभिमान गहाण ठेऊनच त्या क्षेत्रात प्रवेश केलेला असतो त्यामुळे तारकांची लाफडेबाजी व त्यावर शेरे मारताना विनाकारण इतर मिपासदस्यांना कस्पटासमान लेखू नका ही विनंती .

In reply to by ट्रेड मार्क

...दुसऱ्या बाजूने विचार करता तिला काम नाही मिळालं तरी चालेल पण असल्या तडजोडी करणार नाही असं म्हणायचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे दोष कोणा एकावर ठेवणे योग्य नाही....
आपल्याला '...त्यामुळे दोष कोणा एकावर ठेवणे योग्य नाही....' या वाक्यातून नेमके काय म्हणायचे आहे ते निटसे उमगले नाही.
....म्हणजे एक होतकरू मुलगी ऑडिशनला गेली आणि तिथल्या एखाद्या निवडीचे अधिकार असलेल्या व्यक्तीने तिला सांगितलं की तुला काम देईन पण त्याची इच्छा पूर्ण करायला लागेल. काम मिळवण्यासाठी नाईलाजाने का होईना पण तिला त्याची इच्छा पूर्ण करायला लागली. वर ती राजीखुशीने करत आहे असा अभिनय पण करायला लागला तर तिची 'कंसेंट' होती असं म्हणायचं का? ...
या बाबत नेमके कायद्यांचे बारकावे माहित नाहीत पण इंडियन काँट्रॅक्ट अ‍ॅक्ट नुसार इतर कायद्यानुसार बेकायदेशीर असलेले काँट्रॅक्ट अ‍ॅक्ट नुसारही सहसा अग्राह्य होते , आणि स्त्री पिळवणूक विरुद्ध कायद्यांनुसार आपण म्हणता तशी अट अधिकृतपणे घालणे बहुधा बेकायदेशीर ठरावे. आता एखाद्या स्त्रीने काम मिळवण्यासाठी स्वतःहून स्वतःस अर्पण केले तर त्यास कायद्याचा नाईलाज असेल कायद्यास तिथे प्रोटेक्ट करणे अवघड जाईल. उदाहरणार्थ सध्याच्या मीटू मध्ये एका लेखिकेचे मनोगत आले आहे ज्यात काही वेळा नटाने विदाउअट कंसेंट कृत्य केल्याचे म्हटले आहे , कंसेंट नसलेले नटाचे कृत्य बेकायदेशीर असेल. पण त्याच नटाकडे सध्या इतर काम नाही काम तर पाहीजे म्हणून लेखिका स्वतंहूनही एकदा गेली असे म्हणते, अशा वेळी तिने स्वतःहून कंसेंट दिली असे होते. कारण कायद्याच्या भूमिकेतून तो काम देत नसेल तर कायद्याचा मार्ग त्या स्त्रीने स्विकारावयास हवा होता अथवा दुसरे काही काम दुसरीकडे तिला शोधता आले असते. (आधीच्या एका मिपासदस्य सामान्य नागरीक या प्रतिसादकाचा हा दृष्टीकोण की चित्रपटात काम केलेल्या जवळपास सर्वच नट स्टेज बाह्य कंसेंटच्या मार्गाने चित्रपटसृष्टीत पोहोचत असणार हा अनावश्यक सरसकट दोषारोपणाचा आणि अस्पृहणीय आहे हे आधीच्या त्यांना दिलेल्या प्रतिसादातून नोंदवायचे राहीले आहे . चर्चा चालू आहे तर येथे नोंदवून ठेवतो) अर्थात पडद्या मागच्या कंसेंटची आपण हकनाक चर्चा करत आहोत असे वाटते. तनुश्री प्रकरणात स्टेज बाह्य कंसेंटचा प्रश्न नाही , स्टेजवरील कंसेंट बाबतच्या करारात काय होते आणि काय नव्हते हा प्रश्न असावा . चुभूदेघे . कायदे विषयक अचूकतेचा दावा आणि सल्ला नाही उत्तरदायीत्वास नकार लागू.

In reply to by माहितगार

नाच न येणार्या पुरूष अभिनेत्याने अभिनेत्रीला सारखा हात लावावा, ज्या नाचात त्या स्टेप्स नव्हत्या त्या घुसडवाव्यात.... कसला कन्सेण्ट घेऊन बसलात ? डोके ठिकाणावर असणारा दिग्दर्शक असता तर चार कान्फटात मारून नानाला हाकलून दिला असता . पण तो सारंग नानाचा जुना मित्र होता.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

.....कसला कन्सेण्ट घेऊन बसलात ? .....
आपण तनुश्री दत्तांच्या सर्व मुलाखती नीटपणे पाहिल्यात का ? ती स्वतःपण कंसेंट बद्दलच बोलते आहे. तिच्या पहिल्याच चित्रपटात इम्रान हश्मी हिरो होता. त्याच्या सोबतच्या शुटींग बद्दल तिचे काही आक्षेप दिसत नाहीत म्हणजे प्रोड्यूसर दिग्दर्शकाने करारात व्यवस्था केलेली असेल किंवा करार कंसेंटने बदलला असेल. या चित्रपटाच्या करारात पूर्व प्रावधान कंसेंट नव्हती एवढाच विषय आहे. (चॉकलेट हिरो नसल्याने नाना पाटेकरांना तिने कंसेंट व्यावसायिक दृष्टीने कंसेंट देण्याचे तिला टाळावयाचे असू शकते. दिग्दर्शक आणि नाना इरेला पडण्यात आणि तिने नाकारण्यात बहुधा इगो क्लॅश आणि व्यायसायिक गणित अधिक असावे. म्हणजे दिग्दर्शकाच्या अथवा नानाच्या काही चुका झाल्या असतील तर नाकारायच्या असे नव्हे. भारतीय लोक परंपरेने शुचितेच्या अंगाने विचार करत असावेत आणि स्वतः तनुश्रीची गणिते कंसेंट, व्यावसायिक गणित अधिक महत्वाचे असासोब, शुचितेचा मुद्दा बॅक ऑफ माइंड नसेलच असे नाही कारण त्या संबंधाने तिचे सिने सृष्टी बद्दल पूर्वग्रह असावेत आणि इम्रान हश्मी वगैरे तरुण स्मार्ट अ‍ॅक्सेप्टेबल हिरोंबाबत बाबत शुटींग करताना शुचितेचे मुद्दे करारात (कंसेंट) असेल तर तिने डायल्यूट होऊ दिले असावेत. असे तनुश्रीच्या निवड स्वातंत्र्याचा आदर ठेऊनही म्हणावेसे वाटते. तिला आधीच सिनेसृष्टीबाबत पुर्वग्रह होते त्यात आयटम साँगबद्दल अधिक पूर्वग्रह होते, असे तिच्या मुलाखतींवरुन जाणवते. त्यामुळे नाना पाटेकर किंवा इतर कुणाच्या अ‍ॅक्टींग कौशल्याने प्रभावित होणे झाले नसावे . ह्यामुळेच नानांसोबतच्या आता पर्यंतच्या इतर हिरॉईन स्त्री सहकलाकारांच्या तक्रारी आल्या नसाव्यात पण तनुश्री नानाच्या अभिनय कौशल्याने प्रभावित होण्या एवजी पुर्वसाशंकीत किंवा पुर्वग्रहीत असण्याची शक्यता असावी असे वाटते.
...पण तो सारंग नानाचा जुना मित्र होता....
दिग्दर्शक महोदयांना इतर पण मित्र असतील ना पण प्रत्येक मित्राचा आग्रह दिग्दर्शक पूर्ण करतो का ? चित्रपट आणि मालिका लीड कलाकारांवर अवलंबून असतात एकदा चित्रपटाच्या शुटींगचा मोठा भाग झाला की लीड कलाकार बदलणे छोट्या निर्माता दिग्दर्शकांना महागाचे असू शकते हा घटक मित्र असण्यापेक्षा अधिक प्रभावी असावा. दिग्दर्शक हा ही कलाकार असतो, चित्रपट निर्मिती ते नृत्य दिग्दर्शन एक कला निर्मिती प्रक्रीया आहे. कला निर्मिती प्रक्रीयेत एखाद्या दृश्य ते नृत्य यात बदल करण्याचा प्रिरॉगेटीव्ह दिग्दर्शकाचा असणे स्वाभाविक असते. - शक्य आहे कि नाना पाटेकरांना खूश ठेवण्यासाठीही बदल करण्याचा प्रयत्न असेल - पण कलाकार हे माझ्या करारार नाही किंवा करारत असुनही करार मोडू इच्छिते हे म्हणण्यस तनुश्री किंवा इतर कलाकार स्वतंत्र असू शकतात. पण करार बदलण्याची चर्चा करण्याचा नव्या स्टेप कलेच्या गरजेच्या दृष्टीने जोडण्याचा आधिकार दिग्दर्शकासही आहे. स्टेप्स बदलण्याची चर्चाच का केली हे म्हणणे सयुक्तिक नाही . करारात नसलेल्या स्टेप्स आहेत क्षमा करा मी निघाले एवढे तनुश्रीस करता येते. म्हणून इथे मतांतर होते.

In reply to by माहितगार

"करारात नसलेल्या स्टेप्स आहेत क्षमा करा मी निघाले एवढे तनुश्रीस करता येते. म्हणून इथे मतांतर होते. " तिने तेच तर केले आणी ती गाडीत जाउन बसली. त्या आधी नाच कसा करयचा हे नाना तिला शिकवू पाहात होता. नानाने जास्तच जवळीक करयचा प्रयत्न केल्यावर ती साहजीकच चिडली. आणी ईथेच नानाचा व दिग्दर्शकाचा ईगो दुखावला. मुख्य मुद्दा म्हणजे नृत्यदिग्दर्शक असताना नानाला तिला नाच शिकवायची काय गरज? कारण एकच "मी शहाणा" . नवतारका हे एकवेळ सहन करतील पण मिस. ईंडिया वगैरे जिंकलेल्या मुली हे सहन करणार नाहीत.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

आता एक बघा, समजा १) अगदी अशाच ( खर्‍या किंवा काल्पनिक) इतिहास कालीन घटनेवर एक दिग्दर्शक चित्रपट बनवतोय , आणि या चित्रपटात नाना पाटेकर आणि तनुश्री सह कलाकार आहेत. आणि दिग्दर्शकाच्या स्टोरी नुसार नाना पाटेकरने तनुश्रीला दंडाला धरुन स्टेजवर वेग वेगळ्या ठिकाणी जाऊन नाचण्यास सांगावयाचे आहे . आता कथा पटच तसा असेल तर तनुश्रीला नाना पाटेकरचा तो अभिनय स्विकारण्या वाचून प्रत्यवाय रहात नाही. समजा २) पटकथेत विनोदा खातर डान्स न येणारा हिरो नृत्यांगनेस चुकीच्या स्टेप कशा शिकवतो हे दाखवायचे आहे तर सह कलाकार म्हणून तनुश्रीस ते स्विकारावे लागले असते की नाही ? आता हे तिला ती संपूर्ण चित्रपटासाठी सहकलाकार असती तर स्विकारण्यावाचून पर्याय राहीला नसता कारण चित्रपट कलाकाराच्या कामाचा आणि कराराचा भाग राहीला असता. (त्याच वेळी स्टेजच्या बाहेर ही वर्तने संमती शिवाय झाली तर बे कायदेशीर ठरु शकतात) नाना पाटेकरांच्या सोबतच्या या केस मध्ये काँट्रॅक्ट अ‍ॅक्ट नुसार तिने केवळ सोलो डान्स साठीचा करार केला म्हणून प्रॉब्लेम झाला. या केस मध्ये मुख्य प्रॉब्लेम दिग्दर्शकाच्या अथवा प्रोड्यूसरच्या बाजूस ब्रीच ऑफ काँट्रॅक्ट आणि अंशतः ब्रीच ऑफ ट्रस्ट असू शकतो. नाना पाटेकर करार माहित असून तसे वागले अथवा करार महित नसून वागले या मुद्द्यास यामुळेच महत्व प्राप्त होते. कारण सर्वसाधारण परिस्थितीत स्टेजवर कलाकारांना आणि नानासाठी नानाचे वर्तन सामान्य ठरणारे असू शकते. आणि म्हणून ज्यांना तनुश्री ओव्हर रिअ‍ॅक्ट करते आहे असे वाटते त्यातही तथ्य आहे त्याच वेळी करारच्या मर्यादा माहित असून नानाचे वर्तन तसे राहिले असेल तर कायद्याचे बाजूलाही ठेऊन स्पृहणिय ठरेलच असे नाही. त्यामुळेच आधीच्या प्रतिसादातून मी या इंडस्ट्रीच्या लिबरल आर्टचे स्वरुप समजून घेऊन कोड ऑफ कंडक्ट आणि काँट्रॅक्ट चे अधिक आदर्श नमुन्यांच्या उपलब्धतेची गरज नमुद केलेली आहे.

In reply to by माहितगार

कारण सर्वसाधारण परिस्थितीत स्टेजवर कलाकारांना आणि नानासाठी नानाचे वर्तन सामान्य ठरणारे असू शकते
इथे तसे नव्हते. तनुश्रीने जेव्हा प्रथम तकार केली तेव्हा दिग्दर्शक व ईतरानी तिला- " तुझा प्रोब्लेम समजू शकतो पण नाना ज्येष्ठ कलाकार आहे ना" थोडक्यात नानाला कोणी समज दिली तर नाना त्याच्या स्वभावानुसार चित्रपट सोडून गेला तर मोठे नुकसान. म्हणून "तू जरा सहन कर" म्हणजे नानाचे वर्तन त्यानाही मान्य नव्हते ते नाईलाजाने सहन करत होते.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

तनु आणि नानु अनुक्रमे माई आणि मागा आहेत असे उगीच वाटून गेले. . असतील ही, काही सांगता येत नाही.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

...नाना त्याच्या स्वभावानुसार चित्रपट सोडून गेला तर...
चित्रपट सोडून गेलातर ची भिती असू शकते , मान्यय. 'स्वभावानुसार' या बिरुदवली साठी काही आधार आहेत का ? मिडिया ट्रायल नाही ना ? ( चित्रपटांमध्ये माझी विशेष रुची नसते म्हणून विचारतोय )
...म्हणजे नानाचे वर्तन त्यानाही मान्य नव्हते ते नाईलाजाने सहन करत होते....
तसे असेल तर प्रोड्युसर आणि दिग्दर्शक दहा वर्षांनंतर कशाला सपोर्ट करत बसले असते ? असा एक प्रश्न शिल्लक रहातो . एका पाठोपाठ एका पेक्षा अधिक स्त्री कलाकार / पत्रकार अलोकनाथ आणि एम जे अकबर बद्दल बोलू लागले तेवढी संख्या आज या घटके पर्यंत तरी नाना पाटेकरांच्या वाटेला आलेली दिसत नाही. अर्थात इतर स्त्री सहकलाकारांचे उघड समर्थनही अद्याप नानांना मिळालेले दिसत नाही हे पण मान्य करावे लागेल.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

स्त्री आणि पुरुष दोन्ही तारे तारकांच्या एवढ्या एक्सेंट्रीसिटीजना निर्माता दिग्दर्शकांना नेहमीच तोंड द्यावे लागत असणार. अर्थात इंडस्ट्रीत कामाला सुरवात होतानाच कोड ऑफ कंडक्टच्या क्लचरची सवय लावणे हाच यावर अधिक सुयोग्य उपाय असावा असे वाटते.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

करारात काय कुठल्या स्टेप्स कुठल्या गाण्यात करणार इतक्या डिटेल मध्ये लिहिलेले असते का? काय काम असेल याची साधारण रूपरेषा, सर्वसाधारण कामाच्या वेळा याचबरोबर दिग्दर्शक सांगेल त्याप्रमाणे काम करावे असे पण एक कलम असेल ना? स्त्री कलाकारांच्या साठी अंगप्रदर्शन करणार नाही, आयटम सॉंग करणार नाही वगैरे अधिकची कलमे असतील. पण पूर्ण सिनेमातले सगळे सीन व गाणी आणि त्यात कोण काय करणार असं कॉन्ट्रॅक्ट करणं अवघड आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मानसिक दृष्ट्या सामान्य माणूस आपल्या रोजच्या जीवनात आपण काही चला आज आता कोणाला तरी त्रास देऊ किंवा आज कोणाला तरी छेडू किंवा आज मारामारी करू अश्या उद्देशाने घराबाहेर पडत नाही. उद्या जर ऑफिसमध्ये एक स्त्री आणि पुरुष एकत्र काम करत असतील आणि त्या दोघांना मिळून आज एक काम पूर्ण करायचं आहे. त्या स्त्रीला जर एक काम जमत नाहीये म्हणून तो पुरुष सहकारी तिला समजावून सांगतो आहे. १० वेळा सांगून झालं तरी काम नीट होत नाही म्हणून वैतागून त्या पुरुष सहकाऱ्याने नुसतं तिला सहज खांद्याला हात लावून बाजूला केलं आणि स्वतः ते काम करायला बसला. यावर ती स्त्री नाराज झाली व त्यातून मला जमत नाही हे लपवायला आणि "हा कोण मला शिकवणारा" या भावनेने त्या मुलीने तक्रार केली की याने मला नको तिथे स्पर्श केला. मग बाकी सगळं राहिलं बाजूला आणि सगळे त्या पुरुषाच्या मागे लागतील. माझ्या वरच्या एका प्रतिसादात मी सर्वजीतची केस सांगितली आहे. तो काय आज एका मुलीला छेडू म्हणून घराबाहेर पडला असेल का? थोडक्यात सांगायचा उद्देश काय तर परिस्थिती तशी तयार होत जाते आणि मग प्रतिक्रिया म्हणून आपण काही तरी कृती करतो जी समोरच्याला काही कारणाने ऑफेन्सिव्ह वाटू शकते. इंटेन्शन काय आहे हे महत्वाचं. माझा एक म्यानेजर होता तो मुद्दामून मुलींना हात लावायचा, डेस्कवर अगदी चिकटून उभं राहायचा. त्याचा उद्देश उघड होता. मुख्य मुद्दा म्हणजे नृत्यदिग्दर्शक असताना नानाला तिला नाच शिकवायची काय गरज? कारण एकच "मी शहाणा" माई तुम्ही मी टाकलेला व्हिडीओ नीट बघितला का? ही बातमी पण वाचा. नृत्य दिग्दर्शकाने पण तिला बरेच वेळा स्टेप्स दाखवल्या. त्यात तिने Sexual Harassment सारखा गंभीर आरोप लावला आहे. समजा असं समजू की नाना सेट वर गेला आणि तिचा हात धरून तिला नाच शिकवू लागला. हे एकवेळ अशिष्ट वर्तन म्हणता येईल. नानाने काही अश्लील चाळे केले किंवा अश्लील बोलला असं काही दिसत नाही किंवा तनुश्री सुद्धा तसं काही म्हणत नाहीये. इथे मी शहाणा चा प्रश्नच येत नाहीये कारण नृत्य दिग्दर्शक, सिनेमा दिग्दर्शक आणि इतर सहाय्यकांनी पण तिला स्टेप्स दाखवायचा तसेच चेहऱ्यावर हावभाव आणावे म्हणून प्रयत्न केला. मी कोणाची बाजू घेतोय असं नाही पण प्रश्न हा आहे की १० वर्षांपूर्वीची गोष्ट सिद्ध कशी करणार? सहकलाकाराचा हात धरून नाचणे हा #मीटू इतका गंभीर गुन्हा कधीपासून झाला? तिने जरी १० वर्षांपूर्वी पण तक्रार केली होती तरी त्यातून काही सिद्ध झालं होतं का? त्याहून महत्वाचा प्रश्न म्हणजे तक्रार केली म्हणजे समोरचा दोषीच असणार हा दृष्टिकोन का? तुम्ही एखादा व्यवसाय स्वीकारता तेव्हा त्यातील लिखित व अलिखित नियम तुम्हाला माहित पाहिजेत. सिनेमा क्षेत्रात असूनही अंगप्रदर्शन करणार नाही किंवा उत्तेजक दृश्य करणार नाही असे सांगून निभावणाऱ्या पण नट्या आहेतच.

तनुश्री आणि नाना, दोघांपैकी कुणीच बोलत असल्याचं खोटं वाटत मला. (नानाच्या अभिनयाबद्दल तनुश्रीने उद्गार थोडे बाजुला ठेऊया) अवांतरः "मीपण" चे लोण माननीय मोदिजींपर्यंत कधि पोचतेय याची वाट बघतोय.

In reply to by अर्धवटराव

मानसी सोनी ह्या नावाने आंतर्जालावर शोध घेतलात तर बरेच काही सापडेल. अमितभाई शहा जिच्यावर पाळत ठेऊन होते ती हीच तरूणी. तू-नळीवर अमित शहा व तत्कालिन गुप्तचर अधिकारी जी.एल.सिण्घल ह्यांचे संभाषण उपलब्ध आहे.

In reply to by अर्धवटराव

तनुश्रीची अर्णव गोस्वामीला दिलेली अलिकडची मुलाखत , आणि नाना पाटेकरांची २००८ मधली पत्रकार परिषद दोघेही खरेच बोलत आहेत असे गृहीत धरुन दोन दोनदा पुन्हा पहा काय झाले असेल याचा अदमास येण्यास मदत व्हावी असे वाटते.

In reply to by अर्धवटराव

पण वाक्यरचनेकडे थोडं लक्ष्य द्या अर्धवटराव. मिपाकर उदार मनाने अर्थ समजुन घेतात हे त्यांचं मोठेपण.

ज्यांनी फिल्लम लाईन फार जवळून बघीतली आहे, त्यांनीच लिहिलेला खालील लेख, फिल्लम लाईन बद्दल बरेच काही सांगून जाईल. https://www.loksatta.com/yeh-hai-mumbai-meri-jaan-news/article-about-ye…

In reply to by मुक्त विहारि

"पण कपूर चांगले आहेत" हे वाक्य वाचले व लेख वाचयचा थांबवला. राज कपूर्/शम्मी कपूर/आपले राजा गोसावी! सध्या हिरो असते तर 'मी टू' मध्ये त्यांच्याविरुद्ध डझनावारी तक्रारी आल्या असत्या.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माईसाहेब तुमच्या काळात हि या गोश्टी घडत होत्या. ओझरते उल्लेख त्या काळच्या साहित्यात दिसतात म्हणे

In reply to by प्रकाश घाटपांडे

चित्रपटान्,नाटकात काम करयची ईच्छा आहे असे कोणी घरात साण्गितले की घरातले लोक बदडून काढायचे.. ह्याचे कारण हेच.

विश्वामित्रांची संख्या वाढतच चालली आहे. त्यातल्या काहींनी तर माफीसुद्धा मागितली. यातल्या कुणाकुणाला क्लीन चीट देणार आता इथले काही आयडी? तनुश्री दत्ताने सुरुवात केल्यामुळे निदान बर्‍याचजणी पुढे तरी आल्या आहेत. सिनेमा क्षेत्रात हे होणं अनपेक्षित नसले तरी बर्‍याच बातम्या धक्कादायक आहेत. आलोक नाथ आणि विकास बहलबद्दलच्या तर बातम्या वाचून त्या प्रसंगांतून जाणार्‍या स्त्रियांची मानसिक स्थिती काय असेल याचा विचार केला तरी अंगावर काटा येतो! आणि सगळ्याच जणी आताच, खूप वर्षांनंतर हे आरोप करत आहेत असंही नाहीये. अगदी सोशल मिडिया नसेल वापरलं तरी निदान काहींनी कुणाकडे तक्रार केलीच होती, पण त्याची दखल घेतली गेली नाही किंवा त्यांना गप्प राहण्याचा सल्ला दिला गेला. "स्वतःच्या फायद्या साठी काही जणी पुरुषांना मोहात पाडण्याचा प्रयत्न करतात , आणि समस्त स्त्री वर्ग बदनाम होतो .", " देव आणि ऋषींना तो मोह सोडता आला नाही तिथे नाना काय करणार ?" असला डिफेन्स बघून तर काय बोलावे हेच कळत नाही! बायका गप्प राहिल्या तर "इतकी वर्षे गप्प का होत्या?" , आणि बोलल्या तर "आता कायदा त्यांच्या बाजूने आहे, बिचार्‍या पुरुषांनी काय करायचे?" असे प्रश्न! तसे तर विकास बहल बद्दल बॉलिवूडमध्ये सगळ्यांनाच माहीत होतं म्हणे, तरी आता या बायका बोलल्यावर इम्रान खान आणि अर्जुन कपूर पुढे आलेतच ना ते कबूल करायला. मुळात सेक्शुअल हॅरॅसमेंटकडे लोक "स्त्री विरुद्ध पुरुष" या अँगलमधूनच बघायचे टाळले तरी बरे होईल. बाकी ते "बॉलीवूड विरुद्ध मराठी चित्रपट सृष्टी" तर कैच्याकैच आहे!

In reply to by रुपी

'सिनेमा क्षेत्रात हे होणं अनपेक्षित नसले तरी ...' हे उपरोक्त प्रतिसादातील वाक्य. आणि मिपा आयडी सामान्य नागरिक यांच्या प्रतिसादातील क्रमांक २ चे वाक्य दोन्ही चित्रपट सृष्टीबद्दल पुर्वग्रह दर्शवत नाहीत का ? मिडियातील वृत्तांच्या प्रभावाने तात्कालिककाळाची उबळ व्यक्त करणे ठिक आहे. पण एकुण सामाजिक संस्कृतीत जे असते तेच कमी अधिक प्रमाणात सर्वच क्षेत्रात असणार नाही का ? मुळात सेक्शुअल हॅरॅसमेंटकडे लोक "स्त्री विरुद्ध पुरुष" या अँगलमधूनच बघायचे टाळले तरी बरे होईल. याच्याशी सहमत. निवड स्वातंत्र्य आणि कंसेंट या बाबत स्त्रीयांच्याही कल्पना अद्यापी पुरेश्या क्लिअर नसतात, कायद्यांचे बारकावे आणि न्यायव्यवस्थे विषयक अज्ञान आणि अनास्था आहे. त्याच वेळी वाढत्या संधींसोबत प्रत्येक क्षेत्रात पुरुषांसोबत काम करण्यास मिळत आहे. निवड स्वातंत्र्य आणि कंसेंट कायदे याचा अवेरनेसचा अभाव सोबत सामाजिक संस्कार कमी पडलेल्या मुल्ये पायदळी तुडवणार्‍यांशी पाला पडणे याचा रिझल्ट अंशतः असा नकारात्मक वृत्तांनी वेगवेगळ्या क्षेत्रातून पुढे येत राहील. याचा अर्थ सर्वच लोक सर्वच क्षेत्रे वाईट आहेत असा नसावा. चित्रपट सृष्टीतील अनेक परिवारातील दुसर्‍या पिढीतील स्त्रिया चित्रपट सृष्टीत काम करतच आहेत म्हणजे सगळेच काही परफेक्ट नसले तरी सगळेच वाईटही नसावे. सध्याच्या बातम्यांच्या लगोलग फिल्म फेडरेशनने स्त्री कलाकार सुरक्षेच्या दृस्।तीने काही महत्वपूर्ण पाऊलांची घोषणाही केली आहे.
विश्वामित्रांची संख्या वाढतच चालली आहे. त्यातल्या काहींनी तर माफीसुद्धा मागितली. यातल्या कुणाकुणाला क्लीन चीट देणार आता इथले काही आयडी?
विश्वामित्रांची संख्या जी असावयाची तिच असते, ते आता बातम्यात आले आहेत एवढेच. आरोपांची खरी निश्चिती आणि खर्‍या क्लिन चिट या केवळ न्यायसंस्थे कडून येत असाव्यात. प्रबोधनाच्या दृष्टीने तात्कालीक उत्साह ठिक पण व्यक्तिचरीत्रांच्या लिंचींग साठी मिडिया सोशलमिडीयाचा उपयोग आदर्शवतच असेल असेही नसावे.
.."इतकी वर्षे गप्प का होत्या?" , आणि बोलल्या तर "आता कायदा त्यांच्या बाजूने आहे, बिचार्‍या पुरुषांनी काय करायचे?"
हे दोन्ही प्रश्नांचे स्वरुप स्वतंत्र, एकमेकांची पालुपदे नसणारे असू शकावे. ज्या पिडीतांच्या उपयोगासाठी कायदे असतात त्यांना त्याचे ज्ञान आणि आस्थाही नसते, आणि कायद्याम्चा गैरफायदा घेणारे गैर फायदा घेऊन मोकळे होतात तेव्हा आता कायदा त्यांच्या बाजूने आहे, बिचार्‍या पुरुषांनी काय करायचे?" अशा प्रकारची भावना आणि दुसर्‍या दिशेची अनास्था (कि तिरस्कार?) रुजण्याचा धोका असतो. "इतकी वर्षे गप्प का होत्या?" हा प्रश्न पूर्णतः वाजवी नसला तरी, एक पिडितांच्या स्वतःच्याच न्याय्य आधिकारासाठी कमी महत्वाचा नाही. दुसरे पिडितांचे कायदे विषयक स्वतःचे अज्ञान आणि न्यायसंस्थे विषयक अनास्था याचे निदर्शक आहे. बर्‍याच केसेस मध्ये पिडितांचा परिवारातील संवादाचा ते मानसशास्त्रीय समुपदेशनाचा ते सामाजिक जागृतीचा अभावाचे निदर्शक ही असावे. http://indiankanoon.org सारखे संस्थळावरील कोर्ट केसेस चे निकाल शोधले तर एकीकडे अशिक्षीत स्त्रीया कायदा आणि न्याय व्यवस्थेचा लाभ घेताना दिसतात तर दुसरीकडे इन्व्हेटीगेटीव्ह जर्नलीझम , स्टिंग ऑपरेशन हि ज्यांची जबाबदारी त्या स्त्री पत्रकार मुकपणे सहन करताना दिसतात. असे का होत असावे ? एन.डि. तिवारी विरुद्ध स्टिंग ऑपरेशन करुन राज्यपालपाअवरुन घालवता येते. एम.जे. अकबर विरुद्ध एकही स्टिंग ऑपरेशन का नाही झाले ? तो चक्क हॉटेल रुमचे दरवाजे सत्ताड उघडे ठेऊन .. कमाल आहे. एक जर्नलीस्ट गप्प राहीली त्या नंतर दुसरी त्या नंतर तिसरी आता पर्यंतचा मीटू आकडा डझनच्या वरुन गेला आहे म्हणे. पहिल्यातल्याच काही गप्प राहील्या नसत्या स्टींग ऑपरेशन केले असते तर नंतरच्या सुटल्या नसत्या का ? गप्प रहाण्या मागील अडचणी अंशतः समजता येतात , गप्प रहाण्याचे पूर्ण समर्थन अनाकलनीय ठरत नाही ना ? एम.जे. अकबर प्रकरणातील कंसेंट , व्यावसायिक अनैतिकता आणि कायदेशीर काय बे कायदेशीर काय ह्यातील बारकावे समजून घेण्याची गरज असावी. आली ना बातमीत नावे तर सर्व काही सारखेच या भूमिकेने या सोशल मिडिया चर्चांचा कायदे विषयक बारकाव्यां बद्दल जागरुकतेत काय मदत होणार . केवळ नव्या दुसर्‍या गंभीर बातमीने मिडिया भरुन जात नाही तो पर्यंतचेच मीटू मीटू आणि त्या नंतर काय पहिले पाढे पंचाव्वन्न ?

http://www.kractivist.org/tanushree-duttas-fir-against-nana-patekar-wha… गाण्या मध्ये नसतानाही नानाची घुसखोरी , ४ थ्या दिवशी गाण्यात बदल. तनुश्री ची exit . तिला दिली धमकी . हे आज लोकसत्ता मध्ये पण आले आहे. पण त्याची लिंक मिळत नाही. कि गायब करण्यात आली , माहित नाही. मिळाली तर देईन . Tanushree says the film shoot began on March 23 and Nana Patekar stayed on the sets during a song shooting even though his part was long over. The alleged harassment took place on the fourth day of the shoot on March 26, she says. “In between the shots, there were around 100 supporting staff including junior artists, dancers and others and Nana Patekar, against my will and consent, started grabbing me by the arms and pushing me around on the pretext of teaching me how to dance, even though he is not the choreographer… he was touching (me) indecently and unnecessary in front of everybody, but nobody objected and all were complicit in this behavior by being silent spectators,” she alleges. Nana Patekar allegedly told the choreographer and other artists to back away so he could teach her steps. नाना डान्स एक्स्पर्ट कधी झाला ? रावडी / कोंबडी डान्स वेगळा. हे सेक्सी आयटम सॉन्ग वेगळं. कि नाना मोठा नट म्हणुन त्याला सगळं येतं असं समजून माफ ? In 2008, Tanushree’s father Tapan Kumar Dutta had filed an FIR when she allegedly underwent the ordeal and her car was attacked while exiting the sets of ‘Horn Ok Pleasss

https://www.thenewsminute.com/article/everyone-knew-said-nothing-tanush… Tanushree alleged that Nana Patekar got the makers to add an "intimate step" in what would have been her solo song in 'Horn Ok Pleassss', just so he could touch her. “He had no business being on set, it was my solo sequence. But there he was… pulling me my arms, teaching me the dance,” “His antics started from day one. I complained to director and producer that I was facing a lot of problems because of him and they should tell him to stay away from me. He had no business being on set, it was my solo sequence. But there he was… pulling me with my arms, teaching me the dance,” Then Nana Patekar wanted an “intimate step” to be added to the song Tanushree refused to do the "intimate step" with Nana Patekar. Her parents came on set to pick her up. "My father told them, let's shoot with a calm mind tomorrow, go and think over the solution in the night. My daughter will not do an intimate step with this man (Nana Patekar)

https://www.facebook.com/janice.sequeira.9/posts/10156557889786000 I got hold of #NanaPatekar to get a sense of what was happening. All he said was, “Meri beti jaisi hai, mere beti jays hai”, which didn’t really make sense at that point. Eventually, Tanushree’s parents arrived to pick her up. Her car was attacked, the windshield broken. I tried to get in touch with Tanushree to get her version of events. Around midnight, she asked me to come to her place. In tears, she narrated what happened.

गांधी घराण्याला रिटायर करुन तनुश्रीला काँग्रेसचे आध्यक्ष आणि काँग्रेसची पंतप्रधानपदाची उमेदवार बनवता आले तर बर होईल. कमीत कमी भारतीय लोकशाही वंशपरंपरागतेतून बाहेर पडण्यास मदत होईल आणि काँग्रेसी राजकारणाला जरा नवा चेहरा मिळेल.

In reply to by माहितगार

हे काय आता नविन? नाना मराठी आहे, शेतकर्याना मदत करतो वगैरे सगळे मान्य. पण येथे नाना चुकलाच .. वेड पांघरून पुरावे द्या, कन्सेट वगैरे कशाला ते? ती तनुश्री देशपांडे असती व तो नाना खान किंवा नाना कपूर असता तर हीच भूमिका घेतली असती का?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

...कन्सेट वगैरे कशाला ते?...
याचे उत्तर कुणि तनुश्री समर्थक महिला सांगू शकेल का ?
....ती तनुश्री देशपांडे असती व तो नाना खान किंवा नाना कपूर असता तर हीच भूमिका घेतली असती का?...
माई, काही मुलींची स्थिती या मुळे अवघड असते की आया भयंकर जावई शोध लावतात. :) (ह. घ्या.) तनुश्री देशपांडे असती व तो नाना खान जोडी साठी आमचे विश्लेषण तसेच राहील बदलणार नाही. आजच या धाग्यात अस्मादिकांनी हिंदूत्व वाद्यांवर टिका केली आहे . प्रश्न एकतर्फी चष्मे लावणार्‍यांचा आहे. तनुश्री खान असली काय देशपांडे असली काय किंवा अजून कुणा जाती धर्माची, तनुश्री गांधी घराण्याला रिटायर करुन तनुश्रीला काँग्रेसचे आध्यक्ष आणि काँग्रेसची पंतप्रधानपदाची उमेदवार झाली पाहिजे यावर सकारात्मक समर्थक भूमिका घेऊन दाखवा. विषय बदलू नका. :)

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

आणि ते पुराव्यांचे राहीलेच की, गांधी घराण्याच्या वंशवादाच्या ग्रहणातून भारतीय लोकशाही मुक्त होणार असेल तर आपण म्हणता तसे तनुश्रीला अगदी खान करुन, काँग्रेस अध्यक्ष व पंतप्रधानापदाचे उमेदवार करुन नाना पाटेकरांसोबत न्यायालयीन निकाल आणि पुराव्यांशिवाय समस्त वंशपरंपरागत राजकीय घराण्यांची जेलभरो करण्यास आमची ना नाही. नाना पाटेकरांनीही वंशवादातून भारतीय लोकशाही मुक्त होण्यासाठी त्याग अवश्य करावा. अजून एक महत्वाचे आम्ही हिंदी-मराठी चित्रपट रसिक अथवा नानांचे फ्यानपण नाही हे आपल्या सामान्यज्ञानाच्या मदतीसाठी.

You tube वर तनुश्री च्या fir च्या कॉपी उपलब्ध आहेत . त्यात ते मीडिया चॅनेल , कॅमेऱ्याची मोडतोड चां उल्लेख आहे असं कळलं . या वादाची सुरवात करताना दोन दिवस मनसे च्या नावाने बोंबलत होती मग तनुश्री ने आता पुन्हा नाना च्या विरोधात तक्रार दिली पण मनसे च्या विरोधात का नाही दिली ? एक नक्की आहे आता जर कलर्स ने तिला बिगबॉस मध्ये घेतलं तर बिगबॉस चा सेट तुटणार आणि #me too चा विश्वास उडणार .

In reply to by ट्रम्प

बीग बॉस बहुतेक मागे पडलय पण गूगल ट्रेंड्स चेक केले तर तनुश्री दत्तांची गुगल शोध प्रीयता या महिन्यात भारतात राहुल गांधीपेक्षा वाढली आहे म्हणून मी तनुश्रीला नेहरु-गांधी घराण्याला रिटायर करायला जमेल म्हणालो. सोबतच आमेरीकेत सुद्धा तिची शोधप्रीयता वाढताना दिसते आहे. आमेरीकेत तिला कुणि ओळखत नव्हते पहाता पहाता आमेरीकेत तिची गिगल शोध प्रियता प्रियांका चोप्रा सोबत मॅच करु लागली आहे. तिला या विवादातील प्रसिद्धीने आमेरीकेतच काम मिळण्याच्या संधी वाढण्याची शक्यता दिसते. भारताच्या वाट्याला नोबेल सुद्धा येऊ शकते तेव्हा तिला राहुल गांधींची जागा घेऊ द्यावे आणि भारताला या निमीत्ताने एखादे नोबेल मिळू द्यावे असे वाटते. तेवढेच परकीय चलन भारताला या निमीत्ताने लाभले तर हरकत नसावी.

आता तर असं वाटतय कि बॉलीवुड (किंवा कुठलंही प्रसिद्धी विश्व म्हणुया) एका ठिणगेचीच वाट बघत होतं. रोज नवीन बातम्या येताहेत राव. यातुन काहितरी चांगलं घडावं हिच अपेक्षा. नाहितर याचाही 'आप' व्हायचा.

In reply to by अर्धवटराव

मला चित्रपट सृष्टीतील नावे नीटशी माहित नाहीत, पण उदाहरनार्थ एक बातमी विकास बहल नामक व्यक्तिच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीने विकास बहल यांची बाजू घेऊन स्टेटमेंट दिलेले दिसते त्यात त्या , विकास बहल जर चांगली व्यक्ती नाही तर त्याच्या सोबत फ्रेंडली संवाद नाचाचे कार्यक्रम इत्यादी कसे चालू रहाते ? असे ९ एक प्रश्न विचारताना दिसतात. र्‍हितीक रोशनच्या बाबतीतही पूर्व पत्नीने त्याची बाजू घेतली होती असे आठवते. अशा पद्धतीने काही फसव्या केसेस जरी पुढे आल्यातर सर्व गाजावाजाची क्रेडीबिलीटी संपुष्टात यावयास लागते. संस्थात्मक पातळीवर फिल्म फेडरेशन, एडीटर्स गिल्ड आणि मनेका गांधीचे खाते काही महत्वपुर्व पाऊले उचलताना दिसते. अशा सकारात्म्क बाबीही होतील नाही असे नाही.

मोठी स्टार मंडळी आरोपी कलाकार, दिग्दर्शकांसोबत काम न करण्याचा निर्णाय घेताहेत. हे लोक्स आपल्या सहयोग्यांच्या कृष्णकृत्याबद्दल अनभिज्ञ खचीतच नसतील आतापर्यंत. आगोदरच अशा कलंकीत मंडळींसोबत काम न करण्याचं धाडस दाखवलं नाहि यांनी. आता मिडीया ट्रायलला प्रतिसाद देत आपापली कामं थांबवताहेत. नॉन्सेन्स.

In reply to by अर्धवटराव

......अनभिज्ञ खचीतच नसतील आतापर्यंत. असेही असू शकेल. कदाचित, "मी मारल्यासारखे करतो, तू रडल्या सारखे कर." असे पण असू शकेल.

https://www.loksatta.com/manoranjan-news/pune-artists-come-together-to-… आता नाना पाटेकर यांना पुण्यातील कलाकारांनी पाठिंबा दर्शविला आहे. अभिनेत्री तनुश्री दत्ताने केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी नानांवर आरोप केले. जर खरंच त्यांच्यावर अन्याय झाला होता तर त्यांनी सर्वप्रथम पोलिसांत तक्रार दाखल करायला हवी होती. त्यांनी न्याय देवतेकडे न्याय मागायला हवा होता. तसं न करता त्यांनी थेट प्रसारमाध्यमांकडे आपली भूमिका मांडली. म्हणून त्यांनी केलेले आरोप संशयास्पद आहेत,’ असं मत या कलाकारांनी व्यक्त केली. यावेळी निर्माते-दिग्दर्शक शरद गोरे, दिग्दर्शक जितेंद्र वाईकर, अभिनेते प्रकाश धिंडले, मारुती चव्हाण, अभिनेत्री माधवी गोडांबे, वनिता सोनवणे, मयुरी भालेराव, रमाकांत सुतार, पंकज भालेराव, महेश शिंदे, कुणाल निंबाळकर, मयुर जोशी, मंगेश घोडके आदी कलाकार उपस्थित होते. यावेळी कलाकारांनी नानाच्या समर्थनात घोषणादेखील दिल्या. स्वतःला विकत विकत या इतक्या खालच्या थरावर उतरतात ??

In reply to by अभिजित - १

....स्वतःला विकत विकत या इतक्या खालच्या थरावर उतरतात ??...
खालच्या थराला कोण उतरले होते हे कदाचित काळच सांगू शकेल, पण न्यायालयीन प्रक्रीयेसाठी ज्यांना धीर नाही त्यांची वेळच बरेच काही सांगून जाते. काळ आणि वेळेत जरासे अंतर असते ते असे.

द वायर नावाच्या डाव्याकडे झुकलेल्या न्युज मिडीया कंपनीत काम करणार्या श्री विनोद दुआ हे काम करत आहेत. ते जन गण मन की बात ह्या नावाने दर रोज आपला व्हीडीयो युट्युब वर उपलब्ध करून देत असतात. युपिएच्या काळात पद्मश्री अवॉर्ड मिळालेले विनोद दुआ हे भारतातले एक सिनियर प्रेस रीपोर्टर आहेत. जन गण मन की बात ह्या त्यांच्या प्रोग्राम मध्ये सध्याच्या सरकारवर खुपच टोकदार टीका करत असतात. कधी कधी त्यांचा तोल सुद्धा जातो. भारतात तनुश्री दत्ता ह्यांनी सुरु केलेल्या प्रकरणानंतर मी टू ट्रेंड सुरु झाला त्यावर गेल्या आठवड्यात श्री विनोद दुआ ह्यांनी एक कार्यक्रम केलेला होता. ह्या कार्यक्रमात श्री विनोद दुआ ह्यांनी बॉलीवुडच्या श्रेष्ठ कलाकारांना दोष दिला, श्री अमिताभ बच्चन यांच नाव न घेता श्री विनोद दुआ पुढे अस म्हणाले की बॉलीवुडच्या एका श्रेष्ठ कलाका र जो आम्हाला स्वच्छतेचे धडे देत असतो त्याने सुद्धा मि टू वर स्टँड घेतला नाही. अश्या प्रकारे सर्वांवर तोंड सुख घेणार्या श्री विनोद दुआ ह्यांनाच आता तोंडघशी पडाव लागलेल आहे. श्री विनोद दुआ ह्यांच्यावर श्रीमती निशीता जैन नावाच्या एका फिल्म मेकरनी सेक्शुअल अ‍ॅसॉल्टचा आरोप लावला आहे. २९ - ३० वर्षांपुर्वी श्री विनोद दुआ ह्यांनी हे चाळे केले होते. श्री विनोद दुआ ह्यां च्या सुपुत्री मलिक्क दुआ ह्यांनी म्हण्टल आहे जर वडीलांवरचे आरोप खरे असतील तर ते अस्विकार्ह, दु खःदायक व खुप क्लेशदायक असेल. ह्या प्रकरणानंतर मात्र जन गण मन की बात ह्या व्हिडीयोखालील लोकांच्या प्रतिक्रीया खुपच बोलक्या होत्या. काही लोकांनी विचारलच की आता मिटु # विनोद दुआ हा प्रोग्राम कधी करणार ? ईतके दिवस प्रधान सेवक, भाजपाच्या सरकार विरुद्ध गरळ ओकणार्या ह्या पत्रकाराने मी टु ट्रेंडवर ही खुप साळसुदपणे प्रोग्राम केलेला होता. जेंव्हा ह्याच पितळ उघड पडल तेंव्हा त्याचा खरा चेहरा लोकांच्या समोर आला.

आता या केस मध्ये काँग्रेसच्या एन. एस. यु. आय. प्रमुखाचा राजीनामा घेण्यासाठी राहुल गांधींनाही जवळपास चार महिने लागले दिसताहेत. संदर्भ १ संदर्भ २ (बहुधा मी टू चळवळीची आणि एम.जे अकबरांच्या राजीनाम्याची काँग्रेस वाट पहात असणार ) आणि काँग्रेस आय टी सेल मधील तक्रारीकडे खरे तर राहुल गांधींनी पाठच फिरवलेली दिसते (संदर्भ १ संदर्भ २ ) आता राहुल गांधी स्वतःचा राजीनामा कधी देतात हे बघायचे. एकदा पुरावे मागायचे नाही ठरवल्यावर काही काँग्रेस वरीष्ठ कटात सामील होते असे खोटे खोटे गृहीत धरुन त्यांच्यावर आरोप करायला काय हरकत आहे का ? पोलीसी आणि न्यायालयीन करवाई न करता अर्बन नक्षलीझम आणि देशद्रोहाचे आरोप करण्यासही अधिक मोकळीक देण्यास हरकत नाही. न्यायालयाकडे न जाता आरोपबाजीची अनिर्बम्ध चिखलफेक केल्याने विंगेत उभे टाकून तमाशा पहाणार्‍यांचे काहीच जात नाही, तेवढाच औटघटकेचा विरंगुळा असतो.

In reply to by माहितगार

आपला दुसर्या ओळीतील दुसरा संदर्भ गंडलेला दिसतो. तो केरळ आणि तामिळनाडू मधेय वादळाची सूचना देणारा आहे.

In reply to by सुबोध खरे

टाईम्स नाऊ ची वेबसाईट मध्ये काही समस्या असावी असे वाटते. हि गूगलची कॅच्ड व्हर्शन बरोबर दिसते का पाहुया. याची टाईम्स नाऊ वरील परमेनंट प्रॉपर लिंक मिळवून देण्यात कुणि सहकार्य केल्यास आभारी असेन.

मिडिया मध्ये सेक्स्च्युअल हरॅसमेंट कोर्ट केसेसची चर्चा करताना पाळावयाच्या पथ्यांचीची सुचवणी एका दिल्ली न्यायालयाने दिली होती त्यानुसार जो अ‍ॅक्युज्ड आहे
media has to play a very balanced role.... all reportage on the matter should carry his or his representative's views as well. "In the event if such views or comments are not given by them, then a statement as to the fact that an effort was made to ascertain their views should also be made in the news, articles or programmes, as the case may be," .... mention in their reports that "the matter is still sub-judice or is still pending in the court or a final decision in the case is still awaited". संदर्भ
उत्तरदायीत्वास नकार लागू

एकदाचे एम. जे अकबरांनी राजीनामा दिल्याचे कन्फर्मड वृत्त आल्याचे दिसते. ( खरेतर कोर्टात टिकणे जरासे अवघड -अशक्य नव्हे- असलेल्या नाना पाटेकरांबद्दलच्या केसची मिडियात चर्चा अधिक झाली तीही त्या केसच्या बारकाव्यांकडे दुर्लक्ष करुन ) प्रत्येक प्रकरण कायद्याच्या दृष्टीने तसे वेगळे असते. त्यातील बारकावेही वेग वेगळे असतात. कायदे विषयक बारकाव्यां बद्दल माहिती करुन घेण्या बाबत अनास्था स्त्रीयांच्या मुख्य उद्दीष्टांना कितपत उपकारक असेल या बद्दल साशंकता वाटते. एम. जे . अकबरां च्या केस बाबतही आकांड तांडव होत आहे आणि कदाचित बारकाव्यांकडे दुर्लक्ष. मी टू च्या वावटळीत एम जे. अकबरांवर एका पाठोपाठ डझनभर तरी स्त्री पत्रकारांनी आरोप केले. दोन स्त्री पत्रकारांनी त्यांच्या सोबतचा अनुभव चांगला राहील्याचेही मिडियातून नोंदवले. ज्यांनी आरोप केले त्यातील मुख्य पॅटर्न एम. जे अकबर विवीध कारणे देऊन फ्रेश तरुण स्त्री पत्रकारांना त्यांच्या हॉटेल मधील रुमवर बोलावत आणि सजेस्टीव्ह बिहेवीअर दाखवत, आणि अगदी थोड्याशा केसेस मध्ये त्यांनी प्रत्यक्ष स्पर्ष केल्याचा दावाही आहे. आणि अर्थात एम. जे अकबरांनी हे सर्व आरोप नाकारलेच नाहीत तर बदनामीचा खटला आरोपकर्त्या पत्रकारांवर भरुन प्रकरण आता न्यायप्रविष्ठ आहे. यातील प्रत्यक्ष स्पर्ष केलेले आरोप अधिक गंभिर धरले जातील यात नवल नाही. हॉटेल मधील रुमवर बोलावून इंटरेस्ट दाखवणे - ते वरीष्ठ आधिकारी पत्रकार असल्यामुळे पदाचा अनैतिक वापराचा आक्षेप रहातच होता - अलिकडील स्त्री विषयक कायदे विषयक बदलांनी त्यास कदाचित कायदेशीर धारही दिली असेल. पण समजा एम. जे अकबर वरिष्ठ आधिकारी नाहीत केवळ ओळखतात त्यांनी कुणाला आमंत्रित करणे आणि इंटरेस्ट दाखवणे आणि नकार आल्यास पुढे कायदा न मोडणे याची दक्षता ज्या केसेस मध्ये घेतली असेल तिथे आमंत्रित करुन आणि इंटरेस्ट दाखवणे सध्याच्या कायद्यांमध्ये आणि भारतीय मानसाला पटण्याची शक्यता कमी राहीली तरी त्यातील काही प्रकरणे एम. जे . अकबरांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यात मोडू शकतात. उदाहरणार्थ एम. जे. अकबरांवर झालेल्या पहिल्या आरोपातच पत्रकार म्हणते एम. जे अकबरांनी ड्रिंक ऑफर केले आणि नंतर जवळ बसण्या बद्दल सुचवले पण स्त्री पत्रकाराने त्यांच्या सुचवणीस नकार देऊन निघून गेली , एम. जे. अकबरांनी स्वतः काहीच केले नाही हे ती स्त्री पत्रकार स्वतःच कबूल करते. बॉस म्हणून कामावर असताना कामा करता बोलावलेल्या व्यक्तीस ड्रिंक ऑफर करणे आणि जवळ बसण्यास सुचवणे नैतिकता साशंकीत असलेले असेल. कायद्यातील नव्या बदलांनुसार कदाचित कायद्याचे उल्लंघनही पण समजा ती पत्रकार कामा व्यतरीक्त सर्वसाधारण आमंत्रणाने गेस्ट म्हणून गेली आणि मग ड्रिंक ऑफर करणे आणि जवळ बसण्यास सुचवणे हे एम जे अकबरांच्या अभिव्यक्ती स्वांतंत्र्याच्या कक्षेत येऊ शकते का ? हे एम जे. अकबरांचे समर्थन नव्हे ह्या बाबत आणि अशा डझनभर केसेस पैकी ज्या ज्या कोर्टात उभ्या रहातील त्या बाबत नेमक्या बारकाव्यांवर न्यायालयीन निकाल येत्या काही वर्षात येतील आणि कायद्यांच्या परिघास अधिक निश्चित रुप मिळण्यास मदत होईल असे वाटते. अन्यायाला वाचा फोडण्यात इतर स्त्रीयांना वेळ लागणे समजण्यासारखे असू शकते पण अन्यायाला वाचा फोडण्याची उर्वरीत समाजाला मार्गदर्शन आणि दिशा देण्याची जेवढी जबाबदारी पुरुष पत्रकारांची असते तेवढीच स्त्री पत्रकारांची असते. आणि इथे स्त्री पत्रकार एखाद दुसरी नाही तर डझनांनी कमी पडल्याचे जे चित्र उघड झाले ते अचंबित करणारे आहे. अन्याय झाला असेल तर त्याचे डॉक्युमेंटेशन करणे, स्टिंग ऑपरेशन्स करणे, आपापसात कायदे विषयक माहिती प्रसृत करणे व्यवस्थापनांना वर पर्यंत कल्पना देऊन सातत्याने पाठ पुरावा करणे यात या स्त्री पत्रकार कमी पडल्याका आणि का ? हा त्यांच्या वरील अन्याया बाबत सहानुभूती ठेऊनही प्रश्न उरताना दिसतो. या स्त्री पत्रकार म्हणतात तसे एम जे अकबर प्रकरण काही दशके चालले असेल तर चुप्पी साधून दुर्लक्ष करुन त्यांनी पुढच्या नवोदीत स्त्री पत्रकारांवर अन्याय होऊ दिला असे म्हणावयाचे का ? त्यांच्या लेखी केवळ माध्यमातील पत्रकार असलेली व्यक्ती पुढे परराष्ट्र राज्यमंत्री झाली. या महिला पत्रकार म्हणतात ते खरे असेल तर परराष्ट्र राज्यमंत्री पदावरुन राजीनामा घेणे आलेच कारण त्या पदावरुन परदेशी व्यक्तींशी गैर वर्तन झाले किंवा अशा व्यक्तीचा स्वभाव पाहून परकीय गुप्तचर संस्थांनी हनी ट्रॅप लावले तर देशासाठी किती महाग पडू शकते ? आणि हा परिणाम कशाचा तर तक्रारी वेळेवर केल्या नाहीत व्यक्ती आपल्याला नकोशा राजकीय पक्षाचे मंत्रीपद भूषवत नाही तो पर्यंत वाट पाहिली असे म्हणावयाचे का ? सांगण्याचा मुद्दा तक्रारीत तथ्य असेल तर ती उशीरा करणे देशाच्या हिताच्या दृष्टीने साशंकीत असणारे असेलच असे नाही पण साशंकीत असू ही शकते. बरे काही का असेना एकदाचा मुद्दा चव्हाट्यावर आला तेव्हा सदर व्यक्ती परदेशी डिप्लोमॅटीक दौर्‍यांवर व्यस्त होती, मायदेशी परतून सर्व दौर्‍याचा सर्व लेखा जोखा घेतल्या शिवाय राजीनामे घेणे कोणत्याही सरकारला किती अवघड असू शकते याचा राजीनाम्याची घाई करणार्‍यांपैकी कुणिही विचार केलेला दिसत नाही. त्या माणसाचा राजीनामा घेतल्या नंतर परदेशी त्या माणसाने देशासाठी जे काही सकारात्म्क दोन चार व्यक्तिगत संबंध जुळवले असतील त्यांचेही मधातच तुटणे देशासाठी हितकारक ठरते का ? वर म्हटल्या प्रमाणे परदेशी व्यक्तींशी गैर वर्तन झाले अथवा अशा व्यक्तीचा स्वभाव पाहून परकीय गुप्तचर संस्थांनी हनी ट्रॅप च्या शक्यतांपेक्षा आताही राजीनामा घेऊन न्यायालयीन चौकशी होऊन जाणे केव्हाही श्रेयस्कर पण तरीही तथ्य असलेल्या तक्रारी करण्यातील दिरंगाई करणे संबंधीत व्यक्तींवर अन्याय आहेच पण देश हिताचेही नव्हे हे कधी लक्षात घेतले जाउ शकेल का ? हि प्रश्न चिन्हे उपस्थित करतानाच एम. जे अकबरांनी हे सर्व आरोप नाकारलेच नाहीत तर बदनामीचा खटला आरोपकर्त्या पत्रकारांवर भरुन प्रकरण तुर्तास न्यायप्रविष्ठ आहे. आणि न्यायालयात आरोप सिद्ध होत नाहीत तो पर्यंत कायद्याच्या दृष्टीने व्यक्ती निर्दोष समजली जाते हे नोंदवणे अनावश्यक चारीत्र्य हनन टळण्याच्या दृष्टीने श्रेयस्कर असावे असे वाटते. उत्तरदायीत्वास नकार लागू

गूगल ट्रेंड्स : मी टू आणि नाना पाटेकर * देशभराचा मी टू विषयातला रस पाहीला तर अश्चर्य म्हणजे उर्वरीत भारता पेक्षा नॉर्थ ईस्ट मधून या विषयावर अधिक शोध घेतला जात आहे असे दिसते. * महाराष्ट्रात केवळ मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि काही प्रमाणात पिंपरी चिंचवड भागात , तर पुण्यात थोड्याश्याच प्रमाणात मीटू मुव्हमेंटला शोधप्रीयता असावी असे दिसते. उर्वरीत महाराष्ट्रात गूगल ट्रेंड्सने दखल घेण्या इतपत मी टू ची शोध प्रीयता नसावी असे दिसते. * नाना पाटेकरांची शोध प्रियता डोंबीवली आणि पुण्यात अधिक दिसते तर पिंपरी चिंचवड मधील नाना पाटेकर आणि तनुश्री दत्ता ची शोधप्रीयता फिफ्टी फिफ्टी दिसते. * अर्थात महाराष्ट्रात ओव्हर ऑल नाना पाटेकरांची शोधप्रीयता १५ सप्टेंबर पर्यंत तनुश्रीच्या १५पट होती, तनुश्रीचे नाव फारसे गिनतीतही नसावे, तोच फरक तनुश्रीची महारास्।ट्रातील शोधप्रीयता आता नाना पाटेकरांच्या अर्ध्यावर पोहोचली आहे पण यातील तनुश्री शोधप्रीयता मुंबई, नवी मुंबई, ठाणे नागपूर येथून तर काही अंशी पिंपरी चिंचवड येथून येत असावी. नाना पाटेकरांना डोंबीवली आणि पुण्यातून अधिक शोधप्रीयता लाभत आहे किंबहूना तनुश्रीच्या तुलनेत बर्‍यापैकी अधिक टिकुन आहे असे दिसते , मुंबई, नवी मुंबई, ठाणे नागपूर भागात हिंदीभाषी वावर अधिक असल्यामुळे असा फरक कदाचित समजता येईल पण पिंपरी चिंचवड वि डोंबीवली पुणे असा दृष्टीकोणात फरक का पडत असावा ? गूगल ट्रेंडचे स्क्रीन मिपावर एंबेड करण्याचे तंत्र अद्याप जमलेले नाही या बद्दल क्षमस्व

चर्चा बरीचशी वाचली. तक्रार करणाऱया सर्व स्त्रियांना पाठिंबा दिलाच पाहिजे. पुरुषांनी खोट्या तक्रारींना तोंड का द्यावं असा प्रश्न विचारणाऱयांना छळ हा प्रकार माहित नाही व तो समजून घेण्याची कुवत नाहीय. निव्वळ खोट्या तक्रारी येतील म्हणून घाबरणारे हे फारच नाजूक पुरूष म्हणायचे. खोट्या तक्रारी आधीपासून होतातच आहेत. न्यायालयात बलात्कारांच्या खटल्यांमधील जवळजवळ ४०% खोट्या तक्रारी असतात. परंतु, स्त्रियांचा छळ होतो ही गोष्टही तितकीच खरी आहे. १०० जणी खोट्या तक्रारी करत असतील तरी खरंच छळ झालेल्या एका स्त्रीला न्याय द्यायला हे सहन केलेच पाहिजे. शिवाय तक्रार केली की लगेच पुरुष आयुष्यातून उठला असं होत नाही; पण लैंगिक छळाचा मानसिक परिणाम आयुष्यभर होतो. त्यामुळे आमची सहानुभूति मीटू वाल्या बायांना.