मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अभिनंदन

श्री. श्री धमाल मुलगा यांचे अभिनंदन

निखिल देशपांडे ·
आज काल मिपाचा दर्जा खुप खालवलाय म्हणे.. सारखे कैच्या कैच फुटकळ धागे येत असतात!!!! मग अशा फुटकळ धाग्यात आम्हीही एक भर घालावीच म्हणतो. संपादक मंडळाला आमचा धागा उडवायचा पुर्ण अधिकार आहे याचे भान आम्हाला आहेच. पण मिपाच्या लेखनप्रकारात आम्हाला सद्भावना, शुभेच्छा आणि अभिनंदन असे लेखनप्रकार दिसले आणि आम्ही हा लेख लिहायची हिम्मत केली. (आता तुम्हाला म्हणून सांगतो, आम्हाला कळलंय की संपादक मंडळाला असे अभिनंदनाचे धागे आवडत नाहीत. कोण म्हणे रे तो आम्हाला कसे कळले??? अरे संपादक मंडळात राहुन अशा बातम्या कळत नाहीत रे भौ. त्यासाठी खास उपक्रमावर जाऊन रिकामटेकड्या लोकांचा खरडवह्या चाळ्यावा लागतात Wink.

श्री. ओक सर ह्यांस वाढदिवसानिमित्ताने हार्दिक शुभेच्छा!

हैयो हैयैयो ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आपले मिपा मित्र श्री. शशिकांत ओक सर ह्यांचा आज वाढदिवस आहे.. ..श्री. ओक सर, वाढदिवसानिमित्ताने हार्दिक शुभेच्छा! आंतरराष्ट्रीय नाडिग्रंथ अधिवेशनाबाबत आपले लेख येताहेत, अजूनही लेख वाचावयास आवडतील! धन्यवाद! हैयो! हैयैयो!

प्राजक्ता पटवर्धन यांचे अभिनंदन!

प्रसन्न केसकर ·
लेखनविषय:
मध असला की मधमाध्या गुणगुणतात, सुवास आला की भुंगे घोंघावतात आणि गुण दिसले की गुणग्राहक जमतात! या उक्तीचा प्रत्यय नुकताच पुण्यात आला, ख्यातनाम कवियत्री आणि मिसळपाव, मी मराठी आदि संस्थळांच्या सदस्या प्राजक्ता पटवर्धन यांच्या अल्बमच्या प्रकाशनाच्या निमित्ताने. मुळातच प्राजक्ता पटवर्धन या प्रतिभावंत कवियित्री. मिसळपाव, मी मराठी आदि संस्थळावरच्या रसिक वाचकांची त्यांच्या कवितांना आधीच भरभरुन दाद मिळालेली आहे. विविध संस्थळांचे मालक, संपादक आणि समस्त जालकरी मंडळींचा समर्थ पाठिंबा देखील त्यांना सतत मिळत असतोच.

नविन कथासंग्रह

स्पंदना ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मंडळीनमस्कार, हल्लीमिसळपावचा साहित्य क्षेत्रात उमटलेला ठसा जसा प्राजुच्या कविता संग्रहान रेखीव झाला तसाच आणखी एक ठसा उमटला आहे आपल्या सहप्रवासी अरुण मनोहरांच्या कथा संग्रहाचा!! या बद्दल माहिती मिळाली. अरुण मनोहर हे थोडस लांबुन पाहिलेल व्यक्तिमत्व. एकतर वयान ते जेष्ठ!! आणि सर्व कार्यक्रमात त्यांचा असलेला पुढाकार! सिंगापुरच्या मराठी साहित्यिक क्षेत्रात, अरुण मनोहर हे नाव माहित नसलेली व्यक्ती विरळच!

आम्ही : एका स्वप्नपूर्तीचे साक्षीदार

बिपिन कार्यकर्ते ·
लेखनविषय:
मराठी जालावर आल्यापासून जे काही लोक ओळखीचे झाले आहेत, जीवाभावाचे मैतर झाले आहेत, त्यात प्राजुचं नाव अगदी आवर्जून घ्यावं असं. मराठी आंतरजालावर जे काही लोक अगदी सातत्याने आणि चांगलं लेखन करतात त्यातही तिचं नाव अगदी अग्रणी आहे. तिच्या सुंदर कविता / गझला मराठी संस्थळांवर नियमितपणे प्रसिद्ध होत असतात. तर अश्या या आमच्या मैत्रिणीच्या कवितांचा एक अल्बम येऊ घातलाय ही बातमी कुठून कुठून कानी येतच होती. आता प्राजुचा स्वभाव माहिती असल्यामुळे हा अल्बम एकदम नीटनेटका आणि झकास होणार हे नक्की असे वाटतच होते.

सायना नेहवालचे अभिनंदन

अप्पा जोगळेकर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
सायना नेहवालने इंडियन ओपन, सिंगापूर ओपन आणि इंडोनेशियन ओपन (पैकी शेवटच्या दोन मागच्या एकाच आठवड्यात) अशा सलग तीन सुपर सीरीज जिंकून भारताची मान उंचावली त्याबद्दल हार्दिक अभिनंदन. खुट्ट झालं तरी त्या सवंग सानिया मिर्झाला प्रसिद्धी देणारी भारतीय माध्यमे गुणी, सिन्सिअर आणि मेहनती सायनाला देखील सध्या बर्‍यापैकी स्पेस देत आहेत हे पाहून आनंद होतो आहे. कालची मॅच ज्यांना पाहायला मिळाली ते भाग्यवान. आपले जे. पी. मॉर्गन सायनावर कधी लिहिणार याची वाट पाहतो आहे. - बॅडमिंटनप्रेमी अप्पा

वटपोर्णिमेच्या शुभेच्छा

शुचि ·
लेखनविषय:
(चित्र जालावरुन साभार.) वटपोर्णिमेच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. मला अतिशय आवडणारा समयोचित श्लोक "सौन्दर्य लहरी" मधून - विरिंचि: पंचत्वं व्रजति हरिरप्नोति विरतिं विनाशं कीनाशो भजति धनदो याति निधनम| वितन्द्री माहेन्द्रीविततिरपि अंमीलीत्-दृशा महासंहारेSस्मिन विहरति सति त्वत्पति-रसौ||२६|| महा संहाराच्या समयी विरंची (ब्रम्हा) हा पंचतत्वामधे विलीन होतो. किनासा(यम, प्रत्यक्ष मृत्यूचा देव) मृत्यू पावतो.कुबेर, धनाच्या देवतेचा अंत होतो.

आनंदाची बातमी

घाशीराम कोतवाल १.२ ·
लेखनविषय:
अभिनंदण होSSSSSSSSSSSSSSSS गोंद्या आला रे आला गुड न्युज रे ..धमाल 'बाबा'?? ऐ कोण आहे रे तिकड जा जा हत्ती वरुन साखर्‍या वाटा बारा- गुंजण मावळात , तळ कोकणात तोफांची सलामी द्या धमाल रावांच युवराज आले म्हनाव कळु दे जरा लोकांना आमचे स्नेही व मित्र श्री धमाल मुलगा ह्यांना मुलगा झाल्याची गोड बातमी कळाली ! धमाल मुलाचा धमाल बाबा झाला होSSSSSSSSSSSSSSSSSSSS

ब्लॉगवाले सावधान!

शानबा५१२ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
'फुगल'ने फतवा काढला आहे की,ज्या ब्लॉगवरच्या पोस्टना दहा दीवसापेक्षा जास्त वेळापासुन एकही प्रतिसाद मिळाला नाहीये व कधीच ज्या वाचल्या जात नाहीत/गेल्या नाहीत,त्या सर्व पोस्ट delete केल्या जातील.तेव्हा.............. ज्या मिपाकरांनी व त्यांच्या संबंधीत लोकांनी उगाच मोफत खरडायला मिळत म्हणुन जे पोस्ट,लेख(अर्थात फालतु हा शब्द कमी पडतो आहे) लिहले आहेत्,ते त्वरीत दुसरा एखादा बळी बघुन तिथे टाकावेत.उशीरा जाग आलेल्या,स्व:ताला अनुभवी लेखक/कवी समजणा-यांनी(त्यांचे गैरसमज वाढवणारे ही लेखकच/कवीच असतात,त्यांचा उद्देश हाच की आपला लेख कोणी माणुसकी म्हणुन वाचेल).......आपले ते पोस्ट स्वःताच कुठेतरी हलवावेत. काहींनी