मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रे मना ..

सांजसंध्या · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
रे मना .. रे मना मोती पुन्हा निखळून गेले थेंब डोळ्य़ांतील हे निथळून गेले आस होती आठवांना आसवांची मेघ तेव्हां गांव हे वगळून गेले श्वास होते रोखलेले मी कधीचे भास होते खास आज कळून गेले जीव घेणे घाव देही सोसले मी शीतवारे ना कधी जवळून गेले खेळ जेव्हां जीवनाचे साहवेना शोधते वैरी कुठे वितळून गेले - संध्या (२३.२०.२०१०) गझलसम्राट कै सुरेश भट यांच्या एका गझलेतून प्रेरणा घेऊन

वाचने 3563 वाचनखूण प्रतिक्रिया 26

चैतन्य दीक्षित 20/03/2012 - 17:13
एकंदरित छान आहे गझल. फक्त- भास होते खास आज कळून गेले इथे- खास आ- जकळून गेले- असे तोडून वाचावे लागले (मला तरी) त्यामुळे वृत्तात/मीटरमधे असूनही थोडं खटकलं. चू. भू. दे. घे.

प्रचेतस 20/03/2012 - 17:27
सुंदर कविता.
- संध्या (२३.२०.२०१०)
हा २० वा महिना कुठला ब्वा याचा विचार करतोय.

धन्या 20/03/2012 - 18:39
कुणीतरी रसग्रहण टाका रे. दोन दोन ओळींच्या जोडीतील फक्त पहिल्या ओळीच कळल्या. दुसर्‍या ओळीचा पहिल्या ओळीशी काय संबंध आहे हे आमच्या आधीच अधू असलेल्या मेंदूवर जोर देऊनही कळले नाही. मी अकरावी बारावीला असताना लिहिलेल्या चारोळ्यांची वही खुप शोधली पण सापडतच नाही.

सांजसंध्या 20/03/2012 - 18:55
@ वल्ली फेब्रुवारी आहे तो महिना :) वर्षाचा दुसरा @ धनाजीराव = करा कि बिनधास्त रसग्रहण... मला शिकायलाच मिळेल त्यातून. तुमच्या सूचनेवर विचार करेन नक्किच @ गणेशा - नेकी और पूछ पूछ ? @ चैतन्य दीक्षित - यती भंग म्हणायचंय का ? मान्य आहे. तुम्ही ज्या लयीत वाचली त्यावर अवलंबून आहे. @ अतृप्त आत्मा - :)

हारुन शेख 20/03/2012 - 19:10
'आस होती आठवांना आसवांची मेघ तेव्हां गांव हे वगळून गेले' हा शेर काय जमून आलाय, बहोत उंचे ! या एका शेराने जिंकलेत तुम्ही आम्हाला. तुमची प्रतिभा लखलख करणाऱ्या बिजलीसारखी प्रकट झालीय या कडव्यात ! लिहित राहा. -----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

In reply to by हारुन शेख

धन्या 20/03/2012 - 19:58
तुमची प्रतिभा लखलख करणाऱ्या बिजलीसारखी प्रकट झालीय या कडव्यात !
आमच्या पुणे ३० मधल्या एका मित्राने याच कवयित्रीच्या एका कवितेवर दिलेला प्रतिसाद आठवला. :)

सांजसंध्या 20/03/2012 - 19:14
@ धनाजीराव.. बघा बरं पटतं का हे स्पष्टीकरण.. रे मना मोती पुन्हा निखळून गेले थेंब डोळ्य़ांतील हे निथळून गेले आयुष्यातले चांगले क्षण (जे हसू आणू शकतात ) ते निखळून गेलेत... पुढची ओळ कल्पनाविस्तार फक्त.. आस होती आठवांना आसवांची मेघ तेव्हां गांव हे वगळून गेले आठवणी अशा दुं:खद कि अश्रूंचीच आस होती.. पण ( अश्रूंनी भरलेले) मेघ ही ते गाव वगळून गेले.. रडण्याचीही सोय राहिली नाही.

In reply to by सांजसंध्या

धन्या 20/03/2012 - 20:15
आस होती आठवांना आसवांची मेघ तेव्हां गांव हे वगळून गेले आठवणी अशा दुं:खद कि अश्रूंचीच आस होती.. पण ( अश्रूंनी भरलेले) मेघ ही ते गाव वगळून गेले.. रडण्याचीही सोय राहिली नाही.
वरची प्रतिक्रिया पहिल्या वाचनानंतरची होती. काहीशी दुर्बोध वाटली कविता, कदाचित माझी कवितांबद्दलची जाण कमी असेल. :)

In reply to by धन्या

सांजसंध्या 20/03/2012 - 20:19
कदाचित माझी कवितांबद्दलची जाण कमी असेल. अजिबात वाटलं नाही असं :) खरंतर तुमचा मुद्दा रास्त वाटला म्हणूनच स्पष्ट केलं. त्रुटी दाखवतानाही कुणी दुखावला जाणार नाही ही काळजी तुम्ही घेतली .. मनापासून आभार आपले

पैसा 20/03/2012 - 19:42
यतिभंगावर कोणी तरी उपाय सुचवा रे! चर्चा उत्तम चाललीये!
माला भ्या वाटतीय रसग्रहनाची म्हून म्ह्न्तो माला खालील ओळ्या लई अवाल्ड्या जीव घेणे घाव देही सोसले मी शीतवारे ना कधी जवळून गेले कारन रसग्ग्रहनात माजी अवास्ता आशीच झाली व्हती फक्कस्त " घाव देही" च्या जाग्याव "घाव मणि" ह्ये शबूद टाका .मंग बराबर माजीच आवास्ता कवयित्रीने दर्शविली. म्हंजी साहित्याकाला परकाया पर्वेशाचा वरदहस्त आसतो आसं ज्ये मंगेशमामा पाडगावकर म्हंतात त्ये खरंच हाये म्हनायचं !
"आस होती आठवांना आसवांची मेघ तेव्हां गांव हे वगळून गेले"
वरवर चित्रदर्शी, पण खोलवर कृत्रिम. आठवांना आसवांची आस म्हणजे काय? यामध्ये कुठल्याच जीवंत चलनवलनाचे चित्रण दिसत नाही, फक्त शब्दासमोर शब्द दिसतो. मेघातून आठवांच्या अश्रूची अपेक्षा आहे आणि ते गाव वगळून पुढे निघून गेले म्हणजे रडू आले नाही का? आठवण --> रडणे वि. सू. : हा प्रतिसाद एका आजोबांकडून लिहून घेण्यात आला आहे ;-) मला शिव्या देऊ नये. ;-) पळा ऽऽऽ ! ((शब्दांचा खाटीक J-) ) यक्कू क्रूरसिंह

सांजसंध्या 21/03/2012 - 07:44
यक्कू माझं त्या आजोबांशी कसलंही भांडण नाही. पण मधेच गदिमा, मधेच हिरवं आकाश ...कळ्ळं ना ? ;) पोस्टमार्टेमला फुल्ल परवानगी आहे.

In reply to by सांजसंध्या

चौकटराजा 21/03/2012 - 08:56
रसग्रहनाला पोस्टमारर्टेमची उपमा द्यावी ?याबिगर दुसरा शबूद आपल्या शब्दकळेतून आला का न्हाई ? एकांद दुसरा फाल्ट काल्डा म्हून येकदम संदेश बांद ? आनि आपला ल्हानपनचा ख्योळ आटावतो का? कुनी ग्या हा कुनी ग्या तो . अंग तस्शावानी आमी म्हंतो तुमी घ्या ग्रेस भट आम्ही ग्येतो मंगू आन्ना आन गंपटराव ( हा शबूद पु भा भाव्यांचा बर्का ! ) .

In reply to by सांजसंध्या

चौकटराजा 21/03/2012 - 14:07
ह्यो डायलाग जगाच्या इतिहासामंदी द्वोगंच म्हंगाले . येक म्हंजी दशेरत आनि दुगला म्हंजी गांदीबाबा ! आन दोगं बी बाप्ये व्हते ! संदरब - विकी चा पेड्या

मिसळलेला काव्यप्रेमी 21/03/2012 - 10:33
छान प्रयत्न!