निरीश्वरवाद्यांना ईश्वर शिक्षा का करीत नाही ?...
निरीश्वरवाद्यांना ईश्वर शिक्षा का करीत नाही ?...... यनावाला
जगनिर्माता, जगन्नियंता, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, पूजा-अर्चा-प्रार्थना यांनी संतुष्ट होऊन भक्तांवर कृपा करणारा, संकटात धाऊन येणारा, ईश्वर अस्तित्वात आहे असे आस्तिक लोक मानतात. किंबहुना अशा ईश्वराचे अस्तित्व सत्य मानणार्यांना आस्तिक म्हणतात. आस्तिक शब्दाचा हाच अर्थ आज प्रचलित आहे. ( काहीजण केवळ जगनिर्मात्या ईश्वराचे अस्तित्व मानतात. --म.फुले यांनी त्याला निर्मिक म्हटले आहे.-- उपासनेचा देव मानत नाहीत. पण त्यांची संख्या नगण्य आहे.) जगातील बहुसंख्य माणसे अजून आस्तिक आहेत.
" ईश्वर अस्तित्वात नाही." हे ठामपणे सांगणारे निरीश्वरवादी भारतात अगदी वेदकाळापासून आहेत. आता या विज्ञानयुगात त्यांची संख्या वेगाने वाढते आहे.
सर्वसाक्षी, सर्वशक्तिमान असा देव जर आहे तर तो आपल्या अस्तित्वाची प्रचीती सर्व माणसांना येईल असे कांहीच का करीत नाही ? इतका लपून-छपून का राहतो ? आपले अस्तित्व दाखविण्यात त्याला कोणती अडचण आहे ? तसेच त्याचे जे गुणवर्णन आहे त्यांतील एकाही गुणाचा अनुभव कधीही येत नाही. संकटात देव धावून आला आहे असे कधीही घडत नाही. हे कसे ? दीन-दुबळ्यांवर अन्याय होतो, निष्पाप बालिकेवर अत्याचार होतो या प्रत्यही घडणार्या घटना तो करुणासागर देव निष्क्रियपणे पाहात कसा राहातो?
आस्तिक लोक अशा घटनांविषयीं विचार करीतच नाहीत. त्यांना त्यांची श्रद्धा टिकवून धरायची असते. ती अशा घटनांनी डळमळली तर काय करायचे ? आपल्याला कोणाचा आधार आहे ? अशी त्यांना भीती वाटते. त्यामुळे अन्यायपीडित व्यक्ती पूर्वजन्मीच्या पापाचे फळ भोगतात असले बुद्धीला न पटणारे काहीतरी भोंगळ तत्त्व श्रद्धेने खरे मानून मनाचे समाधान करतात. आपण देवाच्या अस्तित्वाविषयी शंका घेतली, देवासाठी जी कर्मकांडे परंपरे अनुसार करीत आहोत ती सोडून दिली तर देव आपल्यावर कोपेल. शिक्षा करील. अशी भीतीही त्यांना वाटत असावी. या संदर्भात डॉ.र.धों.कर्वे यांचे एक विधान आहे. ते म्हणतात, "माणूस देवाला नमस्कार करतो तो "दुर्जनं प्रथमं वन्दे ।" या न्यायाने. म्हणजे देवाने आपल्यावर कोप करू नये, आपले कांही वाईट करू नये म्हणून. हे पटण्यासारखे आहे.
यावर आस्तिकांनी थोडा विचार करावा. जगात निरीश्वरवादी माणसे पूर्वीपासून आहेत; हे आस्तिकांना ठावूक आहेच ते नास्तिक देवा-धर्माचे कोणतेही कर्मकांड करीत नाहीत. देवाला हात जोडून त्याच्यापुढे नतमस्तक होत नाहीत. एवढेच नव्हे तर देवाचे अस्तित्वसुद्धा नाकारतात . आता प्रश्न असा पडतो की त्या नास्तिकांना देव शिक्षा का करीत नाही ? देव सर्वज्ञ आहे. जगात निरीश्वरवादी लोक आहेत. ते कधी माझी पूजा-अर्चा-प्रार्थना करीत नाहीत. मी अस्तित्वात आहे हे सुद्धा ते खरे मानत नाहीत. हे त्या सर्वज्ञ देवाला समजतेच. मग अशा नास्तिकांना देवाने कठोर शिक्षा केली तर नास्तिक वठणीवर येतील. देवाचे अस्तित्व मुकाट्याने मानतील. त्याची पूजा-अर्चा करू लागतील. आस्तिक-नास्तिक वाद मिटून जाईल. हे देवाला नको आहे का? नास्तिकांना कडक शासन करणे देवाला अशक्य आहे का? तो सर्वशक्तिमान आहे ना ? मग त्याच्या दृष्टीने एवढी सोपी असलेली गोष्ट तो स्वत: का करीत नाही ?
देवदर्शनाला जाणार्या तसेच दर्शन घेऊन परत येणार्या भक्तांच्या वाहनांना अपघात का होतात ? त्यात अनेक भक्त का मरतात ?
कोणी म्हणतील -आस्तिकांच्याच वाहनांना अपघात होतात का ? नास्तिकांच्या वाहनांना होत नाहीत ? -- होतातच. गाडीत कोण बसले आहेत ? आस्तिक का नास्तिक ? भूकंपात जखमी झालेल्या माणसांवर उपचार करण्यासाठी जाणारे डॉक्टर का घरफोडीसाठी जाणारे दरोडेखोर ? याचा अपघाताशी कांही संबंध नसतो. अपघाताची कारणे वेगळी असतात.नास्तिकांच्या वाहनांना अपघात होऊ शकतो हे सत्यच आहे. प्रश्न असा आहे की प्रत्यक्ष ईश्वराचे अस्तित्व नाकारणार्या नास्तिकांना तो शिक्षा का करत नाही ? आणि या प्रश्नाचे सत्य उत्तर असे आहे की,ईश्वर अस्तित्वातच नाही.
वास्तव काय आहे ? सुख-दु:खाचे प्रसंग सर्वांवर येतात. आस्तिकांवर येतात तसे नास्तिकांवरही येतात. श्रीमंतांवर येतात. गरिबांवर येतात. आस्तिक लोक देवाचे भजन-पूजन करतात, नामस्मरण करतात म्हणून त्यांच्यावर दु:खाचे प्रसंग क्वचितच येतात तर नास्तिक लोक देवाचे काहीच करीत नाहीत म्हणून त्यांच्यावर सतत दु:खाचे डोंगर कोसळतात असे मुळीच दिसत नाही. जगन्नियंता देव अस्तित्वात असेल तर असे घडायला हवे. नास्तिकांवर दु:खाचे डोंगर कोसळायला हवेत, हे तर्कसंगत आहे. पण तसे घडत नाही. यावरून कोणता निष्कर्ष निघतो ?
अनेक नास्तिक चांगले मानसन्मानाचे, प्रसिद्धीचे, समृद्धीचे जीवन जगले. काही नावे सांगायची तर उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर, रॅंग्लर र.पु.परांजपे, प्राचार्य दि.धों.कर्वे, डॉ.र.धों.कर्वे, सुप्रसिद्ध साहित्यिक वि.स.खांडेकर, श्री.ना.पेंडसे, पु.ल.देशपांडे, सुनीताबाई देशपांडे, अभिनेते डॉ.श्रीराम लागू, निळू फुले, सदाशिव अमरापूरकर आदि अनेकानेक. देवाचे अस्तित्व न मानल्यामुळे त्यांना कोणत्याही विशेष अडचणींना सामोरे जावे लागले नाही. तसेच या सर्व निरीश्वरवादी व्यक्तींना उदंड लोकप्रियता लाभली. मान-सन्मान मिळाले. सर्वार्थाने त्यांचे जीवन समृद्ध होते.
अनेक सद्विचारी, सदाचारी, सज्जन आस्तिकांना आयुष्यात मोठे दु:ख भोगावे लागले. देवाने त्यांच्यावर कांही कृपा केली नाही. दोन उदाहरणे द्यायची तर तुकाराम महाराजांच्या काळात महाराष्ट्रात लागोपाठ चार वर्षे दुष्काळ पडला. तुकारामांच्या कुटुंबाची अन्नान्न दशा झाली. त्यांची पहिली पत्नी भूकबळी ठरली. त्यांनी लिहिले आहे,
"दुष्काळे आटले द्रव्य गेला मान । स्त्री एकी अन्न अन्न करिता गेली.
आता काय खावे कोणीकडे जावे । गावात राहावे कोण्या बळे ॥
विठ्ठलाच्या या निष्ठावंत भक्ताची अशी अवस्था झाली.
रामकृष्ण परमहंस कालीमातेचे परम भक्त होते. "स्वत: माता माझ्याशी बोलते " असे ते सांगत. त्यांना घशाचा कॅंन्सर झाला. अन्नाचा घास गिळता येईना. भक्तांनी विनवले की, " तुम्ही कालीमातेला साकडे घाला. ती तुमचा आजार बरा करील." परमहंस म्हणाले ,"मी मातेशीं बोललो. ती म्हणाली -इतके लक्षावधी लोक जेवतात त्यांच्या मुखाने तूच जेवतो आहेस असे समज. " खरे तर हे उत्तर भोंगळ आहे. इतर लोक जेवतात त्याने रामकृष्ण परमहंस यांचे पोट भरते का ? त्यांना भूक लागणार नाही का ? तात्पर्य एवढेच की आस्तिक माणसांना, देवभक्तांना सुद्धा दु:खे भोगावी लागतात. त्यांच्यासाठी देव काहीच करू शकत नाही. तो अस्तित्वाच नाही तर काय करणार ?
पण अशा सुप्रसिद्ध आस्तिकांचाच विचार का करायचा ? शंभर वर्षांपूर्वीच्या हिंदु समाजाचा विचार करावा. त्याकाळी चातुर्वर्ण्य समाजव्यवस्था होती. चौथा वर्ण शूद्र . ते सगळे आस्तिकच होते. इतर तीन वर्ण त्यांना अस्पृश्य मानत. हे लोक निरक्षर होते. अज्ञानी होते. अत्यंत दीनवाणे अपमानास्पद जीवन जगत होते. जो देव आहे असे ते मनापासून मानत होते त्या देवाने त्यांच्यासाठी काहीच केले नाही. करुणासागर देवाला त्यांची दया आली नाही. देश स्वतंत्र झाला. प्रजासत्ताक स्थापन झाले. संविधान लागू झाले. तेव्हा कागदोपत्रींतरी अस्पृश्यता गेली. या दलितांचा उद्धार देवामुळे झाला नाही. डॉ.आंबेडकरांमुळे झाला. कांहीजण बाबासाहेबांनाच देव मानतात. तसे मानणे हा त्यांचा अपमान आहे हे त्या दलितांच्या ध्यानी कसे येत नाही ? कवि विंदा करंदीकर म्हणतात, "देवातुनी समाजा ज्याने विमुक्त केले । त्यालाच देव करिती याला इलाज नाही. ॥"
तर अशा या देवाचे अस्तित्व खरे कसे मानता येईल ? देव अस्तित्वात नाही हेच बुद्धीला पटणारे सत्य आहे.
देव मानला नाही, तीर्थयात्रा केल्या नाहीत, उपास-तापास, व्रत-वैकल्ये केली नाहीत तरी कुणाचे काहीही वाकडे होत नाही. हे शंभर टक्के सत्य आहे. मात्र परंपरेने आलेले जे सण-सुदिन आहेत ते समाजाचे आनंद सोहळे आहेत. ते अवश्य साजरे करावे. त्यांच्या धार्मिक महत्त्वापेक्षा सांस्कृतिक महत्त्व अधिक आहे. अन्यथा जीवन एकसुरी, नीरस होईल.
.................................................................................
वर्गीकरण
वाचने
82854
वाचनखूण
प्रतिक्रिया
247
निरीश्वरवाद्यांना वाटते ईश्वर
ईश्वर म्हणत असेल: कुठं
मागील जन्मी केलेल्या
In reply to मागील जन्मी केलेल्या by डॉ सुहास म्हात्रे
तुमच्या आयडीला अत्रुप्त
In reply to तुमच्या आयडीला अत्रुप्त by प्रचेतस
मिपाच्या सगळ्याच आयड्यांना
In reply to मिपाच्या सगळ्याच आयड्यांना by डॉ सुहास म्हात्रे
कधी कधी
निरीश्वरवाद्यांना ईश्वर
सर...
चिकाटी ची शेकोटी
In reply to चिकाटी ची शेकोटी by मारवा
छान आहे पुस्तक
निरीश्वरवाद्यांना ईश्वर
निरीश्वरवाद्यांना ईश्वर
In reply to निरीश्वरवाद्यांना ईश्वर by क्रिप्ट
असं अधिकार वाणीने लिहीलेले
In reply to असं अधिकार वाणीने लिहीलेले by सतिश गावडे
नमस्कार करा.
नास्तिकांच्या अस्तित्वावर देवाचा
In reply to नास्तिकांच्या अस्तित्वावर देवाचा by अनन्त अवधुत
नास्तिकांच्या अस्तित्वावर देवाचा
उत्तर तुम्हीच लिहीले आहे की
हम्म
साक्षीदार
नास्तिक!
निरीश्वरवाद्यांना ईश्वर
निरीश्वरवाद्यांना ईश्वर शिक्षा का करीत नाही ?...... यनावालाकदाचित् निरीश्वरवाद्यांकडे लक्ष द्यावे इतकेही त्यांचे महत्व इश्वराला वाटत नसावे ! मात्र, यनावाला कळत नकळत ईश्वराची सतत इतकी आठवण काढत असतात की स्वर्गाच्या लाईनमध्ये त्यांचा नंबर सगळ्या आस्तिकांच्या पुढे असेल* असेच वाटते ! :) * : संदर्भ : कुठल्याश्या कथेत सांगितले आहेच ना की, "शिकारीची वाट पहात बेलाच्या झाडावर बसलेल्या एक पारधी केवळ वेळ घालवण्यासाठी बेलाची पाने तोडून खाली टाकत राहिला, ती झाडाखालच्या शंकराच्या पिंडीवर पडत राहिली आणि काही वेळाने शंकराने प्रसन्न होऊन पारध्याला दर्शन दिले."In reply to निरीश्वरवाद्यांना ईश्वर by डॉ सुहास म्हात्रे
* : संदर्भ : कुठल्याश्या कथेत
लागुंचा एक किस्सा आठवला.
In reply to लागुंचा एक किस्सा आठवला. by प्रकाश घाटपांडे
बाय द वे, विचारीन विचारीन म्हणतो.
In reply to बाय द वे, विचारीन विचारीन म्हणतो. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तुमचा देवावर विश्वास आहे का?
In reply to तुमचा देवावर विश्वास आहे का? by प्रकाश घाटपांडे
तुमचे सर्वच प्रतिसाद खूप
In reply to तुमचा देवावर विश्वास आहे का? by प्रकाश घाटपांडे
वरचा आणि हा, दोन्ही प्रतिसाद
In reply to तुमचा देवावर विश्वास आहे का? by प्रकाश घाटपांडे
हाहाहा.
उद्या माझ्या मेंदुत जैवरासायनिक बदल झाले तर माझे म्हणणे बदलेलही.
मान्य.
अर्थात ते कुणाचेही बदलेल.
हं. जीवनात संकटं. आली की मतं बदलतात, असं एक निरिक्षण आहे.
अगदी यनावालांचेही.
यनांचे आता मत कधीच बदलनार नाही, बदलूही नये असं माझं ठाम मत आहे. जालावर माझे दोन सर आदर्श आहेत, एक दैववादी जे आहे ते आहे असं मानणारे शरद सर, आणि कंप्लेट दैव नाकारणारे वालावलकरसेठ. बाकी, सविस्तर प्रतिसादाबद्दल आभार. एकदा भेटूया....! -दिलीप बिरुटेIn reply to हाहाहा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
यनांचे आता मत कधीच बदलनार
In reply to यनांचे आता मत कधीच बदलनार by प्रकाश घाटपांडे
मस्त
In reply to हाहाहा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जो अद्भूत सृष्टीतल्या चराचर
In reply to जो अद्भूत सृष्टीतल्या चराचर by arunjoshi123
आपण..
In reply to आपण.. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मिपावर सर्वच गोष्टी सर्वांना
In reply to मिपावर सर्वच गोष्टी सर्वांना by arunjoshi123
केव्हाच माफ केलंय.
In reply to केव्हाच माफ केलंय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपण हा नियम सर्वत्र लावायची
In reply to आपण हा नियम सर्वत्र लावायची by arunjoshi123
जाऊ द्या ना सोडा.
In reply to जाऊ द्या ना सोडा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बाकी मस्त. आमच्या उदगीरला
In reply to हाहाहा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
-१
In reply to -१ by विकास
दैव वाद व देव वाद
In reply to बाय द वे, विचारीन विचारीन म्हणतो. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रा. डॉ. दिलिप बिरुटे,
शिक्षा?.....छे.....
यनावाला , नमस्कार ....
नवग्रह फळ जरा चुकीचे टंकले म्हणून परत लिहीत आहे
निरीश्वरवाद्यांना ईश्वर
In reply to निरीश्वरवाद्यांना ईश्वर by arunjoshi123
निरीश्वरवाद्यांना ईश्वर
निरीश्वरवाद्यांना ईश्वर शिक्षा का करीत नाही
देतो ना. पण निरीश्वरवाद्यांना
निरीश्वरवाद्यांना ईश्वर शिक्षा का करीत नाही ?
बापरे
बापरे
In reply to बापरे by सुबोध खरे
देव बाप्पा कान कापेल म्हणून
यनावाला सरांच्या मनात देवाने घर केले आहे
In reply to यनावाला सरांच्या मनात देवाने घर केले आहे by सप्तरंगी
लोकांच्या प्रश्नांनी घर केलंय.
In reply to लोकांच्या प्रश्नांनी घर केलंय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आधुनिक समाजात वावरताना
In reply to आधुनिक समाजात वावरताना by arunjoshi123
बुवा झोपा आता.
In reply to बुवा झोपा आता. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तुम्हाला त्यांच्या
In reply to तुम्हाला त्यांच्या by बिटाकाका
विचित्रविचारधारी
In reply to विचित्रविचारधारी by arunjoshi123
गर्दी, त्याचा तुच्छतादर्शक
In reply to बुवा झोपा आता. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
न बिथरलेले असतानाही लोकांना
In reply to लोकांच्या प्रश्नांनी घर केलंय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
समाजात वावरतांना लोक देवधर्माचे प्रचंड बळी ठरतात
In reply to लोकांच्या प्रश्नांनी घर केलंय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पण उच्चशिक्षितांचं प्रबोधन
In reply to लोकांच्या प्रश्नांनी घर केलंय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आराम खुर्चीतून चळवळ
In reply to आराम खुर्चीतून चळवळ by विकास
=))
In reply to आराम खुर्चीतून चळवळ by विकास
प्रचंड सहमत! प्रतिसाद आवडला!
In reply to आराम खुर्चीतून चळवळ by विकास
आवडला प्रतिसाद.
In reply to आराम खुर्चीतून चळवळ by विकास
बुडते हे जन देखवे न डोळा, म्हणूनी कळवळा येत असे.
In reply to बुडते हे जन देखवे न डोळा, म्हणूनी कळवळा येत असे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बिरुटे सर
In reply to बिरुटे सर by सुबोध खरे
प्रबोधन काही वेळा आंजारुन
In reply to प्रबोधन काही वेळा आंजारुन by प्रकाश घाटपांडे
भूमिका
In reply to बुडते हे जन देखवे न डोळा, म्हणूनी कळवळा येत असे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काही अतिशयोक्त वक्त्यव्ये
In reply to बुडते हे जन देखवे न डोळा, म्हणूनी कळवळा येत असे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रतिसाद आवडला.
In reply to लोकांच्या प्रश्नांनी घर केलंय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अशिक्षित लोकांचं एक वेळा
In reply to यनावाला सरांच्या मनात देवाने घर केले आहे by सप्तरंगी
नास्तिपक्षाचे आस्तिक
In reply to यनावाला सरांच्या मनात देवाने घर केले आहे by सप्तरंगी
मज्जा
जगनिर्माता, जगन्नियंता,
रोचक चर्चा!
मग योद्धे ते अवसरी । युद्धास
In reply to मग योद्धे ते अवसरी । युद्धास by सतिश गावडे
लै भारी!
In reply to मग योद्धे ते अवसरी । युद्धास by सतिश गावडे
=))
In reply to मग योद्धे ते अवसरी । युद्धास by सतिश गावडे
लैच भारी.
In reply to लैच भारी. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मनःशांतीसाठी सगळे नास्तिक
In reply to लैच भारी. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
:-)
In reply to मग योद्धे ते अवसरी । युद्धास by सतिश गावडे
=)) =)) =))
कुणी देवदर्शनासाठी गेला । तिथे चेंगराचेंगरीत मेला । कुणी वाटेत ट्रकखाली आला । नाही वाचवले देवाने ।।असे झाले की डायरेक्ट स्वर्गात जागा मिळते, त्याचे काय ?! :) ;)In reply to मग योद्धे ते अवसरी । युद्धास by सतिश गावडे
जय हो
In reply to मग योद्धे ते अवसरी । युद्धास by सतिश गावडे
ऐला
In reply to मग योद्धे ते अवसरी । युद्धास by सतिश गावडे
=)) =))
मूलभूत घोळ
In reply to मूलभूत घोळ by गामा पैलवान
प्रश्न अगदी योग्य आहे.
In reply to प्रश्न अगदी योग्य आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मुळात ईश्वरच नाही असे
अॅक्चुअली यनावाला आस्तिक
In reply to अॅक्चुअली यनावाला आस्तिक by डॉ सुहास म्हात्रे
)))))))))
In reply to अॅक्चुअली यनावाला आस्तिक by डॉ सुहास म्हात्रे
खर तर परमेश्वरच नास्तिक आहे.
In reply to खर तर परमेश्वरच नास्तिक आहे. by प्रकाश घाटपांडे
घाटपांडे साहेब, वास्तवाचा असा
In reply to घाटपांडे साहेब, वास्तवाचा असा by arunjoshi123
सहमत आहे
In reply to सहमत आहे by गामा पैलवान
अहो त्याच अर्थानं मी लिहिलं
In reply to अॅक्चुअली यनावाला आस्तिक by डॉ सुहास म्हात्रे
तुम्हाला यनावालांवर विश्वासच
In reply to अॅक्चुअली यनावाला आस्तिक by डॉ सुहास म्हात्रे
व्यक्तिगत यनांचा उल्लेख....
In reply to व्यक्तिगत यनांचा उल्लेख.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
यनांचं एकूण अस्तित्वच एक
आज की ताजा खबर
छान चर्चा !
In reply to छान चर्चा ! by प्रसाद_१९८२
हे स्वत:ला नास्तिक म्हणवून
ईश्वराचे नास्तिकी वर्णन
In reply to ईश्वराचे नास्तिकी वर्णन by arunjoshi123
तुमच्यामते "ईश्वर कोण" हे
अरूण जोशी सर
In reply to अरूण जोशी सर by स्वधर्म
- नास्तिक कसे कोणत्याही
In reply to - नास्तिक कसे कोणत्याही by arunjoshi123
थोडं तुमच्यासारखं लिहू का?
In reply to - नास्तिक कसे कोणत्याही by arunjoshi123
थोडं तुमच्यासारखं लिहू का?
In reply to थोडं तुमच्यासारखं लिहू का? by स्वधर्म
कडक, मस्त, जबरदस्त
In reply to थोडं तुमच्यासारखं लिहू का? by स्वधर्म
मूळात आपण मूर्खता ही संकल्पना
In reply to अरूण जोशी सर by स्वधर्म
++११११
शिवदंड
In reply to शिवदंड by राही
आता यनावाला उद्या आमच्यासाठी
In reply to शिवदंड by राही
मुर्खपणांना आवर घालणे कठीण आहे.
In reply to मुर्खपणांना आवर घालणे कठीण आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बिरुटे सर
In reply to बिरुटे सर by ट्रेड मार्क
तोच तर विवेक
In reply to तोच तर विवेक by राही
राहीजी
रिलिजन आणि स्पिरिचुअलिटी या भिन्न गोष्टी आहेत.मुद्दा फक्त देव मानणे वा न मानणे याचा आहे. मी ना धर्माविषयी बोलतोय ना अध्यात्माविषयी आणि त्याची तुलना पण चर्चेत नाहीये. सर्वसामान्य लोक जे सतत कुठल्या ना कुठल्या अडचणींचा सामना करत असतात, ते थोडा मानसिक आधार, शांतता मिळण्यासाठी देवाचे स्मरण/ पूजा करत असतील किंवा देवळात जात असतील किंवा सकाळसंध्याकाळ घरातल्या देवापुढे हात जोडत असतील किंवा स्तोत्र मंत्र म्हणत असतील तर त्यांना मूर्ख बिनडोक का म्हणायचं?ऑफिसला वेळेत जाण्याचे,लाच न घेण्याचे आणि व्यवस्थित काम करणार्यांचे उदाहरण आपण दिले आहे. पण त्यात विशेष ते काय? हे त्यांचे कर्तव्यच असते. ते त्यांनी केलेच पाहिजे.तुम्ही उदाहरण अर्धवट वापरलेत. मुद्दा असा आहे की देवभोळे पापभिरू लोक निदान देवाच्या कोपाच्या वा नरकात जायला लागेल या भीतीने तरी चुकीचे काम करणार नाहीत. पण देव न मानणाऱ्यांना ही भीती नसेल. मग फक्त या "विवेकबुद्धी"वर अवलंबून राहायचं म्हणलं तर किती जणांकडे ती असते? असं म्हणतात की प्रत्येकजण आपापल्या दृष्टीने बरोबरच असतो. माझ्या विवेकबुद्धीला जे पटते ते तुमच्या विवेकबुद्धीला पटेल असं नाही. मग याचे प्रमाण कोणते मानायचे?श्रद्धाळू असणे हा एखाद्यायाचा व्यक्तिगत स्वभाव झाला पण स्वतःच्या नकळत त्याचा अतिरेक होऊ लागला तर ते त्याला आणि समाजाला हानिकारक आहेमी तेच तर म्हणलंय. यात सश्रद्ध आणि अश्रद्ध दोघेही आले. मी माझ्या प्रतिसादात लिहिलंय की आपल्या प्रापंचिक जबाबदाऱ्या नीट सांभाळून जर कोणी देवदेव करत असेल तर काय प्रॉब्लेम आहे? कोणी जर प्रवासातल्या वेळेत मनातल्या मनात जप किंवा स्तोत्र म्हणत असेल तर इतर कोणाला काय प्रॉब्लेम असावा? बाकी देवपूजा करण्यात वेळ घालवल्यामुळे घरात निर्माण ताणाबद्दल म्हणाल तर अश्रद्धांमुळे किंवा त्यांच्या विरोधामुळे घरात ताण निर्माण होत नसेल? नाहीतर मग अश्रद्धाचे आईवडील, जोडीदार, मुले हे सर्वच तितकेच अश्रद्ध असले पाहिजेत. सर्वसाधारणपणे नवरा आणि बायको वेगवेगळ्या स्वभावाचे असतात आणि आवडीनिवडीसुद्धा अगदी सारख्या नसतात. अगदी टोकाच्या नास्तिक नास्तिक व्यक्तीचा जोडीदार थोडा जरी आस्तिक असेल तर किती तणाव किंवा कुचंबणा असेल याचा विचार करा.In reply to बिरुटे सर by ट्रेड मार्क
राहींनी अतिशय उत्तम प्रतिसाद
In reply to राहींनी अतिशय उत्तम प्रतिसाद by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कर्मकांड
पण त्या श्रद्धेमुळे आपण स्वतःच नुकसान करुन घेत असतो पण देवाळू मोडमुळे माणूस कितीही नुकसान झालं तरी ते नुकसान होतंय, हे कळतंय तरी ते कबूल न करणे आणि त्यातच डुंबत जाणे हे घातक होत जाते.हे वाक्य हे गृहीतक जास्त वाटतंय. श्रद्धेमुळे का आणि कसं स्वतःचं नुकसान होतं? कशावरून सर्व श्रद्धाळू कर्मकांडांच्या मागे लागतातच? घरातल्या लोकांच्या सहन करण्याबद्दल बोलायचं तर घरातले सर्व जण सारख्याच लेव्हलचे नास्तिक असायला पाहिजेत तरच वाद होणार नाहीत. कारण एक टोकाचा अश्रद्ध असेल आणि दुसरा थोडा जरी सश्रद्ध किंवा अज्ञेयवादी असेल तरी कोणा एकाची कुचंबणा होणार. या सगळ्यात आपण कुठे थांबायचं हे कळणं महत्वाचं. एखादा नास्तिक मुलगा आस्तिक मुलीच्या प्रेमात पडला तर केवळ आपलं नास्तिक्य टिकवण्यासाठी प्रेमाचा अव्हेर करेल का? आपण प्रेम करतो त्या व्यक्तीसाठी (आई, वडील, जोडीदार, मुलं, मित्र) जर कधी देवासमोर हात जोडावे लागले किंवा प्रसाद घ्यावा लागला तर काय फरक पडतो?बाकी, अश्रद्धांळूचा मात्र असा कोणताही गजर नसतो. असं माझं मत आहे.यनावाला सारखा हा गजर करतात ना, इतरांना मूर्ख बिनडोक पण म्हणतात. वर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं पण देण्याचं सौजन्य दाखवत नाहीत.In reply to कर्मकांड by ट्रेड मार्क
प्रबोधनच....
In reply to प्रबोधनच.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
यनासर, व्यक्तीगत कोणाला मूर्ख
In reply to प्रबोधनच.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
यनासर, व्यक्तीगत कोणाला मूर्ख
यनासर, व्यक्तीगत कोणाला मूर्ख बिनडोक म्हणाले असतील असे मला वाटत नाही.तुम्ही त्यांचे बाकीचे लेख वाचले असतील असं मला वाटलं होतं. त्यांनी सरसकट सगळ्या श्रद्धा ठेवणाऱ्यांना तत्सम विशेषणांनी गौरविलेले आहे.यनावाला सरांचा गजर प्रबोधनाचा आहे, त्याचा झाला तर फायदाच होतो नुकसान होणार नाही.हे तुमचं वैयक्तिक मत झालं. मला जर रोज गायत्री मंत्र किंवा हनुमान चालीसा म्हणल्याने छान वाटत असेल तर कोणाला काय प्रॉब्लेम असावा? हे मंत्र म्हणणे मूर्खपणाचे आहे असं मला सांगून माझा काय फायदा होणार आहे?मिपावर टाकलेल्या लेखनाला प्रतिसादाला उत्तर दिलंच पाहिजे असा काही नियम नाही, ज्याच्या त्याच्या सौजन्याचा भाग आहे.हे तुम्ही कोणासाठी म्हणताय ते कळलं नाही. जर यनावाला उत्तर देत नाहीत या म्हणण्यावर असेल तर त्यांनी काढलेल्या धाग्यांवर विचारलेल्या प्रश्नांना तरी उत्तर द्यावे अशी अपेक्षा आहे. एक गोष्ट नोंद घेण्यासारखी आहे की त्यांना सोयीस्कर असेल त्या ठिकाणी मात्र ते प्रतिसाद देतात. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे - हा ज्याच्या त्याच्या सौजन्याचा भाग आहे.In reply to प्रबोधनच.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हम्म
In reply to राहींनी अतिशय उत्तम प्रतिसाद by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रश्न
In reply to प्रश्न by विकास
उत्तर....
In reply to उत्तर.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आधुनिकता?
धागाकर्ते: तुम्ही एक पत्र
निरीश्वरवाद्यांना ईश्वर
अधिक महत्त्वाचा प्रश्न हा आहे
In reply to अधिक महत्त्वाचा प्रश्न हा आहे by arunjoshi123
गनिमी काव्याने एक वार
In reply to गनिमी काव्याने एक वार by डॉ.नितीन अण्णा
कूच दर्द हे मेरे सिने में
कूच दर्द हे मेरे सिने मेंकुछ म्हणायचं आहे का तुम्हाला ? "कूच/कुच"चा अर्थ जरा वेगळा होतो :) ;)In reply to कूच दर्द हे मेरे सिने में by डॉ सुहास म्हात्रे
सर
दाभोलकर नेहमी म्हणायचे की
In reply to दाभोलकर नेहमी म्हणायचे की by प्रकाश घाटपांडे
दाभोलकर नेहमी म्हणायचे की
In reply to दाभोलकर नेहमी म्हणायचे की by प्रकाश घाटपांडे
गरज विवेकी धर्मजागराची हा
In reply to दाभोलकर नेहमी म्हणायचे की by प्रकाश घाटपांडे
दाभोलकर नेहमी म्हणायचे की
सत्य म्हणजे काय ?
तर्कसुसंगत निष्कर्ष
In reply to तर्कसुसंगत निष्कर्ष by यनावाला
+१
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विनोद अगदी हसण्यासारखा!
In reply to तर्कसुसंगत निष्कर्ष by यनावाला
समदर्शी की अस्तित्वहीन ?
In reply to तर्कसुसंगत निष्कर्ष by यनावाला
नास्तिकाने आस्तिकांना
In reply to तर्कसुसंगत निष्कर्ष by यनावाला
कोणातरी, टिपिकल अंधश्रद्धाळू,
In reply to तर्कसुसंगत निष्कर्ष by यनावाला
देव असतो का नसतो ते जाऊ द्या,
देव असतो का नसतो ते जाऊ द्या, पण जे काय महातार्किक लिहिलंय त्यावरनं हे सिद्ध होतंय कि जो जो कोणी अस्तित्वात असतो तो तो त्याला न मानणारांचे जगणे हराम करत असतो. बस्स.
In reply to तर्कसुसंगत निष्कर्ष by यनावाला
यावरून देव अस्तित्वात नाही
In reply to यावरून देव अस्तित्वात नाही by गवि
त्याचं भौतिक अस्तित्व
In reply to त्याचं भौतिक अस्तित्व by arunjoshi123
सहमत आहे
In reply to सहमत आहे by सतिश गावडे
अस्तित्व ही संकल्पना
In reply to अस्तित्व ही संकल्पना by arunjoshi123
विज्ञानाच्या नावाने आपले
विज्ञानाच्या नावाने आपले ईश्वरविषयक अज्ञान खपवण्यात उत्साही पुरोगामी नास्तिक तरबेज असतात. हा. हा.बरोबर ओळखलंत तुम्ही. आणि अशा लोकांना उघडे पाडण्याचे तुम्ही जे धर्मकार्य अंगिकारले आहे त्यासाठी तुमच्याबद्दल माझ्या मनात अतीव आदर आहे.In reply to त्याचं भौतिक अस्तित्व by arunjoshi123
ईश्वराचं भौतिक अस्तित्व
In reply to तर्कसुसंगत निष्कर्ष by यनावाला
तसेच सर्व माणसे देवाची लेकरे