प्रिय अण्णा,
सर्वप्रथम तुमच्याबद्दल अत्यंत आदर व्यक्त करतो. तुमचं स्वच्छ चारित्र्य, तुमची साधी राहणी, तुमची सात्त्विकता, तुमच्यातली सादगी, तुमच्यातली निरागसता, तुमचं सेवाव्रत या सर्वांना माझा सलाम. अगदी मनापासून. अण्णा, खूप भावता तुम्ही मला..
आता काही मुद्दे -
१) काही दिसांपूर्वी तुम्ही आणि तुमची टीम असं म्हणत होतात की सरकारनं त्यांच्या लोकपालपदासोबत तुमचंही जनलोकपाल बील संसेदेपुढे किमान सादर तरी करावं; मग संसद त्यावर जो निर्णय घेईल तो तुम्हाला मान्य असेल. किंवा त्यावर आधारीत पुढील वर्चा किंवा आंदोलनाची दिशा ठरवता येईल.
२) पण सरकारने नेहमीप्रमाणे सगळ्यांना धोका दिला आणि फक्त स्वत:चंच बील सादर केलं. त्यामुळे सरकारच्या या फसवणुकीविरुद्ध तुम्ही उपोषणाला बसलात ज्याला माझ्यासकट अनेकानेकांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला.
३) या आंदोलनाच्या दरम्यान तुम्ही हेही म्हणत होतात की तुम्हाला सरकार पाडण्यात वगैरे काहीही स्वारस्य नाही, तुम्ही फक्त भ्रष्टाचाराविरुद्ध एक सशक्त कायदा आणू इच्छिता.
४) परंतु काल तुम्ही सरकारला असा इशारा दिलात की सरकारने ३० ऑगस्ट पर्यंत हे बील पास करावं किंवा जावं! (पायउतार व्हावं), जे 'हे सरकार पाडण्यात मला काहीही स्वारस्य नाही..' या विधानाशी विसंगत ठरतं..!
५) अण्णा, अनेक सरकारांनी गेल्या ४२ वर्षात काहीना काही कारणं, सबबी सांगून लोकपाल बील अस्तित्वात आणलं नाही हे अगदी मान्य. त्याकरता जनतेतल्या प्रचंड असंतोषाला तुम्ही तोंड फोडलंत हेही नक्कीच खूप मोठं काम. परंतु एक गोष्ट मी इथे सांगू इच्छितो की,
अ) जरी एखाद्या कायद्याला ४२ वर्ष उशीर झालेला असला तरी,
ब) किंवा आज प्रचंड लोकपाठिंब्याच्या बळावर तुम्ही लौकरात लौकर हा कायदा करण्यास सरकारला भाग पाडलं असलं तरी,
क) किंवा याच लोकबळावर तुम्ही सरकारच्या सिंहासनाला धक्का लावलेला असला तरी,
येत्या चार आठ दिवसात घाईघाईने एखादा कायदा उरकल्यासारखा मंजूर करणं हे कधीही कधीही उचित होणार नाही, किंबहुना इतक्या कमी काळात भ्रष्टाचारासारख्या कॅन्सर विरोधातला एखादा कायदा मंजूर होणं ही मला तरी अशक्य गोष्ट वाटते. त्यावर निश्चितच समाजातल्या अगदी सर्व बुद्धिवंतांकडून, विद्वानांकडून, वकिलांकडून अधिकाधिक चर्चा व्हायला हवी असं माझं मत आहे.
आणि म्हणूनच ३० तारखेच्या आत आमचंच लोकपाल बील जसंच्या तसं पास करा नाहीतर चालते व्हा, हा मला तरी थोडासा अट्टाहासच वाटतो. परंतु हा केवळ तुमचाच अट्टाहास आहे/असेल असंही मला मुळीच वाटत नाही. या मागचा तुम्हाला पुढे करून आपला अजेंडा मांडणारा बोलविता धनी कोण आहे हे मला माहीत नाही..! असं वाटण्याचं कारण असं की महाराष्ट्रातही तुम्ही अनेक आंदोलनं/उपोषणं केली आहेत आणि आवश्यक तिथे किंवा बहुतांशी वेळेला समजुतीनं घेऊन आवश्यक ती माघार घेऊन संबंधितांना आवश्यक ती स्पेसही दिली आहे असा अनुभव आहे. परंतु या वेळेला मात्र इतर काही मंडळींकडून तुम्हाला मुद्दामून जिवघेण्या जिद्दीला भाग पाडलं जात आहे असा मला संशय आहे..!
६) अण्णा, अजून काही गोष्टी मांडू इच्छितो -
अ) आम्ही तुम्हाला ओळखतो अण्णा, तुमच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. परंतु अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदिया ह्या गेल्या ३-४ महिन्यातच अचानक उगवलेल्या व्यक्तिंना मी किंवा इतर भारतीय जनता ओळखत नाही. यांच्या अजेंड्याबद्दल, किंबहुना 'त्यांच्यात काहीही हिडन अजेंडा नाही..' असं निदान मी तरी छातीठोकपणे म्हणू शकत नाही..!
ब) एक कर्त्यव्यदक्ष पोलिस अधिकारी या नात्याने मी किरण बेदींना नक्कीच आदारपूर्वक ओळखतो. परंतु ह्या आंदोलनात मात्र 'त्यांच्याकडेही काहीही हिडन अजेंडा नाही..' असं का माहीत नाही, परंतु मी ते म्हणू शकत नाही..!
तेव्हा अण्णा, लहान तोंडी मोठा घास घेतो आणि इतकंच सांगतो, की अण्णा जपा. स्वत:ला जपा..! आज तुम्ही अरविंद केजरीवाल, सिसोदिया आणि किरण बेदी यांच्या पूर्णपणे नसलात तरी बर्याच अंशी कह्यात गेला आहात असं मला जाणवतं आहे आणि भितीही वाटते आहे.
अण्णा, तुम्ही खूप आपले वाटता म्हणूनच इतक्या मोकळेपणाने लिहितो आहे. दिल्ली, आपला देश इत्यादींबद्दल मलाही नि:संशय खूप आदर आहे. परंतु अण्णा, आजही तुम्ही राळेगणसिद्धीला हवे आहात, देशापेक्षाही महाराष्ट्राला प्रथम हवे आहात इतकंच नम्रपणे सांगू इच्छितो..
अजून काय लिहू..?
तुमचाच,
तात्या.
वाचने
50061
प्रतिक्रिया
138
मिसळपाव
प्रतिक्रिया
?
In reply to विद्वान मंडळी या आंदोलनाला by llपुण्याचे पेशवेll
अशा भ्रमित करणार्या पोस्टस
लेख आवडला
लेखावरील प्रतिक्रियादेखील
In reply to लेख आवडला by क्लिंटन
पोटदुखी
In reply to लेख आवडला by क्लिंटन
"येन-केन प्रकारेण प्रसिद्धा ’रुंधती भवेत्"!
In reply to पोटदुखी by विकास
लेख
In reply to पोटदुखी by विकास
सर्वप्रथम पुष्कळ नविन माहिती
In reply to लेख by क्लिंटन
अरूंधती रॉय यांची मतं पटोत ना
In reply to सर्वप्रथम पुष्कळ नविन माहिती by अप्पा जोगळेकर
+१
In reply to अरूंधती रॉय यांची मतं पटोत ना by ३_१४ विक्षिप्त अदिती
अच्छा
In reply to अरूंधती रॉय यांची मतं पटोत ना by ३_१४ विक्षिप्त अदिती
प्रतिसाद
In reply to सर्वप्रथम पुष्कळ नविन माहिती by अप्पा जोगळेकर
मूव्हिंग गोलपोस्ट्स
In reply to लेख by क्लिंटन
सहमत
In reply to मूव्हिंग गोलपोस्ट्स by प्रदीप
क्लिंटन आणि प्रदीप
In reply to मूव्हिंग गोलपोस्ट्स by प्रदीप
+१
In reply to क्लिंटन आणि प्रदीप by आळश्यांचा राजा
वा! बर्याच दिवसांनी तुम्हाला इथे पाहून बरे वाटले!
In reply to क्लिंटन आणि प्रदीप by आळश्यांचा राजा
"त्यांनी हे लक्षात घ्यायला
In reply to क्लिंटन आणि प्रदीप by आळश्यांचा राजा
माझं काहितरी चुकतय !!
In reply to लेख आवडला by क्लिंटन
चेपु
In reply to माझं काहितरी चुकतय !! by अर्धवटराव
खी खी!
In reply to चेपु by चेतन
हाच लेख सकाळमधे भाषांतरीत
In reply to लेख आवडला by क्लिंटन
बाब्या आणि कार्टे
In reply to हाच लेख सकाळमधे भाषांतरीत by llपुण्याचे पेशवेll
अण्णा आणि त्यांच्या
लेखातील मतांशी असहमत.
अवांतराशी अत्यंत सहमत.
In reply to लेखातील मतांशी असहमत. by आत्मशून्य
''कारण इथं अण्णां सोबतच किरण
In reply to लेखातील मतांशी असहमत. by आत्मशून्य
अण्णांच्या तथाकथित
In reply to ''कारण इथं अण्णां सोबतच किरण by ५० फक्त
नेहेमीप्रमाणेच द्विधा
.
In reply to नेहेमीप्रमाणेच द्विधा by शुचि
+१
In reply to . by पंगा
काही प्रश्न
अण्णांच्या अटी
पण राहुल गांधी? काय कारण
In reply to अण्णांच्या अटी by सुनील
सर्व मतमतांतरे वाचली. ज्ञानात
तेव्हा अण्णा, लहान तोंडी मोठा
लसावि
भावनिक... भरकट्लेला..
जनलोकपाल विधेयकाचा हट्ट
ड्वाळे पाणावले
सहमत
In reply to ड्वाळे पाणावले by प्रियाली
सर्व माहिती वाचली .. छान
>> कोणीही उठेल आणि कायम
In reply to सर्व माहिती वाचली .. छान by गणेशा
+१
In reply to >> कोणीही उठेल आणि कायम by शुचि
शुचि ताई, नम्स्कार
In reply to >> कोणीही उठेल आणि कायम by शुचि
..
तुमी असं म्हणताय का नाही मग
लेख उत्तम आहे