Skip to main content

(वर्षाव)

(वर्षाव)

Published on गुरुवार, 19/08/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
छ्या छ्या, आजकाल बायका दारू पिऊ लागल्या. बीयर, वाईन आणि लिकरमधला फरक तरी कळतो का त्यांना? निदान दारू पिऊन मिपावरती धागे तरी टाकू नयेत. धागे कसले, कॉकटेलमध्ये भिजून ओल्यागिच्च झालेल्या कागदी स्ट्रॉ. आजकाल त्याही मिळत नाहीत. माझ्याकडे एक शेवटची स्ट्रॉ आहे ती टाकून देतो. मग बघतोच उंटाची पाठ कशी मोडत नाही ते. ---------------------------------------------------------------------------------------------- लाहोल बिलाकुवत. तौबा तौबा. या काफरांची ही मिजाज! हे अल्ला परवरदिगार, आता तूच माझं रक्षण कर रे बाबा या रावणी पिठल्यापासून. ---------------------------------------------------------------------------------------------- तो गोसावी रोज येतो. अल्लख म्हणतो. आपल्या भोकरी डोळ्यांनी मला निरखून बघतो. नजर हळूच खाली घरंगळते. पण घेत मात्र काहीच नाही. मला वाटत राहातं एकदा तरी त्याच्या झोळीत भाकर घालताना त्याच्या हाताला हात लागावा. मोहरून माझी मान खाली जाईल, तरी मी चोरटा कटाक्ष एखादा टाकेनच. कल्पनेने सुद्धा हुळहुळून जायला होतं. पण रीत आड येते, त्यालाही. मी ही अशी वांझ, मग तो माझ्या हातची भिक्षा कशी घेणार. हं. बघतेच कशी नाही घेत ते. ---------------------------------------------------------------------------------------------- आपून सगळा करून पायला. साला तिला सगळा उलटाच वाटला तर मी पन काय करनार. आयला माज्याकडचं सगलं काडून दिला, तर ती म्हनतीय वासना. तिच्याच पाठी लागलेल्या एका यडच्याप प्वाराला जरा दमात घेऊन कळवळीची विनंती क्येली तर ती म्हंती मीच गुंड म्हणून. तिची एक मैत्रीण होती जरा 'अडचणीत' तर मी मोठ्या मनाने पैशे दिले हॉस्पिटल वगैरे साठी, तर ही म्हंते दीखावा नुसता. आता मला नीट आटवत नांय हां.. त्ये सगला काडून दिला तेवा दीखावा म्हनली असंल आणि मैत्रिणीच्या वेळी वासना म्हणाली असंल. कायका आसंना पन मुद्द्या काय, कसा वागू मी शहाण्यासारखा................ई...ई......ई......ई.........ईईईईई......................ही पाल कुठनं टपकली मधेच? ---------------------------------------------------------------------------------------------- कॉसकोचा प्रवास करून आताशा माझं वजन वाढायला लागलंय. तिकडे काय मस्त मस्त सॅंपलं मिळतात - हाताळायला आणि चापायलासुद्धा. त्यात एचार वाल्यांनी प्रोसेस इंप्रुव्हायला सांगितली - आणि मीसुद्धा ती घरीच इंप्लिमेंट करायला गेले. ती दूतीही नव्हती तिथे, ते बरंच. नव्या प्रोसेसमुळे अर्ध्या वाटेवर जी पाठीत उसण आली, की विचारू नका. तरी बरं नवरा कधी नव्हे तो नेमका कामाला आला. पण त्याची आणि आमच्या मुलीची छद्मी नजर अजून जात नाही डोळ्यासमोरून. ---------------------------------------------------------------------------------------------- तर मंडळी, या वर्षी आपल्याला रस्तेबांधणीचं बजेट जास्त मागून घ्यायचं आहे. काय आहे की थ्री डी एक्स्प्रेस बांधायची आहे ना! आणि तरीही पुरले नाहीत तर करून टाकू झुमरीतलैया ते पटणा आणि होस्पेट ते गुलबर्गा कॅन्सल. काय म्हणता, पुणे तळेगाव कॅन्सल? छे छे, मला या पुणेकरांशी पुन्हा वाद उकरून काढायचा नाही. एकदा त्यांच्या ब्ल्याक बुकात गेलो तेवढं पुरेसं आहे. ---------------------------------------------------------------------------------------------- आमचे बाबा म्हणजे ना, अगदीच हे आहेत. स्वत्ताला ज्यादा शाने समजतात. मला काच फुटण्याविषयी सांगतात. म्हणतात हॉकी स्टिकने फोडायची. मला काय कळत नाही का? आता मोठा आहे मी. आत्तापर्यंत खूप बाटल्या फुटल्या... ---------------------------------------------------------------------------------------------- आपण इंचाइंचाने काश्मीरमध्ये माघार घेत आहोत. फार बिकट परिस्थिती आहे, आपले प्रधानमंत्री, आपले राष्ट्रपती, आपले लष्कर अशी सारी गुमान कां बसली आहेत? आजच जोरदार कारवाई करायला हवी. नाहीतर हे जर असंच चालू राहिलं तर दीडेक लाख वर्षात आपल्याला जम्मू-काश्मीरवर 'उदक सोडून' बाहेर पडावे लागेल. आणि दहा पंधरा लाख वर्षात संपूर्ण भारत गमावून बसू, आणि युरोपासारखी परिस्थिती येईल. लवकर पोस्टकार्ड टाका, वेळ फार नाही. ---------------------------------------------------------------------------------------------- कविते, तू भाजी होशिल का... स्फुरलीस तू अवचित मजला, पोळीचा परि तवा तापला, भेंडी होऊनी ताकामधली, वदनी माझिया कवळशिल का ? कविते, तू भाजी होशील का ? ('गे कविते, तू भाजी होशिल का...' नकोच ते. भलेभले चळतात.) ---------------------------------------------------------------------------------------------- आजकाल मिपावर बऱ्याच चर्चा चालू आहेत. इतकंच नाही, तर त्या चर्चा कशा चालाव्या, किंवा चालू नयेत यासाठी कोणत्या सूचना देणं रास्त आहे, हे शोधून काढण्यासाठी कौल टाकावे का असा कौल टाकण्याची चर्चादेखील चालूच आहे. एक अस्सल मराठी माणूस म्हणून आम्हीही या सगळ्यात हिरीरीने भाग घेत आहोत, घेत राहू. पण नुकतंच सरपंचांनी चर्चा टाळाव्यात, वारंवार सूचना टाळाव्यात, मिपा सर्वांचंच आहे अशा अनेक गोष्टी सांगितल्या असतानाही या चर्चा चालवाव्यात का? आपल्यासारख्या थोरामोठ्यांकडून या समस्यांवर काही प्रकाश पडेल अशी आशा आहे. की कौलच टाकावा सरळ? ---------------------------------------------------------------------------------------------- ऊलिखांनी गांजलेला शक्तिशाली सिंह मी काय सांगू लायसॉल्ला आयळीची ही व्यथा ----------------------------------------------------------------------------------------------
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 11112
प्रतिक्रिया 47

प्रतिक्रिया

खल्लास विडंबन! __/\__ रावणी पिठल्यापासून परवरदिगारने रक्षण करणे.. हाहाहाहाहा.. (नतमस्तक)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

हेच म्हणतो. हहपुवा.

In reply to by बेसनलाडू

खल्लास विडंबन! हाहाहाहाहा.. बाकी चालू दे... (वाचक)केशवसुमार

In reply to by केशवसुमार

+३

खल्लास!! =)) =)) तुझ्याकडून हे येणार ह्याची खात्रीच होती!! ;) (रावणगोसावी)चतुरंग

राजेशभाऊ, खणखणीऽऽत!!! खरं तर "हाण तिच्या मा**!!" म्हणणार होतो पण.... जाऊ द्या, भावना समजून घ्या!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

एका दगडात अनेक पक्षी. एका गोळीत अनेक निशाणे. उच्च, खणखणीऽऽत आणि बरेच काय काय!

In reply to by भाऊ पाटील

कसा वागू मी शहाण्यासारखा................ई...ई......ई......ई.........ईईईईई......................ही पाल कुठनं टपकली मधेच? हे खासच !! ई ई ई !! =))

स्मायल्या कुठे लपवल्यात सरपंच जाणे... =)) असो..आमच्यापण भावना जरा समजूनच घ्या.. झक्कास विडंबन... (पण याला नेमके कशाचे विडंबन म्हणावे? एकाच दगडात किती पक्षी मारायचे याला काही धरबंध असावा कि नाही याविषयी एक लेख टाकीन म्हणते..)

In reply to by शिल्पा ब

आज मी काय म्हणते अशी स्वाक्षरीच टाका शिल्पाताई. म्हणजे 'आज अमुकवर कौल टाकेन म्हणते', 'आज तमुकवर काथ्याकूट टाकेन म्हणते' इ. (स्वाक्षरीकार)बेसनलाडू अर्थातच, ह. घ्या. (टवाळखोर)बेसनलाडू

दुसरे शब्द नाहित. साष्टांग दंडवत घ्या हो आमच्याकडून....

आवरा!!!! गुर्जी, येक सेन्च्युरी इथेच झाली वो!!! __/\__ -- (अनावर) असुर

:) :) :) :) :) :)

वर्षाव फार्फार आवडला. वमनाच्या विडंबनाला आता काय म्हणावे या विचारांना प्रवृत्त करणारा वगैरे वाटला.

(राघाफ्याक्लबाचा संस्थापक) मिभो

In reply to by मिसळभोक्ता

गुर्जी झिंदाबाद!!!!!!!

In reply to by सहज

गुर्जींचा विजय असो. (राघाफ्यानक्लबाची सभासद) अदिती

सॉलिड!

खल्लास विडंबन! खपलो. गुर्जींकडून असं काहीतरी येणार याची अपेक्षा होतीच. मात्र हा धबधबा फारच भारी ;-)

=)) =)) पुढील स्मायली शिरसाष्टांगाचा समजावा ==O०=>

लै भारी....! -दिलीप बिरुटे

हुच्च!!!

आचार्य अत्रे यांनी हयातीत विडंबनाच्याबाबतीत कौतुक केले ते फक्त "दत्तु बांदेकर" यांचेच ! पण आज त्यांच्या (पक्षी : अत्र्यांच्या) आत्म्याने मिपावरील विडंबनाचा हा भन्नाट प्रकार पाहिला/वाचला, तर ते श्री.राजेश घासकडवी यांना आपल्या कवेत घेऊन प्रेमाचा वर्षावच करतील. दिल्खुष कॅफे लिखाण !

हे म्हणजे एकदम महाभारतातील लढाई पाहत आहे असे वाटले. एका बाणातुन २ बाण मग ४ बाण मग ८ असे करत करत एका वारात सगळे गारद. :) :D ;)

विडंबन नव्हे, मूळ लेखाचे मराठी संस्थळावरचे प्रतिबिंब वाटले. आवडले...

लै भारी! :)

गुर्जी शॉल्लॅड !! एकदम ................ई...ई......ई......ई.........ईईईईई...................... षटकार. __/\__

लै लै काम होतं म्हणुन निवांत वेळ मिळेपर्यंत हे वाचायचं नाही असं ठरवलं होतं, कीती बरं केलं. (इतक्या उशिरा खिदळलो म्हणुन रुममेट्स नी चार शिव्या हासडल्या ते सोडा) मजा आला. उगाच नाही आम्ही गुर्जींचे शिष्य. -घासु गुर्जींचा आद्य शिष्य निळ्या.

वर्षाव फारच आवडला. रावांची सर, तुमचा वर्षाव यानंतर कोणाकडूनतरी ढगफुटीच्या प्रतीक्षेत.

मराठी माणुस पुढे का जात नाही,ह्याचे मिपावरचे अजुन एक उदाहरण. राजेश भाउ लावा तुम्ही हातभार लावा,ही विडंबने करुन मराठी माणसाला एकमेकांपासुन दुर करायला.आणि हो,अहो भावना असतात हो माणसाच्या,आता देवाने आम्हाला विचित्र बनवल त्यात आमचा काय दोष? तुम्ही लोकांनी आमच्या हसण्यावरचं तोंडसुख घेतले,म्हणजे हद्द झाली हो! तुमचा व सर्व प्रतिसादकर्तांचा निषेध!!

शानबा, कृपया हे विडंबन व्यक्तिगतरीत्या न घेणे. यातून थोडीशी टिंगलटवाळी करण्याचा हेतू होता. थोड्याशा गुदगुल्या, कोपरखळ्या, चिमटे मैत्रीच्या भावनेने काढण्याचा प्रयत्न होता. शक्यतो लेखनावर फोकस करून लेखनाची चेष्टा करणे इतपतच. ते लेखन करणाऱ्या व्यक्तीच्या वैयक्तिक गुणदोषांबद्दल लिहायचं नव्हतं. जर तुम्ही अजाणतेपणाने दुखावला गेला असाल तर मी दिलगीर आहे. मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाला मागे खेचतो त्याचं हे उदाहरण हे मला पटलं नाही. अशा खेळीमेळीने माणसं जवळ यायला मदत होते या मताचा मी आहे. मी माझ्या स्वतःच्या कवितेचं देखील विडंबन केलेलं आहे. याहीआधी स्वतःचं विडंबन करणारी कविता लिहिलेली आहे.