मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पैसोबा पुराण

निमिष सोनार · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
माझ्या अल्प ज्ञानानुसार आणि अल्प अनुभवानुसार मी लिहिलेले पैसोबा पुराण- माणसे जिंका. माणसे जोडा. पण ती पैशांनी नव्हे! आपल्या चांगल्या कृत्यांनी. चांगल्या स्वभावाने! पैशांनी जोडल्यास पैसा संपल्यावर माणसे पण दूर जातील. पैसा जवळ असो किंवा नसो, काही लोक पैशांचा खोटा बडेजाव दाखवतात. एक उदाहरण द्यायचे तर एखादी वस्तू विकत घेतल्यावर न विचारता काहीजण त्याची किंमत सांगत सुटतात. असे जे करतात तेच पैशांना नकळत त्यांच्या जीवनात अवाजवी महत्व देत असतात, पण त्यांच्या मनात मात्र पैशांबद्दल द्वेष असतो. पैशांचा द्वेष करू नका. कारण पैसे निर्जीव आहेत. पैसे जवळ असणार्‍या माणसांचा द्वेष करू नका. कारण त्यांनी तो मिळवण्यासाठी केलेली मेहेनत आपल्याला माहित नसते. आणि जर कुणी वाईट मार्गाने पैसा मिळवला असेलच तर त्याला त्याचे फळ मिळेलच. त्याची चिंता आपण कर्मफल सिद्धांतावर सोडून द्यावी. अर्थात पैशांचे महत्व आहे आणि ते नाकारून चालणार नाही. तेव्हा पैशाला तुमचे गुलाम बनवा. पैशाचे गुलाम बनू नका. पैशाने पैसा वाढवा. कारण मोठमोठया उद्योगपतींनी मोठमोठी स्वप्ने पाहिली नसती आणि करोडोंचे भांडवल टाकून, मोठमोठया कंपन्या उभारल्या नसत्या तर आपल्यासारख्या लाखो करोडो लोकांना आज चरितार्थ चालवायला नोकर्‍या मिळाल्या असत्या का? त्या उद्योगपतींनीही आणि सगळ्यांनीच जर हाच विचार केला असता की, "जास्त पैसा नाश करतो, चला आपण अल्पसमाधानी राहू आणि एखादा जाॅब शोधू" तर मग या जगात इतरांना नोकरी देणार्‍या कंपन्या कारखाने उभेच राहिले नसते. मेहेनत करा. पैसा कमवा. पैसा टिकवा. पैसा वाढवा. माणसे जोडा. माणसे टिकवा. पण पैशाच्या प्रभावाने नव्हे तर चांगल्या स्वभावाने! पाच हजार रूपये जेवढे महत्वाचे तेवढेच पाच पैसे सुध्दा महत्त्वाचे हे जो जाणतो तोच खरे पैशाचे मोल जाणतो. इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत की शाही घराणे, राज घराणे यांना वारसा हक्काने पैसा मिळतो पण त्यांना तो टिकवता आला नाही. उलट तो विकून खाल्ला गेला. पैसा टिकवणे आणि वाढवणे हे एक कौशल्य आहे. ते ज्या राजघराण्यांना जमलं त्यांची रया कधीच लयाला गेली नाही. एखाद्या व्यक्तीने आपल्याला पैशांची मदत केली नाही म्हणून त्याला जर आपण अशी दूषणे देत असू की "याच्या लेखी पैसाच सर्वकाही आहे" तर त्याच न्यायानूसार आपण सुद्धा दोषी ठरतो कारण "फक्त पैशांची मदत केली नाही म्हणून त्याला वाईट समजतो" म्हणजेच त्या व्यक्तीशी असलेल्या मैत्री अथवा नात्याला आपण सुद्धा फक्त पैश्यांपुरते महत्व देतो आहे असा त्याचा अर्थ होतो, नाही का? हे जर खरे असेल तर माणसे जोडण्यामागे स्वार्थ असतो हे सिद्ध होते. महागुरू आचार्य चाणक्यांनी सुद्धा यासंदर्भात बरंच काही लिहून ठेवलंय ते सुद्धा कालातीत म्हणजे कोणत्याही काळाला लागू होणारं.. काय वाटते आपल्याला? पटतंय का अापल्याला मी माझ्या अल्पज्ञानानुसार लिहिलेलं हे पैसापुराण? आवडल्यास जरूर लाईक करा आणि शेअर करायला तर करायला तर मुळीच विसरू नका बरं का!

वाचने 22369 वाचनखूण प्रतिक्रिया 62

खेडूत Wed, 04/29/2015 - 11:28
निमिष्काका, शीर्षक पटलं नाही! पुराण कुठाय? थोपुवरून उचलून डायरेक टाकलंत ?
आवडल्यास जरूर लाईक करा आणि शेअर करायला तर करायला तर मुळीच विसरू नका बरं का!
हे मिपावर कसं काय करता येतं ?

In reply to by निमिष सोनार

खेडूत Wed, 04/29/2015 - 12:11
त्ये कळतंय हो ! पण मध्यम बदलताना काई संस्कार करायचे कष्ट घ्याल कि नाई? आमी उठसूट कायबी शेर करत नसतो! बाकी लेख प्रचंड आवडला हे सांगायचं ऱ्हायलं …

In reply to by यसवायजी

नाखु Wed, 04/29/2015 - 12:28
वळलेल्या वाती जेप्याकडे पाठवून देणे (२५च्या) जोड्या करून सत्काराला पाहीजेत. परस्पर भागवत चिटणीस
मि.मा.मि.मं. सचालित ल.हा.धा.स. तर्फे

In reply to by नाखु

यसवायजी Wed, 04/29/2015 - 12:49
@ वळलेल्या वाती जेप्याकडे पाठवून देणे >> जेप्याला अजुन कुठे दिवे लावायला सांगताय? पुरे झालेत आधीचेच. :))

In reply to by पैसा

यसवायजी Wed, 04/29/2015 - 12:35
आपणा सर्वांची व्यवस्था 'बघायला' आम्ही केयस्सारटीशीच्या बशीने आदले दिवशीच निपाणीत दाखल झालेले असू. पुराण तेवढं जंक्शान होऊद्या. ;) (धाग्याची 'वात' लागते वाततं)

In reply to by यसवायजी

पैसा Wed, 04/29/2015 - 12:41
पुराणाची कल्जीच नको! कापूस त्येवडा भरपूर आणा म्हणजे झालं. मग धाग्याची वात नाय लागायची. बेळगाव निप्पाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पैजे वगैरे फ्लेक्क्ष तयार केलेत का नाय?

In reply to by पैसा

यसवायजी Wed, 04/29/2015 - 12:56
"बेळगाव-मच्छे-खानापूर-गोवा-निप्पाणीसह संयुक्त महाराष्ट्र" असा फ्लेक्क्ष करायची ऑर्डर सोलापुरकरांना दिल्ये. खाली "सुप्रशिद्ध पैसापुराण- आग्रहाचे आमंत्रण. तिकीटविक्री चालू." अशी अ‍ॅडपण हाय. बर्री निवू.

सुबोध खरे Wed, 04/29/2015 - 12:17
एखादी वस्तू विकत घेतल्यावर न विचारता काहीजण त्याची किंमत सांगत सुटतात. हि प्रवृत्ती जवळ जवळ सर्व माणसात असते. याचे कारण बर्याच वेळेस ती वस्तू महाग मिळते म्हणून नव्हे तर मला ती स्वस्तात कशी मिळाली हे लोकांना दाखवण्यासाठी. ( म्हणजे मी किती व्यवहार चतुर आहे हे दाखवण्यासाठी). यात उच्छाद म्हणजे बायका त्या आपल्याला हि वस्तू कितीला मिळाली हे विचारतात. म्हणजे किंमत जास्त सांगितली कि त्यांना आनंद होतो. मला म्हणून स्वस्त दिली, एकच नग होता इ इ. ( मी किती गृहकृत्यदक्ष आहे हे दाखवता येते) बाकी आपण आय फोन ६ का घेतला किंवा बुलेटच खरी बाईक असे सुद्धा सांगणारे लोक असतातच ते म्हणजे आपण कसे वेल प्लेस्ड आहोत किंवा आपलि अभिरुची कशी उच्च आहे हे दाखवणे याचा नमुना. गेला बाजार --मी सवाई गंधर्व मध्ये फक्त भीमसेन ऐकतो. बाकी गंगुबाई हनगल फिरोज दस्तूर वगैरे "ठीक" आहेत म्हणणारे पण बरेच दिसत असत.

In reply to by सुबोध खरे

टवाळ कार्टा Wed, 04/29/2015 - 12:28
बुलेटच खरी बाईक असे सुद्धा सांगणारे लोक असतातच
यावर मी एक धागा टाकणार आहे...आधीच कॉपिराईट करुन ठेवलाय हा विषय इथे :)

In reply to by जेपी

नाखु Wed, 04/29/2015 - 12:35
"गुप्त" नाव फोडून जाहीर केल्या बद्दल निषेध. आता एकशे एक वेळा लिहून काढ निमित्त्-निमिष् निस्सीम-निदान आजचा ग्रुहपाठ म्हून.

निमिष सोनार Wed, 04/29/2015 - 12:45
कारण मला हे कोल्हापूर वगैरे काय म्हणत आहेत ते समजले नाही. कृपया शीर्षक बदलून "पैसा पुराण" किंवा वाचकाना जे हवे असेल ते करण्यासाठी कोठे क्लिक करावे लागेल ते सांगा, मी करतो. शीर्षक मला महत्वाचे नाही. लेख महत्वाचा आहे.

In reply to by निमिष सोनार

पैसा Wed, 04/29/2015 - 12:46
तुमचा किंवा लेखाचा प्रॉब्ळम नाय. आम्ही जरा दुसर्‍या धाग्याबद्दल मधेच गंभीर चर्चा करत होतो. मिपाच्या पहिल्या पानावरचे धागे वाचलेत तरी तुमच्या लक्षात आलं असतं.

In reply to by निमिष सोनार

यसवायजी Wed, 04/29/2015 - 12:49
हो ना. कैच्याकै चाल्लंय राव. इशय काय? कोल्लापुर कुटं? यांना लेख महत्वाचा नाही. शीर्षक महत्वाचे आहे.

In reply to by निमिष सोनार

स्पा Wed, 04/29/2015 - 12:59
सोणार साहेब कधितरी इतरांच्या जिलब्यांनाही आपले म्हणा. मग लागतील संदर्भ, :)

होबासराव Wed, 04/29/2015 - 13:28
आपल्या जिलब्या आम्हि फ्रीज मध्ये जपुन ठेवल्यात. एका आपटार्ड मित्रा बरोबर पैज लागलिय, खरे तर त्याला समुपदेशना चि नितांत आवश्यकता आहे पण पठ्ठा ऐकत नाहिये. नॅस्ट्रॉडेमस नि उल्लेख केलेला भारतिय युगपुरुष असल्याच्या तोर्‍यात वावरतोय तो. पैज हारल्यास मि सांगेल ते त्याला करावे लागणार आहे. सो त्यावेळेस आपले लेख त्याल वाचायला दिले जातील आणि त्यावर प्रश्णोत्तर तास सुध्दा ठेवल्या जाइल :) (ह्.घ्या. :))

In reply to by अन्या दातार

नाखु Wed, 04/29/2015 - 15:02
तुमचीच बाकी होती, जरा सरकून घ्या रे नवा भिडू आलाय जरा बॅट्याला पण जागा ठेवा !!! मुद्दाम घुसेन लाज वाटणार्‍या मिपाकरांचा सालस* मित्र *शब्दाचे अर्थाचे हक्क कॅप्टनने राखून ठेवले आहेत तेव्हा माहीतीकरता व्यनी करा. अक्षीहित.

In reply to by अन्या दातार

होबासराव गुरुवार, 04/30/2015 - 15:41
आणि वाचल्यानंतर खुप विचार करायला प्रव्रुत्त करतात्..खरच. कस ईतक छान छान, इतकि खोलि असलेल आणि सौन्दर्यानुभुती देणार लेखन असत.

आदूबाळ Wed, 04/29/2015 - 18:04
महागुरू आचार्य चाणक्यांनी सुद्धा यासंदर्भात बरंच काही लिहून ठेवलंय ते सुद्धा कालातीत म्हणजे कोणत्याही काळाला लागू होणारं.. काय वाटते आपल्याला?
आयला! चाणक्य पण महाग्रू होते?? मला वाटलं ते आपले .... च आद्य महागुरू. चाणक्याचे अर्थविषयक विचार वाचायला आवडतील.

In reply to by निमिष सोनार

पैसा गुरुवार, 04/30/2015 - 16:10
गृहपाठ म्हणून मिपाच्या पानावरचे सगळे धागे वाचा आणि एकेक प्रतिक्रिया देऊन या बघू!