रस्त्यावरून या तू
चालू नकोस आता
निक्षून ती म्हणाली
हातात हात होता
(आला सुवास तोच
ती बैसता समीप
पण साठवू कसा तो
मन क्षुब्ध, हात कंप)
हळवे जुने तमाम
तू आठवू नको ते
कसलाच अर्थ नाही
उरला न जीव तेथे
नाही मी राहिले ती
तूही आता निराळा
वेड्या मनास लागे
वेडा निरर्थ चाळा
मैत्री असेल अपुली
भेटू अधूमधून
नजरेस मात्र ठेव
अपुल्या जरा जपून
नजरेत ना दिसू दे
ती ओल पावसाची
एकांत तो मनस्वी
ती रात्र मीलनाची
वळुनी न पाहताही
तत्काळ ती निघाली
मी आर्त, स्तब्ध, सुन्न
दाटून रात्र आली
---
झाला बराच वेळ
आहे इथे बसून
तो गंध ओळखीचा
आहे इथे अजून
(टीप: आम्हाला इतपतच काव्य येते)
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
7131
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
ल ई डें ज र हाये भौ...
हो
In reply to ल ई डें ज र हाये भौ... by कर्नलतपस्वी
बाब्बो!! अंगावर काटा आला.
In reply to हो by चलत मुसाफिर
हो
In reply to बाब्बो!! अंगावर काटा आला. by राजेंद्र मेहेंदळे
साठ-सत्तरचा दशकातले भग्नर्हदयी दिवाणे ...
In reply to बाब्बो!! अंगावर काटा आला. by राजेंद्र मेहेंदळे
खुप
झाला बराच वेळ
धन्यवाद
आवडली!
धन्यवाद
In reply to आवडली! by राघव
या कवितेवरून आणि वृत्तावरून एका कवितेची आठवण झाली.
खूपच छान ओळी
In reply to या कवितेवरून आणि वृत्तावरून एका कवितेची आठवण झाली. by हणमंतअण्णा शंक…
छान.. छानच
धन्यवाद
In reply to छान.. छानच by सागरसाथी
छानच कविता
मनःपूर्वक धन्यवाद
In reply to छानच कविता by सौन्दर्य
मनःपूर्वक धन्यवाद
In reply to छानच कविता by सौन्दर्य