Skip to main content

एनर्जी व मॅटर

लेखक रणजित चितळे यांनी मंगळवार, 01/05/2012 14:19 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवस एक प्रश्न मनात आहे त्याला समर्पक उत्तर सापडत नाही. आपले विश्व बिगबॅन्गने सुरु झाले अशी थिअरी आहे. त्या पेक्षा पडणारा मोठा प्रश्न म्हणजे, बिगबॅन्ग होण्या साठी लागणारा पदार्थ किंवा घटना अस्तित्वात असायला हवी, तो पदार्थ किंवा ती घटना कोठून आली. एनर्जी व मॅटरच्या आधी काय होते. ते कोठून आले, कशातून आले व ज्याच्यातून आले ते कोठून आले ह्याला समर्पक उत्तर कोणी देऊ शकेल का. मी जालावर प्रयत्न केला समर्पक उत्तर सापडत नाही. कोणी म्हणते की बिगबॅन्गच्याच वेळेला वेळ सुरु झाली. आता वेळ हे आपल्या साठी आहे. वेळेच्या आधी काहीतरी असणारच. काहीच नसेल तर मग हे सगळे उत्पन्न कसे झाले. फक्त एनर्जी होती असे म्हटले तर ती आली कोठून. ती यायला जर स्पेस लागत असेल तर ती स्पेस आली कोठून. कोणी वैज्ञानिक निरुपण करु शकेल का ह्या प्रश्नाचे.

वाचने 37020
प्रतिक्रिया 88

प्रतिक्रिया

In reply to by कवितानागेश

हल्ली इंडिया टीव्ही जास्त बघतेस का ग? (आणि अवांतरः नाझ्का लाईन्सचं शेवट काय झालं??! :D)

स्टीफन हॉकिंग्जचं "द ग्रँड डिझाईन पुन्हापुन्हा वाचून बर्‍यापैकी निराशा झाल्यावर आणि पूर्वी फिजिक्सची पदवी मिळवताना झालेल्या विज्ञानाच्या पायाभरणीवर आता (ग्रँड डिझाईनमधे न म्हटलेलं) असं नक्की वाटतं की विज्ञान (म्हणजे फिजिक्स) या गोष्टीच्या आधारे जगाची उत्पत्ती आणि तत्सम प्रश्न सोडवता येणार नाहीत. याचा अर्थ लगेच समोरचा जे म्हणेल ते मान्य करुन किंवा देव अशी संकल्पना कंपल्सरी करुन एखाद्या श्रद्धेचा किंवा अंधश्रद्धेचा "विजय" झाला असं घोषित करण्याची जरुरी नाही.. माझं असं मत आहे की जगात फक्त "जाणीव" आहे. जन्मल्यावर जाणीव सुरु होते आणि मेल्यावर संपत असावी किंवा तरीही शिल्लक राहात असावी. बाकी ग्रह, तारे, उंची, खोली, आई, बाबा, मित्र, डोंगर, हिरवा, मऊ, सुंदर, गार, गरम, जिवंत वगैरे वगैरे सर्व कॉन्शस असतानच्या "काळा"तला मतामताचा भाग झाला. काळ हा सुद्धा. हे उत्तर अर्थात "शास्त्रीय" नाही. त्यामुळे चितळे ते स्वीकारतील किंवा कसे माहीत नाही. आपण मेल्यावर समजा जाणीव संपत असेल तर जग विश्व युनिवर्स, या गोष्टींचा संदर्भच उरत नाही. जाणीव शिल्लक असली तर मेल्याचं आपल्याला कळतही नसेल. ती आपल्याबाबतीतली केवळ इतरांची एक समजूत किंवा मत असेल.

In reply to by गवि

>>>>आपण मेल्यावर समजा जाणीव संपत असेल तर जग विश्व युनिवर्स, या गोष्टींचा संदर्भच उरत नाही. जाणीव शिल्लक असली तर मेल्याचं आपल्याला कळतही नसेल. ती आपल्याबाबतीतली केवळ इतरांची एक समजूत किंवा मत असेल. ---- गवि, नोट यूवर दीज सेन्टेसेस ;-) नेमकी हीच दिशा पकडून युजींनी 'मृत्यू म्हणजे काय?' या प्रश्नाच्या खोलात शिरण्‍याचा प्रयत्न केला आहे, तो अनुवादित करतो आहे, बहुतेक आज रात्री दोन अडीच वाजता तो अनुवाद टाकतो. थँक्स टू युजी, काही ठिकाणी त्यांनी पटलं तर घ्‍या, नाहीतर चालू पडा असं म्हटलेलं नाही, उलट प्रश्न विचारणार्‍याला त्या प्रश्नात खोलवर शिरायला मदत केली आहे, मला ते प्रचंड आवडलं.

In reply to by यकु

पण हेही एक "मत"च ही अंतिमसीमा मानूनच सगळं.. :) युजी, त्यांची मतं, त्यांची मतं नसणं, देव, शक्ती, अस्तित्व, ई=एमसी स्क्वेअर, आईनस्टाईन, गुरुत्वाकर्षण, पुन्हापुन्हा अनुभवास येणारे विश्वाचे स्थिर नियम, फळ खालीच पडणं.. सारा सारा मतामतांचा किंवा एकमत करण्याचा भाग. असलंच काही खरं तर फक्त आपली... आपलीही नव्हे... एकूण फक्त "जाणीव". ती नक्की आहे. बाकीचं माहीत नाही.. बाकीचा भाग मताचा.

In reply to by गवि

= बिफोर आय स्टार्ट, मी इथलं माझं पहिलं विधान उधृत करतो: प्रश्न महत्त्वाचा नाही, कोणत्या उत्तरानं तुम्ही शांत होता ते महत्त्वाचय कारण प्रश्न दुय्यम आहे, तुम्ही प्रार्थमिक आहात. गवि, शोध ज्यावेळी प्रक्रियेच्या अंगानं घेतला जाईल तेव्हा ते विज्ञान होईल आणि प्रश्नकर्त्याच्या दृष्टीकोनातनं घेतला जाईल तेव्हा ते अध्यात्म असेल. विज्ञानाचा शोध प्रश्नकर्त्यापर्यंत कधीही पोहोचणार नाही आणि जोपर्यंत प्रश्नकर्ता शांत होत नाही तोपर्यंत सर्व वैज्ञानिक शोध जगणं सोपं करतील पण मूळ अस्वास्थ्य मिटवू शकणार नाहीत. तुझा प्रश्न प्रश्नकर्त्याच्या अ‍ॅंगलनं आहे आणि तुझ्या दोन्ही प्रतिसादांचा सारांश असायं: >माझं असं मत आहे की जगात फक्त "जाणीव" आहे. जन्मल्यावर जाणीव सुरु होते आणि मेल्यावर संपत असावी किंवा तरीही शिल्लक राहात असावी. >आपण मेल्यावर समजा जाणीव संपत असेल तर जग विश्व युनिवर्स, या गोष्टींचा संदर्भच उरत नाही. जाणीव शिल्लक असली तर मेल्याचं आपल्याला कळतही नसेल. ती आपल्याबाबतीतली केवळ इतरांची एक समजूत किंवा मत असेल. >असलंच काही खरं तर फक्त आपली... आपलीही नव्हे... एकूण फक्त "जाणीव". ती नक्की आहे. बाकीचं माहीत नाही.. बाकीचा भाग मताचा. =या जगात फक्त एकच गोष्ट निर्विवाद आहे आणि ती म्हणजे आपलं असणं, आपण "मी नाही" असं म्हणू शकत नाही कारण "मी नाही" म्हणायला तरी मी हवाच; किंवा द अदर वे, जाणीव होणारा जाणीवेपूर्वी हजर असायलाच हवा. "हे असणं" ही "जाणीवेपूर्वीची स्थिती" आहे; किंवा द अदर वे, हा आपल्या प्रत्येकाला सतत जाणवणारा मी, आपल्या सर्वांचा एकच आहे. तो एकच असल्यानं निराकार आहे, आदीम आहे, सर्वत्र आहे आणि मुख्य म्हणजे तो जाणीवेनं अनाबाधित आहे. जर आपल्या निव्वळ असण्याच्या जाणीवेशी किंवा त्या जाणीवपूर्व स्थितीशी आपण सतत संलग्न राहू शकलो तर जाणीवेत घडणारी प्रत्येक घटना आपण जाणू शकू मग ती शारीरिक हालचाल असो, विचार असो, भावनांचे कल्लोळ असोत, झोप असो की मृत्यू. ही जाणीवपूर्व स्थिती गवसण्याला किंवा तो सार्वत्रिक मी गवसण्याला सत्य गवसणं म्हटलंय आणि त्या जाणीवपूर्व स्थितीत कायमच्या स्थित झालेल्या पुरूषाला (खरं तर कुणाही व्यक्तीला, पुरुष असो की स्त्री) सिद्ध म्हटलंय. (सध्या सॉलिड बि़झी आहे त्यामुळे इतर सदस्यांच्या प्रश्नांची उत्तरं वेळ मिळाल्यावर देईन)

In reply to by गवि

माझं असं मत आहे की जगात फक्त "जाणीव" आहे. जन्मल्यावर जाणीव सुरु होते आणि मेल्यावर संपत असावी किंवा तरीही शिल्लक राहात असावी. दासबोध दशक ९ समास ६ गुणरुपनिरुपण जाणीव म्हणिजे जाणतें चळण| तेंचि वायोचें लक्षण | वायोआंगीं सकळ गुण| मागां निरोपिलें ||१९|| म्हणोन जाणीवनेणीवमिश्रीत| अवघें चालिलें पंचभूत | म्हणोनियां भूतांत| जाणीव असे ||२०|| पूर्ण समास मूळातूनच वाचावा !

जगभरच्या शास्त्रज्ञांनी आपली 'एनर्जी' अनंत काळपर्यंत पणाला लावली तरी हे 'मॅटर' मिपापुरतेही क्लोज होईल असे वाटत नाही.

आपले सगळ्यांचे प्रतिसाद वाचून मला किती अजून शिकायचे (जाणून घ्यायचे) आहे त्याची ग्वीही मिळीली. छान मुद्देसूद प्रतिसाद पाहून तरी आपण कोठे आहोत व आपल्याला किती जन्म अजून घ्यावे लागणार आहेत ह्याची कल्पना आली. ;)

In reply to by रणजित चितळे

व आपल्याला किती जन्म अजून घ्यावे लागणार आहेत = असा विचार करू नका, कारण समजलं नाही तरी आपण सत्यच राहतो. सत्य समजलं तर आहे आणि न समजलं तर नाही असं नाही. कुणाला समजो न समजो, कुणी दखल घेवो न घेवो, सत्य आहेच कारण सत्य ही कायम स्थिती आहे. एक गोष्ट सदैव लक्षात ठेवा सत्य समजल्यावर जगण्यात तुफान मजाय पण सत्य समजलं नाही म्हणून निराश होण्यात अर्थ नाही, इतर अनेक गोष्टी आहेत ज्यात तुम्ही रमू शकता त्यांचा आनंद घ्या. पण एक मात्र नक्की, जे काय असेल ते आता, या जन्मी आणि इथेच आहे, मग ते सत्य असो की लौकिक, कोणतीही गोष्ट पुढे ढकलण्यात अर्थ नाही

ह्या विषयाशी थेट संबंध नाहीये, पण तुमच्या एका प्रतिसादात तुम्ही म्हटलंय "मला वाटते देव आहे का नाही ह्याचे उत्तर ह्या कोड्यात दडलेले आहे." त्याच्या संदर्भात पूर्वी टि.व्ही.वर पाहिलेली एक मुलाखत आठवली. कोणाची, आणि कोणी घेतलेली ते काही आठवत नाही पण त्यात मांडलेले मुद्दे मात्र लक्षात थोडेफार लक्षात आहेत. "देवाचं कार्यक्षेत्र दिवसेंदिवस कमी होतंय. फार फार पूर्वी दिवस, रात्र, ग्रहण, पाऊस, वादळे, भूकंप हे देवाच्या कृपे/अवकृपेमुळे होतात असा समज होता. पण हळू हळू विज्ञानामुळे त्यामागची कारणं समजू लागली आणि त्यामुळे ग्रहण होतं त्यात देवाचा काही हात नाही हे समजलं. मानवाची उत्क्रांती कशी झाली हे समजल्यावर देवाने माणसाला निर्माण केलं ह्या समजाला तडा गेला. आपलं ज्ञान जसंजसं वाढत जाईल तसं तसं घडणार्‍या प्रत्येक गोष्टीमागील कारणमिमांसा आपल्या ध्यानात येईल आणी आपण देवाला दोष देउन गप्प बसण्यापेक्षा त्या कारणाकडे लक्ष देऊ शकू. देवावर हवाला ठेऊन जगायला सुरूवात केली तर आजूबाजूला होणारी प्रत्येक गोष्टीकडे कुतूहलाने न पाहता 'देवाची करणी' असं म्हणून माणूस गप्प बसेल आणि त्याच्या बुद्धीची वाढच खुंटेल." तुमच्या ह्या प्रश्नाचं पण तसंच आहे. जोपर्यंत विज्ञानाकडे ठाम उत्तर नाही तोपर्यंत हे विश्व निर्माण करणारा कोणीतरी / देव आहे असा समज राहिल. सहज आठवलं म्हणून सांगतो, कॉलेजमधे असताना मी माझ्या मित्राबरोबर आकाशदर्शनासाठी वांगणीला जात होतो. ट्रेन मधे गप्पा मारताना, त्याला म्हणालो, ज्याप्रमाणे भोवरा स्वत:भोवती फिरताना त्याचा अक्ष स्थिर नसतो, तसंच पृथ्वीचाही अक्ष स्थिर नसतो. त्यामुळे ध्रुवतारा आज जरी आपल्याला एका ठिकाणी दिसत असला तरी हजारो वर्षांपूर्वी तो तिथे नव्हता." यावर माझा मित्र म्हणाला, "म्हणजे ध्रुव बाळाला मिळालेलं अढळपद खरं नाही असं तुला म्हणायचंय का? तुझा त्यावर विश्वास नाही का?" या त्याच्या प्रश्नावर मला काय बोलावं तेच समजेना. त्याला समजावण्याच्या भानगडीत मी काही पडलो नाही. काही काही वेळा गप्प बसणंच जास्त सोयिस्कर असतं. असो.

In reply to by मराठे

>>म्हणजे ध्रुव बाळाला मिळालेलं अढळपद खरं नाही असं तुला म्हणायचंय का? तुझा त्यावर विश्वास नाही का? --ठ्ठो... अर्धवतराव

का? हा वस्तुशी -वस्तुच्या परस्पर संबंधांचा किंवा किंवा वस्तुच्या अंतर-रचनेचा शोध आहे विज्ञान जे आहे त्याचा उलगडा करतं हा एक मस्त ज्योक आहे , शिक्षिका : गुरुत्वाकर्षण हा मानवी जीवनातला अत्यंत महत्वाचा शोध आहे आणि तो न्यूटनला सफरचंद झाडावरनं खाली का पडतं ? असा विचार केल्यानं लागला विद्यार्थी : मॅम, गुरुत्वाकर्ष्णाचा शोध लागण्यापूर्वी सफरचंदं खालून वर जायची का? ट्राय टू अंडरस्टँड , प्रक्रियेचा अंत शोधता येत नाही हे शास्त्रज्ञाचं शल्य आहे आणि त्या अर्थी `का'? हा अंतीम अनुत्तरित प्रश्न आहे. ऑन एनी लाईन ऑफ इन्क्वायरी वन कम्स टू अ `कल डी सॅक'; काय कारण असेल त्याच? तर एव्हरी थींग अल्टीमेटली टर्न्स इंटू अ मिस्ट्री! आइनस्टाईननं म्हटलय... If I would be a young man again and had to decide how to make my living, I would not try to become a scientist or scholar or teacher. I would rather choose to be a plumber or a peddler in the hope to find that modest degree of independence still available under present circumstances.” या अर्थानं `का'? हा अंतीम अनुत्तरित प्रश्न आहे. पण अध्यात्म हा प्रक्रियेचा शोध नाही, तो ज्यात प्रक्रिया सुरु होते, चालते आणि संपते त्या अवकाशाचा शोध आहे कारण ते सर्व प्रक्रियांचा स्त्रोत आहे आणि म्हणून रहस्यांच रहस्य आहे. हॉकिंग जेव्हा "बिकॉज देअर इज अ लॉ सच ऍज ग्रॅविटी, दि युनिव्हर्स कॅन अँड विल क्रिएट इटसेल्फ फ्रॉम नथिंग" म्हणतो त्या नथिंगनेसला बुद्ध शून्य म्हणतो. शास्त्रज्ञ उलगडा होत नाही म्हणून व्यथित होईल आणि बुद्ध अंतीम रहस्य गवसल्यानं शांत होईल इतकाच फरक आहे

In reply to by संजय क्षीरसागर

एकूण काय कोणी काहीही म्हणो, विज्ञानात आज तरी मला सतावणा-या प्रश्नाला उत्तर नाही. मग लोक दुसरीकडे त्याचे उत्तर शोधायचा प्रयत्न करतात. त्या दुसरीकडच्या प्रयत्नाला काही लोक अध्यात्म म्हणतात. काही लोक फिलॉसॉफी म्हणतात, तर काही लोक विज्ञान म्हणतात. शिक्षिका : गुरुत्वाकर्षण हा मानवी जीवनातला अत्यंत महत्वाचा शोध आहे आणि तो न्यूटनला सफरचंद झाडावरनं खाली का पडतं ? असा विचार केल्यानं लागला विद्यार्थी : मॅम, गुरुत्वाकर्ष्णाचा शोध लागण्यापूर्वी सफरचंदं खालून वर जायची का? अवांतर काही लोक न्यूटनला कॉन्स्टीपेशन होते का विचारतात. कारण नाही तर गुरुत्वाकर्षणाचे ज्ञान त्याला लहानपणीच झाले असते. ;-) प्रत्येकाला सत्याची (ऋताची) उपरती व्हावा लागते, जेव्हा होते तेव्हा मग तो न्यूटन होतो, आईनस्टाईन होतो, ज्ञानेश्वर होतो, तुकाराम होतो, रमणा होतो, बुद्ध होतो, विवेकानंद होतो, किंवा फिलॉसॉफर होतो. बाकीचे मग त्यांचे अनूयायी होतात खरे पण अर्ध्या मुर्ध्या ज्ञानावर. मग एकमेकात भांडत बसतात विज्ञान श्रेष्ठ का अध्यात्म श्रेष्ठ. खरा विषय राहातो बाजूला. जेव्हा खरा विषय कळतो तेव्हा मग उपरती होते व त्यातून नवा न्यूटन किंवा ज्ञानेश्वर तयार होतो....

In reply to by रणजित चितळे

एका चांगल्या चर्चेबद्दल आभार

In reply to by संजय क्षीरसागर

स्पष्टीकरण र्‍हायलं की वो !!