युती संपली, पुढे काय?
In reply to आपण अनुमान काढताय का सेनेवरचा राग काढताय ?? by वरुण मोहिते
का भाजप बेस्ट असं आडून सांगताय ? असो कोणताही पक्ष अस्तित्वहीन होत नसतो . मोदी शहा जोडगोळी ह्यातले शहा तर उदात्त विचारसरणीचे आहेत त्यामुळे झपाट्याने हाव वाढली आहेच पक्षाची तिट्यानंच भारी पडणारे . अजूनही मोदींच्या नावावर पक्ष जोरदार चालतोय त्याची कर्ण वेगळी तो हा विषय नाही.पक्ष प्रवाही नसले, त्यात नवीन नेतृत्व निर्माण झाले नाही, काळानुसार पक्षाने आपल्यात बदल घडविला नाही, पक्षवृद्धीसाठी प्रयत्न केले नाहीत तर पक्ष अस्तित्वहीन होतात. भारतात यापूर्वी अनेक पक्ष अस्तित्वहीन झालेले आहेत. जनता पक्ष, जनता दल, शेकाप, मनसे, निजद, मगोप, कर्नाटकमधील कै. रामकृष्ण हेगडे यांचा जनशक्ती पक्ष असे अनेक पक्ष अस्तित्वहीन झाले आहेत. डावे पक्ष अस्तित्वहीन होण्याच्या मार्गावर आहेत. रिपब्लिकन पक्षाचे सर्व गट अस्तित्वहीन आहेत. अजितसिंगचा रालोद त्याच मार्गावर आहे. शिवसेना देखील त्याच मार्गावर आहे.
In reply to का भाजप बेस्ट असं आडून by श्रीगुरुजी
In reply to का भाजप बेस्ट असं आडून by श्रीगुरुजी
In reply to खरतर ठाण्यानै शिवसेनेला by औरंगजेब
In reply to खरतर ठाण्यानै शिवसेनेला by औरंगजेब
ठाणे नौपाडा हा भाग कायमच भाजपचा बालेकिल्ला राहिलेला आहे१९९७ मध्ये ठाण्यात शिवसेना आणि भाजप युती नव्हती. त्यामुळे शिवसेना आणि भाजप उमेदवार एकमेकांविरूध्द लढले होते. मागे एका प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे आमच्या वॉर्डातून शिवसेनेचे विलास सामंत निवडून आले होते. तर आमच्या शेजारच्या वॉर्डातून भाजपच्या विमल दाते निवडून आल्या होत्या (माझ्या आठवणीप्रमाणे तो वॉर्ड महिलांसाठी राखीव होता). विशेष म्हणजे याच वॉर्डात ठाण्याचे खासदार प्रकाश परांजपे आणि आमदार मो.दा.जोशी (दोघेही शिवसेनेचे) या दोघांचीही निवासस्थाने होती. किंबहुना विमल दाते आणि मो.दा.जोशी यांची निवासस्थाने चालत दीड मिनिटाच्या अंतरावर होती*. खासदार आणि आमदार हे दोघेही राहात असलेल्या वॉर्डातून शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला ही त्यावेळी मोठी बातमी झाली होती. १९९७ नंतर ठाणे सोडल्यामुळे या भागात नंतर काय झाले हे विशेष ट्रॅक केले नव्हते.
नौपाड्यात संजय केळकर निवडून आले होते आणी आहेतहो बरोबर. पण तरीही विधानसभा आणि महापालिका निवडणुकांचे डायनॅमिक्स पूर्ण वेगळे असल्यामुळे असेच निकाल महापालिका निवडणुकांमध्ये लागतील असे म्हणता येणार नाही. तरीही नौपाड्यातील सुशिक्षित मराठी आणि बहुतांशी उच्चवर्णीय सुशिक्षित भागात शिवसेनेला पूर्वीइतका सहज विजय मिळेल असे वाटत नाही. १९९२ च्या महापालिका निवडणुकांच्या वेळी विलास सामंत आमच्या घरीही प्रचारासाठी आले होते. आमच्या बिल्डिंगमध्ये त्यांना "इथे प्रचारातला वेळ फुकट घालवायची काही गरज नाही-- आमची मते तुम्हालाच मिळणार आहेत" असेही सांगितले गेले होते हे पण लक्षात आहे. आता परिस्थिती काय आहे याची कल्पना नाही. आणि नौपाड्यात फार तर मनपामध्ये ३-४ वॉर्ड असतील त्यामुळे एकट्या नौपाड्यावरून निवडणुकांचे निकाल ठरणार नाहीत. ठाणे मनपा भागात कळवा, मुंब्रा हे पण येतात आणि तिथे राष्ट्रवादीचे बळ बरेच आहे आणि त्यामानाने शिवसेना तिथे कमकुवत आहे. हा जितेंद्र आव्हाड आणि वसंत डावखरेंचा प्रभाव असलेला भाग आहे. तेव्हा ठाण्यातील निकाल बघणेही रोचक ठरेल. *: मो.दा.जोशी सगळ्यात पहिल्यांदा १९९० मध्ये विधानसभेवर निवडून गेले. २००३ मध्ये त्यांचे निधन होईपर्यंत ते आमदार होते. १३ वर्षे आमदार असूनही शेवटपर्यंत ते एका लहान बोळातील दोन खोल्यांच्या चाळीतील घरातच राहात होते. विमल दातेही कमीतकमी ५ (बहुदा १० सुध्दा) वर्षे नगरसेवक असूनही अशाच एका दोन खोल्यांच्या साध्या घरातच राहायला होत्या. त्या काळी आपण किती साधे याचे ढोल पेपरमध्ये जाहिराती देऊन पिटायची फॅशन आली नव्हती. आणि तशी फॅशन आली असती तरी या दोघांनी तसे ढोल नक्कीच पिटले नसते याची खात्री आहे. मो.दा.जोशी १९८६ मध्येही ठाणे मनपावर निवडून गेले होते. १९८६ मध्ये शिवसेनेला मनपामध्ये निसटते बहुमत मिळाले होते. १९८९ मध्ये महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेना उमेदवाराचा एका मताने पराभव झाला होता.याचे कारण शिवसेनेचे एक मत फुटले होते आणि एका शिवसेना नगरसेवकाने काँग्रेसच्या बाजूने मत दिले होते. त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांना राजीनामा द्यायचा आदेश दिला होता. त्यात मो.दा.जोशींनीही राजीनामा दिला होता. शिवसेनेचे लुईसवाडीतील नगरसेवक श्रीधर खोपकर यांनी शिवसेनेच्या भाषेत 'गद्दारी' केल्यामुळे नंतर त्यांचा खून झाला आणि त्या प्रकरणात आनंद दिघेंनाही काही दिवस तुरूंगात जावे लागले होते.
२००९ मध्ये गुहागरमधून १९८० पासून सातत्याने निवडून येणार्या डॉ. नातू पितापुत्रांना डावलून सेनेने हा मतदारसंघ आपल्या घशात घातला.हा मतदारसंघ शिवसेनेला मिळालेला नसून भाजपने सोडलेला आहे. भाजपमधल्या कोणीतरी दलाली करून नातूंचा पत्ता कापला हे उघड आहे. त्याचा दोष शिवसेनेकडे कसा येतो? राबणाऱ्या कार्यकर्त्याची शिवसेनेला कधीच कमतरता पडली नाही. भाजपला पडतेय. नातूंसारख्या हाडाच्या कार्यकर्त्याच्या तोंडाला पानं पुसली तर मतदारांनी भाजपला मतं का द्यायची, असा प्रश्न उपस्थित होतो. म्हणूनंच भाजपला संघाच्या कार्यकर्त्यांवर अवलंबून राहावं लागतं. कारण ते नि:स्वार्थ वृत्तीने कार्य करतात. भाजप जसा राजकीय पक्ष आहे तशी शिवसेना नाही. शिवसेनेचं मूळ स्वरूप (म्हणजे स्थापनेमागचं उद्दिष्ट) राजकीय पक्ष बनणे नसून एक चळवळ चालवणे अशा प्रकारचं आहे. शिवसेना स्वत:चा कार्यकर्ता स्वत:च बनवते. हा दोहोंत फरक आहे. जाताजाता : शिवसेनेच्या ५ आमदारांच्या हत्या राजकीय समजल्या जात नाहीत. त्या खंडणीसाठी झाल्या. अगदी तशीच कृष्णा देसाईची हत्याही टोळीयुद्धात झालेली आहे. तिला राजकीय रंग फासला गेलाय. आ.न., -गा.पै.
युती संपली, पुढे काय?
भाजप भक्त शिवसेना कशी हलकट आहे अन आता कशी खड्ड्यात जाणार आहे ते कोकलत बसणार (जे वरती दिसलेच) अन सेनेचे बोके अंगावर पिवळा रंग फासून काळे पट्टे ओढून आम्हीच कसे वाघ अशी म्याव म्याव (त्यांच्यालेखी डरकाळ्या) फोडत बसणार. बाकी रस्त्यावरचे खड्डे, सांडपाणी निचरा, सार्वजनिक वाहतूक वगैरे जाऊ दे खड्ड्यात.In reply to युती संपली, पुढे काय? by फेदरवेट साहेब
In reply to युती संपली, पुढे काय? by फेदरवेट साहेब
In reply to चांगली बातमी by वरुण मोहिते
In reply to अगदी सोपे लॉजिक आहे. भाजपचा by श्रीगुरुजी
सोय
' असे आहे धन्यवाद.In reply to क ह र हास्यास्पद लेख! =)) =)) by संदीप डांगे
In reply to यात हास्यास्पद काहीच नाही. मी by श्रीगुरुजी
In reply to गुरुजी, आजचा महाराष्ट्रातील by संदीप डांगे
का बुवा अनाकलनीय व गूढ आहे? काहीतरीच. ज्याचा प्रभाव जास्त तो जास्त जागा घेतो हे स्पष्ट आहे. आज भाजप देईल काय जागा? नाहीच देणार कारण आता पारडं फिरलंय. जो दादा असतो तोच दादागिरी करतो, युती तयार होण्याच्या आधीच्या काळात भाजपाला महाराष्ट्रात तळागाळात फार ओळख नव्हती. एक राष्ट्रीय पातळीवरचा पक्ष एवढीच ओळख, भाजप मोठा झाला तो सेनेच्या खांद्यावर बसून. सेनेने तळागाळात मशागत केली, हिंदुत्वाची पाळेमुळे रुजवली त्याचा आयता फायदा घेत भाजप मोठी झाली. तुमची वक्तव्ये पूर्णपणे भाजपप्रेमी आहेत व एकतर तुम्हाला इतिहासच माहित नाही किंवा तुम्ही जाणीवपूर्वक मोडतोड करत आहात हे वरच्या वाक्यांतून दिसून येते. गूढ व अनाकलनीय म्हणे! हसणार नाही तर काय अशा वाक्यांवर...ज्याचा प्रभाव जास्त तो जास्त जागा घेतो!!!! १९ वर्षात ५ निवडणुकीत फक्त १ जागा मिळविणार्या पक्षाचा प्रभाव दोनच निवडणुकीत १२ व १६ जागा मिळविणार्या पक्षापेक्षा जास्त?????? गंमतच आहे. युती तयार होण्याचा आधीच्या काळात भाजप थोड्या प्रमाणात का होईना पण महाराष्ट्राच्या सर्व भागात होता. १९८० च्या व १९८५ च्या निवडणुकीत भाजपने कोकण, पुणे, मुंबई, ठाणे, मराठवाडा, खानदेश, विदर्भ इ. वेगवेगळ्या भागातून मोजकेच असले तरी स्वतःचे १२ व नंतर १६ आमदार निवडून आणले होते. शिवसेनेला मात्र ठाणे व मुंबईतील काही वॉर्डांपलिकडे ओळख नव्हती. शिवसेनेला मुंबईत सुद्धा एकमेव आमदार निवडून आणता आला तो थेट १९८५ मध्ये. १९८० मध्ये तर प्रचंड लाट असलेल्या इंदिरा काँग्रेसशी युती असूनसुद्धा सेनेचे खासदारपदाचे उमेदवार तिसर्या क्रमांकावर फेकले गेले होते. आणि म्हणे मुंबई आमचा बालेकिल्ला. त्यापूर्वी उर्वरीत महाराष्ट्र तर सोडाच, मुंबईत व ठाण्यातही सेनेला विजय मिळाला नव्हता. शिवसेना हा आयता बिळावरचा नागोबा आहे. भाजपमुळे सेना मुंबईच्या बाहेर महाराष्ट्रात ओळखीची झाली ही वस्तुस्थिती होती. मी अजिबात मोडतोड केलेली नाही. जी वस्तुस्थिती होती व आकडेवारी होती तीच सांगितली आहे. आकडे स्पष्ट बोलत असूनही शिवसेनाच भाजपपेक्षा मोठी या भ्रमात रहायचे ठरविलेच असेल तर नाईलाज आहे.
हा हा हा! सेनेची फारशी ताकत नसूनसुद्धा मोठा वाटा द्यायला भाजपचे धुरिण गांजा पिऊन पडले होते की काय? काहीही. कुठेतरी जगाच्या इतिहासात ज्याची ताकत कमी त्याला जास्त वाटा देण्याच्या घटना घडल्या असतील तर जाणकारांनी नक्की सांगावे. अहो हे अटीतटीचे राजकारण आहे, कर्तृत्व नसून फुकट द्रौपदी मिळायला युधिष्ठिराचे महाभारत नव्हे.भाजपच्या तत्कालीन नेत्यांना (महाजन, मुडे, अडवाणी) योग्य वाटाघाटी करता आल्या नव्हत्या ही वस्तुस्थिती मी मूळ लेखातच मांडली आहे. भाजपच्या सुदैवाने २०१४ मध्ये भाजपची सूत्रे मोदी-शहा यांच्यासारख्या खमक्या नेत्यांच्या हातात होती. त्यामुळेच त्यांनी शिवसेनेची मुजोरी मोडून काढून शिवसेनेला त्यांची जागा दाखवून दिली. २०१६ मध्ये झालेल्या २०० नगरपालिकांच्या निवडणुकीतही त्याचे प्रत्यंतर आले आहे.
किती तो आटापिटा, हसायला नही येणार तर काय? माझे ते माझे आणि तुझे तेही माझेच???? मते भाजपची होती शिवसेनेला मिळाली, अजून काही...?ती भाजपचीच मते होती. त्यात सेनेचा वाटा अत्यल्प होता. विश्वास बसत नसेल तर १९७७ पासूनची आकडेवारी बघा. १९७८ मध्ये शिवाजीनगरमधून जनता पक्षाच्या (आजचा भाजप हा त्यावेळी जनता पक्षाचाच भाग होता) शांती पटेल निवडून आल्या होत्या. १९८० मध्ये भाजप स्थापन झाल्यावर १९८० व १९८५ मध्ये भाजपचे अण्णा जोशी निवडून आले होते. जर शिवाजीनगरमध्ये सेनेकडे मते होती तर १९७७, १९८०, १९८५ या निवडणुकीत सेनेला का विजय मिळाला नव्हता? १९९० मध्ये सेनेने हा मतदारसंघ घशात घातल्यावर सलग ५ निवडणु़कीत सेनेचा उमेदवार युतीच्या तिकिटावर विजयी झाला. सेनेला मिळालेली मते ही सेनेची मते नसून भाजपचीच होती. युती असल्याने नाईलाजाने भाजपच्या मतदारांना सेना उमेदवाराला मते द्यावी लागत होती. २०१४ मध्ये युती तुटून सेना व भाजप स्वतंत्र लढल्यावर तब्बल ६५ हजार मतांच्या फरकाने भाजप जिंकला. ही सर्व वस्तुस्थिती असताना हा मतदारसंघ सेनेचाच होता असा दुराग्रह बाळगणार असाल तर नाईलाज आहे. २०१४ ला मोदीलाटेच्या प्रभावात पुण्यात गाढव उभे केले असते निवडणुकीला तरी ते निवडून आले असते, तेव्हा भाजपचे लाळघोटू कौतुक करणारे लेख छापले म्हणजे वस्तुस्थिती आहे असे समजणे हास्यास्पद आहे. मोदी नसताना सुद्धा इथून भाजपचाच उमेदवार विजयी होत होता. यात लोळघोटू कौतुक नसून ही वस्तुस्थिती आहे. वस्तुस्थिती नाकारायचीच असेल तर नाईलाज आहे. संपूर्ण लेखात एक पन्नास वर्षाच्या मोठ्या लांबलचक काळात दोन पक्षांच्या उदयाचा, त्याच्या कारणांचा, प्रभावनिर्मिती, निवडणुकांचे निकाल, तत्कालिक कारणे, विविध बदलांचा, आर्थिक-सामाजिक बदलांचा राजकारणावर झालेला प्रभाव, महत्त्वाच्या घटना ह्यांचा प्रभाव ह्या सगळ्या आणि अनेक छोट्यामोठ्या गोष्टींचा अजिबात विचार न करता, केवळ सोयीची तेवढी मांडणी करुन भाजपच कसा श्रेष्ठ व शिवसेना कशी फालतू हे दाखवण्याचा हास्यास्पद प्रयत्न ह्याशिवाय ह्या लेखाची फारशी किंमत नाही. सेनेच्या तुलनेत भाजपला जास्त जनाधार आहे ही वस्तुस्थिती अनेकवेळा निकालांवरून सिद्ध झाली आहे. सर्व निकाल व आकडेवारी समोर असूनसुद्धा शिवसेनेचीच भलामण करणे हे अत्यंत हास्यास्पद आहे.
सेनाभाजप संबंध हे वाळूच्या घड्याळाप्रमाणे झाले आहेत. आधी सेना वर होती, भाजप खाली, आता भाजप वर आहे सेना खाली. बाकी एवढं समजून घ्यायला कोणाचही समर्थक-विरोधक असायची गरज नाही. पुणे-मुंबई सोडून जरा प्रत्यक्ष फिरले व जाणून घ्यायची खरी जिज्ञासा असेल त्याने जाणून घ्यावे. पुण्यात बसून नुसत्या आकडेवारीवर गप्पा हाणणे सोयिस्कर आहे, पण खरेच असेल असे नव्हे.सेना मुळातच खुजी होती. सेना वर दिसत होती कारण भाजपने सेनेला खांद्यावर घेतले होते. २०१४ पासून भाजपने सेनेला खांद्यावरून खाली आपटल्यानंतर झालेल्या सर्व निवडणुकीत कोण उंच आणि कोण खुजा हे निर्विवाद सिद्ध झाले आहे. मागील २ महिन्यात महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात नगरपालिका निवडणुका झाल्या. त्याचे निकाल स्पष्ट आहेत. निव्वळ पुण्यामुंबईतच नव्हे तर सर्वत्र एकच कल आहे. समांतरः नाशिकमधे मनसेतून निवडून गेलेले नगरसेवक धडाधड एकामागोमाग एक भाजपात सामील झालेत. ह्यात माझ्या भागातल्या दोन अतिशय चांगले काम करणार्या नगरसेवकांचाही समावेश आहे. आता जनता यांनी केलेल्या चांगल्या कामांमुळे यांनाच निवडून देणार आणि श्रीगुरुजींसारखे निवडणुकीचे निकालात निवडून आलेली भाजपचे चिन्हे मोजून पाठ थोपटून घेणार... निर्जीव आकडेवारी आणि जीवंत जमीनी सत्य ह्यात फरक असतो. मान्य व अमान्य करण्याचा पर्याय वस्तुस्थितीत नसतो. इनकमिंग व आऊटगोईंग सर्व पक्षात सुरू असते. नाशिकचे इतर पक्षातील अनेक नेते भाजपप्रमाणे सेनेमध्ये सुद्धा गेले आहेत. मुंबईतही हीच परिस्थिती आहे. आजच मुंबई महापालिकेतील काँग्रेसचा माजी पक्षनेता रविंद्र आंबेरकर सेनेत गेला. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत सेनेने सुद्धा २८८ पैकी ५९ तिकिटे इतर पक्षातून आलेल्या आयारामांना दिली होती. 'सामना'तून किंवा शिवाजी पार्कवर आपल्या कार्यकर्त्यांसमोर केलेल्या भाषणात फुशारक्या व बढाया मारणे खूप सोपे असते. परंतु ती वस्तुस्थिती असतेच असे नाही. निकालातून प्रत्यक्ष परिस्थिती समजते.
In reply to का बुवा अनाकलनीय व गूढ आहे? by श्रीगुरुजी
In reply to एकतर युती संबंधी आपण बोलत आहोत by वरुण मोहिते
अजून एक वाटाघाटी जितक्या झाल्या जागा सोडल्या ते राहूदे पण त्याकाळात सेनेला महाराष्ट्रभर पोचायचं होता त्यामुळे सर्व ठिकाणी अगदी काही ठिकाणी प्रभाव नसून सुद्धा सेनेने उमेदवार उभे केले. भाजपाला इतकी खात्री होती तर त्यांनी का नाही मागितले ते मतदारसंघ .आफ्टरऑल त्यांचा प्रभाव होताइतकी वर्षे पडती भूमिका घेऊन भाजप नेतृत्वाने शिवसेनेला जास्त जागा लढू दिल्या हे मुळातल्या लेखात लिहिले असूनही परत हा प्रश्न विचारायचे प्रयोजन काय? बरं मग २०१४ मध्ये भाजपला खात्री होती म्हणून जास्त जागा मागितल्या त्या शिवसेनेनी का सोडल्या नाहीत?
In reply to मजाच म्हणायची by गॅरी ट्रुमन
In reply to तेच म्हणतोय ना वेगवेगळे लढले by वरुण मोहिते
त्यामुळे आपण प्रतिसाद भाजप समर्थक म्हणून देत आहात .ओक्के. मी कोणाचे समर्थन करावे आणि कोणाचे समर्थन करू नये हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे त्यामुळे याविषयी कोणतेही भाष्य करायची गरज मला वाटत नाही.
In reply to ओक्के by गॅरी ट्रुमन
In reply to एकतर युती संबंधी आपण बोलत आहोत by वरुण मोहिते
ह्या उलट शिवसेनेची स्थापना सामाजिक चळवळीतून राजकारणाकडे वळली.हा एक भ्रम आहे. सेनेने स्थापनेपासून अगदी २ वर्षांच्या आतच निवडणुक लढायला सुरूवात केली होती. सामाजिक चळवळ वगैरे म्हणजे शुद्ध थापेबाजी आहे. भाजपा कडे संघाचे काम करणारे आयते कार्यकर्ते होते जे आजही आहेत त्यामुळे तुलना चुकली आहे पुढे १९८५ ला एक आमदार होता असे आपण म्हणत आहात त्याचवेळी १९९० ला भाजपच्या ४२ आणि सेनेच्या डायरेक्ट ५२ झाल्या हा मुद्दा आपण टाळला. सेनेच्या १ वरून डायरेक्ट ५२ जागा झाल्या नव्हत्या. युती केल्यामुळे भाजपची मते त्यांना मिळाली होती. १८३ लढवून ५२ (त्यात भाजपचे शिवाजीनगरसारखे ढापलेले हक्काचे मतदारसंघ) आणि १०५ लढवून ४२ यात कोण सरस? भाजप चा प्रभाव होता तर जागावाटप असा विषम का केला हे हि टाळला . म्हणजे भाजप वाटाघाटींमध्ये चुकला म्हणजे ज्यांनी भाजप वाढवली ते चुकले .पक्षाला जाग अली २०१४ ला खमके नेते असताना .ओके . अजून एक वाटाघाटी जितक्या झाल्या जागा सोडल्या ते राहूदे पण त्याकाळात सेनेला महाराष्ट्रभर पोचायचं होता त्यामुळे सर्व ठिकाणी अगदी काही ठिकाणी प्रभाव नसून सुद्धा सेनेने उमेदवार उभे केले. भाजपाला इतकी खात्री होती तर त्यांनी का नाही मागितले ते मतदारसंघ .आफ्टरऑल त्यांचा प्रभाव होता . त्यामुळे स्ट्राइक रेट हा मुद्दा हि गैरलागू होतो . याचे उत्तर मूळ लेखातच दिले आहे. इनकमिंग करणे विरोधी पक्षातून इतक्या " स्ट्राईक रेट" ने आजवर पाहण्यात नाही आले . तुम्हाला पूर्वीची फारशी माहिती दिसत नाही. १९८० मध्ये हरयानात जनता पक्षाचे सरकार होते. त्यात भजनलाल मुख्यमंत्री होते. १९८० च्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा काँग्रेसला देशात बहुमत मिळाल्यावर भजनलालसकट हरयानातील सर्व मंत्री व आमदार काँग्रेसमध्ये डेरेदाखल झाले होते. १९८६ मध्ये पद्मविभूषण डॉ. शरद पवार आपले सर्व ५६ आमदार काँगेसच्या गोठ्यात घेऊन गेले होते. या दोन घाऊक इनकमिंगच्या तुलनेत वर्तमानात होणारे इनकमिंग म्हणजे किस झाड की पत्ती.
In reply to त्यामुळे १९९० पासून बोला . by श्रीगुरुजी
या दोन घाऊक इनकमिंगच्या तुलनेत वर्तमानात होणारे इनकमिंग म्हणजे किस झाड की पत्ती.बरं, तेव्हाचे सांगितले, तर आताचे हे किस झाडकी पत्तीवाले इनकमिंगही कुठून कुठे होत आहे त्याचे डिटेल्स असतीलच तुमच्याकडे तेही द्या, अर्धसत्य बोलून दिशाभूल करु नका म्हणजे झालं. गोव्यातले भ्रष्टाचार सिद्ध झालेल्या कोणाला सन्मानपूर्वक भाजपात घेतले, ते का? आणखीही बर्याच ठिकाणी गुंड, भ्रष्टाचारी, घराणेशाहीवाल्यांना आत घेतलंय भाजपने. २०१४ च्या आधी झालेले इन्कमिंग, राज्यांच्या निवडणूकांआधी झालेले इनकमिंग तेही काँग्रेसपक्षातून. कॉन्ग्रेसमुक्त भारताचं स्वप्न कॉन्ग्रेसयुक्त भाजप होऊन पूर्ण होईल असं दिसतंय... =)) =))
In reply to त्यामुळे १९९० पासून बोला . by श्रीगुरुजी
In reply to गुरुजी, आजचा महाराष्ट्रातील by संदीप डांगे
युती तयार होण्याच्या आधीच्या काळात भाजपाला महाराष्ट्रात तळागाळात फार ओळख नव्हती.आणि तरीही भाजपला अगदी १९८० मध्येही ९.४% मते होती बरं का.
२०१४ ला मोदीलाटेच्या प्रभावात पुण्यात गाढव उभे केले असते निवडणुकीला तरी ते निवडून आले असते, तेव्हा भाजपचे लाळघोटू कौतुक करणारे लेख छापले म्हणजे वस्तुस्थिती आहे असे समजणे हास्यास्पद आहे.ही गोष्ट २०१४ च्या लोकसभा नव्हे तर विधानसभा निवडणुकीची आहे. आणि त्यावेळी शिवसेना आणि भाजपचे उमेदवार एकमेकांविरूध्द उभे होते त्याची गोष्ट बोलली जात आहे. जर शिवाजीनगरमध्ये शिवसेनेची इतकी ताकद असती तर विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेचा उमेदवार निवडून जायला हवा होता तसे न होता भाजपचा उमेदवार आरामात निवडून गेला एवढाच मुद्दा आहे. बाकी आकड्यांकडे दुर्लक्षच करायचे असेल तर गोष्ट वेगळी.
In reply to मजाच म्हणायची by गॅरी ट्रुमन
मजाच म्हणायची. मी दुसर्या चर्चेतील एका प्रतिसादात मांडलेले मुद्दे आणि श्रीगुरूजींनी या लेखात मांडलेले मुद्दे जवळपास सारखेच आहेत. तरीही श्रीगुरूजी "भाजपप्रेमी" आणि त्यांना इतिहास माहित नाही पण माझ्याविरूध्द मात्र काहीच कोणी बोललेले नाही. बहोत ही नाइन्साफी है :)इतरांचे माहीत नाही पण सर्व लोकांचे सर्व धाग्यांवरचे सर्व प्रतिसाद मी वाचलेच असतील असे नव्हे. तेव्हा तसे समजणे ही बहूत नाइन्साफी आहे. :-)
आणि तरीही भाजपला अगदी १९८० मध्येही ९.४% मते होती बरं का.कुठे, कधी, रेफरन्स प्लिज... :-)
ही गोष्ट २०१४ च्या लोकसभा नव्हे तर विधानसभा निवडणुकीची आहे. आणि त्यावेळी शिवसेना आणि भाजपचे उमेदवार एकमेकांविरूध्द उभे होते त्याची गोष्ट बोलली जात आहे.कोणत्या निवडणुकीबद्दल बोलतायत ते इतकं कळतंय हो! बाकी मोदीलाट लोकसभेच्यावेळेसच होती, विधानसभेला संपली किंवा वापरली नाही असे मत असेल तर असो. मुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकलं काल, आता नगरपालिकेच्या निवडणुकिसाठीही राज्याचा मुख्यमंत्री मोदींच्या नावाने मते ओढण्याचा प्रयत्न करतोय. हेच तर सगळ्याच पक्षात होतं, मग भाजपच कसा काय वेगळा म्हणावा?
जर शिवाजीनगरमध्ये शिवसेनेची इतकी ताकद असती तर विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेचा उमेदवार निवडून जायला हवा होता तसे न होता भाजपचा उमेदवार आरामात निवडून गेला एवढाच मुद्दा आहे.शिवसेनेची खरी ताकद बाळासाहेबांसोबत गेली, आणि मोदीलाटेने त्याचे आणखी नुकसान केले, वरुन उधोजीराजेंना बाळासाहेबांची जागा घेणे जमले नाही. बाळासाहेबांची अॅक्टीवीटी थांबल्यापासून सेनेची ताकद कमी होत गेली आहे. राणे गेल्यापासून अवकळा यायला सुरुवात झाली.. बाकी आताची सेना आणि तेव्हाची सेना यांची तुलना होऊ शकत नाही.
बाकी आकड्यांकडे दुर्लक्षच करायचे असेल तर गोष्ट वेगळी.सोयींच्या आकड्यांकडेच बघत बसायचे असेल तर गोष्टच वेगळी... प्रत्येक भूमिकेसाठी सोयीची आकडेवारी उपलब्ध असतेच. :-) आकड्यांचीच गोष्ट करायची तर २०१४ लोकसभेत ३१% मते आहेत भाजपला. आणि कॉन्ग्रेसला १९.५%. मतांची संख्या अनुक्रमे 17,16,60,230 आणि 10,69,35,942. तरी निवडून आलेल्या खासदारांची संख्या २८२ विरुद्ध ४४. इतके घोटाळे करुन, भाजपचा इतका टेक्नोसॅव्ही प्रचार असूनही. दहा कोटींच्या वर मते मिळालीच कॉन्ग्रेसला, भाजपला मोदीलाटेची साथ असून सतरा कोटी. आकड्यांकडे बघून निष्कर्ष काढायचे कि कसे ते बघा!
In reply to मजाच म्हणायची. मी दुसर्या by संदीप डांगे
कुठे, कधी, रेफरन्स प्लिज... :-)पान ११ . ही पी.डी.एफ फाईल निवडणुक आयोगाच्या संकेतस्थळावरील आहे. आणि हो. या फाईलमध्ये कुठे शिवसेना हे नाव आढळले तर जरूर सांगा.
आकड्यांकडे बघून निष्कर्ष काढायचे कि कसे ते बघा!तुम्ही काढू नका निष्कर्ष आकड्यांकडे बघून. पण म्हणून इतरही तसेच करतील असे अजिबात नाही. रच्याकने अगदी १९५२ च्या पहिल्या लोकसभा निवडणुकांमध्येही स्वातंत्र्यलढ्याची पूर्ण लीगसी असून, पंडित नेहरूंसारखा नेता असूनही काँग्रेसला ४५% मतेच मिळाली होती. म्हणजे अगदी तेव्हाही ५५% मते विरोधात गेली होती. इतकी वर्षे या वेस्टमिन्स्टर पध्दतीचा काँग्रेसला फायदा झाला पण नंतर नुकसान होत आहे एवढेच.
In reply to :) by गॅरी ट्रुमन
In reply to संदर्भासाठी धन्यवाद. by संदीप डांगे
प्रत्येक भूमिकेसाठी सोयीची आकडेवारी उपलब्ध असतेच. :-)हे बरोबर असले तरी प्रत्येकाने "सोयीच्या" भूमिकेला आकडेवारीची जोड दिली तर चर्चा तथ्याला धरून नाही का राहणार?
In reply to प्रत्येक भूमिकेसाठी सोयीची by हतोळकरांचा प्रसाद
In reply to तुम्ही प्रश्न विचारत आहात की by संदीप डांगे
तुम्ही प्रश्न विचारत आहात की प्रश्नाच्या आडून स्वतःचं मत मांडत आहात?मी प्रश्न विचारत आहे.
तथ्य काय असतं त्याबद्दल आपले विचार आधी मांडा चर्चेचं नंतर बघू...."तथ्य"ला इंग्रजी शब्द "फॅक्ट" आहे बहुतेक. वर ट्रुमन किंवा तुम्ही टाकलेली आकडेवारी हि तथ्ये आहेत (तुम्हाला ती तथ्ये वाटत नसतील तर तुम्ही खोडून काढूच शकता). आता या तथ्यांना सोबत घेऊन केली गेलेली चर्चा उगाच हवेत केली गेलीय असा नाही ना म्हणता येत. म्हणून जर एखाद्याची आकडेवारी सोयीस्कर वाटत असेल तर त्यातली "सोय" उघडी पाडायला तथ्येच मदत करू शकतात असे मला वाटते, बघा पटले तर!
In reply to तुम्ही प्रश्न विचारत आहात की by हतोळकरांचा प्रसाद
In reply to इंग्रजी प्रतिशब्द नव्हता by संदीप डांगे
इंग्रजी प्रतिशब्द नव्हता विचारला ब्वॉ मी! ;-)मी "तथ्य"बद्दलचं माझं मत सांगितलं. तुम्हाला इंग्रजी शिकवायची आवश्यकता मला वाटत नाही.
पण ती आकडेवारी कोणत्या उद्देशाने फेकली आहे तेही ओळखणे आवश्यक असते.हे तुमचं वैयक्तिक मत असू शकते, सगळ्यांनाच हे करण्याची आवश्यकता का पडावी? यालाच पूर्वग्रह म्हणत नसावेत का? कोणी कोणता अजेन्डा राबवावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. एखाद्याने दिलेल्या माहितीवरून त्याला आकडेबहाद्दर म्हणणे मला तरी पटत नाही. ते आकडे एखाद्याला खोटे वाटत असतील तर त्याने ते तसे आकडे खोडून काढावेत एवढाच माझा मुद्दा. आणि कसे आहे डांगेंजी, माझ्यासारखे सामान्य वाचक फक्त तो आकडेवारीचा एकाच प्रतिसाद बघतात का? समजा त्या प्रतिसादाखाली ती आकडेवारी खोडून काढणारा प्रतिसाद दिसला कि तो पण बघणारच की! म्हणजे ९०% कॅलिब्रेशनच्या प्रतिसादाखाली ७८% तरीही चालत नाहीयेत असं दिसलं तर तथ्याच्या जास्त जवळ जाता येणार नाही का? शिवाय दोन्ही बाजूची तथ्ये बघून मग सामान्य माणसे ठरवतीलच की! जसे सामान्य लोक बँकेवरल्या दगडफेकीच्या एका व्हिडिओवरून देशात अराजक माजलंय असं मानत नाहीत तसेच नुसत्या आकडेवारीनेही भुलणार नाहीत असे मला वाटते.
In reply to इंग्रजी प्रतिशब्द नव्हता by हतोळकरांचा प्रसाद
In reply to ते आकडे एखाद्याला खोटे वाटत by संदीप डांगे
In reply to (श्रीगुरुजींनी राजकारणावर by हतोळकरांचा प्रसाद
In reply to अर्रर्र... आजकाल उत्तरं नसली by संदीप डांगे
In reply to उत्तरे नसतातच हो माझ्याकडे, by हतोळकरांचा प्रसाद
In reply to काय म्हणता... उत्तरे नसतात? by संदीप डांगे
बाकी सोयीचे अर्धसत्य मांडून दिशाभूल करु...वावगं काहीच नाही पण अर्धसत्य काय ते तरी सांगा की, उगाच अर्धसत्य अर्धसत्य म्हणून ओरडले म्हणजे एखादी माहिती अर्धसत्य मानायची का?
पुढच्या नंबरात म्हणता वाचक काय ते समजायला हुशार आहेत....(वैयिक्तक होण्याबद्दल माफी मागून..) तुम्हाला एकूणच वितंडवाद करण्यात खूप रस दिसतोय. सामान्य वाचक आकडेवारीचा अर्थ लावण्यात हुशार आहेत असे माझे मत मी वर मांडले. जर एकाच बाजूची (म्हणजे या चर्चेत भाजपची)आकडेवारी टाकली तर त्याचा योग्य तो अर्थ सामान्य वाचक लावतीलच की, तुम्ही त्याची व्यर्थ ढाल बनवण्याचं प्रयोजन काही कळलं नाही. तुम्हाला लोकांनी एका बाजूच्या सोयीच्या आकडेवारीवरून अर्थ काढू नये असे प्रामाणिकपणे वाटत असेल तर तुम्हीही दुसऱ्या बाजूची सोयीस्कर आकडेवारी मांडा की, इतरांना आकडेबहाद्दर म्हणून हिणवण्याने काय होणार?
मूग गिळून होते सर्व हुश्शार वाचक...ओके, म्हणजे तुमच्या प्रतिसादाला प्रतिसाद दिला तरच तुमच्या मताला सहमती दिली असा होरा आहे आपला तर! छान आहे. बाकी हा प्रतिसाद, सहजच! बाकी तुमच्याशी चर्चा बिर्चा ठीक आहे, पण ती धाग्याच्या विषयाला धरून असली तरच माझे मेगाबायटी दुसऱ्यांसाठी वाचण्यायोग्य असतील असे माझे मत आहे.
In reply to एक छान मस्त धागा काढायला हवा by हतोळकरांचा प्रसाद
उगाच अर्धसत्य अर्धसत्य म्हणून ओरडले म्हणजे एखादी माहिती अर्धसत्य मानायची का?ओरडले??? कोण ओरडतंय? डोन्ट लूज यु'अर कूल.... :-) बाकी कोणाच्या मानण्या न मानण्यावर सत्य अवलंबून नसतं हे वरंच सांगितलंय.. वाचलं नाही की समजलं नाही?
तुम्हाला लोकांनी एका बाजूच्या सोयीच्या आकडेवारीवरून अर्थ काढू नये असे प्रामाणिकपणे वाटत असेल तर तुम्हीही दुसऱ्या बाजूची सोयीस्कर आकडेवारी मांडा की, इतरांना आकडेबहाद्दर म्हणून हिणवण्याने काय होणार?जिथे गरज आहे तिथे मी योग्य ती आकडेवारी मांडत असतो. पण तुमच्या वरच्या वाक्यात "दुसर्या बाजूची सोयीस्कर आकडेवारी मांडा" हा शब्दप्रयोग आक्षेपार्ह आहे. एकांगी बाजू मांडणार्यांना आकडेबहाद्दर म्हणून हिणवले तर (वैयक्तिक होतोय माफ करा) तुम्हाला का मिर्च्या लागल्या? तुमची मघापासून चाललेली तणतण काय समजत नाही बुवा कशासाठी आहे ती? =))
तुमच्या प्रतिसादाला प्रतिसाद दिला तरच तुमच्या मताला सहमती दिली असा होरा आहे आपला तर! छान आहेतुम्ही वाटेल तो अर्थ काढा, होरा काढा. कितीही तथ्य सांगा, स्पष्ट बोला पण ज्याला जे बघायचं तेच बघायचं असतं हे स्पष्ट केल्याबद्दल धन्यवाद! तीन मोठ्या प्रतिसादांत एवढे स्पष्ट लिहूनही साधा विचार समजत नसेल तर समजून घ्यायचाच नाही व वितंडवाद घालायचा आहे तो कुणाला हे सामान्य वाचक समजून घेतील अशी आशा करतो.
तुमच्याशी चर्चा बिर्चा ठीक आहे, पण ती धाग्याच्या विषयाला धरून असली तरच माझे मेगाबायटी दुसऱ्यांसाठी वाचण्यायोग्य असतील असे माझे मत आहे.आपल्याकडे मुद्दे असले की लोक मेगाबायटी वाचण्यासारखा आहे की नाही, धागाविषयाला धरुन आहे की नाही ह्याची चिंता करत बसत नाही असा मिपावरचा अल्पकाळाचा अनुभव आहे. उत्तर नसले की मेगाबायटी, वितंडवाद, वगैरे शब्द वापरतात... बाकी, आपल्याकडून पूर्णविराम. सांगण्यासारखं सर्व स्पष्ट सांगून झालंय. धन्यवाद!
In reply to उगाच अर्धसत्य अर्धसत्य म्हणून by संदीप डांगे
एकांगी बाजू मांडणार्यांना आकडेबहाद्दर म्हणून हिणवले तर (वैयक्तिक होतोय माफ करा) तुम्हाला का मिर्च्या लागल्या? तुमची मघापासून चाललेली तणतण काय समजत नाही बुवा कशासाठी आहे ती? =))यासाठी "डोन्ट लूज यु'अर कूल.... :-)". बाकी तुमच्या एका प्रतिसादवर (जरी मला उद्देशून नसल्या तरी) आक्षेप घेणे म्हणजे मिरची लागणे असते होय? छानच आहे की! बाकी तुम्हाला हवे तेव्हा माझ्याकडे किंवा समोरच्याकडे उत्तर नाहीये असे समजण्याची मोकळीक आहेच त्यामुळे, शुभेच्छा!
In reply to ते आकडे एखाद्याला खोटे वाटत by संदीप डांगे
जसे खरिपाच्या पेरणीवर नोटाबंदीचा परिणाम झाला नाही असे धादांत खोटे इथे लिहिल्या गेले तेव्हा तुमच्या सारख्या सामान्य वाचकाने काय पवित्रा घेतला? एकाही नोटाबंदीसमर्थकाने पुढे येऊन ते खोटे आहे असे म्हणायचे धाडस दाखवले नाही.
तुम्ही दाखवले असेल तर ते पुरेसे नाही का..? दरवेळी कशाला पब्लीकचा सपोर्ट हवा असतो..? स्वत:च्या भूमीकेवर विश्वास असेल तर एकटेच ठाम राहिलात तरी सत्य काय ते वाचक बघतातच.
(ट्रक फिरवायला मात्र सगळी बच्चेकंपनी हजर असते ;-))
२० लाखाचे ट्रक तुम्ही फिरवले. "ती कल्पनाच बालीश होती" हे तुमचे आत्ताचे मत आहे का..?In reply to इंग्रजी प्रतिशब्द नव्हता by संदीप डांगे
आकडेवारी तोंडावर फेकली म्हणजे माणूस फार अभ्यासू वगैरे वाटतो पण ती आकडेवारी कोणत्या उद्देशाने फेकली आहे तेही ओळखणे आवश्यक असते. सामान्य माणसे आकडेवारी बघून गप्प बसतात, फार खोलात शिरुन बघत नाहीत. विशिष्ट अजेण्डा राबवणार्या आकडेबहाद्दरांचं त्यामुळेच फावतं. तेव्हढं होऊ नये हे जागरुक वाचकांनी बघावं, बाकी काही म्हणणं नाही आपलं तसं....हे नक्की तुमचेच मत आहे ना..?
In reply to प्रत्येक भूमिकेसाठी सोयीची by हतोळकरांचा प्रसाद
In reply to भूमिका काहीही असली तरी by श्रीगुरुजी
In reply to कांग्रेसनंतर अगदी by हतोळकरांचा प्रसाद
भाजप अजूनही तळागाळातले कार्यकर्ते तयार करण्यात यशस्वी होत नाहीयेहाच कळीचा मुद्दा आहे. हळूहळू या दिशेने वाटचाल करत आहे म्हणावे तर भाजपाने सत्तेची चव पहिल्यांदा चाखुन आता १० वर्षे झाली आहेत.
In reply to यात हास्यास्पद काहीच नाही. मी by श्रीगुरुजी
In reply to अमित क्षणांवरील टीका आपल्याला by वरुण मोहिते
In reply to बाळा नांदगावकर मातोश्रीवर by जानु
In reply to बाळा नांदगावकर मातोश्रीवर by जानु
अर्थातच शिवसेनेला स्वबळावर बहुमत वगैरे मिळणे फारच कठिण आहे.पण सर्वात मोठा पक्ष शिवसेना बनू शकेल आणि तसे झाल्यास उध्दव ठाकरेंची झाकली मूठच राहिल.अगदी अचूक निदान. नेमकं हेच धोरण उद्धव ठाकरे पुढे रेटत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था सरकार चालवंत नसतात. म्हणूनंच या निवडणुकीत बहुमताची गरज नसते. सर्वात मोठा पक्ष महापौर/नगराध्यक्ष वगैरे निवडतो. आ.न., -गा.पै.
१९८० व १९८५ मध्ये पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघात भाजपच्या अण्णा जोशी यांनी निसटता विजय मिळविला होता. भाजपचा हा हक्काचा मतदारसंघ सेनेने घशात घातला. १९९० ते २००९ या काळात सलग ५ निवडणुकीत या मतदारसंघातून सेनेचा उमेदवार विजयी झाला. मते होती भाजपची पण उमेदवार शिवसेनेचा. हा मतदारसंघ आपलाच आहे हा आधी शिवसेनेचा दावा होता आणि नंतर आपल्या उमेदवाराला मिळालेली मते ही आपलीच आहेत असा भ्रम शिवसेनेला झाला. मतदारांनी शिवसेनेचा भ्रम दूर केला तो २०१४ मध्ये. यावेळी दोघेही एकमेकांविरूद्ध लढले व त्या लढतील भाजपच्या मेधा कुलकर्णींनी आपल्या सेना प्रतिस्पर्ध्यावर तब्बल ६५००० मतांच्या फरकाने विजय मिळविला.तुम्हाला कोथरूड मतदारसंघ म्हणायचे आहे का? मेधा कुलकर्णी कोथरूड मधून निवडून आल्या आहेत. त्यांनी सेनेच्या मोकाटेंचा पराभव केला.
In reply to १९८० व १९८५ मध्ये पुण्यातील by चावटमेला
In reply to १९८० व १९८५ मध्ये पुण्यातील by चावटमेला
In reply to शिवाजीनगरमध्ये विजय काळे by अनुप ढेरे
In reply to अरे काय हे! by संदीप डांगे
In reply to शिवाजीनगरचे नाव कोथरूड झाले by श्रीगुरुजी
आणि अभ्यासाचंच म्हणाल तर २० लाख रूपये रोख घेऊन हिंडणार्या ट्रकचालकांच्या कहाण्या लिहिणार्या अभ्यासू व व्यासंगी सदस्यांपुढे आमचा अभ्यास म्हणजे किस झाड की पत्ती!
In reply to शिवाजीनगरमध्ये विजय काळे by अनुप ढेरे
शिवाजीनगरमध्ये विजय काळे आमदार आहेत ना?हो शिवाजीनगरमध्ये भाजपचे विजय काळे आमदार आहेत. त्यांनी काँग्रेसच्या विनायक निम्हण यांचा पराभव केला. हे विनायक निम्हण नारायण राणेंच्या निकटवर्तीयांपैकी होते. २००५ मध्ये राणे शिवसेनेबाहेर पडल्यानंतरही निम्हण शिवसेनेतच होते. पण २००९ मध्ये ते काँग्रेसचे उमेदवार म्हणून विजयी झाले होते. या मतदारसंघात १९८० आणि १९८५ मध्ये भाजपचे अण्णा जोशी तर १९९० आणि १९९५ मध्ये शिवसेनेचे शशिकांत सुतार तसेच १९९९ आणि २००४ मध्ये शिवसेनेचे उमेदवार म्हणून विनायक निम्हण विजयी झाले होते. २०१४ मध्ये या मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार चौथ्या क्रमांकावर होता आणि त्या उमेदवाराने आपले डिपॉझिटही गमावले होते. वास्तविकपणे युती करताना कोणताही पक्ष आपण मागच्या वेळेस जिंकलेली जागा सोडत नसतो. पण प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनाच माहित असलेल्या कारणामुळे भाजपने हा मतदारसंघ १९९० मध्ये शिवसेनेसाठी सोडला आणि अण्णा जोशींना शिवाजीनगरहून कसबा पेठमधून उमेदवारी दिली गेली. ते १९९०-९१ मध्ये महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष होते.तर १९९१ मध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी काँग्रेसच्या विठ्ठलराव गाडगीळांचा पराभव केला होता.
In reply to हो by गॅरी ट्रुमन
In reply to माझ्या आठवणीप्रमाणे पवारसाहेबांनी संभाजीराव काकडेंना उभे केले, by बबन ताम्बे
In reply to हो by गॅरी ट्रुमन
In reply to ण प्रमोद महाजन आणि गोपीनाथ by llपुण्याचे पेशवेll
आता यापुढे युतीसाठी भिकेचा कटोरा घेऊन कोणाच्या दारात जाणार नाही,असे उध्दव ठाकरे म्हणाले. म्हणजे याचा अर्थ नक्की काय घ्यावा? इतकी वर्षे ते भिकेचे कटोरे घेऊन युतीसाठी इतरांच्या दारात जात होते का?
In reply to उद्धव उवाच by गॅरी ट्रुमन
In reply to उद्धव उवाच by गॅरी ट्रुमन
असे उध्दव ठाकरे म्हणाले. म्हणजे याचा अर्थ नक्की काय घ्यावा? इतकी वर्षे ते भिकेचे कटोरे घेऊन युतीसाठी इतरांच्या दारात जात होते का?"तुम्ही महाराष्ट्रात व देशात सत्तेवर आहात. निदान मुंबई तरी आमच्यासाठी सोडा." अशी उधोजींनी फडणविसांना विनंती केल्याचे वाचले. फडणविसांनी अर्थातच ही "विनंती" धुडकावून लावली. हे खरे असेल तर हा भिकेचा कटोराच म्हणावा लागेल.
In reply to असे उध्दव ठाकरे म्हणाले. by श्रीगुरुजी
"तुम्ही महाराष्ट्रात व देशात सत्तेवर आहात. निदान मुंबई तरी आमच्यासाठी सोडा." अशी उधोजींनी फडणविसांना विनंती केल्याचे वाचले.हे कुठे वाचले ह्याचा संदर्भ व ते खरे असल्याचा पुरावा द्याल काय.....?
In reply to "तुम्ही महाराष्ट्रात व देशात by संदीप डांगे
In reply to "तुम्ही महाराष्ट्रात व देशात by संदीप डांगे
In reply to He leader said while Sena by श्रीगुरुजी
In reply to बाकीच्याच काय व्हायच ते होवो by माझीही शॅम्पेन
बाकीच्याच काय व्हायच ते होवो , पण ही निवडणूक ही सेने साठी धोक्याची घंटा आहे हे नक्कीअसे व्हावे हे फार फार वाटते. पण ते होईलच याची खात्री मात्र वाटत नाही. निवडणुका आल्यावर मराठीचे पंचवार्षिक उमाळे आणि इतर वेळी कमालीची अकार्यक्षमता, एकीकडे बोलताना समाजकारणाचा जप करायचा पण दुसरीकडे गुंडगिरी करायची असल्या सेनेचा पराभव व्हावा असे फार वाटत असले तरी तो होईल का याविषयी मात्र साशंकता वाटते.
In reply to पिंचि by कपिलमुनी
In reply to सेना - भाजप by कपिलमुनी
In reply to ते ६५०० कोटी मामाच्या घरुन by संदीप डांगे
In reply to सबरंग इंडीया म्हणजे बूच by llपुण्याचे पेशवेll
In reply to बरोब्बर! ती लिंक पांचजन्य/ by अनुप ढेरे
In reply to बरोब्बर! ती लिंक पांचजन्य/ by अनुप ढेरे
In reply to पेशवे, अनुप, लिन्क कोणाची आहे by संदीप डांगे
In reply to इथे नक्की इश्यू काय आहे? by श्रीगुरुजी
In reply to ते मोदींना विचारा, तेच विरोध by संदीप डांगे
In reply to गॅरी ट्रुमन व गुरुजी यांच्यासाठी by उपेक्षित
In reply to सहमत... लेखाचा उद्देश भाजपचा by संदीप डांगे
In reply to २० लाख रूपये रोख घेऊन फिरणार् by श्रीगुरुजी
In reply to चला म्हणजे एका अर्थी तुम्ही by संदीप डांगे
In reply to गॅरी ट्रुमन व गुरुजी यांच्यासाठी by उपेक्षित
In reply to मी गेल्या काही दिवसात by गॅरी ट्रुमन
In reply to गॅरीभाऊ आपला अभ्यासूपणाचा by उपेक्षित
In reply to उत्तरे by गॅरी ट्रुमन
In reply to ठाण्यात परमार आत्महत्या प्रकरणी by वरुण मोहिते
In reply to सुधाकर चव्हाणांना भाजपमघ्ये by श्रीगुरुजी
In reply to घ्या by वरुण मोहिते
In reply to सॉरी by वरुण मोहिते
In reply to जेव्हा त्याला अधिकृत प्रवेश by श्रीगुरुजी
In reply to गोव्यात भ्रष्टाचार सिद्ध by संदीप डांगे
In reply to कोठे टाकला होता हा व्हिडिओ? by श्रीगुरुजी
In reply to काय गुरुजी... जणू तुम्हाला by संदीप डांगे
In reply to त्या चित्रफिती होय? मी त्या by श्रीगुरुजी
In reply to काय गुरुजी.... पहिलाच विडियो by संदीप डांगे
In reply to पहिल्या चित्रफितीत इंग्लिश व by श्रीगुरुजी
In reply to धडधडीत सत्य समोर असतांना आता by संदीप डांगे
In reply to सिलेक्टिव्ह डंबनेस कसला आलाय? by श्रीगुरुजी
In reply to सिलेक्टीव डम्बनेस? मडकईकर या by संदीप डांगे
In reply to काय बळजबरी आहे. भाषा समजत by श्रीगुरुजी
In reply to कोणतीही बळजबरी करत नाहीए. by संदीप डांगे
In reply to परत तेच पालुपद. एक सोडून तीन by श्रीगुरुजी
भाजप खोटारडा पक्ष आहे व त्याने भ्रष्ट लोकांना आत घेतले आहे
हे मडकईकरांच्या बाबतीत गोव्यात घडले एवढे स्पष्ट आहे सगळे, तरी तुम्ही एका चित्रफितीवर अडून बसले आहात आणि तेच पालुपद उकळत आहात. बाकी तुम्हाला काय समजतं नाही समजत याच्या मला काही घेणे देणे नाही. मिपाकरांनी प्रतिक्रिया दिली नाही दिली ह्याचाही काही संबंध नाही. भाजप जो आहे तो आहे, पण तुमचे त्या पक्षाला अंधपणे डिफेन्ड करणे अधिकाधिक मनोरंजक होत चालले आहे... 'गुगल' केले का? का तेही आयतं करुन हवंय....? की तेही 'समजत' नाही तुम्हाला? (सूचना: 'मेगाबायटीत वाचले नाही' अशी पळवाट काढू नये म्हणून फॉण्ट मोठा केलाय.. :-) )In reply to भाजप खोटारडा पक्ष आहे व by संदीप डांगे
'गुगल' केले का? का तेही आयतं करुन हवंय....? की तेही 'समजत' नाही तुम्हाला?आता तुम्ही चित्रफिती देण्याचे महान कार्य करता (वेगळ्या भाषेतल्या असल्या तरी), भाजपची यादी मेंटेन करता आणि एवढं सगळं करत आहात तर गुगलूनही द्या की. भीति अशी वाटतेय की देताना तामिळ, अर्धमागधी, पाली, तुळू, स्वाहिली असल्या भाषेतल्या लिंका द्याल आणि नंतर ठणाणा कराल की इतक्या लिंक देऊनसुद्धा समजत कसं नाही. (सूचना: 'मेगाबायटीत वाचले नाही' अशी पळवाट काढू नये म्हणून फॉण्ट मोठा केलाय.. :-) ) मेगाबायटी प्रतिसाद देण्याची संधी घालविल्याबद्दल क्षमस्व.
In reply to भाजप खोटारडा पक्ष आहे व by संदीप डांगे
In reply to डांगेंजी, "भाजप खोटारडा पक्ष by हतोळकरांचा प्रसाद
In reply to आधी भाजप किंवा कोणताही एक by संदीप डांगे
In reply to डांगेंजी, ते शब्दांचे खेळ बिळ by हतोळकरांचा प्रसाद
भाजप हा स्वतःला एकीकडे भ्रष्टाचारविरोधी म्हणवतो आणि मग भ्रष्टाचार सिद्ध झालेल्या लोकांना पक्षात घेतो असे आपल्याला म्हणायचे असेल तर याला दुटप्पीपणाने वागणे असे म्हणतात.ठिक आहे ना, दुटप्पीपणा म्हणा की खॉटारडेपणा, कि फर्क पैंदाये? जो गलत वो गलत... शब्दांचा खेळ तर तुम्हीच सुरु केलाय की.. दुटप्पी कि खोटारडे वगैरे वगैरे! बाकी 'मला' काही 'म्हणायचे' नाही हो, जे 'घडले' ते 'मांडत' आहे, फार बेमालूमपणे नसलेले शब्द समोरच्याच्या वक्तव्यात घुसडणे आपली सवय आहे हे निरिक्षण नोंदवतो.
बाकी ते कातडीबचाऊ वगैरे वाक्ये जिथे येतील तिथे खोडून काढा, आधीच व्हिक्टीम कार्ड कशाला खेळायला हवे?आधीच विक्टिम कार्ड?? बाकी विक्टीम कार्ड हा आपला आवडीचा शब्द झालेला दिसतोय..! असो. माझा रोख http://www.misalpav.com/comment/916789#comment-916789 ह्या प्रतिसादाकडे होता, आणि तो प्रतिसाद आल्यावरच मी वरची वाक्ये लिहिली आहेत, तेव्हा "आधीच विक्टिम कार्ड" वगैरे सर्व शब्दसमुच्चय बाद होत आहे. बाकी, मूळ मुद्दा, भाजपने भ्रष्ट लोक पक्षात घेणे हाच व केवळ हाच आहे. त्यावरच राहिलेले बरे. =))
In reply to भाजप हा स्वतःला एकीकडे by संदीप डांगे
In reply to जेव्हा त्याला अधिकृत प्रवेश by श्रीगुरुजी
In reply to खालील बातमी वाचावी. by श्रीगुरुजी
In reply to ह्या बातमीत असे म्हटले आहे by मराठी_माणूस
In reply to प्रवेशासाठी ते प्रयत्नशील असू by श्रीगुरुजी
In reply to नेते घ्या म्हणताहेत , by मराठी_माणूस
In reply to म्हणू देत की. शेवटी घेतले by श्रीगुरुजी
In reply to म्हणू देत की. शेवटी घेतले by श्रीगुरुजी
In reply to भाजपने तात्पुरत्या by हतोळकरांचा प्रसाद
पुण्यातील उदाहरणे डोळ्यासमोर आहेतच.हेच सांगण्याचा प्रयत्न आहे. सध्या बहुतांश कं. मधे नवीन माणुस घेताना बीजीव्ही (back ground verification) केले जाते . इथे पक्षाच्या प्रतिमेचा प्रश्न असताना असे काहीही केले जात नाही हे आश्चर्यच आहे .
In reply to खालील बातमी वाचावी. by श्रीगुरुजी
In reply to खूप दबाव आणला म्हणून मागे घेतलाय by वरुण मोहिते
In reply to तुमच्या मूळ प्रतिसादात खालील by श्रीगुरुजी
In reply to वाद झाल्यावर सांगावं लागलं ना by वरुण मोहिते
In reply to भाजप धडपडत नसून पक्षातील काही by श्रीगुरुजी
.....काही स्थानिक मंडळी प्रयत्न करीत होतीमग पक्ष नेत्रूत्वाने ह्या स्थानिक मंडळीना समज का नाही दिली ? पाठींबा दीला नाही म्हणजे विरोध केला असे होते का ? का "..... with difference" हे आपले उगीच की ह्यात काही तथ्य आहे ?
In reply to .....काही स्थानिक मंडळी by मराठी_माणूस
मग पक्ष नेत्रूत्वाने ह्या स्थानिक मंडळीना समज का नाही दिली ?हे काही समजले नाही. भाजप हा एक राजकीय पक्ष आहे या पार्श्वभूमीवर नेमकी कशी समज अपेक्षित आहे (म्हणजे जाहीर समज असे आपल्याला अपेक्षित आहे का)?
In reply to मग पक्ष नेत्रूत्वाने ह्या by हतोळकरांचा प्रसाद
In reply to इतरत्र आणि वारंवार घडु नये by मराठी_माणूस
In reply to उपाय एकाच असू शकतो, पक्षाचे by हतोळकरांचा प्रसाद
असले घोंगडे पांघरणे बंद करावेबरोबर. हेच म्हणणे आहे. http://www.loksatta.com/bmc-elections-2017-news/mns-comment-on-bjp-3-1397583/ http://www.loksatta.com/bmc-elections-2017-news/shiv-sena-vs-bjp-in-bmc-election-2017-1397630 http://epaper.loksatta.com/1092215/indian-express/03-02-2017#page/3/2
In reply to .....काही स्थानिक मंडळी by मराठी_माणूस
In reply to समज काय तुम्हाला सांगून by श्रीगुरुजी
In reply to "राजधर्माचे पालन करा" हे by मराठी_माणूस
In reply to आता युती तुटल्याच्या चर्चेत by श्रीगुरुजी
In reply to भाजप धडपडत नसून पक्षातील काही by श्रीगुरुजी
भाजपने त्याला पक्षात घेतलेले नाही. इथेच तो विषय संपला.आणि भाजपात घेतले असते तर बातम्यांची भाषा समजण्याचे बंद झाला असते... =))
In reply to भाजपने त्याला पक्षात घेतलेले by संदीप डांगे
In reply to घेतलेच नसल्यामुळे विषय by श्रीगुरुजी
In reply to हा हा हा, भाजपने गुंड व by संदीप डांगे
In reply to द्या की, कोणी अडवलंय? तुम्ही by श्रीगुरुजी
आपण अनुमान काढताय का सेनेवरचा राग काढताय ??