सेन्टी-मेन्टी : थैमान, मी आणि बरच काही..
समाजकारण ( माझे मित्र ज्याला थट्टेने राजकारण ही म्हणतात ) करताना बरेच कटु- गोड , चांगले वाईट प्रसंग येतात माझ्यावर! त्यातले काही मनात दाट ठसा उमटवून जातात, कधी मन खुश असते, कधी खुप आतून हेलावला जातो, मानसिक कुचबंणा होते, कधी या समाजरचने चा, त्या मध्ये असलेल्या विकृत प्रवृत्तींचा प्रचंड राग येतो, पण त्या क्षणी मात्र दाखवता येत नाही. आणि दाखविण्यापुरता वेळ ही नसतो, झटापट निर्णय घ्यावे लागतात कारण तिथे मी लीडर आहे, ज्याला नेता ही म्हणतात. गर्दी आपल्या बाजुने असते, माझा त्या क्षणी जर निर्णय चुकला, एखादा शब्द चुकीचा गेला तर त्या गर्दीचा संयम सुटु शकतो. अर्थात हे काही मी एका दिवसात शिकलो नाही. काही मित्र विचारतात, तु च का असतोस तिथे, माझ उत्तर असते, दुसर कोण नव्हत म्हणुन!
अशी मानसिक कुचंबणा झाली की सांगता येत नसे पण म्हणुन मी मूक कधीच नव्हतो, सांगायचो, शेयर करायचो, एका मित्रा बरोबर! दोन वर्षा पुर्वी, एक दिवस तो ही सोडुन गेला मला, आदल्या दिवशी सकाळी साडे-आठ पासुन ते रात्री दिड पर्यंत सोबत होता माझ्या, दुसर्या दिवशी दुपारी साडे-बाराच्या सुमारास येरवड्याच्या विद्युत- दाहिनीत जळत होता माझ्या समोर, त्याची कथा( नव्हे व्यथा) लिहायला घेतली पण कधीच पुर्ण करु शकलो नाही, कारण शेवटचा भाग लिहायला घेतला की तो शेवटचा दिवस माझ्या समोर उभा राहतो आणि मन पुन्हा भावनिक होते, कसा-बसा त्यातुन सावरलो (पुरता नाही!), पण गेले काही दिवसांत घडलेल्या दोन प्रसंगामुळे मला नीटशी झोप लागत नाही.....
जानेवारी महिन्यातील कुठल्याश्या तरी तारखेला ,सकाळी साधारण साडे-दहाची वेळ, बेरोजगारी मुळे आलेली मरगळ झटकण्याकरिता म्हणुन कुठे तरी लांबवर हिंडुन यावे असे वाटत होते, घरात ही विशेष असे काही काम नव्हते. गाडी ला किक मारावी तेव्हढ्यात फोन वाजला, फोनवर श्रीकांत! आपल्या चौकी ला हवालदार आहे. राम-राम, नमस्कार करेपर्यंत देखील वेळ नसावा वाटत, कारण पटदिशी आवाज च आला " चौकीवर ये " तशीच गाडी वळवली आणि चौकीत गेलो. श्रीकांत बाहेरच पडत होता. " आज येव्हढ्या सकाळी? " मी टोमणा मारला, माझ्या इथ चौकी ला सहसा १२-१ पर्यंत कोणीच येत नाही, ते ही रविवारचा बाजार असला तर. अर्थात कमी संख्या-बळ आणि रात्रीचे राउंड पण त्याला कारणीभूत आहेतच.
' चल '
' कुठे ? '
' खांदवे मन्या ने आत्महत्या केली !! '
शॉक लागला, खांदवे मनोहर! माझ्या ईथल बडं प्रस्थ, गुंठामंत्री!! ढिगाने जमीनीचा पैसा आणि गावातल्या चार बे-कायदा बार पैंकी एकाचा मालक!!! गोंडस चेहर्याची पण तितकीच तोंडाळ बायको आणि पाच महिन्यांची तान्हुली!!!! सुशिक्षित पण जुगाराला आणि तमाशाला नादवलेलं, एक, गोरं-चिट्ट, रांगड, तरणं-ताठ पोरगं!!!!
बाईक, श्रीकांतच्या मागे-मागे चेस केल्यागत नेली. वडगांव शिंदे रोड ला, रस्त्यालगत चार-पाच एकराची अजून न विकलेली, शेती होती मन्याची!! शाळु लावलेला होता, पली कडच्या कडेला एक बाभळीच झाड होत. त्याच झाडाला त्याच प्रेत लटकत होत, गळफास आवळलेला!
" उतरवल का नाही अजून ? "
" नाही उतरवल, कोणी हात च लावेना, माझी पण हिम्मत होत नाहीये, अग्नीशामक बोलावले आहे, तास झाला तरी पत्ता नाही."
झाडा भोवती थोडी गर्दी होती, पोलीस दिसल्यावर जरा पांगा-पांग झाली, आम्ही हळु-हळु झाडापाशी आलो आणि तस-तस चित्र अधिक स्पष्ट होवु लागले, झाडापाशी रम चा अर्धा खंबा पडलेला होता. लटकलेल्या शवाकडे लक्ष गेले आणि मला कळुन चुकले की कोणी हात का लावेना ? प्रेताला मुंग्या लागल्या होत्या , काळ्या, लाल!! डोळ्याच्या खोबणीतुन, झाकलेल्या पापण्यांमधुन मुंग्या बाहेर येत होत्या, माझ्या शेजारी उभ्या असलेल्या एका माणसाला तिथच उबळ आली पाहुन !! धावत उलटा मागे गेला.
मी तिथे आल्या पासुन अर्धा तास उलटुन गेला, बरीच लोकं येत होती-जात होती, पण कोणाला काहीच सुचेना, सरते शेवटी मी एक प्रयत्न म्हणुन म्हणालो , शवाखाली खाली थोडी आग पेटवुन बघु , मुंग्या हटल्या तर हटल्या !! मग खाली घमेल्यात थोडी आग पेटविली, पुन्हा सुचलं की मशाल पेटवु या , मग मशाल आणि घोडा घेवुन, एकाला झाडाच्या फांदी पर्यंत जिथ दोर बांधलेली होती तिथ पोचवल, मशाली मुळे मुंग्याची पांगापांग झाली आणि दोरी हळु-हळु सोडली, खालची आग काढुन घेतली , आम्ही चार चौघानी शव चादरी त लपेटुन घेतल आणी खाली आणल. अॅम्बुलन्स पर्यंत नेल.
मी रहातो ते गाव ,तुकाराम महाराजांच जन्मस्थान असल्याने पवित्र मानल जात. गाव तस चांगल आहे,( की होत ? ) . जमीनी विकल्या गेल्या आणि लोकांच्या खिशात पैसा खुळखुळायला लागला, नव्हे, ओसंडुन वहायला लागला, लक्ष्मी चंचल बनविते म्हणतात , पैसा आला त्या बरोबर चंचलता ही. गावात पाच वर्षापुर्वी केवळ एक देशी दारुच दुकान होत, आणि महाराजांच्या याच गावात आता चार बियर शॉपी, सहा-सात बे-कायदा बार, प्रायव्हेट तमाशाची बैठक, आणि बोटावर न मोजता येण्या-इतपत जुगारीचे धंदे आहेत. याच एका जुगारीच्या धंद्यावर त्या दिवशी रात्री मन्याबरोबर..................
संध्याकाळी चार वाजेपर्यंत मन्या बैठकीत होता.( चंचलतेमुळे होणार्या खर्चाची कल्पना यावी म्हणुन सांगतो, एका तासाच्या, प्रायव्हेट बारीचे ३०००/- रु. आणि वर उडविले जाणारे वेगळे !! ) तिथ त्याने थोडीशी घेतलेली होती, मग त्याच्या स्वताच्या बार मधे बसुन क्वार्टर पिला आणि थेट जुगारीच्या धंद्यावर गेला. पत्ते खेळता-खेळता अजुन एक घेतली, त्यात हारत होता. खिशातले संपले, तिथल्या चार चौघांनी उसनवारी ची थट्टा केली, गडी पेटला, घरी आला. बायकोच्या कपाटातले दिड-एक लाख रु. , तिच्याशी भांडत काढले, गाडी खाली लावलेली होती, निघताना बायकोने बाल्कनीतुनच शिव्या घातल्या. " घरी ये मग दाखवते " म्हणुन तावा-तावाने आत निघुन गेली. ईकडं रात्री तुन हा ते पैसै पण हारला, नशा ही उतरली, वैतागलेल्या बायकोना दरवाजा उघडला नाही, पश्चातापदग्ध अवस्थेत तो निघुन गेला.....कायमचा .......
मी, त्याच्या बायकोला , त्या तान्हुलीला येता-जाता कधे-मधे बघतो त्याच बाल्कनीत , मन्याची बायको तान्हुलीला खेळवायचा आणि उसनवारी च हसु आणुन, ओळख द्यायचा प्रयत्न करते, पण दोघांच्या ही चेहर्यावरचे हास्य केव्हाच मावळले आहे, पश्चाताप तर आहेच. जर त्या माय-माऊली ला कल्पना असती की तिच्या तोंडाळ वक्त्यव्याने असे काही होईल तर मला नाही वाटत की तिने त्या पाच महिन्याच्या तान्हुलीला पोरके आणि स्वताला विधवा केले असते. अर्थात चुक मन्या ची पण, पण नेमकी मन्याची की , त्याच्या उसन वारीची थट्टा करणार्यांची, की त्या ओंथबुन वाहणार्या पैशामुळे आलेल्या माजाची, माहीत नाही, करून घ्यायचे नाही. सहसा असाच कधीतरी त्याच्या हॉटेलात शिरल्यावर, पांढर्या शुभ्र वेषात, दमदार आवाजात ' अरेss , राsम - राsम मालक !! ' असे आवेशात स्वागत करणारा, जुजबी का असेना, ओळख असणारा मन्या गेला आणि त्या दिवसापासुन माझ्या डोळ्यामधुन शिरलेल्या कित्येक मुंग्या माझा मेंदू पोखरत आहेत....
क्रमश ..
Book traversal links for सेन्टी-मेन्टी : थैमान, मी आणि बरच काही..
वर्गीकरण
प्रतिक्रिया
तुझे लेख नेहमीच अंतर्मुख करून
........................
...
हम्म्म्म्म
+१
१+
उत्तम व्यक्तिचित्र
सहमत
अरेरे
काय लिहितोस रे!
सुन्न
त्याच्या बायकोनं जे केलं ते
कडक
+१
आयच्चं ह्या
सुहास साहेब खरच जबरदस्त लेख.
पैसा,सत्ता आणि ज्ञान ह्याची
वाचतोय रे. बाकी, नेहमीचंच.
:(
हे सत्य असेल तर कल्पिताहून
लेखन म्हनुन तर छानच आहे, पण
उत्तम अनुभव....
सत्यकथन असल्याने आणि ह्या
तुझे लेखन वाचवत नाही.
त्या सत्य घटनेची दाहकता
जबरदस्त
हं. आता पुरा दिवस तूझ्या
<<जर त्या माय-माऊली ला कल्पना
लेखनशैली मस्त
सुहास.. जी... खरोखर प्रसन्ग
खुप दाहक लिहितोस रे बाबा.
!!
मन्याने आत्महत्या केली तर
त्या बाळाला ..असो
लेखन उत्तम.