वर्षाव अमृताचा..
कंपीत गात्र होई तू छेडिल्या सुरांनी
श्वासात खोल जाई मिसळून रातराणी
बेहोष मंद तांडे निघताच चांदण्यांचे
क्षितिजास अन पहाटे ही चंद्रिका दिवाणी
उठती अनेक हलके हलके तरंग कोठे
गंधीत रात्र होई घुमवीत धुंद गाणी
आल्हाद स्पर्श होई पात्यावरी धुक्याचा
लाजून हिरवळीचे काळीज होत पाणी
(हळुवार मंद होई हा दीप तेवणारा
वारा तशात गाई बेधुंदशी स्वराणी)
वितळून या क्षणी मी माझीच ना उरावे
उजळून जात काया, लावण्य हे नुराणी
घेई टिपून हलके हे क्षण यौवनाचे
दृष्टीस आज सांगे बघ मौन होत वाणी
हलकेच गूज सांगे ती रात्र पांगताना
बेधुंद मीलनाची अन् ठेवते निशाणी
वर्षाव अमृताचा .. मी त्यात चिंब व्हावे
लाजून चूर व्हावे , स्मरताच ही कहाणी..
- प्राजु
छान कविता
वा! क्या
सुंदर!!!
अप्रतिम
गोड!
क्रांती
मस्तच..
अल्हाद
अप्रतिम
एक
जियो !
फारच सुंदर
धन्यवाद बेला.
लाघवी
मनतरंग
बेहोष मंद
हलकेच गूज सांगे ती रात्र पांगताना
अतिशय
अत्यंत रम्य कल्पनांचा सफाईदार वापर!
कंपीत
धन्यवाद.
वैधानिक इशारा
निशब्द !!!
कविता एकदम सुंदर
अत्यंत अलवार..
खुप सुन्दर
सुंदर
केवळ
सुंदर
सुंदर...
मस्त कविता
सुंदर
धन्यवाद.