मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मंत्रयोग - जपयोग

अनिल तापकीर · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
मंत्रयोग - जपयोग शास्त्रानुसार ज चा अर्थ आहे जन्माचे थांबणे आणि प चा अर्थ आहे पापाचे नष्ट होणे. कुठल्याही शब्दाचे किंवा मंत्राचे वारंवार उच्चारण करणे किंवा मनातल्या मनात वारंवार घोकणे याला जपयोग म्हणतात. याला मंत्रयोग देखील म्हटले जाते. मंत्राचा अर्थ आहे मनाला एका तंत्रात बांधणे. आणि ज्यावेळी मन एका तंत्रात एका नियमात बांधले जाते तेव्हा ती व्यक्ती मनाने खूप सामर्थ्यशाली बनते. कारण नेमाला खूप महत्व आहे माऊलींनी एका ठिकाणी म्हटले आहे कि, ।। नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ ।। जपयोग हि साधना खूप पुरातन आहे. म्हणूनच सर्व धर्मामध्ये या योगाचे अनुसरण करतात. हा एक चमत्कारी योग आहे. याचा प्रभाव व्यक्तीच्या मनावर व मस्तकावर जबरदस्त पडतो. जप योगामुळे सर्व प्रकारचे रोग आणि दु:ख यातना संपतात. जपयोगाचे चार प्रकार आहेत १ - वैखरी - आपल्या वाणीने स्पष्ट व मोठ्याने करतात तो वैखरी जप होय. २- मध्यमा - या मध्ये ओठातल्या ओठात जप केला जातो. ३- पश्यंती - या मध्ये मनातल्या मनात केला जातो यामध्ये ओठ हलत नाही. ४- परा - यामध्ये जप करायचा नसतो तो आपोआप होतो. पहिल्या तीन प्रकारामध्ये जप प्रयन्त पूर्वक करायचा असतो. चवथा प्रकार जो आहे. तो आपल्याला प्राप्त होत असतो. ती एक दैवी देणगी असते. पहिल्या तीन प्रकारची साधना सफल झाली कि परावाणी प्राप्त होते. दु:ख- शोक दूर कसे होतात - ज्यावेळी व्यक्ती खूप काळजीत तणावात चिंतेत असते . त्यावेळी ती नकारात्मक विचारांनी घेरली जाते. आणि पहिल्यापेक्षा जास्त संकटात आणि दु:खात पडते. विचार करून करून हैराण होते. सर्वप्रथम या सर्व विचारातून सुटण्यासाठी मन एकाग्र झाले पाहिजे कुठल्याही देवतेच्या सततच्या मंत्र जपाने मन एकाग्र व्हायला लागते आणि मनामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण व्हायला लागते. आणि तुमच्या सर्व दुःखाचा हळू हळू विनाश व्हायला सुरुवात होते. काही दिवसातच तुम्ही एक आनंदी आणि सामर्थ्यशाली होता. आपल्या आराध्य देवतेच्या निरंतर जपाने मनुष्य त्या दैवी शक्तीशी जोडला जातो आणि त्या दैवी शक्तीकडून त्याला सर्व प्रकारचे सहाय्य प्राप्त होते. जप योगामुळे दिव्य दृष्टी प्राप्त होते. आणि तो सामर्थ्यशाली तर होतोच पण अंतर्ज्ञानी देखील बनतो. जपयोगाच्या चमत्काराविषयी सर्व धर्म ग्रंथामध्ये उल्लेख आलेले आहेत. वेदांमध्ये विविध प्रकारच्या मंत्रांचा उल्लेख केलेला आहे. देवतेच्या नाम मंत्रामध्ये खूप शक्ती असते. त्याचा जप केला कि साधारण मनुष्य देखील दैवी शक्ती प्राप्त होऊन सामर्थ्यशाली होतो मंत्रजपाने जे ध्वनी तरंग उठतात त्याने त्या व्यक्तीचे स्थूल व सूक्ष्म अशी दोन्ही शरीरे कंपित होतात. यालाच मंत्रयोग - जपयोग म्हणतात.

वाचने 71020 वाचनखूण प्रतिक्रिया 434

In reply to by स्पा

धन्या गुरुवार, 07/24/2014 - 16:38
या गोष्टी इतक्या सहजासहजी कळत नाहीत. आणि तुम्हाला समजावण्याईतकी माझी कुवतही नाही. मला स्वतःला समजलेलंच अजूनही "इंटलेक्च्युअल" पातळीवर आहे. ते ज्या दिवशी "इंटर्नलाईज्ड" होऊन मी स्वतःच जेव्हा शांतीस्वरुप होईन तेव्हा कदाचित समजावू शकेनही. अर्थात तुम्हालाही हे सारं माझ्यासारखंच इंटलेक्च्युअल पातळीवर समजून घ्यायचं असेल तर मी मागच्या दोन वर्षांत वाचलेल्या दिड-दोनशे मानसशास्त्रावरच्या पुस्तकांची यादी देतो. वाचा.

In reply to by धन्या

स्पा गुरुवार, 07/24/2014 - 16:40
तुम्हालाही अनुभव नाही म्हणता ब्वोर्र मग वर पलीकडील अनुभव नसलेल्या मंडळींवर का चढताय त्यांनीही दीड दोनशे ग्रंथ वाचलेलेच आहेत कि

In reply to by स्पा

धन्या गुरुवार, 07/24/2014 - 16:46
मग वर पलीकडील अनुभव नसलेल्या मंडळींवर का चढताय त्यांनीही दीड दोनशे ग्रंथ वाचलेलेच आहेत कि
हा तुमच्या मनाचा भ्रम आहे. इथे कुणी चढत नाही. चर्चा चालू आहे इथे. सार्वजनिक मंचावर भाषा जरा जपून वापरावी. :)

In reply to by स्पा

धन्या गुरुवार, 07/24/2014 - 16:55
अगदी अनुभव नसला तरी अनुभवाची पूर्वतयारी नक्कीच झाली आहे. माणूस एका रात्रीत आपल्या सार्‍या निरर्थक गोष्टी सोडू शकत नाही. ती प्रक्रिया असते.

In reply to by प्यारे१

प्रसाद गोडबोले गुरुवार, 07/24/2014 - 17:14
धन्या , काय काय झालं पाहिजे ह्याची लिस्ट वाढतच चालील्ये राव ... आधी फक्त समष्टी होती आता सत्यान्वेषण पण नवीन अ‍ॅड झालय ... *pleasantry*

In reply to by स्पा

धन्या गुरुवार, 07/24/2014 - 17:02
मला जे म्हणायचं आहे ते मी वरच्या तीन चार प्रतिसादांत म्हटलं आहे. यापेक्षा अधिक फोड करुन सांगण्यास मी असमर्थ आहे. मी म्हटल्याप्रमाणे पुस्तकांची यादी मात्र नक्की व्यनी करु शकेन.

In reply to by स्पा

धन्या गुरुवार, 07/24/2014 - 17:04
हाहा लईच मजेदार वाक्य सोडता हो तुम्ही
तुम्हाला माझं वाक्य मजेदार वाटू शकतं. एखाद्या घटनेकडे, व्यक्तीकडे, वाक्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन व्यक्तीगणिक बदलू शकतो.

In reply to by धन्या

कवितानागेश गुरुवार, 07/24/2014 - 19:39
अगदी अनुभव नसला तरी अनुभवाची पूर्वतयारी नक्कीच झाली आहे.>> ऑल द बेस्ट धन्या! . . . . (अवांतरः धन्या कायम नास्तिक रहावा अशी जगन्नियन्त्याकडे कळकळीची प्रार्थना)

In reply to by धन्या

स्पा गुरुवार, 07/24/2014 - 16:56
ज्याप्रमाणे तुम्ही दुसर्यांच्या मोठ्ठ्या मोठ्ठ्या शब्द वापरण्यावरुन टर उडवताय, अनुभव नाही सांगताय, तुमची स्थिती काही वेगळी नाही, दिडशे पुस्तकांच्या भांडवलावर तुम्ही चर्चेचे गुर्हाळ मांडुन बसला आहात, अनुभव काहीच नाही, नुसतेच फुकाचे शब्द. :-D

In reply to by स्पा

सूड गुरुवार, 07/24/2014 - 16:42
मला वाटतं शांती ही बोडणात ठेवलेल्या अन्नपूर्णेप्रमाणे असते. आपणच ती परातीत ठेवतो, आपणच तिच्यावर आपल्या आशा, आकांक्षा, आनंद, दु:ख, चिंतांची पंचामृतं ओततो. ही पंचामृतं आणि भौतिक सुखाचे नैवेद्य आणि अलंकारासकट बोडण कालवून/कळवून झालं ही पुन्हा तीच अन्नपूर्णा त्यातून मिळवण्यासाठी प्रयत्न करतो. असते डोळ्यासमोरच आपणच दडवतो आणि आपणच पुन्हा ती मिळवण्यासाठी प्रयत्न करतो. (चू भू दे घे.) इति लेखनसीमा॥

In reply to by धन्या

प्यारे१ गुरुवार, 07/24/2014 - 16:37
मार्ग कुठलाही अवलंबला तरी हरकत नाही. बाकी कुणाचंही नाव घेऊन नामस्मरणाचे फायदे मिळणं अशक्य आहे. नाम हे ईश्वराचं, अवतारांचंच घ्यावं नि शक्यतो गुरुमुखातून आलेलं असावं असं शास्त्र आहे. (शास्त्र म्हणजे सायन्स नव्हे.) कुणा अवतारावर आपली श्रद्धा नाही ही गडबड आहे, असते. असावी की नसावी हा वेगळा विषय आहे. असो!

In reply to by प्यारे१

बॅटमॅन गुरुवार, 07/24/2014 - 16:40
कुणा अवतारावर आपली श्रद्धा नाही ही गडबड आहे, असते. असावी की नसावी हा वेगळा विषय आहे.
एकदा अवतारावर श्रद्धा नसणे हीच गडबड म्हटल्यास असावी की नसावी हा वेगळा विषय जरी मानला तरी काय फायदा? अवतारावर श्रद्धा न ठेवणे ही गडबड कशी काय ते आम्हां पामरांना समजावून सांगा बघू हभप.

In reply to by प्यारे१

धन्या गुरुवार, 07/24/2014 - 16:43
बाकी कुणाचंही नाव घेऊन नामस्मरणाचे फायदे मिळणं अशक्य आहे.
वाल्या कोळ्याला मिळाले होते की. राम हे जरी देवाचे नांव असले तरी "मरा" हे देवाचं नांव नाही. तरीही त्याचा उद्धार झालाच की. आणि गंमतीचा भाग म्हणजे तेव्हा राम जन्मलाही नव्हता.

In reply to by धन्या

शिद गुरुवार, 07/24/2014 - 16:48
गंमतीचा भाग म्हणजे तेव्हा राम जन्मलाही नव्हता
एक शंका: राम जन्मा अगोदर पासूनच राम नामाला एवढे महत्व कसं काय? काही कळलं नाही. *unknw*

In reply to by शिद

प्यारे१ गुरुवार, 07/24/2014 - 16:50
त्याला अर्थवाद म्हणतात. ह्याच्या बरोबरच अजामेळाचं उदाहरण देखील सांगितलं जातं. देवाचिये द्वारी उभा 'क्षण' भरी हे देखील अर्थवादाचंच उदाहरण.

In reply to by शिद

बॅटमॅन गुरुवार, 07/24/2014 - 16:57
अगदी अगदी. मीही सुरुवात करू म्हणतोय. सुदैवानं त्यात दोन्ही बाजूनं लोकं बोलतात त्यामुळे प्रवचनकारांप्रमाणे पाहिजे ते तुकडे उचलून लोकांच्या तोंडावर फेकावेत हे उत्तम ;)

In reply to by बॅटमॅन

धन्या गुरुवार, 07/24/2014 - 17:12
हे म्हणजे आय. आय. टी. च्या संगणक विभाग प्रमुखाला एम. एस. सी. आय. टी. चं पुस्तक वाचा म्हणून सांगण्यासारखं झालं राव. :)

In reply to by धन्या

बॅटमॅन गुरुवार, 07/24/2014 - 17:19
होय, पण आमची लायकी किती अन आम्ही बोलावे किती याचा ताळमेळ पाहता शेवटी तेच बोललो झालं. :) लहान तोंडी (कल्पनेनेच, कारण नैतर तोंड फाटून जाईल) मोठा घास घेऊन सांगतो, प्रस्थानत्रयी, त्यातही गीता आणि उपनिषदे मुळातून वाचली तर अतिउत्तम. आय आय टी वाल्यांना हे समजणे अवघड नसावेसे मानण्याचे धार्ष्ट्य करतो आहे.

In reply to by प्यारे१

प्रसाद गोडबोले गुरुवार, 07/24/2014 - 17:26
गीताप्रेसने शांकरभाष्य मराठीत अनुवादीत करुन छापलेले नाहीये ...किमान अजुन तरी ... आम्हाला हिंदीतच वाचावे लागते ... हा सरळ सरळ मराठी भाषिकांवर हिंदी लादण्याचा प्रयत्न आहे .... त्याचा आम्ही तीव्र शव्दात निषेध्द करतो *beee* ( ३ च राहिलेत रे ...४०० वा प्रतिसाद टंकायचा मान मला पाहिजेल यंदा )

In reply to by प्यारे१

बॅटमॅन गुरुवार, 07/24/2014 - 17:27
भाष्य इ. वाचलं तरी 'परमार्थेण न गृह्यतां वचः', कारण शेवटी आचार्यांचा अद्वैतमत प्रस्थापित करायचा अजेंडा होता. अजेंडाविरहित बुकं वाचणं हे सर्वोत्तम.

In reply to by बॅटमॅन

प्यारे१ गुरुवार, 07/24/2014 - 17:32
अद्वैतमत बरोबरच आहे. पण ते फार वरचं टोक आहे. बाकी ह्याच अजेंडा वाल्या शंकराचार्यांनी अत्यंत सुंदर भक्तिस्तोत्रं (द्वैतवादी?) रचली आहेत. अर्थात सिस्टीमचा वापर करुन काम नाही झालं तर सिस्टीम फेल. काम झालं तरी नंतर सोडावीच लागणार. त्यामुळं सिस्टीमचं अवडंबर नको.

In reply to by प्यारे१

बॅटमॅन गुरुवार, 07/24/2014 - 17:36
स्तोत्रे छानच आहेत याबद्दल शंका नाही. संस्कृतात यमक हा फंडा त्यांच्या सोडून अन्य कुणाच्या रचनेत असल्याचे आजवरच्या तुटपुंज्या वाचनातून दिसले नाही. अद्वैतमताबद्दल ज्ञानेश्वरांची 'साडेपंधरेया-सोलेया' इ.इ. कमेंट मस्त आणि एकदम नेमकी आहे. ते एक असोच. बाकी कोण कसलं अवडंबर माजवतंय ते स्वयंस्पष्ट आहेच.

In reply to by प्यारे१

बॅटमॅन गुरुवार, 07/24/2014 - 18:14
सिस्टिमला बळंच फेकून देण्याची व्याख्या मनाप्रमाणे करणं हे तर सर्वांत मोठं अवडंबर. आपल्या मनी काहीएक सिस्टीम असावी, तीच लोकांनी फॉलो नै केली तर भ्यँऽऽऽ! करावे हे मोठेच अवडंबर. ज्यांना जमते त्यांचा हेवा वाटतो खरा. :)

In reply to by बॅटमॅन

प्यारे१ गुरुवार, 07/24/2014 - 19:44
व्हेरीफाईड अ‍ॅण्ड टेस्टेड आहे हो ती. आमचा आग्रह नाही ब्वा! ज्यांनी अनुभव घेतला त्यांचं म्हणणं आहे ते. ते वाचलं आहे का तुम्ही? समजून वाचा बरं. ;)

In reply to by कवितानागेश

प्यारे१ गुरुवार, 07/24/2014 - 19:42
झालं.... जरा एखाद्याचं बरं झालेलं बघवत नाही ह्या लीमाऊला. अज्जिबात भेटू नकोस. पुण्य घेऊन येशील त्यांचं सगळं. नैसर्गिक नियमानुसार जिथं जे नाही तिथं ते येऊन समतोल साधण्याचा प्रयत्न होतो ना? ;)

In reply to by कपिलमुनी

बॅटमॅन गुरुवार, 07/24/2014 - 20:05
मंत्रावेगळा ळॉळ =)) या धाग्यावर ५०० झालेच पाहिजेत. संपादक मंडळी, प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज ब्रेकर नका ना लावू. मिपाच्या गौरवशाली इतिहासात आजवर एकही धागा पञ्चशतकी नै झालेला. तो बहुमान याला घेऊ द्या नं प्लीज! _/\_

संजय क्षीरसागर गुरुवार, 07/24/2014 - 20:44
पहिली गोष्ट, पिरा पूर्वग्रह सोडून वाचू शकली, त्यामुळे तिला नेमका मुद्दा उचलता आला. पूर्वग्रहरहित चित्त हा आकलनातला प्रथम चरण आहे. नवी गोष्ट समजायला सर्व पूर्वधारणा सोडायची तयारी हवी, मग त्या कितीही जिवलग असोत आणि कितीही काळ जपलेल्या असोत. पिरानं हा मुद्दा अचूक पकडला आहे :
लहानपणी जर आपल्याला "मिसळपाव" हा एक देव आहे.. असं सांगितलं असतं.. तर "श्रीराम" हा जप करुन जे साध्य होतं तेच "श्री मिसळपाव" ह्या नामस्मरणाने सुद्धा होईल. एकंदरीत नामस्मरण म्हणजे बाकी गोंधळातुन लक्ष काढुन घेऊन एकाच शब्दावर ते केंद्रित करणे असा प्रकार असावा.. लाखो वेळा तेच घोकल्यावर मेंदुला फटिग येऊन भास होणं शक्य नाही का?
ईश्वर ही प्रत्येकाची अज्ञानमूलक धारणा आहे आणि मंत्र किंवा जपानं त्याप्रत पोहोचू ही तिची उप-धारणा आहे. पहिली व्यर्थ आहे त्यामुळे दुसरीही व्यर्थ आहे. पिराच्या जे लक्षात आलंय, तेच मी चर्चेतल्या प्रथम प्रतिसादात सांगितलं होतं:
यालाच "अजपाजप" असेही म्हणतात. या स्टेजला गेलेली व्यक्ती पूर्णपणे भ्रमिष्ट झालेली असते! मनावरचं नियंत्रण संपूर्णपणे नाहीसं होणं म्हणजे अजपाजप. मनाची बडबड थांबवताच येत नाही. अश्या व्यक्तीचं संपूर्ण अवधान मनानं वेधून घेतलेलं असतं. स्वतःच्या जाणीवेचा रोख ती व्यक्ती हवा तसा वळवायला असमर्थ होते. तिला समोरच्या गोष्टीवर किंवा हाततल्या कामावर, फोकसच करता येत नाही. The person has gone completely mad.
आता जर कुणाला, अध्यात्म नक्की काय आहे समजावून घ्यायचं असेल तर माझा, लेखकाला दिलेला हा प्रतिसाद वाचा :
अनीलजी, तुम्हाला (आणि सर्वांना) उपयोग व्हावा म्हणून अंतिम वस्तुस्थिती विषद करुन, सांगता करतो. शांतता ही प्रथम आणि अंतिम आहे. शांती, ईश्वराच्या स्वरुपाचा एक महत्तम पैलू आहे कारण ईश्वर अनुच्चारणीय आहे. त्याचं व्यापकत्त्व कोणत्याही मंत्रात, शब्दात किंवा ध्वनीत बसू शकत नाही. त्यामुळेच तर जगातल्या सर्व ग्रंथांची सांगता, `ॐ शांती: शांती: शांती:' अशी केली जाते. मन हा ध्वनी आहे आणि तो शांत झाल्याशिवाय आपण, त्या चिरस्थायी आणि आदिम शांतीचा अनुभव घेऊ शकत नाही. थोडक्यात, वैश्विक शांती आणि आपलं मूळ स्वरुप एकच आहे, हा आपला अनुभव होऊ शकत नाही. तस्मात जगातला कोणताही मंत्र कुणालाही शांततेप्रत नेऊ शकत नाही. वास्तविकात मंत्र किंवा मनाची अविरत बडबड हाच स्वरुपाचा उलगडा होण्यातला एकमेव अडथळा आहे. त्यामुळे एकीकडे मन संपूर्ण सक्रिय करत (वैखारी, मध्यमा, पश्यंती), ते सर्वस्वी नियंत्रणा बाहेर गेल्यावर (परा), शांत्योपलब्धी असंभव आहे. It is impossible to get connected to oneself. One can never be at peace. खरं तर कोणताही शब्द उमटण्यापूर्वी शांतता आहे. त्यामुळे संस्कृत काय की जगतली कोणतीही भाषा काय केवळ व्यक्तींमधल्या संभाषणाची सोय आहे. तुम्हाला संस्कृत, प्राकृत, इंग्रजी, फ्रेंच कळण्याची काहीही गरज नाही. सर्व संस्कृत आणि तथाकथित धार्मिक पांडित्य व्यर्थ आहे आणि कोणताही ग्रंथ समजण्याची काहीही गरज नाही. तुम्हाला, तुमच्या आप्तांशी संवाद साधता येणारी भाषा, पुरेशी आहे. शांतता हा अनिर्मित मंत्र आहे आणि तो तुम्हाला जन्मतःच उपलब्ध आहे. या आकलनासाठी, शहरी धकाधकीच्या जीवनात, सारं आयुष्य पणाला लावून, जगातल्या सर्व साधनांचा अभ्यास मला करावा लागलायं. तुम्ही निसर्गाच्या निकट आहात त्यामुळे नशीबावान आहात. भाषा आणि पांडित्याविषयी तुमचा सर्व न्यूनगंड झुगारुन द्या. अत्यंत थोडक्यात, आदिम वैश्विक शांतता, मनाच्या बिंदूवर प्रस्थपित होणं ही सिद्धत्वाची स्थिती आहे. अशा व्यक्तीची मनावर संपूर्ण हुकूमत असते. अशी व्यक्ती हवं तेव्हा मनाचा उपयोग करु शकते आणि इतर वेळी त्या आदिम शांततेशी एकरुपतेचा आनंद घेते. शांतता हीच ईश्वर आहे आणि तिच्याशी समरुपता तुम्हाला शांत करते, इतका सोपा मथितार्थ आहे.
वरचा प्रतिसाद हे माझ्या अध्यात्मिक आकलनाचं सार आहे. ते तुम्हाला ही कळणं विषेश अवघड नाही. कारण ती अदिम शांतता आणि आपण एकच आहोत. शांतता एकच आणि अविभाज्य असल्यानं तिच्यासाठी प्रयत्न करणं हाच ती गवसण्यातला अडथळा आहे. हे एकदा समजलं की मग तुम्ही देखिल तथाकथित देव, कर्मकांड, जपजाप्य यातून सर्वस्वी मोकळे होऊन स्वच्छंद जगू शकता. फक्त, पूर्वग्रह सोडून शांतपणे वाचता यायला हवं!

In reply to by संजय क्षीरसागर

नानासाहेब नेफळे गुरुवार, 07/24/2014 - 20:59
+१०००००००००००००००००००००००००००००००००००००००