विकासाची भारतीय संकल्पना..२
आत्म्याचे सुख हे कमी कष्टात अधिक मात्रेत सुख ( सुखाचे फल ) देणारे आहे.
एक प्रश्न पडतो. कमी कष्टात असेल तर राजा विश्वामित्राचा ब्रह्मर्षि विश्वामित्र बनताना त्याला एवढे कष्ट का पडले ?In reply to . by आशु जोग
In reply to नेमका संदर्भ by विटेकर
In reply to रोचक. पण ... by आतिवास
In reply to काहीसा सहमत .. पण by विटेकर
भारतीय " विचार " आणि "व्यवहार" यांतील अंतर हे मु़ख्यतः आत्मविस्मृतीमुळे आणि पाश्चिमात्यांच्या अंधानुकरणामुळे आहे.पाश्चिमात्यांशी संपर्क येण्याअगोदरही आत्मविस्मृती होतच होती. हे पीरिऑडिक असतं. अगदी बुद्धपूर्व काळ घेतला तरी ब्राह्मणकाळातल्या कर्मकांडाची रिअॅक्शन म्हणूनच उपनिषदे तयार झाली. नंतरही अधूनमधून असे ढवळणे चालूच असते. तेव्हा पाश्चिमात्य येण्याअगोदर "आल इझ वेल" होते असे काही नाही.
प्राचीन भारतीयांनी समतोल विचार करून सर्वंकष जीवनपद्धती विकसित केली आणि त्यात कालानुरुप बदल करता येतील अशी लवचिकता ही ठेवली. दुर्दैवाने ही लवचिकताच घातक ठरली !ही लवचिकताच आपला यूएसपी आहे. झापडबंद विचारातून बाहेर पडण्याचे लायसन्स आहे. ती लवचिकता घातक ठरली असे सरसकट विधान करणे चूकच.
In reply to भारतीय " विचार " आणि "व्यवहार by बॅटमॅन
पाश्चिमात्यांशी संपर्क येण्याअगोदरही आत्मविस्मृती होतच होती.
हे मान्यच आहे म्ह्णून मी आत्म विस्मृती " आणि " अंधानुकरण असे म्हंट्ले आहे. धर्माला पुनः पुन्हा ग्लानी येते हे तर स्वतः भगवंताने सांगितले आहे तेव्हा तुमच्या पिरिऑडिक मुद्द्याशी सहमत!
ही लवचिकताच आपला यूएसपी आहे
हे ही मान्य ,पण त्यामुळेच अपप्रवृत्ती शिरल्या कारण त्यातला " विवेक " हरवला. सरसकट नव्हे पण त्याने दिर्घ कालीन परिणाम झाले हे ही खरे. In reply to पाश्चिमात्यांशी संपर्क by विटेकर
पण त्यामुळेच अपप्रवृत्ती शिरल्या कारण त्यातला " विवेक " हरवला. सरसकट नव्हे पण त्याने दिर्घ कालीन परिणाम झाले हे ही खरे.समजा लवचिकता नसती तर विवेक असता असे म्हणावयाचे आहे काय? तसे असेल तर मग लैच असहमत. लवचिकतेचे दीर्घकालीन काही परिणाम आहेत हे मान्य. पण जिथे आचारविचारात लवचिकता अलाउड नसते तिथे विवेक कितपत राहतो??? उलट अशाच ठिकाणी विवेकाची मुस्कटदाबी सर्वांत जास्त होते. लवचिकता हे स्वातंत्र्य आहे. अपप्रवृत्ती शिरायला स्वातंत्र्यापेक्षा पारतंत्र्य जास्त कारणीभूत असते. स्वातंत्र्य असले की आचारविचारांत रोगटपणा तुलनेने कमी असतो. जितकी लवचिकता कमी तितके स्वातंत्र्य कमी.
In reply to पण त्यामुळेच अपप्रवृत्ती by बॅटमॅन
In reply to विवेक विरुद्ध लवचिकता by विटेकर
In reply to सहमत! by बॅटमॅन
ही लवचिकताच आपला यूएसपी आहे.>>> ह्याचावरुन आठवले की मागे कोणीतरी इन्टर्नेट वर एक मस्त विधान केले होते की हिंदुधर्म लिनक्स सारखा आहे ...ओपन सोर्स... कोणीही घ्या काहीही आवडतील ते बदल करा अन खुष राव्हा ....बाकी चे धर्म (विशेष करुन मध्यपुर्वेतील ) हे विंडोज सारखे आहेत ...फिक्स्ड ... अवांतर : मला उबुंटु फार आवडते आणि मॅक ओएस विषयी थोडासा तिरस्कारच आहे =))
In reply to जस्ट टू अॅड by प्रसाद गोडबोले
In reply to जस्ट टू अॅड by प्रसाद गोडबोले
In reply to काहीसा सहमत .. पण by विटेकर
उदाहर्णार्थ .. आपल्या बहिणीचा विवाह होत नाही तोपर्यन्त भाऊ अविवाहित राहतो हे त्यागाचे परिणामी आत्मिक सुखाचे उदाहरण आपल्या आजूबाजूला आपण आजही पाहतोच ना ?
याच्या विपरीतही उदाहरणे पाहण्यात आहेत; आणि त्यात (थोरल्या भावाने बहिणीच्या विवाहाआधी स्वतः विवाह करणे) माझ्या मते काहीही गैर नाही!
शिवाय समजून-उमजून मूल्य पाळणे आणि रुढी-परंपरा - 'लोक काय म्हणतील' म्हणून - एखादा रीतीरिवाज पाळणे यात फरक आहे. कोण नेमके कशामुळे अमूक एखादा व्यवहार करत आहे हे समजून घेणे अवघड आहे.
नि:स्वार्थीपणाचा, त्यागाचा विचार नि:स्वार्थी आणि त्यागी लोक बहुसंख्य असलेल्या समाजात सांगायची वेळ येत नाही असा एक अंदाज आहे. ज्याअर्थी इतके 'विचार' सांगावे लागले त्याअर्थी त्याची गरज त्या काळच्या समाजधुरिणांना भासली असावी. (या विधानाचा व्यत्यास खरा नाही - म्हणजे विचार सांगितले नसतील तर तसा सगळ्यांचा व्यवहार असेलच असे नाही!! :-)' क्रिटिकल मास' तयार होणे ही एक प्रक्रिया आहे. शिवाय एका भारतीय समाजात किती समाज आहेत - हे पाहिले की वेगळे चित्र दिसते . चांगले-वाईट लोक सर्वच समाजांत, सर्वच काळात असतात. परिस्थितीवश कुणाचे प्रभावक्षेत्र जास्त आहे हे ठरते. ही परिस्थिती ठरण्याला मूल्येही कारणीभूत ठरतात - इतका संबंध नक्कीच आहे.
पण आता हे विषयांतर होते आहे - म्हणून थांबते.
मी पुन्हा नमूद करते की चांगल्या विचारांना आणि भारतीय विचारप्रणालीत ते सांगितले गेले आहेत याविषयी काही दुमत अथवा आक्षेप नाही. In reply to उदाहर्णार्थ .. आपल्या बहिणीचा by आतिवास
In reply to पूर्ण प्रतिसादाशी सहमत. by बॅटमॅन
"एक महत्त्वाची गोष्ट म्हंजे "व्हर्च्यू ऑफ नेसेसिटी" केला जातो बहुतेकदा. अन तोच खरा व्हर्च्यू म्हणून कवटाळल्या जातो, वरिजिनल नेसेसिटी संपल्यावरदेखील. पण हे सांगणे म्हंजे तात्कालिक नेसेसिटीदेखील नजरेआड करणे असा सूर प्रंप्राभिमान्यांकडून लावला जातो., जे चूक आहे.
नीट मराठीतुन समजावुन सान्गाल का?In reply to पूर्ण प्रतिसादाशी सहमत. by बॅटमॅन
थोरल्या भावंडाआधी धाकट्याने लग्न करणे किंवा एका बहिणीचे लग्न झालेले नसताना भावाने लग्न करणे यात.....
हे केवळ सामान्य त्यागाचे उदाहरण म्हणून घेतले ! त्या रुढीचे अथवा परंपरेचे ( अशी प्रथा असलीच तर ) उदात्तीकरण करावे असा हेतु नव्हता. त्यागामुळे मिळणारा आत्मिक आनंद असा असतो असे सांगण्यचा तो प्रयत्न होता. याऐवजी महात्मा गांधीनी समाजासाठी केलेला त्याग अथवा सावरकर घराण्याने केलेला त्याग हे उदाहरण घ्यावे. पुराणातील उदाहरण द्यायचे झाले तर दधिचीचे अथवा शिबी राजाचे घ्यावे. इतिहासातील उदाहरण घ्यायचे तर फतेसिंग- जोरावर सिंग आहे. सध्याचेच घ्यायचे तर आमटे परिवार अभय बंग ही उदाहरणे आहेत. फार मोठी उदाहरणे न देता, आजूबाजूची उदाहर्णे द्यावीत म्हणून हे उदाहरण दिले होते. मुद्दा हा आहे की. त्यागातून मिळणारे आत्मिक समाधान !
In reply to ... by विटेकर
मुद्दा हा आहे की. त्यागातून मिळणारे आत्मिक समाधान !मग ठीक आहे. त्या उदाहरणाशी इतका सहमत नसलो तरी या मुद्द्याशी सहमत आहे.
In reply to मुद्दा हा आहे की. त्यागातून by बॅटमॅन
In reply to . by उद्दाम
In reply to . by उद्दाम
बहिणीचे लग्न झाले नाही, म्हणून भावानेही लग्न केले नाही, यात नेमका कसला त्याग झाला?+१. सहमत. उलटपक्षी भावाने लग्न केल्यावर त्याच्या वधूपक्षाच्या गोतावळ्यातून वर संशोधन सोप्पं होउ शकेल.
In reply to . by उद्दाम
In reply to रोचक मालिका. by सस्नेह
'मूल्ये' ही समाज, काल, सुबत्ता यांच्याप्रमाने बदलत आली आहेत. आजच्या समाजासाठी कालची मूल्ये स्वीकारार्ह असतीलच असे नाही.
" Values are like Lighthouses! It is you who break them and not the lighthouse !!"
- 7 Habits of Highly effective people Chapter 1 - Character & Personality In reply to हं. by उद्दाम
लेख आवडला. पण पाश्चात्यान्नी शोध लावलेल्या विजेवर चालणार्या पाश्चात्यानी शोधलेल्या क्याम्पुटरसमोर बसून पाश्चात्यान्नी शोधलेल्या शर्ट प्यान्टीत अंग घालून हा लेख वाचणं म्हणजे माझा तो शिंचा अंतरात्मा तळमळला.'शिंच्या' अंतरात्म्याची तळमळ हुकलेली आहे, इतकेच तूर्तास सांगू इच्छितो.
पूर्तेच्छा व सर्वेच्छांचे गुणोत्तर ही सुखाची व्याख्या तितकीशी 'पूर्ण' नाही
ही व्याख्या पूर्ण नसेल ही पन मग सुखाची पूर्ण व्याख्या काय आहे ?
१ आणि २
माणसाच्या इच्छा इतक्या जास्त असतात आणि
सुखविषयक इच्छा करण्याची माझी क्षमता सिमित आहे
???? सूज्ञ आणि प्रांजळ ची व्याख्या काय ? आणि सर्वच सूज्ञ आणि प्रांजळ माणसे सुखी असतात का ? याचा व्यत्यास सर्वच सुखी माणसे सूज्ञ आणि प्रांजळ असतात का ?
३.सुख हे जाणिव असे पर्यंत असते, स्मृती असेपर्यंत नाही.
म्हणजे नीट उलग्डून सांगाल का ? ( कॉलिंग संक्षी.. साहेब तुमचा प्रांत सुरु झालाय )
४. माझ्या समजुतीप्रमाणे " एकक " आणि "व्याख्या" अशा स्वरुपात मांडण्याचे हे गणितच नव्हे ! माझ्या लेखात जे सूत्र सांगितले ते विषय ध्यानात यावा म्हणून !त्या प्रमेयाची सिद्धता करण्यापेक्षा ते विषय समजण्याच्या द्रूश्टीने अंगुलीनिर्देश करते - शाखा -चंद्र न्यायाप्रमाणे ! शाखा सोडा - चंद्र ध्यानात घ्यावा. आणि लघुशंका करण्याचे सुख शारिरिक तर घर बांधण्याचे सुख मनाचे आणु बुद्धीचे सुख , त्याची बरोबरी कशी होईल? एकक एकच असला तरी वेक्टर वेग्वेगेळे आहेत. आणि हे लॉजिकल नाही सायकालॉजिकल आहे !
५. पुन्हा तेच ! तुम्ही गणित मांडत आहात .. येथे फजी लॉजिक (मराठी शब्द ??) चालते बायनरी नाही.० किंवा १ असे उत्तर मिळणार नाही, सारेच सापेक्ष आहे.
६. निरिच्छ माणूस हीच सुखाची अंतिम अवस्था आहे. निरिच्छ म्हणजेच इच्छा नसलेला, ज्याचा छेद शून्य आहे ,त्याचे सुख अनंत ( इन्फिनिटी)
७. अन्य
एकात्म म्हणजे सर्वसमावेशक ! एकात्म शब्द असलेल्या या लिंक पहाव्यात. ekaatma upachaar
ekaatm maanavi darshan
....स्वत्वाचा शोध घेणारांना क्षितिजाचा शोध घेणारांत, पढतमूर्खांत, गिनले असते.थोडक्यात, तुमच्या विचारांचा बेस हा आहे:
परंतु या लेखात भौतिक विश्वाची शास्त्रे वापरून स्वत्वाच्या असण्यावरच प्रश्नचिन्ह उभे केले आहेयू आर डिनाइंग योरसेल्फ! याचा परिपाक म्हणून वरच्या प्रतिसादात मांडलेला प्रश्न तुम्हाला सतत पडत राहणार :
बाय द वे, एकात्म म्हणजे काय?आणि तुम्ही नेहमी हेच विचारत राहणार :
त्याचे कितीही संधी आणि समास केले तरी सुख शब्दाशेजारी हा शब्द विशेषण म्हणून मला नीट समजून घेता येत नाहीय.कारण स्व एकसंध आहे त्याच्या संधी आणि समास होत नाहीत. पहिल्या लेखात तुम्ही जे म्हटलंय : "अवकाश नावाची काही गोष्ट आहे की काहीच नसण्याच्या संकल्पनेलाच अवकाश म्हणतात?" हा खरा प्रश्न आहे! आणि जोपर्यंत अवकाश किंवा स्पेसचा तुम्हाला बोध होत नाही तोपर्यंत एकत्त्वाचा बोध होणार नाही कारण अवकाश हेच एकत्त्व आहे. विटेकरांनी आमंत्रण दिल्यानं इथे आलो अन्यथा मूळ लेखावर चर्चा करण्यात मला स्वारस्य नाही. या प्रतिसादाच्या शीर्षकात नमूद केलेलं तुमचं वाक्य अर्धसत्य आहे. सुख जाणीव असेपर्यंत असतं असं नाही. तरजाणीवेचं स्थिरत्व हे सुख आहे. मनाची किमया अशी आहे की जाणीवेत घडणारी घटना आपल्याला सुख किंवा दु:ख देते असा आपला समज त्यानं करुन दिलाय. आणि ते खरं दु:खाचं कारण आहे. वास्तविकता अशी आहे की आपण स्वतःच सुख आहोत. फक्त एकत्व साधायचंय, स्वतःची स्वतःशी एकरूपता जाणायची आहे. हा `एकसंध स्व गवसणं' (ज्याला सत्य म्हटलंय) ते सुख आहे. त्यामुळे जोपर्यंत माणूस जाणीवेत किंवा स्मृतीत सुख शोधतोय (नॉस्टालजिया हे जाणीवेत निर्माण झालेलं स्मृतीसुख आहे).. तोपर्यंत त्याला ते गवसणार नाही. किंवा गवसलं तरी ते निसटून जाईल कारण प्रत्येक घटना कालबद्ध आहे; मग ती स्मृती असो की प्रत्यक्ष घटना. आणि ज्या क्षणी त्याला स्वत:च्या एकत्त्वाचा बोध होईल तेंव्हा आपण स्वयेच सुख आहोत हे लक्षात येईल.
सुख जाणीव असेपर्यंत असतं असं नाही. तरजाणीवेचं स्थिरत्व हे सुख आहे.मला काय म्हणायचं होतं हे अधिक उचित शब्दांत लिहिलं आहे. ३. स्वत्वाच्या असण्यावरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे असे लिहिले आहे. विचाराअंती असे निघाले आहे. कर्मणी प्रयोग करून वाक्य वाचावे. जे विचाराअंती सिद्ध झाले तर ते नाकारणार कसे? मला काय स्वतंत्र नसण्याची हौस आहे का? ४. एकात्म सुख म्हणजे 'एका आत्म्याचे सुख', 'आत्म्याचे एक सुख', 'एक आत्मा असलेले सुख' असे अर्थ मी लावत होतो. सर्वसमावेशक सुख हा सोपा अर्थ चांगला आहे. ५. एकत्व माझ्यामते गणिती संकल्पना आहे. त्याचे दोन अस्पेक्ट आहेत. १. ही क्रिया एक होण्याची आहे कि एकसमान होण्याची आहे कि संख्यने एक असण्याची/बनण्याची क्रिया २. काय काय असे 'एक' होणार आहे.
क्षणी त्याला स्वत:च्या एकत्त्वाचा बोध होईल तेंव्हा आपण स्वयेच सुख आहोत हे लक्षात येईल.असे आपण म्हटले आहे तेव्हा कोणती क्रिया होणार आहे नि कोणाकोणात होणार आहे हे कळले नाही. सबब वाक्य पहिल्या झटक्यात कितीही श्रद्धेने वाचले तरी पटत नाही.
५. एकत्व माझ्यामते गणिती संकल्पना आहे. त्याचे दोन अस्पेक्ट आहेत. १. ही क्रिया एक होण्याची आहे कि एकसमान होण्याची आहे कि संख्यने एक असण्याची/बनण्याची क्रिया २. काय काय असे 'एक' होणार आहे.नाही. एकत्त्व हा अनुभव आहे. नाऊ ट्राय टू अंडरस्टँड धिस : `सुख ही जाणीवेची स्थिर अवस्था आहे' हा फंडा आहे. त्यामुळे घटना काहीही असो, ज्या क्षणी जाणीव स्थिर होईल त्या क्षणी व्यक्ती सुखी होईल (खरं तर स्वस्थ होईल). याचा अर्थ सुख घटना किंवा स्मृतीवर अवलंबून नाही. आता मानवी मनाची किमया अशीये की ते जाणीवेचं स्थिर होणं; प्रसंग, घटना किंवा प्रक्रियेशी जोडतं त्यामुळे आपल्याला वाटतं सुख जाणीवेत आहे. साधी गोष्ट घ्या. प्रणय हे भूतलावरचं सर्वोच्च शारीरिक सुख आहे. तुम्ही जर कधी प्रणयाचा अत्यंत स्वस्थपणे (म्हणजे उद्याचा दिवस शून्य करुन) उपभोग घेतला तर तुम्हाला असा अनुभव येईल की द प्रोसेस जस्ट कनेक्ट्स द पार्टनर्स टू देमसेल्व्ज! थोडक्यात, प्रणयी युगुलाची (दिवसभराच्या व्यापात) सैरभर झालेली जाणीव स्वतःप्रत येते. हे जाणीवेचं स्वतःप्रत येणं सुख आहे. त्याला जाणीव स्थिर होणं म्हटलंय. यू आर कनेक्टेड टू योरसेल्फ. (ऑर रियली बोथ पार्टनर्स आर कनेक्टेड टू देअरसेल्व्ज). बुद्ध या अवस्थेला शून्यावस्था म्हणतो! कारण काय? तर वेन वन इज कनेक्टेड टू वन सेल्फ, देअर इज नो सेल्फ!... देअर इज ओन्ली स्पेस. एक स्वास्थ्य, संपूर्ण शांतता असते. त्याला व्यक्तीत्वाचा किंवा अहंकाराचा लय होणं म्हटलंय. बरेच लोक दुसर्याला अहंकारी ठरवायच्या नांवाखाली काहीही खपवतात कारण त्यांना स्वतःलाच काही कळलेलं नसतं. तर ही स्पेस, हे निराकार अवकाश, जे आपलं मूळ रुप आहे ते एकत्त्व आहे. आणि तो स्वतःचा अनुभव होणं सत्य गवसणं आहे. पण मन सांगतं सुख प्रणयात आहे! पुढे तर आणखी मजा आहे. मन सुखाची प्रतवारी करतं. प्रणायाच सुख (क्षूद्र), देवभक्तीचं सुख (श्रेष्ठ), नातेसंबंधातली सुखं (आवश्यक), संपत्तीलाभाचं सुख (जगायला अनिवार्य), पर्यटनाचं सुख (नेहमी शक्य नाही पण अधूनमधून हवंच)... आणि कायकाय प्रकार आहेत याची तुम्हाला कल्पना आहेच. अशाप्रकारे माणूस अनुभवजन्य सुखाच्या मागे लागतो आणि ते कालबद्ध असल्यानं (वरुन काहीही दाखवो) आतून नेहमी अस्वस्थ राहातो . पण ज्या क्षणी व्यक्तीला स्वत:च्या एकत्त्वाचा बोध होतो तेंव्हा आपण स्वयेच सुख आहोत हे लक्षात येतं. हा सार्या अध्यात्माचा मथितार्थ आहे.
क्रमश