मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रिमझिम पावसात बारवी धरण परिसरात!

शान्तिप्रिय · · भटकंती
या मंगळवारी मी काही कामानिमित्त बदलापूर ला गेलो होतो. तेव्हा रिमझिम पाऊस बरसत होता. सृष्टी हिरवेगार वस्त्र नेसून अतिशय सुंदर दिसत होती. मग काय? ठरवले बारवी धरण परिसर पाहण्याचे. त्याआधी काही मित्रांबरोबर गप्पा मारताना या मोसमात बदलापूर जवळील परिसर किती सुंदर असतो ही माहिती मिळाली. तसेच बदलापूर हे नाव कसे पडले याची रंजक माहिती मिळाली ती अशी: शिवाजी महाराज रायगडावरून सुरत किंवा त्या दिशेला स्वारी करताना याच दिशेने येत. तेव्हा त्याचे घोडे अतिशय थकलेले असत. मग याठिकाणी घोडे बदलले जायचे आणि मग सुरत कडे प्रयाण सुरू. यावरून या ठिकाणाला बदलापूर असे नाव पडले. रंजक वाटले मला हे कळल्यावर! सकाळी ११ च्या आसपास कंजूस काकांना फोन केला आणि १ वाजता आम्ही बदलापूर ला भेटलो. बदलापूर पश्चिमेला एस टी स्थानक आहे. तेथून मुरबाड ला बस आहेत. बारवी धारण मार्गे जाणारी बस पकडली आणि आमचा प्रवास सुरू! बदलापूर गावाबाहेर पडल्यानंतर बसमधून दिसणारा निसर्ग दृष्ट लागण्याजोगाच! जेमतेम १८ किमी वर बारवी धरण लागते. बारवी धरण हे कल्याण आणि नवी मुंबईला पाण्याचा प्रमुख स्रोत आहे. सव्वीस जुलै च्या प्रलयंकारी पावसावेळी धरण पूर्ण भरले होते आणि पाणी कल्याण भिवंडीत खांद्यापर्यंत साचले होते. धरणाचा परिसर वृक्षवैविध्याने नटाला आहे. भोकर , मोह आणि इतर झाडे येथे भरभरून आहेत. धरण मोठे आहे. रिमझिम पावसामुळे या भागात फिरण्यास मजा आली . विशेष म्हणजे शनिवार रविवार न जाता आम्ही मंगळवारी भेट दिल्यामुळे गर्दी आणि हुल्लडबाजी टाळून निसर्ग जवळून बघता आला. तिथे एक स्थानिक रहिवासी आताच्या मोसमात येणाऱ्या भाज्या गोळा करत होते. कंकाकांनी या भाज्यांबद्दल लिहावे अशी विनंती. सध्या नुकताच पाऊस सुरू असलेने आजूबाजूला थोडे पाण्याचे झरे पाहिले. एकंदरीतच सुट्टी नसलेल्या दिवशी संवड काढून अशी ठिकाणे पाहणे उत्तम! पण हे कर्णोपकर्णी करु नका हं! फोटो देत आहे. बाकीचे फोटो कंकाकांनी द्यावेत अशी त्यांना विनंती करतो . रस्ता: bd1 धरण bd11 कंकाकाका आणि मी KNS परिसर pa1 pa2 pa3 pa4 pa5 रहिवासी आणि भाज्या bj1 bj2 misc1

वाचने 13592 वाचनखूण प्रतिक्रिया 41

अजया Fri, 07/01/2016 - 16:41
छान भटकंती.लहानपणी बारवी धरणाला काकाचे बोट पकडून जात असू! कोंडेश्वर पण मधल्या दिवशी बघण्यासारखं ठिकाण आहे बदलापुरातलं.शनि रवि मात्र भयानक!

In reply to by प्रचेतस

बोका-ए-आझम Sun, 07/03/2016 - 09:24
मला भटकायचा योग आला नाही पण शिवडीला फ्लेमिंगो महोत्सवाला ते, मी आणि नूलकरकाका होतो. एका तासात केवढी माहिती दिली दोघांनी! _/\_

मुक्त विहारि Fri, 07/01/2016 - 18:06
डोंबिवली पासून बदलापूर, आम्हाला तरी जास्त दूर नाही.....इतक्या जवळच्या गावात येवून देखील, शांतिप्रिय ह्यांची भेट न झाल्याने खंत वाटत आहे. असो, नेक्स्ट टाइम परत एकदा शांतिप्रिय ह्यांच्या बरोबर कट्टा करू.

प्रचेतस Sat, 07/02/2016 - 10:24
तसेच बदलापूर हे नाव कसे पडले याची रंजक माहिती मिळाली ती अशी
मी वेगळंच काहीतरी ऐकलंय. ब्रिटिशांनी जेव्हा रेल्वे सुरु केली तेव्हा इथे रेल्वे रुळांचे सांधे बदलले जाऊन गाडी ट्रॅक चेंज करायची त्यामुळे त्या ठिकाणाला बदलापूर म्हणायला लागले.

In reply to by प्रचेतस

नाखु Sat, 07/02/2016 - 10:38
आप्ल्या (देशी) इतीहासावर विश्वास नाही हेच वाटायला लागले आहे. सगळ इंग्रजांवर विश्वास ठेऊन. अधे मधे देशीही घेत जा (माहीती) कंजूस काकांना बरीच आडवाटेवरची ठिकाणे (आजायच्या सोप्या आणि कमी खर्चीक वाटांसह माहीती आहेत असे दिसते. चित्रे लांबवली गेलीत का मलाच दिसतात? . ता.क.ही सर्व चित्रे दिसली याचा आनंद आहे.

In reply to by प्रचेतस

सूड गुरुवार, 07/14/2016 - 14:28
'बदल' हा शब्द शिवकालीन महाराष्ट्रात प्रचलित होता (किंवा अस्तित्वात होता) असे मला वाटत नाही.
मग कोणता शब्द प्रचलित असावा 'असं तुम्हाला वाटतं?

In reply to by प्रचेतस

चौकटराजा Fri, 07/15/2016 - 16:16
अगदी बरोबर ! शिवकालात हा शब्द नव्हताच. तो अलिकडे पुण्यातील एका लग्न समारंभात जन्माला आला. आपण आता म्हणतोच ना बुवा 'बदल' लेत म्हणून.

In reply to by गौतमी

कंजूस Sun, 07/03/2016 - 10:03
त्याच कंदातून( सुरणासारखा कंद कोणी खात नाहीत ) हा दुसरा तुरा पानांचा निघतो.पहिल्यातून फूल निघते.

In reply to by पीशिम्पी

कंजूस गुरुवार, 07/14/2016 - 14:35
प्रतिसादातला तीन नंबरचा फोटो जलाशयाचा आहे.चार नंबरच्या फोटोतला रस्ता वळून धरणाच्या भिंतीच्या डाव्या टोकाजवळून जातो तिथून फोटो काढता येतो.तसं पाहिलं तर आता कोणत्याच धरणाच्या भिंतीवर जाता येत नाही.धरण बहुतेक सप्टेबरात भरते आणि ओवरफ्लो फार सुंदर असतो.सर्व बाजूने पाहता येते.

In reply to by कंजूस

रघुनाथ.केरकर गुरुवार, 07/14/2016 - 17:42
यन्दा मात्र उशीरा भरेल, कारण उन्ची वाढवलीय धरणाची ,पण पाण्लोट क्षेत्रात असाच पाउस सुरु राहील्यास मात्र सप्टेबर च्या आधीसुद्धा भरु शकते.