महिला क्रिकेट ....भारत 3, इंग्लंड 0.... ये नया भारत है...
नुकतीच, इंग्लंड विरूद्ध भारत ही तीन सामन्यांची एक दिवसीय क्रिकेट मालिका संपली.
हळूहळू का होईना पण, महिला क्रिकेट बाबतीत, लोकं रस घेत आहेत, हे जाणवले.
पहिल्या आणि दुसर्या मॅच मध्ये, हरमन प्रीत कौरने, अप्रतिम खेळ केला, विशेषतः दुसर्या मॅच मध्ये... 2017 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध केलेल्या 169 रन्स नंतर, ही 111 चेंडूत 139 रन्सची खेळी, खरोखरच दृष्ट लागण्या सारखी. शतका नंतरच्या 39 धावा फक्त 11 चेंडूत काढल्या..
दोन्ही मॅचेस सुंदर झाल्या, पण लक्षांत राहिली ती तिसरी मॅच आणि कारण म्हणजे, दिप्ती शर्माने केलेला रन आऊट.
लिंक खाली देत आहे.
https://youtu.be/9Wabzl17RwI
ज्यांनी, ही मॅच लाईव्ह बघीतली असेल, त्यांना ह्या रन आऊटचे महत्व नक्कीच समजले असेल...
दिप्ती शर्माने समयसुचकता दाखवून, योग्य तेच केले, पण खरे कौतुक वाटले ते, हरमनप्रीत कौरचे.
हरमन प्रीत कौरने दिप्तीची चांगलीच पाठराखण केली ...
https://www.loksatta.com/krida/harmanpreet-kaur-comment-on-deepti-sharma-charlotte-dean-run-out-in-ind-vs-eng-womens-cricket-match-prd-96-3149475/
शेवट पर्यंत लढा देणारे खेळाडू आणि खेळाडूंची पाठराखण करणारा नेता असेल तर, संघ उत्तम खेळ करतोच..
1 ऑक्टोबर पासून, सुरू होणार्या, महिला क्रिकेट आशिया कप साठी, ह्या भारतीय संघाला शुभेच्छा....
वर्गीकरण
प्रतिक्रिया
+११
आशिया कपसाठी भारतीय संघाला
स्मृती मंधाना (९१, ४० व ५०)
सहमत आहे ...
दिप्ती शर्मा ला हरमनप्रीत कौर
हे तर फारच उत्तम ....
सहमत