Skip to main content

चालू घडामोडी - ऑगस्ट 2018

लेखक सोमनाथ खांदवे यांनी बुधवार, 01/08/2018 06:39 या दिवशी प्रकाशित केले.
राजीव गांधींच्या काळात एन आर सी चा मसुदा ठरविण्यात आला होता , भाजप ने त्या अंतर्गत घुसखोरांचा आकडा जाहीर केला असता सगळ्या विरोधकांनी आरडा ओरड करत सभात्याग केला विशेष म्हणजे त्यात काँग्रेस सुद्धा शामिल होती , भाजप चे हे दिसून येणारे काम पण मीडिया याच कौतुक न करता त्या 40 लाख लोकांच्या वेदना छापत बसणार , या बेकायदेशीर लोकांमूळे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येते पण मीडिया ला त्याच्या शी घेणेदेणे काय ? या विषयांवर काँग्रेस ची अवस्था धरलसोडलचावतय अशी झालेली दिसते . आसाममध्ये राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा (एनआरसी) मसुदा आज जाहीर झाला आहे. या यादीनुसार आसाममध्ये २ कोटी ८९ लाख ८३ हजार ६७७ लोक कायदेशीर असून ४० लाख ७ हजार ७०७ लोकांना बेकायदा घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे आसाममध्ये घुसखोरी केलेल्या आणि नागरिकता सिद्ध करू न शकलेल्या या ४० लाख लोकांना बेघर व्हावे लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आसाममध्ये ३ कोटी २९ लाख ९१ हजार ३८४ लोकांनी वैधतेसाठी अर्ज केला होता. त्यातील ४० लाख ७ हजार ७०७ लोकांना अवैध घोषित करण्यात आले आहे. कागदपत्रांची पुर्तता करू न शकणाऱ्या आणि नागरिकता सिद्ध न करू शकणाऱ्या या ४० लाख लोकांना अवैध घोषित करण्यात आलं आहे. दरम्यान, हा मसुदा अंतिम नसून ज्यांना त्यावर आक्षेप आहे, ते लोक तक्रार करू शकतात. ज्यांचं नाव या यादीत आलं नाही ते लोक पुन्हा अर्ज करून आपलं नागरिकत्व सिद्ध करू शकतात, असं एनआरसीच्या राज्य समन्वयकाने स्पष्ट केलं. दरम्यान, एनआरसीच्या या मसुद्यावर तृणमूल काँग्रेसने संसदेत स्थगन प्रस्ताव आणण्याची मागणी केली आहे. तर आरजेडीने यावर राजकारण होत असल्याचा आरोप केला आहे.  सात जिल्ह्यात कलम १४४ लागू  हा मसुदा जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर आसाममध्ये सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सशस्त्र पोलिसांच्या २२० कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. बारपेटा, दारंग, दिमा हासौ, सोनितपूर, करीमगंज, गोलघाट, धुबरी आदी जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. 

वाचने 82991
प्रतिक्रिया 266

प्रतिक्रिया

Pakistan will be going to the IMF for the 13th time. हा पाकिस्तानी वृत्तपत्र डॉन मधील लेख केवळ पाकीस्तानच्या आर्थीक अडचणी माहित करुन घेण्यासाठी नव्हे तर आय.एम.एफची कार्य प्रणाली थोडक्यात समजून घेण्यासाठी वाचावा. श्रीमंत देशातील ४ पाकीस्तानी मित्रराष्ट्रांचा प्रभाव असतानाही पाकिस्तानची अर्थव्यवस्था कशी वापरुन घेतली जाते हे पहाण्यासाठी वाचावा. त्या शिवाय इस्लामिक राष्ट्रांना ऋण व्यवहारास धार्मिक अनुमती नसतानाही सौदी इराण पाकीस्तान ते उर्वरीत इस्लामिक राष्ट्रांचा ऋण व्यवहारातील सहभागाची दुटप्पी गंमत बघण्यासाठी वाचावा.

तामिळनाडूचे भूतपूर्व मुख्यमंत्री, करुणानिधी ह्यांचे वयाच्या ९५व्या वर्षी निधन. ईश्वर मृतात्म्यास शांती देवो.

तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रमुकचे सर्वेसर्वा एम.करुणानिधी यांनी मंगळवारी संध्याकाळी ६ वाजून १० मिनिटांनी चेन्नईच्या कावेरी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. करुणानिधी यांच्या निधनाने तामिळनाडूचे आणि देशाचे मोठे नुकसान झाले आहे. करुणानिधी हे दक्षिणेतील दिग्गज राजकीय नेत्यांपैकी एक होते. तामिळनाडूच्या राजकारणात त्यांनी स्वत:चा वेगळा ठसा उमटवला. आज करुणानिधींना आपण राजकारणी म्हणून ओळखत असलो तरी त्यांचा प्रवास चित्रपटांपासून सुरु झाला होता. तामिळनाडूच्या या लोकप्रिय नेत्याविषयी जाणून घ्या काही खास गोष्टी. - एम. करुणानिधी म्हणजेच मुत्तुवेल करुणानिधी यांचा जन्म ३ जून १९२४ रोजी तिरुकुवालाईमध्ये झाला. करुणानिधी यांनी एकूण तीन विवाह केले. त्यांच्या तीन पत्नींपैकी पद्मावती यांचे निधन झाले आहे. करुणानिधी यांना चार मुले आणि दोन मुली आहेत. पद्मावतीपासून त्यांना एमके मुथू हा मुलगा आहे. दयालुपासून त्यांना एमके अलागिरी, एमके स्टालिन, एमके तमिलरासू आणि मुलगी सेल्वी अशी चार मुले आहेत. रजतिपासून त्यांना कनिमोळी ही मुलगी आहेत. कनिमोळी राज्यसभेवर खासदार आहेत. - करुणानिधी वयाच्या १४ व्या वर्षीच राजकारणात उतरले. हिंदी-हटाओ आंदोलनामध्ये ते सहभागी झाले होते. १९३७ साली शाळांमध्ये हिंदी भाषा अनिवार्य करण्यात आली होती. दक्षिणेत या निर्णयाला मोठा विरोध झाला. करुणानिधी सुद्धा त्यामध्ये सहभागी झाले होते. लेखणीला हत्यार बनवत त्यांनी हिंदी भाषेला अनिवार्य करण्याच्या निर्णयाविरोधात जोरदार लेखन केले. हिंदी भाषेविरोधात रेल्वे ट्रॅकवर उतरुन त्यांनी आंदोलन केले. - हिंदी विरोधी आंदोलनानंतर करुणानिधी यांचे लेखन-वाचन सुरु होते. वयाच्या २० व्या वर्षी तामिळ चित्रपट कंपनी ज्यूपिटर पिक्चर्समधून त्यांनी पटकथा लेखक म्हणून आपल्या करीयरची सुरुवात केली व अनेक लोकप्रिय तामिळ चित्रपटाच्या कथा लिहिल्या. - द्रमुकच्या स्थापनेनंतर एम. करुणानिधी यांनी अण्णादुराई यांचा विश्वास संपादन केला व त्यांचे निकटवर्तीय बनले. तामिळनाडूत पक्षाचा पाया भक्कम करण्याची आणि पैसे गोळा करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. करुणानिधी यांनी ही जबाबदारी उत्तमरित्या निभावली. या दरम्यान त्यांचे तामिळ चित्रपटात लेखन सुरुच होते. समाजातील वाईट गोष्टी आणि द्रविड अस्मितेचे विषय त्यांनी चित्रपटातून मांडले. - १९५७ साली द्रमुक पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरला. त्यावेळी पक्षाचे एकूण १३ आमदार निवडून आले त्यामध्ये करुणानिधी यांचा समावेश होता. त्यानंतर द्रमुकची राज्यातील लोकप्रियता वाढत गेली व अवघ्या दहावर्षात या पक्षाने तामिळनाडूचे राजकारणच बदलून टाकले. १९६७ सालच्या विधानसभा निवडणुकीत द्रमुकला पहिल्यांदा पूर्ण बहुमत मिळाले व अण्णादुराई तामिळनाडूतील बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री बनले. सत्ता मिळाल्यानंतर दोन वर्षातच १९६९ साली अण्णादुराई यांचे निधन झाले. - अण्णादुराई यांच्यानंतर करुणानिधींनी द्रमुकची धुरा संभाळली व मुख्यमंत्री बनले. त्यानंतर १९७१ सालच्या निवडणुकीत करुणानिधी यांनी स्वबळावर सत्ता मिळवली व मुख्यमंत्री बनले. या प्रवासात त्यांना लोकप्रिय अभिनेते एमजी रामचंद्रन यांची साथ मिळाली. पण ही मैत्री फारकाळ टिकली नाही. एमजीआर यांनी अण्णाद्रमुक हा स्वतंत्र पक्ष स्थापना केला. १९७७मध्ये एमजीआरनी करुणानिधी यांचा मोठा पराभव केला. - ६० वर्षाच्या राजकीय करीयरमध्ये करुणानिधी पाचवेळा तामिळनाडूचे मुख्यमंत्री बनले. सर्वाधिक १३ वेळा आमदार बनण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. First Published On: Aug 07 2018 08:03 p.m.

In reply to by कपिलमुनी

हे क्षेत्रीय पक्ष, पर्यायाने क्षेत्रीय इच्छा आकांक्षा ह्यांचे एक महत्वाचे स्तंभ होय. भारतीय व्यवस्था संघराज्यवादी पूर्णपणे नसली तरी क्षेत्रीय भाषिक, सांस्कृतिक, इत्यादी वेगळेपण जपायला म्हणून "अर्ध संघराज्यवादी" (क्वासी फेडरल) स्ट्रक्चर जपून असते. करुणानिधी अश्या क्षेत्रीय नेत्यांत एक वजनदार आवाज नक्कीच होते, अन कदाचित शेवटचे होते (नवीन पटनाईक अजून आहेत पण ते अल्पसंतुष्ट असून त्यांचे आक्रमक क्षेत्रीय समस्या मांडायचे पिंड नाहीये) म्हणून त्यांच्या (करूननिधींच्या) जाण्याने संघराज्य व्यवस्थेला बऱ्यापैकी धक्का पोचला आहे (जी व्यवस्था केंद्र सरकारला चेक अँड बॅलन्स म्हणून गरजेची आहे) , ह्या रीतीने त्यांचे जाणे थोडेफार नुकसान नक्कीच असावे देशाचे.

गोदी मीडिया जोमात! abp news च्या २ पत्रकारांनी दिलेला राजीनामा हा चर्चेचा विषय बनला. तस पाहिलं तर ही त्या वाहिनीची अंतर्गत गोष्ट असायला हवी होती पण ज्या रीतीने घटनाक्रम झाला त्यावरून सरकारला आपल्या धोरणांवर टीका करणाऱ्या पत्रकारांना कसे बाजूला करायचे आहे ते दिसत आहे. ध्रुव राठीच्या एकाच व्हिडीओ मध्ये बऱ्याच गोष्टी एकत्र सांगितल्या आहेत म्हणून तो इथे देत आहे. (असेही पोस्टकार्ड न्यूज च्या बातम्या मिपावरती चालतात मग घ्या हे ही चालवून! ;) ) थापा मारण्यात आणि फक्त थापच लोकांपर्यंत पोहोचवण्यात सरकार कित्ती "दक्ष" आहे हे दिसेल यातून! RSF ही संस्था पत्रकारिता स्वातंत्र्य आणि देश यावर २००२ पासून अहवाल प्रकाशित करते. यावर्षी भारताचे स्थान घसरून १३८ (१७० देशांमध्ये) या स्थानावर आले आहे! त्यातल्या त्यात आनंदाची गोष्ट म्हणजे पाकिस्तानच्या एक स्थान वरती आहोत आपण, त्यांचा नंबर १३९ आहे!! मी गेल्या काही वर्षांचे आकडे पहिले. 2009 india 105, pak=159 2011-12 india 131 pak 151 2013 india 140 pak 159 2015 india 136 pak 159 संदर्भ- Deadly threat from Modi’s nationalism यावरून पाकिस्तान मजल मारून वरती आलेला दिसतो आहे तर भारताची अधोगती सुरु आहे! २०१४ च्या निवडणुकांआधी भारताचे स्थान भलतेच घसरले होते. असीम त्रिवेदीसारख्या व्यंगचित्रकारावर देशद्रोह खटला भरलेला जो महिन्यातच मागे घ्यावा लागला. आत्ता देखील हीच परिस्थिती येऊ घातली आहे. फरक इतकाच आहे कि काँग्रेस च्या काळात सगळे चॅनल सगळ्या घोटाळ्यावरून, भ्रष्टाचारावरून सरकारला फैलावर घेत होते, आता फक्त आणि फक्त स्तुती कराल तरच प्रगती कराल नाहीतर "घरी बसाल" असे चित्र तयार होत आहे. फेसबुक वरती एक राजकीय कार्टून शेअर केले म्हणून कमल शुक्ला या संपादकाला "देशद्रोह" कलम लावून आत टाकले. असेही "देशद्रोह" हे या राजकारण्यांचे आवडते कलम आहे. कारण याचे देशाशी काही देणे घेणे नाही. यावरती वेगळ्या(कन्हैयाच्या) धाग्यावर लिहितो वेळ मिळाला कि (मिपावर्ती मराठी टंकता येत नसल्यामुळे दुप्पट वेळ लागत आहे!) यांना मत देऊन चुकी केली असे वाटणे दिवसेंदिवस वाढतच चालले आहे... :(

In reply to by शब्दबम्बाळ

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थन केले पाहीजे यात वाद नाही. पण पत्रकारीतेचे एकुणच व्यवसाय म्हणून चारीत्र्य साशंकीत झालेले नाहीना अशी शंका वाटते - काही इकडची चाटूगिरी करतात काही तिकडची - तटस्थतेचा बळी दिल्या नंतर इकडच्या असो अथवा तिकडच्या चाटूगिरीसाठी जनतेला किती प्रेम शिल्लक राहील या बाबत साशंकता वाटते. बाकी RSF ह्या संस्थेच्या तटस्थतेचे आणि पारदर्शकतेचे कौतुक जॉन रोसेंथॉल यांच्या लेख १ आणि लेख २ मधून उघडे पडत असावे. मनमोहन सिंग कालीन अशा (उदाहरणर्थ) बातमीने भाजपाचे शुद्धीकरण होणार नाही, त्याच वेळी होलीअर दॅन दाऊ चा नैतिक अधिकारही कितपत शिल्लक रहात असावा या बाबत साशंकता वाटते. भारतीय पत्रकारीता आणि राजकारण दोन्हींना त्यांचे आदर्श चारीत्र्य प्राप्तीसाठी अजून अवकाश बराच असावा असे वाटते. असो.

In reply to by माहितगार

केरळचे ते उदाहरण राज्यसरकारी होते, मनमोहन कालीन दिल्ली पोलीस , सुप्रीम कोर्टाने लिव्हरेज देई पर्यंत खासदारांच्या बाबतीत स्टिंग ऑपरेशन करणार्‍या पत्रकारांच्या मागे पडली होती असे या वृत्तावरुन दिसते. असो.

In reply to by माहितगार

कमाल करते हो सरजी! मी लिहिलेल्या प्रतिसादात पहिला मुख्य मुद्दा "न आवडणाऱ्यांवर दबाव आणणाऱ्या सरकारचा होता" तसेच हीच बाब अधोरेखित करणाऱ्या RSF रिपोर्ट बद्दल होता. आपण त्या प्रतिसादाखाली २ उपप्रतिसाद दिलेत. त्यातल्या एकाही प्रतिसादात आपण "सध्याच्या सरकारच्या काळात सुरु असलेल्या दबावतंत्राबद्दल" किंवा "भारताच्या घसरणाऱ्या पत्रकारिता स्वतंत्र्य निर्देशांकाबद्दल" अवाक्षरही काढले नाहीत! त्याऐवजी आपण काय केलेत? १.
"काही इकडची चाटूगिरी करतात काही तिकडची - तटस्थतेचा बळी दिल्या नंतर इकडच्या असो अथवा तिकडच्या चाटूगिरीसाठी जनतेला किती प्रेम शिल्लक राहील या बाबत साशंकता वाटते."
म्हणजेच सगळे पत्रकार कसे वाईट आहेत आणि अर्थातच ते वाईट असल्याने त्यांसोबत काय होते याविषयी जनतेला कशाला प्रेम शिल्लक राहील अशी शक्यता आपण बोलून दाखवलीत. थोडक्यात प्रसूनजींना काढले काय किंवा राजीनामा दिला काय "जनतेला"(की तुम्हाला) ममत्व वाटणार नाही हे स्वतःच अनुमान काढलेत. २.
बाकी RSF ह्या संस्थेच्या तटस्थतेचे आणि पारदर्शकतेचे कौतुक जॉन रोसेंथॉल यांच्या लेख १ आणि लेख २ मधून उघडे पडत असावे.
आपण दिलेले संदर्भ (जे हल्ली आपण अभावानेच देता) हे २००७ चे आहेत!! तब्बल ११ वर्ष जुने! पण त्यासंबंधी काहीही न लिहिता, या संदर्भांवरून RSF कशी थापडी आहे जणू हेच सिद्ध होते हे दर्शवण्याचा आपण प्रयत्न करत आहेत. याला म्हणतात "what अबाऊट गिरी" वाचणाऱ्याच्या मनात संस्थेच्या विश्वासार्हते बद्दल संभ्रम निर्माण करायचा जेणे करून हे आकडे विश्वासार्ह वाटू नयेत. जा जगात अस्तित्वात येणारी कुठलीही संस्था हि मर्त्य मानवानेच निर्माण केली असल्याने त्या संस्थेला कुठून ना कुठून पैसे/लोक/स्थळ यांचे संबंध हे लागणारच! आपण जी लिंक शेअर केली आहे त्याचे लेखक बायज्ड नाहीत हे कसे सिद्ध कराल? RSF च्या वेबसाईट वरती निर्देशांक कसा काढला जातो त्याची संपूर्ण पद्धती दिलेली आहे ती जाऊन बघू शकता. या खेरीज जगातल्या काही विश्वासार्ह संस्था हि यादी वापरतात! "The Index is a point of reference that is quoted by media throughout the world and is used by diplomats and international entities such as the United Nations and the World Bank." भारताचे स्थान कुठल्या यादीमध्ये वरती गेले की आम्ही जल्लोष करतो पण खाली जाताना दिसले कि प्रथम संस्थेवरती शंका घेणे हेच काम होते. नुट्रीशन इंडेक्स वरती पण हाच आरोप केला गेला होता. ३.
मनमोहन सिंग कालीन अशा (उदाहरणर्थ) बातमीने भाजपाचे शुद्धीकरण होणार नाही, त्याच वेळी होलीअर दॅन दाऊ चा नैतिक अधिकारही कितपत शिल्लक रहात असावा या बाबत साशंकता वाटते.
"असीम" चे उदाहरण देऊन मीच पहिल्या प्रतिसादात काँग्रेस बद्दल मत हे मांडले होते खरंतर, पण आपल्याला सध्याच्या सरकारवर टिप्पणी करण्याऐवजी मागच्या सरकारच्या वेळी काय झाले आणि मग ते पण वाईट होते हे आधी मांडावे वाटत आहे! म्हणून आत्ता विशेष काही वेगळे होत नसून फक्त भाजपाला आम्ही त्यापेक्षा चांगले कसे हे दाखवता येणार नाही अशी साशंकता दिसते. दोन्ही संपूर्ण प्रतिसादांमध्ये तुम्ही कुठेही "आत्ता" जे होत आहे त्यावर शून्य भाष्य केलं आहे. अशावेळी तुमच्या "कथित" निष्पक्ष भूमिकेबद्दल संशय येणे साहजिक आहे. बाकी आपण कोब्रा पोस्ट ची बातमी देऊन उत्तम काम केलेत बर का!! त्यांनी हल्लीच स्टिंग ऑपरेशन केलं होत ज्यात बरेच लोक अडकले होते. PAYTM वाले सुद्धा कुठल्या पक्षाशी संबंधित आहेत हे समोर आले होते. झी न्यूज सारखे डझनभर चॅनल कसे "पेड न्यूज" दाखवतात हे ही समोर आले होते. साहजिकच मुख्य मीडिया ने हा रिपोर्ट प्रसारित केलाच नाही!! या रिपोर्टचे २ पार्ट होते. मी खाली एक व्हिडिओ देत आहे त्याच्या डिस्क्रिप्शन मध्ये इतर भागांच्या लिंक मिळतील. बरेच धक्के बसतील बघून हे सगळे PAYTM चा फौंडर म्हणतो की "कैसे कैसे काम कारवाये संघ ने हम से क्या बतायें" तेव्हा काय बोलणार?!

In reply to by शब्दबम्बाळ

....डझनभर चॅनल कसे "पेड न्यूज" दाखवतात हे ही समोर आले होते....
साहेब, माझ्याकडे ( ंइ सर्वीसला आलेल्या कंपनीकडे) जाहीरातीसाठी चिक्कार पैसा आहे अशा आशेने पुरेशा विवीध वृत्तसंस्थांनी स्वतःहून आम्ही पेड न्यूज देतो बरंका म्हणून सांगितलेला व्यक्तिगत अनुभव माझ्या गाठीशी आहे, यात मागच्या पिढीत आदर्श समजल्या जाणार्‍या पत्रकारांची नव्या (बायलॉजीकल) पिढीचाही समावेश होता. आताच्या काळात एकीकडे संपादकीय धोरणाची निश्च्चिती वृत्त संस्थांच्या जाहीरात विभागा कडून होते. तर दुसरीकडे पत्रकार मंडळी स्वतःची पत्रकारीता ब्लॅकमेलींगसाठी वापरताना दिसतात. तुम्ही कोणत्याही पक्षात असा त्यांच्या चंगळीची व्यवस्था करावी लागते. चंगळ केलीत तर सारे आलबेल नाही तर ब्लॅकमेल असे साधे सरळ हिशेब आहेत. सरकारी कंत्राटांचा शेकडो कोटींचा संबंध असतो ज्याच्या हाती कंत्राटे पडतात ते सरकारी बाजूने माध्यमांना पोसतात आणि ज्यांच्या पदरात कंत्राटे पडत नाहीत ते विरोधी बाजूने माध्यमांना पोसतात. राजकीय पक्ष, माध्यमे आणि पत्रकार त्यांच्या संघटना कोणत्याही असोत त्यांच्याकडे निष्पक्षतेच्या अपेक्षेतून न बघीतलेले बरे असावे. पेड न्यूज बद्दलचा एक लेख कोणत्याही पक्षास टार्गेट न करता मी जानेवारी २०१४ (मोदी सत्तेवर पोहोचण्याच्या आधी) काथ्याकुट चर्चेस घेतला होता, (मिपाकरांना त्या मुद्याचे महत्व कदाचित न उमगल्या मुळे फाट्यावर मारला गेला हा भाग वेगळा) तेव्हा पेड न्यूज बद्दलची मते मी भाजपा सरकारच्या सोईने बनवलेली नाहीत हे लक्षात घ्यावे. त्या शिवाय माझ्या वरच्या प्रतिसादात "भाजपाचे शुद्धीकरण होणार नाही, त्याच वेळी (विरोधी बाजूकडे) होलीअर दॅन दाऊ चा नैतिक अधिकारही कितपत शिल्लक रहात असावा या बाबत साशंकता वाटते. हे वाक्य माझ्या वरच्या प्रतिसादात सुस्पष्टपणे लिहिलेले आहे. इंदिरा गांधी काळ जगजाहीर आहे, नेहरुकाळात झालेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिक्षेपाबाबतचा युट्यूब मी वर लावलेला आहे. तिथेही माझे वाक्य अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण करण्यात नेहरु कमी पडले असतील तर टिका केलीच पाहिजे. अर्थात नेहरुंनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाकारले तर आम्ही का नाकारु नये असे सरसकटीकरणही टळणे श्रेयस्कर असावे असेच आहे.
...दोन्ही संपूर्ण प्रतिसादांमध्ये तुम्ही कुठेही "आत्ता" जे होत आहे त्यावर शून्य भाष्य केलं आहे. अशावेळी तुमच्या "कथित" निष्पक्ष भूमिकेबद्दल संशय येणे साहजिक आहे....
अर्थात नेहरुंनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाकारले तर आम्ही का नाकारु नये असे सरसकटीकरणही टळणे श्रेयस्कर असावे; मनमोहन सिंग कालीन अशा (उदाहरणर्थ) बातमीने भाजपाचे शुद्धीकरण होणार नाही, हि दोन वाक्ये कशाची द्योतक आहेत ? निष्पक्ष लेखनाची अपेक्षा करणारा वाचकाचे मनही निष्पक्ष आणि ओपन माईंडेड असावयास लागत नाही का ? याच धाग्यावर माझी आसाम विषयक भूमिका आहे ती तुम्ही कशी मोजता ? आता या ठिकाणी चर्चेचा मुख्य विषय प्रसून वाजपेयींचे ते वार्तांकन अपुर्ण आणि अस्पृहणियच आहे हे मी खालच्या प्रतिसादात व्यवस्थित दाखवून दिले आहे. स्त्रीयांच्या स्व-मदत गटांना उद्योग विषयक मार्गदर्शनासाठी रिसोर्स पर्सन म्हणून मी व्यक्तिशः फिरलो आहे ( मोदी पंतप्रधान होण्याच्या आधी काँग्रेसच्या काळात ) . जाहीरात खर्च झेपत नाहीत प्रॉडक्टची वेगळी ओळख निर्माण करणे औघड जाते असे लक्षात आले तर मी त्या महिलांना सुप्रिया सुळेंशी संपर्क करुन त्यांना ब्रँड अंबॅसॅडर करता येते का पहा म्हणालो तेव्हा मी काय राष्ट्रवादी काँग्रेसचा समर्थक होतो का काय ? कि मोदींनी एका महिला स्व-मदत गटास प्रसिद्धी दिली याचे महत्व समजून घेताना मोदी समर्थक होतो. कोणत्या ऐश्वर्या राय आणि कोणते सचिन तेंडूलकर आणि कोणते प्रसून वाजपेयीं सारखे पत्रकार स्त्रीयांच्या स्व-मदतगटांचे ब्रँड अँबॅसॅडर म्हणून वेळ आणि श्रम खर्च करतात ? स्त्रीयांच्या स्व-मदतगटांसाथी काही पॉझीटीव्ह नाही करता आले तर कमीत कमी काही निगेटीव्ह होणार नाही हे बघीतले जावयास नको हे बघण्याचे तारतम्य तथाकथित आदर्श पत्रकारांना नको का ?
...भारताचे स्थान कुठल्या यादीमध्ये वरती गेले की आम्ही जल्लोष करतो पण खाली जाताना दिसले कि प्रथम संस्थेवरती शंका घेणे हेच काम होते.
सॉरी व्यक्तीशः मी कोणत्याही अशा जल्लोशात सामील होत नाही. अगदी अशात भारताची अर्थ व्यवस्थेचा आकार किती वाढला या बद्दल चालू-घडामोडी धाग्यात मिपाकर मित्रांनी पोस्ट टाकली मी त्याच्या मर्यादा सुस्पष्ट केल्या. त्यानंतर त्यांच्या बाजूचे ट्रोलींगही सहन केले. परदेशी एन जी. ओ. धुतल्या तांदळासारख्या नाहीत संबधीतांचे हित संबंध जपले जाण्यासाठी त्या वापरुन घेतल्या जातात हेही तेवढेच खरे आहे त्यामुळे परकीय एनजीओ च्या जल्लोष असो वा टिका मी तरी विमुटभर मिठासोबतच घेतो कारण माझ्या देशाचे हित अहित करण्यास माझे देश बांधव समर्थ आहेत त्यासाठी परदेशी एन जी ओंच्या फुटपट्ट्यांवर विसंबण्यची आवश्यकता नसावी. असो.

In reply to by माहितगार

पेड न्यूज बद्दलचा एक लेख कोणत्याही पक्षास टार्गेट न करता मी जानेवारी २०१४ (मोदी सत्तेवर पोहोचण्याच्या आधी) काथ्याकुट चर्चेस घेतला होता, (मिपाकरांना त्या मुद्याचे महत्व कदाचित न उमगल्या मुळे फाट्यावर मारला गेला हा भाग वेगळा) तेव्हा पेड न्यूज बद्दलची मते मी भाजपा सरकारच्या सोईने बनवलेली नाहीत हे लक्षात घ्यावे.
मागाजी, एक दुवा द्यायचा. तो पण एका इंग्रजी लेखाचा आणि या एकोळी धाग्याला लेख म्हणायचे. परत मिपावाल्यांनी तो फाट्यावर मारला म्हणून अश्रू ढाळायचे. हे फार होतय असे तुम्हाला वाटत नाही का? तुमचे वाचन चांगले आहे. भरपूर अनुभव आहे, इंग्रजी चांगले आहे; तर करा की भाषांतर त्या इंग्रजी लेखाचे आणि द्या मराठीमधे सारांश. तुम्ही दिलेला दुवा मराठी लेखाचा असता तर मी असे काही सुचवलेच नसते. त्या लेखाखाली आलेल्या प्रतिक्रियापण एकत्रीतपणे सारांशरूपाने देता आल्या असत्या तर त्या लेखाच्या भाषांतराची खुमारी आणखीनच वाढली असती. "व्हॅल्यू अ‍ॅडेड" ह्या शब्दाचे महत्व, या विषयावर सविस्तर लेख लिहिण्याइतके ज्ञान तुमच्याकडे नक्कीच आहे. मी दुवा वाचला आहे. २०१४ चा असला तरी आजही तो कालबाह्य झालेला नाही. त्यावर ३-४ प्रतिक्रियाही दिल्या आहेत. त्या वाचाव्यात. मी त्या लेखाचा भाषांतर करण्याचा छोटासा प्रयत्नही करून पाहिला आहे. ते भाषांतरही तिथेच एका प्रतिसादात चिकटवले आहे. आणि मगच हे लिहितो आहे. तुम्ही इंग्रजीत असलेले चांगले लेख सारांश रूपाने मिपावर आणले आणि त्यानंतर तुमचे विचार त्यावर मांडलेत तर तुमच्या प्रत्येक धाग्याची मिपाकर आतुरतेने वाट पहातील. असे करणे हे कष्टदायक असले तरी ते लाभदायक नक्की असेल. पण त्यासाठी आदित्य कोरडेसाहेबांसारख्या लोकांचा आदर्श समोर ठेवणे आवश्यक आहे. असो. _/\_

In reply to by शब्दबम्बाळ

" यावरती वेगळ्या(कन्हैयाच्या) धाग्यावर लिहितो " हे सोडून बाकीच्या मुद्द्यांना अंशतः समर्थन . बाकी काहीही असो कन्हया चा तुम्हाला लैच कळवळा राव , होऊन जाऊ द्या एकदा कन्हया वर चर्चा , काढा तुम्ही धागा .

In reply to by शब्दबम्बाळ

सगळेच पत्रकार जनतेचा आवाज बनण्याचे कार्य करत नाहीत . प्रत्येक वर्तमानपत्र किंवा tv न्युज चॅनेल वर उच्च पदावर पोहचलेले पत्रकार हे सत्ताधारी किंवा विरोधक यांचे तळवे चाटत स्वतःचे खिसे भरण्याचे काम करत असतात .यात तुम्हाला एकही निष्पक्ष पणे पुढाऱ्यांचे बुरखे फाडणारा पत्रकार सापडणार नाही . कायम भाजप ला झोडणारी बरखादत्त निरा रडीया केस मध्ये बोलका बाहुला पंतप्रधान च्या काळात कशी सापडली होती हे आठवून बघा . https://jansatt.wordpress.com/2010/11/19/%

In reply to by शब्दबम्बाळ

प्रसून वाजपेयींचे उत्पन्न द्विगुणीत होण्याबद्दलच्या आक्षेप बद्दलचे हे वार्तांकन युट्यूबवर अनेक वेळा बघीतले. सांगितलेले गेलेले आकडे लिहिले आणि कॅल्क्युलेटरही वापरले . छत्तिसगढ राज्यात कांकेर नावाच्या गावात १२ स्त्रीयांनी स्व-मदत सहकारी गट स्थापन केला. सरकारी प्रशिक्षण घेऊन, सिताफळे तशीच विकण्या एवजी सिताफळांचा पल्प बनवून विकण्याचा प्रकल्प चालू केला . पहिल्या वर्षी त्याचे सिताफळाचे आईसक्रीम बनवून २५ हजार मिळवले हे विक्री उत्पन्न आहे की निव्वळ नफा हे वार्तांकनातून क्लिअर होत नाही. तसेच १२ स्त्रियांनी नेमके किती पैसे या सहकारी व्यवसायात आणले ? यंत्र सामुग्री आणि वितरण व्यवस्थेवर काय गुंतवणूक केली ? दर वर्षी किती किलो सिताफळे प्रोसेस केली , नेमके कोण कोणते खर्च केले याची अकाऊंटींग्च्या दृष्टीने नफा नेटकेपणे मोजण्यासाठी लागणरी माहिती या वार्तांकनातून मिळत नाही. मुद्दा सिताफळ विषयक सहकारी व्यवसाया बद्दल असताना , प्रसून वाजपेयी आणि त्यांची टिम धान म्हणजे तांदळापासूनच्या उत्पन्नाकडे चर्चा नेऊन जाणीव पुर्वक विषयांतर करताना दिसतात. त्या उत्पादनासाठी लागणारे खर्च आणि उत्पन्न लिहून काढण्यास वेळ देताना दिसतात, मग चर्चेचा मुख्य विषय असलेल्या सिताफळ व्यवसाया बद्दल पूर्ण माहिती जसे त्यांचे पासबूक खर्च लिहिण्याच्या वह्या सर्व पडताळून एखाद्या अकाउंटंट कडून तपासून का घेत नाहीत ? स्वतःला अकांटंसीचे ज्ञान नसेल तर ठिक एबीपी माझा तील यांचे सॅलरी मोजणार अकाउंटंटना विचारले तरी नफा मोजण्यासाठी नेमक्या कोणत्या माहितीची कमतरता आहे याची माहिती मिळाली असती. प्रत्येक व्यवसाय प्रत्येक वेळी फायद्यात असेल असे नाही. सरकारी आधिकार्‍यांनी त्यांच्या पातळीवर व्हॅल्यू अ‍ॅडीशन होऊन नफा मिळवता येईल अशा व्यवसायाचे प्रशिक्षण दिले. केवळ अकाउंटींगचे ज्ञान नसले तर, सुशिक्षीतांना नफा नीट मोजता येत नाही, त्या तर अशिक्षीत स्त्रिया. मोदींसमोर बोलणार्‍या स्त्रिने पुर्वी व्यापारी २५ किलो सिताफळे ५०-६० रुपायांना घेऊन जात, आता एक किलो रसाला १५० रुपये मिळतात २५ किलो सिताफळांचा अंदाजे ५ किलो रस निघतो त्याचे ७०० रुपये मिळतात अशी माहिती दिली. २५ किलो मागे सिताफळांना ५० रुपायांएवजी रस काढल्यामुळे ७०० रुपये मिळत असतील तर फायद्याचे सर्वसाधारण गुणोत्तर चक्क दहापट होत असेल समजा काही रक्कम यंत्र सामुग्री रेफ्रीजरेशन आणि वितरणावर खर्च होत असेल ती वजा जाता जे काही अधिकचे दोन पैसे मिळतात ते नक्कीच आर्थीक प्रगतीत भर घालतात. पंतप्रधान मोदींनी त्या स्त्रीयांना टिव्हीवर उदाहरण म्हणून पेश करण्या आधी अकाउंटट लोकांचा अहवाल मागवून घेतला असता तर प्रसुन वाजपेयींना हा वार्तांकनीय गोंधळ घालण्याचा चान्स मिळाला नसता. सरकारी अधिकार्‍यांनी हाताशी हिशेब आकडेवारी अधिक व्यवस्थितपणे ठेवणे गरजेचे असते. स्त्रीयांच्या स्व-मदत गटांना प्रोत्साहन देणे हि केवळ भाजपा नव्हे काँग्रेस काळापासून प्रयत्न चालू आहेत. त्यातील यशाची उदाहरणे स्वतः पंतप्रधानांनी सादर करणे अत्यंत चांगली गोष्ट आहे. छत्तीसगढ सारख्या नक्षल ग्रस्त भागात व्यावसायिक यशाची उदाहरणे नैराश्य दूर करण्यासाठी मदत करणारी असू शकतात. पत्रकारांनी चिकित्सा करुन काही चुकत असेल तर नजरेस आणावे पण सर्वसामान्य माणसाचा आत्मविश्वास खचेल असे तमाशे करु नयेत. हे मोदीच काय एबिपीच्या मालकांना मीही सुनावले असते. या पत्रकारांनी गावात जाऊन अर्धवट माहितीच्या बळावर वृत्तांकनाचे पाप केले नाही त्या पेक्षा मोठे पाप त्या अशिक्षीत महिलांचा परस्परावर असलेल्या विश्वासाला आणि आत्म विश्वासाला मार्गदर्शन न करता खचवण्याचे काम केले ते खचितच स्पृहणिय नसावे.

In reply to by माहितगार

एक कळत नाही, नेटके विश्लॅषण करुन विरोधकांना नेमक्या मुद्यांवर उघडे पाडण्यात बाबत स्वतः भाजपा समर्थक एवढे उदासिन का असतात ?

In reply to by माहितगार

आपण व्हिडीओ अनेकदा पाहिलात म्हणता तरीही आपल्याला गावाचा सरपंच उत्पन्नाबाबत काय म्हणत आहे, तसेच चंद्रमणी यांचा जो १२ महिलांचा गट आहे त्यातल्या इतर महिला आम्हाला काहीच फायदा झालेला नाही हे सांगताना दिसले कसे नाही याचे आश्चर्य वाटले!! आणि जरा काय आकडेमोड केलीत तेही लिहायचे होते म्हणजे कळले असते सगळ्यांना. आता पुन्हा व्हिडीओ सुरु करा आणि १०:११ पासून १२:२७ पर्यंत बघा! महिला काय म्हणतात "दुप्पट उप्तन्न राहील बाजूला आम्हाला आम्ही गुंतवलेले पैसे देखील परत मिळत नाहीयेत" (" जय प्रगती" गटाची प्रत्येक महिला महिन्याला १००रुपये गुंतवत होती, ५ वर्ष! असे पहिली महिला सांगते. ६००० रुपये झाले ५ वर्षांची गुंतवणूक. आता गेल्याच वर्षी २५००० रुपये गटाला म्हणजेच १२ जणींना मिळून मिळाले हे सांगतात. म्हणजे २५०००/१२ = २०८३ रुपये प्रत्येकी इतके भरघोस वार्षिक नफा बर का!) बर आता दुसरी महिला म्हणते कि हे २५००० आम्हाला मिळाले नाहीत कारण ते गटाच्या खात्यात होते जे यावर्षी ४५००० झालेत, आम्ही गुंतवलेले स्वतःचे पैसे पकडून! म्हणजे जवळपास ४००० रुपये एका महिलेला मिळणार. त्यांच्यानुसार हे उत्पन्न २ वर्षांचे मिळून झाले बर का आता. आता चंद्रमणी यांनी स्वतः सांगितलेला हिशोब बघूया! आम्ही २५केजी सीताफळ पासून ५केजी पल्प काढतो आणि १५०रु/केजी ने विकतो आणि यातून पूर्ण समूहाचा ७००रुपये नफा होतो! आता समूहात आहेत १२जणी, मग प्रत्येकीला ७००/१२= ५८ रुपये फायदा रोजचा! आपण दिवसाचा नफा जवळपास ६० रुपये पकडू, जरी सीताफळ हे वर्षभर विकणार नसले तरी मासिक उत्पन्न काढूयात!

प्रत्येकी मासिक उत्पन्न = ६०*३०= १८०० रुपये!!!

आणि या महिलेला राष्ट्रीय चॅनेल वर बोलावून विचारण्यात आले कि "तुमचे उत्पन्न दुप्पट झाले का? तसेच तुमचे दुप्पट झाले असेल तर तुमच्या समूहातल्या बाकी सदस्यांचे देखील झालेच असेल ना?" या दोन्ही प्रश्नांचे उत्तर "हो" असे दिले गेले. आता दुप्पटच का? तर सरकारचे दुप्पट उत्पन्नाचे व्हिजन काय आहे ते सगळ्यांना माहित आहेच, त्यामुळे तेच एकदा पाहणाऱ्यांच्या मनावर बिंबवायचा हा सरळ प्रयत्न होता! महिला बचत गट, आणि अनेक समूह याना मदत मिळायलाच हवी आणि मार्गदर्शन पण! परंतु स्वतःच्या थापा त्या महिलांवर का थोपवता? जोडधंद्यांतून १८०० रुपये मासिक उत्पन्न, धान्याच्या शेतीतून कुटुंब चालवणे शक्य नाही हे स्वतः त्यांनी देखील सांगितले आहे. मग सरकार काय शेतकऱ्याची थट्टा करायला बोलावते का अश्या लोकांना? एखाद्या खाजगी कंपनी मध्ये काम करणाऱ्या माणसाने जर सांगितले कि कंपनीने त्याचा पगार चक्क दुप्पट केला आहे तर सहकार्यांना आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही पण नंतर जर कळले कि त्याचा पगार महिना ४०००रुपये होता आणि आता ८०००रुपये केला आहे तर जोडाच काढतील नाही का?(हा पगार देखील वर लिहिलेल्या उत्पन्नापेक्षा जास्त ठेवला आहे!) आणि त्या व्हिडीओ मध्ये प्रसून स्वतः सांगतात कि पहिल्यांदा "शेतीतील" उत्पन्न दुप्पट झाले का हे विचारले त्यामुळे लपवाछपवी तरी दिसत नाही कि जणू शेतीचे उत्पन्न विचारले आणि सीताफळाचे म्हणून दाखवले. चुकी नक्कीच म्हणू शकता. जेव्हा सरकारने पत्रक प्रसिद्ध केले कि फक्त सीताफळ उत्पन्नाबाबत चर्चा होती तेव्हा पुन्हा संपूर्ण रिपोर्ट केलाच त्यांनी! -ABP news made a mistake when the reporter asked the income of the farmer relating it to paddy. -Chandramani Kaushik income hasn’t got doubled, neither from Paddy nor from Sitafal. -Farmers are living in dismal condition with income even less than of NAREGA workers. -Past three years have seen multiple protests from farmers all over India. It is time government focusses on solving their real issues instead of cherry-picking few farmers and showing that the schemes brought by them are successful.

In reply to by शब्दबम्बाळ

१) विषय सिताफळ प्रक्रीया सहकारी महिला उद्योगा पुरता मर्यादीत आहे. जी चर्चा सिताफळ प्रक्रीया सहकारी महिला उद्योगा बाबत आहे ती तिथेच मर्यादीत ठेऊया. ग्रामीण अर्थ जिवन हा बराच मोठा विषय आहे. इतर बाबतीत म्हणजे एकुण उत्पन्नाशी सरमिसळ करण्याची घाई करण्याचे काही कारण नाही. २) जेव्हा सविस्तर चर्चा करतो आहोत तेव्हा, प्रसून वाजपेयींनी दिलेले त्यांच्या सोईचे तुकडे बघण्या पेक्षा, पंतप्रधानांचे गावकर्‍यांशी झालेले व्हिडीओ कॉन्फरन्सींग मूळातून अभ्यासावे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंग विशीष्ट सरकारी स्कीमच्या यशाची बाजू दाखवण्यासाठी प्री प्लान्ड आहे यात वाद नाही. सिताफळ प्रक्रीया उद्योगातून होणार्‍या उत्पादना बाबत महिला बोलावयास लागते , त्या पुर्वी धानच्या शेतीतून उत्पन्न कमी पडते आहे हेच तीही सांगते आहे, आणि ते मोदी शांत पणे ऐकतात. त्यात उत्पन्न दुप्पट होत असल्याचा मोदी किंवा चंद्रमणींचा कोणताही प्रयत्न दिसत नाही. चंद्रमणी जेव्हा सिताफळ प्रक्रीया उद्योग बद्दल बोलण्यास सुरु होते तेव्हा मोदींच्या चेहर्‍यावर स्मित येते . मोदी उत्पन्न दुप्पट झाले का विचारतात तेव्हा सिताफळ उद्योगातील उत्पन्न दुप्पट झाले का हाच त्याचा आशय असू शकतो. ज्या अर्थी तिनशे स्त्रीयांना उद्योगाशी जोडून घेतले असे चंद्रमणी म्हणते पल्पिंग मशिन वगैरेचे उलेख करते तेव्हा अगदीच चिल्लर उद्योग केला असे नसावे. आता त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पुढे पंतप्रधान मोदी 'मुल्य्वृद्धी / व्हॅल्यू अ‍ॅडीशन करुन उत्पादनाची विक्री करावी म्हणजे उत्पन्न वाढते' हि अर्थशास्त्रीय संकल्पना ग्रामस्थांशी चर्चा करु लागतात आणि पंतप्रधान मोदी 'मुल्य्वृद्धी / व्हॅल्यू अ‍ॅडीशन करुन उत्पादनाची विक्री करावी म्हणजे उत्पन्न वाढते' हे देशातील ग्रामीण जनतेस संदेश देणे हाच मोदींच्या कार्यक्रमाचा हेतू दिसतो. हा हेतू साध्य करण्यासाठी असे एखादे सकारात्मक उदाहरणाचे पंतप्रधानांनी ब्रँड अँबॅसॅडर होणे केव्हाही चांगली गोष्ट आहे. ३) प्रसून वाजपेयींचे वार्तांकन म्हणजे चार्टर्ड अकाउंटटचा प्रॉफीट अँड लॉस स्टेटमेंट आणि बॅलन्सशीट असणारा ऑडीट रिपोर्ट नव्हे. ४) प्रसून वाजपेयींचे वार्तांकन कांकेरच्या या महिलागटाच्या सिताफळ प्रक्रीया उद्योगातील अनेक आकडेवारी गोळाच करत नाही. मूळ प्रकल्प अहवाल, त्यांच्या हिशेबाच्या वह्या गुंतवणूकी आणि खर्च, फिक्स एक्सपेन्सेस , व्हॅरीएबल एक्सपेन्सेस , खेळते भांडवल, बँकाम्चे कर्जव्याज इत्यादी कशाचिही माहिती प्रसून वाजपेयींच्या वार्तांकनातून पुढे येत नाही. कि ज्यावरुन नफ्याचे व्यवस्थित मोजणी करता येईल. पल्पिंग मशिनचा उल्लेख आहे पल्पिअंगमशिनची इन्व्हेस्टमेंटसाठीचे पैसे झाडाला उगवत नसावेत. आईस्क्रीम बनवण्यासाठी महिलांनी स्वतःची मशिनरी वापरली की दुसर्या कुणाची भाड्यानी वापरली याचे उल्लेख नाहीत. एकुण किती सिताफळे प्रोसेस केली याचे उल्लेख नाही. एके वर्षीचा नफा २५००० आहे तर दुसर्‍या वर्षी नफा का नाही याचे अकाऊंटींग उत्तराचा अभाव आहे. बँकेचे मशिनरीवर लोनसाठी जेस्टेशन पिरियड दिला असेल तर पहिल्यावर्शी कॅश हातात खेळेल पण पुढच्या वर्षी नफा होऊनही बँकेचा परतावा दिल्यामुळे हातात पैसे खेळतीलच असे नाकेव, असेच असेल असे नाही, प्रसून वाजपेयींच्या वार्तांकनातील माहिती निष्कर्ष काढण्यासाठी परिपूर्ण नाही एवढा पहिला मुद्दा आहे. ६) प्रसून वाजपेयींनी रोजचे उत्पन्न ७०० रुपये आहे असा निष्कर्ष कसा काढला याची कल्पना ते देत नाहीत. समजा रोजचे उत्पन्न रुपये ७०० असले तरी पुर्वी जर रोज २५ किलो सिताफळे जशीच्या तशी विकून २५ किलो सिताफळांचे ५० रुपये मिळत असतिल आणि आता ७०० मिळत असतील प्रक्रीया केल्यामुले होणारी मुल्यवृद्धी दहापट व्हावी. आता प्रसून वाजपेयींच्या भागाकाराची तुलना कुठे चुकते ते सांगतो. आधी २५ किलो सिताफळांचे ५० रुपये मिळत त्या ५० ला १२ ने भाग द्या त्याचे ४ रुपये १६ पैसे होतात. आणि मग ७०० रुपयांना १२ ने भाग द्या त्याचे ५८ रुपये ३३ पैसे होतात. आता ४ रुपये १६ पैसे पुर्वी मिळत त्याच्याशी ५८ रुपये ३३ पैसे ची तुलना करा म्हणजे १४ पटीच्या आसपास मुल्यवृद्धी होत असल्याचे दिसून येते. ७) आता माझ्या वर विश्वास वाटत नसे, (आणि लगेच वाटणार नाहीच कारण चष्मे ) तर चार्टर्ड अकाउंटट आणि कॉस्ट अकाउंटट ना हे व्हिडीओ आणि माझे विश्लॅषण दाखवून त्यांचे मत घ्या. जी माहिती परिपूर्ण नाही त्या बेसिसवर निष्कर्ष काढणे योग्य आहे का त्यांना विचारा. ८) आणि मग महिलांना आणि देशाला तुम्ही फसवलेच जात आहात हा निष्कर्ष लादून दिशाभूल करणे नैतिक गुन्हाच कि नाही हे स्वयंरोजगार आणि स्व-मदत गटांना मार्गदर्शन करण्यासाठी फिल्डवर मनोभावे काम करतात त्यांना विचारा. एवढे करुन चष्मे उतरवून बघता आले नाही तर केवळ बकळ सदीच्छा देऊ शकतो त्या आहेतच.

In reply to by माहितगार

चालू द्या! उद्या सरकारने निष्कर्ष काढला की देशातील सगळ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले आहे तर ते सिद्ध करण्याची जबाबदारी सरकारची कि देशातल्या प्रत्येकाची? हे दावे सरकारने स्वतः आणि लोकांनी पडताळून पाहायला नकोत का? का तिथेही पंप्र लोकांना आशा दाखवत आहेत पण हे पडताळणी करणारे लोक त्यावर विरजण घालत आहेत म्हणाल? १.
"जी चर्चा सिताफळ प्रक्रीया सहकारी महिला उद्योगा बाबत आहे ती तिथेच मर्यादीत ठेऊया. ग्रामीण अर्थ जिवन हा बराच मोठा विषय आहे. इतर बाबतीत म्हणजे एकुण उत्पन्नाशी सरमिसळ करण्याची घाई करण्याचे काही कारण नाही."
मी सगळी आकडेमोड सीताफळ उद्योगावर केली आहे. मग पुन्हा ग्रामीण जीवन वगैरे कुठून काढलात काय माहित! मला काहीही घाई नाही. २.
ज्या अर्थी तिनशे स्त्रीयांना उद्योगाशी जोडून घेतले असे चंद्रमणी म्हणते पल्पिंग मशिन वगैरेचे उलेख करते तेव्हा अगदीच चिल्लर उद्योग केला असे नसावे.
तुम्ही नक्की काय बघताय मला खरंच कळत नाहीये! ३०० स्त्रिया?? अहो १०-१५ बायकांचा उल्लेख करतात त्या! अवघड आहे राव! जाऊदे दमलो आता सांगून, जर त्या महिलांना खरंच फायदा होत असता तर त्या तक्रार करताना दिसल्या नसत्या. माणसाला पैसे मिळत आहेत हे तरी कळत जरी कमी शिकलेला असला तरी! माझा मुद्दा हाच आहे की जर दिवसाला ६०-७० रुपये कमावणाऱ्या महिलेला तुम्ही उत्पन्न दुप्पट झाल्याची रोल मॉडेल दाखवणार असाल (समूहाचे खरे उत्पन्न इतका कारनामा झाल्यावर सरकारला सिद्ध करता आले असते पण ते अजूनही झालेच नाही) तर शेतकरी कशाला इतक्या भानगडीत पडेल? फक्त आमची योजना चांगली आहे हे दाखवायला? आणि चष्मे शोधण्यापेक्षा आकड्यांनी सिद्ध केलत तर मी नक्कीच मानेन हि खात्री देतो!

In reply to by शब्दबम्बाळ

माझा मुद्दा हाच आहे की जर दिवसाला ६०-७० रुपये कमावणाऱ्या महिलेला तुम्ही उत्पन्न दुप्पट झाल्याची रोल मॉडेल दाखवणार असाल (समूहाचे खरे उत्पन्न इतका कारनामा झाल्यावर सरकारला सिद्ध करता आले असते पण ते अजूनही झालेच नाही) तर शेतकरी कशाला इतक्या भानगडीत पडेल?
मान्य आहे सरकारने चार्टर्द अकाऊंटटचा रिपोर्ट उपलब्ध झाल्यावर दावा केला म्हणजे अधिक बरे झाले असते, पण तरीही म्हणून प्रसून वाजपेयींच्या वार्तांकनाला चार्टर्द अकाऊंटटचा रिपोर्ट चा दर्जा देता येतो का हे आपल्या परिचयातील चार्टर्ड अकाऊंटला विचारावे.
जाऊदे दमलो आता सांगून, जर त्या महिलांना खरंच फायदा होत असता तर त्या तक्रार करताना दिसल्या नसत्या.
एवढ्यात दमलायसा ? फक्त सांगण्याची सवय झाली की असे होत नाही ना ? जरा कान देवून मूळ प्रसारण ऐकावे म्हणजे ३०० चा आकडा कुठून येतो ते कळेल. नफा/तोटा मोजण्यासाठी प्रसून वाजपेयींच्या वार्तांकनात कोणती माहिती नाही हे आपणास प्रतिसादात लिहूनही लक्षात घेणे अवघड जाते, आता माझ्या वर विश्वास वाटत नसे, (आणि लगेच वाटणार नाहीच कारण चष्मे ) तर चार्टर्ड अकाउंटट आणि कॉस्ट अकाउंटट ना हे व्हिडीओ आणि माझे विश्लॅषण दाखवून त्यांचे मत घ्या. जी माहिती परिपूर्ण नाही त्या बेसिसवर निष्कर्ष काढणे योग्य आहे का त्यांना विचारावे. हे क्लिअर वेगळा पॉईंट टाकून लिहिले तरी पहात नाही. त्यातर अशिक्षीत स्त्रिया आहेत कोणी पत्रकार संपूर्ण अकाऊंटीग न तपासता चुगल्या पोहोचवून भांडणे लावून देण्याची व्यवस्था करतो हे शहाण्पणाचे लक्षण आहे का ?
---३०० स्त्रिया??...
यूट्यूब व्हिडिओ पहाण्याचे कुणाचे काही सुटत आहे का ? ते प्रसून वाजपेयींचे तुकडे बाजूस ठेऊन मूळ प्रसारण पहाण्यास सुचवले होते . खाली दिला होता पुन्हा एकदा देतो. आणि अजून एक तुमच्या प्रतिसादातील कॅल्कुलेशन मध्ये 'रोज' हा शब्द पुन्हा पुन्हा येतोय तो नेमक्या कितव्या मिनीट सेकंदाला कोणत्या महिला सदस्याच्या तोंडात कोणत्या युट्यूब मध्ये येतो ते सांगावे मूळ प्रसारण दोनदा पहा ओळखीतल्या चार्टर्ड अकाउंटट आणि कॉस्ट अकाउंटटला माझा प्रतिसाद दाखवून त्यांचे मत कळवा, मग पुढे बोलू. तो पर्यंत दोन मूळ प्रसारणे पुन्हा एकदा. आणि चंद्रमणीचे

In reply to by शब्दबम्बाळ

. हे डायरेक्ट पि एम ओ वेबसाईटवर कसे शोधायचे माहित नाही. मोदींच्या स्त्री स्व-मदत गटांशी व्हिडीओ कॉन्फरन्सीम्ग मधील ज्यांना चुका काढायच्या असतील त्यांनी खालील युट्यूब पहाव्यात त्यात आणखीही उणीवा मिळतील नाही असे नाही, पण स्त्री स्व-मदत गटांची संकल्पना या स्त्रीया नेमके काय करण्याचे प्रयत्न करत आहेत ह्याची थोडीफार ओळख होण्यास मदत होईल.

In reply to by शब्दबम्बाळ

शब्दबंबाळ साहेब , मी तो व्हिडिओ पहिला , खेडेगावातील बायका कॅम्येरा समोर सफाईदार बोलू शकत नाहीत .त्यामुळे आपण आपली बुद्धी वापरून व्यवस्थित अर्थ काढायचा असतो .शब्दांचा किस पाडून लांबलचक प्रतिसाद लिहण्यापेक्षा सीताफळ शेती कशी करतात या वर वाचन करायचे . थोडा लॉजिकल विचार करा 25 kg चीं सिताफळांचा पल्प काढण्याचे काम एक बाई करू शकते तिथे तुम्ही ते काम 12 जणी करतात अस का रंगवता ? " आम्ही २५केजी सीताफळ पासून ५केजी पल्प काढतो आणि १५०रु/केजी ने विकतो " इथं पर्यंत त्या महिलेचे वाक्य आहे , म्हणजे 700 रु प्रत्येकीला मिळतात असा अर्थ होती . " आणि यातून पूर्ण समूहाचा ७००रुपये नफा होतो!आता समूहात आहेत १२जणी, मग प्रत्येकीला ७००/१२= ५८ रुपये फायदा रोजचा!आपण दिवसाचा नफा जवळपास ६० रुपये पकडू . " हे सगळं तुम्ही जोडलं आहे . त्या महिला त्यांचे कर्तृत्व आनंदाने सांगत आहेत तर तुम्ही त्यांच्या आनंदावर ( प्रसून , बरखा , कन्हया , कुबेर यांच्या सारखे) विरजण का घालताय ?

In reply to by ट्रम्प

मला खरंच सडेतोड प्रतिसाद द्यायचा मोह आवरावा लागतोय... नाहीतर उत्तम रीतीने तुमच्या पद्धतीचा प्रतिसाद दिला असता! जिथे तिथे नुसते ट्रोलिंग करण्यापेक्षा जरा समोरची माहिती तरी नीट बघत जावा हो! एक व्हिडीओ बघितला तर नुसता! तेवढाही नीट बघता येत नसेल तर काय बोलायचं... आता एक काम करा पुन्हा व्हिडीओ लावा आणि ८:०० पासून ९:०० पर्यंत बघा! चंद्रमणी स्वतः सांगताना दिसतील कि ७०० रुपये हा एकटीच नाही तर संपूर्ण समूहाचा(१२ लोक) उत्पन्न आहे. अहो इथे तर डोकं लावायची पण विशेष गरज नाही हो पण बघा प्रयत्न करून! तुमचे विधान
" आम्ही २५केजी सीताफळ पासून ५केजी पल्प काढतो आणि १५०रु/केजी ने विकतो " इथं पर्यंत त्या महिलेचे वाक्य आहे , म्हणजे 700 रु प्रत्येकीला मिळतात असा अर्थ होती ."
आता आपल्या हिशोबाने मांडणी करूया हा!(जरी तसे नसले तरीही) प्रत्येक महिला रोज २५केजी सीताफळ प्रोसेस करत असेल तर १२ महिलांचे मिळून ३०० केजी सीताफळ होतात!! तेही एका दिवसाला! हा तर उद्योग समूह झाला! बर असो, एकीचे रोजचे उत्पन्न ७०० रुपये पकडले तर मासिक उत्पन्न किती होते? ७००*३०=२१००० रुपये एका महिन्याचे उत्पन्न तेही प्रत्येकीचे!! इतके पैसे पल्प काढून मिळायला लागले तेही दर महिना तर इंजिनीरिंगची नवीन पोरं ८०००-१०००० मिळणारा पगार सोडून पळतील कि हो पल्प काढायला! :D शिवाय इतके भरघोस उत्पन्न असते तर समूहाच्या बायका स्वतःच का तक्रार करत असत्या कि फायदा होत नाहीये, गुंतवलेले पैसे देखील मिळत नाहीयेत? त्यामुळे नेक्स्ट टाइम कोणाला बुद्धी वापरायला, लॉजिक लावायला, शब्दांचा कमी खिस पडायला सांगत असाल तेव्हा जरा विचार करा... चर्चा नीट देखील केल्या जाऊ शकतात, जमल तर बघा!
त्या महिला त्यांचे कर्तृत्व आनंदाने सांगत आहेत तर तुम्ही त्यांच्या आनंदावर ( प्रसून , बरखा , कन्हया , कुबेर यांच्या सारखे) विरजण का घालताय ?
मला त्या रिपोर्ट मध्य महिला तक्रार करताना दिसल्या... तुम्हाला कुठे आनंदाने सांगताना दिसल्या? बाकी अर्णव वगैरे "पत्रकार" आपले लाडके असतील दिसतंय बाकीचे विरजण घालणारे! :D

In reply to by शब्दबम्बाळ

माझा मुद्दा हाच आहे की जर दिवसाला ६०-७० रुपये कमावणाऱ्या महिलेला तुम्ही उत्पन्न दुप्पट झाल्याची रोल मॉडेल दाखवणार असाल (समूहाचे खरे उत्पन्न इतका कारनामा झाल्यावर सरकारला सिद्ध करता आले असते पण ते अजूनही झालेच नाही) तर शेतकरी कशाला इतक्या भानगडीत पडेल?
मान्य आहे सरकारने चार्टर्द अकाऊंटटचा रिपोर्ट उपलब्ध झाल्यावर दावा केला म्हणजे अधिक बरे झाले असते, पण तरीही म्हणून प्रसून वाजपेयींच्या वार्तांकनाला चार्टर्द अकाऊंटटचा रिपोर्ट चा दर्जा देता येतो का हे आपल्या परिचयातील चार्टर्ड अकाऊंटला विचारावे.
जाऊदे दमलो आता सांगून, जर त्या महिलांना खरंच फायदा होत असता तर त्या तक्रार करताना दिसल्या नसत्या.
एवढ्यात दमलायसा ? फक्त सांगण्याची सवय झाली की असे होत नाही ना ? जरा कान देवून मूळ प्रसारण ऐकावे म्हणजे ३०० चा आकडा कुठून येतो ते कळेल. नफा/तोटा मोजण्यासाठी प्रसून वाजपेयींच्या वार्तांकनात कोणती माहिती नाही हे आपणास प्रतिसादात लिहूनही लक्षात घेणे अवघड जाते, आता माझ्या वर विश्वास वाटत नसे, (आणि लगेच वाटणार नाहीच कारण चष्मे ) तर चार्टर्ड अकाउंटट आणि कॉस्ट अकाउंटट ना हे व्हिडीओ आणि माझे विश्लॅषण दाखवून त्यांचे मत घ्या. जी माहिती परिपूर्ण नाही त्या बेसिसवर निष्कर्ष काढणे योग्य आहे का त्यांना विचारावे. हे क्लिअर वेगळा पॉईंट टाकून लिहिले तरी पहात नाही. त्यातर अशिक्षीत स्त्रिया आहेत कोणी पत्रकार संपूर्ण अकाऊंटीग न तपासता चुगल्या पोहोचवून भांडणे लावून देण्याची व्यवस्था करतो हे शहाण्पणाचे लक्षण आहे का ?
---३०० स्त्रिया??...
यूट्यूब व्हिडिओ पहाण्याचे कुणाचे काही सुटत आहे का ? ते प्रसून वाजपेयींचे तुकडे बाजूस ठेऊन मूळ प्रसारण पहाण्यास सुचवले होते . खाली दिला होता पुन्हा एकदा देतो. आणि अजून एक तुमच्या प्रतिसादातील कॅल्कुलेशन मध्ये 'रोज' हा शब्द पुन्हा पुन्हा येतोय तो नेमक्या कितव्या मिनीट सेकंदाला कोणत्या महिला सदस्याच्या तोंडात कोणत्या युट्यूब मध्ये येतो ते सांगावे मूळ प्रसारण दोनदा पहा ओळखीतल्या चार्टर्ड अकाउंटट आणि कॉस्ट अकाउंटटला माझा प्रतिसाद दाखवून त्यांचे मत कळवा, मग पुढे बोलू. तो पर्यंत दोन मूळ प्रसारणे पुन्हा एकदा. आणि चंद्रमणीचे

In reply to by शब्दबम्बाळ

काही तरी गोंधळ झालेला दिसतोय , मी नक्की कोणता व्हिडिओ बघणे अपेक्षित आहेत ते तारीख, पोस्टिंग ची वेळ सहित द्या म्हणजे माझ्या पण डोळ्यावरील भाजप प्रेमाचे कातडे दूर होण्यास मदत होईल . एका प्रतिसादात तुम्ही 10.11 ते 12 .27 या वेळेचा व्हिडिओ बघा म्हणताय तर एकदा 8 त 9 या वेळेचा बघा म्हणताय . नक्की कोणती वेळ आणि कुठल्या तारखेचा किती वाजता पोस्ट केलेला व्हिडिओ ते पण सांगा , आपण हा सगळा गोंधळ मिटवून टाकू . एकदा तुम्ही कन्हया चा व्हिडिओ टाकून त्याचे गुणगान करत होता , तो व्हिडिओ पहिल्या नंतर मी उपस्थित केलेले मुद्द्यांवर स्पष्टीकरण द्यायच्या ऐवजी अंतर्धान पावले ,आता तसे नका करू . थोडक्यात अंतर्धान होण्याची इमेज नका बनवून घेऊ .

In reply to by ट्रम्प

महिगारांच्या ज्या प्रतिसादाला तुम्ही "सडेतोड" असा प्रतिसाद दिला आहे त्यातच त्यांनी एक व्हिडीयोची लिंक दिली आहे त्याबद्दल बोलतोय. त्यातला वेळेचा तुकडा हि सांगितलंय तुम्हाला... तुम्ही तो प्रतिसाद पूर्ण वाचला असावा अशी अशा करतो
एकदा तुम्ही कन्हया चा व्हिडिओ टाकून त्याचे गुणगान करत होता
आपल्याला गुणगाण चा अर्थ कळत असावा अशी अपेक्षा आहे. ट्रेंड मार्क यांनी वाट्टेल तसे आरोप केले आणि गायब झाले, ते कसे बिनबुडाचे आहेत (पीएचडी बद्दल) हे मी स्पष्ट केले. तसेच अजून काही शंका असतील तर त्याचा स्वतःचा व्हिडीओ पहा म्हणजे बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळतील हे सांगितले होते. यात आपल्याला "गुणगान" कुठे दिसले? त्याखाली आपण मात्र ट्रोलिंग करायला सुरुवात केलीत... त्याच्या उच्चारांचा आधार घेऊन कमी लेखण्याचा प्रयत्न केलात त्यामुळे असल्या प्रतिसादांना मी फाट्यावर मारतो. अजून एक, या कांकेर च्या महिला सीताफळाचा उच्चार "छिताफळ" असा करतात, भारी वाटत ऐकायला ते! पण मी काय म्हणतो करा कि इथं पण जरा उच्चारांवरून ट्रोलिंग? कसे... माझ्या इमेज ची चिंता नसावी, स्वतःची मात्र करू शकता...

In reply to by शब्दबम्बाळ

कन्हैया भक्ताबरोबर कुठे वाद घालणार म्हणून मी उत्तर दिलं नाही. तो एवढा पीएचडी करतोय म्हणजे मिती बुद्धिवान असेल आणि त्याचे भक्त पण तेवढेच बुद्धिवान असणार. आम्ही पामर कुठे पासंगाला पण पुरणार नाही. तुमचे धन्यवाद मानतो, माझ्या ज्ञानात भर टाकलीत की पीएचडी करणाऱ्यांनी काम न करता फक्त सरकार अनुदान देतंय म्हणून काही न केलेलं चालतं. तसेच एकूणच आकलनशक्ती आणि हुशारी जास्त असल्याने त्यांना विचारस्वातंत्र्यही जास्तच असलं पाहिजे. म्हणून ते काहीही बोलले, कुठल्याही घोषणा दिल्या तरी त्या बरोबरच असल्या पाहिजेत. तळटीप: माझी कन्हैयावरून (किंवा उमर खालेद, शेहला रशीद वगैरे) वाद घालायची अजिबात इच्छा नाही आणि माझ्याकडे तेवढा वेळही नाही. तुम्ही त्याला दैवत मानत असाल तर तुमच्यासाठी चांगलंच आहे. आणि हो मला माझ्या इमेजची चिंता आहेच. माझ्या कुठल्याही आयडी वरून मला देशद्रोहाचं समर्थन करायचं नाही किंवा ज्यांची निष्ठा संशयास्पद आहे अश्या लोकांबरोबर कुठल्याही तर्हेने जोडलं जायचं नाहीये.

In reply to by शब्दबम्बाळ

दीड महिन्यांपूर्वी च्या भिडे गुरूजींच्या धाग्यावरील कन्हया बद्दल ची तुम्ही अर्धवट ठेवलेली चर्चा आता पुन्हा सुरू करताय ? अरे वा छानच आहे ! तुम्ही म्हणाला होता म्हणून तुम्हाला मी वेगळा धागा काढण्यासाठी समर्थन दिले होते , म्हणजे काय कन्हैया बद्दल सगळे विषय भविष्यात एकाच धाग्यावर सापडतील . तो माझा प्रतिसाद पुढील प्रमाणे होता . एव्हलांचं प्रूफ टेंट के लिये सिर्फ भाजप को जिम्मेदाड पकड रहे है ? काँग्रेस ने क्यो नही लिये ? 2) बिहाड में जो दलितो की हत्याये हुई उसके लिये भाजप क्यो ? नितीश कुमार जिम्मेदाड नही है ? 3) दलितो की बुक बॅन के बारे में बोलते वक्त मनुस्मृती बॅन के बारे में क्यो नही बोले ? 4) आरक्षण के बारे में बोलते वक्त गटड साफ करने वाले और मंदीड के पुजाडी की बात करते करते प्रायव्हेट कम्पनी में आरक्षण क्यो नही ऐसा उन्होंने सवाल किया . कीधड की लिंक कीधड जोड रहे हैं वो ? प्रायव्हेट कम्पनीयो में भला गटड साफ कडने वाले और मंदिड के पुजाडी का क्या काम , वाहां टॅलेंटेंड लोगो को ही चूनते है फिर वॊ किसीं भी जाती से हो . सिड्फ गव्हर्नमेंट में आरक्षण के नाम पर कुछ भी चलता हैं . 5) हमारे भारत में दलितो की जीवन अवस्था के लिये सिर्फ चार साल पुराणी भाजप की सरकार जिम्मेदाड है ? दलितो की जीवन अवस्था के लिये काँग्रेस की कोई जिम्मेदाडी नही ? अगर है तो आज तक हमने श्रीमान कन्हया कुमार जी को काँग्रेस के खिलाफ बोलते वक्त हमने नही देखा . अगर आपने देखा है तो डालीये बीडीओ . 6) कन्हया कुमार जी बिहाड से आये है और बिहाड की जो दुरावस्था लालूप्रसाद ने की है , कन्हया जी ने उनके बारे में भी कभी गुस्सा आज तक नही दिखाया ? ऐसा क्यो ? सभी प्रॉब्लेम के लिये सिड्फ भाजपा की गलती है क्या ? त्याच्या उच्चरा प्रमाणे लिहिलेल्या शब्द फाट्यावर मारा पण कन्हया बद्दल उपस्थित केलेले प्रश्न फाट्यावर मारणे म्हणजे शुद्ध पळपुटेपणा आहे

In reply to by ट्रम्प

किती दुतोंडीपणा हो? कन्हैयाचा विषय तुम्ही स्वतः या धाग्यावर काढलात (ज्याची इथे गरज नव्हती पण असो ) आणि आता मला म्हणताय
दीड महिन्यांपूर्वी च्या भिडे गुरूजींच्या धाग्यावरील कन्हया बद्दल ची "तुम्ही" अर्धवट ठेवलेली चर्चा आता पुन्हा सुरू करताय ?

चर्चा "मी" तिथेही सुरु केली नव्हती आणि इथेही केलेली नाही!(तुमच्याशी तर नाहीच नाही)

काही अतिउत्साही स्वयंघोषित देशभक्त (जे स्वतः देश सोडून डॉलर छापायला बाहेर राहतात आणि फावल्या वेळेत देशभक्तीची सर्टिफिकेट वाटतात) जे आरोप करत होते पीएचडीबद्दल त्याचे मी उत्तर दिले, हे मी वरच्या प्रतिसादात लिहिले आहेच. आपल्याला मराठी कळत असेल अशी अपेक्षा आहेच! तुम्ही जे बोलला होतात कि मी त्याचे तिथे "गुणगान" करत होतो ते दाखवून द्या, मग पुढचं बोला. मी कन्हैया बद्दल तुमच्या कुठल्याही प्रश्नाचे उत्तर द्यायला बांधील नाही, त्याची विचारधारा निवडायला तो स्वतंत्र आहे आणि त्यातला जे मला पटेल त्याला समर्थन द्यायला मी स्वतंत्र आहे आणि जे पटणार नाही ते नाकारायलाही. तुम्हाला काही प्रॉब्लेम? बाकी पंप्र जेव्हा "गेल्या ६०वर्षात काहीच प्रगती झाली नाही" म्हणतात तेव्हा त्यांना विचारायला जाता का हो? फक्त तुम्हीच प्रगती करताय काय म्हणून, काँग्रेस पण काहीतरी केलं असेल कि! प्रत्येकाची एक "राजकीय" मांडणी असते. कन्हैयाची पण असेलच, त्याचा तुम्हाला काय त्रास आहे ते मात्र कळलं नाही! आणि तुम्हाला वेगळा धागा हवा आहे म्हणत आहेत ना, इथे बघा.. शांतपणाने सगळी झालेली चर्चा बघा आणि तिथे टीका करा. टीका करण्याला काहीच हरकत नसावी पण वरच्या ट्रेड मार्क यांच्या प्रतिसादात असल्या प्रमाणे समोरच्याला (म्हणजे मलाच! :D ) "संबोधने" देऊन प्रतिमा हनन करणे हे ट्रोलिंग आहे. मग त्यानुसार प्रत्युत्तर द्यावे लागते आणि चर्चा खुंटते (बऱ्याच लोकांना हेच हवे असते) आणि हो मुद्द्यावर परत येत... सापडला का एकदाचा व्हिडीओ?!

In reply to by शब्दबम्बाळ

भक्त म्हणणे म्हणजे ट्रोलिंग करणे आहे होय? म्हणजे मोदींच्या म्हणा किंवा भाजप किंवा रास्व संघाच्या बाजूने बोलणाऱ्याला नुसते भक्तच नाही तर इतर विशेषणांनी संबोधण्यात येते त्याला काय म्हणतात? तुमच्या प्रतिसादांमधून तुम्ही कन्हैयाला बरंच मानता असं दिसतंय, मग भक्त फक्त मोदींना मानणारेच असतात का? काही अतिउत्साही स्वयंघोषित देशभक्त आता इथे पण तुम्ही मला ट्रोल करताय, काय? (जे स्वतः देश सोडून डॉलर छापायला बाहेर राहतात आणि फावल्या वेळेत देशभक्तीची सर्टिफिकेट वाटतात) जे आरोप करत होते पीएचडीबद्दल जळू नका हो! मी कोणालाही देशभक्तीची सर्टिफिकेट वाटत नाहीये. पण ज्यांच्या देशभक्तीविषयी थोडी सुद्धा शंका आहे अश्या लोकांबरोबर मला जोडलं जायचं नाहीये. बादवे, कामानिमित्त दुसऱ्या देशात राहणे हे देशद्रोहाच्या क्याटेगरीत मोडत नाही, स्पष्ट करतो कारण तुमचा सूर तसाच दिसतोय. पीएचडी बद्दल म्हणाल तर कन्हैया काही एकटाच पीएचडी करतोय का? इतर असंख्य पीएचडी करणारे काम करता करता पीएचडी करत असतात. अगदी फुल्ल टाइम काम करणे जमत नसेल तरी पार्ट टाइम किंवा इंटर्न म्हणून असं काहीतरी काम करतात. कन्हैया असं काही करतो का? बरं त्याचा पीएचडी चा विषय कुठला? तर आफ्रिकन स्टडीज! पीएचडी कधी चालू केलं तर २०११ मध्ये ७ वर्ष झाली अजून आफ्रिकन स्टडीज पूर्ण झालं नाही. त्याचे वडील अर्धांगवायूने अंथरुणाला खिळलेले आहेत, आई अंगणवाडी सेविका म्हणून काम करते. मोठा भाऊ आसाममध्ये कुठल्यातरी कंपनीत सुपरवायजर म्हणून काम करतो. त्यांची एक एकर शेती पण आहे पण बहुधा कोणी त्याकडे लक्ष देत नसावे. म्हणजेच घरची परिस्थिती काही फारशी बरी नाही, आई आणि आजारी वडील यांना सोडून हा बाकीचे उद्योग करत बसतोय. पण तो त्याचा वैयक्तिक प्रश्न झाला, माझा आक्षेप आहे तो हे बाकी नसते उद्योग करण्यावर. सरकारी अनुदान मिळतंय म्हणून ७ वर्ष झाली तरी पीएचडी पूर्ण व्हायचं नाव घेत नाही. खूपच अवघड विषय दिसतोय! त्याची विचारधारा निवडायला तो स्वतंत्र आहे आणि त्यातला जे मला पटेल त्याला समर्थन द्यायला मी स्वतंत्र आहे आणि जे पटणार नाही ते नाकारायलाही. तुम्हाला काही प्रॉब्लेम? मग मी माझी विचारधारा निवडली तर तुम्हाला काय प्रॉब्लेम? फुकटात सगळं पदरात पाडून, देशाच्या प्रगतीला कुठलाही हातभार ना लावता वर "हमे चाहिये आझादी" (न जाणे कशापासून) असल्या घोषणा देणे हे माझ्या मते देशद्रोह असेल तर तुम्हाला काय प्रॉब्लेम? असले लोक निदान घरभेदी तर म्हणलेच पाहिजेत. जवळपास ३० वर्षाचं झाल्यावर सुद्धा स्वतः काम न करता "हमे चाहिये गरिबीसे आझादी" म्हणतोय याचं तुम्हाला आश्चर्य वाटलं नाही? आफ्रिकन स्टडीज मध्ये पीएचडी करून त्याला तसंही काय काम मिळणार आहे म्हणा. तुम्ही आणि कन्हैया दोघेही मोदीविरोधी आहात हे मी समजू शकतो. तुम्हाला विरोध करण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण याची विरोधाची पातळी त्याच्या ट्विटर अकाउंट वर जाऊन बघा. एका ट्विटमध्ये तर लिहिलय - स्वतःच्या पत्नीनंतर मेहबूबाला पण सोडणारे मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत. दुसऱ्या एकात लिहितोय "कुछ दिन तो गुजारो मोदीराज मे, फट के आ जायेगी हाथ मे". समस्त चॅनेल आणि सोशल मेडियामधून मोदींना यथेच्छ शिव्या घालून वर हे लोक मोदी आम्हाला बोलू देत नाहीत, भाषणस्वातंत्र्याची गळचेपी होतीये हे कसं काय म्हणू शकतात?

In reply to by शब्दबम्बाळ

आम्ही २५केजी सीताफळ पासून ५केजी पल्प काढतो आणि १५०रु/केजी ने विकतो आणि यातून पूर्ण समूहाचा ७००रुपये नफा होतो! १ केजी सीताफळ मार्केट मधली किंम्मत = ८० ते ९० रु/ किलो २५केजी सीताफळ किंम्मत = २००० रु. ( ८० रु किंम्मत धरुन ) २५केजी सीताफळ पासून ५केजी पल्प काढतो आणि १५०रु/केजी ने विकतो म्हणजे एकुण = ७५० रु च्यायला २५ किलो सीताफळ मार्केट मध्ये विकण परवडणार की : १२५० रु चा लॉस करुन वर पल्प करायची मेहनत वर लॉस, बहोत बडा लोचा है इसमे !!

In reply to by डँबिस००७

साहेब लोचा मुंबई पुणे किंवा मोठ्या शहरातील मार्केट प्राईस उत्पादकाला मिळत असते ह्या समजण्यात आहे. तुम्ही ज्या ८०/९० किंवा दिडशे किंवा प्रसंगी अडिचशे च्या दराने फळे घेता तो दर उत्पादकाला व्यापार्‍याकडून कधीच मिळत नसतो. त्यांना मिळणारा दर हा पेरीशेबल गूड्सचे भाव पाडून २५ किलोस ५० रुपये इत्यादी मिळतात हे त्या भगिनीने सांगितलेच आहे. समजा फळांचे दर मार्केट मध्ये वाढले तर प्रक्रीया केलेल्या उत्पादनावर प्रॉफीट अधिक मिळावयास हवा कमी नव्हे. आपण सिताफळाची मार्केट व्हॅल्यू लक्षात घेतली तेव्हा सिताफळ पल्प पासून बनणारे सिताफळ रबडी, सिताफळ आईसक्रीमचे मार्केट भाव लक्षात घेतले का ? नसतील ते पहावेत. सहकारी क्षेत्रात प्रक्रीया कृत उत्पादनाचे उत्पादन वितरण आणि भाव विषयक निर्णय चुकूनही तोटा येऊ शकतो किंवा तिथेही फसवणूक भ्रष्टाचार होनारच नाही याची शाश्वती देता येत नाही पण नेमके अकाउंटींगचे आकडे मिळत नाहीत तो पर्यंत हे सगळे कयास झाले आणि कयासांच्या आधारावर मोदींची बदनामी करणे ठिक त्याचा त्यांना सराव आहे. खेडे गावातील नेतृत्व करणार्‍या अशिक्षीत स्त्रीस केवळ मांडणी न जमल्यामुळे बदनामीस हकनाक तोंड द्यावे लागणे आणि भारत भरच्या स्त्री स्व-मदत गटांची माध्यमांच्या आणि बातमीदारांच्य अनिअभिज्ञते मुळे अथवा हलगर्जीपणामुळे हकनाक बदनामी होणे कित्पत श्रेयस्कर आहे या बाबत साशंकता वाटते असो.

In reply to by डँबिस००७

लोच्यांया जागा वेगळ्या अधिकारी स्तरीय असू असतात. जसे की सिताफळ प्रक्रीया करणार्‍या पल्पिंग मशिन विकणारी कंपनी आहे. या नव्हे पण अशा कंपन्यांचे विक्रेते सरकारी अनुदान नेमके कोणत्या स्कीम मध्ये कोणत्या आधिकार्‍याकडून जाते ते बघतील आणि त्याच्याशी संधान बांधतील आणि प्रकल्प अनुदान लवकर मंजूर व्हावे म्हणून अमुक एक टक्के अधिकार्‍यांच्या हातावर टिकवू शकतात. नरसिंह राव पंतप्रधान असताना मनमोहन सिंग अर्थ मंत्री असताना पि.एम आर.वाय. स्वयं रोजगार स्कीम आली - अशा स्किम्स नंतर दलित, आदिवासी, ओबीसी यांच्यासाठी त्यांच्या त्यांच्या महामंडळातून येत राहील्या - त्यात तरुणांना अमुक एक अनुदान मिळे . या साठी डिस्ट्रीक्ट इंडस्ट्रीज सेंटर कडे अ‍ॅप्रोच करावा लागे आणि नेमके तिथे विवीध कंपन्यांचे सप्लायर डिस्ट्रीक्ट इंडस्ट्रीज सेंटरच्या अधिकार्‍यांना पटवून स्वतःचे इप्सित साध्य करुन घेत. जवळून तटस्थपणे बरेच काही बघितलेय. लिहिन कधि तरी योग आल्यास

In reply to by माहितगार

जर लिहिले तर व्यक्ती / मंत्री किंवा राजकीय पक्षांकडे बोटे न दाखवता नाव न घेताच लिहिन; त्यामुळे असे कुणी हित संबंधी कुणि असे काही लिहिणार म्हणून वाचतील तर बावचळून जाण्याचे कारण नसावे हे असे कुणि वाचक आलेच तर लक्षात घ्यावे ही नम्र विनंती.

In reply to by माहितगार

माहितगार साहेब, जवळून तटस्थपणे बरेच काही बघितलेय. लिहिन कधि तरी योग आल्यास तुम्ही लिहाच !! मला म्हणायच हे आहे की कोणत्याही व्यवसायाचा पाया हा प्रॉफिट हाच अशु शकतो. तोटा होत असताना ही व्यवसाय दोन तीन वर्ष करत असणे म्हणजे अक्कलशुन्यपणाच कारण व्यवसायासाठी घरुन पैसे कोण नेणार ? फार वर्षांपुर्वी मुंबई होलसेल मार्केट मध्ये साबण वडी , त्यांच्या मार्केट भावा पेक्षा ही स्वस्त मिळत असे. त्या व्यापार्याला विचारल तर तो म्हणाला नफा हा त्या कार्टन बॉक्स ( (ज्या कार्टन बॉक्स मधुन साबणाच्या व ड्या येतात ) विकुन मिळतो साबणाच्यावड्या विकुन नाही.

In reply to by डँबिस००७

....त्या व्यापार्याला विचारल तर तो म्हणाला नफा हा त्या कार्टन बॉक्स ((ज्या कार्टन बॉक्स मधुन साबणाच्या व ड्या येतात ) विकुन मिळतो साबणाच्यावड्या विकुन नाही.
=)) असे नसते हो सरजी, टर्नओव्हर नामकी भी कोई चीज होती है. व्यापारी अजून बरचं काय काय करतात. आपण म्हणता तो व्यापारी नक्कीच नफ्यात असेल. स्वयंरोजगार चालू करणार्‍ञां नवागतांना मी नेहमीच हे व्यापारी धोरण अंगिकारण्यासाठी सांगत असे. व्यवसाय फायद्यात नसताना फायद्यात असल्याचे सांगावे आणि फायद्यात असेल तर नुकसानीत करतोय म्हणून सांगावे, या पॉलीसीचे स्ट्रॅटेजिक बेनीफीट असतात आणि भारतीय व्यापारी यात पारंगत असतो.

In reply to by माहितगार

व्यवसाय फायद्यात नसताना फायद्यात असल्याचे सांगावे आणि फायद्यात असेल तर नुकसानीत करतोय म्हणून सांगावे, या पॉलीसीचे स्ट्रॅटेजिक बेनीफीट असतात आणि भारतीय व्यापारी यात पारंगत असतो.
याबद्दल अधिक लिहावे जमल्यास. वाचायला आवडेल.

हा पुण्य प्रसुन वाजपेयी म्हणजे तोच तथाकथित संतुलित पत्रकार ना, ज्याने खालील मुलाखत घेतली होती ! ---

ह्या पुण्य प्रसुन वाजपेयी सारखे भाट पत्रकार, संतुलित पत्रकारितेच्या नावावर लोकांना कश्या शेंड्या लावतात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे खालचा व्हिडिओ. ---

बेंगळुरू मिरर’ने दिलेल्या वृत्तानुसार कर्नाटक सरकारने सात मिनिटांच्या शपथग्रहण सोहळ्यावर ४२ लाख रूपये खर्च केले. अरविंद केजरीवाल यांनी ताज वेस्ट एंडमध्ये २३ मे रोजी सकाळी ९.४९ वाजता चेक इन केले. आणि २४ मे रोजी सकाळी ५.३४ वाजता चेकआऊट केले. ज्या दिवशी ते आले त्यादिवशी इन-रूम डायनिंग, खाण्या-पिण्याचे बिल ७१०२५ रूपये आणि बेव्हरेजचे ५००० रूपयांचे बिल झाले. आता काय म्हणावे असल्या आम आदमींना ?

In reply to by शाम भागवत

भारतीय अर्थव्यवस्था धावणाऱ्या हत्तीप्रमाणे: आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ही बातमी लोकसत्तानेपण दिलीय म्हणून मला ही बातमी वाटली. :)

In reply to by शाम भागवत

मूळ बातमी India's economy is an elephant that's starting to run, says IMF अशी आहे. बातमीच्या शीर्षकाचे भाषांतर करताना केलेला बदल लोकसत्ताने का केला (पक्षी : नकारात्मक सनसनाटी निर्माण करण्याच्या हेतूने केला का ?), हे त्या वर्तमानपत्राचा पूर्वेतिहास पाहता समजण्यासारखे आहे ! :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

डॉ, सही प्रतिक्रीया ! वर्तमानपत्राचा पूर्वेतिहास आहेच तसा !!

माझ्या माहितीप्रमाणे हत्ती भरपूर वेगात पळू शकतो.बाकी 'सामना' चे मुखपत्र असल्याने आणि इतर बऱ्याच कारणांमुळे लोकसत्तेबाबत माझा पास. :) 'आमच्या वाघाच्या डरकाळीमुळेच हत्ती पळायला लागला आहे' अशी बातमी उद्याच्या लोकसत्तेत छापली गेली तर आश्चर्य नाही.

In reply to by तेजस आठवले

हत्ती ताशी २४ किमी वेगाने पळू शकतो. परंतु तो चारही पाय एकदम उचलत नसल्याने (#) हत्ती "पळतो" हे व्याख्येप्रमाणे बरोबर नाही असे शास्त्रज्ञांचे मत होते. # याच कारणाने हत्तीला उडी मारता येत नाही. परंतु हत्ती चारी पाय एकदम न उचलता एका वेगळ्याच तर्हेने धावण्याचा वेग गाठतो. जिज्ञासूंनी खालील दुवा वाचून पाहावा. https://news.stanford.edu/pr/03/elephants49.html 'आमच्या वाघाच्या डरकाळीमुळेच हत्ती पळायला लागला आहे' अशी बातमी उद्याच्या लोकसत्तेत छापली गेली तर आश्चर्य नाही. ह ह पु वा

भारतिय अर्थव्यवस्था धावणार्‍या हत्तीप्रमाणे = भारतिय अर्थव्यवस्थेच्या हत्तीसारख्या धावण्यामुळे आजूबाजूच्या बर्‍याच चांगल्या गोष्टी उध्वस्त होऊ शकतात. कारण, धावणार्‍या हत्तीची उपमा त्याच्या वेगापेक्षा जास्त त्याने होणार्‍या नुकसानाकरताच जास्त दिली जाते. लोकांच्या कल्पनाशक्तीप्रमाणे अजून काही बर्‍यावाईट अर्थांनाही वाव आहे. :) India's economy is an elephant that's starting to run = हत्तीसारख्या ताकदवान असलेल्या भारतिय अर्थव्यवस्थेने आत्ता कुठे वेग पकडायला सुरुवात केली आहे... या वाक्यरचनेत, "भारतिय अर्थव्यवस्था तगडी आहे आणि ती भविष्यात अजून वेगवान होण्याचा संभव आहे" असा सकारात्मक रोख आहे. *** 'आमच्या वाघाच्या डरकाळीमुळेच हत्ती पळायला लागला आहे' अशी बातमी उद्याच्या लोकसत्तेत छापली गेली तर आश्चर्य नाही. हहपुवा. पण, पूर्वेतिहासाच्या पार्श्वभूमीवर, असे खरोखरच झाले तरी आश्चर्य वाटणार नाही. ;)

Give me chance I will make better Rafael Aircraft -- Congress MP Rajesh Jakhar गेल्या तीस वर्षांपासुन भारतीय शास्त्रज्ञ तेजस नावाच विमान विकसित करत आहेत !! त्यावेळेला ह्या राजेश जाखर ला कदाचीत विमान बनवायला येत नव्हत !

मुख्यमंत्र्यांचा गृह खात्यावर वचक नाही याचे हे दुसरे उदाहरण , पाहिले महाराष्ट्र बँकेच्या म्यानेजर ला अटक करणे . महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) नालासोपारा येथून वैभव राऊत याला अटक केली असून त्याच्या घरातून आणि दुकानात काही संशयास्पद साहित्य जप्त करण्यात आले आहे. यात स्फोटकं बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याचा समावेश आहे. तसंच आठ देशी बॉम्बही मिळाले आहेत. दरम्यान हिंदू जनजागृती समितीने वैभव राऊतची अटक ही ‘मालेगाव पार्ट २’ असल्याची शंका येत असल्याचं म्हटलं आहे. वैभव राऊत सनातन संस्थेचा साधक असल्याचा बातम्यांमध्ये उल्लेख आहेत. वैभव राऊत धडाडीचा गोरक्षक असून तो ‘हिंदू गोवंश रक्षा समिती’ या गोरक्षण करणाऱ्या संघटनेच्या माध्यमातून कार्यरत होता अशी माहिती हिंदू जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट यांनी दिली आहे.

BHEL (Bharat Heavy Electricals Ltd.) ने कधी पासून मोबाईल निर्मिती करायला सुरुवात केली ? कारण राहुल गांधींनी छत्तीसगडच्या प्रचारात आरोप केलाय की मोदींनी BHEL कडून मोबाईल का खरेदी केले नाहीत. --- https://www.jagran.com/politics/national-congress-president-rahul-gandh…

वैभव राऊतच्या घरून जप्त करण्यात आलेली स्फोटके मराठा मोर्चात घातपातासाठी-आव्हाड Updated: Aug 11 2018 03:35 p.m. | Written by लोकसत्ता ऑनलाइन महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक अर्थात एटीएसने हिंदू जनजागृतीच्या वैभव राऊतच्या घरी धाड टाकून स्फोटके पकडली. ही सगळी स्फोटके मराठा आंदोलनात घातपात घडवण्यासाठी होती असा आरोप राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. या संदर्भातले ट्विटच जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. महाराष्ट्रात अराजक माजेल यासाठी हा प्रयत्न करण्यात आला. वैभव राऊतच्या घरी सापडलेली स्फोटके मराठा आंदोलनात घातपात घडवण्यासाठी होती असा आरोप आव्हाड यांनी केला आ

जसं प्रधानसेवकांनी सहाशे कोटी मतदार म्हटले होते तसलाच प्रकार आहे हा. BSNL ऐवजी BHEL बोलून गेले राहूल गांधी.

मला एक गोष्ट नाही समजली महाराष्ट्रात सरकार कुठल्याही पक्षाचे असुद्या निवडणुकीच्या अगोदर कथित हिंदू दहशतवादी का सापडतात ? आणि यामुळे नक्की कुठल्या पक्षाचा फायदा होतो ? राहिला प्रश्न आव्हाडांच्या बेलगाम वक्तव्याचा , मराठा मतदारांनी भाजप सेना आणि दोन्ही काँग्रेस यांच्या पैकी कोणालाही मतदान न करता सरळ NOTA चा वापर करावा जेणे करून मराठी मतदारांना निवडणुकीतील मतदाना पुरते वापरणे बंद होईल .

आर्टीकल ३५अ रद्दबादल करण्यासाठी सुप्रिम कोर्टात याचिका दाखल केलेली आहे. त्यानंतर सध्या देशात आर्टीकल ३५अ वर जोरदार चर्चा चालु झालेली आहे. १९५४ नंतर देशाच्या संविधानात प्रेसिडेंशीयल ऑर्डर खाली काही गोष्टी घुसडल्या गेल्या त्यात आर्टीकल ३७० हे एक मुख्य होते. गेल्या ७० वर्षांत ह्या टेंपरवरी आर्टीकल ला हात लावायची कोणत्याही सरकारची हिंम्मत झालेली नाही. काय आहे आर्टीकल ३५अ : Article 35A of the Indian Constitution is an article that empowers the Jammu and Kashmir state's legislature to define “permanent residents” of the state and provide special rights and privileges to those permanent residents.[1][2] It was added to the Constitution through a Presidential Order, i.e., The Constitution (Application to Jammu and Kashmir) Order, 1954 - issued by the President of India on 14 May 1954, exercising the powers conferred by the clause (1) of the Article 370 of the Indian Constitution, and with the concurrence of the Government of the State of Jammu and Kashmir.[3] १९४७ नंतर पाकिस्तानने काश्मिरमध्ये तुर्की अतिरेकी लढवय्ये पाठवुन तिथल्या काश्मिर भागाचा कब्जा घेतला. आज त्या भागाला आपण पाकिस्तान ने बळकावलेला काश्मिर अस संबोधतो. भारताने तो भाग परत मिळवण्याचा खास असा प्रयत्न कधी केलाच नाही. त्या वेळेला तिथल्या ६ ते ७ लाख हिंदु जनतेने तिथुन पळ काढलेला होता, ते तिथुन जम्मु काश्मिरमध्ये स्थलांतरीत झाले. त्या आश्रित लोंकांना आर्टीकल ३५अ खाली आश्रित लोकच समजतात. मुळचे काश्मिरी भारतीय १९५४ नंतर ना भारतीय राहीले ना काश्मिरी राहीले. ६ ते ७ लाख लोक आजही जम्मुच्या रस्त्यावर रहातात. ह्या लोकांच्यावतीने काही लोकांनी सुप्रिम कोर्टात आर्टीकल ३५अ रद्द व्हावा ह्यासाठी याचीका दाखल केलेली आहे.

In reply to by तुषार काळभोर

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा, दोन तासात 94 कोटी गायब! हा प्रकार येणार्या संभाव्य धोक्याकडे ईशारा करतोय, डीजीटल बँकेच्या सुरक्षा यंत्रणा सुसज्ज, सक्षम, व अद्ययावत असणे गरजेच आहे हे अधोरेखीत होत आहे. पैसे वाचवण्याच्या प्रकारा मुळे थातुर मातुर सुरक्षा यंत्रणा राबवुन काम होणार नाही . एकंदरीत सुरक्षा यंत्रणा म्हणजे पैश्याचा अपव्यय हा भारतातील लोकांचा दृष्टीकोण असतो. अति महत्वाचा क्लोज सर्कीट कॅमेरा बर्याच ठिकाणी अजुन लावलेला नाही. जर लावलेला असेल तर तो काम करत नसतो. सगळ्याच गोष्टी लाल फितीत अडकवुन काम होणार नाही. लोकांची मेंटॅलीटी बदलली पाहीजे हा भारत देशाच्या विकासात एक महत्वाचा भाग आहे.

भारताला परदेशात कसोटी मालिका जिंकून देणारे पहिले कर्णधार अजित वाडेकर यांचं दीर्घ आजाराने आज मुंबईतल्या जसलोक रुग्णालयात निधन झालं. ते 77 वर्षांचे होते. अजित वाडेकर यांच्या नेतृत्त्वात भारताने 1971 साली वेस्ट इंडिज आणि इंग्लंड दौऱ्यात कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम गाजवला होता. 1

https://timesofindia.indiatimes.com/city/meerut/this-i-day-hindu-mahasa…
हे काय चाललंय देशात काही कळत नाही! :-( आधी शरीया कोर्टाच्या मागण्या आता हे हिंदू कोर्ट. मागच्या आठवड्यात संविधान जाळले गेले, मनुस्मृती झिंदाबाद अश्या घोषणा दिल्या गेल्या. नक्की कोणत्या मार्गावरून जातोय आपला देश??

उत्तुंग व्यक्तिमत्व... सर्वसमावेशक नेतृत्व... अमोघ वक्तृत्वाचे धनी आणि अमेरिकेच्या नाकावर टिच्चून भारताची आण्विक तटबंदी भक्कम करणारे भारताचे माजी पंतप्रधान 'भारतरत्न' अटलबिहारी वाजपेयी यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं. ते ९३ वर्षांचे होते. गेल्या अनेक वर्षांपासून सार्वजनिक जीवनापासून दूर असलेल्या वाजपेयींची प्रकृती वयोमानानुसार खालावली होती. मागील ९ आठवड्यांपासून त्यांच्यावर दिल्लीतील 'एम्स' रुग्णालयात उपचार सुरू होते. कालपासून त्यांची प्रकृती अधिकच खालावत गेल्यानं रात्री त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. अखेर आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. वाजपेयींच्या निधनामुळं अवघा देश हळहळला असून त्यांच्या रूपानं भारतीय राजकारणातील समन्वयी युगाचा अस्त झाल्याची भावना व्यक्त होत आहे.