लेख
पुन्हा एकदा पहाट झाली
गेले काही दिवस रोज एक कावळा पुनईच्या उंंचच उंच झाडावर बसून आपल्या घराण्याचा तीव्र स्वर सोडून कोमल स्वरात साद घालताना दिसत होता. त्याच्या गोड बोलण्याला दाद देणारे आसपास कोणीच दिसत नव्हते.
गावात कावळे दिसेनाचे होवूनही कितीतरी काळ लोटला हे त्याला माहीतीच नसावे असे वाटत होते.
आज सकाळी त्याच्या हाकेला दूरवरुन
उत्तर आले, आणि थोड्याच वेळात आसमंत कावळ्यांच्या कर्कश्य गाण्यांनी गजबजून गेले.
सगळं काही संपून गेल्यावर
कोणी पुन्हा पुन्हा साद घालतो
तेव्हा मनात येतं
याला काही अर्थ नाही.
पुस्तक परिचय: कोल्हाट्याचं पोर - लेखक: किशोर काळे
मागच्या वर्षी वाचनालयात पुस्तक शोधत असताना माझ्या हाती किशोर शांताबाईं काळे यांचं कोल्हाट्याचं पोर नावाचं पुस्तक लागलं. पुस्तकाच्या मलपृष्टावरील ओळी वाचल्यानंतर दुःख झालं आणि किशोर काळे व त्यांच्या आईबद्दल मनात उत्सुकता निर्माण झाली. त्याच दिवशी हे पुस्तक मी घरी नेलं आणि एका बैठकीत मी ते वाचून काढलं होत.. काही दिवसांपूर्वी मी ते दुसऱ्यांदा वाचलं आणि त्याबद्दल लिहण्याचा मोह आवरला नाही…
परदेशस्थ भारतीय
चोरी
छोटा कृष्णा मित्रांसोबत वाड्याच्या अंगणात खेळण्यात गुंग होता. "कृष्णा गौरव्वा आहे का रे घरात ?" ह्या प्रश्नाने त्याचे मन खेळातून बाहेर आले, त्याची मान आवाजाच्या दिशेने वळली - सत्तरी ओलांडून गेलेल्या आज्जी काठी जमिनीला टेकवून उभ्या होत्या. त्याने होकारार्थी मान हलवली . पळत आत जाऊन वर्दी दिली - "आई स्वामी आज्जी आल्या आहेत. " गौरव्वा हातातलं काम टाकून डोक्यावरचा पदर सावरत स्वयंपाक घरातुन बाहेर आली. तोपर्यंत स्वामीनबाई सोप्यातल्या आरामखुर्चीत येऊन विसावल्या होत्या. गौरव्वानं त्यांच्या पायावर डोकं टेकवलं.
मंटी बिंटी आणि घंटी
मंटी बिंटी आणि घंटी
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
मला प्राणी आवडत नाहीत अन हिने मांजर पाळलं . म्हणजे माझं काय झालं असेल ?...ज्यांना प्राणी आवडत नाहीत त्यांनाच माझं दुःख कळू शकेल .
पापी पेटका सवाल साला ! हुं ! पेट !
एवढी मोठी बाई ! जी नवऱ्याला नाचवू शकते, ट्रेन करू शकते,गोंडा घोळायला लावू शकते, ती उगा एखाद्या प्राण्याच्या मागे का लागावी? तेही मी असताना ! तिला प्राण्यांची फार आवड आहे , फार कळवळा आहे, असं तुम्हाला वाटत असेल तर ते चूक आहे. खरं कारण वेगळंच होतं.
शिकार...
मंदिराच्या समोर बांधलेल्या चौथऱ्यावर आम्ही तिघे मी, दया आणि रवी आकाशाकडे तोंड करून असेच पहुडलो होतो. एकदम निरभ्र आकाश, एक सुध्दा काळा ढग नव्हता. निळीतून काढलेल्या सफेद कपड्यासारखं निळसर पांढरं, कुठे कुठे शेवरीच्या झाडाखाली पडलेल्या कापसासारखे पांढरे शुभ्र ढग, त्यावर अगणित चांदण्याचा अंधुक प्रकाश, या सौंदर्यात भर घालण्यासाठी नुकताच उगवलेला पूर्ण चंद्र. दृष्ट लागावी असं ते दृश्य. क्षणभर वाटलं कुणाची नजर लागू नये म्हणून तरी, एखादा काळाकुट्ट ढग हवा होता,. लहान भावाला कुणाची दृष्ट लागू नये म्हणून, आई त्याच्या गालावर काजळाचा टिळा लावायची. गोऱ्या गालावर तो टिळा खूपच सुंदर दिसायचा.
अंतर्गत सीमावाद (भाग-२)
ईशान्येकडील राज्यांमधील सीमावाद
स्वातंत्र्यानंतर ईशान्येकडील आसाम, नागालँड, त्रिपुरा इत्यादी प्रदेशांचे भारतीय संघराज्यात विलिनीकरण झाले. मात्र त्यात आसाममध्ये अनेक भाषिक, वांशिक, धार्मिक गटांचा समावेश असल्यामुळं हे सर्वात मोठं आणि वैविध्यपूर्ण घटकराज्य बनलं होतं. कालांतरानं स्थनिक समुदायांची मागणी आणि भाषावार प्रांतरचनेचं सूत्र यांच्या आधारावर आसाममधून विविध घटकराज्यांची निर्मिती करण्यात आली. तसं होत असताना सर्व घटकराज्यांनी एकमेकांच्या प्रदेशावर आपापले दावे करण्यास सुरुवात केली. त्यामुळं त्यांच्यात सीमावादाला सुरुवात झाली.
हरंगुळचं "हरहुन्नरी" शिक्षणकेंद्र
✪ हरंगुळच्या शिस्तबद्ध व अष्टावधानी जनकल्याण निवासी विद्यालयाला भेट
✪ विद्यार्थ्यांसाठी आकाश दर्शन व फन लर्न सत्र घेण्याचा अनुभव
✪ सत्रांमधला मुलांचा सहभाग आणि ऊर्जा!
✪ पहाटे चंद्र बघण्याचा मुलांचा अनुभव आणि त्यांना तो दाखवण्याचा माझा अनुभव!
✪ शिक्षकांचं काम किती कठीण असतं ह्याची झलक
✪ दिवसातून अडीच तास मैदानावर खेळणारे विद्यार्थी- दुर्मिळ दृश्य!
✪ सेरेब्रल पाल्सी व इतर बौद्धिक व शारीरिक दिव्यांगांसाठीच्या संवेदना प्रकल्पाला भेट
अंतर्गत सीमावाद (भाग-1)
अलिकडेच महाराष्ट्रातील विविध सीमावर्ती भागांमधील गावांनी आपल्याला शेजारच्या राज्यांमध्ये समाविष्ट व्हायचे आहे, असं म्हटलं आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमावादानं पुन्हा डोकं वर काढलं आहे. स्वातंत्र्यानंतर भाषा-आधारित घटकराज्यांची निर्मिती करण्यात आली. त्यामुळं काही घटकराज्यांमध्ये वांशिक, धार्मिक, भाषिक असे वैविध्य मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे. पुढील काळात विविध कारणांनी देशातील प्रत्येक समुदायाकडून आपल्यासाठी स्वतंत्र घटकराज्याची मागणी लावून धरली जात आहे. त्यामुळं भाषेच्या आधारावर घटकराज्यांची निर्मिती करण्याचे तत्व मागे पडले आहे.