पुण्यात शनिवारवाड्यासमोर जो पुल आहे ना
तिथे खुप गर्दी असते, गोंगाट असतो
डुप्लिकेट पीनांचे चार्जर तिथे मिळतात
ते अगदीच टाकाऊ असतात
मला तो भाग आवडत नाही
स्वारगेटला तुडुंब भरलेल्या पीएमटी बघितल्यावर मला भोवळ येते
चिंचवडला प्रशस्त महामार्गावरील हॉटेलात पावाबरोबर फरसाण्याची भाजी खाल्ल्यावर मला अशीच भोवळ आली होती
तेव्हापासून मिसळपाव हा पदार्थ मी व्यर्ज केलाय
बाकरवड्या खाल्ल्यावर नेहमी पोट दुखते
मग तीही मी कधी खात नाही
दगडूशेटला जाता जाता जोशी वडेवाल्याकडे मी ढुंकुनही कधी पाहत नाही
येरवड्याला एकदा बाईक पलटी झाली होती
मग तिकडे मी कधी गेलोच नाही
कोथरुडला जायचा मात्र प्रसंगच कधी आलाच नाही
रॅडीसनमध्य