कुणा न कळता.

लेखनविषय:
कुणा न कळता भेटत होतो तेव्हा आपण शब्दा वाचुनी जाणत होतो तेव्हा आपण. नुकता वसंत आला झाड झाड मोहरले नुकते हृदयी आपुल्या प्रीत झरे पाझरले नवे फुलोरे झेलत होतो तेव्हा आपण. भिडता डोळ्यास डोळे हृदयी अनामिक सूर पळभर दूर होता का उठते मनी काहूर मनो मनी का झुरत होतो तेव्हा आपण. तुझ्या आसपास माझे उगाच घुटमळने नजरेच्या कोनातून हळूच तुझे बघणे जरा आगळे वागत होतो तेव्हा आपण. दीपक पवार.

घाटरस्ता, निसर्ग आणि मी

लेखनविषय:
नुकत्याच होऊन गेलेल्या वर्षावाला, निथळून टाकणारी हिरव्याकंच कांतीची गर्द वनराई. सकाळचे कोवळे ऊन पिऊन तजेलदार झालेली नवी पालवी. स्वच्छ धुऊन निघालेले, लाल मातीच्या चिखलावर, रेखीव छान वळणदार रांगोळीची जणू निळीशार रेघच असलेले रस्ते. त्यावरून वळणे घेत घेत मी निवांतपणे, आजूबाजूचा निसर्ग न्याहाळीत, मजेत आवडीचे गाणे गुणगुणत, घाटमाथ्यावर चढून जातो आणि, पुढे तसाच खाली उतरून जातो. दिवसभर राबायला, सिमेंटमध्ये वाळू, खडी मिसळायला. परत येताना पुन्हा तेच सारं. - संदीप चांदणे (मंगळवार, १३/०९/२०२२)

गजानन

लेखनविषय:
निसर्ग बरसला सुखाचा पाऊस, आनंदाचा कंद घरी आला. भक्तीचा उत्सव आनंदले रोम गणपतीचा सण आला आला. सुखकर्ता आला विघ्नहर्ता आला, आयुष्याचा कर्ता घरी आला. वर्षभर ज्याची पाहतो मी वाट, तो दु:खहर्ता घरी आला. फुलला पारिजात उंचबळे सुवास, सुगंधाचा दाता घरी आला. विद्येचा ईश्वर ज्ञानाचा दाता बुद्धीचा विधाता घरी आला. --- अभय बापट

आठवण

लेखनविषय:
काव्यरस
जपला खिशात मी तुझा रुमाल होता गुलाबी पाकळ्यांचा देही गुलाल होता. आठवणीच्या खजिना उरात साठलेला स्वप्नांच्या वाटेवरचा तो हमाल होता. बांधलेला तुझ्यासाठी शब्दांचा महाल होता शब्दांनीच उभा केला पुढती सवाल होता. चढला होता रंग तुझ्या ही गालावरती की तुझा अभिनय तेव्हा कमाल होता. ---- अभय बापट

अतृप्त ओळी

लेखनविषय:
आत्मसमरूप दिसतात ओळी आत्मस्वरूप असतात ओळी . इथे नदीचा दिसतो काठ तिथे संथ प्रवाह पार लावतात ओळी . निराळ्या वेदनेच्या एकाच गावी दिसता दिसतो आम्ही सहप्रवासी कुठे दूर अंधारात हरवले गाव माझे दिसे मी उगाचच तिथला निवासी असे शब्द साधे येतात साथी कविता त्यातुन वाहते प्रपाती . उरी अंतरी घाव नाजूक खोल वरी दिसते केवळ शांत ज्योती ! आम्ही नाही ऐसे कवी ज्यास म्हणती जशी वेदना ती , तसे शब्द हाती. मनाचेच सारे इथे मांडयाचे .. न पूर्ती मिळे त्यातूनी .. काय त्याचे? असा मी ही अतृप्त अतृप्त आहे . . माझ्या स्वभावी मूळचा शाप आहे .

ओल्या खुणा

लेखनविषय:
काव्यरस
हळव्या झाल्या काळजातल्या ओल्या खुणा हृदयातला रेशमी घाव दाखवू कुणा फुले शोधता लागला जिव्हारी काटा डोळ्यातल्या दर्यात उसळती अश्रूंच्या लाटा नभाच्या वेशीवर उदास रंग उतरे उरी लागलेला बाण घेऊन रावा फिरे हरवून दूर गेली ओळखीची वाट मोरपीशी स्वप्नांचा कोसळू लागे तट मावळतीच्या वणव्यात सूर्यबिंब जळून गेले प्राणाच्या शेजेवर निखारे उधळून गेले

उष्णकटिबंधीय वसंत

वनस्पति उद्यानातून फेरफटका मारताना माहितीची पाटी नसलेले झाड पाहून साहित्यिक राजूमधील चौकश्याने विचारले हे झाड कोणते? त्याचा वनस्पती वैज्ञानिक मित्र म्हणाला उष्णकटिबंधीय म्हणजेच ट्रॉपीकल! (राजूने वेळ मारून नेणे कंसात जोडले) वनस्पती वैज्ञानिक मित्राने राजूची वसंत ऋतूवरील कविता ऐकुन झाल्यावर मोबाईलवर मराठी विकिपीडियावरचे वसंत ऋतूचे पान उघडत राजूला विचारले वसंत ऋतू आला हे कसे ओळखायचे ? झाडाला फुले लागल्यावर की कोकीळेने कुहू कुहू केल्यावर की वसंतऋतूवरील कविता ऐकल्यावर?

रोज किती पाणी प्यावे?

रोज किती पाणी प्यावे? शरीराची गरज असेल एवढे आणि आधुनिक विज्ञानाने सुविद्य डॉक्टर सुचवतील तेवढे रोज किती पाणी प्यावे? अन्न पिकविण्यासाठी शेतीसाठी शिल्लक राहील एवढे रोज किती पाणी प्यावे? शेती आणि शरीरांची गरज यांचे गणित नाही जुळली तर इतर अपव्यय टाळून लोकसंख्या नियंत्रणाचे महत्व ईतर चार जणांना पटवून शरीराची गरज भागेल तेवढे

आङळे वाङळें साहित्य संमेलन

आङळे वाङळें साहित्य संमेलन आङळे वाङळेंना म्हणाली मराठी साहित्य संमेलनाला नाही गेलात कसे ते? वाङळें आङळेंना म्हणाला तुमच्या आङळीकेचे साहित्याने अजीर्ण झाल्यावर इतर साहित्याला जागा आता उरलीच कुठे ?
Subscribe to कविता माझी