मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

व्यक्तिचित्र

तू जीव माझा- तू प्राण माझा - आलीस तू अवचिता

चित्रगुप्त ·
तू जीव माझा - तू प्राण माझा - घ्यावया नच होतीस आली मालूम होते मला शौच्यालयात घुसता मग सावरून बसता मोबाइलात रमता आलीस तू अवचिता जवळि जवळ येता मग कडकडून डसता मम उष्ण रक्त प्रशिता मेरा चैन-वैन सब लुटिता वाजवून टाळिका मी जीव तुझा - मी प्राण तुझा - हरिला - अल्विदा मच्छरिनी - अल्विदा. .

गुरुदेवांना श्रध्दान्जली

खिलजि ·
लेखनविषय:
त्याचा अस्त जणू माझ्या आठवणींचा उदय मी आणि माझ्या आठवणी रंगत जाते महफील नूरानी घेर वाढता अंधाराचा हळूच येते अश्रू घेऊनि कैक आठवणी ताज्या अजुनी पुन्हा परतती नव्या होऊनि वेळेचा मग मी माग काढतो आठवणींवर स्वार होऊनि पुन्हा निराशा हाती येते अश्रुंचे बहू मोल देउनी कधी तिमिर मज सखा भासतो तरीही स्वतःशी एकटा हसतो नेहेमीप्रमाणे तो पुन्हा उगवतो आठणींचा पुन्हा अस्त होतो

बगूमामा

मालविका ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
बगूमामा खर तर आईचा मामा आणि माझे मामाआजोबा. पण अगदी लहान वयात त्यांना आजोबा म्हणणं जीवावर यायचं. मी आईसारखचं बगूमामा म्हणायचे. यथावकाश समज आल्यावर मी आमचं नातं समजून घेऊन त्यांना आजोबा म्हणायला लागले. परवा आजोबा गेल्याच कळलं आणि डोळे भरून आले. कितीतरी आठवणी उचंबळून आल्या. आजोबांना कोकण भारी प्रिय. इकडे यायचं म्हणजे आजोबा केव्हाही तयार. अगदी कितीतरी वर्ष आजोबा २ व्हिलर घेऊन पार्ल्यातून चिपळूणला यायचे. शेवटी आता तुम्ही २ व्हिलर वरून एवढा प्रवास करायचा नाही अशी बंदी घातली तेव्हा ते थांबले. कुठलंही काम करायला घ्या आजोबा उत्साहाने तयार. माझी आजी तर त्यांची लाडकी.

सात वेळा मेलेला माणूस "The Dead Man"

rushikapse165 ·
खेळ.खेळ म्हणजे खेळच.मग तो कुठलाही असो.आजकाल एक नवा ट्रेंड चाललाय,काय तर,90'Kids.तसा मी काही नव्वदच्या दशकातील नाही.आणि नसलो तरी मी काही दुर्देवीही नाही,कारण माझा जन्म तो २००० सालचा,त्यामुळे संगत होती ती नव्वदच्याच दशकाची. तो काळही तसाच होता.T.V.नावाचा प्रकार तितकासा सगळ्यांकडे नसायचा.त्यात त्यावेळच्या रामानंद सागरांच्या रामायण आणि श्रीकृष्ण या मालिकांनी अगदी दशक उलटल्यानंतरही आपलं वर्चस्व प्रेक्षकांच्या मनावर गाजवलं होतं,आणि त्यामुळे ज्याघरी T.V.त्याघरी संध्याकाळी गर्दी हे ठरलेलं.आणि दुसरं काय तर?क्रिकेट,त्यावेळी क्रिकेट म्हणलं की सचिन अाणि सचिन म्हणलं की क्रिकेट,एवढंच गणित.आणि आमच

पत्रकारितेतला दिप्स्तंभ

शूकरोपम ·
लेखनप्रकार
न्यूज अँकर, मल्टीमीडिया पत्रकार आणि लेखक ते इंडिया टुडे समूहाचे सल्लागार संपादक, आणि इंडिया टुडे टेलिव्हिजनचे आँकर. एक माणूस आपले खेत्र गाजवतो तो म्हणजे राजदीप सरदेसाई! यांचे निवडणुक बोलणे तर खास असते. असा एकदम बॅलन्स मानूस आपल्या टिव्हिच्या माध्यमात आहे हे आपले भाग्य आहे. कोणतेही टोपिक असो हा मानूस एकदम मुळाशी जातो. नेहमी पुर्ण दुसरा बाजू दाखवून देतो. या यशस्वी मानसाने साध्या रिपोर्टर मह्नून सुरुवात केली. पन कोणत्याही प्रामानिक मानसाला त्याचे काम वर घेउन जात असते. तसे त्याने मोठमोठ्या टिव्हि चानेल्स साठी काम केले आहे.

एस. पी. आम्ही फक्त तुलाच नाही तर आमच्या तारुण्याला देखील गमावलं आज....

अबोलघेवडा ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
हॅलो SP ... कालच बातमी आली तू आम्हाला सोडून गेल्याची आणि खरं सांगतो तुझा चेहरा आणि आमच्या आठवणीतलं आमचं तारुण्य दोन्हीही पकडीतून निसटून गेलं बघ... बातमी वाचली तेव्हा कुठे कळलं की तू ७४ वर्षांचा होतास. हो कारण या अगोदर आम्ही तुला तुझ्या आवाजामुळे सतत तरुणच समजत होतो. आवाजाला कुठे रे असतं कधी वय? आणि तू जी हिट गाणी दिलीस ना तेव्हा आमचं तारुण्य ऐन भरात होतं त्यामुळे SP कधी म्हातारा होऊच शकत नाही अशी ठाम समजूत झाली होती आमची. मैने प्यार किया (१९८९) पासून तू जो आमच्या तारुण्यात आलास तिथपासून ते हम आपके है कौन (१९९४) पर्यंत म्हणजे आमचं सगळं कॉलेज विश्व तू बरोबर व्यापून राहिलास.

Once in a lifetime....!

डॉ श्रीहास ·
२८ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर Govt. Medical college ला कोव्हीड ड्यूटी केली. पण ड्युटीची नोटीस हातात पडल्यावर पहिली प्रतिक्रिया ... मला का जावं लागतंय , बाकी लोकं जातीलच! माझी ओपिडी तशीही कमी आहे नुकतीच वाढतीये , मागचे कितीतरी दिवस अर्ध्यापेक्षा कमी वेळ काम करतोय ना ? मलाच infection झालं तर सरकार जबाबदारी घेणार का ? मग जवळच्या मित्रांनी जाणीव करून दिली की ही संधी आहे काहीतरी भव्यदिव्य घडतांना साक्षीदार होण्याची आणि आपण समाजाचं काहीतरी देणं लागतोच ना मग जाऊन ये ड्युटीला... आई बाबांना काळजी होती पण मी जावं ही इच्छा देखील होतीच. भुतो न भविष्यती अशी परिस्थिती ...

नंस न ओढताही आठवत काहीबाही

माहितगार ·
कोविडमुळे नाक-शिंकर-प्राणायाम करताना आठवतं काहीबाही.. 'शिंच्या येणारे, तंबाखू चुना आण 'आऽआऽऽआऽऽआक्षीऽऽऽऽऽ' गाय-छाप!