मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जाणिव

अरेबिक समुद्र ते हिंदी महासागर: जागतिक भाषा प्रेम

माहितगार ·

In reply to by माहितगार

साधा उपाय आहे... भाजपला शिव्या द्या, विशेषत: फडणवीस कसे अयोग्य आहेत ते लिहा. ह्याच्या उलट केलेत तरी चालेल.

In reply to by मुक्त विहारि

आजकाल, मिसळपाव वर तुमच्या लेखनावर प्रतिसाद न येणे, लेखनाच्या धाग्याचे काश्मीर न होणे हे लेखन उत्तम असल्याचा पुरावा आणि शाबासकी मानायची वेळ आलेली आहे , काय म्हणता ;)

In reply to by प्रसाद गोडबोले

पण सध्या मात्र व्यक्ती द्वेष आणि व्यक्ती पूजा जोरात आहे. पण त्यातही, "फडणवीस" मात्र दोघांचेही नावडते.... असो, आनंद आहे....

In reply to by मुक्त विहारि

एकदम खरं आहे .
फडणवीस
"महाराष्ट्र देशोधडीला लागला तरी टरबुज्या अणाजी पंत बामनी कावा करुन परत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला नाय पायजेल" हे वाक्य मी स्वतःच्या कानांनी ऐकले आहे! फुल्ल मजा आहे ह्या इथे =)))) कर्वे गोखलें आगरकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात सर्वच लोकं प्रचंड टोकाचे "पुरोगामी" आहेत हे धडाधडीत सत्य आहे ! घैसास केळकर ही नावे ऐकुन पहिला प्रश्न भिसे "कोण" असाच पडतो तुळजापुरच्या मंदिरातील पुजारीच ड्रग्जच्या व्यापारात आहेत हे कळाल्यावर पुजारी म्हणजे नक्की "कोण" असा प्रश्न पडतोच ! "शेटजी आणि भटजीच्या हातात राज्य देणार का " असे म्हणणारे "पुर्वी राजे पेशवाई द्यायचे , आता पेशवे राजे कोण ठरवतात" असे म्हणणारे किंवा "माझं हिंदुत्व हे शेंडी जानव्याचे हिंदुत्व नाही" असं म्हणणारे सगळ्यांना जातीय राजकारण, जातीय समीकरणं सर्व पुढार्‍यांना व्यवस्थित कळतात आणि वळताही आहेत , आणि त्यांना मते देणार्‍या मतदारांनाही ! जात नाही ती जात ! चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः। तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्।।4.13।। हे कळल्याचा मला मनापासुन फार आनंद होतो :)

In reply to by प्रसाद गोडबोले

तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्।। यातला कर्तार कुठल्या धम्माचा? भाषेची मिसळ झाल्याने निर्माण झालेली शंका..... हलकेच घ्या.

विवेकपटाईत 18/04/2025 - 18:19
उर्दू भाषा, नाजूक लाजरी, पर्शियन आणि अरेबिकची ती सुंदर कन्या. अमीर खुसरो ने खडी बोलीत रचना केल्या. पण दरबारी कवि असल्याने अरेबिक लिपि वापरली. अश्या रीतीने उर्दूचा जन्म झाला. खडी बोली हिन्दीची मानस कन्या उर्दू आहे. कालांतरात अरबी फारसी शब्दांचा वापर वाढू लागला. दरबारी लोकांच्या सोयी करता अमीर खुसरो ने खालीकबारी ज्यात प्रत्येक हिन्दी शब्दांचे , फारसी, तुर्की, अरेबिक अनुवाद चारोळी काव्य प्रकारचा माध्यमाने केला. एक पहेली उदा. फ़ारसी बोली आई ना। तुर्की ढूँढी पाई ना।। हिन्दी बोली आरसी आए। खुसरो कहें कोई न बताए।। उत्तर- आरसी (दर्पण, आइना)

In reply to by विवेकपटाईत

माहितगार 18/04/2025 - 20:25
सारे जहांसे लिहिणारा कवि कोणी होता नंतर तो पाकिस्तान प्रेमी झाला. खुसरोने आधी काय लिहील त्याची जी काही बोली असेल ते पण ध्येय काय अरेबिक म्हणून अरेबिक लिपी . पुढे तुम्ही काय म्हणताय ".. दरबारी लोकांच्या सोयी करता अमीर खुसरो ने खालीकबारी ज्यात प्रत्येक हिन्दी शब्दांचे , फारसी, तुर्की, अरेबिक अनुवाद चारोळी काव्य प्रकारचा माध्यमाने केला. " १) त्यांचे राज्यकर्ते दरबार फारसी, तुर्की, अरेबिक ला वाहिलेले होते आणि ते भारतात जन्मले म्हणून भारतीय होते आणि कथित भाषा संकर भारतातच झाला म्हणून उर्दु भारतीय! हो की नाही माझी कविता पण त्या संकराचीच तर दुहाई देते आहे. २) आपण हिंग्लिश आणि मिंग्लीशलाही भारतीयच म्हणतो की नाही नंतर त्यात हिंदी आणि मराठी शब्द नावापुरतेच उरले लिपी रोमन झाली आणि बहुसंख्य भारतीयांना नीट समजुन वाचता नाही आली तरी हिंग्लीशी आणि मिंग्लिशी भारतीयच रहाणार हो की नाही हक्कचे तो त्यांचा ३) कवितेत अरेबिक आणि फारसी लिपीचे तोंड भरून कौतुक राहुन गेले ते पुढच्या एखाद्या कवितेतून नक्की करूया

In reply to by माहितगार

माहितगार 18/04/2025 - 20:38
असंख्य वर्षांच्या पारतंत्र्यात अरेबिक आणि रोमन लिपीचे महत्व होते त्याच्या दहा अब्जपट तरी स्वातंत्र्यानंतर परकीय लिपींचे महत्व वाढलेच पाहीजे. जिथून भाकर मिळते तिकडे दंडवत सलाम करण्याशिवाय पर्याय नसतो अशी उक्ती सार्थच असते.

In reply to by माहितगार

साधा उपाय आहे... भाजपला शिव्या द्या, विशेषत: फडणवीस कसे अयोग्य आहेत ते लिहा. ह्याच्या उलट केलेत तरी चालेल.

In reply to by मुक्त विहारि

आजकाल, मिसळपाव वर तुमच्या लेखनावर प्रतिसाद न येणे, लेखनाच्या धाग्याचे काश्मीर न होणे हे लेखन उत्तम असल्याचा पुरावा आणि शाबासकी मानायची वेळ आलेली आहे , काय म्हणता ;)

In reply to by प्रसाद गोडबोले

पण सध्या मात्र व्यक्ती द्वेष आणि व्यक्ती पूजा जोरात आहे. पण त्यातही, "फडणवीस" मात्र दोघांचेही नावडते.... असो, आनंद आहे....

In reply to by मुक्त विहारि

एकदम खरं आहे .
फडणवीस
"महाराष्ट्र देशोधडीला लागला तरी टरबुज्या अणाजी पंत बामनी कावा करुन परत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला नाय पायजेल" हे वाक्य मी स्वतःच्या कानांनी ऐकले आहे! फुल्ल मजा आहे ह्या इथे =)))) कर्वे गोखलें आगरकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात सर्वच लोकं प्रचंड टोकाचे "पुरोगामी" आहेत हे धडाधडीत सत्य आहे ! घैसास केळकर ही नावे ऐकुन पहिला प्रश्न भिसे "कोण" असाच पडतो तुळजापुरच्या मंदिरातील पुजारीच ड्रग्जच्या व्यापारात आहेत हे कळाल्यावर पुजारी म्हणजे नक्की "कोण" असा प्रश्न पडतोच ! "शेटजी आणि भटजीच्या हातात राज्य देणार का " असे म्हणणारे "पुर्वी राजे पेशवाई द्यायचे , आता पेशवे राजे कोण ठरवतात" असे म्हणणारे किंवा "माझं हिंदुत्व हे शेंडी जानव्याचे हिंदुत्व नाही" असं म्हणणारे सगळ्यांना जातीय राजकारण, जातीय समीकरणं सर्व पुढार्‍यांना व्यवस्थित कळतात आणि वळताही आहेत , आणि त्यांना मते देणार्‍या मतदारांनाही ! जात नाही ती जात ! चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः। तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्।।4.13।। हे कळल्याचा मला मनापासुन फार आनंद होतो :)

In reply to by प्रसाद गोडबोले

तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्।। यातला कर्तार कुठल्या धम्माचा? भाषेची मिसळ झाल्याने निर्माण झालेली शंका..... हलकेच घ्या.

विवेकपटाईत 18/04/2025 - 18:19
उर्दू भाषा, नाजूक लाजरी, पर्शियन आणि अरेबिकची ती सुंदर कन्या. अमीर खुसरो ने खडी बोलीत रचना केल्या. पण दरबारी कवि असल्याने अरेबिक लिपि वापरली. अश्या रीतीने उर्दूचा जन्म झाला. खडी बोली हिन्दीची मानस कन्या उर्दू आहे. कालांतरात अरबी फारसी शब्दांचा वापर वाढू लागला. दरबारी लोकांच्या सोयी करता अमीर खुसरो ने खालीकबारी ज्यात प्रत्येक हिन्दी शब्दांचे , फारसी, तुर्की, अरेबिक अनुवाद चारोळी काव्य प्रकारचा माध्यमाने केला. एक पहेली उदा. फ़ारसी बोली आई ना। तुर्की ढूँढी पाई ना।। हिन्दी बोली आरसी आए। खुसरो कहें कोई न बताए।। उत्तर- आरसी (दर्पण, आइना)

In reply to by विवेकपटाईत

माहितगार 18/04/2025 - 20:25
सारे जहांसे लिहिणारा कवि कोणी होता नंतर तो पाकिस्तान प्रेमी झाला. खुसरोने आधी काय लिहील त्याची जी काही बोली असेल ते पण ध्येय काय अरेबिक म्हणून अरेबिक लिपी . पुढे तुम्ही काय म्हणताय ".. दरबारी लोकांच्या सोयी करता अमीर खुसरो ने खालीकबारी ज्यात प्रत्येक हिन्दी शब्दांचे , फारसी, तुर्की, अरेबिक अनुवाद चारोळी काव्य प्रकारचा माध्यमाने केला. " १) त्यांचे राज्यकर्ते दरबार फारसी, तुर्की, अरेबिक ला वाहिलेले होते आणि ते भारतात जन्मले म्हणून भारतीय होते आणि कथित भाषा संकर भारतातच झाला म्हणून उर्दु भारतीय! हो की नाही माझी कविता पण त्या संकराचीच तर दुहाई देते आहे. २) आपण हिंग्लिश आणि मिंग्लीशलाही भारतीयच म्हणतो की नाही नंतर त्यात हिंदी आणि मराठी शब्द नावापुरतेच उरले लिपी रोमन झाली आणि बहुसंख्य भारतीयांना नीट समजुन वाचता नाही आली तरी हिंग्लीशी आणि मिंग्लिशी भारतीयच रहाणार हो की नाही हक्कचे तो त्यांचा ३) कवितेत अरेबिक आणि फारसी लिपीचे तोंड भरून कौतुक राहुन गेले ते पुढच्या एखाद्या कवितेतून नक्की करूया

In reply to by माहितगार

माहितगार 18/04/2025 - 20:38
असंख्य वर्षांच्या पारतंत्र्यात अरेबिक आणि रोमन लिपीचे महत्व होते त्याच्या दहा अब्जपट तरी स्वातंत्र्यानंतर परकीय लिपींचे महत्व वाढलेच पाहीजे. जिथून भाकर मिळते तिकडे दंडवत सलाम करण्याशिवाय पर्याय नसतो अशी उक्ती सार्थच असते.
नक्कीच, पर्शियन आणि उर्दू भाषेतील प्रेमाची भावना दर्शवणारी कविता खालीलप्रमाणे: **पर्शियन आणि अरेबिक प्रेम:** पर्शियन भाषा, जणू सुंदर युवती, अरेबिक तरुणावर तिचे मन मोहित. मोहक अदा, नजाकत खास, प्रेमाचा रंग, जणू गुलाबाचा सुवास. **उर्दू, पर्शियन आणि अरेबिकची सुंदर कन्या:** उर्दू भाषा, नाजूक लाजरी, पर्शियन आणि अरेबिकची ती सुंदर कन्या. शब्दांची जादू, भावनांचा खेळ, सौंदर्याची खाण, जणू मोत्यांचा मेळ. **उर्दू आणि हिंदी प्रेम:** अशा सुंदर उर्दूचं, हिंदी तरुणावर मन भाळले. प्रेमाची कहाणी, जणू गोडते खेळ. शब्दांची गुंफण, रंगांची उधळण, दोन भाषांचं, हे अनोखं मिलन. **भाषा आरती** जय पर्शियन माता, सुंद

रोजचे मरणे - गूगल एआयची कविता

माहितगार ·

चित्रगुप्त 10/04/2025 - 08:58
नको मला कॉपीराईट किंवा कोणताच राईट बायको सांगते तेच खरे राईट तिने सांगावे, आपण वागावे यात काय वाईट ? (-- यावर जेमिनीताई काय म्हणते ?)

चित्रगुप्त 10/04/2025 - 08:58
नको मला कॉपीराईट किंवा कोणताच राईट बायको सांगते तेच खरे राईट तिने सांगावे, आपण वागावे यात काय वाईट ? (-- यावर जेमिनीताई काय म्हणते ?)
हि मी गूगल एआयला मुद्दाम लिहिण्यासाठी सांगितलेली कविता नाही. माझ्या याझिदी विषयक एका धागा लेखास मिपाकर चित्रगुप्तांनी "While living, be a dead one चा स्वानुभव." शिर्षकाचा प्रतिसाद दिला. अशाच आशयाच्या कुणा प्रसिद्ध कविच्या एखाद दोन कविता वाचनात येऊन गेल्याचे आठवत आहे पण नेमका कवि कविता किंवा कवितेच्या ओळी आठवत नाहीत म्हणून गूगल बाबाला "रोजचे मरणे कविता" हा शोध दिला तर गूगलबाबाने एआयच्या मदतीने स्वतःचीच कविता सादर केली.

क्षितिजाचे कुंपण

कर्नलतपस्वी ·
बालपण...... साखर झोपेच्या वळणावर अंदोलत स्वप्न हिंदोळ्यावर बांग कुणाची येता कानी विरून गेली सारी कहाणी तरूणपण...... विझल्या साऱ्या चांदणठिणग्या बघा बघा ती पहाटफुटणी छोट्या टीचभर खळगीसाठी धरावी आता वाट ही कुठली दगड मातीच्या रस्त्यामधूनी दिसेल काही अमोघ अद्भूत धावत होतो उर फुटोस्तर हाती आले मृगजळ सुंदर म्हातारपण...... झाली आता चांदणसंध्या चक्क कळाले भ्रमनिरास होणे ओलांडून क्षितिजाचे कुंपण उरले फक्त मार्गस्थ होणे

दोन ओळींची कविता,......

कर्नलतपस्वी ·

म्हटले तर प्रॅक्टीकल, म्हटले तर ईमोशनल . वाचक कुठल्या नजरेने वाचतोय त्यावर ठरेल. बाकी लिहिलेले खरेच असेल तर, ईच्छापत्र करणे ही काळाची गरज आहे असेच म्हणेन. त्यात भावना आणू नयेत. (कधीकाळी विमा काढा म्हटले तरी लोक म्हणायचे"का माझ्या मरणावर टपलायस?)

मृत्युपत्र म्हणले की नकळत डोळ्यात पाणी येतेच. मी कायमच माताहतांना विल बनवण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. वरिष्ठांनी इच्छापत्र करून आपले मनोगत जाहीर करून उर्वरित आयुष्य सुखात जगावे व नंतर प्रियजनांना होणारा कायद्याचा त्रास वाचवावा.

चित्रगुप्त 24/09/2023 - 22:42
आवडली चौदा ओळींची कविता. पण तिला 'दोन ओळींची' का म्हटले ते समजले नाही. समजा कुणा एकाची दोन - चार घरे/प्लॉट/शेतजमिनी वगैरे आहेत. त्या प्रत्येकाबद्दल वेगवेगळे इच्छापत्र करून ते त्या त्या कागदपत्रांबरोबर फायलीत ठेवावे असा सल्ला मला एका चांगल्या वकिलाने दिला आहे. म्हणजे ती ती प्रॉपर्टी विकताना त्रास होत नाही. याबद्दल जाणकारांचे काय मत आहे ?

म्हटले तर प्रॅक्टीकल, म्हटले तर ईमोशनल . वाचक कुठल्या नजरेने वाचतोय त्यावर ठरेल. बाकी लिहिलेले खरेच असेल तर, ईच्छापत्र करणे ही काळाची गरज आहे असेच म्हणेन. त्यात भावना आणू नयेत. (कधीकाळी विमा काढा म्हटले तरी लोक म्हणायचे"का माझ्या मरणावर टपलायस?)

मृत्युपत्र म्हणले की नकळत डोळ्यात पाणी येतेच. मी कायमच माताहतांना विल बनवण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. वरिष्ठांनी इच्छापत्र करून आपले मनोगत जाहीर करून उर्वरित आयुष्य सुखात जगावे व नंतर प्रियजनांना होणारा कायद्याचा त्रास वाचवावा.

चित्रगुप्त 24/09/2023 - 22:42
आवडली चौदा ओळींची कविता. पण तिला 'दोन ओळींची' का म्हटले ते समजले नाही. समजा कुणा एकाची दोन - चार घरे/प्लॉट/शेतजमिनी वगैरे आहेत. त्या प्रत्येकाबद्दल वेगवेगळे इच्छापत्र करून ते त्या त्या कागदपत्रांबरोबर फायलीत ठेवावे असा सल्ला मला एका चांगल्या वकिलाने दिला आहे. म्हणजे ती ती प्रॉपर्टी विकताना त्रास होत नाही. याबद्दल जाणकारांचे काय मत आहे ?
इच्छापत्र लिहून, संपत्तीची वाटणी केली वाचून बघ म्हंटल तर, दोन टिपे गाळून, तीने पावती दिली बघता बघता ढग भरून आले मधेच विज कडाडून गेली काय कमावले,किती कमावले, "ती", दोन टिपे खुप काही सांगून गेली तुमचं आपलं काहीतरीच बाबा,...... कागदावरची अक्षरे धुसर झाली दोन ओळीची कविता, बरेच काही सांगून गेली तीची दोन टिपे ,माझी दोन टिपे, जेव्हां एकत्र झाली.... वाटले, हरिद्वारची गंगाच दारी आली

रापण.....

कर्नलतपस्वी ·

गवि 06/03/2023 - 15:50
रापण हा सामूहिक मासेमारीचा प्रकार आहे. टेहेळणी करणाऱ्या व्यक्तीला किनाऱ्यानजीक माशांच्या मोठ्या थव्याची हालचाल, खळबळ, चमचम दिसली की तो सर्वांना भोंगा किंवा तत्सम आवाज करून इशारा देतो आणि लगेच गावातले अनेक लोक एकत्र येऊन पाण्यात जाळे फिरवत फिरवत त्या कळपाला वेढतात. मग जाळ्याची टोके एकत्र करून ते किनाऱ्यावर उथळ पाण्यात अडकवतात. म्हणजे मासे मरत नाहीत. हळू हळू उपसत लागतील तसे विक्रीला काढता येतात. सौदे ठरवायला उसंत मिळते. सर्वांना एकसमान वाटा मिळतो. आता अजूनही ही पद्धत चालू आहे हे माहीत नव्हते. तुम्ही हल्लीच बघितली म्हणजे अजून चालू आहे. गंमत म्हणजे लहानपणी कोंकणात आम्ही पोरे क्रिकेट खेळताना कॅच सुटला की त्या फिल्डरला राप्या, रापू असे म्हणायचो. सोपा कॅच रापला असेही म्हणायचो.

मार्क्स भौ,गवी भौ प्रतिसादाबद्दल मनापासून आभार. यंत्रयुगात रापण हा पारंपारिक प्रकार आजही बघायला मिळाला. वयोवृद्ध अनुभवी रापणकर केळुसकर आणी नुकतीच मिसरूड फुटलेला नवशिका रापणकर संस्कार यांच्या बरोबर मनसोक्त गप्पा मारल्या. वागळी (स्टिंग रे) ,बांगडा,सुरमई, खेकडा असे मासे पण ओळखीचे झाले. बाकी मी शाकाहारी असल्याने अंबोळी,सोल कढी वरच समाधान मानले.

उपेक्षित 10/04/2023 - 10:51
इकडे गोयं मध्ये रापणीचे मासे म्हणजे खाणारे सगळे तुटून पडतात. इकडे अजूनही पारंपरिक पद्धत टिकून आहे. बाकी शुद्ध शाकाहारामुळे कधी खायचा संबंध आला नाही. जाता जाता - ३/४ महिन्यांपूर्वी आमच्या इकडे सांखळी ला १०० ला १५/२० बांगडे मिळत होते जागोजागी ;)

गवि 06/03/2023 - 15:50
रापण हा सामूहिक मासेमारीचा प्रकार आहे. टेहेळणी करणाऱ्या व्यक्तीला किनाऱ्यानजीक माशांच्या मोठ्या थव्याची हालचाल, खळबळ, चमचम दिसली की तो सर्वांना भोंगा किंवा तत्सम आवाज करून इशारा देतो आणि लगेच गावातले अनेक लोक एकत्र येऊन पाण्यात जाळे फिरवत फिरवत त्या कळपाला वेढतात. मग जाळ्याची टोके एकत्र करून ते किनाऱ्यावर उथळ पाण्यात अडकवतात. म्हणजे मासे मरत नाहीत. हळू हळू उपसत लागतील तसे विक्रीला काढता येतात. सौदे ठरवायला उसंत मिळते. सर्वांना एकसमान वाटा मिळतो. आता अजूनही ही पद्धत चालू आहे हे माहीत नव्हते. तुम्ही हल्लीच बघितली म्हणजे अजून चालू आहे. गंमत म्हणजे लहानपणी कोंकणात आम्ही पोरे क्रिकेट खेळताना कॅच सुटला की त्या फिल्डरला राप्या, रापू असे म्हणायचो. सोपा कॅच रापला असेही म्हणायचो.

मार्क्स भौ,गवी भौ प्रतिसादाबद्दल मनापासून आभार. यंत्रयुगात रापण हा पारंपारिक प्रकार आजही बघायला मिळाला. वयोवृद्ध अनुभवी रापणकर केळुसकर आणी नुकतीच मिसरूड फुटलेला नवशिका रापणकर संस्कार यांच्या बरोबर मनसोक्त गप्पा मारल्या. वागळी (स्टिंग रे) ,बांगडा,सुरमई, खेकडा असे मासे पण ओळखीचे झाले. बाकी मी शाकाहारी असल्याने अंबोळी,सोल कढी वरच समाधान मानले.

उपेक्षित 10/04/2023 - 10:51
इकडे गोयं मध्ये रापणीचे मासे म्हणजे खाणारे सगळे तुटून पडतात. इकडे अजूनही पारंपरिक पद्धत टिकून आहे. बाकी शुद्ध शाकाहारामुळे कधी खायचा संबंध आला नाही. जाता जाता - ३/४ महिन्यांपूर्वी आमच्या इकडे सांखळी ला १०० ला १५/२० बांगडे मिळत होते जागोजागी ;)
त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी -प्रसिद्ध गझलकार अनिल कांबळे. - तारर्कर्लीच्या समुद्र किनाऱ्यावर भटकंतीचा आनंद घेतला.तेव्हां एक वेगळाच अनुभव आला. रापण,कोकणात कोळ्यांचा पारंपारिक मासेमारीचा व्यवसाय. यावेळेस बघायला मिळाला.जाळ्यात अडकलेल्या जलचरांची अवस्था बघून वरील गझल आठवली.काही ओळी सुचल्या त्या पंक्तीबद्ध करायचा प्रयत्न केला.याचे श्रेय मी गझलकारांना देईन. गझलकार अंत्यत संवेदनशील,प्रतिभावान.

दुपार

कर्नलतपस्वी ·
झोपली होती दुपार घेऊन कोवळ्या उन्हाला आवाज शांत स्पंदनांचा ऐकू येई मनाला तिरीप कोवळ्या उन्हाची जणू दुपारची एकदाणी झोपण्या आधी दुपारं गात होती बडबड गाणी पहुडली सुखाने अलवार पांघरून पदर थंडगार विसरून मध्यान्हीचा ताप निष्पाप सवे जीवाच्या झोपली दुपार....

खरचं गरज आहे का?

कर्नलतपस्वी ·

आणि मूळ माल वाचला नव्हता त्याने पहिल्यांदा वाचताना लैच गोंधळ उडाला, पण मग कवी चाहूल चा अर्थ लागला अन झटकन सगळा उलगडा झाला. जहापन्हा तुसी ग्रेट हो तोफु कबुल करो पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

आम्ही पाषाणयुगी. आम्ही अश्वत्थामा. ब्रह्मास्त्र फेकलं की परत घेता येत नाही. तुमचं म्हणणं पटलं ,पूर्णा लिहायला हवी होती. आता तुम्हीच व्हा आमचे तारणहार आणी बघा काय करता येते का? बाकी प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.

In reply to by कर्नलतपस्वी

आदिम काळात आदम ने हव्वा ला जाणले तरी त्यांना संतती झाली असा उल्लेख मराठी बायबलात आहे. आता संतती साठी किती प्रयत्न करावे लागतात ? स्वर्गातून जी कला आली आहे ती खाली धरतीवर पोहोचेपर्यंत कमी कमी होत अणूएवढी सुक्ष्म झाली आहे त्यामुळे शिक्षणाची गरज आहे.

आणि मूळ माल वाचला नव्हता त्याने पहिल्यांदा वाचताना लैच गोंधळ उडाला, पण मग कवी चाहूल चा अर्थ लागला अन झटकन सगळा उलगडा झाला. जहापन्हा तुसी ग्रेट हो तोफु कबुल करो पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

आम्ही पाषाणयुगी. आम्ही अश्वत्थामा. ब्रह्मास्त्र फेकलं की परत घेता येत नाही. तुमचं म्हणणं पटलं ,पूर्णा लिहायला हवी होती. आता तुम्हीच व्हा आमचे तारणहार आणी बघा काय करता येते का? बाकी प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.

In reply to by कर्नलतपस्वी

आदिम काळात आदम ने हव्वा ला जाणले तरी त्यांना संतती झाली असा उल्लेख मराठी बायबलात आहे. आता संतती साठी किती प्रयत्न करावे लागतात ? स्वर्गातून जी कला आली आहे ती खाली धरतीवर पोहोचेपर्यंत कमी कमी होत अणूएवढी सुक्ष्म झाली आहे त्यामुळे शिक्षणाची गरज आहे.
पेरणा कोण शिकवते कळ्यांना कसे, केव्हां उमलायचे कोण शिकवते पानांना केव्हां कसे गळायचे ऋतुराज वसंत येता झाडे बहरून येती निसर्ग चक्र फिरता होती फुले कळ्यांची श्वानास कसे कळते मास भादव्याचा आला खरचं गरज आहे का? हे सर्व शिकवावयाची बुद्धिमान मानवाला!!! जानुके आपुली आदम आणी ह्व्वाची स्वर्गातूनच शिकून आली कला फळे चाखायची धन्वंतरी कशाला हे सर्व शिकवण्यास मग मित्र मैत्रिणीं कशाला? फक्त पार्टी झोडण्यास!!!!!

आज्जी गेलीय सोडून

चांदणे संदीप ·

आज्जी आजोबा सगळ्यात जवळचे नाते. पेरू पासून ते मेरू पर्यंत सर्व गोष्टी त्यांच्या बरोबर शेअर करू शकतो. कवीता आवडली.

ओह ! शीर्षक वाचून मला मिपावरील आजी या आय डी ने मिसळपाव सोडले की काय अशी शंका आली.

गवि 15/06/2022 - 10:02
आवडली. कवितेचा आकार म्हणावा तर फार सुंदर आहे. हुरहूर लावणारा. पण अर्थ कळाला नाहीये. अर्थात अगदी टोकदार स्पष्ट अर्थ असलाच पाहिजे हे काही कविता या प्रकाराचं सौंदर्यस्थळ नव्हे. कवीला नेहमीच्या उघड इंटरप्रिटेशनपेक्षा (आजी या नातेवाईकाची मरणोत्तर आठवण) यापेक्षा वेगळंच काहीतरी सुचवायचं आहे असं वाटतं. भावंडांच्या उल्लेखाने हे अधिकच वाटते. आजीला परलोकात आधीच गेलेली भावंडे भेटून विचारतील, किंवा सर्वजण आहेत आणि दादाच गेलाय असे काहीसे विचित्र वाटले अधेमधे. पण हे न कळल्याने विचार चालू होतो. हेच कवितेचे यश.

आंबट गोड 15/06/2022 - 11:43
तर असे वाटतेय की हा दादा च परलोकात गेला..आजी आणि लहान भावंडांना सोडून!

चित्रगुप्त 15/06/2022 - 16:53
तीन-चारदा कविता वाचली. अतिशय आवडली. वाचकांनी वेगवेगळ्या कल्पना केल्या आहेत त्याही मननीय आहेत. कविता चुटपुट लावणारी आहे, हेच तिचे सौंदर्य, असेही म्हणता येईल. ज्या आजीने आजवर काबाडकष्ट करून (ज्यांचे आई-वडील देवाघरी गेलेले आहेत अश्या -) आपल्या लहान लहान नातवंडांना पाळले -पोसलेले आहे, तिचा सर्वात मोठा नातू आता कमावण्यालायक झालेला आहे, म्हणुन त्याला शहरात नेऊन, कुठेतरी कामावर लावून , किंवा नुस्तेच गर्दीच्या गाडीत बसवून ती निघून गेलेली आहे .... अशा त्या मोठ्या नातवाचे मनोगत या कवितेत व्यक्त झालेले आहे, असे मला वाटते. "मला सांगशील का ग ?" ... आणि पुन्हा भेटशील का ग ?" या दोन ठिकाणी "ग" वापरला आहे, पण "कुठे दादा आमुचा 'गे' ? हे वाचून भलतीच कल्पना मनाला शिवून गेली, आणि कवितेचा आणखीही 'तसला' एक अर्थ लावता येईल, असे वाटून गेले.

हुरहुर लावणारी कविता!! खाणारी तोंडे आणि कमाई यांचा मेळ बसत नसल्याने आजीने नातवाला कुठेतरी सोडुन दिले असेच प्रथम वाटले. पण ईतर प्रतिक्रिया बघुन असेही वेगवेगळे अर्थ निघु शकतात हे समजले.

गणेशा 25/06/2022 - 14:18
हळवे लिखान.. ---- उसवले मायधागे फाटले आकाश माझे.. तू निघून गेल्यावर विरले सुखाचे अस्तर --- गणेशा

आज्जी आजोबा सगळ्यात जवळचे नाते. पेरू पासून ते मेरू पर्यंत सर्व गोष्टी त्यांच्या बरोबर शेअर करू शकतो. कवीता आवडली.

ओह ! शीर्षक वाचून मला मिपावरील आजी या आय डी ने मिसळपाव सोडले की काय अशी शंका आली.

गवि 15/06/2022 - 10:02
आवडली. कवितेचा आकार म्हणावा तर फार सुंदर आहे. हुरहूर लावणारा. पण अर्थ कळाला नाहीये. अर्थात अगदी टोकदार स्पष्ट अर्थ असलाच पाहिजे हे काही कविता या प्रकाराचं सौंदर्यस्थळ नव्हे. कवीला नेहमीच्या उघड इंटरप्रिटेशनपेक्षा (आजी या नातेवाईकाची मरणोत्तर आठवण) यापेक्षा वेगळंच काहीतरी सुचवायचं आहे असं वाटतं. भावंडांच्या उल्लेखाने हे अधिकच वाटते. आजीला परलोकात आधीच गेलेली भावंडे भेटून विचारतील, किंवा सर्वजण आहेत आणि दादाच गेलाय असे काहीसे विचित्र वाटले अधेमधे. पण हे न कळल्याने विचार चालू होतो. हेच कवितेचे यश.

आंबट गोड 15/06/2022 - 11:43
तर असे वाटतेय की हा दादा च परलोकात गेला..आजी आणि लहान भावंडांना सोडून!

चित्रगुप्त 15/06/2022 - 16:53
तीन-चारदा कविता वाचली. अतिशय आवडली. वाचकांनी वेगवेगळ्या कल्पना केल्या आहेत त्याही मननीय आहेत. कविता चुटपुट लावणारी आहे, हेच तिचे सौंदर्य, असेही म्हणता येईल. ज्या आजीने आजवर काबाडकष्ट करून (ज्यांचे आई-वडील देवाघरी गेलेले आहेत अश्या -) आपल्या लहान लहान नातवंडांना पाळले -पोसलेले आहे, तिचा सर्वात मोठा नातू आता कमावण्यालायक झालेला आहे, म्हणुन त्याला शहरात नेऊन, कुठेतरी कामावर लावून , किंवा नुस्तेच गर्दीच्या गाडीत बसवून ती निघून गेलेली आहे .... अशा त्या मोठ्या नातवाचे मनोगत या कवितेत व्यक्त झालेले आहे, असे मला वाटते. "मला सांगशील का ग ?" ... आणि पुन्हा भेटशील का ग ?" या दोन ठिकाणी "ग" वापरला आहे, पण "कुठे दादा आमुचा 'गे' ? हे वाचून भलतीच कल्पना मनाला शिवून गेली, आणि कवितेचा आणखीही 'तसला' एक अर्थ लावता येईल, असे वाटून गेले.

हुरहुर लावणारी कविता!! खाणारी तोंडे आणि कमाई यांचा मेळ बसत नसल्याने आजीने नातवाला कुठेतरी सोडुन दिले असेच प्रथम वाटले. पण ईतर प्रतिक्रिया बघुन असेही वेगवेगळे अर्थ निघु शकतात हे समजले.

गणेशा 25/06/2022 - 14:18
हळवे लिखान.. ---- उसवले मायधागे फाटले आकाश माझे.. तू निघून गेल्यावर विरले सुखाचे अस्तर --- गणेशा
उशीराने आले ध्यानी एकटे गर्दीत बसून मला अनोळख्या देशी आज्जी गेलीय सोडून घरातून निघताना का बोलली ती नाही? तुला लेकरा घरात जागा उरलीच नाही आई बाबा गेल्यावर आज्जी तूच उरलेली कुणाकुणा पोसशील तूही आता थकलेली माझ्या इवल्या बहिणी आणि भाऊ लहानगे तुला आज्जी, म्हणतील कुठे दादा आमुचा गे? काय सांगशील त्यांना मला सांगशील का ग? आज्जी एवढ्याचसाठी पुन्हा भेटशील का ग? - संदीप चांदणे

वसंतात मृगजळ खास

माहितगार ·
काठावरचे गुपित झेलता अनु'मतीची महत्ता विशेष वसंताचे मृगजळ खास कटी बंधात उष्म निश्वास नभी नाभी ताम्र गोल चा'लते जातो तोल आर्त कुंजन आस पास पर्ण विरहीत पुष्प तटी दाट दिंगबर सुरेख मदन पाझरतो . . . . . . . स्वतःच्याच कवितेच्या विडंबनाचा विचार केला आणि कवितेतला(च) मदन अकस्मिक पाझरला. ;)

सिर्फ त्रिवेदी बचेगा।

कर्नलतपस्वी ·

पहिल्या कडव्यातच रेफरन्स आहे. लाट आणी करोना जवळपास समानार्थी शब्द झालाय. दोन लाटा गेल्या पण तीसरीने पकडले. सात दिवस झाले घरातच बंद आहे. तोच संघर्ष लीहीला आहे़ आता मस्त. धन्यवाद.

पहिल्या कडव्यातच रेफरन्स आहे. लाट आणी करोना जवळपास समानार्थी शब्द झालाय. दोन लाटा गेल्या पण तीसरीने पकडले. सात दिवस झाले घरातच बंद आहे. तोच संघर्ष लीहीला आहे़ आता मस्त. धन्यवाद.
पहिली,दुसरीला बसवलं होतं फाट्यावर तीसरीने केली कुरघोडी आणून बसवलं खाटेवर कधी आली,कशी आली माहीत नाही कुठं गाठ पडली अतीरेक्या सारखी घुसली पहिल्या फळीची दाणादाण उडली लढवत होती पंजा आजमावत होती जोर पण मजबूत ज्याचा माजां तोच कापणार होता दोर लढवत होती पेच टाकत होती डाव घालत होती सह्याद्रीच्या उरावर टिकावा चा घाव तीन दिवस तीन रात्री घमासान लढाई केली खूप काढला घाम आणी खूप दमणूक झाली शिजत नाही डाळ बघून मागे परत फिरली टिबं टिबं च्या.................. प्रेमा पुढे ती बिचारी हारली ती बिचारी हारली....... सात दिवस अडां सेल मधे काढल्यानंतर आज ठीक वाटत आहे.