मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रा. स्व. संघाची वैचारीक नसबंदी !

राजु भारतीय · · जनातलं, मनातलं
माझी पार्श्वभूमी : १) शाखेत गेला नाही तर रात्री जेवेण नाही अशा गल्लीत, वाड्यात, वातावरणात जन्म आणि बालपण. २) वयाच्या नवव्या वर्षापासून शाखेत. नंतर महाविद्यालयात व्यावसाईक शिक्षण घेताना वसतिगृहात रहाताना कॅम्पस वर शाखा सुरु केली. नियमित चाळीस तरुणांची शाखा चालवली. ३) संघ योजनेतून परिवारातल्या एका संघटनेची मोठी जबाबदारी वयाच्या एकोणीसाव्या वर्षी दिली गेली. सुरुवातीला जिल्हा स्तरावर नेतृत्व करून त्या जिल्ह्यात नसलेलं काम उभे केलं आणि दीड वर्षात प्रांतस्तरीय ( राज्यस्तरीय ) जबाबदारी आली, नंतर राष्ट्रीय. ४) स्थानिक, जिल्हा, प्रांत आणि राष्ट्रीय स्तरावरील बैठका, आतल्या गोटातल्या बैठका, अभ्यासवर्ग, चिंतन शिबिरे, बौद्धिके यांना नियमित अपेक्षित आणि उपस्थिती. ५) स्थानिक ते राष्ट्रीय स्तरावरील अधिकारी आणि नेते यांच्याशी परिचय मैत्री संवाद पत्रव्यवहार वगैरे . ६) सध्या संघ आणि परिवारापासून लांब. राम मंदिर हे आंदोलन अनावश्यक असून देशाचा घात करणारे आहे असा सुरुवाती पासून राष्ट्रीय अधिका-याशी मतभेद होता. बाबरी उध्वस्त करण्याने देशाचे अपरिमित नुकसान झाले अशी भावना- जे सत्य आहे. संघाची ती अत्यंत क्रूर- केवळ-राजकीय खेळी होती. काम करत असताना बरेच न पटणारे मुद्दे येत होते. पण सगळे आपल्याला वाटते ते तसेच व्हावे असे नव्हे - असे स्वत:ला समजावत पुढे गेलो …. राम मंदिर हे कधीच राष्ट्रीय आंदोलन नव्हते आणि नाही. या देशातल्या समस्त हिंदूंची ती भावना नव्हे - काही लोकांची असेल. सद्य विषय : अलीकडे संघ अधिका-यांनी हिंदुनी तीन मुले होऊ द्यावीत अशी व्यक्त केलेली विधाने. संघाने भारता मध्ये आधीच एक दुभंग निर्माण केलाय - हिंदू आणि अन्य असा. त्या दुभंगला खत पाणी घालण्यासाठी अशी विधाने आणि आचरण संघ करत असतो. लव्ह जिहाद वगैरे.दुभंग हे राष्ट्रीय पाप आहे. सामान्य स्वयंसेवकांच्या डोक्यात, मनात, रक्तात हा भेद इतका पक्का रुजलाय की त्यांना आपण करू तीच देशभक्ती, आपण करू तेच सामाजिक काम आणि आपले सामाजिक प्रकल्प हेच फक्त देश पुढे ढकलण्याचे इंधन आहे - असा पक्का समज आहे. या विषयावर त्यांना अन्य कांही ऐकणे सोसवतच नाही. अन्य महत्वाचे : या देशाला संघाची / संघ कामाची आवश्यकताच नाही. संघ या देशाच्या प्रगती मधला एक मोठा अडसर आहे.- कारण संघाकडून प्रस्थापित राजकीय व्यवस्थे मध्ये दोष आहेत हे संमोहन पद्धतीने पटवून देऊन समांतर व्यवस्था उभी करण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातो. वास्तविक आवश्यकता आहे ती लोकशिक्षणातून प्रस्थापित व्यवस्थे मध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या प्रयत्नाची. समांतर व्यवस्थेमधले संघाचे सामाजिक, राजकीय ( भाजप ), शैक्षणिक, आर्थिक प्रकल्प हे तद्दन सत्ता केन्द्री, मनुष्य केन्द्री आणि बहुतांशी आतबट्ट्यातले आहेत. ज्या सामाजिक प्रकल्पांचा मुखवटा धारण करून संघ आपला ढोल बडवतो त्या सामाजिक प्रकल्पांचे वेगवेळ्या निकषांवर ऑडीट केल्यास सत्य समोर येऊ शकते. संघाची शक्ती : प्रत्यक्ष काम न करणारे, कट्ट्यावर बसून मत व्यक्त करणारे, कधीतरी उत्सवाला जाणारे, एखाद्या संघ प्रकल्पाला भेट देऊन आलेले म्हणजे वरवरचे लोक ही आणि हीच संघाची पहिली मोठी शक्ती आहे. या सर्वांचा संघ हा लिळा चरीत्रातल्या आंधळे आणि हत्ती यांच्या कथे सारखा आहे. कुणा शेपूट, कुणाला सोंड हे अवयवच हत्ती आहे असे वाटते. संघाची दुसरी शक्ती संघाचे अत्यंत भाबडे, फार विचार न करू शकणारे पण पोपटपंची करणारे कार्यकर्ते / स्वयंसेवक आहेत. ही जनता प्रेमाचा संसर्ग झालेल्या टीनेजर सारखी असते. स्वत:चा एकवेळ "एक दुजे के लिये " होऊ देतील पण काही ऐकून घेणार नाहीत. अशी जनता आसाराम बापूंच्या कळपात पण असते आणि अन्य ब-याच ठिकाणी. संघाची तिसरी शक्ती आहे ते प्रत्यक्ष संघात आणि संपूर्ण संघ परिवारात असणारी भोंदू मंडळी किंवा सत्ता केंद्रे. प्रचंड मोठ्यावर भोंदुगिरी येथे चालते. ज्याच्यावर आपली श्रद्धा आहे, ज्यांच्या बौद्धीकांनी आपण आपले घरदार सोडून राष्ट्राय स्वाहा करायला निघालो आहोत त्याचे पाय मातीचे आहेत हे भाबड्या जमातीला कधीच कळत नाही. भाजपच नव्हे सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक प्रकल्पांमध्ये ही सत्ता केंद्रे आहेत, भोंदुगिरी आहे आणि विचारद्रोही लोक आहेत. भारतीय समाज एकसंधच असावा अशी माझी प्रामाणिक तळमळ आहे. हिंदू आणि मुसलमान या केवळ राजकीय स्वार्थासाठी पाडलेल्या रेषा आहेत - विशेषत: १९४७ नंतर. त्या पुसल्या जाऊ शकतात आणि त्या पुसल्या पाहिजेत. ४७ च्या आधीच्या जखमा वखवखत आणि भळभळत ठेवल्या जातात, मुद्दाम - त्या मागे स्वार्थ आहे, कपट आहे आणि देशाचे अतोनात नुकसान आहे.

वाचने 42173 वाचनखूण प्रतिक्रिया 275

बलि Wed, 10/30/2013 - 20:12
हिंदू आणि मुसलमान या केवळ राजकीय स्वार्थासाठी पाडलेल्या रेषा आहेत - विशेषत: १९४७ नंतर. त्या पुसल्या जाऊ शकतात आणि त्या पुसल्या पाहिजेत
यासाठी समाजातील सर्वच स्तरातील, धर्मातील लोकांनी पुढाकार घ्यायला हवा.

In reply to by बलि

राजु भारतीय गुरुवार, 10/31/2013 - 18:03
या बाबतीत सर्वांनी पुढाकार घ्यावा हे मान्यच आहे. पण तो एक पुढचा टप्पा आहे. पहिला टप्पा हा या रेषा कृत्रिम आणि स्वार्थी आहेत आणि त्या पुसल्या पाहिजेत याची जाणीव सर्व समाजाला व्हावी लागेल, त्याही आधी दुभंग निर्माण करण्याचे प्रयत्न थांबले पाहिजेत. धन्यवाद.

In reply to by श्रीगुरुजी

राजु भारतीय Mon, 11/04/2013 - 09:49
४७ नन्तर तर या भेदांची गरज नव्हती. मुसलमानांचे लांगुलचालन करणं कॉंग्रेसने चालू ठेव्लं. मुसलमानांचे तुष्टीकरण ईंग्रजाकडून मिळालेल्या देणगी सारखं त्यांच्या स्वार्थासाठी,मतांच्या रा़जकारणासाठी चालु राहिलं, पण संघाने या काँग्रेसच्या खेळीला सामाजीक उत्तर द्यायचे सोडून राजकीय उत्तर द्यायची व्यवस्था केली - जनसंघाची स्थापना करुन ! संघ ही राजकीय संघटना नव्हती. इंग्रजांच्या, काँग्रेसच्या क्रुपेने निर्माण झालेला भेदाच्या आगीवर संघ एका बाजूला तेल ओतुन आपली ही पोळी भाजुन घेतोय. खरेतर तो भेद जिवंत ठेवायचाच सातत्याने प्रयत्न करतोय !गावागावात,तुमच्या आजुबाजुला असलेल्या मुसलमानांशी तुमचं वैयक्तिक भांड्ण असते का ? वैर असते का - ते मुसलमान आहेत म्हणून ?

In reply to by राजु भारतीय

इष्टुर फाकडा Mon, 11/04/2013 - 18:29
" पण संघाने या काँग्रेसच्या खेळीला सामाजीक उत्तर द्यायचे सोडून राजकीय उत्तर द्यायची व्यवस्था केली - जनसंघाची स्थापना करुन ! संघ ही राजकीय संघटना नव्हती." काय बोलतो भाऊ तू ? जरा दोन वाक्यात साम्य असुदेकी ! किती कोलांट्या माराव्या लागतात ना…. उगी असुदे :)

In reply to by प्रकाश घाटपांडे

विजुभाऊ गुरुवार, 10/31/2013 - 12:35
संघ कार्यकर्ते आणि वैचारीक गोष्टींचा संबन्ध असतोच असे नाही. तिथे विचारांची फक्त देवाण होते घेवाणीला फक्त काहीनाच परवानगी असते. ( एकेकाळी शाखेत जाणारा....विजुभाऊ)

In reply to by प्रकाश घाटपांडे

राजु भारतीय गुरुवार, 10/31/2013 - 18:08
वैचारिक बदलाचा प्रवास तपशील म्हणून फार महत्वाचा नाही आणि या लेखात विषयाचा रोख पहाता ते फार महत्वाचे नाही. राम मंदिर ज्या पद्धतीने प्रसवल गेलं त्या प्रक्रियेचा आघात प्रचंड होता ज्यामुळे बाहेर पडण्याचे धाडस केले, हे स्पष्ट केले आहेच. अर्थात हा ही निर्णय अचानक घेता येणे शक्य नव्हते. धन्यवाद.

In reply to by राजु भारतीय

मुक्त विहारि गुरुवार, 10/31/2013 - 18:34
मुद्दा जर फक्त राम मंदिराचाच असेल तर, गोष्ट निराळी आहे. केवळ ह्या एका कारणाने जर तुम्ही सगळ्या संघाला आणि स्वयंसेवकांना आणि त्यांच्या कार्यपद्धतीला दोषी समजत असाल तर ते चूकीचे आहे. तो निर्णय राष्ट्रीय पातळीवरुन घेतल्या गेला होता.कुठल्याही पक्षाच्या कार्यकारणीत एकदा निर्णय घेतला की , एक तर तो पाळावा किंवा गप्प बसावे. बरे दुसरी गोष्ट अशी की, तुम्हाला राम मंदिराचा निर्णय पटला नाही, मग तुम्हाला नंतर झालेले बाँब-स्फोट ते कसाब व्हाया गोध्रा हा प्रवास पण पटला नसेलच.तुम्ही कधी त्यावर आपले विचार का नाही मांडले?

In reply to by मुक्त विहारि

राजु भारतीय गुरुवार, 10/31/2013 - 18:51
वरच्या विधानावरून मूवी तुमचा पक्का आबा झालाय ! २६/११ नंतर कुणीतरी एवढ्या मोठ्या शहरात असे छोटे मोठे कारनामे तर होतच असतात असे म्हणाले होते, आठवते ना ? अहो राम मंदिर हे फक्त मंदिरासाठी आंदोलन नव्हते - किमान - शहाण्या विचारी मनांनी तरी एवढे भाबडे असू नये. बाबरी पडल्यानंतर या देशाची संपूर्ण वैचारिक फाळणी झाली आहे - विनाकारण ! या देशाचे समाजकारण धर्माच्या पलीकडे जाण्याची गरज होती आणि आहे त्या प्रक्रिये मध्ये भारतीय समाज शंभर वर्षांनी मागे गेलाय !!! आता आधी हा खड्डा भरून काढावा लागेल मग रस्त्यातले खड्डे बुजतील, म्हणजे विकास सुरु करायला आपण विनाकारण मागे पडलोय ! ही फाळणी करण्याची स्वतंत्र भारतात गरज काय होती ? आणि त्या नंतरचे आपले प्रश्न हे आपण ही मूवी संसर्गित / बाधीत आहात याचा दाखला देते ! कसाब म्हणजे पाकिस्तानची कारवाई हा काय मुसलमानांचा हिंदुंवर हल्ला होता ? कमाल आहे !! गोधरा, १९९३ चे स्फोट हे बाबरी पाडल्याच्या कारणावरून निर्माण झालेल्या फाळणीची विषारी फळे आहेत त्याचा जाब संघाला विचारा !

In reply to by राजु भारतीय

मुक्त विहारि गुरुवार, 10/31/2013 - 19:35
प्रथमतः, माझे नांव मुक्त विहारी (किंवा मुवि) असेच आहे.मला कुठलीही उपाधी किंवा इतर राजकीय नेत्यांचे नांव देवू नका. दुसरे..."अहो राम मंदिर हे फक्त मंदिरासाठी आंदोलन नव्हते." निदान मला तरी ते फक्त त्यासाठीच आहे असे वाटते. तिसरे... "बाबरी पडल्यानंतर या देशाची संपूर्ण वैचारिक फाळणी झाली आहे." म्हणजे त्याआधी न्ह्वती असे आहे का? चौथे..."या देशाचे समाजकारण धर्माच्या पलीकडे जाण्याची गरज होती आणि आहे त्या प्रक्रिये मध्ये भारतीय समाज शंभर वर्षांनी मागे गेलाय !!!" हे फक्त एका राम मंदिरामुळेच का? पाचवे... "कसाब म्हणजे पाकिस्तानची कारवाई.हा काय मुसलमानांचा हिंदुंवर हल्ला होता?" हा "दार-उल-हरब" वरचा हल्ला होता.आता तुम्हाला दार-उल-इस्लाम आणि दार उल हरब माहीत नसेल तर गोष्टच वेगळी.. सहावे..."गोधरा, १९९३चे स्फोट हे बाबरी पाडल्याच्या कारणावरून निर्माण झालेल्या फाळणीची विषारी फळे आहेत त्याचा जाब संघाला विचारा !" अच्छा म्हणजे त्याआधी हिंदू-मुस्लीम दंगे होतच न्हवते असे तुम्हाला म्हणायचे आहे का?

In reply to by राजु भारतीय

श्रीगुरुजी गुरुवार, 10/31/2013 - 21:04
>>> अहो राम मंदिर हे फक्त मंदिरासाठी आंदोलन नव्हते - किमान - शहाण्या विचारी मनांनी तरी एवढे भाबडे असू नये. मग अजून कशासाठी होते? >>> बाबरी पडल्यानंतर या देशाची संपूर्ण वैचारिक फाळणी झाली आहे - विनाकारण ! या देशाचे समाजकारण धर्माच्या पलीकडे जाण्याची गरज होती आणि आहे त्या प्रक्रिये मध्ये भारतीय समाज शंभर वर्षांनी मागे गेलाय !!! शहाबानो खटल्यातील निकाल राजीव गांधींनी पाशवी बहुमताच्या जोरावर फिरवून कोट्यावधी मुस्लिम स्त्रियांना म्हणजेच पर्यायाने भारतीय समाजाला किमान ५०० वर्षे मागे नेले त्याचे काय? अगदी १५ दिवसांपूर्वी कोणत्यातरी साधूच्या स्वप्नावर अंधविश्वास ठेवून उन्नानमध्ये उत्खनन करण्याचा मूर्खपणा करून आणि त्यासाठी प्रचंड खर्च करून भारताला अनेक शतके मागे नेले त्याचे काय? धर्माच्या आधारावर वेगळे कायदे करून भारतीय समाजात कायमची फूट पाडून ठेवली त्याचे काय? या देशाची वैचारिक फाळणी ८ व्या शतकातच झाली होती व ती नंतर ब्रिटिशांनी व त्यानंतर काँग्रेसने अजून रूंदावली. बाबरी मशीद पाडण्याचा व या फाळणीचा काहीही संबंध नाही. >>> आता आधी हा खड्डा भरून काढावा लागेल मग रस्त्यातले खड्डे बुजतील, म्हणजे विकास सुरु करायला आपण विनाकारण मागे पडलोय ! सर्वात धार्मिक आधारावर केलेल्या वेगळ्या कायद्यांमुळे व एका विशिष्ट धर्मातील लोकांचे धर्माच्या आधारावर सुरू असलेले फाजील लाडांमुळे तयार झालेल्या दर्‍या बुजविण्याची गरज आहे. >>> ही फाळणी करण्याची स्वतंत्र भारतात गरज काय होती ? धार्मिक आधारावर वेगळे कायदे करून दोन्ही समाजात कायमस्वरूपी दरी निर्माण करण्याची काय गरज होती? >>> कसाब म्हणजे पाकिस्तानची कारवाई हा काय मुसलमानांचा हिंदुंवर हल्ला होता ? अर्थातच >>> कमाल आहे !! गोधरा, १९९३ चे स्फोट हे बाबरी पाडल्याच्या कारणावरून निर्माण झालेल्या फाळणीची विषारी फळे आहेत त्याचा जाब संघाला विचारा ! आपण पूर्वी संघात असूनही आपले इतके अज्ञान कसे? गोध्रा किंवा १९९३ पूर्वीदेखील भारतात अनेक दंगली व बॉम्बस्फोट झालेल्या आहेत. ही कोणत्या घटनेची विषारी फळे होती? १९२१ मधील केरळमधील मोपल्यांची दंगल तर संघाच्या जन्माआधी झाली होती. १९४७ च्या दंगली, १९६८ ची भिवंडीची दंगल, १९८४ ची मालेगाव-भिवंडीची दंगल, १९८० पासून १९९२ पर्यंत होत असलेले बॉम्बस्फोट हे काय बाबरीमशीद्-गोध्रा प्रकरणामुळे झाले का? आणि गोध्रा येथे रेल्वेचा डबा पेटवून ६० कारसेवकांना जाळले नसते तर गुजरातची दंगल झाली असती का?

In reply to by राजु भारतीय

४७ नंतर ९१ पर्यंत ज्या अनेक धार्मिक दंगली झाल्या त्या काय राममंदिराच्या मुळे झालेल्या वैचारीक फाळणीमुळे (म्हणजे खरेतर वैचारीक फाळणी वगैरे काही न झालेल्या. फक्त काही लोकाना अशी कोल्हेकुई कायम करायची असते) झाल्या होत्या का? झालेच १८९२-९३ साली झालेल्या दंगली ही तथाकथित वैचारिक फाळणी (असेलच तर!) अनादि (म्हणजे इस्लामचे आक्रमण सुरु झाल्यापासूनची) अनंत आहे असे तुम्हाला वाटत नसेल तर खुषाल तुम्ही स्वतःशीच खोटे बोलत आहात असे समजा.

In reply to by राजु भारतीय

श्रीगुरुजी गुरुवार, 10/31/2013 - 20:14
समस्या जितकी जुनी तितकी ती सोडविणे त्रासदायक! श्रीरामजन्मभूमीवरील मूळचे मंदीर उध्वस्त करून तिथे मशीद बांधली ही संतापजनक व दु:खद घटना ४५० वर्षांहून अधिक जुनी. स्वातंत्र्यानंतरची ४५ वर्षे सुद्धा ही समस्या सोडविण्याऐवजी लोंबकळत ठेवली गेली. त्यामुळे समस्येच्या उत्तराचा आघात प्रचंड असणारच.

आदिजोशी Wed, 10/30/2013 - 20:32
बरेच मुद्दे मांडलेत, स्पष्टीकरण एकाचेही नाही. उदा: ४७ च्या आधीच्या जखमा भळभळत ठेवण्यामागे आज संघाचा काय स्वार्थ आहे? लव्ह जिहाद संघाची चाल आहे का? देशातल्या समस्त हिंदुंची भावना तुम्हाला कशी काय कळली? इत्यादि इत्यादि. आणि हो, नसबंदी बद्दलही आम्हाला कळेल असं लिहा.

In reply to by आदिजोशी

राजु भारतीय गुरुवार, 10/31/2013 - 18:28
माफ करा, स्पष्टीकरण देण्याच्या मुद्द्यांची जंत्री आपण तयार केलीत तर एकेक मुद्दा पटलावर घेता येईल. १९५० साली घटनेने हे स्वतंत्र राष्ट्र आहे असे घोषित करताना आता इथे कुणी हिंदू आणि मुसलमान नाही, इथे सगळे भारतीय म्हणून राहतील असे स्पष्ट केले आहे. या स्पष्टीकारणामध्ये प्रचंड अर्थ आहे. हे उपासना पद्धतीवर आधारित भेद वैयक्तिक स्वरूपात जपता येतील पण त्याचा राजकीय वा सामाजिक लाभ उठवता येणार नाही आणि कायद्याने तसा भेद करता येणार नाही. त्यामुळे तोवर असणारे मुस्लिम राखीव मतदार संघ बंद झाले. ब्रिटीश कालीन संसदे मध्ये रीतसर मुसलमान आणि हिंदू यांच्या टक्केवारी नुसार जागा भरल्या जाणा-याची पद्धत - कायद्याने - स्वतंत्र भारतात बंद झाली. मग आता हिंदूंचे संघटन " हिंदू " म्हणून करण्याचे कारण काय ? १९२५ ते १९४७ त्या संघटना करण्याला काही अर्थ होता. कारण इंग्रज सरकार तो भेद जिवंत ठेऊन आपली वाट सुकर करत होता. आपल्याच म्हणजे भारतीयांचे सरकार आल्यावर हिंदू म्हणून घाबरण्याचे काही कारण नव्हते आज ही नाही ! तरी देखील संघ हिंदू संघटीत झाला पाहिजे असे म्हणतो, याला स्वार्थ सोडून दुसरे कiरणच नाही. १९४७ नंतर राम मंदिरा सारखे निरर्थक आंदोलन सोडले तर एका तरी राजकीय वा सामाजिक विषयासाठी एकत्रित हिंदू म्हणून दाद मागावी लागली आहे का ? दुसरे - लव्ह जिहाद ची किती प्रकरणे तक्रारी च्या स्वरूपात अखिल भारतात पोलिसांकडे दाखल झाली आहेत ? मुसलमान आणि हिंदू व्यक्तींमधला सरसकट विवाह वा प्रेम हे लव्ह जिहादच आहे असा संघवाल्यांचा सरसकट दावा आहे ! तसा प्रचार रीतसर ते करतात याचे अनेक पुरावे आहेत. ते इथे देण्यासारखे नाहीत.

In reply to by राजु भारतीय

अनिरुद्ध प गुरुवार, 10/31/2013 - 18:55
आपण काय बोलत आहात हे आपल्याला तरि समजत आहे का?मला तरी हा आपला प्रसिद्धी मिळवण्याचा सवन्ग मार्ग वाटत आहे.

In reply to by अनिरुद्ध प

राजु भारतीय गुरुवार, 10/31/2013 - 18:59
अनिरूध्द, आपली शंका काय आहे ? हमरीतुमरव्र्र नका येऊ. चर्चा करु. पटलं तर ठिक नाही तर सोडून द्या !!

In reply to by राजु भारतीय

राजु भारतीय गुरुवार, 10/31/2013 - 19:10
… आणखीन एक ! इथे मला प्रसिद्धी कशी मिळेल ? वा मिळते ? खच्चुन हजारेक मिपा सदस्यांमध्ये प्रसिद्धी साठी म्हणताय का ? पण असे काही म्हणजे तुमच्या लेखी सवंग वगैरे लिहिण्याने हि प्रसिद्धी कशी काय बुवा मिळते ? आणि मग त्या प्रसिद्धीचे लोक इथे काय करतात ? नोकरी मिळते ? मिपाच्या निवडणुका होतात ? की अवार्ड फंक्शन असते आणि अवार्ड मिळते ? की माझे होर्डिंग लावले जाते ? म्हणजे नेमके मिळते काय - असा तुमचा दावा आहे ? मिपा मध्ये लेखन करण्याचा तुमचा वा अन्य लोकांचा प्रसिद्धी मिळवणे हा हि एक हेतू असतो का ? पण पुन्हा तेच - या प्रसिद्धीतून सदस्यांना काय काय लाभ होतात ? याचे उत्तर तुम्ही द्यायला माझ्या पेक्षा लायक आहात कारण आपण मला मिपावर सिनियर आहात ! चला उत्तर द्या !!

In reply to by राजु भारतीय

अनिरुद्ध प गुरुवार, 10/31/2013 - 19:55
मी मिपा वर आपल्यापेक्षा सिनिअर वगैरे काही नाही,किवा आपण समवयस्क (मिपावर) आहोत असे समजु,सवन्ग प्रसिद्धी असे वाटण्याचे एक कारण म्हणजे आपण आजपर्यन्त ईतक्या दिवसात कुठल्याही धाग्यावर एकही प्रतिकिया लिहिलेली दिसली नाही,तसेच आपण हा नवा धागा सुरु केला तो सुद्धा सन्घ परिवार आणि हिन्दुत्व या विषयावर्,कारण हल्ली एक फेशनच झाली आहे सन्घ परिवार,मोदी हिन्दुत्व या वर टिका करुन झटपट प्रसिद्धी मिळवण्याची जी माझ्यामते सवंग आहे.

In reply to by राजु भारतीय

पिशी अबोली Wed, 11/06/2013 - 18:16
का बरे खोटा ?
कारण तुम्ही करुन दिलेला परिचय हा संघपद्धतीनुसार नाही... तसा करुन देण्याचे प्रश्न तुम्ही सोयीस्कररित्या टाळत आहात...
मी जर मझा परिचय करुन नसता दिला तर मला संघाविषयी काही माहिती नाही अशी ओरड झाली असती.
तुम्ही तुमची मतं प्रामाणिकपणे मांडली असती तर त्यांची कदर झाली असती.. कातडे पांघरुन 'मी कळपातला' असे दाखवण्याच्या प्रयत्नाने काहीच साध्य झाले नाही...

In reply to by पिशी अबोली

राजु भारतीय Wed, 11/06/2013 - 19:02
संघ पद्धतीने परिचय आपण कसा करता ? तो कसा करतात ? परिचय करून देण्याची पद्धत कुठे आणि संघातल्या कुणी लिहून ठेविली आहे ? आपण कोणत्या अभ्यासवर्गात परिचय करून देण्याचे प्रशिक्षण घेतले ? आपल्या गावातले भारतीय मजदूर संघाचे कार्यकर्ते किंवा भाजप चे कार्यकर्ते किंवा विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते किंवा संस्कार भारती चे कार्यकर्ते तुम्ही म्हणता तसाच परिचय करून देतात का ? ( बाय द वे ; भारतीय मजदूर संघाचा कार्यकर्ता पाहिलाय का कधी ? ) आणि पद्धतीने परिचय करून न देणा-यांना संघातून काढून टाकण्याचा अधिकार हल्ली पु. मोहनजीनि आपल्याला दिलाय का ? आणि शेवटी समजा ज्या कुठल्या स्तैल ला आपण संघ स्तैल परिचय म्हणता तो इथे करून द्यायला मिपा हे साप्ताहिक विवेक आहे का, म्हणजे संघ परिवारातील काही बाही ? मुद्दाचे बोला हो, मी खरा की खोटा याचा काय सबंध ? संपादित कृपया वैयक्तिक शेरेबाजी करू नये.: संपादक मंडळ

In reply to by राजु भारतीय

पिशी अबोली Wed, 11/06/2013 - 21:03
बस बस बस... थँक्यू... :) इथे अनेक संघाशी संबंध आलेले लोक आहेत... तुमची ऑथेंटिसिटी की काय म्हणतात ती चेक करायची होती... ती करवून दिलीत... और क्या चाहिये... :)
मी खरा की खोटा याचा काय सबंध ?
अहो चिडताय काय असे? तुमचा धागा आहे...त्यात तुम्ही बरंच काहीबाही सांगत आहात... गुरूसुद्धा पारखून घ्यावा म्हणतात... तुमचे विचार पटवून घेण्याआधी तुम्ही खरे की खोटे ते तपासायला नको का?

In reply to by पिशी अबोली

राजु भारतीय Wed, 11/06/2013 - 22:28
वंदनीय पिशी अबोली ताई , नमस्कार , आता - घडाभर तेल संपले असेल तर - मुळ मुद्द्यांवर आपले मत प्रदर्शन करून आम्हाला उपकृत कराल का ? आणि मी चिडत वेगैरे नाही हो . आणि चिडलो असतो तर संपादक मंडळाला मी ही तक्रार केलीच असती ना !.

In reply to by राजु भारतीय

इष्टुर फाकडा गुरुवार, 10/31/2013 - 19:47
मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाबाबत तुमचे काय मत आहे ? समान नागरी कायदा आला पाहिजे का नको ? या कायद्याला संघाने कधी विरोध केला? राम मंदिराबाबत सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे. तो वाचा आणि सांगा सुप्रीम कोर्ट कम्युनल आहे का ?

In reply to by इष्टुर फाकडा

मुक्त विहारि गुरुवार, 10/31/2013 - 20:17
"मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाबाबत तुमचे काय मत आहे ? समान नागरी कायदा आला पाहिजे का नको ? या कायद्याला संघाने कधी विरोध केला?राम मंदिराबाबत सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे. तो वाचा आणि सांगा सुप्रीम कोर्ट कम्युनल आहे का ?" जावु दे... आधी बघावे गुगलून, अडल्यास बघावे विकीला हाच आमचा मार्ग एकला

In reply to by बिपिन कार्यकर्ते

प्यारे१ Wed, 10/30/2013 - 20:43
३०० + होतील ही! एकाच ग्राऊंडवर किती वेळा खेळायचं राव? राजु भारतीय यांना शुभेच्छा. तुमचा काळ कधीचा हो?

प्रभाकर पेठकर Wed, 10/30/2013 - 20:51
रा. स्व. संघाचा एके काळचा माफक सदस्य आहे मी. नुसताच स्वयंसेवक. गल्लीस्तरावरही कांही कार्य केलेले नाही. त्यामुळे कांही भाष्य करण्याची योग्यता नाही. वाचत राहीन. ज्या उद्देशाने धागा काढला आहे तो सफल होईल असे वाटते आहे.

In reply to by बाबा पाटील

राजु भारतीय गुरुवार, 10/31/2013 - 18:37
अळीचे फुलपाखरू झाल्यावर फुलपाखरू सूर्याजी पिसाळ होते का ? वाल्याचा वाल्मिकी होतो तेव्हा वाल्मिकी सूर्याजी पिसाळ ठरतो का ? फुलनदेवी माणसात येण्यासाठी डाकूगिरी सोडते तेव्हा ती डाकूगिरीशी गद्दारी करते का ? नक्षलवादी सामान्य नागरिक म्हणून जगण्यासाठी शरण येतात तेव्हा त्यांना पिसाळ म्हणतात का ? पिसाळ कोण प्रवाहातले कोण, बाबा ?

In reply to by राजु भारतीय

मुक्त विहारि गुरुवार, 10/31/2013 - 20:50
"अळीचे फुलपाखरू झाल्यावर फुलपाखरू सूर्याजी पिसाळ होते का? वाल्याचा वाल्मिकी होतो तेव्हा वाल्मिकी सूर्याजी पिसाळ ठरतो का?" वरील दोन्ही उदाहरणे ही स्वतःच स्वतःची उत्क्रांती करण्याचा मार्ग आहे.अळी किंवा वाल्मिकी हे कुठल्याही सामाजिक कळपाचे सदस्य न्हवते. "फुलनदेवी माणसात येण्यासाठी डाकूगिरी सोडते तेव्हा ती डाकूगिरीशी गद्दारी करते का?" तिने डाकूगिरी का सोडली? तर तिला जिवंत रहायचे होते.संधी मिळताच तिचा खून झालाच. "नक्षलवादी सामान्य नागरिक म्हणून जगण्यासाठी शरण येतात तेव्हा त्यांना पिसाळ म्हणतात का?" संघाची तुलना फक्त संघा बरोबरच करता येते.तुम्ही निदान उदाहरण तरी संघाला शोभेल असे देत जा. "पिसाळ कोण प्रवाहातले कोण, बाबा ?" आता तुम्हीच सांगा पिसाळ कोण ते......मला तर तुम्ही खरोकरच संघात होतात का? असा प्रश्र्न पडला आहे.कारण ज्याला संघाची स्थापना का आणि कशी झाली? आणि त्यानंतर ५/६ वर्षांतच त्याचे परीणाम काय झाले? हे माहीत असलेला स्वयंसेवक असा धागा काढणार नाही.

सोत्रि Wed, 10/30/2013 - 20:59
PopCorn - ('चड्डी' सरसावून बसलेला) सोकाजी

मुक्त विहारि Wed, 10/30/2013 - 21:36
ज्या पोटतिडीकेने तुम्ही लिहीले आहे त्याच पोट तिडीकेने इथे कधीच खालील गोष्टीची चर्चा आपल्या मुस्लीम बांधवांनी केली नाही. १. समान नागरी कायदा. २. आझाद मैदान निषेध. ३. मुझ्झफर नगरचा निषेध. ४. घुसखोर बांगला-देशींचा (मग तो हिंदू असो की मुसलमान) निषेध. ५. मुस्लीम आंतकवाद्यांचा निषेध. अजून एक लक्षांत घ्या, भारत हा पुर्वीपासूनच "दार-उल-हरब" मानल्या गेल्या आहे.आज जितक्या सहजतेने तुम्ही हे एक भारतीय म्हणून लिहू शकता, इतक्या सहजतेने इथलेच काय पण कुठलाही मुस्लीम, ईंडीयन मुजाहिदीन, दावूद इब्राहिम किंवा रझा अ‍ॅकॅडमी बद्दल बोललेला नाही. तुम्ही संघात होता असे म्हणता, पण संघाची स्थापना का झाली? आणि तुम्हाला अजून पण असे वाटते का, की आता संघाने त्याचे विसर्जन करावे? वरील विचार मंथन हे राजू भारतीय ह्यांच्या बरोबर होत असल्याने, मुद्दाम गहन विचार करणार्‍यांनी मध्येच तोंड खूपसू नये, ही विनंती.

In reply to by मुक्त विहारि

उद्दाम गुरुवार, 10/31/2013 - 12:40
दुसर्‍यानी तोंडं का खुपसायची नाहीत? खाजगी सवाल जबाबच करायचे तर एकमेकांच्या स्वप्नात जाऊन दृष्टांत का द्यायचे? का, ही वेबसाइट म्हणजे फक्त तुमची पुण्यभू आणि पितृभू आहे आणि आम्ही कोणी इराणमधून आलो आहोत की काय? :)

In reply to by उद्दाम

उद्दाम गुरुवार, 10/31/2013 - 12:41
दुसर्‍यानी तोंडं का खुपसायची नाहीत? खाजगी सवाल जबाबच करायचे तर एकमेकांच्या स्वप्नात जाऊन दृष्टांत द्यायचे की. का, ही वेबसाइट म्हणजे फक्त तुमची पुण्यभू आणि पितृभू आहे आणि आम्ही कोणी इराणमधून आलो आहोत की काय?

In reply to by उद्दाम

मुक्त विहारि गुरुवार, 10/31/2013 - 12:48
त्याचे काय आहे... मी शक्यतो ज्याने धागा काढला आहे, त्याच्याशी किंवा ज्याला काही किमान वैचारीक पातळी आहे त्याच्याशी विचार मंथन करतो. आपली आणि माझी वैचारीक किंवा सामाजिक पातळी जुळणे शक्यच नाही.कारण आपण नावाप्रमाणेच उद्दाम आहात.त्यामुळे आपण आमच्या पासून दुरच रहा.ही विनंती आहे. दुसरी गोष्ट...."आम्ही कोणी इराणमधून आलो आहोत की काय?" ते मला माहीत नाही, पण आपण भारतीय असाल तर... आपण अद्याप... १. समान नागरी कायदा. २. आझाद मैदान निषेध. ३. मुझ्झफर नगरचा निषेध. ४. घुसखोर बांगला-देशींचा (मग तो हिंदू असो की मुसलमान) निषेध. ५. मुस्लीम आंतकवाद्यांचा निषेध. ह्या विषयी निषेध का व्यक्त केला नाही?

In reply to by मुक्त विहारि

उद्दाम गुरुवार, 10/31/2013 - 14:01
देशात समान नागरी कायदाच आहे. ज्याने त्याने आपला धर्म पाळावा हाच तो समान नागरी कायदा. बहुपत्नीत्वाची चाल हिंदू धर्मातही होती. आणि ती हिंदुंनी स्वतः होऊन कयदा करुन बंद केली. तुम्ही ही चाल बंद करा, असा 'त्यान्नी' फतवा नव्हता काढला. आता तुम्ही तुमच्या पायावर धोंडा पाडून घेतला, तर त्याला बाकीच्यानी काय करायचे? ते पोटगीच्या कायद्याचेही तसेच. अस्ले आत्मघातकी कायदे करायला कोण सांगितले होते? उगाच दुसर्‍यांना दोष का द्यायचा?

In reply to by उद्दाम

मृत्युन्जय गुरुवार, 10/31/2013 - 14:10
बहुपत्नीत्वाची चाल हिंदू धर्मातही होती. आणि ती हिंदुंनी स्वतः होऊन कयदा करुन बंद केली. यासाठी भारतात मतदान झाले होते आणि सर्वमताने हिंदुंनी ही चाल कायद्याने स्वधर्मासाठी बंद करवली हे माहिती नव्हते मला. जरा पुरावे द्याल का याचे? तुम्ही ही चाल बंद करा, असा 'त्यान्नी' फतवा नव्हता काढला. कायदा करुन अशी एखादी चाल बंद करणे याला फतवाच म्हणायला हवे. खासकरुन असे कायदे फक्त एकाच धर्मासाठी करुन दुसर्‍या धर्मासाठी केले जातात तेव्हा त्याला फतव्याचेच स्वरुप असते. आता तुम्ही तुमच्या पायावर धोंडा पाडून घेतला, याला तुम्ही पायावर धोंडा पाडुन घेता यातच सगळे आले. तर त्याला बाकीच्यानी काय करायचे? बाकीच त्यांना पाहिजेत ते करतच आहेत. ते पोटगीच्या कायद्याचेही तसेच. अस्ले आत्मघातकी कायदे करायला कोण सांगितले होते? उगाच दुसर्‍यांना दोष का द्यायचा? वरचीच सगळी उत्तरे परत वाचा. असो. शुभ दीपावली.

In reply to by मृत्युन्जय

उद्दाम गुरुवार, 10/31/2013 - 14:17
कायदा तुमच्याच संसदेने केलेला होता. आणि समजा बहुसंख्य हिंदुना नसेल मान्य तो कायदा, तर आपला आवाज उठवून ते हा कायदा बदलू शकतात. -------------- द्विभार्या प्रतिबंधक कायद्याचा कट्टर विरोधक उद्दामराव एकलिंगे.

In reply to by उद्दाम

पैसा गुरुवार, 10/31/2013 - 14:29
"तुमची संसद" हा उल्लेख अत्यंत आक्षेपार्ह आहे. अर्थात तुम्ही पाकिस्तानी/अन्य देशाचे नागरिक असाल तर तसे स्पष्ट करा ही विनंती.

In reply to by उद्दाम

मृत्युन्जय गुरुवार, 10/31/2013 - 14:33
कायदा तुमच्याच संसदेने केलेला होता. तुमच्या म्हणजे? तुम्ही बाहेरचे की काय? मग कशाला उगाच तोंड उचकटताय,. तुम्हाला नाहिच कळायचे ते, आणि संसद काय हिंदु संसद होती काय? ती घटनाधिष्ठित निधर्मी राष्ट्राची संसद होती ना? आणि समजा बहुसंख्य हिंदुना नसेल मान्य तो कायदा, तर आपला आवाज उठवून ते हा कायदा बदलू शकतात. फक्त आवाज उठवुन कायदा बदलता येतो? आणि मुळात प्रश्न कायदा बदलण्याचा नाहिच. तो बदलावा असे म्हणणारे फारसे नरपुंगव दिसणारही नाहित. पण तो सर्वांना "समान" असावा एवढीच माफक अपेक्षा. एखाद्या विशिष्ट धर्मापुढे लाळघोटेपणा करु नये.

In reply to by उद्दाम

मृत्युन्जय गुरुवार, 10/31/2013 - 14:53
तुमची आणि आपली सर्वांची यामधला फरक यत्ता दुसरीत शिकवतात. आपल्या जवळच्या शाळेत कृपया लगेच प्रवेश घ्यावा. उद्या कोणी जर एखाद्याला म्हटले की "तु मुर्ख आहेस" तर त्याचा अर्थ "आपण सग्ळे मुर्ख आहोत " असा होत नाही

In reply to by टवाळ कार्टा

मुक्त विहारि गुरुवार, 10/31/2013 - 17:01
काही काही अहंमन्य / हेकेखोर लोकांच्या शाळा फार मस्त असतात्, त्यांना फार उच्च शिक्षण देवून मुद्दाम गहन विचार करायला भाग पाडल्या जाते.

In reply to by मुक्त विहारि

राजु भारतीय Mon, 11/04/2013 - 11:30
१) तुम्ही ज्या घटनांची यादी दिली आहे त्या सर्व घटनांची मुसलमानांनी निंदा केली पाहिजे असे माझेही मत आहे. २) संघाची स्थापना का झाली याचा स्वातंत्र्योत्तर काळात विचार करायचे काही कारण नाही. कारण स्वातंत्र्यानंतर राज्य करणारे मोगल वा इंग्रज नव्हते - सत्ता भारतीयांची होती. त्यामुळे फक्त हिंदूंचे संघटन करण्याची आवश्यकता उरली नव्हती. समाजाला आज संघाची गरज नाही हे समाजाने ठळकपणे अधोरेखित केलंय ! शाखांची संख्या बघा, त्यात जाणा-या तरुणांची संख्या बघा. संचलनात भाग घेणा-या स्वयंसेवकांची गेल्या दहा वर्षातली ( ढासळती ) टक्के वारी काढा म्हणजे समजेल. संघ आणि त्यांच्या अन्यान्य संघटनांच्या प्रचारकांची आणि पूर्णवेळ कार्यकर्त्यांची ( ढासळती )संख्या बघा. हिंदूंचे संघटन या विषयाचे भारतीय समाजाला ना आकर्षण वाटते ना त्याची आवश्यकता वाटते. विसर्जित करा असे मी म्हणालो नाही. विसर्जित करायची आवश्यकताच नाही. संघ एक दिवस आपोआप विरघळलेला असेल.

In reply to by राजु भारतीय

मुक्त विहारि Mon, 11/04/2013 - 17:32
१) तुम्ही ज्या घटनांची यादी दिली आहे त्या सर्व घटनांची मुसलमानांनी निंदा केली पाहिजे असे माझेही मत आहे. पण ते करत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळेच संघ जिवंत राहणे, ही काळाची आणि पर्यायाने हिंदूंची गरज आहे.ज्या दिवशी संघ संपेल त्यादिवशी शरियत कायदा लागू केला जाईल, असे वाटते.

In reply to by मुक्त विहारि

राजु भारतीय Wed, 11/06/2013 - 18:08
मुसलमान काय म्हणतात आणि त्यांनी काय म्हणावे हा माझ्या लेखनाचा विषय नाही. आपला विषय संघ हा आहे. दुसरा मुद्दा : संघाची किंवा हिंदु म्हणून संघटीत राहण्याची गरज जर भारतातल्या हिंदुना वाटत असती तर सातत्याने त्यांनी हिंदुत्वाचा विचार करणा-या आणि तो तथाकथित करतो म्हणून भाजप ला नाई का सत्तेवर बसवले असते ? कायमचे ? गुजरात सोडता एकही राज्यात अन्य पक्षांच्या कुबड्यांशिवाय भाजप या तथाकथित हिंदू रक्षण करणा-या संघाच्या राजकीय आघाडीला कधीच आजवर बहुमत मिळाले नाही - संघाची डायरेक्ट मदत असून देखील. राम या विषयावर डायरेक्ट निवडणूक लढवून सुद्धा सत्तेत आलेल्या वाजपेयी सरकारला तब्बल चौदा पक्षांची मदत घ्यावी लागली कारण राम मंदिर बांधु असे आश्वासन देऊन देखील भाजपला बहुमत नव्हते. तुम्ही ज्या शहरात राहता तिथेआणि संपूर्ण भारतात रोज सायंकाळी शाखा ओसंडून वाहिल्या असत्या. रोज जाऊ द्या वर्षातून एकदा - शरियत लागू नये म्हणून विजया दशमीच्या संचलनाला तरी समस्त हिंदू सहभागी झाले असते …? होतात का ? संचलन झाल्याचे तरी कळते का ? काढा गेल्या दहा वर्षातल्या संचालनात सहभागी होणा-या हिंदूंची संख्या. आपण अभ्यासा अंती प्रामाणिक पणे उत्तर दिले तर संख्या घटलेलीच दिसेल. वैयक्तिक तुम्ही भयगंड ग्रस्त असाल त्यामुळे तुमचा हा भ्रम आहे की देशातल्या समस्त हिंदुना शरियतचे भय वाटते आहे आणि त्यामुळे समाजाला संघाची आवश्यकता आहे. गेल्या दहा वर्षातली सांख्यिकी सांगेल संघ आणि अन्यान्य परिवारातल्या संघटनेतील प्रचारक वा पूर्णवेळांची संख्याच नव्हे तर पात्रता ही रोडावली आहे. संघच फक्त हिंदूंचे रक्षण करतो या भ्रमात राहू नका. सातशे वर्षे हिंदुंवर वेगवेगळी आक्रमणे झाली - विशेषत: इस्लामी आक्रमणे म्हणून हिंदुस्तान इस्लामी राष्ट्र नाई झाले. संघाची गरज भासवून हिंदुना इतके किरकोळीत नका हो काढू !

In reply to by राजु भारतीय

मुक्त विहारि Wed, 11/06/2013 - 19:04
असो, भावना पोहोचल्या..... पण मग आता, रझा अ‍ॅकॅडमी,इंडियन मुजाहिदीन, लष्करे तोयबा इ. संघटनांबद्दल आपले काय मत आहे? आणि " संघच फक्त हिंदूंचे रक्षण करतो या भ्रमात राहू नका." मी अजिबात भ्रमात नाही, फक्त संघच हिंदूंचे रक्षण करतो, ही वस्तूस्थिती आहे.

In reply to by मुक्त विहारि

राजु भारतीय Wed, 11/06/2013 - 19:18
तुम्ही ज्या संघटनांची नावे इथे दिली आहेत त्या संघटना भारत द्रोही आहेत, त्यांच्या समाज विघातक काळ्या कृत्यांनी भारताचे नुकसानच केले आहे आणि भारतीय मातीत या अशा किंवा कोणत्याच फ्यासीस्ट संघटनांना थारा मिळता कामा नये असे माझे मत आहे. हिंदूचे रक्षण संघ करतो तर परमेश्वर काय करतो ? मग देवळे शिव पार्वती विष्णू हनुमान कृष्ण राम यांची का ? रामाचे मंदिरच कशाला ? बाबरी फोडून तिथे डॉ हेडगेवारांचे मंदिर का नाही बांधले ? …. आणि माझ्या प्रश्नांचे उत्तर द्या ना ! कर्नाटकात भाजपने गटांगळी का खाल्ली ? केंद्रात भाजपचेच सरकार का नाही ? संचलनात घोष पथक गुणिले फार तर पाच एवढेच स्वयंसेवक का असतात ? तुमच्याच सारखा भयगंड सा-या देशाला पाच पंचवीस नाही - अठ्ठ्यांशी वर्षात का नाही झाला ?

In reply to by राजु भारतीय

श्रीगुरुजी Wed, 11/06/2013 - 22:50
>>> हिंदूचे रक्षण संघ करतो तर परमेश्वर काय करतो ? >>> एक कथा आहे. एक साधू परमेश्वराचा नि:स्सीम भक्त असतो. तो राहत असलेल्या गावात एकदा पूर येतो. सर्वजण नावेने सुरक्षित ठिकाणी जायला निघतात. "स्वतः देव माझे रक्षण करायला आला तरच मी जाईन" असे साधू सांगून तिथून हलत नाही. काही वेळाने मंदीराच्या पायर्‍यापर्यंत पूर येतो. त्याअवस्थेत एक नावाडी नाव घेऊन तिथे येतो व साधूला आपल्याबरोबर येण्यास विनवितो. साधू पुन्हा एकदा यायला नकार देतो. काही वेळाने मंदीर पूर्ण बुडायची वेळ येते. त्यावेळी लष्कराचे सैनिक हेलिकॉप्टर घेऊन साधूला वाचवायला येतात. पण साधू त्यांच्याबरोबर जायला नकार देतो. शेवटी काही वेळाने साधू पाण्यात वाहून जातो. मेल्यानंतर तो स्वर्गात देवाला जाब विचारतो की मी तुझी एवढी भक्ती करूनसुद्धा तू मला का वाचविले नाहीस. यावर देव सांगतो की मी २ वेळा तुला वाचवायचा प्रयत्न केला होता. एकदा मी नावाड्याच्या रूपात आलो तर एकदा हेलिकॉप्टर घेऊन आलो होतो. तूच अज्ञानामुळे मला ओळखले नाहीस. आता तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळाले असेल अशी आशा आहे. >>> मग देवळे शिव पार्वती विष्णू हनुमान कृष्ण राम यांची का ? दत्त, गणपती, देवी इ. ची पण देवळे असतात. >>>> रामाचे मंदिरच कशाला ? बाबरी फोडून तिथे डॉ हेडगेवारांचे मंदिर का नाही बांधले ? जिथे रामाचा जन्म झाला होता तिथे रामाचे देऊळ बांधायचे ना? >>> …. आणि माझ्या प्रश्नांचे उत्तर द्या ना ! कर्नाटकात भाजपने गटांगळी का खाल्ली ? येडीयुरप्पा बाहेर पडल्यामुळे मतात फाटाफूट पडून भाजपची सत्ता गेली. >>> केंद्रात भाजपचेच सरकार का नाही ? भाजपला २७३ खासदारांची जमवाजमव जमली नाही म्हणून. >>> संचलनात घोष पथक गुणिले फार तर पाच एवढेच स्वयंसेवक का असतात ? त्याने काय फरक पडतो? संघाविषयी विश्वास व आत्मीयता असणे पुरेसे आहे. >>> तुमच्याच सारखा भयगंड सा-या देशाला पाच पंचवीस नाही - अठ्ठ्यांशी वर्षात का नाही झाला ? दुर्दैवाने देशातल्या बहुसंख्य जनतेला राखीव जागा, पुतळे, स्मारके, नामांतर, नामविस्तार इ. अफूच्या गोळ्या सातत्याने चारत गेल्याने त्यांना अजून या वस्तुस्थितीची पुरेशी जाणीव न झाल्यामुळे.

In reply to by राजु भारतीय

श्रीगुरुजी Wed, 11/06/2013 - 21:48
>>> गुजरात सोडता एकही राज्यात अन्य पक्षांच्या कुबड्यांशिवाय भाजप या तथाकथित हिंदू रक्षण करणा-या संघाच्या राजकीय आघाडीला कधीच आजवर बहुमत मिळाले नाही - संघाची डायरेक्ट मदत असून देखील. घोर अज्ञान! संघाविषयी तर सोडाच, या देशातील राजकारणाविषयी देखील तुमचे घोर अज्ञान आहे.

In reply to by राजु भारतीय

श्रीगुरुजी Wed, 11/06/2013 - 22:53
>>> अहो, लिहीण्याच्या ओघात मप्र, छ्ग, राहुन गेले, हे मान्य ! दिलगीरी. पण मुळ मुद्द! लक्षात घ्याना. दिल्ली, राजस्थान, कर्नाटक, गोवा, हि.प्र., उ.प्र., उत्तराखंड हे देखील राहून गेले. लिहिण्याच्या ओघात तुमचे बरेच काही राहून गेलेलं दिसतंय. बादवे, तुमचा मूळ मुद्दा नक्की काय?

In reply to by मुक्त विहारि

पुष्कर जोशी Wed, 11/06/2013 - 17:12
वरील विचार मंथन हे राजू भारतीय ह्यांच्या बरोबर होत असल्याने, मुद्दाम गहन विचार करणार्‍यांनी मध्येच तोंड खूपसू नये, ही विनंती.
भारी ह. ह. पु. वा.

ध्यानस्थ बगळा Wed, 10/30/2013 - 21:41
लै जुना विषय.. मी १८५७ ला यावर नेटावर चर्चा करायचो.. आता १७० वर्षांनंतर कशाला हे खोदून काढताय.? आरेसी शिबिरं अटेंड केलित.. लौंगी फटाक्याच्या आवाजाला घाबरणारी पांढरी चिपाडं जबराट भाषणं देताना अमंळ गंमत वाटायची.

सद्य विषय
ह्या मुद्द्याशी संपुर्ण सहमत.
या देशाला संघाची / संघ कामाची आवश्यकताच नाही. संघ या देशाच्या प्रगती मधला एक मोठा अडसर आहे.- कारण संघाकडून प्रस्थापित राजकीय व्यवस्थे मध्ये दोष आहेत हे संमोहन पद्धतीने पटवून देऊन समांतर व्यवस्था उभी करण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातो
१. ह्या देशाला काँग्रेस ची ही गरज नाहीये. २. नैसर्गिक संकट असो वा मानवनिर्मित संकट असो संघ प्रत्येक वेळी धर्म-जातीचा कुठलाही विचार न करता सामान्य माणसासाठी काम करत आलेला आहे तो संघ देशाच्या प्रगतीमधला अडथळा कसा असु शकतो ह्याबद्द्ल आपल्याकडुन जास्तीची माहीती वाचायला नक्कीच आवडेल. (राजकारणाच्या बाबतीत संघ अतिशय कडवा आहे ही गोष्ट एकदम मान्य). ३. आपल्या राजकीय व्यवस्थेमधे प्रचंड प्रमाणात दोष आहेत ही बाब खरी आहे. संघ हा शब्द न ऐकलेलं शेंबडं पोरं पण सांगेल ही गोष्ट. प्रचंड भ्रष्टाचार हा सगळ्यात मोठा दोष. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव हा दुसरा दोष. असे शेकड्यानी दोष दाखवता येतील. ह्यामधे संघानी हिप्नोटाईझ करायचा प्रश्ण कुठे येतो? कुठली समांतर व्यवस्था उभी करतोय संघ म्हणे? भाजपा हा एक ऑफिशियल पक्ष आहे, व्यवस्था नाही.
संघाची शक्ती ह संपुर्ण मुद्दा :
शितावरुन भाताची परीक्षा करु नका हो. असे लोकं जाल तिथे भेटतील.
भारतीय समाज एकसंधच असावा अशी माझी प्रामाणिक तळमळ आहे. हिंदू आणि मुसलमान या केवळ राजकीय स्वार्थासाठी पाडलेल्या रेषा आहेत - विशेषत: १९४७ नंतर. त्या पुसल्या जाऊ शकतात आणि त्या पुसल्या पाहिजेत. ४७ च्या आधीच्या जखमा वखवखत आणि भळभळत ठेवल्या जातात, मुद्दाम - त्या मागे स्वार्थ आहे, कपट आहे आणि देशाचे अतोनात नुकसान आहे.
राजकीय इच्छाशक्तीचा अभाव. जर ह्या जखमा पुसल्या गेल्या तरं सगळ्यांचीच दुकानं बंद पडतील, त्यामुळे स्वार्थी राजकारणी असं होऊ देणार नाहीत.

बहुगुणी Wed, 10/30/2013 - 22:26
लेख वाचून काही प्रामाणिक प्रश्न पडले: १) 'दुभंग हे राष्ट्रीय पाप आहे' हा मुद्दा पटण्यासारखा आहे, पण देश असा दुभंग ठेवणं ही सर्वच पक्षांची राजकीय गरज झालीये त्याविषयी काही मत? २) आपल्या वैचारिक प्रवासात ४) स्थानिक, जिल्हा, प्रांत आणि राष्ट्रीय स्तरावरील बैठका, आतल्या गोटातल्या बैठका, अभ्यासवर्ग, चिंतन शिबिरे, बौद्धिके यांना नियमित अपेक्षित आणि उपस्थिती. ५) स्थानिक ते राष्ट्रीय स्तरावरील अधिकारी आणि नेते यांच्याशी परिचय मैत्री संवाद पत्रव्यवहार वगैरे . ते.. ६) सध्या संघ आणि परिवारापासून लांब. इथपर्यंत आमुलाग्र बदल घडण्याइतकं काय घडलं? ३) संघाची शक्ती : प्रत्यक्ष काम न करणारे, कट्ट्यावर बसून मत व्यक्त करणारे, कधीतरी उत्सवाला जाणारे, एखाद्या संघ प्रकल्पाला भेट देऊन आलेले म्हणजे वरवरचे लोक ही आणि हीच संघाची पहिली मोठी शक्ती आहे. या सर्वांचा संघ हा लिळा चरीत्रातल्या आंधळे आणि हत्ती यांच्या कथे सारखा आहे. कुणा शेपूट, कुणाला सोंड हे अवयवच हत्ती आहे असे वाटते. संघाची दुसरी शक्ती संघाचे अत्यंत भाबडे, फार विचार न करू शकणारे पण पोपटपंची करणारे कार्यकर्ते / स्वयंसेवक आहेत. ही जनता प्रेमाचा संसर्ग झालेल्या टीनेजर सारखी असते. स्वत:चा एकवेळ "एक दुजे के लिये " होऊ देतील पण काही ऐकून घेणार नाहीत. या वरच्या वर्णनात मला वाटतं "संघ" या शब्दाच्या जागी "शिवसेना", "मनसे", "काँग्रेस", "रिपाइं", "सीपीएम" किंवा "तृणमूल काँग्रेस", यांपैकी कुठल्याही पक्षाचं नाव घातलं तर चालेल, हो ना? ४) अखेरीसः "रा. स्व. संघाची वैचारीक नसबंदी" यामध्ये आपल्याला संघाने स्वतःच्याच सदस्यांची केलेली वैचारिक नसबंदी अभिप्रेत असावी, तसं असेल तर so called बुद्धीजीवी असलेले इतक्या मोठ्या संख्येने सदस्य अशी नसबंदी कित्येक दशकं का होऊ देत असावीत, आणि तुमच्यासारखे त्याला उघड विरोध का करीत नसावेत? असो, लिखाणाचं धाडस इथे केलंत याचं कौतुक वाटतं; असंच लिखाण "पांचजन्य" मध्ये प्रसिद्ध होईल का?

In reply to by बहुगुणी

विटेकर गुरुवार, 10/31/2013 - 16:58
या न्यायाने दिग्गीराजाना
अखिल भारतीय धाडसी वीरपुरुष
असाच कीताब द्यायला हवा ! प्रचितीवीण जे बोलणे | ते अवघे कंटाळवाणे | तोंड पसरुनी सुणे |भुंकुनी गेले ||

In reply to by बहुगुणी

राजु भारतीय Mon, 11/04/2013 - 12:33
बहुगुणी - १) ( आपला विषय राजकीय पक्ष असा नाही पण तरीही … ) हा दुभंग जिवंत ठेवण्याचे दु:कृत्य काँग्रेस, भाजप सकट सगळे राजकीय पक्ष करताहेत हेच या समाजाचे दुर्दैव आहे. धार्मिक आणि जातीय दृष्ट्या भारतीय समाज समरस आणि एकसंध असावा ही आपल्या सामाजिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे पण - स्वातंत्र्यानंतर तसा प्रामाणिक प्रयत्न कोणत्याच राजकीय पक्षाने केला नाही. ( फार अधिकार वाणीने मला सांगता येणार नाही पण जात आणि धर्म या बाबतीत सर्व कम्युनिस्ट पक्ष मात्र बहुदा वेगळे आहेत, त्यांनी त्यांचे राजकारण याच्या पलीकडे जाऊन केले आहे असे मला वाटते, but I have not studied them in toto ) 2) माझ्यातला वैचारिक बदल हा विषय माझा लेखनाचा नाही. मी संघाचे काम केले आहे हे इथे उघड केले नसते तर संघाचे प्रत्यक्ष काम करणारे आणि ते कट्ट्यावरचे यांनी मला हा विषय मांडण्याचा नैतिक अधिकार नाही असे म्हणून सगळे मुद्दे पुसून टाकले असते. त्यामुळे मी अनेक वर्षे काम केले आता नाही एवढेच महत्वाचे - या ठिकाणी. स्वतंत्रपणे आपण म्हणाला त्या प्रमाणे त्या प्रवासा विषयी नक्की लिहीन. ३) संघाव्यतिरिक्त अन्य ठिकाणी कार्यकर्त्यांचा स्तर आपल्या मुद्दा क्रमांक तीन मध्ये लिहिल्या प्रमाणे असेल. माझा त्यांच्या संघटनात्मक बाबींचा अभ्यास नाही. पण आपण संघाची तुलना अन्य राजकीय पक्षांशी करत आहात, हे ध्यानात घ्या. संघाची तुलना राजकीय पक्षांबरोबर नाही येणार करता. आपल्याकडे तरी कोणताच राजकीय पक्ष कोणत्याच मुल्यांवर ( value system ) काम करत नाही. ४) संघातले बुद्धिवंत हा एक प्रचंड अभ्यासाचा विषय आहे. म्हणजे संघ इतका दोषी आहे तर मग अमुक अमुक तिथे कसे आणि ते तिथे आहेत तर आपण तिथे जायला किंवा त्यांच्या बरोबर असायला काय हरकत आहे असे वाटून काही ही विचार न करता स्वत:ला झोकून देणारे बरेच लोक संघात सापडतील. आपले म्हणणे मला मान्य आहे तिथे ( खूप नव्हे पण ) बरेच आदरणीय बुद्धिवंत आहेत. या विषयी खूप लिहिण्याऐवजी माझा रोख डायरेक्ट व्यक्त करतो : काही बुद्धिवंत तिथे आहेत म्हणून संघविचार - आज आवश्यक आहे हे तर अजिबात न पटणारे आहे. मला आपणास काही प्रश्न विचारू द्या : अ) २६/११ सारखे भीषण कृत्य ओसामाकडे अनेक बुद्धिवंत असल्याशिवाय होऊ शकेल का ? ब) तंत्रज्ञान, मनोविकास, साहित्य, संगीत वगैरे वगैरे समाजाच्या सर्व थरातले बुद्धिवंत हिटलरकडे नव्हते का ? त्याच्या बाजूने खंबीरपणे शेवट पर्यंत उभे राहणारे बुद्धिवंत सहस्त्रावधी असल्याशिवाय एकट्या हिटलर ला त्याने जे काही साध्य केले ते करता आले का ? क) द्रौपदीचे वस्त्रहरण होताना धृतराष्ट्र, भीष्म काही पांडव, आणि अन्य या बुद्धिवंतांचा रोल कसा होता ? ड ) प्रमोद महाजन यांची अनेक काळी कृत्ये अटलबिहारी बाजपेयी यांच्या सारख्या जगन्मान्य बुद्धिवंत असामीने थोपविण्याचा एकतरी - ए-क त-री - प्रयत्न केल्याचा दाखला इतिहासा मध्ये सापडतो का ? महाजनांची काळी कृत्ये या विषयी आपण अनभिज्ञ असाल तर अनेक कागदपत्रांबरोबर - त्यांच्या बंधूंचे माझा अल्बम चाळा. इ ) आपण ज्या गावात राहता त्या गावात एकतरी भाजपचा नगरसेवक असेल आणि तो नक्की - म्हणजे अगदी ठामपणे नक्की भ्रष्ट असेल हे सहज दाखवता येईल. अशा नगरसेवकाला आपल्या शहराचे कार्यवाह, संघचालक, वा अन्य बुद्धिवंत यांनी कधीतरी जाब विचारलाय का ? ई ) ज्ञान प्रबोधीनीचे संस्थापक अप्पा पेंडसे, विवेकानंद स्मारकाचे एकनाथजी रानडे, सुधीर फडके, सांगलीचे देवल, चित्रकुटचे नानाजी देशमुख, आज जिवंत असणारे आणि जनसंघाचे धूळ बसवून पुसट केलेले संस्थापक बलराज मुधोक असे अनेक बुद्धिवंत संघातून बाहेर पडलेच की ! त्यांना संघ पटला नाही म्हणून बाहेर पडले. या सगळ्या बुद्धिवंतांची क्षमता त्यांच्या कार्याच्या परिचयातून आपणाला झालेलीच असेल ! ……पण काही ठिकाणी काही बुद्धिवंत गप्प का बसतात हा मनोवैज्ञानिक अभ्यासाचा विषय आहे ! ५) पांचजन्यमध्ये असे लिखाण छापून येणार नाही कारण - they do not have tolerance required to publish comments on themselves ! कुमार केतकर सुधीद्र कुळकर्णींचे विचार दर रविवारी छापायचे पण केतकरांचे विचार छापायचे धाडस साप्ताहिक विवेक वा पांचजन्य वा Organizer कधीच दाखवणार नाही. संघ हे कडवे संघटन आहे - दुर्दैवाने !

In reply to by राजु भारतीय

अर्धवटराव Tue, 11/05/2013 - 02:02
तुम्ही स्वतःला भूतपूर्व संघी म्हणवता ना... तुम्हाला वैचारीकता शोधुन दाखवावी लागतेय म्हणजे अतीच झालं. कावीळ झालेल्या दिग्वीजयी खेकड्याचे रंगबिरंगी मनोगत तुम्ही रंगवलत...आणि त्यातल्या अत्युच्च्य पतित मुल्यांना नाकारण्याची विनम्रता दाखवताय... त्याला सिंपल दाद दिली मी.

In reply to by अर्धवटराव

प्यारे१ Tue, 11/05/2013 - 02:30
>>>सिंपल दाद अवेसोमे! ;) -दोनशे झाले काय रे? बिपिनदाचा शब्द आपला माथा. बास्स. ३०० बोला तो ३०० करने काच्च्च! रज्जु भैइया अर्रर्रर्र सॉरी राजु भारतीय आगे बढो...

पण एक गोष्ट नक्की : `एक कुटुंब एक मुल' हे धोरण पालक, मुल आणि देश सर्वांच्या हिताचं आहे. पालक फोकस्ड संगोपन करू शकतात आणि लवकर मोकळे होतात, मुलाचं संगोपन यथोचित होतं आणि देशापुढे लोकसंख्या हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे तो सुटण्याची शक्यता निर्माण होते.

In reply to by संजय क्षीरसागर

मुक्त विहारि Wed, 10/30/2013 - 22:44
हे धोरण पालक, मुल आणि देश सर्वांच्या हिताचं आहे. पण बरेचसे मुस्लीम लोक ते मान्य करत नाहीत, त्याचे काय?

In reply to by संजय क्षीरसागर

मुक्त विहारि गुरुवार, 10/31/2013 - 09:40
"सुखी कुटुंबं बघितली की इतरेजन त्यातून शिकण्याची शक्यता निर्माण होते." हे , तुमच्या आमच्या सारख्या काही माणसांनाच लागू होते.बर्‍याचे वेळा, त्या माणसाचे सूख कसे हिरावून घेता येईल ह्याचाच विचार केला जातो.

In reply to by संजय क्षीरसागर

धन्या Wed, 10/30/2013 - 22:48
तुम्ही म्हणताय तसं पालक, मुल आणि देश यांचं `एक कुटुंब एक मुल' या धोरणाने भलं होईलच असं नाही. ही गोष्ट कुटुंबागणिक बदलू शकते. एकुलता एक किंवा एकुलती एक असलेल्यांचे पालक सजग नसतील तर रोगापेक्षा औषध भयानक असं म्हणायची वेळ येते. चीनने लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी हा प्रयोग करुन पाहीला होता आणि त्याचे दुष्परीणामही भोगले आहेत.