मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बोगदा

संजय क्षीरसागर · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
समोर आणि मागे ...वर आणि खाली ..या बाजूला अन त्या बाजूला एक लांबलचक अंधारा बोगदा.. (रस्त्याच्या खालून तर चालत नाहीये ना मी?) बोगद्यात प्रवेश करताना वाटत होतं, हां हां म्हणता संपेल तो. पण जसजसं आत जाऊ तसं अंधार दाटतच चाललाय ...अंतराचा ठाव लागेना झालाय... (`कशाला मारली झक' असं आता वाटतंय... पण काय उपयोग?) मी जात आहे..की येत आहे ? (आयचा घो! रिवर्समधे चालतोयं की काय?) ..आता संपेल , मग संपेल असे वाटणारा हा बोगदा संपत तर नाहीच..पण आणखी आणखी अरुंद होत चाललाय. डोळे उघडले काय अन मिटले काय, सारखेच..! (माझे डोळे उघडे आहेत का बंद? पण आता हे सांगणार तरी कोण?) वाटचाल अवघड म्हणता म्हणता अशक्य होत चाललीय...मघापर्यंत पाउल तरी पुढे (की मागे ?) पडत होतं ! पण आता तर बोटही हलवणं अशक्य झालंय... (बहुतेक माझी एमाराय चाललीये ! अजिबातच हालता येत नाहीये) ओह. काय करू ? किंबहुना काही करण्याचा ऑप्शन मला आहे का ? (एमाराय कुणी करायला सांगितली होती बरं?) ..आतापर्यंत तरी जे केलं ते ‘मी’च केलं का ? मला काही पर्याय होता का ? ( `ऐकावे डॉक्टरचे आणि करावे मनाचे' हेच खरं!) माझी वाट चुकली आहे का ? (यालाच `वाट लागली' म्हणतात का? पण आता `वाट पाहाण्याशिवाय' हातात काये ?) किती काळ गेला समजत नाही. काळ ही संकल्पनाच या बोगद्यात अर्थशून्य ठरली आहे... (पुन्हा तोच प्रश्न डोळे उघडेत का बंद? आणि ते सुद्धा कोण ठरवणार, मी की बोगदा?) ....अं ? हा आवाज कसला ? खरंच आवाज येतो आहे की चाहुलीला आसावलेल्या माझ्या कानांना भास होतो आहे ? कोण ते हसतंय ? हे सुपरिचित असे मंद शांत सूर कुठून ऐकू येताहेत ? (हल्ली पेशंटला एमारायमधे बासरी ऐकवतात असं दिसतंय!) कुणाचं तरी निकट सान्निध्य जाणवतंय ... फार फार पूर्वी लहानपणी, स्मृती पोचते तिथपासून, अगदी श्वाससुद्धा घेता येत नव्हता तेव्हापासून माझा प्रेमानं सांभाळ करणारं कुणीतरी...तोच का तू ? (का मीच तो? आयला, काय लफडा आहे हा? `मी' तू आहेस की `तू' मी आहेस? कोण कुणाशी बोलतंय?) अन इथे कसा अवचित समोर आलास ? (तू समोरून आलास का मागून हा खरा प्रश्न आहे! ....पण तो नंतर सोडवू.) ...ओह आता मी तुला ओळखले आहे..तू तो अंती असणारा आहेस..सगळं काही अखेर ज्याच्याकडेच जातं तो.. ..नाही, नाही, पण तू तर सुरुवातीला पण होतास..! ..जेव्हा मी एक बिंदूसुद्धा नसेन, तेव्हापासून तूच तर सोबत होतास..! म्हणजे तू अंती नव्हे तर आदि...! (अरे, आता आलं लक्षात तू आदी उर्फ अ‍ॅडी (किराणावाला)! आणि मी आँटी!) हसू नको..मी ओळखलंय तुला. तूच तो ! तू..माझ्या अंतर्यामी राहून दिशा देणारा, माझे चलन वलन, वहन-भरण करणारा ...योगक्षेम चालवणारा आत्मन ! माझेच शुद्ध केवल स्वरूप..! (येस, अ‍ॅड्या वाणी! कडकीत सुद्धा वाणसामान देणारा आणि मला शुद्ध डालडा देणारा तो तूच!) ..जनधिक्काराच्या अंधारात चाचपडताना थेंबाथेंबाने मी गलितगात्र होताना, मति तर्क अन मार्ग सारे खुंटले होते तेव्हा, विजेसारख्या क्षुल्लक गोष्टीचे बील थकले होते तेव्हा, तूच ना नवा मार्ग सुचवलास ? (`आज उधार उद्या रोख' हाच तो वाणसामानाचा मार्ग आणि शेजार्‍याकडून टेंपरवारी कनेक्शन घेऊन घर उजळवून टाकलं होतस, आठवतंय?) ..होय. आता माझ्या थोडं थोडं लक्षात येऊ लागलंय...मागे वळून पाहताना काही काही उमज पडू लागला आहे. ...पुष्कळदा मला वाटत होतं मला निर्णय घ्यायचा आहे.. (आता तरी बीलं भरु का नको? चालललंय ते काय वाईट आहे?) पण आता उमगतंय, ..निर्णय घेतले ते ‘मी’ नाही, तर माझ्या पूर्वकर्मांनी, ... त्या कर्मांच्या वेळोवेळी समोर ठाकलेल्या परिणामस्वरूप परिस्थितीने... (ज्ञानीजनांनी पूर्वीच सांगितलंय `नाईलाज को क्या इलाज? आणि सिनियर सिटिझन्स म्हणतात ते, `कर्म माझं!' म्हणजे हेच असावं) निर्णयाचे योग्य पर्याय अर्थात होते..पण अज्ञानाच्या धुक्यामुळे मी ते जाणले नाहीत. ...केवळ घेतले म्हणून काही निर्णय अंमलात आणले...कधी स्वत;च्या कधी इतरांच्या मतानं कर्म पार पाडले. (आयला, संपतेयं का नाही ही एमाराय?) होय.. तुझ्यासाठीच केली सर्व कर्मे..कधी भली कधी बुरी..कृष्ण अन धवल..सुचेल तसं केलं. आल्या क्षणाला साजरं केलं त्या कर्माच्या आहुतीनं (अरे, गॅस कोण फुकटात देणार? तिथे पैशाची आहुती द्यावीच लागली) कधी तू समोर असायचास, कधी वळणापलीकडे ! तुझे इशारे कधी कधी समजलेच नाहीत. कधी समजूनसुद्धा दुर्लक्ष केलं मी ! पण परिणाम भोगायला अन उपभोगायला लागले मात्र आपणा दोघांना ! एकत्रित.. (म्हणजे बीलं थकवायची मी आणि परिणाम मात्र `एकत्रित'! दैवी चमत्कार म्हणतात तो हाच) या काळोख्या बोगद्यातला प्रवेश ही त्याचीच तर परिणीती नव्हे ? (तू बोगद्यात आहेस का बाहेर? आणि एकावेळी दोघांचा एमाराय कसा चालूये?) ..यावेळी तुझे हास्य मघासारखे मुक्त नाही...! (बील वाढलं की काय?) ...समजलं ! कधीतरी काहीतरी चुकलंय. नाही समजत, नक्की कधी अन कुठं...पण चुकलंय खरं ! पश्चात्ताप.. ? हं..चूक समजेल तर ना पश्चात्ताप ? (छे, छे, रामराया, सोडव रे या हिवतापातून) पण खोल तळाशी एक खात्री आहे रे..रस्ते चुकले असतील पण इरादे नक्कीच चुकीचे नव्हते. जन्म घेणं हातात नव्हतं पण जन्म घेतल्यावर जमेल तितके हातपाय हलवले, काही दिशा ठरवून मार्ग शोधण्याचा प्रयत्न तरी प्रामाणिकपणे केला रे ! (जन्म घेतला का दिला? हातपाय हालायचे थांबून आता, डोक्यात विचारांना सुद्धा हालायला जागा राहिली नाही. टोटल ज्याम!) आणि हे सर्व तुझ्यासाठीच रे आत्मन, तुझ्यासाठी ! ना त्या आईवडिलांसाठी, ना बायको-मुलांसाठी, ना सख्या-जिवलगांसाठी. सगळं काही स्वत:साठीच बरं. .( अ‍ॅडया, गैरसमज नको बरं, `आत्मन' म्हणजे संस्कृतमधे `ग्रोसर', ज्याच्याशिवाय `आत्मा चालत नाही' तो) आज या अंधाऱ्या बोगद्याच्या अंतर्गृहात जणू माझी प्रज्ञा शुद्ध व्हावी तसे सर्व काही स्वच्छ दिसते आहे मला ! आता या ज्ञानाच्या क्षणी मला निवळलेल्या मानससरोवराचा तळ अगदी स्पष्ट दिसतो आहे. (एमारायच्या पाईपात ही बिसलेरीची बाटली कुठून आली?) अन हेही समजतंय की ही अनुभूती या ज्ञानासाठीच ! तुझीच योजना ही ! तुझ्या-माझ्यातले अंतर शून्य करण्यासाठी ! जिवा-शिवाची भेट घडवण्यासाठी ! द्वैताला अद्वैत करण्यासाठी ! (आयचा घो, जीवाला शिवायचा अनुभव यावा म्हणून मला या पाईपात घातलं?) अन मग आता वेळ का लावतो आहेस जिवलगा ? (त्यापेक्षा साईडनं पाईप खोल!) पुरे झालं आता ! नको अंत पाहूस ! नको दुरून दुरून ते विलक्षण मोहक हास्य फेकूस ! भरून जाऊदे तुझ्या प्रकाशमय चैतन्याने माझा रिकामा गाभारा ! उजळून जाऊदे हे तमोमय कृष्णविवर तुझ्या दैदिप्यमान सान्निध्याने ! (लावा रे कुणी तरी लाईट लावा!) .....या अज्ञान-बोगद्याचा अंत करणारे हे पाउल, मी शिल्लक राहिलेले सर्व बळ एकवटून हे पहा उचलले ! (मायला, आणि पुन्हा नवा बोगदा लागला!) ______________________________ (मूळ बोगदा इथूनच साभार!)

वाचने 23739 वाचनखूण प्रतिक्रिया 91

अशा दोन्ही साशंकता आहेत. ज्यांना माझ्या लेखनात इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी सांगतो की, आता खुद्द मान्यवरांनी सुरुवात केलीये, तेव्हा न्याय होईल की नाही याची खात्री (मला तरी) नाही. एनी वे, बहुमतानं अल्पमताला दाबणं हे लोकशाहीत सुद्धा शक्य आहेच आणि ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांना तर ते सहज आहे. प्रस्थापिताविरुद्ध प्रतिवाद अवघड नाही कारण प्रस्थापिताकडे किती प्रज्ञा आहे ते मूळ लेख दर्शवतो. पण नवा विचार उचलून धरणं जनमनावर अवलंबून आहे. तस्मात, माझा आयडी ब्लॉक झाला तर त्याला फेअर जस्टीस म्हणता येणार नाही पण दाद सुद्धा मागता येणार नाही. अर्थात, जे लिहिलंय ती केवळ मूळ लेखाची खिल्ली नाही तर एकूण जनमानचा वैचारिक गोंधळ दर्शवण्याचा प्रयत्न आहे. मला ब्लॉक होण्याची फिकिर नाही कारण अभिव्यक्ती हा सत्याचा अंगभूत धर्म आहे. इथे नाही तर आणखी कुण्याप्रकारे मी व्यक्त होत राहीनच. लेट अस सी.

In reply to by संजय क्षीरसागर

स्पंदना Wed, 10/15/2014 - 04:34
हाणा!! मारा!! तोडा!! अयाई!! मेलो!! अल्ल्ला!! हर हर महादेव!! हाण! काप!! पडला!! गेला!! पळ! अरे पळतोस कोठे!! देवा वाचव!! अलल्ला बचाव!! ऑ!!! यप!! सपासप! !!हाणा!! मारा!! तोडा!! अयाई!! मेलो!! अल्ल्ला!! हर हर महादेव!! हाण! काप!! पडला!! गेला!! पळ! अरे पळतोस कोठे!! देवा वाचव!! अलल्ला बचाव!! ऑ!!! यप!! सपासप! !!हाणा!! मारा!! तोडा!! अयाई!! मेलो!! अल्ल्ला!! हर हर महादेव!! हाण! काप!! पडला!! गेला!! पळ! अरे पळतोस कोठे!! देवा वाचव!! अलल्ला बचाव!! ऑ!!! यप!! सपासप! !!हाणा!! मारा!! तोडा!! अयाई!! मेलो!! अल्ल्ला!! हर हर महादेव!! हाण! काप!! पडला!! गेला!! पळ! अरे पळतोस कोठे!! देवा वाचव!! अलल्ला बचाव!! ऑ!!! यप!! सपासप! !!

In reply to by स्पंदना

अर्धवटराव Wed, 10/15/2014 - 05:45
=)) तुला गं काय झालं अपर्णे एव्हढा सगळा धावा करायचा...साक्षात भवानी तु...अगं हे सगळे स्वर्ग/जन्नतपती तुझ्याकडे आशेने बघतात...आणि तुच अशी  हाय खावी ना...

In reply to by स्पा

कारण ती निव्वळ इकडचं तिकडचं उचलून केलेली फेकंफेक आहे. तो अनुभव असला तर मात्र `औषधोपचाराची' गरज आहे. अर्थात, लिहिण्याची स्टाईल अशीये की सामान्यांनी भारावून जावं पण एकूण गौडबंगाल काये ते विडंबनातून मांडलंय. http://www.misalpav.com/user/*****/authored गाळलेल्या जागी योग्य आकडा टाकला की झालं!

पिलीयन रायडर Tue, 10/14/2014 - 12:34
संक्षी... कोडि घालु नकात,.. लेख वाचायला प्रय्त्न केलाय.. अगदी प्रामानिकपणे... अर्ध्यातच अवसान गळालं... आता नक्की कशावर लिहीलय ते सांगाल तर कदाचित अर्थ लागेल.. (आज काही काम नाही फारसं..) शोधाशोध करायला सांगु नकात, ते मला जमत नाही..

In reply to by पिलीयन रायडर

पिलीयन रायडर Tue, 10/14/2014 - 13:57
आणि नाही आवडलं.... "तुम्हाला" विरोध करायचा म्हणुन नाही... दोन्ही लेख वाचले... तुम्ही ज्याला विडंबन म्हणत आहात ते वाचलं तर स्पष्ट सांगते, जमलेलं नाही.. तुमच्या लेखामुळे जे गोंधळुन गेले आहेत तो तुमच्या लिखाणाचा परिणाम आहे, मुळ लेखाचा नाही... कारण तुम्ही मुळ लेख जशाचा तसा उचलुन मध्ये स्वतःच्या ओळी कंसात घुसडल्या आहेत.. आणि त्यानी गोंधळ उडतो आहे.. मुळ लेखावर अनेकांनी चांगल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. मला नाही वाटत की तुमचा लेख उडेल.. कारण केवळ हातात अधिकार आहे म्हणुन त्याचा गैरवापर करतील असे सध्याचे कुणीच संपादक नाहीत.. कोणीही तेवढ्या कोत्या मनाचे नाही.. अवांतरः- तुमची दुर्बोधतेची व्याख्या नेमकी काय? ग्रेसच्या कविता लोकांना कळत नाही तेव्हा तुम्ही त्यांना म्हणता की "आपल्याला नसेल कळत तर सोडुन द्यावं... दुसर्‍याला कशाला खाली खेचता?"... आणि ह्या विडंबनाची प्रेरणा असणारा लेख तुम्हाला "गौडबंगाल" वाटतो.. आता तुम्ही का नाही सोडुन देत?

In reply to by पिलीयन रायडर

मी माझ्या ओळी `घुसवल्या' नाहीयेत तर असल्या मजेशीर मानसिक गोंधळाला (जो प्रस्थापित आध्यात्मात `प्रगतीचा टप्पा' किंवा `शेवटची पायरी' मानली गेलायं) आणि (त्यामुळेच मूळ लेखावर `वॉव! वॉट अ‍ॅन एक्स्पीरिमंट असे प्रतिसाद आहेत), त्याला विनोदाचा रंग दिलायं. कुणी कधी MRI Scan चा अनुभव घेतला असेल (किंवा तुम्ही त्याबद्दल ऐकलं जरी असेल) तर त्याला हा `बोगदा' अनुभव किती भयानक असतो याची कल्पना येईल. तो बोगदा तरी वैद्यकीय कारणासाठी असतो. हा `आध्यात्मिक बोगदा' मात्र साधकानं स्वतःच ओढवून घेतलेला असतो.

In reply to by संजय क्षीरसागर

कवितानागेश Tue, 10/14/2014 - 14:55
तुम्हाला एमाराय ची भिती वाटते? ??? किन्वा इन जेनरल भिती वाटते? सहज विचारले, हितचिन्तक म्हणून . नाही सान्गितले तरी चालेल.

In reply to by कवितानागेश

आध्यात्मातल्या `बोगदा एक्सपिरियंसबद्दल' चाललंय. अर्थात, तुम्हाला कल्पना असेलच त्यामुळे वेगळं काही सांगायची गरज नाही. इतरांसाठी आय हॅव गिवन जस्ट अ पॅरलल.

In reply to by कवितानागेश

ज्या पद्धतीनं दिलासा देतायं त्यावरनं. असू दे तो तुमच्याजवळच. मला काहीएक गरज नाही. मेडिकल एमारायचीही नाही आणि आध्यात्मिक एमारायचीह तर नाहीच नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

कवितानागेश Tue, 10/14/2014 - 17:25
मी नेणार नाही हो तुम्हाला एमारायसाठी. कशाला काळजी करताय? पण मला तुमच्या भितीबद्दल सखेद आश्चर्य वाटलं. शिवाय प्रत्यक्ष अनुभवाशिवायच तुम्ही हा अनुभव भयानक असतो, हे कसं काय बरं सांगत आहात, याबद्दल अतीव उत्सुकताही वाटली. तुमचे या प्रश्नापासून पळून जाणं मी नक्कीच समजू शकते, पण तरीही तुम्हाला भितीबद्दल असे कळवळून लिहिताना पाहून माझ्यासारख्या अनेक सह्र्दय सदस्यांना आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय रहाणार नाही. म्हणून मला रहावलं नाही आणि विचारलं, तुम्ही खरोखरच घाबरता????

In reply to by कवितानागेश

विटेकर Tue, 10/14/2014 - 17:51
किती काळजी करावी माणसाने माऊतै ! " विश्वबंधुत्व" म्हणतात ते हीच की काय ? आता मी सुखाने डोळे मिटेन म्हणतो ! ( उठवू नका रे कोणी प्लीज )

बाळ सप्रे Tue, 10/14/2014 - 14:09
'एका मळ्यात होती' चे पडसाद आहेत तर हे.. तिथे तुमची प्रतिक्रीया न दिसल्याने मला बरं वाटल होतं.. पण तितक्यात हे वाचलं आणि साक्षात्कारही झाला.. म्हणजे परत जैसे थे !! रच्याकने 'एका मळ्यात होती' हे कशाचे पडसाद होते ??

In reply to by बाळ सप्रे

मी काय कुणाचं घोडं मारलेलं नाही. आणि तो स्वभावही नाही. आता कुणाला काय आणि केव्हा उसळी मारावीशी वाटेल काही सांगता येत नाही. पण एक निरिक्षण आहे, आध्यात्मात गंडलेले किंवा देवभोळे, माझा उद्देश किंवा (त्यांच्याकडे) रोख नसतांनाही, माझ्यावर (उगीच) खवळून असतात. अर्थात, अशा `बोगदा एक्स्पिरियन्सवाल्यांना', `आध्यात्म इतकं सोपं असेल तर आम्ही इतके दिवस काय झक मारली का?' असं वाटणं सहाजिक आहे.

विटेकर Tue, 10/14/2014 - 15:12
धीस इज पार्शिलिटी. नेह्मी नेह्मी तूच का रीप्रेझेन्टेटिव्ह (टीम वाहव्वा! )????? संपादक मंडळ इकडे लक्ष देईल का ?

चौकटराजा Tue, 10/14/2014 - 16:42
हे मला काही कळलं नाही पण माझे असे मत आहे की ज्याना कबीर समजला त्याना अध्यात्म समजले. मला वाटते कबीर काही शिकलेला बिकलेला नसावा. आपल्या जवळ जाणे इतका सोपा अर्थ असताना उगीचच बोगद्यात शिरून मागे कशाला जायचे ? If your are not worthy enough to change others change yourself as it is easier going towards you than attracting others to you ! .

In reply to by सुहास..

स्पंदना Wed, 10/15/2014 - 04:41
तू तुझ्या चौकटीत जगत नसलास तरी मी तुला माझ्या चौकटीत बसवणारच!!! उगा गाळण उडते तुम्हा लोकांची चौकटीच नाव ऐकुन. समज नसल्याने गैरसमजाचे धनी होता तुम्ही. चौकटीत बसलच पाहिजे, अन ते ही मी देते आहे तीच. माझी सोडुन दुसर्‍या कोणाचीही चौकट चालणार नाही सांगुन ठेवते. मी सांगतेय ना, पुन्हा पुन्हा विचारु नको, तुझा गोंधळ फक्त माझ्या चौकटीत बसलास तरच सुटेल, नाहीतर आणखी गोंधळ!! मुर्ख! अडाणी!!

स्पा Tue, 10/14/2014 - 18:31
सुरेखच जागा आहे.... नक्की जाऊन यायला हव ११,१४,२८, ५३ क्रमांकाचे फोटो ज्याम आवडले. जाण्या येण्याचा किती खर्च आला तेही सांगा

In reply to by सूड

बॅटमॅन Tue, 10/14/2014 - 18:49
शिवाय १७ व्या फोटोतला वॉटरमार्क हटवता आल्यास अजून बरे. रसास्वादात अंमळ बाधा आणत असल्याने अर्थनिर्णयनात मूग गिळून बसावे लागत आहे. प्रख्यात फ्रेंच कलासमीक्षक आज-दु-पार यांच्या सिद्धांताप्रमाणे फोटोरूपी कलावस्तूच्या एकूण व्यामिश्र अनुबंधाचा हाही एक रोचक आयाम म्हणावयास हरकत नसावी.

In reply to by पैसा

सूड Tue, 10/14/2014 - 18:58
रसग्रहण, पाणिग्रहण, आसनग्रहण या सगळ्यात ग्रहणाचा अर्थ स्वीकार करणे असा असताना मूळात ग्रहण लागलं की लोक दान का करत असावेत?? किती विरोधाभास!!

In reply to by हाडक्या

पैसा Tue, 10/14/2014 - 19:23
तसां काय नाय वो! मीयां आपलां आमच्या सरांच्या धाग्यावर शंभर प्रतिसाद करायला हातभार लावतंय. माजो आपलो चानीचो वाटो.

In reply to by पैसा

प्रभाकर पेठकर Tue, 10/14/2014 - 19:37
नॉट निगोशिएबल म्हणजे 'चर्चा करण्यास अयोग्य' किंवा 'रोकड रकमेत रुपांतरीत करता येणारा' अहस्तांतरणीय म्हणजे नॉन ट्रान्सफरेबल.

In reply to by प्रभाकर पेठकर

पैसा Tue, 10/14/2014 - 20:16
जण्रल विंग्लिशप्रमाणे तुम्हे म्हणताय ते बरोबर पण मी निगिशिएबल इन्स्ट्रुमेंट अ‍ॅक्टाबद्दल बोलत होते. नॉट निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट म्हणजे अहस्तांतरणीय लिखत (म्हंजे तुमचे चेक ड्राफ्ट्स इ. जे काय असेल ते)

In reply to by हाडक्या

बॅटमॅन Tue, 10/14/2014 - 19:36
अहो, अधनंमधनं होतं असं. सारखं गारगोटीप्रमाणे (प्रथमार्धसंधिविग्रहू ;) ) राहण्यात तरी काय प्वाइंटे, नैका?

In reply to by जेपी

विडंबनाचं सध्या बाजूला राहू दे, वास्तविकता अशीये. एकतर बोगदा एक्स्पिरियन्ससाठी व्यक्ती कोण वणवण करते. त्यात असा अनुभव `जाहीर' केल्यावर, इतरेजन बावचळून जातात. `आपल्याला केव्हा दिसणार बोगदा?' म्हणजे एकतर बोगदावाली व्यक्ती मानसिक टनेलमधे सापडलेली असते. तो अनुभव म्हणजे भ्रम असतो, कारण सत्य समोर आहे, ती क्लॅरिटीये, व्यापकता आहे, बोगदा नाही. मग दुनिया, बोगदा एक्स्पिरियन्सवाल्या व्यक्तीकडे `पोहोचलेली' म्हणून बघायला लागते. `तुला बासरी ऐकू येतेयं? सिंप्ली ग्रेट! आता टनेलच्या त्या एंडला उभा असलेला `तो' भेटणार! खरं तर कसली बासरी आणि कसलं काय, मायला सगळे कल्पनेचे खेळ. इकडून तिकडून काहीबाही वाचलेलं, निरुद्योगी डोक्यात फिरत असतं, त्यातनं नाही नाही ते भास व्हायला लागतात. पण आता बोगदावाली मागे हटू म्हणता हटू शकत नाही कारण बाकीचे तिला पुढे ढकलत राहातात. असा हा भंपक सोहळा उत्तरोत्तर रंगत जातो. मग कुणी म्हणतं `कसा दिसतोयं तो कृष्णसखा?' की ही सुरु! कल्पनेला अंत नाही. मग `सुगंध' वगैरे यायला लागतात, `प्रकाश' दिसायला लागतो. ही खरं तर बाकीच्या सेंसरीज बाद होत चालल्याची लक्षणं असतात पण या `विद्वानांच्या' भाऊगर्दीत कोण कुणाला समजावणार? तस्मात `कधी संपणार हा बोगदा ?' हा प्रश्न उपमर्दकारक ठरतो. तर अशी ही विद्वजनांची मांदियाळी आणि त्यांचे खुळे बोगदे!

In reply to by संजय क्षीरसागर

सुहास.. Tue, 10/14/2014 - 23:09
स्वत: च्या ललित लेखाबद्दल स्वतःलाच येक्षप्लेशन द्यावे लागावे यासारखे खेदकारक काही नाही, विषय चांगला पण , लांबण जास्त झाली....त्यामुळे एक तर विमान डोक्यावरून च नव्हे तर आकांशगंगेच्या बाहेरून गेलयं , त्यात मग कंस ही भरुन पावलेत. लेखन सरल असते तर वेगळे नक्की वाटले असते . ( बाकी तेच, निंदा, परखड परीक्षण, गांभीर्य ई.ई. ) हे उदाहरणादाखल, कल्लोळ तर दाखवायचा पण सरल आणि संयत भाषेत :) http://misalpav.com/node/12078

In reply to by सुहास..

आता लेखच इतका दीर्घ आहे म्हटल्यावर (जवळजवळ) सगळे मुद्दे कव्हर करणं आलं. जेपींना स्पष्टीकरण दिलेलं नाही, फॅक्ट सांगितलीये.

In reply to by संजय क्षीरसागर

स्पंदना Wed, 10/15/2014 - 04:45
आला आला ! सुगंध आला एकदाचा. तरी म्हंटल अजुन खुळा हा शब्द कसा आला नाही. आता त्यांचे खुळे बोगदे म्हणजे माझा शाना बोगदा नाय का?

In reply to by मारवा

जे लिहितो तो अनुभव असतो. दुसर्‍याचा अनुभव आणखी सघन असेल तर तो आपलासा करण्यात आनंद वाटतो (पाहा: `ती गेली तेंव्हा रिमझिम' वरचे तुमचे आणि माझे एक्सचेंजेस). आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जिंदगी अनेकानेक बाजूंनी रंगीन केलीये. संगीत, वैवाहिक आयुष्य, आपत्य संगोपन, आप्तांशी नाते-संबंध, सचोटीची व्यावसायिक कारकिर्द, निर्धास्त सांपत्तिक स्थिती, आणि त्याच्या जोडीला आध्यात्म, कविता, ललित साहित्य, योगा, प्राणायम, खेळ, दोस्त लोक...आणखी काय हवं?

In reply to by संजय क्षीरसागर

मारवा Wed, 10/15/2014 - 11:15
संजय जी मग माझा गैरसमज झाला कदाचित. मला वाटल तस की तुम्ही कुठेतरी दुखावलाय म्हणुन विचारल इतकचं.

निराकार गाढव Wed, 11/12/2014 - 08:05
या रसग्रहणाचा एक महत्वाचा पैलू कोणाही प्रतिसादकाच्या लक्षात आलेला दिसत नाही. ते म्हणजे "प्रगाढ" आणि "दीर्घकालीन" अभ्यास!!" मूळ लेख १३/३/२०१३ ला प्रसिद्ध झाला आणि हे रसग्रहण झाले १४/१०/२०१४ ला, म्हणजे तब्बल एकोणीस महिन्यांच्या अभ्यास आणि चिंतनानंतर. मलासुद्धा माझ्या व्यासंगपूर्ण अभ्यासांतीच हे लक्षात आले. .

सस्नेह Wed, 11/12/2014 - 11:35
आजवर मिपावर कधीच न केलेली गोष्ट आज करावी लागतेय, स्वत:च्या लेखाचा अर्थ सांगणे. इथे सर्व लोक्स समजदार आहेत. पण काही विद्वान लोकांना अर्थ समजला नाही असे वाटते म्हणून हा प्रपंच. सदर लेख हा माझ्या ‘साक्षात्कार’ या लेखाचे विडंबन असावे असे वाटते. ‘साक्षात्कार’ हे एक रूपक असून चिवट मानवी आशेचे अन जिजीगीषेचे प्रातिनिधिक चित्रण आहे. जीवनात अपयश अपमान दु:ख अनंत वेळा अनुभवास येते. प्रियजनांचा मृत्यू, वियोग प्रतारणेचा धक्का, .. कित्येक क्षणी तर जीवन संपवावेसे वाटण्याइतके नैराश्य येते. सर्व काही संपले, फिरून या जीवनात जगण्यासारखे काहीच राहिले नाही असे वाटते. तरीही जीवन शिल्लक असतेच असते. आणि ते रेटताना विस्मय वाटावा अशी एक जीवनेच्छा, वठलेल्या खोडला अंकुर फुटावा तशी पुन्हा बहरून येत राहते. ती जीवनेच्छा कुठल्यातरी निमित्तमात्र प्रकाशाच्या कवडशाच्या आधाराने सरसरून येते. जीवन संपले तरी जीवनेच्छा अंकुरणे संपत नाही. आपणा सर्वांना आयुष्यात कधी ना कधी हा अनुभव आला असेलच. हीच थीम आहे या लेखाची. यात कुणाला काही अध्यात्मिक दिसावे याचे नवल वाटले. धन्यवाद.

In reply to by सस्नेह

संदीप डांगे Wed, 11/12/2014 - 13:38
जाऊ द्या हो ताई, फार मनाला लावून घेऊ नका. तुमच्या लेखाला ओढून ताणून कुणी अध्यात्माचा शिक्का मारत असेल तर जैसी जिसकी सोच. मला सिंह आणि कोकरू यांची गोष्ट आठवली. ज्यात "तू नाही तर तुझ्या बापाने माझेकडे येणारे पाणी उष्टे केले असेल" असे म्हणून कोकराचा जीव घेणारा सिंह आठवला. कुणाला स्पष्टीकरण द्यावे लागावे यासारखा मनस्ताप दुसरा नाही. पण एक बरे झाले तुम्ही त्या लेखामागची भावना स्पष्ट केली ते. मी त्यामागच्या भावनेशी जुळवून घेऊ शकलो आणि त्याचा मला आनंद झाला.