मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शतशब्दकथा स्पर्धा: अंतिम निकाल

आदूबाळ · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
मिपाला स्पर्धा आयोजनाचा मोठा इतिहास आहे. कथास्पर्धा, छायाचित्र स्पर्धा आदि स्पर्धा मिपाने वेळोवेळी आयोजित केलेल्या, करत असलेल्या स्पर्धांना भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. शतशब्दकथा स्पर्धेलाही अविस्मरणीय प्रतिसाद मिळाला. स्पर्धेसाठी आलेल्या तब्बल ८३ शतशब्दकथांमधून सहा कथा अंतिम फेरीसाठी निवडल्या गेल्या. अंतिम फेरीसाठी स्पर्धक लेखकांनी आपल्या शतशब्दकथेचा सीक्वल लिहायचा होता. सहापैकी पाच स्पर्धकांनी सीक्वल लिहिले. वाचकांच्या मतांना आणि परीक्षकांच्या निवडीला समान महत्त्व देऊन अंतिम फेरीचा निकाल जाहीर करत आहोत. तर अंतिम निकाल आहे:

प्रथम क्रमांकः मृत्युन्जय (कथा: लोकमान्य)

द्वितीय क्रमांकः चांदणे संदीप (कथा: येक रुपाया)

तृतीय क्रमांकः मधुरा देशपांडे (कथा: निकाल)

विजेत्यांचं हार्दिक अभिनंदन! विजेत्या स्पर्धकांना मिपातर्फे पारितोषिकस्वरूपात पुस्तकं आणि मानपत्र देण्यात येईल. प्रा. डॉ. दिलीप बिरुटे, खेडूत आणि वेल्लाभट यांनी या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून काम पाहिलं. गेला महिनाभर अनेक उत्तमोत्तम शतशब्दकथा वाचायला मिळाल्या. एक वेळ अशी होती की मुख्य बोर्डाच्या पहिल्या पानावर फक्त शतशब्दकथाच दिसत होत्या. आज या निकालाबरोबर ही स्पर्धा संपते आहे, पण गेला महिनाभर मिळालेल्या साहित्य मेजवानीच्या आठवणी बरेच दिवस टिकून राहतील. सर्व स्पर्धकांचे, वाचक-मतदात्यांचे, संमं+सासंमं सदस्यांचे आणि मुख्यतः परीक्षकांचे आभार मानणं औपचारिक आणि कृत्रिम वाटेल, पण मनात असणारी कृतज्ञता व्यक्त करून इथे थांबतो.

वाचन 15561 प्रतिक्रिया 48

बोका-ए-आझम Sun, 09/06/2015 - 20:34
या स्पर्धेच्या परीक्षकांचे खास अभिनंदन. इतक्या अप्रतिम कथांमधून तीन कथा निवडणे आणि त्यांचे क्रमांक ठरवणे हे खूपच कठीण काम होतं पण ते त्यांनी व्यवस्थितरीत्या निभावून नेलं.

बहुगुणी Sun, 09/06/2015 - 20:42
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन! आणि परीक्षकांचे आणि एका अनोख्या स्पर्धेचा नवीन पायंडा पाडून तो यशस्वी करणार्‍या सार्‍यांचे आभार!

In reply to by मनिष

दोन्ही कथांचे दुवे, याच लेखात त्यांच्या नावांखाली देता आले तर वाचकांना कथा परत वाचून त्यांचा आनंद घेणे शक्य होईल. सासंमंला या उपयोगी कृतीकरता विनंती आहे.

मृत्युन्जय Mon, 09/07/2015 - 09:55
सगळ्या विजेत्यांचे अभिनंदन. सर्ब वाचक प्रतिसादकांना अनेक धन्यवाद. शशक लिहिण्याचा माझा हा पहिलाच प्रयत्न होता. बरा जमला असे आत्ता तरी वाटते आहे. आयोजक, संपादक आणि परिक्षकांचे अनेक आभार. त्यांनी अतिशय मेहनते घेउन ही स्पर्धा यशस्वी केली. मराठी आंजावर पहिल्यांदाच असा काही उपक्रम हाती घेतला गेला. त्याबद्दल नीलकांत आणि टींमचे अभिनंदन आणि शुभेच्छा.

बबन ताम्बे Mon, 09/07/2015 - 11:31
विजेत्या कथा आणि इतरही अनेक कथा छानच होत्या. आयोजकांचेही आभार. खूप छान स्पर्धा होती.

चांदणे संदीप Mon, 09/07/2015 - 13:06
मृत्युन्जय आणि मधुरा देशपांडे यांचे अभिनंदन! या स्पर्धेच्या निमित्ताने आणि विजेत्यांपैकी एक म्हणून सांगायचं झाल तर, कमी शब्दांत खूप मोठा अर्थ व्यक्त करणे तेही साध्या-सोप्या भाषेत, सर्वसामान्य वाचकांना कळेल आणि रुचेल अस लिहावं यासाठी फार वर्षांपासून माझे प्रयत्न सुरू आहेत. कवितेत मी ब-यापैकी यशस्वी झालो पण कथेच्या बाबतीत अशा परिमाणाचा विचार कधीच नव्हता केला. वाचनाची आवड मला आंतरजालावरही फिरवत राहिली आणि साधारण वर्षभरापूर्वी मिपावर मी वाचनमात्र स्थिर झालो. याचदरम्यान कुठेतरी आतीवासताईंची "आन्जी" मला इथे भेटली आणि ह्या लेखनप्रकाराशी (शतशब्द्कथा) ओळख झाली आणि हा लेखनप्रकार मला अतिशय भावला! (आन्जीही मला खूप आवडते!) मी आतीवासताईंना यानिमित्ताने धन्यवाद देतो की त्यांच्या लेखनातून प्रेरणा घेऊन ही कथा मी लिहिली आणि मिपावर 'श्रीगणेशा' केला! सर्व स्पर्धकांचे आभार ज्यांनी ही या स्पर्धेला छान आकार दिला. सर्व परीक्षकांचे शतश: आभार! सर्व वाचकांचे आणि प्रतीसादाकांचे आभार ज्यांनी आपले प्रेम माझ्या झोळीत टाकले! आशा आहे आत्मचरित्राएवढा मोठा प्रतिसाद झाला नसावा! चूभूद्याघ्या!

चिगो Mon, 09/07/2015 - 16:21
सर्व विजेत्यांचे दणकून अभिनंदन.. परिक्षक आणि आयोजकांचे आभार..

स्पर्धा आयोजक, परीक्षक, वाचक आणि प्रतिसादक सर्वांचे खूप आभार!! शशक लिहिण्याचा हा पहिलाच प्रयत्न होता. या अनोख्या साहित्य प्रकाराची ओळख करुन दिल्याबद्दल आतिवास ताई यांना धन्यवाद. नेमक्या १०० शब्दात सगळे बसवताना जी कसरत करावी लागली त्याने मजा आली लिहिताना. सिक्वे ल मुळे त्यात अजुन भर पडली. पुन्हा एकदा धन्यवाद.

समीरसूर Tue, 09/08/2015 - 11:37
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन! आणि आयोजकांचेदेखील अभिनंदन! या स्पर्धेमुळे काही दिवस मिपावर एक आगळे चैतन्य बघायला मिळाले हे खरे! अतिवास यांचे खास आभार! त्यांच्यामुळे हा नवीन आणि कठीण साहित्यप्रकार सगळ्यांना अनुभवता आला. स्पर्धा छान पार पडली.