स्मार्ट फोन ची निवडनुक

लेखनविषय:
नमस्कार मित्रांनो... आज काल सगळ्यांच्याच खिशात स्मार्ट फोन विसावलाय, (विसावलाय कसला :-) ) किंवा ज्यांच्या कडे नाहि ते सुध्दा स्मार्ट फोनच घ्यायचा विचार करतायेत तसेच ज्यांच्या कडे आहे ते त्यांच्या माॅडेल ला कंटाळलेत, मार्केट मधे ईतक्या व्हरायटीज आहेत कि गोंधळुन जायला होतं, नेट वरिल रिव्हयुज पण एका मर्यादे पर्यंत मदत करतात कारण तेहि बर्याचदा पेड असतात, तर या सगळ्यांन वर आपण मिपाकर एक मेकांची मदत करु शकतो BaseMark OS II हे टुल वापरुन, कदाचीत बर्याच जनांना कंम्प्युटर साठी असलेले belark adviser आठवत असेल त्याच धर्तीवर हे टुल काम करते.

बंबईसे आया मेरा दोस्त

मला लहानपणापासूनच बंबईसे आया मेरा दोस्त ह्या गाण्याचे खूप अप्रूप होते. बऱ्याच वेळेला मी हे गाणे गुणगुणायचो. कळत न कळत माझ्या मनावर (नको तो) परिणाम झालाच. म्हणजे शाळेत/महाविद्यालयात जात असताना रात्र रात्र जागून अभ्यास करणे, साहजिकच सकाळी उशिरा उठणे, कसे अगदी चांगले वाटत होते! पण तरीहि, काही तरी चुकल्यासारखे वाटायचे, कारण कि आमची न शिकलेली आजी सारखी सांगायची कि “लवकर निजे लवकर उठे, तया ज्ञान आरोग्य संपत्ती भेटे”

आता तुमीच सांगा रायल बुलेट वापरावी का? ऑ?

लेखनविषय:
आता तुमीच सांगा रायल बुलेट वापरावी का? ऑ? तसं म्हनाल तर आपला बारदाना लई मोट्टा है. चाळीसपंनास एकर उस है. निम्मा उस जातोय साकरकारखान्यात. निम्या उसाचं गुर्‍हाळं लागत्यात. द्राक्षे है. मागल्या सालाच्या मागल्या साली वायनरी फैक्ट्रीचे सत्तर टक्के शेर घेतले. द्राक्षे वायनरीत नाय तर फारेनला जात्यात. सोसायटी, ग्रामपंचायत झालंच तर पंचायत समिती आपल्याच ताब्यात है. पुढल्या सालाला झेडपीत उडी मारायची है. दोन गण आपलेच है त्यामुळे फिकीर नै. उगाच नै कै पंचक्रोशीत बाळासायेब म्हनून आपल्याला वळखतेत. काय? तस सौंसारपानी बरा चाललाय. घरामदी एकाला तिन तिन गाड्या हैत.

(सगळ्यात पहिला झाडू कोणी बनवला असेल?)

लेखनविषय:
लेखनप्रकार
सणासुदीचे दिवस आले नं की मला लहानपणापासून एक प्रश्न पडतो, म्हणजे स्साला हे घर आवराआवरीचं खूळ सर्वात पहिले मानवाच्या डोक्यात कधी आलं असेल? म्हणजे सगळ्यात पहिला झाडू कोणी बनवला असेल? कधी बनवला असेल? आणि कसा बनवला असेल. विशेषतः खराट्यांचं कौतुक वाटतं हो, तिच्यामारी कोणाच्या सुपीक डोक्यात आलं असेल कि आधी नारळाची वगैरे झाडं लावा, मग झावळी खाली आल्यावर हीर काढायचा प्रकार म्हणजे "सृष्टीच्या सृजनशीलतेचा अप्रतिम नमुना असलेल्या मानवाच्या सृजनशीलतेची आणि कल्पकतेची आणि साफसफाईची आणि नीटनेटकेपणाची हाईट" वाटते मला! तसेच इतर अन्य पदार्थांचे ही, जसे कि चिखलटिपणी!

मिपा वरील सुधारणांसाठी विनंती

लेखनविषय:
लेखनप्रकार
मिपा हे मराठी संकेतस्थळ समजल्यापासून अगदी रोज न चुकता भेट देत आहे. मिपावर रोज येणारे लेख, कविता हा म्हणजे तर जणू खजिनाच आहे. इथे एकदा भेट दिली कि काहीतरी मनोरंजक, ज्ञानवर्धक लिखाण नाकीच वाचायला मिळत. इस्पिकचा एक्का, गवि, स्पा, वामनसुत, विसोबा खेचर, जॅक डनियल्स यांचे लेख म्हणजे तर पर्वणीच असते वाचकांसाठी. हे सर्व वाचत असतांना लेखनासारख्या नवीन क्षेत्रात माझ्यासारख्या नवीन व्यक्तीला काहीतरी लिहिण्याची स्फूर्ती न येओ तर नवलच. मला ह्या संस्थळावर काही गोष्टींची उणीव भासते, ती मी इथे मुद्देसूद मांडण्याचा प्रयत्न करतो आहे.

एक मुलाखत: गप्पाटप्पा शिळबाबांसोबत

एक मुलाखत: गप्पाटप्पा शिळबाबांसोबत श्रोतेहो, आज होळीनिमीत्त आपल्या स्टुडीओमध्ये प्रसिद्ध शिळपादक श्री. शिळबाबा आलेले आहेत. आपण त्यांच्याशी बोलून त्यांच्या या आगळ्यावेगळ्या छंदाबाबत माहीती करून घेवूया. निवेदकः नमस्कार शिळबाबा. होळीनिमीत्ताने आपणाला शुभेच्छा. शिळबाबा: नमस्कार, नमस्कार. आपणालाही होळीच्या शुभेच्छा! निवेदकः शिळबाबा, संपूर्ण राज्यात आपल्या शिळपादनाची किर्ती पसरलेली आहे. गावोगावी आपल्या शिळपादनाचे कार्यक्रम होतात. या सर्व कार्याबद्दल आपल्याला काय वाटते? शिळबाबा: माझ्यासारख्या एकमेव शिळपादकाला मिळालेली किर्ती पाहून मला खुपच समाधानी वाटते.

मिपावरील तज्ञांचे मार्गदर्शन हवे आहे !

लेखनप्रकार
तर्‍हेतर्‍हेचे प्रश्न पडतात. उत्तरे शोधून सापडत नाहीत. अशावेळी मिसळीवर यावे वाटते. मिसळीवरचे तज्ञ काही मार्गदर्शन करु शकतील ही आशा असते. भारत देशामधे अनेक शतकांपासून हिंदू धर्म विद्यमान आहे. तर असे सांगितले जाते की या देशात खूप विषमता होती. त्यापासून सुटका व्हावी म्हणून पिचलेल्या लोकांनी इतर धर्माचा अवलंब केला. हे कितपत सत्य आहे ? विदेशी आक्रमकांबरोबर आलेले धर्म इथल्या लोकांनी स्वखुशीने स्वीकारले. तर मग ते स्वीकारल्यानंतर झोपडीत राहणारे लोक राजवाड्यात गेले का ? पूर्वीचे गुलाम नंतर राजे नाहीतर निदान सरदार बनल्याची उदाहरणे आहेत का ? विदेशी आक्रमक जे इथल्या जनतेवर जिझिया कर लादत असत.

<तुम्ही मंगळवादी आहात का?>

लेखनविषय:
लेखनप्रकार
तुम्ही मंगळ वादी आहात का? ब्रांडेड जन्मपत्रीका...महागडे ज्योतिषी ..अंगठ्या, खडे व अक्सेअसरिज .. उंची नवग्रह शांती ..मंगळ शांती ... लग्न न जमणे , कडक मंगळाच्या मुलीचे मौ मंगळाच्या मुलाशी लग्न इत्यादी..इत्यादी .. मंगळ वाद पूर्वी आमच्या लहान पणी पण होता पण स्वरूप निराळे होते .. पत्रीकेत मंगळ असलेल्या मुलीचे लग्न साध्या मुलाशी लागले तर मुलगा मरतो मात्र मंगळाच्या मुलाचे लग्न साध्या मुलीशी झाले तर शाअंत कली तर काही होत नाही. हल्ली नजर सुरक्षा कवच , स्वर्ग चे ज्योतिषाचार्य वगैरे नव्या टेक्नॉलॉजीज आल्या आहेत.......

समसचा २० वा वाढदिवस

लेखनविषय:
लेखनप्रकार
३ डिसेंबर १९९२ ला नील पॅपवर्थ नामक ब्रिटन मधील एका टेलीकम्युनिकेशन मधे काम करत असलेल्या इंजिनियरने मोठ्या संगणकावर Merry Christmas असे टंकले आणि "एंटर" चे बटन दाबताक्षणी ते युकेस्थित व्होडाफोनच्या एका डायरेक्टरच्या हाताच्या पंजापेक्षा मोठ्या असलेल्या मोबाईल फोनवर चमत्कार झाल्याप्रमाणे ते अवतिर्ण झाले आणि जगातला पहीला एस एम एस तयार झाला. अर्थात एका हाडाच्या इंजिनियरच्या दृष्टीने त्याने एक प्रयोग केला आणि तो यशस्वी झाला. यापुढे काही नव्हते. पण कंपनीच्या उद्योजक मनास त्यातूनच एक मोठी धंद्याची संधी दिसली. पुढे बघता बघता एस एम एस चे प्रस्थ वाढत गेले.
Subscribe to प्रश्नोत्तरे